NCP pune Against Inflation | राष्ट्रवादी काँग्रेसने भरवला मोदी महागाई बाजार

Categories
Breaking News Political पुणे

महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे मोदी महागाई बाजार उभारुन आंदोलन

पुणे : देशात महागाईने उच्चांक गाठला असून यावर्षी महागाईचा उच्चांक मोडीत काढला असून या आठवड्यात घाऊक महागाई दर १५.८८ वर गेला आहे. हा गेल्या ९ वर्षांतील उच्चांक असून केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे ही कठिण परिस्थिती देशावर ओढावली आहे. याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुण्यात मोदी महागाई बाजार भरविण्यात आला होता.

पुणे शहरात अनेक ठिकाणी आठवडे बाजार भरतात. याशिवाय काही बाजारपेठा देखील सुरू झाल्या आहेत. पण आज पुण्यातील जंगली महाराज रोड परिसरात उभारण्यात आलेल्या भाजीपाला , फळे , फुलविक्रेता ,पुस्तक विक्रेता , शालेय साहीत्य , किराणा, चहा , वडापाव विक्रेता याचबरोबर मासळी बाजारासह “मोदी महागाई बाजार पेठची” चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. यामध्ये बाजारपेठ उभी करून महागाई विरोधात आगळे वेगळे आंदोलन करण्यात आले. मोदीजी, महागाईचा बाजार उठवा नाहीतर जनता तुमचा बाजार उठविल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या आंदोलनातून देण्यात आला.

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मोदी सरकारच्यावतीने अत्यावश्यक सेवे सह जीवनावश्यक वस्तूत देखील मोठ्या प्रमाणत वाढ करण्यात आली आहे.याचा फटका सर्वसामान्य जनतेसह किरकोळ विक्रेत्यांना देखील बसला आहे.जनता दिवसेंदिवस महागाईच्या ओझ्याखाली पिचली जात असून आता व्यापारी आणि विक्रेत्यांवरही महागाईची ही संक्रांत ओढावली आहे.
लक्षात घेण्याची बाब म्हणजे मे महिन्यात भाजीपाल्याच्या किमतीचा दर ५६.३६ टक्के, तर गव्हाच्या दर १०.५५ टक्के आणि अंडी, मांस आणि मासळीच्या भाववाढीचा दर ७.७८ टक्के होता. तर उत्पादित उत्पादने आणि तेलबियांमध्ये ती अनुक्रमे १०.११ टक्के आणि ७.८ टक्के होता. कच्च्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूच्या महागाईचा दर ७९.५० टक्के होता. मे महिन्यात किरकोळ महागाई दर ७.४ टक्के होता.

केंद्रातील मोदी सरकारला महागाईवर अंकुश ठेवण्यात सपशेल अपयश आले असून याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे व प्रदीप देशमुख , उदय महाले, वनराज आंदेकर, अजिंक्य पालकर, वैशाली थोपटे, सदानंद शेट्टी , मूणालीनी वाणी मोनाली गोडसे, राखी इंगळे, रोहन पायगुडे, सुशांत साबळे,सौरभ गुंजाळ, लक्ष्मण आरडे , रूपाली ठोंबरे , मनिषा होले ,योगेश पवार ,दिलशाद अत्तार हे पदाधिकारी व मोठ्या प्रमाणावर नागरीकही उपस्थीत होते

NCP Pune | कार्यकर्त्यांना बळ देणारा ‘राष्ट्रवादी’

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

कार्यकर्त्यांना बळ देणारा ‘राष्ट्रवादी’

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज, म्हणजे १० जून रोजी २३ वा वर्धापनदिन आहे. कोणतीही संघटना, राजकीय पक्ष किंवा संघटनेचा वर्धापनदिन हा त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी अभिमानाचा क्षण असतो. त्याचबरोबर आतापर्यंतच्या वाटचालीचे सिंहावलोकन करत पुढील प्रवासाचा निर्धार करण्याचा क्षण असतो. त्यामुळेच, देशातील पाचव्या क्रमांकाचा राष्ट्रीय पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचा हा वर्धापनदिन माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांसाठी उर भरून आणणारा दिवस आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला आज देश पातळीवर असणारी ओळख सहजासहजी मिळालेली नाही. पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची अफाट मेहनत, दूरदृष्टी आणि आपल्या विचारांवर ठाम असणारी कार्यपद्धती या सर्वांचा हा मिलाप म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आहे. या पक्षाचे वैशिष्ट्य म्हणजे या पक्षात कार्यकर्त्यांना बळ मिळते. हायकमांड किंवा पक्षश्रेष्ठींच्या दरबारात असण्यापेक्षा प्रत्यक्ष जमिनीवर किती काम करता आणि सामान्य जनतेशी तुमची किती नाळ जुळलेली आहे, अशा कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडे पाहिले जाते.

