Ajit Pawar Vs Raj Thackeray : अजित पवार राज ठाकरेंवर संतापले : म्हणाले, मुलाखत घेतली तेव्हा …! 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

अजित पवार राज ठाकरेंवर संतापले : म्हणाले, मुलाखत घेतली तेव्हा …!

गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क मैदानात दोन वर्षांनंतर झालेल्या मनसेच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक हिंदूत्वाची भूमिका मांडतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर यथेच्छ टीका केली. शरद पवारांनी १९९९मध्ये राष्ट्रवादीची स्थापना केल्यापासूनच राज्यात जातीपातीचे राजकारण सुरू झाल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी यावेळी केला. राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर शरद पवार यांनीही भाष्य केलं असून आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही संताप व्यक्त केला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मुंबई तसेच मुंब्रा येथील झोपडपट्टय़ांमधील मदरशांमध्ये गंभीर प्रकार सुरू असल्याने त्यांवर धाडी घालण्याची विनंती पंतप्रधानांना करण्याबरोबरच मशिदींवरील भोंगे उतरवा, अशी मागणी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकारकडे केली. सरकारने भोंगे उतरविले नाही तर अशा मशिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा वाजवा, असा आदेश राज यांनी मनसैनिकांना दिला आणि आक्रमक हिंदूत्वाचा पुरस्कार केला. शरद पवार यांनी १९९९मध्ये राष्ट्रवादीची स्थापना केल्यापासूनच राज्यात जातीपातीचे राजकारण सुरू झाल्याचा आरोपही राज यांनी केला.

यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, “एकेकाळी तुम्ही शऱद पवारांची मुलाखत घेता आणि तोंडभरुन कौतुक करता. असा काय चमत्कार घडला? त्यावेळी मुलाखत घेताना शरद पवार यांना जातीयवादी वाटले नाहीत आणि काही दिवसातच जातीयवादी वाटू लागले. शरद पवार आज राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात आहेत का? शरद पवार १९६२ पासून युवक काँग्रेसमध्ये काम करत आहेत. त्यावेळी या लोकांचे जन्मही झाले नव्हते. अशा लोकांनी शरद पवारांवर टीका टिप्पणी करणं म्हणजे सूर्याकडे पाहून थुंकल्यासारखं आहे. राज ठाकरेंकडून ही अपेक्षा नव्हती”. राज ठाकरे सरड्याप्रमाणे रंग बदलत असल्याचंही अजित पवार यावेळी म्हणाले.

Sanjay Raut Vs Raj Thackeray : संजय राऊत यांनी राज ठाकरेंना सुनावले.. म्हणाले ..! 

Categories
Breaking News Political देश/विदेश महाराष्ट्र

संजय राऊत यांनी राज ठाकरेंना सुनावले.. म्हणाले ..!

महाराष्ट्रातील जातीपातीच्या राजकारणाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार जबाबदार असल्याचा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. तसंच १९९९ ला राष्ट्रवादी पक्षाचा जन्म झाल्यानंतर महाराष्ट्रातील जातीपातीचं राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याचंही म्हटलं. यावेळी राज ठाकरे यांनी आम्ही जातीपातून बाहेर पडत नाहीत, मग हिंदू कधी होणार असा सवालही केला. गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क मैदानात दोन वर्षांनंतर झालेल्या मनसेच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक हिंदूत्वाची भूमिका मांडतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर यथेच्छ टीका केली. दरम्यान त्यांच्या या टीकेवर शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले –

“काही लोकांना ही गोष्ट हवी आहे, काही लोकांना कशाला राष्ट्रवादी काँग्रेसला ही गोष्ट हवी आहे, शरद पवारांना ही गोष्ट हवी आहे. १९९९ मध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाल्यानंतर या महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू झालं. याआधी जात नव्हती का? होती, पण त्याआधी जातीचा अभिमान होता. मात्र, १९९९ मध्ये जेव्हा राष्ट्रवादीचा जन्म झाला तेव्हा यांनी दुसऱ्या जातीबद्दल द्वेष निर्माण करायला लावला,” असा आरोप राज ठाकरे यांनी केला.

