Sharad Pawar Vs Girish Mahajan : कसलाही संबंध नसताना शरद पवार पुणे मेट्रोने फिरून आले 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

कसलाही संबंध नसताना शरद पवार पुणे मेट्रोने फिरून आले

: पवारांच्या प्रतिक्रियेवर भाजपची तिखट प्रतिक्रिया

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्रात येणार असून ते पुणे दौरा करणार आहे. पुण्यातील बहुप्रतिक्षित मेट्रोचा प्रारंभ मोदी करणार आहेत. मात्र मोदींच्या येण्याआधीच महाराष्ट्राचं राजकारण तापल्याच दिसून येत आहे. मोदींच्या दौऱ्याच्या एकदिवस आधी शरद पवारांनी मेट्रोच्या कामाबाबत विधान केलं होतं. त्याला भाजपने चोख प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळत आहे.

भाजपचे मंत्री युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सोडवून आणण्यासाठी प्रयत्न करतातय. सरकारमधील चार मंत्री युक्रेनमधील विद्यार्थ्यांना सोडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आज सहा विमानांनी विद्यार्थी आलेत. मात्र केंद्र सरकारला विद्यार्थ्यांची काळजी नाही, असं दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न पवार करत असल्याची टीका गिरीश महाजन यांनी यांनी केली.

 

महाजन पुढं म्हणाले की, विकासकामं पूर्णत्वाकडे जात आहेत. काही कामं पूर्ण झाली. मात्र काही दिवसांपूर्वी शरद पवार कारण नसताना मेट्रोमध्ये फिरून आले. आपण किती चांगलं काम करतो हे दाखविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र मेट्रोचा आणि पवारांचा काडीचा तरी संबंध आहे का, असा सवालही महाजन यांनी उपस्थित केला.

दरम्यान शरद पवार राजकीय आरोप करतात. मात्र मोदी येणार असल्याने पुणे भाजपमय, मोदीमय झालंय. त्याचं पवारांना वाईट वाटत आहे. त्यामुळे ते वाटेल ते आरोप करतायत असंही महाजन यांनी म्हटलं.

 

शरद पवार म्हणाले होते की,’रशिया आणि युक्रेनमधील संघर्षाचा परिणाम विद्यार्थ्यांवर होतोय. ‘आज ही हजारो मुलं अडकलीयत. जीव मुठीत धरुन ती तिथं आहेत. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात येतात. त्यांच्या येण्याला माझा आक्षेप नाही, पण मेट्रोचे काम पूर्ण नाही. अर्धवट कामाचे उद्घाटन करण्यासाठी मोदी येतायत.

PM Modi tour pune : Sharad pawar : अर्धवट कामाचं उदघाटन करताना काही संकट आल्यास .. : शरद पवारांनी PM मोदींना दिला इशारा 

Categories
Breaking News PMC Political देश/विदेश पुणे

अर्धवट कामाचं उदघाटन करताना काही संकट आल्यास ..

: शरद पवारांनी PM मोदींना दिला इशारा 

पुणे : पुणे मेट्रोचं उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते उद्या होणार आहे. त्यासाठी शहरात मोठी तयारी सुरु आहे. पण या उद्घाटन कार्यक्रमावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा आणि राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी गंभीर इशारा दिला आहे. मेट्रोच्या अर्धवट कामाचं उद्घाटन होतंय, काही संकट निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल, असं शरद पवार यांनी PM मोदींना उद्देशून म्हटलं आहे.

पवार म्हणाले, “माझी आज देशाच्या पंतप्रधानांना विनंती आहे की ते उद्या पुण्यात येत आहेत. त्यांच्या दौऱ्याबद्दल काही तक्रार नाही, पण या मेट्रोचं काम पूर्ण झालेलं नाही त्याच उदघाटन होत आहे. नदी सुधार करण्याची गरज आहे. नदी सुधारण्याचं काम हाती घेतलं पाहिजे. पण या नदीवर अनेक धरणं आहेत. त्यामुळं कधी ढगफुटी झाली तर या मोठ्या संकटाची झळ आजूबाजूच्या गावातील लोकांना बसणार आहे. अर्धवट कामाचं उदघाटन केलं जातंय त्याच स्वागत करू, पण अशा अर्धवट कामामुळं जर काही संकट निर्माण झाल तर आपल्यालाच ते पाहायला लागेल” नवीन नदी सुधार प्रकल्पाबाबत अधिकारी आणि नेत्यांशी बोलू यावर तोडगा काढू असंही त्यांनी म्हटलं आहे.

बऱ्याच दिवसांनी या परिसरात आलो आहे. पुणं बदलतंय, शहराचा चेहरा बदलतोय, पूर्वी इकडे जुन्या पद्धतीच गाव होतं. नागरिककरण वाढलं त्यामुळं आता जुनी ओळख राहिली नाही. देशाच्या कानाकोपऱ्यातून इथं लोक आले आहेत. पण एकूणच पुणे शहरातील कामांबाबत आता सामंजस्याची कमतरता भासत आहे, असंही शरद पवार पत्रकार परिषदेत म्हणाले.

Heat of PMC Election 2022 : मोदी, पवार, ठाकरे यांच्या सभा!

Categories
Breaking News PMC Political पुणे

मोदी, पवार, ठाकरे यांच्या सभा!

