Monsoon | मान्सूनचा पहिला अंदाज आला | जाणून घ्या यंदा किती पाऊस पडणार? दुष्काळाची शक्यता किती?

Categories
Breaking News social देश/विदेश लाइफस्टाइल शेती

मान्सूनचा पहिला अंदाज आला | जाणून घ्या यंदा किती पाऊस पडणार?  दुष्काळाची शक्यता किती?

 स्कायमेटच्या मते, सामान्य पावसाची केवळ 25% शक्यता आहे.  LPA च्या 94% पाऊस अपेक्षित आहे.  तेथे दुष्काळ पडण्याची शक्यता 20% आहे.  वास्तविक, ला निना संपली असून आगामी काळात एल निनोमुळे मान्सून कमकुवत होण्याची शक्यता आहे.
भारतात मान्सून २०२३: मान्सूनचा पहिला अंदाज आला आहे.  स्कायमेट या खाजगी हवामान अहवाल देणार्‍या संस्थेने 2023 चा मान्सूनचा अंदाज जाहीर केला आहे.
स्कायमेटच्या मते, यंदा मान्सून सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.  म्हणजे, पहिल्या अंदाजात पाऊस सामान्यपेक्षा कमी असू शकतो.  स्कायमेटच्या मते, सामान्य पावसाची केवळ 25% शक्यता आहे.  LPA च्या 94% पाऊस अपेक्षित आहे.  तेथे दुष्काळ पडण्याची शक्यता 20% आहे.  वास्तविक, ला निना संपली असून आगामी काळात एल निनोमुळे मान्सून कमकुवत होण्याची शक्यता आहे.

Union Budget 2023-24 | केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24ची ठळक वैशिष्ट्ये

Categories
Breaking News Commerce cultural Education PMC Political social Sport आरोग्य देश/विदेश पुणे महाराष्ट्र लाइफस्टाइल शेती

Economic recession | देशात जूननंतर आर्थिक मंदी येऊ शकते

Categories
Breaking News Commerce Political social देश/विदेश पुणे

देशात जूननंतर आर्थिक मंदी येऊ शकते

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केली चिंता

जी २० परिषदेला (G20 conference) आजपासून सुरुवात होत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union minister Narayan Rane) यांनी या परिषदेचे उद्घाटन केले आहे. आजपासून इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुप ची दोन दिवसीय बैठक सुरु होणार आहे. या बैठकीत सहभागी होणारे देश आणि संस्था पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीच्या विविध पैलूंवर विचारमंथन करणार आहेत.

नारायण राणे यांनी या परिषदेचे उद्घाटन केले आहे. नारायण राणे म्हणाले, “मी स्वतःला भाग्यशाली समजतो की, जी २० या जागतिक परिषदेचे उदघाटन माझ्या हाताने झाले. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वात आपण देशाची प्रगती करत आहोत, आपल्या जीडीपीमध्ये कमालीची वाढ होत असून आठ वर्षापूर्वी आपला देश १० व्या क्रमांकावर होता. आपला आता देश ५ व्या क्रमांकावर आहे. ते केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणामुळे शक्य झाले आहे. येत्या १० वर्षांत आपण तिसर्‍या क्रमांकावर जाऊ अशी शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली. तसेच जागतिक मंदीवर भाष्य करताना राणे म्हणाले की, जगामध्ये आर्थिक मंदी मोठ्या देशांना आहे. भारताला त्याची झळ बसू नये आणि मंदी आली तर जूननंतर येईल. मंदीची झळ सामान्य नागरिकांना पोहचू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करत आहेत”, असेही नारायण राणे म्हणाले.

शहरांचे स्वरूप कसे असावे याचे मार्गदर्शन या परिषदेमधून मिळेल आणि याला केंद्र सरकार, राज्य सरकार निधी उपलब्ध करुन देतील. तसेच महाराष्ट्र प्रशासनाबद्दल मला अभिमान आहे. सरकार बदलले की निर्णय बदलतात, या मताशी मी सहमत नाही, मी ३२ वर्ष मंत्री होतो, निर्णय बदलत नाहीत तर  दृष्टिकोन बदलतो”, असे नारायण राणे यांनी स्पष्ट केले. तसेच अमेरिकेचा जी डी पी २० ट्रिलियन आहे. भारत ५ ट्रिलियनपर्यंत पोहचू पाहत आहे. देशाच्या प्रगतीसाठी, आर्थिक स्थिती भारताची सुधारावी. यासाठी केंद्र सरकारमार्फत विशेष उपाययोजना केल्या जात आहे. तसेच जी २० परिषदेमध्ये देखील यावर चर्चा होणार आहे. देशातील प्रत्येक नागरिकांना याचा फायदा होणार आहे. प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यावर परिषदेत विशेष चर्चा होणार असून केंद्र सरकार युद्ध पातळीवर पावल उचलत असल्याचे त्यांनी सांगितले. (Minister Narayan Rane)

