Maharashtra Politics | विरोधी पक्षांनाच सत्ताधाऱ्यांबरोबर बसण्याची हाव असेल तर लोकशाहीचा गाडा टिकेल कसा? आणि मग युवकांचा राजकारणातला रोल मॉडेल कोण असणार?

Categories
Breaking News Political social देश/विदेश महाराष्ट्र संपादकीय

Maharashtra Politics | विरोधी पक्षांनाच सत्ताधाऱ्यांबरोबर बसण्याची हाव असेल तर लोकशाहीचा गाडा टिकेल कसा? आणि मग युवकांचा राजकारणातला रोल मॉडेल कोण असणार?

Maharashtra Politics | (Author: Ganesh Mule) | लोकशाहीचे (Democracy) जसे चार महत्वाचे स्तंभ आहेत, अगदी त्याचप्रमाणे आणि किंबहुना त्याहूनही महत्वाचा लोकशाहीचा आधार हा विरोधी पक्ष (Opposition Party) असतो. मात्र विकासाचे कारण देत तोच विरोधी पक्ष जर सत्ताधाऱ्या (Ruling Party) सोबत हातमिळवणी करून सत्तेत बसू लागला तर हा लोकशाहीचा गाडा टिकेल कसा? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. शिवाय महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने अशाच गोष्टी घडत चालल्या आहेत. त्यामुळे युवकांचा (Youth) राजकारणावरील विश्वास उडत चालला आहे. त्यामुळे आम्ही राजकारणात रोल मॉडेल (Roll Model) म्हणून कुणाकडे पाहायचे, असा संभ्रम राजकारणात येऊ पाहणाऱ्या आणि सर्वसामान्य युवकांना पडला आहे. (Maharashtra Politics)
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसापासून वेगवेगळ्या गोष्टी घडत आहेत. ज्या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच्या आहेत. जे काही घडतं त्यामुळे लोक फक्त सुन्न होतात. सुरुवातीला भाजप (BJP) हा मोठा पक्ष असून देखील भाजपला सत्ता स्थापन करता आली नाही. मुख्यमंत्री कुणाचा असणार, या मुद्द्यावर शिवसेनेने भाजपचा हात सोडला. त्यामुळे महाविकास आघाडी सत्तेवर आली. यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा सगळ्यात मोठा हात होता. काँग्रेस (INC), शिवसेना (Shivsena)आणि राष्ट्रवादीने (NCP) सत्ता स्थापन केली. मात्र हे सहन न झाल्याने आणि विरोधी पक्षात बसण्याची वेळ आलेल्या भाजपने कुरघोड्या करायला सुरुवात केली. यात सगळ्यात आघाडीवर होते ते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis). फडणवीस हे पवारांना शह देतात म्हणून त्यांची लोकप्रियता वाढू लागली होतीच. शिवाय त्यांना केंद्राकडून देखील साथ मिळत असल्याने त्यांचे महाराष्ट्रात वर्चस्व वाढत चालले होते. (Maharashtra Political Crisis)
मग फडणवीस यांनी आपले बुद्धिचातुर्य चालवत आणि गनिमी कावे करत शिवसेनेत उभी फूट पाडली. उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) सेना एकाकी पडली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या बंडाने शिवसेना तर फुटलीच मात्र महाविकास आघाडीला देखील आपली सत्ता राखता आली नाही. मग भाजप आणि शिंदे यांनी ठाकरेंचं उरलं सुरलं देखील सगळं हिरावून घेतलं. बंडखोरी केलेली सगळी लोकं ही ED आणि तत्सम यंत्रणांना घाबरलेली होती. फक्त हेच लोक नाही तर काँग्रेस, उद्धव यांची सेना आणि राष्ट्रवादीतील लोकांच्या मागे देखील यंत्रणा लावल्या जात होत्या. कुठल्याही पद्धतीने दबाव आणून विरोधी पक्ष कमकुवत करायचा हा चंग बांधून भाजपने कुरघोड्या सुरु ठेवल्या.
याचाच परिणाम म्हणून राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी (Ajit Pawar) नुकतेच बंड केले. विरोधी पक्षात असणारा राष्ट्रवादी मग  लगेच सत्ताधारी झाला. शरद पवारांना हे माहित होते कि नाही, हे पुढे उघड होईलच. मात्र या सगळ्या घटनांमुळे मात्र सर्वसामान्य लोक, युवक यांचा मात्र राजकारणावरील विश्वास उडत चालला आहे. शिवाय सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवणारा विरोधी पक्ष जर सत्तेच्या दावणीला बांधला जात असेल तर लोकशाहीचा गाडा कसा टिकणार? लोकांच्या आशेचा किरण कोण असेल? असे प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडू लागले आहेत.
जे चाललंय ते सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेरचं आहे, हे याचमुळे. कारण काँग्रेस ला कंटाळून लोकांनी भाजपला मोठा पक्ष बनवलं. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना आपल्या आशेचा किरण मानलं. मात्र भाजपने लोकांच्या हिताची भूमिका घेतली असं दिसून येत नाही. भ्रष्टाचारी लोकांच्या मागे यंत्रणा लावल्या म्हणून लोकांना भाजपविषयी आदर वाटू लागला. पण कालांतराने भाजपने त्याच लोकांना आपल्या पक्षाचा आश्रय देत त्यांना मंत्री केलं. त्यामुळे लोकांना यातला नेमका बोध कळेना. तसेच शरद पवार यांचं महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील मक्तेदारी मोडून काढणारा नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं जाऊ लागलं. मात्र त्यांच्या कुरघोड्या पाहता ते लोकांसाठी कमी आणि सत्तेसाठी चिटकून राहण्यासाठी सर्व गोष्टी करतात, हे लक्षात येऊ लागलं. शरद पवारांच्या नेहमीच्या बदलत्या भूमिकेमुळे लोकांचा त्यांच्यावर विश्वास उरला नाही. कालच्या प्रकरणात आपला हात नाही, असं शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलेलं असलं तरी लोकं आता त्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत.
सत्ताधाऱ्यांनी लोकांचं, लोक काय बोलतात यावर फार लक्ष द्यायचं नसतं आणि आपला अजेन्डा चालवायचा असतो, अशी एक रीत पडून गेली आहे. मात्र  विरोधी पक्षानं लोकांची बाजू घेऊन लोकांचे प्रश्न मांडून त्यांना न्याय मिळवून द्यायचा असतो, हे देखील सोयीस्कर रित्या विसरले जात आहे. अशा परिस्थितीत उत्साहाने राजकारणात येऊ पाहणाऱ्या नवख्या युवकांनी नेमकं कुणाला आदर्श मानायचं? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.
यात लोकांनाच अग्रणी भूमिका घ्यायला हवीय. राजकारणातून आपला फार विकास होत नसतो, हे आता तरी लोकांनी लक्षात घ्यायला हवंय. आपला विकास आपल्यालाच करावा लागतो. आपल्याशिवाय आपल्याला कुणी वाचवू शकत नाही, हे सूत्र लक्षात घेऊन आणि राजकारणाकडे दुर्लक्ष करून लोकांनी स्वविकास करून घ्यायला हवाय.