पक्षाच्या या वर्धापनदिनाचा विचार करताना, पूर्ण २३ वर्षांचा काळ आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या डोळ्यांसमोरून जातो. पक्षाची स्थापना १० जून १९९९ रोजी झाली. त्यानंतर तीन-चार महिन्यांमध्येच पक्षाला विधानसभा-लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जावे लागले. तत्कालीन राजकारण आणि भाजप-शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या विचारातून शरद पवार साहेबांनी काँग्रेसबरोबर हातमिळवणी केली. पवार साहेबांच्या राज्यातील लोकप्रियतेची चुणूक पहिल्याच निवडणुकीत देशाने पाहिली होती. त्यामुळे, तरुणांचा ओढा राष्ट्रवादी काँग्रेसकडे होता. अशा तरुणांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण करण्यासाठी, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसपासून दूर ठेवण्यासाठी माध्यमांमध्ये बातम्या पेरल्या जात होत्या. कधी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपबरोबर जाणार, तर कधी काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार, अशा बातम्या सारख्या येत होत्या. पण, पक्षाच्या राज्यातील वाटचालीवर त्याचा कोणताच परिणाम झाला नाही. उलट, २००४च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून उदयाला आला. हा विस्तार फक्त राज्यापुरता मर्यादित नव्हता, तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार-खासदार निवडून येत गेले. आतापर्यंत ११ राज्यांमध्ये पक्षाच्या चिन्हावर आमदार निवडून गेले आहेत. आजही, पक्षाचे पाच खासदार आहेत. त्यातील चार महाराष्ट्रातील आहेत, तर पाचवा खासदार लक्षद्वीप येथून निवडून आला आहे. पवार साहेबांची विकासाची दूरदृष्टी आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा विचार यांच्या बळावर या पक्षाचा पाया रचला गेला. हा पाया एवढा मजबूत आहे, की अनेक आव्हाने आल्यानंतरही पक्ष भक्कमपणे उभा आहे. पवार साहेबांच्या आतापर्यंतच्या वाटचालीत अनेक स्थित्यंतरे आली. मात्र, राजकारणामध्ये ते कायमच लक्षवेधी ठरले. त्यामुळेच, पवार साहेबांना लक्ष्य करायचे, त्यांच्यावर जहरी टीका करायची हा एककलमी कार्यक्रम विरोधी पक्षांकडून राबवला जातो. मात्र, वयाच्या ८२व्या वर्षीही पवार साहेब अशा सर्वांना पुरून उरले आहेत आणि देशाच्या राजकारणात एका दीपस्तंभाप्रमाणे उभे आहेत. सत्ता असो वा नसो, आपण पक्ष चालवू शकतो, वेगळ्या पद्धतीने जनतेच्या उपयोगी पडू शकतो, हे पवार साहेबांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे.