: मार्चपासून शहरातील राजकीय वातावरण तापणार

: महापालिका निवडणुकीची तयारी

 पुणे : महापालिका निवडणुकांचा (PMC election) कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नसला तरी शहरात राजकीय ज्वर चढण्यास सुरूवात झाली आहे. मार्च महिन्यात  पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार (NCP chief Sharad pawar), मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्या सभांनी शहरातील राजकीय वातावरण महापालिका निवडणूकांच्या तोंडावर चांगलेच तापणार आहे.

दि. 1 मार्चला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा “परिवार संवाद’ पुण्यात येणार असून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह पक्षाचे नेते शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार असून महापालिका निवडणूकांच्या तोंडावर सत्ताधारी भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादीकडून पुण्यातील कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष विधानसभा निहाय बैठका घेणार आहेत. त्यानंतर दि. 5 मार्चला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर येणार असून त्यांच्या हस्ते शहरातील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या विकासकामांची उद्घाटने करणार असून ते पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठकही घेण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

 

त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर असून या दौऱ्यात ते महापालिकेच्या वेगवेगळया विकासकामांचे भूमीपूजन तसेच मेट्रोचे उद्घाटनही करणार आहेत. यानिमित्ताने त्यांची जाहीर सभा घेऊन महापालिकेच्या निवडणूकांसाठी शक्‍ती प्रदर्शन करण्याचे भाजपकडून नियोजन असून पंतप्रधान मोंदीच्या दौऱ्याचे नियोजन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: लक्ष देऊन करीत आहेत. त्यानंतर लगेचच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही जाहीर सभा दि. 9 मार्चला होणार आहे. पक्षाच्या वर्धापनदिना निमित्ताने पुण्यातील शहर पदाधिकाऱ्यांच्या आग्रहाखातर ही सभा पुण्यात घेतली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Allegation of Chandrakant Patil : Sharad pawar : शरद पवार नेहमीच समाजात जातीयवाद निर्माण करत असतात

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

शरद पवार नेहमीच समाजात जातीयवाद निर्माण करत असतात

: चंद्रकांत पाटलांचा आरोप

पुणे – शरद पवार नेहमीच समाजात जातीयवाद निर्माण करत असतात, त्यांचा तसा प्रयत्न असतो असा आरोप भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील  केला आहे.


 राष्ट्रवादीचे नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे मलिक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, ईडी सूडबुद्धीने कारवाई करते असं विरोधकांनी म्हणायचं नसत. एखादी चौकशी सुरू असताना त्यावर तात्काळ बोलणं योग्य नाही. सत्ताधारी एकही केस न्यायालयात जिंकू शकलेले नाहीत. ते न्यायालयात का जात नाहीत, असा सवाल भाजपाचे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला आहे.
आज ते पुण्यात (Pune) बोलत होते.भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी शहरातील विविध प्रश्नांवर पुणे महापालिका आयुक्तांची भेट घेतली. यावेळी ते म्हणाले, ईडी (ED) सूडबुद्धीने कारवाई करते असं विरोधकांनी म्हणायचं नसत. एखादी चौकशी सुरू असताना त्यावर तात्काळ बोलणं योग्य नाही. या केसमध्ये न्यायालयाचा दरवाजा ठोठावला पाहिजे. सत्ताधारी एकही केस न्यायालयात जिंकू शकलेले नाहीत. ते न्यायालयात का जात नाहीत, असा सवाल त्यांनी केला आहे. पुढे ते म्हणाले, काँग्रेसकडे (Congress) टीका करण्यासाठी विषय नाहीत म्हणून अर्थहीन चर्चा करत असतात. आमचा येणाऱ्या महापालिकेत मुद्दा हाच आहे. ५० वर्ष विरुद्ध ५ वर्ष असा फॉर्म्युला आहे. आम्ही काय केलं हे सांगू, तुम्ही काय केलं ते सांगा, असेही ते म्हणाले आहेत. जे गलिच्छ बोलतात त्यांना परवानगी आणि मी तर सुसंस्कृत बोलतो, नाव न घेता असा टोला त्यांनी राऊतांना लगावला आहे. भुजबळांना दोन वर्षे जेलमध्ये कोणी भेटायला पण जात नव्हते. शरद पवार नेहमीच समाजात जातीयवाद निर्माण करत असतात, त्यांचा तसा प्रयत्न असतो असा आरोपही त्यांनी केला आहे.

Rahul Bajaj : बजाज समूहाचे सर्वेसर्वा ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचं निधन

Categories
Breaking News Commerce देश/विदेश पुणे महाराष्ट्र

बजाज समूहाचे सर्वेसर्वा ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचं निधन

पुणे : ज्येष्ठ उद्योजक आणि बजाज समूहाचे दिशादर्शक राहुल बजाज (Rahul Bajaj) यांचं शनिवारी निधन झालं. ते ८३ वर्षांचे होते. पाच दशकांमध्ये बजाज समूहाला (Bajaj Group) नावारूपाला आणण्यात राहुल बजाज यांनी प्रचंड योगदान दिले आहे.