सर्वच राजकीय पक्ष म्हणतात, तरुणांनी राजकारणात आले पाहिजे पण युवा वर्गाने कोणाचा आदर्श घ्यावा हाच मोठा प्रश्न आज निर्माण झाला आहे. ज्यांचा आदर्श घ्यावा अशी व्यक्तिमत्वे कधी एका पक्षात तर कधी दुसऱ्या पक्षात हे वास्तव सद्यस्थितीत आहे आणि  पक्षाची ध्येयधोरणे काय ? या मुद्द्याला तिलांजली दिली जात असल्याचे वास्तवही आहे.त्यामुळे युवा वर्गाने राजकारणात यावे ही साद एकीकडे घातली जात आहे आणि दुसरीकडे जनहितासाठी आवश्यक असणारा विरोधी पक्ष कायमचा हद्दपार करण्याचे डावपेच सुरू आहेत त्यासाठी राजकारणात फोडाफोडीचे राजकारण तर खुलेआम होत आहे मात्र विकासाच्या नावाखाली स्वार्थ साधला जात असेल तर लोकहिताचा विचार कुणीच करत नाही असेच म्हणावे लागेल.

– हेमंत बागुल, काँग्रेस कार्यकर्ता.
——
Article Title | Maharashtra Politics |  If only the opposition parties want to sit with the rulers, how can the car of democracy survive?  And then who will be the role model of the youth in politics?