G 20 Conference | 16 आणि 17 जानेवारीला जी20 परिषदेच्या पायाभूत सुविधा कार्यगटाची बैठक पुण्यामध्ये

Categories
Breaking News Commerce PMC social देश/विदेश पुणे महाराष्ट्र

16 आणि 17 जानेवारीला जी20 परिषदेच्या पायाभूत सुविधा कार्यगटाची बैठक पुण्यामध्ये

भारताच्या जी20 अध्यक्षतेंर्गत जी20 पायाभूत सुविधा कार्यगटाची(IWG) पहिली बैठक पुण्यामध्ये 16-17 जानेवारी 2023 रोजी आयोजित होणार आहे. या मंचावर आयडब्लूजी सदस्य देश, अतिथी देश आणि भारताने निमंत्रित केलेल्या आंतरराष्ट्रीय संघटना भारताच्या जी20 अध्यक्षतेंर्गत 2023 पायाभूत सुविधा जाहीरनाम्यावर चर्चा करण्यासाठी एकत्र येणार आहेत. भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाचा आर्थिक व्यवहार विभाग या बैठकीचे यजमानपद भूषवेल तर ऑस्ट्रेलिया आणि ब्राझिल बैठकीचे सहअध्यक्षपद भूषवतील.

जी20 पायाभूत सुविधा कार्यगट मालमत्ता श्रेणी म्हणून विकसित होणाऱ्या पायाभूत सुविधांसह पायाभूत सुविधा गुंतवणुकीचे विविध पैलू, दर्जेदार पायाभूत सुविधा गुंतवणुकीला प्रोत्साहन आणि पायाभूत सुविधा गुंतवणुकीसाठी आर्थिक संसाधने जमा करण्यासाठी नवोन्मेषी साधनांची निवड करणे या विषयांवर विचारमंथन करतो.पायाभूत सुविधा कार्यगटाची फलनिष्पत्ती जी20 फायनान्स ट्रॅक प्राधान्यक्रमांमध्ये वापरली जाते आणि पायाभूत सुविधा विकासाला प्रोत्साहन दिले जाते.

भारताच्या जी20 अध्यक्षतेची ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ ही संकल्पना 2023च्या भारताच्या जी20 अध्यक्षतेअंतर्गत 2023च्या पायाभूत सुविधा जाहीरनाम्यासाठी पोषक वातावरण निर्माण करते. ही संकल्पना समन्यायी वृद्धीचा संदेश अधोरेखित करते आणि प्रतिरोधक, समावेशक आणि शाश्वत शहरी पायाभूत सुविधांची उभारणी करत असलेल्या चर्चेच्या केंद्रीय जाहीरनाम्यासोबत यथार्थाने जोडली जाते. पुण्याच्या बैठकीत होणाऱ्या चर्चांमध्ये भारतीय अध्यक्षतेंर्गत पायाभूत सुविधा कार्यगटासाठीच्या जाहीरनाम्यावर भर दिला जाईल.

