MLA Sunil Kamble | पुणे मनपामधील पाणीपुरवठा आणि STP प्रकल्पाची कामे पूर्ण करण्यास प्राधान्य  – उदय सामंत | आमदार सुनील कांबळे यांनी मांडली होती लक्षवेधी सूचना

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

पुणे मनपामधील पाणीपुरवठा आणि STP प्रकल्पाची कामे पूर्ण करण्यास प्राधान्य  – उदय सामंत

| आमदार सुनील कांबळे यांनी मांडली होती लक्षवेधी सूचना

नागपूर| पुणे शहरासाठी समान पाणीपुरवठा योजना प्रकल्पांतर्गत (24*7 water project) सप्टेंबर २०२३ पूर्वी आणि राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत पुणे शहरातील मुळा-मुठा नदीचे प्रदूषण (Mula mutha pollution control) नियंत्रित करणे या प्रकल्पाची कामे मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येतील. ही कामे पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येईल अशी माहिती मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी आज विधानसभेत दिली.
विधानसभा सदस्य सुनील कांबळे (MLA Sunil Kamble) यांनी यासंदर्भात आज लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री श्री. सामंत बोलत होते.

ते म्हणाले की, पुणे शहर हे भौगोलिकदृष्ट्या उंच व सखल भागांमध्ये विभागलेले आहे. त्यामुळे काही भागांमध्ये जादा दाबाने व जादा वेळेसाठी पाणी उपलब्ध आहे व काही भागामध्ये अत्यल्प पाणीपुरवठा करण्यात येतो. त्याअनुषंगाने पुणे शहरासाठी समान पाणी पुरवठा योजना २४x७ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुणे महानगरपालिकेने हाती घेतला आहे. या प्रकल्पामध्ये प्रामुख्याने टाक्या बांधणे, मुख्य दाब नलिका टाकणे, अस्तित्वातील वितरण व्यवस्थेचे पुनरूत्थान करणे, पंपिंग स्टेशन्स बांधणे तसेच नागरिकांच्या नळजोडांवर एएमआर मीटर्स बसविणे आदी बाबींचा अंतर्भाव आहे. हा प्रकल्प राबविण्याकरीता पाण्याच्या साठवण टाक्या बांधण्याकरीता एक निविदा, मुख्य दाब नलिका टाकण्याकरीता एक निविदा व शहराच्या जलशुध्दीकरण केंद्रनिहाय पाच निविदा, अशी ७ निविदांची प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे. या निविदांपैकी पाण्याच्या ८२ साठवण टाक्यांपैकी आज अखेर ४२ टाक्यांची कामे पूर्ण झालेली असून २२ टाक्यांची कामे प्रगतीपथावर असून, टप्प्याटप्प्याने माहे सप्टेंबर २०२३ अखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

याशिवाय, राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत पुणे शहरातील मुळा-मुठा नदीचे प्रदूषण नियंत्रित करणे या प्रकल्पाची निविदा मान्य झाली असून कार्यादेश देण्यात आलेले आहेत. या प्रकल्पांतर्गत प्रामुख्याने एकूण ११ मैलापाणी शुध्दीकरण केंद्रे बांधणे (एकूण क्षमता ३९६ एम.एल.डी.) व ५५ कि.मी. लांबीच्या मलवाहिन्या टाकणे प्रस्तावित आहेत. या ११ मैलापाणी शुध्दीकरण प्रकल्पांपैकी नायडू हॉस्पिटल (१२७ एम.एल.डी.), भैरोबा (७५ एम.एल.डी.), धानोरी (३३ एम.एल.डी.), वडगाव (२६ एम.एल.डी.) या मैलापाणी शुध्दीकरण केंद्रांची कामे जागेवर सुरू करण्यात आलेली आहेत. तसेच ५५ कि.मी. लांबीच्या मलवाहिन्या टाकण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या प्रकल्पाचे काम विहित मुदतीत मार्च २०२५ अखेर पूर्ण करण्याचे नियोजन असून योजना कार्यान्वित झाल्यानंतर नदीचे प्रदुषण कमी होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती मंत्री सामंत यांनी दिली.
लक्षवेधी वरील या चर्चेत सदस्य भीमराव तापकीर यांनी सहभाग घेतला.

