Bhide Wada Smarak High Court | उच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे सावित्रीबाई फुलेंना मानवंदना : डॉ. सिद्धार्थ धेंडे

Categories
Breaking News Political social पुणे

Bhide Wada Smarak High Court | उच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे सावित्रीबाई फुलेंना मानवंदना : डॉ. सिद्धार्थ धेंडे

– भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक होण्याचा मार्ग मोकळा ; पुणे महापालिकेकडे हस्तांतरणाचा न्यायालयाचा निर्णय

 

Bhide Wada Smarak High Court | भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक (Bhide wada National Memorial) होण्याचा अंतिम मार्ग मोकळा झाला आहे. भिडे वाड्याचे पुणे महापालिकेकडे (pune Municipal Corporation) हस्तांतरण करण्याचा निर्णय उच्च  न्यायालयाने (High Court) दिला आहे. असंख्य सामाजिक संघटना, नेत्यांनी दिलेल्या लढ्याचे हे यश आहे. न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे नवरात्री मध्ये सावित्रीबाई फुलेंना (Savitribai Phule)  खऱ्या अर्थाने दिलेली मानवंदना आहे, अशी भावना पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे (Dr Siddharth Dhende) यांनी व्यक्त केली. (Bhide Wada National Memorial High Court)

महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भिडेवाडा येथे देशातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. ही वास्तू सामाजिक, ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे ; मात्र त्या वास्तूचे योग्य प्रकारे जतन होत नसल्याची तक्रार होती. त्याचे जतन करून राष्ट्रीय स्मारक करा, अशी मागणी सामाजिक संघटना करत आहेत. सामाजिक संघटनांच्या दबावामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने स्मारकासाठी 50 कोटींची तरतूद केली होती. मात्र काही तांत्रिक अडथळ्यांमुळे प्रत्यक्ष स्मारक उभारले न्हवते. (Pune Bhide Wada News)

भिडे वाडा महापालिकेकडे हस्तांतरण करावे यासाठी न्यायालयीन प्रक्रियेत हे प्रकरण प्रलंबित होते. विविध सामाजिक संस्था संघटना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यासाठी लढा देत होते. त्या लढ्याला अखेर यश आले आहे. उच्च न्यायालयाने भिडे वाडा पुणे महापालिकेकडे हस्तांतरण करण्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे या ठिकाणी ज्ञानार्जनाला अभिप्रेत असणारे राष्ट्रीय स्मारक उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे ज्यांच्यामुळे स्त्रियांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम झाले आहे. त्या सावित्रीबाई फुलेंना या निर्णयामुळे मानवंदना मिळाली असल्याचे डॉ. धेंडे म्हणाले. (Bhide Wada Smarak Pune)
—————————

रिपाइच्या वतीने पेढे वाटून आनंदोत्सव –

भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी आरपीआयच्या वतीने लढा देण्यात आला. त्यामुळे उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे. भिडे वाडा येथे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून पेढे वाटून आनंद साजरा केला.

True Voter App | ट्रु व्होटर ऍप योग्य पद्धतीने काम करीत नाही | डॉ सिद्धार्थ धेंडे 

Categories
Breaking News PMC पुणे

ट्रु व्होटर ऍप योग्य पद्धतीने काम करीत नाही | डॉ सिद्धार्थ धेंडे

पुणे | अनेक प्रभागातील मतदारांची नावे मोठ्या प्रमाणावर दुसर्‍या प्रभागाच्या मतदार यादीत (PMC Prabhag Ward Voting List) गेले आहे. एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींची नावे वेगवेगळ्या तीन प्रभागांच्या मतदार यादीत समाविष्ट केली गेली आहेत. तसेच ट्रु व्होटर हे ऍपही योग्य पद्धतीने काम करीत नाही, यामध्येही त्रुटी असल्याचे आयुक्त विक्रम कुमार यांच्या निदर्शानास आणून दिल्याचे डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी सांगितले.

प्रभाग निहाय प्रारुप यादीवर हरकती आणि सुचना नोंदविण्यासाठी ३ जुलैपर्यंत मुदत होती. शेवटच्या दिवशी दोन हजाराहून अधिक हरकती आणि सुचना दाखल झाल्या आहे. मतदार यादीतील त्रुटीबाबत यापुर्वी भाजपच्या पदाधिकार्‍यांनी आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली होती. तर सोमवारी आरपीआयचे शहराध्यक्ष शैलेश चव्हाण (RPI Shailesh Chavan), माजी उपमहापौर सुनीता वाडेकर (Sunita Wadekar), डॉ. सिध्दार्थ धेंडे (DR Siddharth Dhende), प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव (Balasaheb Janrao), पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष परशुराम वाडेकर (Parshuram Wadekar) यांनी आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner and Administrator Vikram Kumar) यांची भेट घेऊन त्रुटीविषयी माहीती दिली. तसेच हरकती आणि सुचना नोंदविण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली. या मागणीला आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असुन, राज्य निवडणुक आयोगाकडे पत्राद्वारे मागणी केली जाणार असल्याचे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितल्याचे डॉ. धेंडे यांनी पत्रकार परीषदेत नमूद केले.