“उद्याच्या शहरांना अर्थसाहाय्य: समावेशक, प्रतिरोधक आणि शाश्वत” हा या बैठकीत चर्चिला जाणारा प्राधान्यक्रमाचा अग्रणी विषय आहे. शहरांना वृद्धीचे आर्थिक केंद्र बनवणाऱ्या विविध पैलूंवर, शहरी पायाभूत सुविधांना अर्थसाहाय्य, भविष्यात उपयुक्त असलेल्या पायाभूत सुविधांची उभारणी, उर्जा कार्यक्षम आणि पर्यावरणस्नेही शाश्वत पायाभूत सुविधांना खाजगी अर्थपुरवठा उपलब्ध करण्यासाठी वित्तीय गुंतवणुकीला दिशा देण्यावर आणि सामाजिक असंतुलन कमी करण्यावर ही संकल्पना भर देईल. या बैठकीच्या जोडीने पुणे बैठकीत ‘उद्याच्या शहरांना अर्थसाहाय्य’ यावर एका उच्च स्तरीय कार्यशाळेचेही आयोजन होईल. या कार्यशाळेत उद्याच्या शहरांची उभारणी करण्यासाठी तांत्रिक आणि व्यवस्थापकीय गरजांशी संबंधित संकल्पना, खाजगी अर्थसाहाय्यात आणि उद्याच्या शहरांच्या अर्थसाहाय्याच्या क्षमतांच्या गरजांमध्ये वाढ करण्याबाबत गुंतवणूकदारांच्या धारणा यावर चर्चा होईल. जी20 बैठकीच्या आधी पुणे महानगरपालिका आणि पुणे शहरातील इतर हितधारकांच्या वतीने अनेक लोकसहभाग उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये जी20 वरील व्याख्याने, शहरांना भविष्यासाठी सज्ज बनवणे आणि शहरी विकासाचे महत्त्व यावरील चर्चासत्र. सायक्लोथॉन, राष्ट्रीय युवा दिनी मोटरबाईक रॅली, स्वच्छता मोहीम आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मॉडेल जी20 चर्चा यांचा समावेश होता. जी20 बैठकीच्या जोडीने होणाऱ्या संपूर्ण विचारविनिमयांमध्ये जीवनातील सर्व स्तरांमधील लोकांना सहभागी करण्याचा या उपक्रमांचा उद्देश आहे. भारताच्या जी20 अध्यक्षतेच्या काळात जी20 पायाभूत सुविधा कार्यगटाचा वापर शहरांना भेडसावणाऱ्या समस्या आणि नजीकच्या भविष्यात शहरे निर्माण करणार असलेल्या संधी यावर चर्चा करण्यासाठी आणि शहरांना अधिकाधिक निवासयोग्य बनवणारा एक आराखडा तयार करण्यासाठी एक मंच म्हणून केला जाईल.

अर्थ मंत्रालय जी20 पायाभूत सुविधांच्या जाहीरनाम्याला दिशा देईल जेणेकरून जी20 नव्या संकल्पना निर्माण करणारा आणि एकत्रित कृतीला गतिमान करणारा एक जागतिक प्रमुख कारक बनेल.

ECI | RVM | घरापासून दूर असलात तरी आपल्या गावात करता येणार मतदान |निवडणूक आयोग आता RVM आणण्याच्या तयारीत

Categories
Breaking News Political social देश/विदेश महाराष्ट्र

घरापासून दूर असलात तरी आपल्या गावात करता येणार मतदान

|निवडणूक आयोग आता RVM आणण्याच्या तयारीत

भारतातील (India) जवळजवळ एक तृतीयांश प्रौढ जनता मतदान (voting) करत नाही, हे लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने (Election commission of India) राजकीय पक्षांना नव्या प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या (ईव्हीएम) डेमोसाठी बोलावले आहे. या मशिनमुळे देशातील स्थलांतरितांना त्यांच्या घरापासून दूर असताना देखील मतदान करण्यास मदत होणार आहे. शिवाय मतदान करण्यासाठी वृद्धांचा प्रवास टळणार आहे.

निवडणूक आयोगाकडून रिमोट इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन (RVM) तयार करण्यात आले असून, त्यामुळे ७२ मतदारसंघांची (constituency)मते स्वीकारता येतील. मतदारानुसार हे यंत्र स्विच केले जाते. यामुळे दुर्गम मतदान केंद्रावरून आरव्हीएमच्या माध्यमातून ७२ मतदारसंघांसाठी मतदार मतदानाचा हक्क बजावू शकतात.

2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत 67.4% मतदान झाले होते. अर्थात 30 कोटींहून अधिक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला नाही. यावरून निवडणूक आयोग चिंतीत आहे.

दरम्यान आरव्हीएम मशीनचा डेमो १६ जानेवारीला आहे. या वेळी निवडणूक आयोगाची तांत्रिक तज्ज्ञ समितीही उपस्थित राहणार आहे. याशिवाय कायद्यात आवश्यक बदल, प्रशासकीय कार्यपद्धती आणि मतदान पद्धती किंवा तंत्र अशा सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांशी संबंधित मुद्द्यांवर आयोगाने ३१ जानेवारीपर्यंत लेखी मते मागवली आहेत.

Bilawal Bhutto Vs BJP | बिलावल भुट्टो यांच्या निषेधार्थ भाजपाचे राज्यात १२०० ठिकाणी आंदोलन

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र

बिलावल भुट्टो यांच्या निषेधार्थ भाजपाचे राज्यात १२०० ठिकाणी आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वात भारत (India) सामर्थ्यशाली झाला आहे. पाकिस्तान (Pakistan) भारतात दहशतवादी कारवाया (Terror) करू शकत नाही तसेच भारताकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला करण्याची भारताची ताकद आहे. यामुळे हताश पाकिस्तानकडून मा. मोदीजींविषयी अपमानास्पद वक्तव्य करण्यात आले, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP President Chandrashekhar Bawankule) यांनी शनिवारी पुणे येथे केली.

