Vaccination for 15-18 years: Muralidhar Mohol: 15 ते 18 वयोगटासाठी शहरात 5 लसीकरण केंद्र; 3 जानेवारीपासून लसीकरण होणार सुरु : महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

Categories
Breaking News PMC पुणे

१५ ते १८ वयोगटासाठी शहरात ५ लसीकरण केंद्रे :

: महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

– ५ केंद्रांवर ३ जानेवारीपासून होणार लसीकरण सुरु

पुणे : केंद्र सरकारच्या निर्देशानुसार पुणे मनपा हद्दीतील १५ ते १८ वयोगटातील नागरिकांसाठी कोरोना लसीकरणाचे नियोजन केले असून या वयोगटासाठी शहरात ५ स्वतंत्र लसीकरण केंद्राचे नियोजन केल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. यासाठी १ जानेवारीपासून कोविन पोर्टलवर नोंदणी सुरु होत असल्याचेही महापौर मोहोळ म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना १५ ते १८ वयोगटातील लाभार्थ्यांना कोरोना लसीकरण सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यास अनुसरून पुणे महापालिकेचे नियोजन पूर्ण झाले आहे. याबाबत माहिती देताना महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, नवीन लाभार्थी वयोगटासाठी कोवॅक्सिन लस देण्याचे निर्देश देण्यात आले असून त्या दृष्टीने लशीचा मुबलक साठा उपलब्ध करण्यात येत आहे. शहरातील सर्व भागातील लाभार्थ्यांना लस घेता यावी, यासाठी शहरात पहिल्या टप्प्यात ५ स्वतंत्र लसीकरण केंद्रे सुरू करण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करताना पुणे महापालिकेने उत्तम कामगिरी केली होती, तशीच कामगिरी या वयोगटासाठीही करण्याचा प्रयत्न आहे’.

‘२००७ किंवा त्यापूर्वी जन्मलेले या लसीकरणासाठी पात्र ठरले असून लाभार्थ्यांना नव्या वर्षाच्या पाहिल्याच दिवशी लसीकरण नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारचे कोविन हे पोर्टल किंवा एप्लिकेशन वापरावे लागणार आहे. यात ५० टक्के ऑनलाईन आणि ५० टक्के ऑफलाईन नोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. शिवाय लसीकरणाला येताना लाभार्थ्यांकडे आधारकार्ड/ओळखपत्र आवश्यक असणार आहे, असेही महापौर मोहोळ म्हणाले.

लसीकरणासाठी सुरू होणारी स्वतंत्र केंद्रे

१) कै. दशरथ बळीराम भानगिरे दवाखाना, महंमदवाडी, हडपसर
२) कमला नेहरू रुग्णालय, मंगळवार पेठ
३) कै. जयाबाई सुतार दवाखाना, कोथरूड
४) भारतरत्न स्व. राजीव गांधी हॉस्पिटल, येरवडा
५) कै. मुरलीधर लायगुडे दवाखाना, वडगाव खुर्द

Mahavikas Aghadi Vs BJP : Metro Bridge : महाविकास आघाडी म्हणते, विकासाच्या नावाखाली गणेश उत्सव परंपरा नष्ट करण्याचा भाजपचा प्रयत्न; तर भाजप म्हणते, गणेश मंडळ कार्यकर्त्यांच्या आडून महाविकास आघाडीचे राजकारण

Categories
Breaking News PMC Political पुणे

विकासाच्या नावाखाली गणेश उत्सव परंपरा नष्ट करण्याचा भाजपचा प्रयत्न : महाविकास आघाडी

: गणेश मंडळ कार्यकर्त्यांच्या आडून महाविकास आघाडीचे राजकारण : भाजप

पुणे : मेट्रो प्रकल्पाच्या पुलावरून महापालिकेचे मुख्य सभागृह आणि बाहेर देखील महाविकास आघाडी आणि सत्ताधारी भाजप च्या नेत्यामध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली.    मेट्रोच्या पुलाची उंची वाढवण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना व काँग्रेस या महाविकास आघाडीतील तिन्ही घटकपक्षांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या मेट्रो पुलाची उंची न वाढवता काम सुरू ठेवून पुणे शहराची परंपरा मोडीत काढण्याचा दुर्दैवी प्रयत्न सत्ताधारी भाजप करत आहेत असा आरोप या तीनही पक्षांच्या वतीने करण्यात आला. तर भाजपने आरोप केला कि गणेश मंडळ कार्यकर्त्यांच्या आडून महाविकास आघाडी राजकारण करते आहे.