एखाद्या भागाचा किंवा शहराचा विचार करताना, विकास कसा करायचा आणि पुढील ५० वर्षांचा विचार करायचा, ही गोष्ट पवार साहेबांनी सर्वांना शिकवली. त्यामुळेच, पुणेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसला कायम साथ दिली. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निवडून येत गेले, सलग १० वर्षे महापालिकेची सत्ता पक्षाकडे होती. पवार साहेबांचा विचार आणि आदरणीय अजितदादा पवार यांचे नेतृत्व यातून विकासाला कशी दिशा मिळते, हे पुणेकरांनी अनुभवले आहे. त्याचबरोबर राज्यात महिलांसाठी चळवळ उभी करणाऱ्या संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांचे नेतृत्वही पुण्याने पाहिले आहे. त्यामुळेच, पक्षावर येथील जनतेने कायम विश्वास ठेवला. महिलांना सर्वाधिक संधी देणारा पक्ष म्हणूनही राष्ट्रवादी काँग्रेसकडे पाहिले जाऊ शकते. नगरसेविका म्हणून, महापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष, खासदार अशा अनेक पदांवर पक्षाने महिलांना संधी दिली आहे. देशातील पाचव्या-सहाव्या क्रमांकाचे शहर म्हणून पुण्याकडे पाहिले जाते. अशा पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष म्हणून माननीय खासदार वंदनाताई चव्हाण यांनी दीर्घकाळ काम केले. शहरातील अनेक पदांवर महिलांनी काम केले आहे. शहराचा विकास होत असताना आणि वाटचालीला आकार येत असताना, या महिलांना थेट निर्णयाची संधी देण्याचे काम आमच्या पक्षाने केले आहे, हे सांगताना निश्चितच आम्हाला अभिमान वाटतो. पूर्वीच्या काँग्रेसमध्ये अनेकांना सत्तेची खुर्ची पाहता आली नव्हती. अशा असंख्य कार्यकर्त्यांनाही नगरसेवक, महापौर, आमदार होता आले, हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मितीचे यश आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे वैशिष्ट्य म्हणजे येथे कार्यकर्त्यांना मिळणारा मान. इतर पक्षांच्या तुलनेमध्ये आमच्या पक्षात हायकमांडकडे कधीच चकरा माराव्या लागत नाहीत. खऱ्या अर्थाने लोकशाही जिवंत ठेवणारा हा पक्ष आहे. माझ्यासारख्या अगणित कार्यकर्त्यांना राजकीय पार्श्वभूमी नसतानाही, तरुण वयामध्येच अनेक महत्त्वाच्या पदांवर संधी दिली. अशा पद्धतीने पक्ष वाढवताना कार्यकर्त्यांची राजकीय कारकीर्द घडवणारा पक्ष हीच राष्ट्रवादी काँग्रेसची खरी ताकद आहे. ही ताकद काय असते, याचा अनुभव संपूर्ण राज्याने २०१९च्या विधानसभा निवडणुकीमध्ये घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस संपवायची असेल, तर पवार साहेबांना लक्ष्य करायचे, यासाठी विरोधी पक्ष झपाटले होते. त्यामुळे, त्यांनी जानेवारी ते नोव्हेंबर २०१९ या काळामध्ये पक्षातील अनेक नेत्यांना, आमदार-खासदारांना गळाला लावले होते. आता मोठे नेते ओढून घेतले, तर राष्ट्रवादी काही उरली नाही, असा त्यांचा हस्तिदंती मनोऱ्यातील अंदाज होता. विविध सर्वेक्षण संस्थांनीही राष्ट्रवादी २०-२२ आमदारांपुरती उरणार असा निष्कर्ष काढला होता. प्रत्यक्षात ८० वर्षांचा योद्धा रणभूमीवर उतरला होता. त्यांनी कार्यकर्त्यांना हाक दिली आणि शहरा-शहरांमधून तरुणांची फौज त्यांच्यामागे उभी राहिली. त्यांच्या बळावर राष्ट्रवादी काँग्रेसने ५४ आमदार निवडून आणले. सोलापूरसारख्या शहरामध्ये अचानक पवारसाहेबांच्या रॅलीला आलेले हजारो तरुण कोण होते, साताऱ्यातील सभेचा ऐतिहासिक पावसातील फोटो भरल्या डोळ्याने सोशल मीडियावर टाकून विचार पोहोचवणारे विशीतील हात कोणाचे होते, असे असंख्य प्रश्न ज्यांच्या मनामध्ये आहेत, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसची २३ वर्षांची वाटचाल पाहावी लागेल. या पक्षाने कधीही जातीय-धार्मिक किंवा कोणत्या अस्मितेचे राजकारण केले नाही. अन्य राज्यांमध्ये या अस्मितेच्या राजकारणामुळे सत्ता मिळवणारे पक्ष असतानाही, पवार साहेबांनी हा सोपा मार्ग टाळला. कठोर मेहनत, आत्मविश्वास, संघटनात्मक बांधणी यातून कायम तरुणांना दिशा देण्याचे काम केले. त्यामुळेच, विरोधकांनी घेरलेले असताना, कणाकणांतून तरुण कार्यकर्ते गोळा झाले आणि २०१९मध्ये पक्षाने राजकारणाला कलाटणी देणारी कामगिरी केली. पुढील वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस २५व्या वर्षात पदार्पण करणार आहे, एक कार्यकर्ता म्हणून आम्हा सर्वांना हा क्षण डोळ्यामध्ये साठवायचा आहे. अतिशय संघर्षातून राष्ट्रवादी काँग्रेसने आणलेले हे सोनेरी दिवस पुणेकर आणि राज्यातील जनता विसरणार नाही, असा विश्वास आम्हाला निश्चितच आहे.