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाचे नेतृत्व करताना ते बोलत होते.

मा. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी मा. मोदीजी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्यामुळे संपूर्ण देशाच्या आणि महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत. याचा निषेध करण्यासाठी राज्यात भाजपा कार्यकर्ते १२०० ठिकाणी आंदोलन करत आहेत. सर्व शहरे, जिल्हे व तालुक्यांच्या ठिकाणी आंदोलने होत आहेत. बिलावल भुट्टो यांचा पुतळा जाळून कार्यकर्ते संताप व्यक्त करत आहेत. (Bhartiya Janata Party)

त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण जगामध्ये भारताला महत्त्वाचे स्थान मिळवून देत आहेत. भारताकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला करण्याची ताकद भारताकडे मा. मोदीजींच्या नेतृत्वात आहे. तो देश भारताच्या विरोधात बॉम्बस्फोट किंवा दहशतवादी कारवाया अशी कृती करू शकत नाही. दहशतवाद्यांना पोसणारा पाकिस्तान हतबल झाला आहे. पाकिस्तान कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे अशी वक्तव्ये केली जात आहेत.

त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकासाची बुलेट ट्रेन सुरू झाली असून हे असेच काम चालू राहिले तर आपले राजकीय अस्तित्व संकटात येईल, अशी भीती महाविकास आघाडीला वाटते व तेच त्यांच्या मोर्चामागचे खरे कारण आहे. महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात महाराष्ट्राची पिछेहाट झाली. आता राज्य गतीने पुढे जात आहे, यामुळे हा मोर्चा काढण्यात आला आहे.

ते म्हणाले की, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महापुरुषांचा अपमान केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केला त्यावेळी आदित्य ठाकरे त्यांना मिठी मारत होते. महाविकास आघाडीच्या एका आमदाराने छत्रपती शिवाजी महाराजांसारखी वेषभूषा करून तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसमोर नतमस्तक झाला होता. ही महाविकास आघाडीची संस्कृती आहे. अशी अनेक उदाहरणे देता येतील.

शहर अध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले, पाकिस्तानला भारताकडून पराभव स्वीकारावा लागला, तरी त्यांचा मूळ स्वभाव बदलत नाही. मोदींमुळे जगात शांतता प्रस्थापित होत आहे. पाकिस्तानातील जनतेचे लक्ष तेथील परिस्थितीवरून विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता बदलेला भारत आहे. महाविकास आघाडीचे नेते आज बोलत नाहीत. पंतप्रधान एका पक्षाचे नाहीत, ते देशाचे नेते आहेत. महाविकास आघाडीच्या स्वाभिमानाचे काय झाले.

यावेळी प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रशेखर बावनकुळे, शहराध्यक्ष जगदीश मुळीक,महीला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ,आमदार माधुरीताई मिसाळ प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, मुरलीधर मोहोळ, आमदार सिध्दार्थ शिरोळे, माजी सभागृह नेते गणेश बिडकर, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने,संघटन सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दिपक पोटे, दिपक नागपुरे, दत्ताभाऊ खाडे यांच्यासह मंडल अध्यक्ष, पदाधिकारी, माजी नगरसेविक आदी उपस्थित होते

 

Rainfall Forecast : देशात यंदा सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस  : हवामान विभागाचा अंदाज 

Categories
Breaking News social देश/विदेश शेती

देशात यंदा सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस

: हवामान विभागाचा अंदाज

भारतीय हवामान विभागाने गुरुवारी जाहीर केलेल्या पहिल्या लाँग रेंज फोरकास्ट (LRF) मध्ये या वर्षी देशात सामान्य मान्सून असेल. हे सलग चौथं वर्ष असेल जेव्हा भारतीय हवामान विभागाने सामान्य पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, IMD एप्रिल आणि जूनमध्ये दोन टप्प्यांत दीर्घ पल्ल्याचा अंदाज जाहीर करते.

“जून ते सप्टेंबर दरम्यान नैऋत्य मोसमी पाऊस सामान्य आणि परिमाणात्मक असेल, तो दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या ९९ टक्के म्हणजे ८७ सेंटिमीटर असेल,” असं पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम रविचंद्रन म्हणाले.

देशाचा मोसमी पाऊस हा सामान्य मानला जातो जेव्हा तो दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के असतो. यावर्षी, भारतीय हवामान विभागाने उन्हाळी मान्सूनचा हंगामी पाऊस आधीच्या ८८ सेमी (१९६१-२०२०वर आधारित) वरून ८७ सेमी (१९७१-२०२०वर आधारित) पर्यंत खाली येईल असं सांगितलं आहे.