: आमचा विरोध हे महापौरांचे हास्यास्पद वक्तव्य – प्रशांत जगताप

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले कि “गणेशोत्सव” म्हणजे पुणे शहराचे सांस्कृतिक वैभव… पुणे शहरातील गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीची भुरळ केवळ महाराष्ट्राला किंवा भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला आहे. मात्र पुणे शहराच्या या वैभवाला गालबोट लागतेय की काय असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. पुणे शहरातील सर्व मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक ही छत्रपती संभाजी महाराज पूल (लकडी पूल) येथून जाते. गेल्या 131 वर्षांपासून ही परंपरा अखंडितपणे चालू आहे. मात्र छत्रपती संभाजी महाराज पुलावरून प्रस्तावित असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या पुलामुळे ही परंपरा खंडीत होणार आहे. या मेट्रोच्या पुलाची उंची वाढवण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना व काँग्रेस या महाविकास आघाडीतील तिन्ही घटकपक्षांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या मेट्रो पुलाची उंची न वाढवता काम सुरू ठेवून पुणे शहराची परंपरा मोडीत काढण्याचा दुर्दैवी प्रयत्न सत्ताधारी भाजप करत आहेत असा आरोप या तीनही पक्षांच्या वतीने करण्यात आला. याबाबत आज महाविकास आघाडीतील पक्षांनी प्रश्न उपस्थित केले असता महाविकास आघाडीचा मेट्रो प्रकल्पास विरोध असल्याचे हास्यास्पद वक्तव्य  महापौरांनी केले आहे.  पालक मंत्री आदेशाने मेट्रोचे काम सुरु झाले असे  महापौर महोदयांनी सांगितले, जर हे खरे असेल तर महापौरांनी सप्टेबर मध्ये काम थांबवताना कोणत्या अधिकारांत मेट्रोचे काम थांबवले होते. पुणे शहराच्या अस्मितेच्या या प्रश्नावर महानगरपालिकेच्या सभागृहात चर्चा व्हावी अशी मागणी महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी केली असता भर सभागृहात महापौरांचं खोटं वक्तव्य उघडं पडेल म्हणून भारतीय जनता पक्षाने चर्चा घडू दिली नाही. पुणेकरांच्या प्रतिनिधींना सभागृहात बोलण्याची संधी न देता महापौरांनी मोदी सरकारच्या हुकूमशाही पॅटर्न पुणे महानगरपालिकेत राबवला आहे.

“राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पुणे शहराच्या विकासाला विरोध नाही तसेच मेट्रोला देखील विरोध नाही, मात्र विकासाच्या नावाखाली पुण्याच्या परंपरेला नष्ट करण्याचा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. हिंदुत्वाचा आणि संस्कृतीचा ठेका घेतलेल्या भाजपचे देवंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जो DPR केला त्यात या चुका झाल्या आहेत त्यामुळे ही नामुष्की ओढवली आहे हे पुणेकरांच्या समोर आणण्यासाठी आज सभागृहात बोलू देण्याची आमची मागणी होती परंतू हे सत्य जनतेसमोर येऊ नये म्हणूनच महापौरांनी आम्हाला सभागृहात बोलू दिलं नाही.” असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.

: महाविकास आघाडीचे नेते गणेश मंडळांची दिशाभूल करत आहेत : महापौर

याबाबत महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, गणेश मंडळ कार्यकर्त्यांच्या आडून महाविकास आघाडीचे राजकारण सुरु आहे. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना खोटे सांगून त्यांची दिशाभूल केली जात आहे. कारण काम सुरु करण्याचे आणि ते ही पोलिस बंदोबस्तात करण्याचे आदेश पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. त्यामुळे आम्ही सभागृहात सर्व नेत्यांना सांगत होतो कि आपण अजित दादांना भेटून हा प्रश्न निकाली लावू. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आमचे ऐकले नाही. आम्हाला सभा चालू द्यायची होती. कारण शहराच्या हिताचे ३०० विषय मंजूर करायचे आहेत. मात्र विरोधी नगरसेवकांनी गोंधळ घालत सभा बंद करण्याचे काम केले. सभागृह नेते गणेश बिडकर म्हणाले, महानगरपालिकेची सर्वसाधारण झाल्यानंतर या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सर्व पक्षाचे पदाधिकारी एकत्र येऊ. यावर काही उपाय काढता येईल का? यासाठी महापौर यांच्या कार्यालयात बैठक घेऊन सर्व पक्षांचे एक शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार तसेच नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊ असा उपाय सुचविला. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना यात रस नव्हता. केवळ राजकारण करून महाविकास आघाडी गणेश मंडळाची, कार्यकर्त्यांची दिशाभूल करत आहेत. अजूनही आम्ही दोन्ही नेत्यांकडे यासाठी पाठपुरावा करण्यास तयार आहोत. तर स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने म्हणाले, विकासाच्या आड कधीही गणेश मंडळ कार्यकर्ता येत नाही. टी पुण्याची परंपरा नाही. मात्र महाविकास आघाडी वेगळेच राजकारण खेळू पाहत आहे.

Murlidhar Mohol : पुण्याचे महापौर देशातील महापौरांना सांगणार ‘स्वच्छ भारत मिशन’चा अनुभव !