राहुल बजाज यांचा जन्म १० जून १९३८ साली झाला. राहुल बजाज यांचे अर्थशास्त्र आणि विधीमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आहे. त्यांनी हॉवर्ड विद्यापीठातून ‘एमबीए’चेही शिक्षण घेतले आहे. राहुल बजाज हे १९६८ मध्ये बजाज ऑटोमध्ये कार्यकारी अधिकारी या पदी रुजू झाले. बजाज या उद्योग समूहाला वाहन उद्योगात मोठं करण्यात राहुल बजाज यांचा मोठा वाटा आहे. २००१ मध्ये राहुल बजाज यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बजाज या उद्योग समूहाला वाहन उद्योगात मोठं करण्यात राहुल बजाज यांचा मोठा वाटा आहे. २००१ मध्ये राहुल बजाज यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

गेल्या वर्षी राहुल बजाज यांनी बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पाच दशकांपासून त्यांनी बजाज ऑटोची धुरा यशस्वीरित्या सांभाळली होती. बजाज ऑटोला आघाडीवर नेण्यात राहुल बजाज यांना महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा होता. राहुल बजाज यांच्यानंतर ६७ वर्षीय नीरज बजाज यांच्याकडे बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली होती.

बजाज ऑटोच्या यशात मोलाचा वाटा

राहुल बजाज सन १९६८ मध्ये बजाज ऑटोचे सीईओ झाले. यानंतर ३० व्या वर्षी जेव्हा राहुल बजाज यांनी ‘बजाज ऑटो लिमिटेड’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला, तेव्हा हे पद मिळविणारे ते सर्वात तरुण भारतीय असल्याचे सांगितले जाते. यानंतर बजाजने एका निरंकुश पद्धतीने उत्पादन केले आणि स्वत:ला देशातील सर्वांत मोठ्या कंपन्यांपैकी एक बनविण्यात यश मिळविले. वर्ष १९६५ मध्ये ३ कोटींच्या उलाढालीवरून सन २००८ मध्ये बजाजने सुमारे १० हजार कोटींची उलाढाल गाठली.

भारतीय उद्योगांच्या विकासात भरीव योगदान देणारा देशाभिमानी उद्योजक गमावला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना

राहूल बजाज यांच्या निधनाने भारतीय उद्योगाच्या विकासात केवळ भरीव योगदान देणारा ज्येष्ठ उद्योजकच आपण गमावला नाही तर सामाजिक भान असलेला, आणि देशासमोरील समस्यांवर निर्भिडपणे आपली मते मांडणारा, तरुण उद्योजकांचा प्रेरक असा देशाभिमानी उद्योजक आपल्यातून गेला आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
राहूल बजाज यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत.
राहूल बजाज यांनी दुचाकी वाहनांच्या उत्पादनात देशात क्रांती आणली तसेच जगातील या क्षेत्रातील इतर कंपन्यांसमोर भारताचे आव्हान उभे केले. त्यांनी केवळ आपल्या उद्योगाचा विकास असा संकुचित विचार केला नाही तर देशातील सर्वच उद्योगांच्या समस्या आणि त्यांना येणाऱ्या अडचणी यावर स्पष्ट व निग्रही भूमिका घेतली. एक सच्चा देशभक्त उद्योजक म्हणून देशासमोरील काही समस्यांवर देखील त्यांनी भाष्य केले आणि जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे सामाजिक कार्यही उद्योजकांनी सामाजिक जबाबदारी कशी पार पाडावी त्याचे उत्तम उदाहरण होते.
राहूल बजाज हे विशेषत: उद्योजकांच्या युवा पिढीचे मार्गदर्शक होते. त्यांनी राज्य शासनाला देखील उद्योगाच्या विकासासंदर्भात वेळोवेळी महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत.
त्यांच्या जाण्याने निश्चितच राज्याच्या उद्योग विश्वाचे नुकसान झाले आहे असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या श्रद्धांजलीपर संदेशात म्हणतात.

 

Pune NCP : Sharad Pawar : पुणे राष्ट्रवादी कॉंग्रेस भावूक  : पवार साहेबांच्या आरोग्यासाठी दगडूशेठला आरती : Video पहा

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

पुणे राष्ट्रवादी कॉंग्रेस भावूक

: पवार साहेबांच्या आरोग्यासाठी दगडूशेठला आरती

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर चोहोबाजूंनी सदिच्छांचा वर्षाव सुरू झाला. अनेकांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या सदिच्छा व्यक्त केल्या. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनेही शरदचंद्रजी पवारसाहेब यांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी प्रार्थना म्हणून पुण्याचे दैवत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आरती करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मंदिरात आरती करून शरदचंद्रजी पवार यांच्या उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.

 

Sharad pawar : Pune Metro : शरद पवार यांचा पुणे मेट्रोने प्रवास!  : चंद्रकांत पाटील यांनी साधले शरसंधान 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

शरद पवार यांचा पुणे मेट्रोने प्रवास!

: चंद्रकांत पाटील यांनी साधले शरसंधान

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी आज पुणे मेट्रोच्या फुगेवाडी स्टेशनला भेट दिली. स्टेशन परिसराची पाहणी करून त्यांनी फुगेवाडी ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका असा प्रवासही मेट्रो ने केला. त्यांच्या याच मेट्रो प्रवासावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी आक्षेप घेत शरद पवारांच्या उपस्थितीत पुणे मेट्रोची चाचणी म्हणजे आयत्या पिठावर रेघोट्या असल्याचे सांगत टीका केली होती. तसेच मेट्रो प्रशासनाविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात असल्याचेही त्यांनी सांगितले होते.

