Dhiraj Ghate on MIM – एमआयएम ही भाजपची बी टीम असल्याचा काँग्रेसचा दावा पोकळ – धीरज घाटे

Categories
Breaking News Political पुणे

Dhiraj Ghate on MIM – एमआयएम ही भाजपची बी टीम असल्याचा काँग्रेसचा दावा पोकळ – धीरज घाटे

Dhiraj Ghate on MIM – (The Karbhari News Service) – एमआयएम पक्षाची पुण्यात अनिस सुंडके (Anis Sundke MIM Pune Loksabha) यांना उमेदवारी मिळणे हे पराभवाच्या भीतीपोटी भाजपाचे पडद्यामागील षडयंत्र असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ऍड. अभय छाजेड (Abhay Chajed Pune Congress) यांनी पत्रकाव्दारे केला आहे. त्या आरोपांचा समाचार पुणे भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे (Dhiraj Ghate Pune BJP) यांनी सुस्पष्ट शब्दात घेतला. (Pune Loksabha Election)

घाटे म्हणाले, एमआयएम ही भाजपची बी टीम असल्याचा दावा, तो दावा किती पोकळ आहे, हे वारंवार सिद्ध झाले आहे. निवडणूक आयोगाने हैद्राबादमधील ५ लाख ४० हजार बोगस मतदारांची नावे काढून टाकली आहेत. तसेच हैद्राबादमध्ये मोठ्या संख्येने बोगसमतदार असल्याचा आरोपच तेथील भाजपच्या उमेदवार माधवी लता यांनी जाहीरपणे केला होता. जर एमआयएम ही भाजपची बी टीम असती तर भाजपचे त्यांचे नुकसान ऐन निवडणुकीत केले असते का’

भारतीय जनता पक्ष हा दोन खासदारांपासून, ३०० पेक्षा जास्त खासदार निवडून आणणारा पक्ष आहे. हे साध्य करण्यासाठी भाजपने कधीही कोणतेही षडयंत्र केले नाही केवळ कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर आणि मतदारांचा विश्वास मिळवत हे साध्य करून दाखवले आहे, हा इतिहास फार जुना नाही. देशातील मतदारच भाजपला तिसऱ्यांदा विजयी करत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी पाहण्यासाठी उत्सुक आहे. सर्वच गोष्टी जर भाजपच्या बाजूने असतील, तर विजयासाठी पुण्यात भाजपला षडयंत्र करण्याची गरज नाही हे सामान्य मतदाराही समजते. उलट काहीही करा पण निवडणूक जिंकून सत्ता काबीज करा, हे अलिखित आणि अघोषिक धोरण गेली ६०-७० वर्षे देशात राबवणाऱ्या काँग्रेसचे चरित्र षडयंत्र रचण्याचेच आहे, असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे पुण्याचे अध्यक्ष धीरज घाटे यांनी केला आहे.

ते म्हणाले, ‘गेली दहा वर्षे काँग्रेस सत्तेच्या बाहेर असल्याने त्यांना येनकेनप्रकारे त्यांना सत्ता हवी असल्याने त्यासाठी ते षडयंत्र रचण्याची शक्यता नाकारती येत नाही. पुण्यातील मतदारांनी सन २०१४ आणि २०१९ साली मोदीजींसाठी कसे मतदान केले याचा इतिहास ताजा आहे. यावेळीही मतदारांनी त्यांचे मन बनवले असून आता पुण्यातील नाही तर देशातील मतदार मोदीजींना पुन्हा तिस-यांचा पंतप्रधान करण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसत आहे.

घाटे यांनी सांगितले की, ‘अन्य पक्षातून काँग्रेसमध्ये केवळ तिकीटासाठी आलेल्या रविंद्र धंगेकरांना काँग्रेसने काही महिन्यापूर्वी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली. आता पुन्हा त्यांनाच लोकसभेसाठी उमेदवारी दिली असल्याने धंगेकरांना उमेदवारीवरुन कार्यकर्त्यांच्यातील मोठा वर्ग नाराज आहे. ही नाराजी व्यक्त करण्याचा एक भाग म्हणून भाजपसारख्या पक्षावर षडयंत्राचे आरोप केले जात आहेत.