Categories
Breaking News PMC पुणे

पुण्याचे महापौर मोहोळ देशातील महापौरांना सांगणार ‘स्वच्छ भारत मिशन’चा अनुभव !

– केंद्राच्या ‘न्यू अर्बन इंडिया’ परिषदेसाठी महापौर मोहोळ वाराणसीत

पुणे : पुणे शहरात दररोज निर्माण होणाऱ्या संपूर्ण कचऱ्यावर प्रक्रिया करणारे शहर म्हणून पुण्याचा देशात डंका आहे. हा धागा पकडून पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ हे देशातील महापौरांना स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पुणे शहराने केलेल्या कामगिरीचा अनुभव सांगणार आहेत. निमित्त आहे केंद्र सरकारच्या नगर विकास मंत्रालयाने ‘न्यू अर्बन इंडिया’ अंतर्गत आयोजित केलेल्या देशातील महापौरांच्या परिषदेचे. विशेष म्हणजे देशातील केवळ दोन महापौरांनाच यात अनुभव सांगण्याची संधी मिळाली असून त्यात महापौर मोहोळ यांचा समावेश आहे.

केंद्र सरकारच्या नगर विकास मंत्रालयाने वाराणसी येथे ‘न्यू अर्बन इंडिया’ अंतर्गत देशातील महापौरांची परिषद शुक्रवार दि. १७ डिसेंबर रोजी आयोजित केली असून यात देशभरातील महापौरांना पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्गदर्शन करणार आहेत. तर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंह पुरी यांची विशेष उपस्थिती असणार आहे. शिवाय पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ हे स्वच्छ भारत मिशनवर तर सुरतच्या महापौर हेमाली बोघावाला या ‘अमृत’ योजनेचे सादरीकरण करणार आहेत. या दोन्ही महापौरांची निवड थेट केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने केली आहे.

याबाबत माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘देशाच्या महापौरांसह केंद्रीय नगरविकास मंत्र्यांसमोर स्वच्छ भारत मिशनअंतर्गत पुणे शहराने केलेल्या कामाची माहिती देण्याची संधी मिळाली, हा पुणेकरांचा सन्मान आहे. शिवाय शहर स्वच्छतेसाठी राबणाऱ्या १५ हजारांपेक्षा जास्त स्वच्छ सेवकांचे हे यश असून हा त्यांचाही सन्मान आहे, याचे मनस्वी समाधान आहे. देशातील महापौरांसमोर प्रेझेन्टेशन देणार असून यात पुणे शहराने कशी कामगिरी केली याची सविस्तर माहिती देणार आहे.’

‘भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात पुणे महापालिकेची सत्ता आली तेव्हा कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रश्न अतिशय गंभीर होता. शिल्लक राहणाऱ्या कचऱ्याचा प्रश्न सर्वांनाच सतावत होता. अशातच आम्ही जास्तीत जास्त कचऱ्यावर प्रक्रिया कशी होईल, यासाठी यंत्रणा उभी करण्याकडे विशेष लक्ष दिले. याचेच सकारात्मक परिणाम म्हणून कचरा प्रक्रिया करण्यात पुणे महानगरपालिका स्वयंपूर्ण झाली आहे’, असेही महापौर मोहोळ म्हणाले.

Amit Shah : PMC : गृहमंत्री अमित शाह रविवारी पुणे महापालिकेत : छत्रपती शिवरायांच्या पुतळा स्मारकाचे भूमिपूजन तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे होणार लोकार्पण

Categories
Breaking News PMC Political देश/विदेश पुणे

गृहमंत्री अमित शाह रविवारी पुणे महापालिकेत

– महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

– छत्रपती शिवरायांच्या पुतळा स्मारकाचे भूमिपूजन तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे होणार लोकार्पण

पुणे : देशाचे गृहमंत्री अमित शाह येत्या रविवारी (१९ डिसेंबर) पुणे दौऱ्यावर असून गृहमंत्री शाह थेट पुणे महापालिकेत येणार असून त्यांच्या शुभहस्ते हिरवळीवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठ पुतळा स्मारकाचे भूमिपूजन आणि वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

पुणे महापालिकेच्या हिरवळीवर महापौर मोहोळ यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासनाधिष्ठ पुतळा स्मारक साकारण्यात येत आहे. तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा नवीन इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ बसविण्यात येत आहे. हे दोन्ही कार्यक्रम गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते येत्या रविवारी दुपारी ३ वाजता संपन्न होणार आहेत.

याबाबत माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘दोन्ही कार्यक्रमास केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची विशेष उपस्थित राहणार असून गृहमंत्री शाह हे स्वतः महापालिकेत येत असल्याचा विशेष आनंद आहे.’