Ajit Pawar Maharashtra Tour | विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून शरद पवारांच्या निर्णयाचे स्वागत

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

Ajit Pawar Maharashtra Tour | विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून शरद पवारांच्या निर्णयाचे स्वागत

| विरोधी पक्षनेते अजित पवार उद्यापासून आठ दिवस पुणे, सातारा, उस्मानाबाद, लातूर, नाशिक दौऱ्यावर 

Ajit Pawar Maharashtra Tour | शरद पवार (Sharad pawar) साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम रहावे हा राज्यातील, देशातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांचा आग्रह मान्य करुन पदावर कायम राहण्याचा घेतलेला निर्णय माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) प्रत्येक कार्यकर्त्याचा उत्साह वाढवणारा, राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडी, देशातील विरोधी पक्षांच्या एकजुटीला बळ देणारा आहे. साहेबांनींच राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम रहावे, असा आग्रह धरत, अध्यक्ष निवड समितीने साहेबांच्या निवृत्तीचा निर्णय फेटाळून लावला आणि साहेबांनीच अध्यक्षपदी कायम रहावे, (NCP president) हा निर्णय एकमताने घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे एक कुटुंब असून साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्ष राज्यात आणि देशात उज्जवल यश संपादन करेल,” असा विश्वास व्यक्त करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. (NCP president News)
 साहेबांनी राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहण्याचा निर्णय आपल्या सर्वांच्या आग्रहाखातर घेतला असून त्यांचे वय आणि प्रकृतीची काळजी घेऊन आपण सर्वांनी येणाऱ्या काळात अधिक जबाबदारी उचलावी, एकजुटीने आणि अधिक जोमाने काम करावे, साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करावा, असे आवाहनही अजित पवार यांनी केले आहे. (Ajit pawar news)
साहेबांच्या सकारात्मक निर्णयानंतर आम्ही सर्वजण आता पुन्हा नव्या जोमाने पक्षाच्या कामाला लागलो आहोत. आज उशीरापर्यंत मुंबईत थांबल्यानंतर उद्या 6 तारखेला मी दौंड, कर्जत दौऱ्यावर जात आहे. 7 तारखेला बारामती, 8 तारखेला कोरेगाव, सातारा, 9 तारखेला सातारा, फलटण. 10 तारखेला उस्मानाबाद, लातूर, 11 तारखेला नाशिक आणि 12 तारखेला पुणे असा माझा दौरा कार्यक्रम असणार आहे, अशी माहितीही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे. (Ajit pawar Maharashtra tour)
००००००

NCP Pune Celebration | पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पेढे वाटून साजरा केला आनंदोत्सव

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

NCP Pune Celebration | पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पेढे वाटून साजरा केला आनंदोत्सव

|  पवारसाहेबांच्या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवंचैतन्य – प्रशांत जगताप

NCP Pune Celebration |  “लोक माझे सांगाती” या आत्मचरित्राच्या (Lok Majhe Sangati – Autobiography) प्रकाशन प्रसंगी लोकनेते खासदार शरदचंद्रजी पवार (Sharad pawar) यांनी जाहीर केलेला पक्षाध्यक्षपद निवृत्तीचा निर्णय आज देशभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नेत्यांच्या विनंतीनंतर अखेर मागे घेतला आहे. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP Pune) पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी भवन येथे ढोल ताशांच्या गजरात, फटाके वाजवून पेढे वाटत आनंदोत्सव साजरा केला. (NCP Pune Celebration)

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी “देशाचा बुलंद आवाज…शरद पवार..शरद पवार” , “पवार साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है” , “देश का नेता कैसा हो पवार साहेब जैसा हो” अशा घोषणा देत संपूर्ण राष्ट्रवादी भवनचा परिसर दणाणून सोडला. (NCP Chief Sharad pawar)

यावेळी आनंदोत्सव साजरा करताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप (NCP Pune President prashant jagpat ) म्हणाले की, “गेली सहा दशके देशाच्या, राज्याच्या राजकारणातील ‘शरद पवार’ हे नाव कुणालाही, कुठेही थांबवता आलेलं नाही. देशाच्या कृषी, कला, क्रीडा, समाजकारण, राजकारण, संस्कृतीक व औद्योगिक क्षेत्रात आदरणीय पवारसाहेबांचे नाव मोठ्या सन्मानाने घेतले जाते. या सर्व क्षेत्रांमध्ये पवारसाहेबांनी आपल्या कार्यकाळात घेतलेले निर्णय आजही ‘आदर्शवत’ असे आहेत. आजच्या परिस्थितीमध्ये आदरणीय पवारसाहेबांची देशाला व राज्याला नितांत आवश्यकता असताना आदरणीय पवारसाहेबांनी घेतलेला हा निर्णय आम्हा कार्यकर्त्यांना धक्कादायक असाच होता.ज्यांना आदर्श मानत आमची पिढी राजकारणात आली,त्या नेतृत्वाच्या छायेत काम करत असताना त्या नेतृत्वाकडून अचानक पक्षाध्यक्षपद सोडण्याची घोषणा ऐकून कुठल्याही कार्यकर्त्याला आपल्या भावना आवरता येणार नाहीच,अशी परिस्थिती असताना कार्यकर्त्यांच्या मतांचा विचार करत आदरणीय साहेबांनी आज आपला निर्णय मागे घेतला आहे. आदरणीय साहेबांचा आधार पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्यांला हवा आहे. देश एका अराजकतेच्या उंबरठ्यावर असताना आदरणीय साहेबांनी हा निर्णय मागे घेतल्याने, देशातील परिवर्तनाची ही लढाई जिंकण्यासाठी आता आम्ही सर्वजण सज्ज आहोत. (NCP Pune News)