“बाबासाहेब पुरंदरे यांचं सॉफ्ट टार्गेट आहे”

राज ठाकरे म्हणाले, “तो त्या जातीचा हा या जातीचा असं म्हणत फूट पाडत पाडत कधी मराठा आरक्षणाचं आमिष दाखवायचं. बाबासाहेब पुरंदरे यांचं सॉफ्ट टार्गेट आहे. आम्हाला इतिहास वाचायचा नाही. लिहिला कोणी, पुरंदरे, ब्राह्मण, अच्छा म्हणजे यांनी चुकीचा लिहिला असणार.”

“जातीतून बाहेर पडणार नाही, मग आम्ही हिंदू कधी होणार?”

“आम्ही इतिहास वाचतच नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की जातपात गाडून स्वराज्यासाठी एक व्हा त्या महाराष्ट्रात जातीपातीवरून भांडणं सुरू आहेत, वाद सुरू आहेत, राजकारण सुरू आहेत. आम्ही जातीतून बाहेर पडणार नाही, मग आम्ही हिंदू कधी होणार?” असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

संजय राऊतांची प्रतिक्रिया –

“शरद पवारांनी जातीवाद परसरवला असं म्हणता…पण सल्लामसलत करण्यासाठी त्यांच्या चरणाशी तुम्हीदेखील जात होतात. कशासाठी इतक्या मोठ्या माणसांवर बोलायचं. तेवढ्यापुरच्या टाळ्या मिळतात पण त्यादेखील प्रायोजित आहेत,” असं संजय राऊत म्हणाले.

“काल मेट्रोचं तसंच इतर काही प्रकल्पांचं उद्घाटन झालं, त्याच्यावर बोला. तुमच्या भोंग्याचं, यांच्या भोंग्याचं काय करायचं यासाठी सरकार समर्थ आहे,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला. शिवतीर्थावरचा भोंगा भाजपाचा होता अशी टीका यावेळी संजय राऊतांनी केली. तसंच अक्कलदाढ उशिरा येते हे काल महाराष्ट्राला दिसलं असा टोलाही लगावला.

“काल त्यांनी मराठीभाषा भवनचं स्वागत करायला हवं होतं. महाराष्ट्राच्या राजधानीत इतकं मोठं कार्य घडलं आहे. त्याच्याविषयी काही बोलले नाहीत. फक्त टीका केल्याने काय मिळतं?आहे ते देखील गमवून बसाल,” असा सल्ला संजय राऊतांनी दिला. भाजपा त्यांची मळमळ दुसऱ्याच्या भोंग्यातून बाहेर काढत असल्याचं स्पष्ट दिसत आहे असा आरोप यावेळी त्यांनी केला.

UPA : Sharad pawar : UPA अध्यक्ष पदात मी पडणार नाही  : शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

Categories
Breaking News Political देश/विदेश महाराष्ट्र

UPA च्या अध्यक्ष पदात मी पडणार नाही

: शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

कोल्हापूर : राष्ट्रवादी युवक काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील उपस्थित होते. याच बैठकीत शरद पवारांकडे यूपीएचं अध्यक्षपद सोपवण्याचा ठराव मांडण्यात आला आणि संमतही करण्यात आला. तेव्हापासून शरद पवार संयुक्त पुरोगामी आघाडीचे (UPA)अध्यक्ष होण्यासंबंधी  चर्चा रंगल्या आहेत. या चर्चांना आज शरद पवारांनी आज पूर्णविराम दिला. पवार कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलते होते.