‘हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांनी आपणा सर्वांनाच दिशा दिलेली आहे. दैनंदिन जीवनात काम करत असताना या दोन्ही महापुरुषांच्या वाटेवरून वाटचाल करणे, हे प्रेरणादायी आहे. म्हणूनच महापालिका म्हणून पुणेकरांसाठी काम करत असताना या दोन्ही महापुरुषांचे पुतळे असावीत, ही मनोमन इच्छा होती. जी आता पूर्णत्वास जात असताना मनस्वी समाधान आहे.’

Pune School Reopen : पुण्यातील  पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा गुरुवार पासून  सुरु होणार : महापालिका आयुक्तांचे आदेश जारी 

Categories
Breaking News Education PMC पुणे महाराष्ट्र

पुण्यातील  पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा गुरुवार पासून  सुरु होणार

: महापालिका आयुक्तांचे आदेश जारी

पुणे : ओमायक्रोन  विषाणूची धास्ती संपूर्ण जगाने घेतली आहे. ऑस्ट्रिया, जर्मनी सारख्या शहरात तर लॉकडाऊन करण्यात आला आहे. पुणे शहरात लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले असले तरी लहान मुलांचे लसीकरण झालेले नाही. त्यामुळे १५ डिसेंबरपर्यंत पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय पुणे महापालिकेकडून घेण्यात आला होता. पुणे शहरात सध्यस्थितीत ओमायक्रोनचा एकच सक्रिय रुग्ण आहे. तसेच परदेशावरून येणाऱ्या प्रवाशांवर पुणे महापालिका लक्ष ठेऊन आहे. त्याच अनुषंगाने शहरातील शाळा १६ डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.  आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे निर्देश जारी केले आहेत.

राज्य सरकारने एक डिसेंबरला पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ओमायक्रॉन विषाणूमुळे सतर्क राहण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. पण शिक्षण  विभाग आणि राजेश टोपे यांनी शाळा सुरु होण्याच्या निर्णयात कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट केल्यावर अनेक जिल्ह्यात शाळा सुरु करण्याच्या तयारीलाही सुरुवात झाली होती. मात्र मुंबई महापलिककेने या विषाणूचा धोका पाहता शाळा १ तारखेपासून सुरु होणार नसल्याचे जाहीर केले होते. तर पुणे महापालिकेने १५ डिसेंबरपर्यंत शाळा बंद राहणार असल्याचे सांगितले होते. त्याच अनुषंगाने शहरातील शाळा १६ डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.  आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे निर्देश जारी केले आहेत.

जिल्ह्याचे पालकमंत्री, विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त अशा आम्ही सर्वांनी चर्चा करून शाळा सुरु करण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे. सर्व नियम पाळून या शाळा गुरुवार पासून सुरु होतील.

        मुरलीधर मोहोळ, महापौर

Pedestrian Day : Mayor : PMC : पादचारी दिन साजरा करणारे देशातील पहिले शहर बनले पुणे  : महापौर मुरलीधर मोहोळ 

Categories
Breaking News PMC पुणे

पादचारी दिन साजरा करणारे देशातील पहिले शहर बनले पुणे

: महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे : लक्ष्मी रस्त्याचा झालेला खुला मॉल, शहरात ठिकठिकाणी सजलेले रस्ते, पादचारी मार्गांच्या सोडवलेल्या समस्या आणि रस्त्यावर चालण्यासाठी पुणेकरांचा मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद. अशा उत्साहपूर्ण वातावरणात शनिवारी पुण्यातील पहिला पुणे महापौर पादचारी दिन साजरा करण्यात आला. शिवाय या पादचारी दिनासोबतच पुणे पादचारी दिन साजरा करणारे देशातील पहिले शहर बनले.

पुणे शहरातील ठिकाणी ५०० मी लांबीचे रस्ते पादचारीपूरक निर्माण करणे, चौक पादचारी सुरक्षितता लक्षात घेऊन सुधारणा कामे करणे आणि सुरक्षित मिड ब्लॉक क्रॉसिंग सुधारणा कामे करणे या पादचारी अनुषंगे कामांचा समावेश होता.
सर्वात महत्वाचा उपक्रम लक्ष्मी रस्त्यावर “ओपन स्ट्रीट मॉल” ही संकल्पना घेऊन नगरकर तालीम चौक ते उंबऱ्या गणपती चौक या सुमारे ४०० मी लांबीचा रस्ता पूर्णतः वाहनासाठी बंद करून पादचारी नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आला. सकाळी ११ वाजता मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते या उपक्रमाला सुरुवात झाली. यावेळी हेमंत रासने, (स्थायी समिती अध्यक्ष), मा.विक्रमकुमार ( महापालिका आयुक्त), मा.कुणाल खेमणार ( अती. म.आ ) यांचे उपस्थित सर्व लांबिमध्ये पादचारी कामांची पाहणी केली.