– प्रशांत जगताप,
शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पुणे

NCP Vs Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील जिथे दिसतील, तिथे घेराव घालणार  | पुणे राष्ट्रवादीचा इशारा 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

चंद्रकांत पाटील जिथे दिसतील, तिथे घेराव घालणार

| पुणे राष्ट्रवादीचा इशारा

खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याबाबत बेताल वक्तव्य करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणी त्वरित माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला भगिनी चंद्रकांत पाटील जिथे दिसतील, तिथे घेराव घालतील, असा इशारा पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शुक्रवारी देण्यात आला.

चंद्रकांत पाटील यांनी सुप्रियाताईंबाबत केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सारसबाग येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासमोर निषेध नोंदविण्यात आला. या वेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात घोषणा दिल्या. तसेच, पाटील यांच्या पुतळ्याला जोडेमार आंदोलनही करण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदीप देशमुख, मृणाल वाणी, रुपाली पाटील, संतोष नांगरे व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

‘महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरातील कोथरूड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असलेले चंद्रकांत पाटील हे पुण्याची व महाराष्ट्राची संस्कृती बिघडवण्याचे काम करीत आहेत. सुप्रियाताई यांच्यासारख्या लोकप्रतिनिधींविरोधात व समस्त महिला वर्गाविरोधात त्यांनी केलेले वक्तव्य हे निषेधार्ह आणि तितकेच लाजीरवाणे आहे. ‘घरी जा, स्वयंपाक करा, मसणात जा’ ही त्यांची वक्तव्ये महिलांनी चूल व मूल इतक्यापुरतेच मर्यादित राहावे, त्यांना समाजकारणात व राजकारणात वाव नसावा, या मानसिकतेचे प्रदर्शन करणारे आहे. यातून चंद्रकांत पाटील व भाजपची मनुवादी वृत्ती दिसून येत आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात अशा प्रकारची वृत्ती लादू पाहणाऱ्या चंद्रकांत पाटील यांचा आम्ही निषेध करतो. चंद्रकांत पाटील यांनी त्यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्वरित माफी मागावी अन्यथा ते जिथे दिसतील तिथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला – भगिनी त्यांना घेराव घालतील. त्यासाठी चंद्रकांत पाटील तयार राहावेत,’ असा इशारा  शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिला.

Eid Milan : शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात उद्या ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन

Categories
Breaking News Political social पुणे

शरद पवारांच्या उपस्थितीत उद्या ईद मिलन कार्यक्रम

पुणे : शरद पवारांच्या उपस्थितीत पुण्यात ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गुरूवार दि.१२ मे रोजी कोंढवा खुर्द येथील एन.आय.बी.एम रोडवरील,लोणकर गार्डन येथे सायंकाळी ६.०० वाजता संपन्न होणार असून सर्व धर्मीय पुणेकरांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. अशी माहिती राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली
जगताप म्हणाले, आजच्या सद्यस्थितीत असलेल्या सामाजिक परिस्थितीमध्ये सर्वधर्मीय बांधवांनी आपली एकात्मता जपत सामाजिक समता, बंधुता अबाधित राखणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. देशातील बदलत्या सामाजिक परिस्थितीला निव्वळ या देशातील काही मूठभर समाज विघातक प्रवृत्ती कारणीभूत असून या सर्व गोष्टींना विरोध करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे.  येथील सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर  कोविड काळापूर्वी दरवर्षी घेण्यात येणारा “ईद मिलन” कार्यक्रम या वर्षी देखील मोठ्या उत्साहात घेण्यात येणार असून या कार्यक्रमास सर्व धर्मियांचे धर्मगुरू,सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाचे निमंत्रक स्वतः  खासदार शरद पवारसाहेब हे आहेत.
जगताप पुढे म्हणाले,  रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज,शाहू,फुले व आंबेडकर यांच्या विचारांचा आदर्श ठेवत गेल्या ६० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत  पवारसाहेबांनी नेहमी सर्वधर्मीय अठरा पगड जातींच्या सर्व घटकांना सोबत घेत महाराष्ट्राचा विकास केला. पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असून पुणे शहरात हिंदू मुस्लिम बांधवांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असूनही सर्वधर्मीय गुण्या गोविंदाने राहतात. याचे कारण येथील सलोखा जपण्यासाठी घेतले जाणारे सर्वधर्मीय कार्यक्रम. पवारसाहेब देखील दरवर्षी पुणे शहरात ‘ईद मिलन ‘ सारखा कार्यक्रम राबवतात. परंतु गेल्या दोन वर्षांपासून कोविडमुळे बंद असणारा हा कार्यक्रम यावर्षी राज्य कोविड निर्बंधमुक्त झाल्याने मोठ्या उत्साहात घेण्यात येणार आहे.
या कार्यक्रमादरम्यान सर्व नागरिकांसाठी शिरखूर्मा व स्नेहभोजन व्यवस्था करण्यात आली असून त्यानंतर होणाऱ्या मुशायरा व कवी संमेलन या कार्यक्रमासाठी सम्पत सरल,अल्ताफ़ ज़िया,कुनाल दानिश ,अनवर कमाल बेहरीन,डॉ आरिफ़ा शबनम,राना तबस्सुम,मन्नान फ़राज़ आदी नामवंत कलाकार उपस्थित राहणार आहेत.