ज्या काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात शपथेवर श्रीराम काल्पनिक असल्याचे सांगितले होते, त्याच काँग्रेसच्या सर्व नेत्यांवर रामनवमीच्या शुभेच्या देऊन पत्रकार परिषद सुरू करण्याची वेळ का आली ? आमची सत्ता राज्यात १९९५ साली आली पण नंतर पंधरा वर्षे नाही आली. जेव्हा काँग्रेसच्या कारभाराला लोक कंटाळले आणि त्यांनी २०१४ साली भाजपला सत्तेवर बसवले. जे राज्यात तेच केंद्रात, स्व. अटलजींचे सरकार २००४ साली गेल्यानंतर काँग्रेसची सत्ता देशात आली, पण अवघ्या दहाच वर्षात देशातील जनतेने बहुमताने भाजपला केंद्रात सत्ता दिली. त्यासाठी कोणतेही षडयंत्र करावे लागले नाही, कारण ते भाजपचे चरित्रच नाही, असेही घाटे यांनी स्पष्ट केले.

Kasba Constituency | BJP | कसबा मतदारसंघातील मोफत आरोग्य तपासणी शिबिरात पहिल्याच दिवशी शंभर पेक्षा जास्त महिलांचा सहभाग

Categories
Breaking News Political social आरोग्य पुणे

Kasba Constituency | BJP | कसबा मतदारसंघातील मोफत आरोग्य तपासणी शिबिरात पहिल्याच दिवशी शंभर पेक्षा जास्त महिलांचा सहभाग

| कसबा विधानसभा निवडणूक प्रमुख हेमंत रासने यांच्या यांच्या पुढाकाराने महिलांना दिलासा

 

Kasba Constituency | BJP |पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त (PM Narendra Modi Birthday) उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री  चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) व समर्थ युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने निवडणूक प्रमुख हेमंत रासने (Hemant Rasane) यांच्या संकल्पनेतून कसबा मतदारसंघात (Kasba Constituency) महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे (Helath Check Up Camp for women) आयोजन करण्यात आले आहे. १० ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबरपर्यंत मतदारसंघातील सर्व प्रभागांमध्ये मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार असून आज प्रभाग क्रमांक १८ मध्ये पहिल्याच दिवशी शेकडो रुग्णांची तपासणी करण्यात आली. तसेच ज्या नागरिकांना पुढील उपचाराची गरज आहे, त्यांनाही मदत केली जाणार आहे. भाजप प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol), राज्य उपाध्यक्ष राजेश पांडे (Rajesh Pande) आणि शहराध्यक्ष धीरज घाटे (Dhiraj Ghate) यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी बोलताना हेमंत रासने म्हणाले की, “देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वय वर्ष ४० वर्षांवरील महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करणात आले आहे. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात महिला घरगुती कामांसोबतच त्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी माझ्या माता – भगिनींसाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या तपासणीमध्ये महिलांना काही आजार आढळल्यास त्यावर योग्य ते औषधोपचार करण्यात येतील.

समर्थ युवा फाऊंडेशनच्या माध्यमातून शिबीर आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराच्या माध्यमातून आज प्रभाग १७ मधील शुक्रवार पेठेतील जैनमंदिर येथे फिरत्या आरोग्य तपासणी वाहिकेच्या माध्यमातून अनेक महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली व आरोग्या संबंधीच्या तक्रारींवर योग्य ते उपचार घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरात रक्तातील साखर तपासणी (ब्लड शुगर),रक्तदाब तपासणी (बी.पी.),छातीचा एक्स-रे,रक्त तपासणी (सीबीसी टेस्ट),कोलेस्ट्रॉल तपासणी,स्तनाचा कर्करोग तपासणी (मॅमोग्राफी) आदी ९५०० रुपये पर्यंतच्या तपासण्या करण्यात आल्या. कसबा मतदारसंघातील सर्व ६ प्रभागांमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी कसबा विधानसभा अध्यक्ष श्री. राजेंद्र काकडे, सहसंयोजक श्री.अनिल बेलकर, फार्मासिस्ट, केमिस्ट तसेच कसबा मतदारसंघातील सर्व महिला पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sane Guruji Ganesh Mandal Fire | साने गुरूजी मंडळाला लागलेली आग फटाक्यामुळे!