संपूर्ण रस्त्यावर दोन्ही बाजूचे फूटपाथ पादचाऱ्यांसाठी मोकळे केले, रस्त्याचे दोन्ही कडेला रंगीत रचना निर्माण केल्या व त्यामध्ये पथारी व्यावसायिक यांना जागा देण्यात आली, रस्त्यावर विविध ठिकाणी आकर्षक झाडे, फुले यांच्या कुंड्या ठेवणेत आल्या.
रस्त्यावर लहान मुलांना खेळण्याचे स्वरूपात प्रशिक्षण सेफ किड्स संस्थेद्वारे सोय केली होती.

सकाळी ११ ते संध्याकाळी ४ पर्यंत नागरिकांनी उस्पुर्तपणे सहभागी होऊन, या संकल्पनेस प्रतिसाद दिला. नागरिकांनी मुक्त स्वरूपात विहार व खरेदीचा आनंद घेतला. व्यापारी, पथारी व्यावसायिक व नागरिकांनी या संकल्पनेस चांगला पाठिंबा दिला
लोकांच्या सूचना व प्रतिक्रिया यातून यापुढे पुणे शहरात पादचारी सुविधा आणखी चांगल्या स्वरूपात निर्माण करणेचा प्रयत्न राहणार आहे.

पादचारी दिन हे केवळ निमित्त : महापौर मोहोळ

पादचारी दिन हे केवळ एकदिवसीय निमित्त असले तरी या निमित्ताने पादचाऱ्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी, शहरातील पादचारी मार्गांची दुरुस्ती व्हावी, झेब्रा क्रॉसिंग रंगवले जावेत, भुयारी मार्गांची दुरुस्ती व्हावी, भुयारी मार्गातील विद्युत व्यवस्था आणि सीसीटीव्ही यंत्रणा सुरु व्हावी, असे अनेक उद्देश या आयोजनामागे होते, असे महापौर मोहोळ यांनी सांगितले.

पाषाण-सुस रस्त्यावर ‘स्ट्रीट फॉर पीपल’

केंद्र शासनाच्या उपक्रमात भाग घेऊन पाषाण-सुस रस्त्यावर ‘स्ट्रीट फॉर पीपल’ ही संकल्पना निर्माण केली आहे. अभिनव आर्ट कॉलेज ते मुंबई-पुणे हायवे पर्यंत सुमारे ५०० मी लांबीचा रस्ता विकसित केला आहे. या रस्त्यावर वाहनासाठी तीन लेन, स्वतंत्र सायकल मार्ग, प्रशस्त पादचारी मार्ग आणि रस्त्याच्या कडेला ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था निर्माण केली असून व्यायामाची साधने, स्केट बोर्ड खेळणेची सुविधा, रोलर स्केटिंग खेळणेची सुविधा, लहान मुलांना अर्बन ९५ संकल्पनेवर आधारित खेळणेची साधने, फ्लोअर गेम उपलब्ध करून देणेत आली आहेत.

Pune Metro : Murlidhar Mohol : महापौरांनी स्पष्टच केले; व्यवहार्य पर्याय नसल्याने लकडी पुलावर मेट्रोचे काम सुरु करणार

Categories
Breaking News PMC पुणे महाराष्ट्र

व्यवहार्य पर्याय नसल्याने लकडी पुलावर मेट्रोचे काम सुरु करणार : महापौर मोहोळ

– सुचवलेल्या पर्यायाने खर्च ७० कोटींनी आणि कालावधी दोन वर्षांनी वाढणार

पुणे : छत्रपती संभाजी महाराज पुलावरील मेट्रोच्या कामासाठी गणेशोत्सव मंडळांनी आणि मेट्रोने सुचवलेले पर्याय व्यवहार्य नसल्याचा अहवाल मेट्रो तांत्रिक तज्ञांकडून प्राप्त झाला असून यापेक्षा अधिक काळ मेट्रोचे काम बंद ठेवणे शहराच्या विकासाच्या दृष्टीने उचित नाही. म्हणूनच मेट्रोचे काम पुन्हा सुरु असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

गणेश विसर्जन मिरवणुकीत छत्रपती संभाजी महाराज पुलाववरील मेट्रो मार्ग अडथळा ठरेल, असा आक्षेप काही गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी घेतला होता. त्यावर मेट्रोचे काम थांबवून महापौर मोहोळ यांनी गणेशोत्सव मंडळ कार्यकर्ते, मेट्रो अधिकारी आणि तज्ञांच्या तीन बैठका घेतल्या होत्या. शिवाय महापौर मोहोळ यांनी कार्यकर्त्यांकडून पर्यायही मागवला होता. या पर्यायांचा अभ्यास मेट्रोने अभ्यास केल्यानंतर मेट्रोने सुचविलेले दोन्ही पर्यायही व्यवहार्य नसल्याचा निष्कर्ष निघाला होता. त्या पार्श्वभूमीवर महापौर मोहोळ यांनी काम सुरु करण्यास सांगितले आहे.