Prashant Jagtap : प्रशांत जगताप यांची शालेय साहित्याची “तुला”

Categories
cultural Political पुणे

प्रशांत जगताप यांची शालेय साहित्याची “तुला”

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर अध्यक्ष  प्रशांतदादा जगताप यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुणे शहर मध्यवर्ती कार्यालय येथे प्रशांत जगताप यांची शालेय साहित्याची “तुला” करण्यात आली.

याप्रसंगी बोलताना  प्रशांत जगताप यांनी सांगितले कि महाराष्ट्रातील इतर राजकीय समाजामध्ये द्वेष निर्माण करण्यासाठी भोंग्याचे वाटप करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता सामाजिक भान लक्षात घेऊन शालेय साहित्याचे वाटप करत आहे, याचा मला सर्वस्वी अभिमान आहे. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची हि भूमिका भूषणावह आहे. याप्रसंगी मातृपितृ संस्कारांनुसार  प्रशांत जगताप यांचे आई वडील यांचेही औक्षण आणि सन्मान करण्यात आला.

या उपक्रमाचे आयोजन आणि संकल्पना पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस आणि मनपाच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या सदस्य शिल्पा भोसले आणि पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस  संतोष जोशी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कसबा मतदारसंघ अध्यक्ष गणेश नलावडे यांनी केले. प्रदेश प्रवक्ते प्रदिप देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.

या उपक्रमासाठी नगरसेवक वनराज आंदेकर, प्रियाताई गदादे पाटील, स्वाती पोकळे, संतोष नांगरे, गणेश कल्याणकर, अभिजित बारवकर, संदीप पवार, मनाली भिलारे, दिपक पोकळे, राहुल गुंड, पूनम बनकर, सारिका पारेख, रत्ना नाईक, वैजयंती घोडके, ज्योतीताई सूर्यवंशी, आप्पा  जाधव, अनिल आगवणे आदी अनेक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी शालेय साहित्याचे विशेष सहकार्य केले.

वरील सर्व शालेय साहित्य पुणे शहरातील विविध भागातील, गोर गरीब वसाहतींमधील गरजवंत विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना वितरित करण्यात येणार आहे.

याप्रसंगी बोलताना आयोजक संतोष यांनी सांगितले कि, “राज्यातील तरुणाईमध्ये जाती – धर्माच्या नावाने द्वेष पसरवण्यासाठी काही विकृत मनोवृत्तीचे लोक भोंग्याचे वाटप करत असल्याच्या वातावरणातच पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्याची संकल्पना पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष  प्रशांतदादा जगताप यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राबविण्यात आली. जातीय – धार्मिक द्वेष पसरवू पाहणाऱ्यांना हि योग्य चपराक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सामान्य कार्यकर्ताही सतत सामान्य नागरिकांसाठी विधायक उपक्रम राबवण्याला प्राधान्य देत असतो हे यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