त्यानंतर आता पुणे महामेट्रोकडून यावर स्पष्टीकरण देण्यात आले. मेट्रो प्रकल्पाची माहिती हवी म्हणून शरद पवारांकडून आम्हाला विचारणा करण्यात आली होती. पुणे मेट्रोचे काम सुरू होऊन साडेचार वर्षे झाली, परंतु ते आतापर्यंत कधीही आले नव्हते. त्यामुळे आम्ही त्यांना फुगेवाडी येथील मेट्रो स्टेशनच्या कार्यालयात बोलावले. त्यानुसार ते आज या ठिकाणी आले होते.

हा प्रकल्प कधी सुरू झाला, खर्च किती, सध्याची स्थिती काय आहे ही सर्व माहिती त्यांना देण्यात आली. त्यानंतर फुगेवाडी स्टेशनची त्यांना माहिती दिली आणि नंतर त्यांनी मेट्रोने प्रवास केला. आजच्या भेटीत मेट्रोची ट्रायल रण झाली नाही, शरद पवारांना फक्त मेट्रो संदर्भातली माहिती देण्यात आली. या मार्गावरील मेट्रोची ट्रायल 2019 मध्येच झाल्याचे महामेट्रोचे सरव्यवस्थापक हेमंत सोनवणे यांनी सांगितले.

चंद्रकांत पाटील यांनी मेट्रोतून प्रवास केल्यानंतर शरद पवार यांच्यावर टीका केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज मेट्रोची चाचणी घेऊन जणू काही त्यांच्यामुळे पुणे मेट्रोचा प्रकल्प झाल्याचे प्रशासनाने भासविणे म्हणजे आयत्या पिठावर रेघोट्या असा प्रकार आहे. पुणे व पिंपरी चिंचवडमधील लोकप्रतिनिधींना डावलून केवळ राज्यसभा सदस्य असलेल्या एका नेत्याच्या उपस्थितीत चाचणी घेतल्याबद्दल मेट्रोच्या प्रशासनाविरोधात आपण विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव दाखल करणार आहे, असा इशारा त्यांनी दिला.

Devendra Fadanvis Vs NCP : फडणवीस यांच्या वयापेक्षाही जास्त काळ पवार साहेब  राजकीय जीवनामध्ये  सक्रिय : पुणे शहर राष्ट्रवादीचे देवेंद्र फडणवीस यांना उत्तर 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

फडणवीस यांच्या वयापेक्षाही जास्त काळ पवार साहेब  राजकीय जीवनामध्ये  सक्रिय

: पुणे शहर राष्ट्रवादीचे देवेंद्र फडणवीस यांना उत्तर

पुणे : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि  पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्यावर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पश्चिम महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे, अशा आशयाचे वक्तव्य त्यांनी केले आहे. फडणवीस यांच्या वयापेक्षाही जास्त काळ पवार साहेब महाराष्ट्र आणि देशाच्या राजकीय जीवनामध्ये पूर्ण प्रभावाने सक्रिय आहेत. त्यांनी या काळात राजकीय आणि सामजिक अवकाश व्यापून टाकला आहे. मात्र, २० वर्षांच्या, त्यातही निम्मा काळ नागपूर शहरातील एका मतदारसंघापुरते सक्रिय असणाऱ्या फडणवीस यांनी पवार साहेबांवर टीका करणे अगदीच हास्यास्पद आहे. शरद पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेसमुळे देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षनेते पदावर बसावे लागले आहे. त्याचीच मळमळ फडणवीसांच्या मनातून अशा पद्धतीने बाहेर पडत आहे, हे या ठिकाणी प्रकर्षाने जाणवते. असा टोला पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस चे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी लगावला आहे.

 

जगताप म्हणाले,  साहेबांनी सहा दशकांच्या कारकीर्दीमध्ये १४ निवडणुका लढवल्या आणि सर्वच्या सर्व वाढत्या मताधिक्याने जिंकल्या. वेगळा पक्ष स्थापन केल्यानंतर देशाच्या १३ राज्यांमध्ये आमदार निवडून आणणे, तीन राज्यांमध्ये खासदार निवडून आणणे, केंद्रातील सत्तेमध्ये सहभागी होणे, ही किमया शरद पवार साहेबच करू शकतात. या जोडीला बीसीसीआय आणि आयसीसी या क्रिकेट संघटनांची धुराही त्यांनी सांभाळली. राज्यातील अनेक संस्था-संघटनांना आधार दिला. अनेक संघटना उभारून, त्या जागतिक दर्जाच्या केल्या. अमेरिकेच्या अध्यक्षांपासून वेगवेगळ्या देशांच्या प्रमुख नेत्यांबरोबर संबंध निर्माण केले. याउलट, फडणवीसांना स्वतःचे अस्तित्व दाखवून देण्यासाठीही कोणत्या तरी लाटेचा आधार घ्यावा लागतो. पवार साहेबांसारख्या पात्रतेचा विचार करायलाही फडणवीसांना दुसरा जन्म घ्यावा लागेल.