याबाबत महापौर मोहोळ म्हणाले, ‘विकासाची कामे करत असताना संस्कृती जपणे, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहेच. मीही स्वतः आधी गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्त्या आणि नंतर लोकप्रतिनिधी आहे. पुण्याच्या गणेशोत्सवाने आजवर समाजभान जपत झालेले बदल स्वीकारले. काळानुरूप बदलत, परंपराही जपत पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाने जगाच्या नकाशावर छाप उमटवली. मेट्रोच्या अर्थात शहर विकासाच्या मुद्द्यावरही कार्यकर्ते साथ देत मेट्रोच्या कामाला साथ देऊन पुण्याच्या प्रगतीचे साक्षीदार होतील.’

गणेशोत्सव मंडळांनी दिलेल्या पर्यायात मेट्रो मार्ग खंडित करण्याचा पर्याय होता. मात्र देशभरातील कोणत्याही मेट्रोने असा पर्याय कुठेही अवलंबला गेला नाही. याबाबत मेट्रो मार्ग सलग ठेवण्याची मेट्रोची भूमिका होती. तर मेट्रोने सुचवलेल्या पहिल्या पर्यायानुसार पुलाच्या आजूबाजूचे ३९ पिलर पाडून नव्याने बांधावे लागणार होते. त्यासाठी ७० कोटी रुपयांचा खर्च आणि २४ महिन्यांचा अतिरिक्त कालावधी लागणार होता. दुसऱ्या पर्यायानुसार १७ पिलर पाडून नव्याने बांधणे हाही होता. त्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी आणि २३ कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च होणार होता. त्यामुळे व्यावहारिक विचार करता आणि कामाची सद्यस्थिती लक्षात घेता दोन्ही पर्याय योग्य नसल्याचे मेट्रोच्या तांत्रिक तज्ज्ञांचे म्हणणे होते. या सर्व बाबी लक्षात घेता, आहे त्या परिस्थितीत काम सुरु करण्याचा पर्याय अधिक योग्य वाटला’, असेही महापौर मोहोळ यांनी स्पष्ट केले.

Jayant Patil : Murlidhar Mohol : जलसंपदा मंत्र्यांनी भेट नाकारल्याने महापौर नाराज!

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

जलसंपदा मंत्र्यांनी भेट नाकारल्याने महापौर नाराज 

: पुणेकरांच्या दबावाने पाणी कपात रद्द : महापौर 

पुणे : पुण्याच्या पाणी प्रश्‍नावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची वेळ घेऊन पाच वाजता सिंचन भवन येथे गेलो, तासभर वाट पाहिली. त्यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन थेट पत्रकार परिषदेला गेले. त्यामुळे मी सिंचन भवन येथून निघून आलो. माझ्या वैयक्तीक कामासाठी नाही तर पुणेकरांचा प्रतिनिधी म्हणून त्यांना पूर्वकल्पना देऊन भेटण्यासाठी गेलो होते. तरीही भेट झाली नाही, ’’ अशा शब्दात महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान पुणेकरांच्या दबावामुळे भितीपोटी जलसंपदा मंत्र्यांनी पाणी कपात रद्द केली याचे आम्ही स्वागत करतो, असे मोहोळ म्हणाले. जयंत पाटील यांनी भाजपवर केलेल्या आरोपांमध्ये मला जायचे नाही, पण दोन दिवसांपूर्वी तुमच्या खात्याने आदेश काढून पोलिस बंदोबस्तात पाणी कपात करणार असल्याचे सांगितले. तरीही पाणी कपातीचा कोणताही प्रस्ताव नव्हता असे मंत्री सांगत आहेत. हे राजकारण सुज्ञ पुणेकर बघत आहेत. भामा आसखेडचे पाणी मिळाले म्हणून खडकवासल्याचे पाणी कपात केले जात आहे, यात देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करायचा काय संबंध. वड्याचे तेल वांग्यावर काढत असल्याची टीका मोहोळ यांनी केली. दरम्यान, पाटील यांनी ‘‘महापौर मला कशासाठी भेटणार आहेत हे माहिती नाही, पत्रकार परिषद संपल्यानंतर मी त्यांना भेटेल असा खुलासा केला. तर जयंत पाटील यांच्या खुलाशानंतर महापौरांनी या प्रकरणातून माघार घेतली. असा आरोप शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला. तर महापौर म्हणाले कि पाण्यात राजकारण आणू नये, ही आमची इच्छा आहे.

Jayant Patil : Prashant Jagtap : “खोट बोल पण रेटून बोल ” ही भाजपची प्रवृत्ती : प्रशांत जगताप

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

“खोट बोल पण रेटून बोल ” ही भाजपची प्रवृत्ती

: राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप

पुणे : जलसंपदा विभागाच्या एका कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याचा पत्राचा संदर्भ देत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पाण्याचे राजकारण करू पाहत आहेत. पुण्यात कुठलीही पाणी कपात करण्यात आलेली नाही. जलसंपदामंत्री  जयंतराव पाटील यांच्या खुलाश्यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या प्रकरणातून माघार घेत असल्याचे जाहीर केले. खर बघायला गेलं तर भारतीय जनता पार्टीच्या देश पातळीवरील नेत्यांपासून सर्वांचीच “खोट बोल पण रेटून बोल ” ही प्रवृत्ती असून पुणेकर या प्रवृत्तीला येत्या काळात निश्चितच धडा शिकवतील. असा टोला राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी लगावला आहे.