शरद पवार म्हणाले, ”युपीएच्या अध्यक्षपदासाठी मला रस नाही, जनाधार असलेल्या पक्षांना एकत्र घेऊन पर्याय द्यावा, विरोधकांनी एकत्र यावे, यासाठी मी पाठिंबा आणि जी मदत हवी असेल ती देणार आहे. मी काही नेतृत्व करण्याची जबाबदारी घेणार नाही. मध्यंतरी आमच्या एका तरुणाने युपीएचा अध्यक्ष व्हावा यासाठी ठराव केला. मला त्यात अजिबात रस नाही, मी त्याच्याच पडणार नाही. मी काही जबाबदारी घेणार नाही. पण एकत्र येऊन काही पर्याय देता येत असेल तर त्यांना सहकार्य देण्यासाठी माझी तयारी आहे,”

”इतर सर्व पक्षांचीही राज्या राज्यांमध्ये शक्तीकेंद्र आहेत. पण काँग्रेस एक असा पक्ष आहे जो देशाच्या प्रत्येक राज्यात कमी जास्त प्रमाणात आहे. आज त्यांची सत्ता नसेल पण काँग्रेस कार्यकर्ता देशाच्या प्रत्येक राज्यातील जिल्ह्यात, गावात पहायला मिळतो. त्यामुळे पर्यायी काही करायचं असेल तर ज्या पक्षाचा वेस व्यापक आहे त्याला घेऊन करणं वास्तव्याला धरुन होईल. तसा विचार वेगवेगळ्या पक्षातील लोक करत असतील तर त्याच्यातून काही निर्णय येण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षाने एकत्र यावं असं म्हणतात त्यावेळी काही वास्तव गोष्टी दुलर्क्ष करुन चालणार नाहीत.ममता बॅनर्जींचा अत्यंत शक्तिशाली पक्ष आहे, सत्ता असून लोकांचा पाठिंबा आहे,” असे पवार म्हणाले.

संजय राऊतांनी युपीएचा सातबारा काँग्रेस आणि गांधी घराण्याकडे असून तो बदलण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे, याबाबत पवारांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, ” ते संजय राऊत यांचे मत आहे माझं मत नाही,”

Sharad Pawar : AIMIM : एमआयएम सोबत जाण्याबाबत शरद पवारांनी केले महत्वाचे वक्तव्य 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

एमआयएम सोबत जाण्याबाबत शरद पवारांनी केले महत्वाचे वक्तव्य

पुणे : कुणी कुठल्या पक्षासोबत जायचं हे ते स्वत: सांगू शकतात. परंतु ज्यांच्यासोबत जायचंय त्या पक्षाने तरी होकार दिला पाहिजे. हा राजकीय निर्णय आहे. हा निर्णय महाराष्ट्रापुरता कुणी प्रस्तावित केला असला तरी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष म्हणून अशा प्रकारचा राजकीय निर्णय राज्याला घेण्याचा अधिकार देत नाही. राज्याला या निर्णयाबाबत राष्ट्रीय समितीने स्पष्ट करेपर्यंत कोणत्याही राज्यात अशा प्रकारची भुमिका ते घेऊ शकत नाहीत. त्यामुळं महाराष्ट्रात गेली दोन दिवस जो एमआयएमबाबत ज्या बातम्या येतायत. तो पक्ष निर्णय नाही, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘एमआयएम’सोबत जाण्याची शक्यता नसल्याचे सांगितले.

एमआयएम चे खासदार इम्तियाज जलील यांनी ‘एमआयएम’ला महाविकास आघाडीत सामील करून घेण्याचे आवाहन आघाडीच्या नेत्यांना केले आहे .या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या राजकीय चर्चेला पवार यांनी राष्ट्रवादीच्या वतीने पूर्ण विराम दिला आहे. माळेगाव येथील निवासस्थानी रविवारी (दि २०)सायंकाळी पत्रकारांशी पवार बोलत होते.

Pune, Airport : Sharad Pawar : पुणे विमानतळाबाबत शरद पवारांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती!