Water Project | मोरगाव  परिसर भागात पुरंधर उपसा सिंचन योजनेच्या 3.9 km पाईपलाईनचे काम विक्रमी 40 दिवसांत पुर्ण 

Categories
Breaking News social पुणे शेती

 मोरगाव  परिसर भागात पुरंधर उपसा सिंचन योजनेच्या 3.9 km पाईपलाईनचे काम विक्रमी 40 दिवसांत पुर्ण

मोरगाव व परिसर भागात पुरंधर उपसा सिंचन योजनेच्या 3.9 km पाईपलाईनचे काम विक्रमी अशा 40 दिवसांत पुर्ण करण्यात आले आहे. या योजनेमुळे परिसरातील लोकांना चांगलाच फायदा होणार आहे.

श्री क्षेत्र मोरगांव ता. बारामती जि.पुणे येथील जिरायत भाग शेतकऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार  यांचे माध्यमातुन व  आदर पूनावाला सिरम इन्स्टिट्यूट पुणे यांचे सहकार्यातुन पुरंधर उपसा सिंचन योजनेमध्ये जोगवडी ते खटकळ ओढा, ढोलेमळा, मोरगाव येथील शेतीला पाणी पुरवठा होणेकामी पाइपलाइन करणेसाठी ८ मार्च रोजी 1.32 कोटी C.S.R फंडातून निधी देणेत / उपलब्ध करून दिला होता. सदर पाईपलाईनचे काम पुर्ण करणेसाठी मोरगाव येथील तरुण शेतकरी / कार्यकर्ते  अनिल ढोले, चांगदेव ढोले,गणेश ढोले, अविनाश ढोले, हनुमंत ढोले, अंकुश ढोले ,विठ्ठल ढोले, त्रिंबक खोपडे, सखाराम तावरे, विजय ढोले,नारायण तावरे, विलास तावरे महादेव ढोले ,अभिजीत ढोले तसेच मोरगाव चे विद्यमान सरपंच श्री निलेश केदारी , माजी सरपंच पोपट तावरे व ग्रामपंचायत सदस्य यांनी विशेष कष्ट घेतले होते. सदर योजनेमुळे मोरगांव परिसरातील ढोलेमळा, पाटील बुवाचा मळा, चोपणवस्ती, तावरेवस्ती, हनुमाननगर सोनारशेत येथील शेतक-यांना फायदा होणार आहे.

सदर योजनेमुळे अंदाजे 450 ते 500 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तसेच अंदाजे 150 से 200 शेतकरी कुटुंबाचे जीवनमान उंचवणार आहे. सदर योजनेकामी शेतकरी, ग्रामपंचायत, सिंचन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच व इतर ठिकाणी पत्रव्यवहार व पाठपुरावा इतर बाबींसाठी  संदीप शंकरराव कदम ,उपायुक्त ,पुणे महानगरपालिका यांनी समन्वय साधून योजना पूर्ण करणेसाठी विशेष योगदान व सहकार्य केले आहे .सदर पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ सोमेश्वर स.सा.कारखाना चेअरमन पुरूषोत्तम जगताप व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष  संभाजी नाना होळकर यांच्या हस्ते झाले होते.

सदर काम दिनांक 18 जुन 2022 रोजी पुर्ण झाले असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी माजी सैनिक सेलचे नवनियुक्त पुणे शहराध्यक्ष अविनाश ढोले व सर्व ग्रामस्थ यांचे उपस्थित खटकळ ओढयात पाणी सोडण्यात आले.

सदर योजनेमुळे मोरगाव व परिसरातील वाडीवस्ती- वरील शेतकरी यांनी समाधान व्यक्त केले आहे तसेच त्यांनी  अजितदादा पवार  यांचे नुकतेच मुंबई येथे जाऊन सत्कार केला व आभार व्यक्त केला आहे. तसेच सिंचन विभागातील मुख्य अभियंता गुणाले साहेब व इतर अधिकारी त्यांचेही आभार मानले आहेत.

Handa Morcha : PMC : माजी जलसंपदा राज्यमंत्री पुणे महापालिकेवर आणणार हंडा मोर्चा 

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

माजी जलसंपदा राज्यमंत्री पुणे महापालिकेवर आणणार हंडा मोर्चा

: फुरसुंगी, उरुळी देवाची गावाची पाणी समस्या सोडवण्याची मागणी

पुणे : फुरसुंगी, उरुळी देवाची ही दोनही गावे तीन वर्षांपूर्वी पुणे महापालिकेत समाविष्ट झाली आहेत. महापालिकेत समाविष्ट झाल्यापासून या गावांना पाणीपुरवठासुद्धा नीट होत नसल्याने नागरिकांचे खूप हाल होत आहेत. मी मंत्री असताना जलसंपदा विभागाला निर्देश देऊन कालव्याद्वारे नियमित पाणी सोडत होतो. मात्र आता नागरिक परेशान आहेत. त्यामुळे या गावांची पाणी योजना 15 दिवसांत पूर्ण नाही झाल्यास महापालिकेवर हंडा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा राज्याचे माजी जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी महापालिकेला दिला आहे.

