BJP Vs NCP | राष्ट्रवादीचा निषेध करण्यासाठी शहर भाजपच्या वतीने आंदोलन

Categories
Breaking News Political पुणे

शहरातील राष्ट्रवादीची गुंडगिरी संपवणार

भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक

पुणे शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते गुंडगिरी करीत असून, त्यांच्यावर पोलिसांचा आणि सरकारचा अंकुश राहिलेला नाही. शहराची संस्कृती बुडविण्याचे पाप करणार्या राष्ट्रवादीची गुंडगिरी संपवणार असल्याचा इशारा भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिला.

राष्ट्रवादीच्या गुंडगिरीचा निषेध करण्यासाठी शहर भाजपच्या वतीने आज अलका टॉकिज चौकात मुळीक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. प्रदेश चिटणीस धीरज घाटे, शहर सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दत्ता खाडे, दीपक नागपुरे, दीपक पोटे, संदीप लोणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुळीक म्हणाले, सोमवारी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात घुसून त्यांच्यावर हल्ला करण्याचा नियोजनबद्ध कट राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आखला होता. त्याप्रमाणे सेनापती बापट रस्त्यावरील चौकात आंदोलन करणारे हॉटेल मेरियेटच्या प्रवेशद्वारातून आत पोहोचले. त्यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या सुरक्षा रक्षकांच्या गाडीवर आक्रमण केले. बालगंधर्व रंगमंदिरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अंडी आणि शाईच्या बाटल्या घेऊन आले होते. या गुंडांवर कोणतेही गंभीर गुन्हे दाखल झालेले नाहीत. उलट भाजपच्या कार्यकर्त्यांवर विनयभंगासारखे गंभी गुन्हे दाखल करण्यात आले. हे गुन्हे तातडीने मागे घ्यावेत आणि राष्ट्रवादीच्या गुंडांवर कडक कारवाई करावी अशी मागणी आम्ही करीत आहोत.

मुळीक पुढे म्हणाले, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपच्या पदाधिकार्यांवर हल्ले करीत आहेत. नागरिकांना दमदाटी करीत आहेत. ठिकठिकाणी हप्ते वसुल करीत आहेत. त्यांच्या विरोधात जे आवाज उठवतील त्यांची पोलिसांच्या मदतीने गंभीर गुन्हे दाखल केले जात आहे. अशा गळचेपीला भाजपचे कार्यकर्ते घाबरत आहेत. शंभर गुन्हे दाखल झाले तरी आम्ही घाबरत नाही. गुंडगिरी विरोधातील आमचा लढा सुरूच राहील.

NCP activists show black flags | राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्मृती इराणींना दाखवले काळे झेंडे 

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्मृती इराणींना दाखवले काळे झेंडे

२०१४ साली अवघ्या ५ रुपयांनी गॅस सिलेंडरची किंमत वाढून ३६५ रुपये झाल्याने रस्त्यावर उतरून निदर्शने करणाऱ्या परंतु आज भाजप सरकारच्या काळात तब्बल १००२ रुपये गॅस सिलेंडर होऊन देखील चकार शब्द देखील न काढणाऱ्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने सेनापती बापट रोड येथे आंदोलन घेण्यात आले.

स्मृती इराणी आज एका पुस्तक प्रदर्शनासाठी पुणे शहरात आल्या असता पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या मार्गावर काळे झेंडे दाखवत , घोषणा देत स्मृती इराणी यांचा निषेध केला. याप्रसंगी ” महागाई ची राणी, स्मृती इराणी” , ” स्मृती भाभी जवाब दो” , ” बहुत हुई महागाई की मार,चले जाओ मोदी सरकार” या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.


याप्रसंगी बोलतांना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की,”देशातील प्रत्येक कुटुंब महागाईच्या झळा सोसत असताना केंद्रातील मोदी सरकार मात्र याची दखल घेत दिलासा देण्यास तयार नाही.अश्या परिस्थितीमध्ये ज्या अभिनेत्री स्मृती इराणी यांच्या महागाई विरोधी अभिनयावर विश्वास ठेवत ज्या सर्वसामान्य नागरिकांनी २०१४ मध्ये भाजपला मतदान केले त्या नागरिकांना स्मृती इराणी यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या परंतु गेल्या ७ वर्षात गॅस सिलेंडरची किंमत ३६५ वरून तब्बल १००२ वर गेल्याने नागरिकांचा मोदी सरकार वर रोष असल्याचे आजच्या आंदोलनात पाहायला मिळत आहे.२०१४ साली याच भाजपने तत्कालीन पंतप्रधानांना महागाई साठी दोषी ठरवत बांगड्या पाठवल्या होत्या आज मात्र तत्कलिन परिस्थिती पेक्षा कितीतरी जास्त महागाई झाल्याने आजच्या पंतप्रधानांना देखील तीच भेट देण्याची वेळ आली आहे.”