केवळ निवडणुकीचा विचार करून लोकप्रिय घोषणा करायच्या आणि कोणत्या तरी लाटेवर स्वार होऊन निवडणूक जिंकायची, हा पवार साहेबांचा स्वभाव नाही. राजकारण करत असताना, केवळ निवडणुकांपुरता विचार करायचा नसतो. तर, या राजकारणातून सर्वसामान्यांच्या कल्याणाचा विचार करायचा असतो, माणसांना जोडायचे असते. त्यांची आयुष्ये उभी करायची असतात. पवार साहेबांनी राज्यामध्ये किती नेते उभे केले आहेत, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहेत. आजही, फडणवीस यांनी त्यांच्या आजूबाजूला पाहिले, तर पवार साहेबांच्या आशीर्वादावर मोठे झालेले नेतेच त्यांना दिसतील. फडणवीसांनी एकदा पक्षाची झूल अंगावरून फेकून उभे राहावे, मग त्यांना त्यांची ताकद काय आहे, हे कळून येईल. केवळ स्पर्धेपूर्वी औषधे खाऊन दंडाच्या बेटकुळ्या फुगवण्यासारखी फडवणीसांची अवस्था आहे. तर, पवार साहेबांच्या तालमीमध्ये फडणवीसांपेक्षा जास्त ताकदीचे कितीतरी नेते तयार झाले आहेत. पण, कोणत्या तरी लाटेवर स्वार होऊन पहिल्यांदा मुख्यमंत्री आणि दुसऱ्यांदा विरोधी पक्षनेते झालेल्या फडणवीस यांना वास्तवाचे भान आलेले नाही, हेच पुन्हा एकदा दिसून येते. असे ही जगताप म्हणाले.

 

Sharad pawar : आमची पिढी खऱ्या अर्थाने भाग्यवान आहे…. आम्ही असा नेता पहिला 

Categories
cultural Political पुणे महाराष्ट्र

आमची पिढी खऱ्या अर्थाने भाग्यवान आहे…. आम्ही असा नेता पहिला

१२ डिसेंबर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा आज जन्मदिवस. देशाचे लोकनेते असणारे आणि या महाराष्ट्राची संपूर्ण जाण असणारे या राज्यातील,या देशातलं एक दिग्गज व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची खाती ख्याती आहे असे आदरणीय शरद पवार साहेब हे वयाची ८१ वर्ष  पूर्ण करून अर्थात सहस्रचंद्र दर्शनाचा योग पूर्ण करून  ८१ व्या वर्षात पदार्पण करत आहेत, त्यांना वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा….

आमची पिढी खऱ्या अर्थाने भाग्यवान आहे. मी वयाची ८० वर्षे पूर्ण करणारा परंतु या वयात सुद्धा तरुणांनाही लाजवेल अशा प्रकारचा अफाट जनसंपर्क असणारा त्याचबरोबर उदंड उत्साह असणारा या वयातील एकमेव नेता पाहिला , हे भाग्य या पुढच्या पिढीला मिळेल की नाही याबाबत भाकीत वर्तवता येणार नाही. परंतु आम्हाला हा योग मिळाला आहे, हे आम्ही आमचं नशीब समजतो. आज देशात विविध राजकीय पक्षांच्या  विविध विचारधारा मानणारे विविध क्षेत्रातील मंडळी असतील या सर्वांशी एकाच वेळेस थेट संपर्क ठेवणाऱ्या पवारसाहेब आपल्याला परिचित आहेत. महाराष्ट्राच्या भूमीतून दिल्लीत जाणारे आणि तब्बल मागची तीन दशकं आपलं कर्तृत्व सिद्ध करणारे पवार साहेब हे महाराष्ट्रातील एकमेव नेते ठरले आहेत. महाराष्ट्राने यापूर्वी देशासाठी अनेक नेते दिले परंतु त्यांना काम करण्यासाठी खूप कमी वेळ मिळाला. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविल्यानंतर   त्या वेळेपासून देशाच्या, राज्याच्या सर्व राजकीय प्रमुख, राजकीय पक्षांच्या नेत्यांशी  सलोख्याचे संबंध ठेवत असताना आपल्या कारकीर्दीतील खूप जास्तीचा  वेळ विरोधी पक्षात घालवत असताना प्रत्येक सत्ताधारी पक्षाबरोबर दोन हात करण्याची वेळ आदरणीय पवार साहेबांवर आली पण या परिस्थितीमध्ये देखील आपला पक्ष आपली विचारधारा त्याचबरोबर उपेक्षित वंचित घटकांना न्याय देण्याची भूमिका तसेच  आपण ज्या  राज्याला, आपल्या जनतेला, ज्यांच्याशी आपली बांधिलकी आहे त्यांच्याशी आपले उत्तरदायित्व आहे, त्या वर्गाला यांच्याबरोबर पवार साहेबांनी कधीही प्रतारणा केली नाही, सत्ताधाऱ्यांच्या  विरोधात जात केलेला संघर्ष संपूर्ण देशाने ,उभ्या महाराष्ट्राने बघितलेला आहे. साहेबांचा हा लढवय्या स्वभाव निश्चितच आम्ह कार्यकर्त्यांना भाऊन जातो. मागच्या सहा दशकांच्या या राजकीय प्रवासात पवार साहेब अभेद्य का राहिले. ते राजकीय असो व आपल्या वैयक्तिक आयुष्यातील आलेल्या शारीरिक-मानसिक संकटांमध्ये ते का डगमगू  शकले नाही हा अनुभव माझ्या राजकीय आयुष्यात फार जवळून घेता आला यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो.