Categories
Breaking News Political पुणे

पुणे विमानतळाबाबत शरद पवारांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती 

पुणे : जिल्ह्यातील नियोजीत विमानतळासंदर्भात या पंधरवड्यात संबंधितांशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लागेल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. बारामती तालुक्यातील सुपे येथील विद्या प्रतिष्ठानच्या शैक्षणिक संकुलाच्या इमारत पाहणीच्या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

पवार  म्हणाले – विमान तळासंदर्भात जागा निश्चित झाल्या, पण संरक्षण खात्याने हरकत घेतली. त्यामुळे हा प्रश्न प्रलंबीत राहिला आहे. पुढील पंधरा दिवसात मी स्वतः, खासदार सुप्रिया सुळे आणि राज्य सरकारचे प्रतिनिधी मिळून संरक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेणार आहोत. संरक्षण खात्याचे पुण्यात एक विभाग आहे. त्यांची विमाने रोज सकाळी सरावासाठी या भागातून जात असतात. शेवटी त्यांची भूमिका काय आहे हे समजून घ्यावी लागेल. आणि त्यानंतरच विमानतळा संदर्भातील मार्ग काढला जाईल.आंतरराष्ट्रीय स्तरावरील विमानतळ नेमके कोठे होणार हा प्रश्न अद्यापही गुलदस्त्यात आहे. चाकणला होणार, पुरंदर तालुक्यात होणार का बारामती,दौंड व पुरंदर तालुक्यांच्या सिमेवरील गावांत होणार याबाबत परिसरात उलट-सुलट चर्चा चालू आहे.
 पवार  यांनी येत्या पंधरवड्यात हा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे सुतोवाच केल्याने होणाऱ्या बैठकीकडे लक्ष वेधले आहे. बारामती, दौंड व पुरंदर तालुक्यांच्या लगतच्या गावांसाठी सुपे हे मध्यवर्ती बाजार पेठेचे गाव असल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातले आहे. गावात विद्या प्रतिष्ठानचे मोठे शैक्षणिक संकुल उभारले जात आहे. त्या बरोबरच उपजिल्हा रूग्णालय, मोठी बाजार पेठ होऊ घातली आहे. याबाबत त्यांना विचारले असता. ते म्हणाले – हा विषय अजित पवारांचा आहे. आणि विमानतळाचा प्रश्न माझ्याशी संबधित आहे, असा खुलासा केला.

Nawab Malik Portfolios : नवाब मलिक आता बिनखात्याचे मंत्री  : ‘या’ नेत्यांवर सोपवली जबाबदारी 

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

नवाब मलिक आता बिनखात्याचे मंत्री

: ‘या’ नेत्यांवर सोपवली जबाबदारी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी गुरुवारी रात्री उशीरापर्यंत सुरु असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडललेल्या या बैठकीत सध्या संक्तवसुली संचालनालयाच्या म्हणजेच ईडीच्या ताब्यात असणाऱ्या नवाब मलिक यांच्याकडून अल्पसंख्यांक मंत्रीपदाचा कारभार काढून घेण्यात आलाय. नवाब मलिक यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला नसला तरी राष्ट्रवादीच्या या निर्णयामुळे ते बिनखात्याने मंत्री झालेत.

खाती कोणाकडे?


राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्यणानुसार गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे अल्पसंख्याक विभागाचा कार्यभार सुपूर्द करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे राजेश टोपे यांच्याकडे नवाब मलिक यांच्याकडे असणारं दुसरं खात्याचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलाय. राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री असणारा राजेश टोपे आता कौशल्य विकास आणि रोजगार या विभागाचा कार्यभारही पाहतील.

