Annasaheb Waghire College | विद्यार्थ्यांनो झोप उडविणारी स्वप्ने बाळगा |  यशवंत शितोळे

Categories
Education पुणे महाराष्ट्र

विद्यार्थ्यांनो झोप उडविणारी स्वप्ने बाळगा |  यशवंत शितोळे

“विद्यार्थ्यांनी झोप उडविणारी स्वप्ने बाळगायला हवी. आपल्या नजरेतील स्वप्ने हातातील मोबाईला दाखवा. जगात कोणतेही संकट सांगून येत नाही. बौद्धिक, शारीरिक, मानसिक क्षमता ओळखून स्पर्धा परीक्षांच्या तयारीला लागा. वयाच्या कोणत्या वर्षी अधिकारी किंवा यशस्वी उद्योजक व्हायचे हे आधीच ठरवून तयारीला लागले पाहिजे. दिवसातील 24 तासांचे योग्य नियोजन केल्यास सर्व काही शक्य आहे, जगातील कोणतीही गोष्ट कठोर परिश्रमाने आपण शक्य करू शकतो” असे आवाहन महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान आणि सहायता कक्षाचे अध्यक्ष श्री यशवंत शितोळे यांनी विद्यार्थ्यांना केले.

ओतूर येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात, एकदिवसीय स्पर्धा परीक्षा उद्बोधन कार्यशाळेत ते बोलत होते.

सदर कार्यशाळेत महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान आणि सहायता कक्षाच्या मार्फत आयोजित “करिअर कट्टा” उपक्रमा अंतर्गत ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

जीवनात वेळेला खूप महत्व आहे, विद्यार्थ्यांनी वेळेच्या सदुपयोग करून स्वतःसह आपल्या पालकांचे स्वप्न साकार करावे, वेळ पुन्हा पुन्हा येत नाही. करिअर कट्टा च्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना अत्यल्प दरात कोणत्याही परीक्षेची तयारी करण्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाची सोय केलेली आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचे सोने करावे इत्यादी माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या कार्यशाळेत अध्यक्षतेस्थानी उपप्रचार्य डॉ. एस. एफ. ढाकणे होते. व्यासपीठावर उपप्रचार्य डॉ. के. डी. सोनावणे, डॉ. व्ही. एम. शिंदे, समन्वयक डॉ. नंदकिशोर उगले, मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संतोष वाळके, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. सुनील लंगडे, मराठी विभाग प्रमुख डॉ. वसंतराव गावडे, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. अमोल बिबे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. विनायक कुंडलिक, डॉ. रमेश काशीदे, डॉ. निलेश काळे, डॉ. भूषन वायकर, शिक्षकेतर कर्मचारी श्री. सतीश दांगट, श्री. सुरेश थोरात इत्यादींनी परिश्रम घेतले.

कार्यशाळेच्या समारोपानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभिप्राय घेऊन विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रमाणपत्र दिले

SSPU | Navratri | सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (SSPU) तर्फे नवरात्री उत्साहात साजरी

Categories
Breaking News cultural Education पुणे

सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (SSPU) तर्फे नवरात्री उत्साहात साजरी

सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (SSPU) तर्फे नवरात्रीनिमित्त दरवर्षीप्रमाणे सरस्वती पूजन करण्यात आले. हे सरस्वती पूजन एसएसपीयु इमारतीच्या आवारात दि. ०३.१०.२०२२ रोजी करण्यात आले.

एसएसपीयुच्या स्कूल ऑफ ब्युटी अँड वेलनेसच्या विद्यार्थिनींनी यावेळी नवदुर्गा स्वरूपात वेषभूषा धारण केली. ज्यामध्ये कुंडलिनी उर्जेच्या नऊ चक्रांचे प्रतीक आहे. तसेच यामध्ये व्यक्तीचे आरोग्य, समृद्धी आणि मानसिक आरोग्य याचे प्रतिबिंब दर्शविले जाते. यावेळी डॉ. स्वाती मुजुमदार ( प्र- कुलपती- सिंबायोसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी) यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. सरस्वती पूजनच्या वेळी डॉ. गौरी शिऊरकर (प्रभारी कुलगुरू – सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी) आणि एसएसपीयूचा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता. यावेळी गणपतीची आरती, देवीची आरती, श्लोक यांचे गायन करण्यात आले. नवरात्रीच्या निमित्ताने डॉ. स्वाती मुजुमदार यांनी सर्व एसएसपीयुच्या कर्मचारी वर्गाला नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीने नवरात्रीचा उत्सव हा खूप आनंदाने, जोशपूर्ण साजरा करण्यात आला आहे.