NCP Pune : Inter-religious harmony : जातीयवादाच्या आरोपाला राष्ट्रवादी सर्वधर्मसमभाव जपत उत्तर देणार 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

जातीयवादाच्या आरोपाला राष्ट्रवादी सर्वधर्मसमभाव जपत उत्तर देणार

पुण्यात राष्ट्रवादीकडून परिसंवाद यात्रेत सर्वधर्मसमभाव जपला जाणार

: मुस्लीम बांधवा कडून हनुमान जयंती तर हिंदू बांधवा कडून रोजा इफ्तार च्या कार्यक्रमाचे आयोजन

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि त्यांचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जातीयवादाचे आरोप होत आहेत. मात्र याकडे फार लक्ष न देता राष्ट्रवादी कॉंग्रेस सर्वधर्मसमभाव जपण्याचा प्रयत्न करताना दिसते आहे. पुणे राष्ट्रवादी कडून  उद्या  परिसंवाद यात्रा आयोजित केले आहे. याच यात्रेच्या समारोपात राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून एक अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुस्लीम बांधवा कडून हनुमान जयंती तर हिंदू बांधवा कडून रोजा इफ्तार च्या कार्यक्रमाचे आयोजन उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्या उपस्थितीत करण्यात आले  आहे. अशी माहिती पुये राष्ट्रवादी कॉंग्रेस चे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.

याबाबत जगताप यांनी सागितले कि,

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची परिवार संवाद यात्रा उद्या दिनांक १६ एप्रिल  रोजी पुणे शहरात येत असून दुधाने लॉन्स येथे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जलसंपदामंत्री तथा प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलहेब,  खासदार सुप्रिया सुळे,राज्यमंत्री  दत्तात्रय भरणे, खासदार वंदना चव्हाण,खासदार डाॅ. श्री. अमोल कोल्हे आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये खालील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवार, १६ एप्रिल २०२२ चे असे असतील कार्यक्रम

सकाळी :१०.०० ते ११.०० वा.
शिवाजीनगर विधानसभा मतदार संघ आढावा बैठक.

११.०० ते १२.३० वा.
कोथरुड विधानसभा मतदार संघ आढावा बैठक.

दुपारी :१२.३०ते०१.३०वा.
कसबापेठ विधानसभा मतदार संघ आढावा बैठक.

दुपारी ०२.०० ते ०३.३० वा.
खडकवासला विधानसभा मतदार संघ आढावा बैठक.

दुपारी ०४ ते ०५
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अर्बन सेलच्या वतीने “अर्बन कनेक्ट” या ॲपचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

सायंकाळी ०५.०० ते ०६.००
पुणे शहरजिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व विधानसभा मतदार संघ कार्यकारणी आढावा बैठक.

सायंकाळी ०६.०० ते ०७.३० वा.
पुणे ग्रामीण जिल्हाराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकारणी आढावा बैठक.

सायंकाळी ०७.०० वाजता.
दुधाने लॉन्स जवळील हनुमान मंदिर येथे सर्वधर्मीय बांधवांकडून हनुमान जयंतीची आरती व रोजा इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

NCP agitation Against Raj Thackeray : राज ठाकरेंच्या वक्तव्याविरोधात पुणे राष्ट्रवादीचे आंदोलन 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

राज ठाकरेंच्या वक्तव्याविरोधात पुणे राष्ट्रवादीचे आंदोलन

पुणे : “गुढीपाडव्याच्या मनसेच्या मेळाव्यात मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ज्या पद्धतीने धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले. त्यानंतर सहाजिकच राज्यभर सामाजिक एकात्मता, शांतता भंग होईल असं वातावरण निर्माण झालेले असताना राज ठाकरे यांच्या भूमिकेचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पुणे शहरातील कोंढवा येथे निषेध आंदोलन घेण्यात आले.

शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच आपला भारत देश विविध परंपरा, विविध संस्कृती, विविध भाषा, धर्म ,जात ,प्रांत या सर्व गोष्टींच्या कुठल्याही पर्वा न करता सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवत सर्व समाजातील लोक एकत्र नांदतात.

भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकाराप्रमाणे प्रत्येक धर्माला प्रत्येक जातीला आपल्या आपल्या रितीरिवाजानुसार सण-उत्सव,प्रार्थना व धार्मिक कार्य करण्याचे स्वातंत्र्य आहे. गेल्या ७५ वर्षात अनेक वेळा काही जातीय कट्टरतावादी प्रवृत्तींनी ही शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला ,परंतु भारतीय नागरिकांनी त्यांना दाद दिली नाही. आज पुन्हा राज ठाकरे यांना पुढे करत समाजातील काही घटक अशाच प्रकारे हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण होईल व त्याचा राजकीय फायदा घेता येईल, असा विचार करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. आयुष्यात आपण सर्वांनी लहानपणापासून हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन या सर्व समाजातील मित्रांसोबत राहत आपण लहानाचे मोठे झालो. अचानक आज कुणीतरी नेता येऊन म्हणतो की, या धर्माचा विरोध करा, त्या धर्माचा विरोध करा हे खरोखर सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारे कृत्य असून, या प्रवृत्तीचा आपण करू, तेवढा निषेध कमीच आहे. अशा प्रकारचे वातावरण हानीकारक असून भविष्यात आपण आपल्या पुढच्या पिढीला हे शिक्षण देणार आहोत का ….? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला.

आंदोलन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष  प्रशांत जगताप, मा.नगरसेवक हाजी गफूर पठाण,प्रवक्ते प्रदीप देशमुख, मा.नगरसेविका नंदाताई लोणकर, हाजी फिरोज शेख, रईस सुंडके, मोहसिन शेख, डॉ.शंतनु जगदाळे, समीर शेख, दिपक कामठे, अब्दुल हाफिज, मेहबूब शेख, हसीना इनामदार यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Agitation of NCP Pune : राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचे अनोखे आंदोलन : दरवाढीविरोधात  मुंडन करत नोंदवला  निषेध

Categories
Political पुणे

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी दरवाढीविरोधात  मुंडन करत नोंदवला  निषेध

पुणे : केंद्र सरकारच्या अख्यारीत असणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये दररोज वाढ होत असून, ही वाढ थांबावी या हेतूने पर्वती विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सातारा रोड येथे निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात गॅस सिलेंडरची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. तर काही कार्यकर्त्यांनी यावेळी मुंडन करत आपला निषेध नोंदवला.

“दैनंदिन जीवन जगत असताना घरगुती गॅस, पेट्रोल, डिझेल या आपल्या जीवनावश्यक वस्तू आहेत. या वस्तूंचे दर वाढत राहिले तर एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाचे महिन्याचे बजेट कोलमडते. गेल्या काही महिन्यात निवडणुका असल्यामुळे थांबवलेले ही दरवाढ आता अचानकपणे पुन्हा सुरू करण्यात आली आहे. म्हणजे केवळ निवडणुकीपुरते लोकांची फसवणूक करायची निवडणूक संपली ,की पुन्हा लोकांच्या खिशावर दरोडा टाकायचा हेच केंद्र सरकारचे धोरण आहे. सर्वसामान्य नागरिकांवर ही भाववाढ लादत असताना केवळ देशातल्या काही बड्या उद्योगपतींना याचा फायदा होत असून, भारतीय जनता पार्टीला आपले हितसंबंधी उद्योगपती यांची जपणूक करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळेच केवळ सर्वसामान्य जनतेवर ती महागाई लादयची आणि उद्योगपतींची संपत्ती वाढवणे हाच भाजपचा गेल्या ७ वर्षातील अजेंडा राहिला आहे. परंतु जर देशातील जनतेची ही लूट थांबली नाही तर भविष्यात तुमच्या आमच्यासारखे मध्यमवर्गीय मारले जाणार असून हा देश पुन्हा मोठ्या आर्थिक संकटात येईल त्यामुळेच केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने देशातील जी जनतेची लूट चालवली आहे, ही लूट थांबवावी, यासाठी आजचे आंदोलन असून सर्वसामान्य नागरिकांनी यातून धडा शिकावा व पुन्हा भारतीय जनता पार्टीला गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत कुठेही सत्तेत बसवु नये” , असे आवाहन शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले.