पालमंत्रीपदाची जबाबदारी कोणाकडे?
दोन विभागांबरोबरच नवाब मलिक यांच्याकडे असणारी गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारीही काढून घेण्यात आलीय. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलाय. तर परभणीचे पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

मलिक यांच्याकडील जबाबदाऱ्या का काढल्या?
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना बैठकीत झालेल्या निर्णयांबद्दल सांगताना नवाब मलिक यांच्याकडून जबाबदारी काढून घेण्यात आल्याचं सांगितलं. “नवाब मलिक यांचा जामीन पुन्हा फेटाळण्यात आला आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडच्या जबाबदाऱ्या या इतरांना देण्याचं काम हे या दोन-चार दिवसांत पूर्ण होईल. नवाब मलिक जोपर्यंत पुन्हा उपलब्ध होत नाहीत, तोपर्यंत ज्या जिल्ह्याचे त्यांच्याकडे पालकमंत्रीपद आहे ते जिल्हे आणि त्यांच्याकडच्या खात्यांची जबाबदारी ते नसल्यामुळे काम थांबू नये, यासाठी तात्पुरती व्यवस्था करायचं आम्ही ठरवलं आहे,” असं जयंत पाटील म्हणाले.

मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारीही काढली
मुंबईचे राष्ट्रवादीचे अध्यक्षपद नवाब मलिकांकडे आहे आणि लवकरच मुंबई महापालिका निवडणुक आहे, यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, “नवाब मलिक हे मुंबईचे अध्यक्ष आहेत आणि आज ते उपलब्ध होऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्याबरोबर कार्याध्यक्ष म्हणून नरेंद्र राणे आणि राखी जाधव या दोघांची नेमणूक आम्ही करणार आहोत. नवाब मलिक उपलब्ध नसल्याने पक्ष संघटनेची येणाऱ्या निवडणुका आणि अन्य सर्व गोष्टींची हाताळणी, आमचे हे दोन कार्याध्यक्ष नवाब मलिक यांच्यासमवेत करतील.”

आज मुख्यमंत्र्यांना पाठवणार पत्र
“नवाब मलिकांकडे दोन जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद होतं. तिथे आता परभणीत धनंजय मुंडे हे पालकमंत्री असतील आणि गोंदियात प्राजक्त तनपुरे हे पालकमंत्री असतील, हा निर्णय आम्ही घेतला आहे. उद्याच (शुक्रवारी) मी मुख्यमंत्र्यांनी मी पत्र पाठवून आमच्या पक्षाकडून हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना कळवला जाणार आहे, मुख्यमंत्री त्यावर अंतिम निर्णय घेतील. नवाब मलिकांच्या अनुपस्थितीमुळे त्यांच्या विभागाचं काम पूर्णपणे ठप्प झालं आहे. यामुळेच ही जबाबदारी दुसऱ्या मंत्र्यांना देण्याची आवश्यकता आहे,” असंही जयंत पाटील यांनी सांगितलं.

चुकीच्या पद्धतीने अटक
“नवाब मलिक आणि अनिल देशमुख या दोघांना चुकीच्या पद्धतीने डांबून ठेवलेलं आहे. अनिल देशमुखांनी अटक झाल्यावर स्वत:हून राजीनामा दिला. नवाब मलिक यांची जी अटक झालेली आहे ती चुकीच्या पद्धतीने झाली आहे, अशी आमची धारणा आहे. त्या पद्धतीने न्यायालयात लढाई सुरू आहे.तोपर्यंत त्याच्या विभागाचा भार हा दुसऱ्यांना सोपवला जात आहे, नवाब मलिक हे मंत्रिपदावर कायम राहतील,” असंही जयंत पाटील यांनी सांगितलं.

River Improvement : नदी सुधार प्रकल्प : सामाजिक संस्थांसोबत आज बैठक 

Categories
Breaking News PMC पुणे

नदी सुधार प्रकल्प : सामाजिक संस्थांसोबत आज बैठक 

पुणे : मुळा-मुठा नदी काठ सुधारणा प्रकल्पावर पर्यावरणतज्ज्ञांनी आक्षेप घेतल्याने त्या आक्षेपांबाबत महापालिकेचे अधिकारी, जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींची आज बैठक होणार आहे. या प्रकल्पाबाबत सामाजिक संस्थांच्या हरकतींवर या बैठकीत चर्चा होणार आहे.