Gov will pay the fee | कोरोनामुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांचा कोर्स पूर्ण होईपर्यंतची फी भरणार

Categories
Breaking News Education Political social महाराष्ट्र

कोरोनामुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांचा कोर्स पूर्ण होईपर्यंतची फी भरणार

– उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई| कोरोनामुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांचा आता जो कोर्स (अभ्यासक्रम) आहे (उदा. मेडीकल, इंजिनिअरींग किंवा इतर कोणताही) तो अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत पूर्ण शुल्क राज्य शासन भरेल. तो अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत फी सरकारच्या वतीने भरली जाईल त्यासाठी कोणताही वेगळा निर्णय करण्याची आवश्यकता नाही, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तारांकित प्रश्नाचे उत्तर देताना दिली.

कोरोनामुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांचे पदवी व पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण होईपर्यंतचे संपूर्ण शुल्क माफ करण्याचा निर्णयाबद्दल शासनाने कोणती कार्यवाही केली. याबाबत विधानसभा सदस्य शिरीष चौधरी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री श्री.पाटील बोलत होते.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले, कोरोनामुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांचे पदवी व पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंतची संपूर्ण फी माफ करण्याबाबत सर्व अकृषी विद्यापीठांना निर्देश देण्यात आलेले आहेत. आतापर्यंत ९३१ पदवी अभ्यासक्रमातले विद्यार्थी, २०० पदवी अभ्यासक्रमातले विद्यार्थी आणि २२८ पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थी यांना २ कोटी ७६ लाख ८४ हजार २२२ रक्कम वितरीत करण्यात आली आहे, अशी माहिती मंत्री श्री.पाटील यांनी विधानसभेत दिली.

Ph.D | Prof. Adinath Bhakad | प्रा.आदिनाथ भाकड यांना हिंदी विषयात पीएच.डी प्रदान

Categories
Breaking News Education पुणे

प्रा.आदिनाथ भाकड यांना हिंदी विषयात पीएच.डी प्रदान

पुण्यातील मराठवाड़ा मित्र मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स,डेक्कन जिमखाना, पुणे येथील हिंदी विषयाचे शिक्षक श्री. आदिनाथ शेषराव भाकड यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मानव्याविद्या शाखा अंतर्गत हिंदी विषयातील पीएच.डी पदवी प्रदान करण्यात आली.

भाकड यांनी “इक्कीसवीं सदी के आदिवासी उपन्यासों का विश्लेषणात्मक अध्ययन”(प्रातिनिधिक हिंदी उपन्यासों के परिप्रेक्ष्य में)या विषयावरील शोध प्रबंध विद्यापीठाला सादर केला होता.त्यांना पीएच. डी.पदवी संशोधन कार्यासाठी अहमदनगर महाविद्यालयातील तुलनात्मक साहित्याचे अभ्यासक प्रा.डॉ.साताप्पा चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.

प्रा.भाकड हे शेतकरी कुटुंबातील असून त्यांचे शिक्षण हे ग्रामीण भागात झाले आहे.ते अत्यंत मेहनती आहेत. त्यांचे अनेक संशोधन लेख राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय शोध पत्रिकांमधून प्रकाशित झाले असून त्यांचे संदर्भ ग्रंथ विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत. विविध पुरस्कारांनी सन्मानित प्रा.भाकड यांच्या या यशाबद्दल मराठवाडा मित्र मंडळ संस्थचे कार्याध्यक्ष श्री.बी.जी.जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवीदास गोल्हार, अहमदनगर कॉलेजचे प्राचार्य डॉ.आर.जे. बार्नबस, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हिंदी विभाग प्रमुख डॉ.विजयकुमार रोडे, डॉ. महेश दवंगे, युवा नेते संजय डोळसे,डॉ दिलीप नलगे, रस्तापुर वि. सहकारी सोसायटीचे माजी चेअरमान सुखदेव भाकड, रस्तापुर वि. सहकारी सोसायटीचे संचालक भरत भाकड यांनी अभिनंदन केले.

भाकड यांना यापूर्वी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून त्याच्या शैक्षणिक वाटचालीचे समाजातील विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

Annasaheb Waghire College | ओतूर येथील अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा विद्यापीठाच्या राज्यस्तरीय वारीमध्ये सहभाग

Categories
Breaking News Education पुणे

ओतूर येथील अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा विद्यापीठाच्या राज्यस्तरीय वारीमध्ये सहभाग

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २२ जुन ते १० जुलै २०२२ या कालावधीमध्ये पुणे ते पंढरपूर या दरम्यान विद्यापीठाच्या वतीने राज्यस्तरीय वारीचे आयोजन करण्यात आले.