Categories
Breaking News cultural Political social पुणे

Sane Guruji Ganesh Mandal Fire | साने गुरूजी मंडळाला लागलेली आग फटाक्यामुळे!

Sane Guruji Ganesh Mandal Fire | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा (J P Nadda) आज पुणे दौऱ्यात ज्या साने गुरुजी गणपती मंडळाची (Sane Guruji Ganesh Mandal) आरती करत होते तिथे आग लागली.  आरती करत असतानाच मंडळाच्या देखाव्याच्या शिखराला आग लागली. त्यामुळे त्यांच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना तातडीने तिथून बाहेर काढले
पाऊस पडत असल्यामुळे आणि अग्निशमन दलाच्या प्रयत्नाने आग लगेचच विझली. नड्डांसोबत त्यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे (Chandrashekhar Bawankule), शहर अध्यक्ष धीरज घाटे (Dhiraj Ghate) देखील तिथे उपस्थित होते.

अग्निशमन दल नियंत्रण कक्षात राञी ०७•४६ वाजता आंबीलोढा कॉलनी, साने गुरूजी नगर येथे असलेल्या मंडळाजवळ सजावट केलेले एक मोठे मंदिर याला आग लागल्याची वर्दि मिळाली असता दलाकडून जनता वसाहत, एरंडवणा अग्निशमन केंद्र येथून व अग्निशमन मुख्यालयातून अशी एकूण चार अग्निशमन वाहने रवाना करण्यात आली होती. (Pune Ganeshotsav)
घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, सजावट केलेल्या एका मोठ्या मंदिराच्या कळसापासून आगीची सुरवात झाली असून आग वाढत आहे. जवानांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत व शहरात गणपती उत्सवानिमित्त मोठ्या प्रमाणात भाविक असल्याने तातडीने मंडपाच्या मागील बाजूने शिडी लावत वर चढून चार ही बाजूने होज पाईपच्या साह्याने पाण्याचा मारा केला. सुमारे वीस मिनिटात आगीवर नियंञण मिळवत पुढील धोका दूर केला. सुदैवाने कोणी जखमी नाही. अधिक माहिती घेतली असता आग फटाक्यांमुळे लागल्याचे समजले.

Dheeraj Ghate : ‘जिथे गरज तिथे धीरज’ हा नारा घेऊन नगरसेवक धीरज घाटे यांची निवडणुकीची तयारी सुरु 

Categories
PMC Political पुणे

‘जिथे गरज तिथे धीरज’ हा नारा घेऊन नगरसेवक धीरज घाटे यांची निवडणुकीची तयारी सुरु

पुणे : महापालिका निवडणुकीची प्रभाग रचना जाहीर झाल्यापासून निवडणूक रणधुमाळीला चांगलाच वेग आला आहे. मात्र प्रभागाची तोडमोड झाल्याने बरेच प्रस्थापित नगरसेवक नाराज झाले आहेत. मात्र नेहमीच नागरिकांच्या हाकेला ओ देत त्यांच्या मदतीला धावून जाणारे नगरसेवक धीरज घाटे यांनी मात्र प्रभागाच्या तोडमोडीकडे फार लक्ष न ‘जिथे गरज तिथे धीरज’ हा नारा घेऊन आपल्या कामाला सुरुवात देखील केली आहे. नेहमीप्रमाणे त्यांना नागरिकांचा तात्काळ प्रतिसाद देखील मिळू लागला आहे.