Code Of Conduct | आदर्श आचारसंहिता पाळण्याबद्दल सर्वच राजकीय पक्षांचे एकमत

Categories
Breaking News Political पुणे

आदर्श आचारसंहिता पाळण्याबद्दल सर्वच राजकीय पक्षांचे एकमत

आज पुणे शहराचे पोलीस कमिशनर अमिताभजी गुप्ता यांनी शहरात राजकीय पक्षांच्या सद्यस्थितीत असलेल्या वातावरणा संदर्भात सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीस राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ,भाजप ,शिवसेना ,वंचित बहुजन आघाडी, एम.आय.एम, मनसे या सर्व राजकीय पक्षांचे अध्यक्ष व प्रतिनिधी उपस्थित होते.  बैठकीत यापुढे आंदोलन करत असताना पोलिसांनी घालून दिलेली आदर्श आचारसंहिता पाळण्याबद्दल सर्वच राजकीय पक्षांचे एकमत झाले.

देशाची सांस्कृतिक व शैक्षणिक राजधानी समजल्या जाणार्‍या पुणे शहरात राजकीय पक्ष व राजकीय नेते यांची देखील एक आदर्श संस्कृती आहे. गेल्या अनेक वर्षात राज्यासह देशातील इतर शहरांमध्ये राजकीय पक्षांमध्ये अनेक चुकीच्या घटना घडल्या परंतु पुणे शहरातील राजकीय कार्यकर्त्यांनी एक आदर्श आचार संहिता जपत कितीही टोकाचे आंदोलन असले तरी कधी कुठलेही गैरप्रकार झाले नव्हते. राजकारणात राजकीय मतभेद असू शकतात विचारसरणीमध्ये भिन्नता असू शकते. परंतु विचारांची लढाई ही विचारांनीच लढली गेली पाहिजे,त्या लढाईला कुठेही गालबोट लागता कामा नये. पुण्याची हीच राजकीय संस्कृती टिकवण्यासाठी पुणे शहरातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांना एकत्र घेत घेतलेल्या या बैठकीनंतर नंतर पुणे शहरात राजकीय सलोखा टिकेल असे मत शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केले.

 

या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष  प्रशांत जगताप अंकुशअण्णा काकडे,भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक,शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे , मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर,आमदार माधुरीताई मिसाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख यांच्यासह सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

RPI : गोरगरीब व्यावसायिकांना त्रास दिल्यास शहरभर तीव्र आंदोलन छेडू : आरपीआयचा इशारा

Categories
Breaking News PMC Political पुणे

गोरगरीब व्यावसायिकांना त्रास दिल्यास शहरभर तीव्र आंदोलन छेडू

– आरपीआयचा इशारा ; शिष्टमंडळाच्या वतीने पुणे महापालिका आयुक्तांना निवेदन

पुणे : पुणे महापालिकेत प्रशासक आल्यापासून हातावर पोट असणाऱ्या व्यावसायिकांवर चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जात आहे. दुसऱ्या बाजूला राजकीय वरदहस्त असणाऱ्या मोठ्या व्यावसायिकांकडे कानाडोळा केला जात आहे. परिणामी सर्वसामान्य व्यावसायिकांमध्ये अन्यायाची भावना निर्माण होत आहे. परिणामी महापालिका कर्मचारी व छोट्या व्यावसायिकांमध्ये वादाचे प्रसंग निर्माण होत आहे. नियमानुसार बेकायदेशीर वागणाऱ्या सर्वांवरच कारवाई करणे गरजेचे आहे. मात्र विनाकारण हातावर पोट असणाऱ्या व्यावसायिकांना त्रास दिल्यास शहरभर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) वतीने दिला आहे.

पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार  यांची आरपीआयच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. या वेळी दिलेल्या निवेदनात हा इशारा दिला. तसेच विविध मागण्या मांडण्यात आल्या. या वेळी पुणे शहर अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी नगरसेवक अशोक धेंडे, नगरसेविका हिमाली कांबळे, सरचिटणीस महिपाल वाघमारे, शाम सदाफुले आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.