नदीकाठ सुधार प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होणार आहे, भविष्यात शहराला पुराचा धोकाही होण्याची शक्यता व इतर आक्षेप सामाजिक संस्थांनी घेतला होता. त्यावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी याप्रकल्पावर पुण्यातील एका कार्यक्रमात बोट ठेवून याचा अभ्यास करावा लागणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर या प्रकल्पाच्या धोक्यासंदर्भात मुंबईत १२ मार्च रोजी शरद पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यामध्ये चर्चा करताना पर्यावरणवादी व महापालिकेचीही बाजू ऐकून घेण्यात आली. त्यानंतर अभ्यास करण्यासाठी समिती गठित करण्याचा निर्णय घेतला असून, ही समिती १५ दिवसात त्यांचा अहवाल सादर करणार आहे.याच वेळी या प्रकल्पावर पुण्यातील सामाजिक संस्था, संघटना, पर्यावरणवादी यांच्याशी चर्चा करण्यासाठी १६ मार्च रोजी जलसंपदा विभाग आणि महापालिकेची बैठक होईल असे आदेश जयंत पाटील यांनी दिले. त्यानुसार ही बैठक उद्या सकाळी ११ वाजता होत असून, महापालिकेने या प्रकल्पावर कोणते आक्षेप घेतले जाऊ शकतात याचा विचारू करून त्याबाबत तयारी करण्याची लगबग सुरू होती.
“बैठकीत शासनाने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीसमोर महापालिका प्रकल्पाचे सादरीकरण करणार आहे. त्यावेळी महापालिकेचा आराखडा तयार करणारे तज्ज्ञही उपस्थित राहणार आहेत.’’
– विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका

Sharad Pawar Vs Chandrkanat Patil : पवारसाहेब मन मोठे करा… पुण्याच्या विकासात आता तरी आडवे येऊ नका!