: कामातून मन जिंकणारा नगरसेवक

धीरज घाटे यांची ओळखच काम करणारा आणि गरजेला धावणारा माणूस असा आहे. त्यांच्या वाट्याला प्रभाग 17 आला आहे. प्रभागाची तोडमोड झाली असली तरीही त्यांना इतरांसारखी भीती वाटत नाही. जो नवीन भाग आपल्या प्रभागात आला आहे? तिथल्या नागरिकांशी त्यांनी संपर्क देखील सुरु केला आहे. घाटे आपल्या टीमला सोबत घेऊन नेहमीच कार्यरत असतात. तो अजेन्डा पुढे राबवत घाटे नी लोकांशी संपर्क करण्याचे काम सुरु केले आहे. सुरुवातीलाच घाटे यांनी नागरिकांची प्रत्येक मूलभूत गरज ओळखत नागरिकांना संबंधित काम करण्याऱ्या लोकांचे फोन नंबर उपलब्ध करून दिले आहेत. त्यानुसार तात्काळ लोकांचा प्रतिसाद मिळणे देखील सुरु झाले आहे.
यामध्ये घाटे यांनी महापालिका संबंधित कामासाठी, आपत्कालीन परिस्थिती बाबत, आरोग्य विषयक कामाबाबत, मोफत ऍम्ब्युलन्स हवी असल्यास, ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी स्वतंत्र व्यक्तींची नेमणूक केली आहे. तसेच महिला सबलीकरण, मोफत अभ्यासिका, अल्पदरात व्यायामशाळा उपलब्ध करून दिल्या आहेत. शासकीय योजना, शिक्षण विषयक माहिती, पोलीस खात्याशी संबंधित कामकाजाबाबत देखील लोकांना स्वतंत्र व्यक्ती उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचा लाभ नागरीक घेऊ शकतील.

Hawkers : Dheeraj Ghate : फेरीवाल्यांना दिलासा : जुन्या नियमाप्रमाणेच भाडे आकारणार  : स्थायी समितीची मान्यता 

Categories
Breaking News PMC Political पुणे

फेरीवाल्यांना दिलासा : जुन्या नियमाप्रमाणेच भाडे आकारणार

: स्थायी समितीची मान्यता

पुणे : शहरातील फेरीवाल्याना स्थायी समितीने चांगलाच दिलासा दिला आहे. नवीन दरवाढीमुळे फेरीवाल्यांचे कंबरडे मोडले होते. यातून फेरीवाल्यांची सुटका होणार आहे. सर्व फेरीवाल्यांचे भाडे आता जुन्या नियमाप्रमाणेच आकारले जाणार आहे. म्हणजे या लोकांना आता दिवसाला 100 रुपये न दयावे लागता वर्षाला 240 रुपये द्यावे लागणार आहेत. भाजपचे नगरसेवक आणि माजी सभागृह नेता धीरज घाटे यांनी या बाबतच्या प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवला होता. समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. अशी माहिती समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.

: धीरज घाटे यांचा प्रस्ताव

महापालिकेच्या वतीने केंद्र सरकारच्या निर्देशानुसार शहरात फेरीवाला धोरण लागू करण्यात आले आहे. त्यानुसार महापालिकेने फेरीवाल्यांच्या परवाना शुल्कात देखील वाढ केली आहे. पूर्वी फेरीवाल्यांकडून वर्षाला सरसकट 240 रुपये आकारले जात होते. मात्र नवीन नियमानुसार हे भाडे दिवसाला 100 रुपयांपर्यंत गेले आहे. त्यातच कोरोनाचा कहर गेल्या दोन वर्षांपासून सुरु आहे. त्यामुळे या फेरीवाल्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांचे शुल्क जुन्या नियमानुसार करावे, असा प्रस्ताव धीरज घाटे यांनी स्थायी समिती समोर ठेवला होता. त्यांच्या प्रस्तावानुसार पुणे मनपाचे नव्याने दरभाडे आकारण्यात आले आहे. फेरीवाल्यांच्या दैनंदिन उत्पन्नापेक्षा हे भाडे अधिक आहे. त्यामुळे स्थिर हातगाड्या व बैठे परवाना धारकांना जुन्या नियमाप्रमाणे भाडे आकारण्यात यावे. या प्रस्तावाला मंगळवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानुसार आता या लोकांना आता दिवसाला 100 रुपये न दयावे लागता वर्षाला 240 रुपये द्यावे लागणार आहेत. फेरीवाल्याना हा दिलासा मानला जात आहे.
—–
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा कहर सुरूच आहे. यामुळे पथारी वाल्यांची आर्थिक स्थिती खूप नाजूक झाली आहे. त्यातच महापालिकेचे भाडे देखील त्यांच्या दररोजच्या उत्पन्नापेक्षा जास्तच आहे. त्यामुळे हे भाडे कमी करण्याबाबत प्रस्ताव दिला होता. या अगोदर देखील जून 2019 मध्ये प्रशासनाला प्रस्ताव दिला होता. स्थायी समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. मुख्य सभेत देखील आम्ही हा प्रस्ताव मंजूर करून घेऊ आणि त्याची अंमलबजावणी करू.