स्वच्छ वारी, स्वस्थ वारी, निर्मल वारी, हरित वारी, लोकशाही वारी व कोरोना मुक्त वारी तसेच वृक्षदिंडी चे आयोजन वारी मार्गावर करण्यात आले होते. सदर वारीच्या निमित्ताने वारी मार्गावर मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो या थीमवर अधारीत पथनाट्याचे पालखी मार्गावर १८ ठिकाणी सादरीकरण करण्यात आले. सदर पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे काम केले. सदर वारीमध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर मधील हरीश चौधरी, हर्षल जाधव, सचिन दिवेकर व मनोज गायकर या स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन जनजागृती चे काम केले.

वारीमध्ये सहभागी झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ अभय खंडागळे यांनी सर्व स्वयंसेवकांचे प्रमाणपत्र देऊन अभिनंदन व कौतुक केले. सदर प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ एस एफ ढाकणे, रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ व्ही एम शिंदे, मराठी विभाग प्रमुख डॉ व्ही वाय गावडे, हिंदी विभाग प्रमुख डॉ डी एम टिळेकर व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ अमोल बिबे उपस्थित होते.

Scholarship exams | अतिवृष्टीमुळे शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली 

Categories
Breaking News Education पुणे महाराष्ट्र

अतिवृष्टीमुळे शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली

परीक्षा आता 31 जुलै रोजी

पुणे | महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या (आठवी) तारखा बदलण्यात आल्या असून आता 20 जुलै ऐवजी 31 जुलै 2022 रोजी घेण्यात येणार आहेत.

या परीक्षा राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये 20 जुलै रोजी एकाच दिवशी घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पुरसदृश्य स्थिती व बहुतांश ठिकाणी भुस्खलनामुळे वाहतूक बंद असल्याने विद्यार्थ्यांना दळणवळणास येणाऱ्या अडचणी, विद्यार्थी हित व त्यांची सुरक्षा लक्षात घेता परीक्षा रविवारी 31 जुलै 2022 रोजी घेण्यात येणार आहे.

परीक्षेसाठी यापूर्वी निर्गमित करण्यात आलेले प्रवेशपत्र 31 जुलै च्या परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येईल,असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी कळविले आहे.

Pavitra Portal | पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरु

Categories
Breaking News Education पुणे महाराष्ट्र

पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरु

पुणे | राज्यातील शिक्षक पदांची भरती प्रक्रियेची कार्यवाही पवित्र प्रणालीमार्फत सुरु करण्यात आली आहे. सद्यस्थितीत 196 व्यवस्थापनांतील सुमारे 769 पदांसाठी एसईबीसी आरक्षणाच्या जागा इडब्लूएस/खुल्या प्रवर्गात रुपांतरीत करुन पदभरतीची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी 17 जुलै 2022 पर्यंत आपले प्रमाणपत्र अद्ययावत करावेत, असे शिक्षण उपसंचालक डॉ. श्रीराम पानझाडे यांनी कळविले आहे.

पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक भरतीसाठी 2 सप्टेंबर 2021 रोजी 561 खाजगी व्यवस्थापनाच्या 2 हजार 62 रिक्त पदांसाठी मुलाखतीसह पर्यायांतर्गत 3 हजार 902 पात्र उमेदवारांची शिफारस करण्यात आली होती. प्रमाणपत्र अद्ययावत केल्यानंतर उमेदवारांकडून उपलब्ध रोस्टर व विषय विचारात घेऊन त्याच्या शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेनुसार प्राधान्यक्रम उपलब्ध करुन देण्यात येईल.

एकूण 196 व्यवस्थापनाच्या सुमारे 769 रिक्त पदांसाठी 1:10 या मर्यादेत उमेदवार उपलब्ध करुन दिले जातील. मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी एकूण 30 गुण असतील. उमेदवारांची अंतिम निवड 30 गुणांच्या आधारे आरक्षण व विषय विचारात घेऊन केली जाईल.

100 percent syllabus | चालू शैक्षणिक वर्षापासून पहिली ते 12 वी साठी 100 टक्के पाठ्यक्रम लागू

Categories
Breaking News Education social महाराष्ट्र

चालू शैक्षणिक वर्षापासून पहिली ते 12 वी साठी 100 टक्के पाठ्यक्रम लागू

मुंबई | शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून इयत्ता पहिली ते 12 वी साठी 100 टक्के पाठ्यक्रम लागू करण्यास शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

मार्च 2020 पासून कोविड-19 च्या प्रादूर्भावामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये शाळा ऑनलाईन स्वरूपामध्ये सुरू होत्या. तसेच प्रत्यक्ष शाळेत अध्ययन-अध्यापन मर्यादित स्वरूपात होत असल्याने या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांवरील अध्ययनाचा ताण कमी व्हावा यादृष्टीने शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये इयत्ता पहिली ते 12 वी चा पाठ्यक्रम 25 टक्के कमी करण्यात आला होता. तसेच ही परिस्थिती कायम राहिल्याने कमी केलेला पाठ्यक्रम 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी देखील कायम ठेवण्यात आला होता.