सप्टेंबर २०१९ ला विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आणि महाराष्ट्रातील भाजप विरोधी पक्षांचा संघर्षाचा काळ होता. या संघर्षाच्या काळात मोदी शहा या जोडीने या देशात भाजपेतर पक्ष्यांच्या सत्ता येणारच नाही अशा प्रकारच्या खोट्या कारवाया सुरू केल्या होत्या.  अर्थात वेगळ्या प्रकारच्या गळचेपीचे राजकारण सुरू केले होते. पण  ६० वर्षाच्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या व्यक्तिगत आयुष्यावर वा त्यांच्या राजकीय जीवनामध्ये त्यांनी घेतलेल्या निर्णयांवर राजकीय पक्षांनी काही जरी बेछूट आरोप केले तरी  ते आरोप एखाद्या सभेपुरते मर्यादित असायचे आरोपांना लेखी तक्रारीचे स्वरूप कधीही प्राप्त झाले नव्हते.  त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेलाही हे कळून चुकलं होतं की पवार साहेबांसारखे  नेतृत्व हे कायम महाराष्ट्राच्या जडण घडणीसाठी काम करणारे व्यक्तिमत्व आहे ,परंतु साहेबांचा राजकीय प्रवास थांबवावा किंवा अडचणीत घ्यावा यासाठी हे आरोप होत आले आहेत  आणि त्यासंदर्भात निवडणुका झाल्यानंतर कुठल्याही प्रकारच्या हालचाली होत नसायच्या असे असताना महाराष्ट्रातील २०१९ची निवडणूक जिंकायची या वैर भावनेने केंद्रातील मोदी सरकारने ईडीच्या माध्यमातून आदरणीय पवार साहेबांना नोटीस पाठवली मुळातच पवार साहेब हे राज्यातील कुठल्याही साखर कारखान्याचे किंवा राज्य सहकारी बँकेचे सभासद नसताना त्या कारखान्यांमधील व्यवहारांमध्ये किंवा राज्य सहकारी बँकेकडून कारखान्यांना देण्यात येणारे कर्जाच्या  कुठल्याही प्रक्रियेमध्ये साहेबांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध आलेला नसताना फक्त विरोधी  पक्षातील सर्वात  दिग्गज नेता आम्ही कसा अडचणीत आणला व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची वाटचाल कशी थांबवयाची  या हेतू पोटी ही नोटीस पाठवली होती. ८० वर्षाच्या योद्ध्याला आयुष्यात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या कायदेशीर नोटीशीला सामोरे जावे लागले होते. ही नोटीस मिळाल्यानंतर इतर कुठलीही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या विपरीत आदरणीय पवार साहेबांनी भूमिका घेतली आणि थेट ईडीला आव्हान  दिले  की, मी तुमच्या कार्यालयांमध्ये तुमच्या भेटीला येत आहे . अशा या अनपेक्षित उत्तराने भांबावलेले मोदी सरकार यांना एकूणच बॅकफूटवर जाण्याची वेळ आली आणि एकूणच भारतात आणि महाराष्ट्रात एक वेगळा संदेश गेला जाणून-बुजून पवार साहेबांना अशाप्रकारे टार्गेट केले जात आहे आणि खुद्द पवार साहेब येत आहेत असं म्हटल्यानंतर ईडीची आणि या एकूणच कट-कारस्थानाची हवाच निघून गेली होती.  त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्वच कार्यकर्त्यांनी अगदी टोकाची भूमिका सार्वजनिक माध्यमांमध्ये जाहीर केल्यामुळे यासंदर्भात आपण अडचणीत येतोय याची जाणीव मोदी सरकारला झाली होती.  मला आठवतंय ज्या दिवशी ईडीच्या कार्यालयांमध्ये पवार साहेब भेट देण्यास जाणार होते. त्या दिवशी पवार साहेबांना पाठिंबा देण्यासाठी मी आणि माझे मित्र नगरसेवक विशाल तांबे आम्ही मुंबईच्या दिशेने निघालो मुंबईचा प्रवास चालू असताना या संपूर्ण प्रवासात आम्ही विविध माध्यमांमध्ये या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून होतो याच वेळी माध्यमांमध्ये एक माहिती अशी मिळाली की,मुंबईच्या कमिशनरने  स्वतः साहेबांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी जात साहेबांना विनंती केली की, आपण ईडीच्या कार्यालयात भेट द्यायला जाणे टाळावे. या गोष्टीतून एक जाणवले की ईडीचे नोटीसमुळे अडचणीत आलेले फडणवीस सरकार आणि एकूणच मोदी सरकार यांनी पवार साहेबांना समोर सपशेल गुडघे टेकले होते आणि हे संपूर्ण चित्र उभ्या महाराष्ट्राने आणि महाराष्ट्रातील जनतेने बघितले होते. असे  असताना आम्ही ईडीच्या कार्यालयात जाणे टाळले  व  थेट साहेबांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी गेलो. आमची गाडी सिल्वर ओक  निवासस्थानी पोहोचे पर्यंत पवार साहेबांची पत्रकार परिषद संपत आली होती तेवढ्यात आम्हाला समजले की पवार साहेब दोन दिवसांच्या पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागातील पाहणी दौऱ्यासाठी जाणार आहेत म्हणून, पवार साहेब पुण्याला जाणार असणाऱ्या ताफ्याजवळ आम्ही थांबलो.  साहेब सिल्वर ओकच्या पायऱ्या उतरून खाली येत असताना तेवढ्यात त्यांचे लक्ष माझ्याकडे गेलं आणि तेव्हा त्यांनी तेवढ्यात मला विचारलं की कधी आलात? मी त्यांना सांगितलं की, साहेब सकाळीच आलोय त्यानंतर आता पुढे कुठे जाणार ? मी म्हटलं साहेब पुण्याला निघणार आहोत ते म्हणाले गाडी कुठे आहे ? मी म्हटलं गाडी सोबतच आहे साहेब . ते म्हणाले ठीक आहे गाडी माझ्या ताफ्यासोबत ठेवा असं म्हटल्यानंतर आम्ही साहेबांच्या ताफ्याच्यामागे गाडी ठेवली हा ताफा वाशीजवळ आल्यानंतर जिल्हा पोलीस बदलासाठी थांबला.