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

पवारसाहेब मन मोठे करा… पुण्याच्या विकासात आता तरी आडवे येऊ नका

:  चंद्रकांत पाटील यांचा शरद पवारांना टोला

पुणे : मुळा-मुठा नदी पुनरूज्जीवन प्रकल्पाला स्थगिती देण्याचा निर्णय घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा पुण्याच्या विकासात पाय आडवा घालण्याचे काम केलेले आहे. खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत या प्रकल्पाला स्थगिती देत राज्य सरकारनेही पुण्याच्या विकासाबाबतची उदासिनता कृतीतून दाखवून दिलेली आहे. असा आरोप भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तसेच पवारसाहेब मन मोठे करा… पुण्याच्या विकासात आता तरी आडवे येऊ नका. असा टोलाही शरद पवार यांना लगावला आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील मेट्रो सेवेला हिरवा कंदिल दाखविला. केवळ पाच वर्षांत भूमीपूजन ते उद्घाटन हा वेग भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्षमतेचे उदाहरणच होते. शहरांच्या विकासाचे प्रकल्प भाजपा प्रभावीपणाने आणि वेळेत पूर्ण करतो, हा विश्वास पुणेकरांच्या मनात निर्माण करणारी ही घटना होती. नदी पुनरूज्जीवन प्रकल्पाचे भूमीपूजन करून तोही वेळेत पूर्ण होणार, हे लक्षात आल्यानंतर त्याला अपशकून करण्याचे सूतोवाच गेल्याच आठवड्यात खासदार शरद पवार यांनी केले होते. काल झालेल्या बैठकीत या प्रकल्पाला स्थगिती देण्याचा निर्णय गुणात्मक नसून राजकीय आहे.
पाटील म्हणाले,  नदी पुनरूज्जीवन प्रकल्प किती संवेदनशील आहे, याची भारतीय जनता पार्टीस पूर्ण कल्पना आहे. हा प्रकल्प भाजपाच्या कल्पनाभरारीतून आलेला नाही तर पूर्ण अभ्यासांती होतो आहे. हा नदी सुशोभीकरणाचा प्रकल्प असल्याची आवई उठवून त्याला विरोध करण्याचा पवार यांचा प्रयत्न त्यांना शोभणारा नाही. नद्या आणि पाणी या संदर्भात शिखर संस्था असलेल्या सीडब्लूपीआरएसने जलसंपदा खात्याच्या शिफारसीनुसार या प्रकल्पाच्या हायड्रॉलॉजी आणि हायड्रॉलिक्स अभ्यासास डिसेंबर २०१७ मध्ये मान्यता दिलेली आहे. जवळपास पाच वर्षांच्या पूर्वाभ्यासानंतर या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पाच वर्षांच्या कालावधीत जलसंपदा खाते, सीडब्लूपीआरएस, लोकप्रतिनिधी, विविध पर्यावरणविषयक संस्थांचे प्रतिनिधी, माध्यमकर्मी, या प्रकल्पाशी निगडित असलेल्या नागरिकांशी संवाद केला गेला आहे. राष्ट्रीय हरित लवादात या प्रकल्पासंदर्भात आलेल्या सर्व रास्त मुद्द्यांचे निराकरण झाल्यावरच या प्रकल्पाच्या निविदा निघाल्या.
नदीत सांडपाण्याचा व दूषित पाण्याचा एक थेंबही जाणार नाही, यासाठी ११ मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. महापालिकेकडे असलेले मर्यादित आर्थिक स्रोत लक्षात घेउन मोदी सरकारने जायकाकडून ९९० कोटींचे कर्ज घेऊन त्यातील ८४१ कोटी रुपये अनुदानस्वरूपात महापालिकेला देण्याचा निर्णय घेतलेला आहे.
माननीय शरद पवार पुण्याचा विकास तुम्ही करू शकता, असा भ्रम तुम्ही गेली पन्नास वर्षे पुणेकरांच्यात जोपासलात. परंतु तुमच्या दुर्देवाने पुण्यात, राज्यात आणि केंद्रात भाजपा सरकार आल्यावर पुणेकरांना विकास वेगाने होऊ शकतो आणि वेळेत होभ शकतो, याचे प्रत्यंतर आले. २०१२ च्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत तुमच्या पक्षाने प्रकाशित केलेल्या जाहिरनाम्यात ‘नदीसुधार योजना राबवविणार,’ असे आश्वासन दिलेले होते. त्या कारकिर्दीत तुमच्या पक्षाची निर्विवाद सत्ता होती. परंतु त्या पाच वर्षांत आपल्याकडून त्याबाबत कोणतेही पाऊल पुढे पडले नाही. त्यानंतर २०१७च्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात पुन्हा नदीसुधार योजनेअंतर्गत काय काम करणार, याचा उल्लेख केलेला आहे.
पाटील पुढे म्हणाले,  पवारसाहेब, पुण्याच्या नदीची झालेली ओंगळवाणी अवस्था आम्हाला पाहवत नव्हती; म्हणूनच या नदीचे पुनरूज्जीवन करण्यासाठी आम्ही कंबर कसली. केंद्र सरकार आणि राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मदतीचा हात पुढे केला. त्याचाच परिणाम म्हणून पुण्यात भारतीय जनता पार्टीला गेल्या पाच वर्षांत या प्रकल्पाचा सर्वांगाने अभ्यास करता आला. आणि त्यानंतच या प्रकल्पाचे भूमीपूजन झाले आहे. पुण्याचा विकास आपल्या सहभागाशिवाय कसा होऊ शकतो, या अहंकारापोटी आपण नदी पुनरूज्जीवन प्रकल्प रेंगाळण्याचा निर्णय घेतला असेल तर ते आपणास शोभा देणारे नाही. पुण्याच्या पर्यावरणात, आरोग्यात, सौंदर्यात आणि अर्थकारणात भर घालणारा हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी मन मोठे करा.