: गावांना व्यवस्थित पाणीपुरवठा नसल्याची केली तक्रार

शिवतारे यांच्या पत्रानुसार फुरसुंगी, उरुळी देवाची ही दोनही गावे तीन वर्षांपूर्वी पुणे महापालिकेत समाविष्ट झाली आहेत. महापालिकेत समाविष्ट झाल्यापासून या गावांना कुठल्याही नागरी सुविधा मिळत नसल्याने येथील लोकांच्यात तीव्र रोष आहे. त्यातच अलीकडे या गावांना पाणीपुरवठासुद्धा नीट होत नसल्याने नागरिकांचे खूप हाल होत आहेत. या गावांमध्ये ग्रामपंचायत असताना पाणीपुरवठा व्यवस्थित केला जात होता. अडचणीच्या काळात मी जलसंपदा विभागाला निर्देश देऊन कालव्याद्वारे नियमित पाणी सोडत होतो. निदान त्याद्वारे स्थानिक टैंकर्स घरोघरी पाणीपुरवठा करीत होते. दुर्दैवाने महापालिकेत गेल्यानंतर या गावांचा पाणीपुरवठा सुधारण्याऐवजी पूर्ण कोलमडून गेला आहे.

: पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नागरिकांच्या या मागण्यांचा विचार व्हावा

१) ग्रामपंचायतची जुनी पाणीयोजना आणि जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित करावा जेणेकरून पाणीपुरवठा सुरळीत व्हायला मदत होईल.
२) महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला मनपाकडून देय असलेला निधी लवकरात लवकर वर्ग करावा.
३) फुरसुंगी, उरुळी देवाची पाणीयोजना लवकरात लवकर पूर्ण करावी.

या बाबत १५ दिवसात समाधानकारक कार्यवाही न झाल्यास नाईलाजास्तव पुणे मनपावर हंडा मोर्चा काढण्यात येईल. त्यासाठी हे पत्र हीच नोटीस समजण्यात यावी. असा इशारा शिवतारे यांनी दिला आहे.

PMC : चार गावांची पाणी योजना महापालिका घेणार ताब्यात

Categories
PMC पुणे

चार गावांची पाणी योजना महापालिका घेणार ताब्यात

: १४ कोटींचा खर्च अपेक्षित

पुणे : महापालिका हद्दीत शिवणे, कोंढवे-धावडे, उत्तमनगर आणि न्यू कोपरे अशा चार गावाचा समावेश झाला आहे. या गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या योजनेतून पाणी पुरवठा केला जायचा. मात्र या गावाचा समावेश मनपा हद्दीत झाला असल्याने आता त्या गावाची जबाबदारी महापालिकेची आहे. त्यामुळे प्राधिकरणा कडील पाणी पुरवठा योजना महापालिका आपल्या ताब्यात घेणार आहे. त्यासाठी महापालिकेला १४ कोटीचा खर्च अपेक्षित आहे. या बाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासानाकडून स्थायी समिती समोर ठेवण्यात आला आहे. यावर समितीच्या मंगळवारच्या बैठकीत चर्चा होईल.

: स्थायी समिती समोर प्रस्ताव

महापालिका प्रशासनाच्या प्रस्तावानुसार महापालिका हद्दीत २०१७ साली शिवणे आणि उत्तमनगर या दोन गावांचा सामावेश झाला होता. त्यानंतर २०२१ साली कोंढवे धावडे आणि न्यू कोपरे या गावांचा समावेश महापालिका हद्दीत करण्यात आला आहे. या चार ही गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र या गावांचा महापालिका हद्दीत समावेश झाला असल्याने आता गावांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. त्यानुसार प्राधिकरण सोबत झालेल्या बैठकीत ही पाणी योजना महापालिकेकडे हस्तांतरित करण्याबाबत चर्चा झाली होती. यासाठी महापालिकेला प्राधिकरणास १४ कोटी रुपये देणे अपेक्षित आहे. त्यानंतर हो योजना महापालिकेकडे हस्तांतरित होईल. या बाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासानाकडून स्थायी समिती समोर ठेवण्यात आला आहे. यावर समितीच्या मंगळवारच्या बैठकीत चर्चा होईल.