दोन ते तीन मिनिट झाले तरी ताफा हलला नाही म्हणून आम्ही विचारात असतानाच तेवढ्यात साहेबांचे चालक श्री. गामा  मामा आमच्या गाडीजवळ आले आणि त्यांनी सांगितले की पवार साहेबांनी तुम्हाला गाडी जवळ बोलवले आहे त्याचबरोबर मी आणि विशाल दोघेही साहेबांच्या  गाडी जवळ गेलो, साहेबांनी आम्हाला सांगितले की तुम्ही दोघे गाडीत बसा, मी पुढे बसतो तुम्ही दोघे मागे बसा.  त्याचबरोबर मी, विशाल आणि आमदार रोहित पवार आम्ही तिघेही गाडीत मागे बसलो, असा आमचा प्रवास वाशी पासून सुरू झाला.  या प्रवासामध्ये साहेबांनी इतर अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.  मला आठवतंय जसा खोपोलीचा घाट क्रॉस  करून आम्ही वर आलो,तशी साहेबांची तेथील पवनचक्क्यांवर  नजर पडली तसं या पवनचक्क्यांकडे  बोट करून साहेब म्हणाले की या पवनचक्क्यांचा प्रवास तुम्हाला माहिती आहे का? आम्ही म्हंटलं  नाही साहेब? मग साहेबांनी सांगितलेकी ९०च्या दशकामध्ये मी राज्याचा मुख्यमंत्री असताना राज्यामध्ये गुंतवणूक आणण्यासाठी परदेशात  गेलो होतो,लोक तिथेj असणाऱ्या पवनचक्क्यांच्या माध्यमातून विद्युत निर्मिती आणि स्थानिकांना मिळणारा रोजगार याची माहिती घेत ही संकल्पना आपल्या महाराष्ट्रात प्रत्यक्षात उतरेल की नाही याचा अभ्यास घेतला त्यानंतर महाराष्ट्रात एकदा सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना तेथील स्थानिक आमदार श्री. विक्रमसिंह पाटणकर यांच्या मतदारसंघात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट देण्याचा योग आला,तो कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर पवार साहेबांना आजूबाजूच्या परिसरात सर्व पठार दिसले आणि पवार साहेबांनी हेलिकॉप्टर उपलब्ध करण्याच्या सूचना श्री. पाटणकर यांना दिल्या.  थोड्याच वेळात हेलिकॉप्टर आले . हेलिकॉप्टरच्या माध्यमातुन आदरणीय पवार साहेबांनी आजूबाजूच्या डोंगरांची पाहणी केली व या पठारावर  पवनचक्क्या बसवणे शक्य होईल का ?याबाबत चाचपणी केली . त्या माध्यमातून महाराष्ट्रात त्याकाळी कमी असणारे विजेची गरज भागवता येईल तसेच या पठारी भागातील नागरिकांना यातून उत्पन्न सुद्धा सुरू होईल अशी दूरदृष्टी त्या वेळेस साहेबांची होती.  याबाबतची कल्पना त्यांनी स्थानिक लोकांसमोर मांडली त्यावेळी ही कल्पना महाराष्ट्रातील नागरिकांसाठी त्या परिसरातील नागरिकांसाठी थोडी शंकास्पद होती की, ही योजना यशस्वी होईल की नाही परंतु पवार साहेबांनी त्यांची समजूत काढल्यानंतर त्या परिसरातील नागरिकांनी तयार होत  हा बदल स्वीकारला आणि त्यानंतर सुरुवातीला सातारा आणि त्यानंतर संपूर्ण राज्यात  अशाप्रकारे पवनचक्क्यांच्या जाळं उभं राहिलं. त्यानंतर या तंत्रज्ञानाने राज्याभर खूप मोठा विस्तार केला.  एका नव्या व्यवसायाची सुरुवात महाराष्ट्रात झाली ही सगळी माहिती घेत असताना आम्ही पुण्यात कधी पोहोचलो,हे  आम्हाला समजलं नाही.  या प्रवासात लोणावळा पासुनच ठीक ठिकाणी कार्यकर्त्यांनी साहेबांच्या समर्थनार्थ तसेच स्वागतासाठी उभे राहून मोठ्या मोठ्या मोठ्या मोठ्या घोषणा दिल्या, तसेच अनेक  ठिकाणी  साहेबांचा स्वागत करण्यात आले .