Mula-Mutha River Improvement : Sharad Pawar : मोदींनी भूमिपूजन केलेल्या नदी सुधार योजनेत शरद पवारांनी घातले लक्ष 

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

मोदींनी भूमिपूजन केलेल्या नदी सुधार योजनेत शरद पवारांनी घातले लक्ष

: मुळा मुठा नदी प्रकल्पाच्या कामाबाबत शंका निरसनासाठी समिती गठीत

मुंबई- पुणे येथील मुळा मुठा नदीची स्वच्छता आणि संवर्धन होण्यासाठी शासन उपाययोजना करीत आहे. या प्रकल्पाबाबत शंकांचे निरसन व्हावे आणि अडचणींवर मात करून स्वच्छ, सुरक्षित नदी परिसरासाठी काम सुरू व्हावे यासाठी आंतरविभागीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

पुणे येथील प्रस्तावित रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंटबाबत आज खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण केंद्र येथे बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर आदी उपस्थित होते.

पुण्यातील मुळा मुठा नदी प्रकल्पाच्या कामाबाबत काही पर्यावरणवादी, तज्ज्ञ तसेच स्थानिक सामाजिक संस्थांनी प्रश्न उपस्थित केले असले तरी मुळा मुठा नदीची स्वच्छता आणि संवर्धन व्हावे ही सर्वांचीच इच्छा आहे. त्यामुळे या प्रश्नांचा अभ्यास करून शंका निरसन करण्यासाठी पर्यावरण विभाग, नगरविकास विभाग आणि जलसंपदा विभागातील तज्ज्ञांची समिती नेमण्यात आली आहे. या समितीची बैठक लवकरच पुणे येथे होईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्वच्छ आणि आरोग्यदायी पाणी व नदी हे सर्वसामान्य पुणेकरांचा हक्क अबाधित राहण्यासाठी योग्य कार्यवाही होण्यासाठी तज्ञ समिती कामकाज करेल, असे सांगितले.

PM Modi in pune : पुण्यातील  मुरुडकर झेंडेवाले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साठी बनवला खास फेटा !!!

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे

पुण्यातील  मुरुडकर झेंडेवाले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साठी बनवला खास फेटा !!!

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर येत आहेत. त्यासाठी भाजपने जोरात तयारी केली आहे. मोदींचा सन्मान खास मराठमोळ्या पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांनी फेटा बनवला आहे. त्यासाठी बरीच तयारी चालली होती.

: भाजपने दिले पवारांना उत्तर

दरम्यान मोदींच्या मेट्रो उदघाटनावरून राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी टीका केली होती. शिवाय इशारा ही दिला होता. त्यावर आता भाजपने पवारांना उत्तर दिले आहे. भाजपने म्हटले आहे कि मोदी लोकार्पण आणि उदघाटन असे दोन्ही गोष्टी करतात. तसं पवार तुम्हाला जमलं नाही.
https://twitter.com/bjp4maharashtra/status/1500176426397736961?s=21

: शहराच्या वाहतुकीत होणाऱ्या बदलावरून राष्ट्रवादीचा हमला

दरम्यान आजच्या मोदींच्या दौऱ्यामुळे वाहतुकीत बरेच बदल होणार आहेत. याबाबत महापौरांनी ट्विट केले होते. त्या ट्विट ला राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी उत्तर दिले आहे. जगताप म्हणाले, मोदी पाकिस्तानात जाऊन केक खाऊन आले तेव्हा कुठला प्रोटोकॉल नव्हता, मग पुणेकरांना का त्रास? असा प्रश्न जगताप यांनी विचारला आहे.
https://twitter.com/jagtapspeaks/status/1500206758584717314?s=21