: पाणी कपात नाही : जयंत पाटील

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहरातील प्रतिनिधींसोबत जलसंपदा मंत्री .जयंत पाटील  यांनी सिंचन भवन येथे आज ४.०० वाजता बैठक आयोजित केली होती. या बैठकी दरम्यान राष्ट्रवादी  शिष्टमंडळाने  बाबतचे निवेदन जलसंपदा मंत्र्यांना दिले असता .पाटील  म्हणाले की, “अश्या प्रकारची कुठलीही पाणी कपात करण्यात आलेले नाही किंवा राज्य सरकार अश्या प्रकारच्या विचाराधीन नाही. गेल्या ५ वर्षात फडणवीस सरकारच्या काळात देखील तब्बल ११ वेळा अश्या प्रकारचे पत्र जलसंपदा विभागाकडून महानगरपालिकेला पाठवण्यात आली होती तसेच फडणवीस सरकारने एक महिना 180 mld क्षमतेचा एक पंप बंद ठेवत पुणेकरांवर पाणी कपात लादली होती. आम्ही मात्र कुठल्याही प्रकारच्या पाणी कपातीचा निर्णय घेतलेला नसून पुणे व पिंपरी चिंचवड या महानगरांच्या भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता भविष्यात रिसायकलिंगद्वारे तसेच पश्चिम घाटातील पाणी या महानगरांकडे वळवण्याच्या विचाराधीन आहोत.”

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या प्रकरणातून माघार घेतली : जगताप

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष .प्रशांत जगताप म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी गेल्या १७ वर्षाच्या पालकमंत्री पदाच्या काळात कधीही पाणी कमी पडू दिले नाही, परंतु केवळ अधिकारी स्तरावरील एका पत्राचा आधार घेत देवेंद्र फडणवीस पाण्याचे राजकारण करू पाहत आहे. या शहराच्या पाणी व्यवस्थापनात नेहमीच आदरणीयअजितदादांनी पुणे शहराचा नव्याने होणारा विस्तार विचारात घेत पाणी व्यवस्थापन करण्यात आले.एवढेच नाही तर या पाण्याव्यतिरिक्त भामा-आसखेड प्रकल्पातील २.५ TMC पाणी अजितदादांमुळे पुणे शहरास मिळाले. गेल्या ५ वर्षांच्या काळात पुणेकरांनी मोठ्या विश्वासाने भाजपच्या हातात महानगरपालिकेची सत्ता दिली मात्र देशात,राज्यात सत्ता असूनही फडणवीसांना पुणे शहरासाठी काहीही करता न आल्याने पाणी प्रश्नाआडून महापालिकेचे राजकारण फडणवीस करू पाहत आहेत.विशेष म्हणजे यात देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या एक दिवस अगोदर अश्या प्रकारचे पत्र बाहेर येणे हे सुद्धा संशयास्पद आहे.  जलसंपदामंत्री नामदार जयंतराव पाटील साहेबांच्या या खुलाश्यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या प्रकरणातून माघार घेत असल्याचे जाहीर केले. खर बघायला गेलं तर भारतीय जनता पार्टीच्या देश पातळीवरील नेत्यांपासून सर्वांचीच “खोट बोल पण रेटून बोल ” ही प्रवृत्ती असून पुणेकर या प्रवृत्तीला येत्या काळात निश्चितच धडा शिकवतील.
या शिष्टमंडळात आमदार चेतन तुपे,आमदार सुनील टिंगरे,विरोधीपक्षनेत्या दिपालीताई धुमाळ,  जयदेवराव गायकवाड,  रविंद्र माळवदकर, देशमुख आदी उपस्थित होते.

Irrigation : Water Cut for Pune : पोलीस बंदोबस्तात पाटबंधारे विभाग उद्या पुण्याचे पाणी करणार कमी! : महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केला निषेध

Categories
Breaking News PMC पुणे महाराष्ट्र

पोलीस बंदोबस्तात पाटबंधारे विभाग उद्या पुण्याचे पाणी करणार कमी!

: पुणेकरांवर पाणीसंकट

पुणे : पुणे शहरावर आगामी काळात पाणी संकट ओढवण्याची चिन्हे आहेत. कारण उद्यापासून पाटबंधारे विभाग पुण्याचे पाणी कमी करणार आहे. विशेष म्हणजे पोलीस बंदोबस्तात हे पाणी कमी केले जाणार आहे. वारंवार सांगूनही महापालिकेने पाणी वापर कमी केला नाही म्हणून हे पाऊल उचलले जात आहे. असे पाटबंधारे विभागाने म्हटले आहे. दरम्यान पाटबंधारे विभागाच्या या निर्णयाचा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी निषेध केला आहे.