या आंदोलन प्रसंगी  पर्वती विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष  संतोष नागरे, महिला शहराध्यक्ष .मृणालिनीताई वाणी ,प्रवक्ते  प्रदीप देशमुख, विपुल म्हैसुरकर,श्वेता कामठे होनराव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Pune : NCP Vs BJP : पुणे राष्ट्रवादी कॉंग्रेसची भाजपच्या विरोधात प्रतीकात्मक होळी

Categories
Breaking News PMC Political पुणे

पुणे राष्ट्रवादी कॉंग्रेसची भाजपच्या विरोधात प्रतीकात्मक होळी

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहर मध्यवर्ती कार्यालयाच्या प्रांगणात केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे वाढलेली महागाई, भ्रष्टाचार, जातिवाद तसेच पुणे महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपचा ई व्हेईकल घोटाळा, नदी सुधार घोटाळा ,१४ लाखांचे झाड, ॲमिनिटी स्पेस विक्री घोटाळा, ३२०० फ्लॅट विक्री घोटाळा,जलपर्णी घोटाळा, कॉफिटेबल बुक घोटाळा या विविध घोटाळ्यांच्या अनिष्ट व नकारात्मक गोष्टींचे दहन करत प्रतिकात्मक होळी साजरी केली.

यावेळी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की “आज होळी या सणाच्या निमित्ताने आपण घरोघरी असत्य अन्याय अत्याचार यांसह अनेक अनिष्ट तत्वांची होळी करत नकारात्मक गोष्टींतून नव्या सकारात्मक गोष्टींकडे वाटचाल करत असतो. आज या प्रतिकात्मक होळी च्या माध्यमातून केंद्रातील सत्ताधारी भाजप असो व महानगरपालिकेत गेल्या पाच वर्षात कारभारी करणारी करणारी भाजप असो दोन्ही ठिकाणी सत्ताधारी भाजपमुळे नागरिकांना विविध त्रासांना सामोरे जावे लागले आजही महागाई, जातिवाद, धार्मिक तेढ हे मुद्दे गंभीर बनले असून जर विरोधी पक्षातील कोणी या मुद्द्यांवर आवाज उठवला तर त्यांना केंद्रीय तपास यंत्रणांचा धाक दाखवत छापेमारी, धाडसत्र, अटक यांसारखी दडपशाही करत विरोधी पक्षातील जनतेचा आवाज उचलणाऱ्या नेत्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशातील या संपूर्ण परिस्थितीवर कुणाचाही अंकुश राहिलेला नाही ,अशा परिस्थितीत या प्रतिकात्मक होळीच्या माध्यमातून सर्व अनिष्ट प्रवृत्तींचा आम्ही दहन करत आहोत”.

या आंदोलनास शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख,यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

SRA : FSI : SRA योजनांचा एफ एस आय वाढवला

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

SRA योजनांचा एफ एस आय वाढवला

: पुणे  राष्ट्रवादीने मानले  उपमुख्यमंत्री यांचे आभार

पुणे : शहरातील एसआरए (SRA) मधील नवीन गृह प्रकल्पांना अतिरिक्त एफएसआय (Additional FSI)  वाढवून मिळावा याबाबतचे निवेदन मागील तीन दिवसापूर्वी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP Pune) पार्टीच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (DCM Ajit Pawar) यांना दिले होते.  अजितदादांनी आज तात्काळ हा विषय मार्गी लावला असून राज्याच्या गृहनिर्माण विभागाने आज याबाबतचे आदेश जारी केले आहेत. या निर्णयाबद्दल पालकमंत्री अजितदादा पवार यांचे पुणे राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून आभार मानण्यात आले आहेत.

याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस चे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले कि पुणे  शहर हे भौगोलिकदृष्टया राज्यातील १ क्रमांकाचे शहर आहे. या शहराच्या एकुण लोकसंख्येपैकी तब्बल ४२ टक्के लोकसंख्या झोपडपट्टीमध्ये राहते. तसेच या शहरात एकूण ५४२ झोपडपट्टया आहेत. सध्या पुणे शहरात सुरू असलेले एसआरए प्रकल्पांमधील झोपडपट्टी वासीयांना मिळणारी २७० चौ. फुटची घरे अपुरी ठरतात, या निर्णयामुळे या सर्व नागरिकांना दिलासा मिळणारअसून इथून पुढे सुरू होणाऱ्या एसआरए प्रकल्पांमध्ये किमान ३०० चौ. फुटाची घरे देण्याबाबतचा आदेश राज्याच्या गृहनिर्माण विभागाने काढला आहे. शहरातील तब्बल ५४२ झोपडट्टीवासीयांना दिलासा देणाऱ्या या निर्णयाबद्दल पालकमंत्री अजितदादा पवार यांचे आभार