आरपीआयच्या वतीने दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, पुणे महापालिका कर्मचाऱ्यांवरती झालेला हल्ला अत्यंत निंदनीय आहे. त्यांचे समर्थन कोणीही करणार नाही. रिपब्लिकन पक्ष या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करीत आहे. महापालिका प्रशासक सध्या पुणे मनपामधील धोरण ठरवत आहे. महापालिकेचे काम चालवित आहेत. महापालिका कर्मचाऱ्यांना मारहाण झालेल्या घटनेच्या मुळापर्यंत गेलो तर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रशासक म्हणून आपण पदभार घेतला आहे. तेव्हापासून बेकायदेशीरपणे पथारी व्यवसाय करणारे नागरिक, बेकायदेशीरपणे झालेले बांधकाम यांचेवर कारवाई करण्याचा पहिला निर्णय घेण्यात आला. कायद्यानुसार हे बरोबर देखील आहे. परंतु कोरोनाच्या दोन वर्षामध्ये अनेक कुटुंबाची वाताहत झाली आहे. त्याचा अधिक फटका हातावर पोट असणाऱ्या व्यवसायिकांना बसला. मुलांची शाळेची फी थकलेली आहे. विविध कारणांकरिता बँकेचे कर्ज घेतले मात्र त्याचे हफ्ते रखडलेले आहे. नोकरी गमवावी लागल्याने अनेकांना हलाखीचे जीवन जगावे लागत आहे.

शहरातील गरीब कुटुंबाची जगण्याची अशी लढाई एका बाजूला चालु आहे. तर दुसऱ्या बाजूला महापालिकेचे चुकीची धोरणे हातावर पोट असणाऱ्या व्यावसायिकांच्या मानसिक तणावात भर घालत आहेत. पथपथारीवरील जिवंत माणसे काढायची आणि निर्जीव, बेकायदेशीर बांधलेले होर्डींग, राजकीय लोकांचे कार्यालय, पक्षाचे कार्यालय, विविध धार्मिक स्थळ, विविध पक्ष, संघटना, संस्था यांचे नामफलक यांच्यावर कोणीतीही कारवाई करायची नाही हे चुकीचे धोरण महापालिकेचे आहे. छोटे पथारी व्यवसायिक यांच्यवर कारवाई करताना मोठे पंचताराकिंत हॉटेल्स व मॉल मध्ये असणाऱ्या अनधिकृत बांधकामे, टेरेसवर साईट व फ्रंन्ट मार्टिनल, बेसमेंट व पार्किंग मधील चालू असलेले व्यवसाय यावर मात्र कसलीही कारवाई होत नाही. हे दुटप्पी धोरण आहे. हे देखील आपण विचारात घ्यायला पाहिजे. मनपा प्रशासक यांवर कारवाई करणार आहे का ? असा सवाल पक्षाच्या वतीने उपस्थित करण्यात आला.

बेकायदेशीरपणे झालेले व चालु असलेल्या बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश काढले. परंतु मोठे व्यवसायिक यांचेकडून अन्य बेकायदेशीरपणे झालेले बांधकाम यांना मात्र महापालिका प्रशासन अभय देत आहे. पैसेवाले, राजकीय वरदहस्त असणाऱ्यांना नियमांमध्ये सुट आहे व दुसरीकडे आर्थिक दुर्बल, राजकीय पाठींबा नसणाऱ्यांना त्रास दिला जात आहे. प्रशासक व प्रशासन यांनी फक्त एका वर्गावर अन्याय होईल असे कोणतेही धोरणांचा अवलंब करायला नको आहे. त्यांचा परिणाम हा नागरिकांमध्ये असंतोष निर्माण करण्यास पुरेसा होतो. त्यामुळेच महापालिका कर्मचारी व नागरिकांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. त्यामुळे महापालिका मधील सर्व स्तराच्या वर्गाना समान न्याय द्यावा. कोणाचेही जगण्याचे साधन हिरावून घेऊ नये. तसेच नागरीकांमध्ये भय, द्वेष निर्माण होईल अशी कृती होता कामा नये. अन्यथा रिपब्लिकन पक्ष पुणे शहरामध्ये उग्र आंदोलन करेल असा इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आला.
————–

RPI : Halima shaikh : पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन येथे RPI चा धडक मोर्चा : आठवले गटाच्या पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्याक सेल महिला आघाडीच्या अध्यक्षा हलिमा शेख यांचे नेतृत्व 

Categories
Political पुणे

पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन येथे RPI चा धडक मोर्चा

आठवले गटाच्या पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्याक सेल महिला आघाडीच्या अध्यक्षा हलिमा शेख यांचे नेतृत्व

पुणे : वडगाव बुद्रुक येथील जमीन खरेदी- विक्री व्यवसायीक विठ्ठल नामदेव पांगारे यांच्या समर्थनार्थ तसेच पांगारे यांना मिळत असलेल्या धमकी व पैशे मागणीच्या निषेधार्थ मंगळवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्याक सेल महिला आघाडीच्या अध्यक्षा हलिमा शेख यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन, पुणे येथे धडक मोर्चा काढण्यात आला व सदर विषयाचे निवेदन देण्यात आले.