: वारंवार सांगूनही पाणी कमी केले नाही : पाटबंधारे

पाटबंधारे विभागाच्या म्हणण्यानुसार पाणीवापर कमी करण्याचे निर्देश  उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री महोदय व अध्यक्ष का.स.स. तसेच मा.ना दत्तात्रय भरणे राज्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मद व जलसंधारण बने पदम सामान्य प्रशासन तथा (पालकमंत्री सोलापूर) यांना निर्देश दिलेले होते. तथापि अद्यापही पुणे मनपा खडकवासला धरणातील दैनंदिन पाणीवापर नियंत्रित / कमी केलेला नाही. ही बाब पुन्हा उन्हाळा हंगामाच्या नियोजनाबाबत दि. २६/०३/२०२१ रोजी झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निदर्शनास आल्याने पुणे महानगरपालिकेने भामा आसखेड प्रकल्पातील वापर सुरू केल्यामुळे खडकवासला धरणातील पाणीवापर नियंत्रित /कमी न केल्यास जलसंपदा विभागाने सदरील पाणीवापर कमी करावा असे.  उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री महोदय यांनी निर्देश दिलेले होते. पुणे महानगरपालिका खडकवासला धरणातून सध्या दैनंदिन सरासरी १४६० एमएलडी पाणीवापर करीत असून भामा आसखेड धरणातूनही १८० एमएलडी व २०० एमएलडी इतका दैनंदिन पाणीवापर करीत आहे. पुणे मनपाचा दैनंदिन पाणीवापर नियंत्रित / कमी करण्याबाबत मा. आयुक्त, पुणे मनपा यांनादेखील कळविण्यात आले होते. तसेच कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरलेल्या नियोजनानुसार शेतीला उन्हाळ्यात सिंचनासाठी पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याने धरणात मर्यादित पाणीसाठा उन्हाळा अखेरीस पिण्यासाठी उपलब्ध राहणार आहे व त्यामुळे पुणे शहरास जून जुलै २०२१ मध्ये पाणीटंचाई भासण्याची शक्यता असल्याचेही पुणे मनपास अवगत करण्याते आले होते तरीही मनपाने अद्यापही दैनंदिन पाणीवापर नियंत्रित/ कमी केलेला नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे २०२१-२०२२ च्या उन्हाळा हंगामामध्ये शेतीसाठी पाणीटंचाई होऊ शकले असे आपणास या विभागामार्फत वारंवार कळविलेले आहे. त्यामुळे, आपण अद्यापपर्यंत पुणे महानगरपालिकेचा दैनिक पाणीवापर
नियंत्रणात न आणल्यामुळे जलसंपदा विभागामार्फत शुक्रवार दि. ०३/१२/२०२१ पासून पाणीवापर नियंत्रणात आणण्यात येणार आहे. असे पाटबंधारे विभागाने म्हटले आहे.

पुण्याचं पाणी कमी करण्याचा डाव ! : महापौर

पुणेकरांना गरजेचं असणारं पाणी कमी करण्याचा डाव पाटबंधारे विभागाकडून सुरू आहे. उद्यापासून पुणे शहराचे पाणी कमी करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे, याचा समस्त पुणेकरांच्या वतीनं तीव्र निषेध! असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे.
पुणे शहरात नव्याने समाविष्ट झालेली २३ गावे आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता दैनंदिन १ हजार ४६० एमएलडी पाणी खडकवासलातून आणि ३८० एमएलडी पाणी भामाआसखेडमधून पुरवठा होतोय. परंतु उद्यापासून पोलीस बंदोबस्तात पाणी कमी करण्याचा प्रयत्न पाटबंधारे विभाग करत आहे.
पालकमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना माझी विनंती आहे, पुण्याचं पाणी कृपया कमी करु नका. पाणीगळती थांबवणे, पाणीबचत करणे, यासाठी आम्ही युद्धपातळीवर प्रयत्न करत आहोत. २४x७ समान पाणीपुरवठा योजनेचे काम अत्यंत वेगाने सुरु असून ते काम लवकरच पूर्ण करणार आहोत. आमचे अनेक प्रयत्न सुरु असतानाही पोलीस बंदोबस्तात पाणी कमी करण्याचा निर्णय चीड आणणारा आहे. शेतील पाणी देण्यास आम्हा पुणेकरांचा अजिबातही विरोध नाही. मात्र प्राधान्य नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याला असायला हवं, याचं थोडंही भान जलसंपदा विभागाला असू नये? जलसंपदाचा हा सुलतानी कारभार आणि दादागिरी पुणेकर कदापिही सहन करणार नाहीत. असे ही महापौर म्हणाले.