आदरणीय साहेबांनी आपला निर्णय मागे घेतल्याबद्दल साहेबांचे आम्ही मनापासून आभारी आहोत.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, दिपकभाऊ मानकर, दत्ताभाऊ सागरे, किशोर कांबळे, महेश हांडे, सुषमा सातपुते, समीर शेख, संदीप बालवडकर, गणेश नलावडे, राजश्री पाटील, नाना नलावडे, आनंद सागरे, भक्ती कुंभार , कुलदीपशर्मा , रोहन पायगूढ़े, फहीम शैख़ यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

NCP President Sharad Pawar | माझ्या निर्णयाची कल्पना अजित पवार यांना दिली होती | शरद पवार 

Categories
Breaking News Political देश/विदेश महाराष्ट्र

NCP President Sharad Pawar | माझ्या निर्णयाची कल्पना अजित पवार यांना दिली होती | शरद पवार 

| शरद पवारांची सर्वात मोठी घोषणा | राजीनाम्याचा निर्णय मागे

 

NCP President Sharad Pawar | लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मचरित्राच्या प्रकाशन समारंभात शरद पवार (Sharad pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचा अनपेक्षित निर्णय जाहीर केला. याची कोणालाच कल्पना नव्हती. त्यामुळे कार्यकर्ते सैरभैर होताना दिसले. मात्र अजित पवारांना (Ajit Pawar) या निर्णयाची कल्पना होती. असे शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. (NCP Chief Sharad pawar Marathi news) 

| काय म्हणाले शरद पवार?

– संघटनात्मक बदल करणार. जबाबदारीचे पद घेणार नाही

-पक्षात उत्तराधिकारी निर्माण व्हायला हवाय

-पक्षासाठी आणखी जोमानं काम करणार

-अजित पवार यांनीही राजीनामा मागे घेण्याची विनंती केली

-महाविकास आघाडीवर कसलाही परिणाम पडणार नाही

-सुप्रिया सुळे राष्ट्रीय अध्यक्ष होणार, यात तथ्य नाही.

-राष्ट्रवादीचे नेते भाजपात जाऊ इच्छितात हे खोटे आहे.

-राहुल गांधी यांनीही माझ्याशी चर्चा केली. महाविकास आघाडीत आम्ही एकत्र काम करणार

-माझ्या निर्णयाची कल्पना अजित पवार यांना दिली होती.

(Sharad pawar Marathi news)

NCP Pune Resigns news |  Finally all office bearers of NCP in Pune resigned

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

NCP Pune Resigns news |  Finally all office bearers of NCP in Pune resigned

NCP Pune Resigns  news |  NCP President Sharad Pawar has announced his resignation from the post of President.  The news was heard and all office bearers of NCP Pune in Pune resigned.  Activists gathered at NCP Bhavan to protest Sharad Pawar’s resignation.  All the activists present led by spokesperson Pradeep Deshmukh were present outside the party office.  (NCP Pune Resigns news)
 Speaking on the occasion, Deshmukh said, NCP is a family.  Pawarsaheb is the patriarch of the house.  A family elder can never retire.  Therefore, we are all adamant on resignation till the time sir does not change the decision.  (Sharad Pawar Latest News)
 All the workers were overwhelmed with emotions at this time. Tears were not stopping.  Announcements were being made to withdraw the resignation.  (NCP Pune Resigns news)
 Spokesperson Pradeep Deshmukh, Ravindra Malwadkar, Sadanand Shetty, Munalini Vani, Nilesh Nikam, Kaka Chavan Ajinkya Palkar, Vikram Jadhav, Faim Sheikh, Gurumit Singh Gill and other prominent activists were present in large numbers.  (Pune Rashtravadi news)