या सर्व काळात साहेबांनी एकदा देखील असे म्हटले नाही की केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने माझ्यावरती सूडबुद्धीने  कार्यवाही केली किंवा मला त्यांचा राग आहे असं साहेब बोलले देखील नाही.  खूप साऱ्या  लोकांना अशा प्रकारची काही घटना घडल्यानंतर एकमेकांना फोन करून शेखी  मिरवण्याची सवय असते अशा प्रकारचे चित्र मी रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये बघत असतो परंतु या संपूर्ण दोन तासाचा प्रवासामध्ये साहेबांनी एकदाही मोबाईलला हात लावला नाही किंबहुना मी आज मोदी अथवा फडणवीस सरकारला कसा धडा शिकवला अशा प्रकारचा एकही वाक्य वापरलेले नाही त्याही पलीकडे जाऊन आपल्या साठ वर्षांच्या राजकीय जीवनामध्ये महाराष्ट्रात गुंतवणूक कशी आली, इतर सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील काही मंडळींच्या आठवणी आम्हाला सांगितल्या  हा आमच्यासाठी निश्चितच एक वेगळा अनुभव होता.  मी पुन्हा एकदा सांगेल आयुष्यामध्ये एवढी मोठी घडामोडी घटना दिवस ज्याने त्याच्या आयुष्यात आला त्याच दिवशी पवार साहेबांचा सोबत प्रवास करण्याचा योग पवार साहेबांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला उपलब्ध करून दिला ही माझ्या आयुष्यातील सुवर्णमय घटना आहे.  आयुष्यात कितीही वादळ आली,संकट  आली तरी ङगमगायचे  नसतं ,त्याला जायचं असत आणि त्याला सामोरे जात असताना त्याची शेखी मिळून घ्यायची नसते तर या वादळ वाऱ्यामध्ये सुद्धा जमिनीवर पाय घट्ट रोवून त्या परिस्थितीची सामना कसा करावयाचा हे पवार साहेबांनी सांगितले हा एक पुढच्या काळात राजकीय व सामाजिक जीवनात काम करत असताना संकटांशी दोन हात करण्याचा वेगळा विचार पवार साहेबांच्या कृतीतून आम्हाला आम्ही शिकलो आदरणीय पवार साहेबांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना दिला हे ऋण  कधीच न फिटणारे आहे या हिमालयाएवढ्या उत्तुंग कर्तृत्व असणाऱ्या नेतृत्वाला मी मनापासून सलाम करतो वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो.  साहेब आपण शतायुषी व्हा..  शतायुषी होत असताना या देशाचं पंतप्रधानपद भूषवावे ,  ही माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची निश्चितच अपेक्षा राहील.  पंतप्रधानपद हे कुठल्याही वयाच्या चौकटीत मोजले जाणारे नाही ते या देशात सुराज्य आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीच्या हातात यावे , यासाठीचा काळ असून येत्या काळात आपण हे पद भूषवाल,  अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अपेक्षा आहे.  पुन्हा एकदा आपणांस  वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…

 

श्री. प्रशांत सुदाम जगताप

शहराध्यक्ष. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.

Nawab Malik : Sharad Pawar : शरद पवार हेच चाणक्य : नवाब मलिक यांचा पवारांवर कौतुकाचा वर्षाव 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

शरद पवार हेच चाणक्य

: नवाब मलिक यांचा पवारांवर कौतुकाचा वर्षाव

पुणे : पुण्यात महाविकास आघाडीचे राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक  यांचा महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी मलिक यांनी शरद पवार यांचे भरभरून कौतुक करण्याबरोबरोच भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. ”शरद पवार हे असे चाणक्य आहेत, जे स्वतःला चाणक्य समजतात त्यांच्यावर मात केली असल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत.”

”शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येतील अस कुणीही स्वप्नात पहिले नव्हते. तशीच परिस्थिती देशात आहे. बरेच लोक एकत्र येतील अशी कधी चर्चा होत नाही. या सर्वांची मोट बांधण्याचे काम पवार करतील. सर्वांना एकत्र आणायचा आहे त्या दृष्टीने पवार काम करत आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

”देशात प्रश्न निर्माण झाल्यानंतर ज्याप्रमाणे युपीएच्या बैठका होणे आवश्यक आहे त्या होत नाहीत. त्यामुळे ममता दीदी, सपा, टीआरएस, आरजेडीसह दक्षिणेतील पक्षांची मोट बांधून काँग्रेस सकट एक मोर्चा तयार करायचा आहे. सामूहिक नेतृत्व निर्माण करून हा मोर्चा काम करेल. संपूर्ण देशात सध्या भाजपविरोधी वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे देशभरातील भाजपविरोधकांची मोट बांधण्याचं काम शरद पवार करत असल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत.”

आता देशाच्या जनतेला पर्याय उपलब्ध करून देणार

”देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या पक्षाकडे बघावं, एनडीए मध्ये कोणीही शिल्लक राहत नाही, एनडीए सोडून लोक जात आहेत. आजच्या घडीला भाजप विरोधात देशात वातावरण निर्माण झाला आहे. देशातल्या सर्व विरोधकांची मोट बांधण्याचे काम पवारांनी घेतला आहे. ममतादीदीसोबत त्याच विषयावर चर्चा झाली आहे. देशातील सर्व राजकीय पक्षांना एकत्र घेऊन मोठी आघाडी निर्माण करून देशाच्या जनतेला पर्याय उपलब्ध करून देणार आहोत. त्याची चिंता भाजपला सतावत आहे.”