सदर विषयाची तक्रार विठ्ठल नामदेव पांगारे यांनी धायरी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या तक्रारींमध्ये बाजीराव दामोदर रायकर, विनोद बाजीराव रायकर, ऋषीकेश बाजीराव रायकर, पांडुरंग रायकर, ओंकार रायकर, ऋतुजा रायकर, शांताराम रायकर, सुजीत रायकर, रुपाली झगडे, अभिजीत रायकर, रविंद्र रायकर, अक्षय रायकर, अक्षता रायकर, लीलाबाई रायकर, संदीप रायकर, विद्या सांळुके, दिपाली झगडे यांच्या नावाने, सर्वांचा विरोधात तक्रार व निवेदन देण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक संगीता पाटील यांनी सदर निवेदन स्वीकार करून यावर योग्य ती चौकशी करून कारवाई करू, असे आश्वासीत केले.

Ramdas Athavale : पुण्यात महापौर अन् मुंबईत उपमहापौर रिपाइंलाच मिळणार : रामदास आठवलेंचा विश्वास 

Categories
Political पुणे महाराष्ट्र

पुण्यात महापौर अन् मुंबईत उपमहापौर रिपाइंलाच मिळणार

: रामदास आठवलेंचा विश्वास

 पुणे : भाजप मनसेच्या नादाला लागल्यास ‘रिपाइं’ भाजपचा नाद सोडेल का, असे विचारल्यावर ‘आम्ही त्यांचा नाद सोडला तरी ते आमचा नाद सोडणार नाहीत,’ असे आठवले म्हणाले. स्वतंत्र चिन्हावर लढायचे की, भाजपच्या हे अजून ठरले नाही. मात्र, एकत्र निवडणूक लढवणार असून, मागासवर्गीय आरक्षण पडल्यास पुण्यात महापौर  आणि मुंबईत उपमहापौर  रिपाइंला मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुण्यातील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत रामदास आठवले  विविध विषयांवर बोलत होते.

तर देवेंद्र फडणवीस यांना अजून मुख्यमंत्री असल्याचा भास होतो, यावर आठवले म्हणाले, ”त्यांना तसा भास होतो, तर दोन वर्षांनंतरही उद्धव ठाकरे यांना आपण अजूनही मुख्यमंत्री नाहीत, असे वाटते, अशी मिश्किल टिपण्णी केली.यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला शब्द दिल्याचेही त्यांनी नमूद केले.”

पाकिस्तानने बळकावलेला भूभाग आपल्या पुन्हा परत आपल्या ताब्यात घ्यावा लागेल

”एकदा पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक केला. दहशतवाद्यांना प्रशिक्षण देऊन जर भारतीय सैनिकांवर भारतीय नागरिकांवर दहशतवादी हल्ले केले जात असतील तर पाकिस्तानवर पुन्हा एक सर्जिकल स्ट्राइक करावं लागेल. पाकिस्तानी दहशतवादी हल्ले थांबवले नाही तर एकदा आरपारची लढाई लढावी लागेल. पाकिस्तानने बळकावलेला भूभाग आपल्या पुन्हा परत आपल्या ताब्यात घ्यावा लागेल असे मतही आठवले यांनी व्यक्त केले.”

भारत पाकिस्तान क्रिकेट सामना होऊ नये

”भारत पाकिस्तान क्रिकेट सामना खेळू नये असे माझ्या पक्षाचे मत आहे. खेळामध्ये राजकारण आणू नये हे जरी खरे असले तरी अशा परिस्थितीत पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळू नये असे माझे मत आहे. जयेश शहा यांना देखील मी हे सांगणार आहे.”

दलितांचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत

“जनधन, उज्वला आणि मुद्रा योजनाअंतर्गत मोठ्या प्रमाणात नागरिकांना फायदा झाला आहे. आवास योजनेत अनेकांना पक्की घरे मिळाली आहेत. आयुष्यमान भारत योजनेत सव्वा दोन लाखाच्या वर लोकांना लाभ झाला आहे. जात-धर्म न पाहता नरेंद्र मोदी यांनी या योजना सर्वांपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न केले आहेत. जातीनिहाय जनगणना व्हायला हवी, अशी आमची मागणी आहे. त्यातून जातीभेद वाढणार नाही, तर ज्या जाती अधिक मागास आहेत, त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करणे सोयीचे होणार आहे. दलितांचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. त्यांना आत्मनिर्भर करण्याची आवश्यकता आहे,” असेही त्यांनी सांगितले.