         धीरज घाटे, नगरसेवक

PMC Colonies : Dhiraj Ghate : सातव्या वेतन आयोगानुसार महापालिका कर्मचाऱ्यांचे वाढलेले घरभाडे कमी करा

Categories
PMC Political पुणे

सातव्या वेतन आयोगानुसार महापालिका कर्मचाऱ्यांचे वाढलेले घरभाडे कमी करा

: माजी सभागृह नेते धीरज घाटे यांची मागणी

पुणे :  सातवा वेतन आयोग प्रत्यक्षात लागू झाल्यानंतर पुणे महानगरपालिकेतील सेवकांचे घरभाडे हे प्रचंड प्रमाणात वाढलेले आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. यामध्ये मुख्यत्वे करून चतुर्थ श्रेणी सेवकांमध्ये याबाबत जास्त
अन्यायकारक भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे पुणे मनपातील सेवकांचे वाढलेले घर भाडे हे पूर्वीप्रमाणे किंवा कमी घर भाडे आकारावे. अशी मागणी नगरसेवक आणि माजी सभागृह नेते धीरज घाटे यांनी महापालिका आयुक्त यांचेकडे केली आहे.

: घरांच्या पुरेशा सुविधा द्या

घाटे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनानुसार  पुणे मनपा स्थापन झाल्यापासून चतुर्थ श्रेणी सेवकांना मनपा वसाहतीमध्ये सदनिका दरमहा अल्प आडे आकारून वाटप केल्या होत्या. चतुर्थ श्रेणी सेवक हे गेली ५० वर्षांपेक्षा जास्त काळ या मनपा सदनिकेत रहात आहेत. मुख्यत्वे करून पुणे मनपा वसाहतीमध्ये राहणारे सेवक हे अत्यावश्यक {आरोग्य विभाग) खात्याशी निगडीत असून ते २४/७ पुणे शहराची स्वच्छता करतात. शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतात. हे सेवक जीव मुठीत घेवून पुणे शहराचे आरोग्य व पुणे शहर स्वच्छ ठेवतात. सन २०१३-१४ च्या ऑडीट रिपोर्टनुसार पुणे मनपातील सेवकांच्या घर भाड्यामध्ये तडका फड़की वाढ करण्यात आली. आता सातव्या वेतन आयोगामुळे प्रचंड प्रमाणात घरभाडे वाढ झाली आहे. त्यामुळे सेवकांमध्ये याबाबात असंतोष निर्माण झाला आहे. सदरची बाब हि अन्यायकारक आहे. पुणे मनपा वसाहतींचे बांधकाम होऊन सुमारे ४० ते ५० वर्ष पेक्षा जास्त कालावधी झाला आहे. येथील खूप इमारती या मोडकळीस आलेल्या आहेत वसाहतीमध्ये सुविधांचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे. काही इमारती ह्या धोकादायक आहे मागील वर्षी पुणे मनपातील चाळ विभागाकडील अधिकाऱ्यांनी इमारतीची पाहणी करून सदर इमारती ह्या धोकादायक जीर्ण झालेल्या / मोडकळीस झालेल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हानी होऊ शकते असा अहवाल सादर केला आहे. तरी या सेवकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा व आयुक्त यांनी  प्रत्यक्षात इमारतींची पाहणी करून येथील सेवकांच्या घरांची स्थिती पहावी. ज्या प्रमाणात भाडे आकारले जाते त्या प्रमाणात घरांची स्थिती आहे का? पुरेश्या सुविधा आहे का? तरी आपण यामध्ये लक्ष घालून पुणे मनपातील सेवकांचे वाढलेले घर भाडे हे पूर्वीप्रमाणे किंवा कमी घर भाडे आकारावे. असे घाटे यांनी म्हटले आहे.