हे आंदोलन सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या १०० ते १५० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
या प्रसंगी शहराध्यक्ष  प्रशांत जगताप, जेष्ठ नेंते अंकुश काकडे, वैशाली नागवडे,प्रदीप देशमुख,बाळासाहेब बोडके,निलेश निकम, किशोर कांबळे,मृणालिनी वाणी,रुपाली पाटील,उदय महाले,गणेश नलावडे,विक्रम जाधव,मानली भिलारे,राजू साने, कार्तिक थोटे , अनिता पवार,वैशाली थोपटे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Agitation : PMC Employees : अंशदायी वैद्यकिय सहाय्य योजना मोडीत काढण्या विरोधात महापालिका कर्मचारी करणार निदर्शने  : 12 मे ला महापालिका भवनासमोर आंदोलन 

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

अंशदायी वैद्यकिय सहाय्य योजना मोडीत काढण्या विरोधात महापालिका कर्मचारी करणार निदर्शने

: 12 मे ला महापालिका भवनासमोर आंदोलन

पुणे : महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या अंशदायी वैद्यकीय सहाय योजना व शहरी गरीब  योजनेअंतर्गत वैद्यकीय सेवा सुविधा पुरविण्यात येत आहेत. या अंतर्गत महापालिका कर्मचारी आणि आजी माजी सभासद अर्थात आजी माजी नगरसेवकांना उपचारासाठी 90% रक्कम महापालिकेकडून उपलब्ध करून दिली जाते. मात्र नुकतेच आरोग्य प्रमुखांनी जारी केलेल्या सर्क्युलर मुळे कर्मचारी आणि आजी माजी सभासदांना 40 ते 60% रक्कम खिशातूनच भरावी लागणार आहे.  कारण सी. एच. एस. दरपत्रकात अंर्तभूत नसलेल्या बिलांचे पैसे मनपा देणार नाही, असे आदेश आरोग्य प्रमुखांनी रुग्णालयाला दिले आहेत. यामुळे महापालिका कर्मचारी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांच्या सर्वच संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. 12 मे ला तीव्र आंदोलन करण्याचे आवाहन संघटनांनी अधिकारी ते बिगारी तसेच सेवानिवृत्त सेवक अशा सर्वच महापालिका कर्मचाऱ्यांना केले आहे. यावर महापालिका प्रशासनाची भूमिका काय असेल, हे पाहणे महत्वाचे आहे.

: कर्मचारी संघटनांचे हे आहे कर्मचाऱ्यांना आवाहन

पुणे महापालिका कामगार युनियन, पीएमसी एम्प्लोइज युनियन, अभियंता संघ आणि पुणे मनपा निवृत्त सेवक संघ यांनी कर्मचाऱ्याना हे आवाहन केले आहे.
अधिकारी, कामगार व कर्मचारी व सेवानिवृत्त सेवक मित्रांनो, दि. ५ एप्रिल २०२२ रोजी आरोग्य अधिकारी पुणे मनपाने पुणे मनपा पॅनलवर असणाऱ्या सर्व रूग्णालयांना पुणे मनपाच्या सी.एच.एस. दर पत्रकात अंतर्भूत नसलेल्या (नॉट इनशेडयुल्ड) सर्व प्रोसिजर व तपासण्यांचे देयके अदा करता येणार नाहीत असे पत्र देऊन कळविले आहे. यामुळे मोठया प्रमाणात पैश्यांचा भुर्दंड आपल्या सर्वांना सोसावा लागत आहे.काहींनी तर यामुळे आपले उपचारही थांबविले आहे. प्रशासनाची ही कृती अत्यंत चुकिची, एकतर्फी व आपल्यावर अन्याय करणारी आहे. याबाबत ताबडतोबीने पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) व तीच्या सर्व सहयोगी संघटनांनी पत्र देऊन याबाबत विरोध दर्शविला आहे. तसेच अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) यांच्याबरोबर बैठक घेऊन पूर्वी प्रमाणे उपचाराची प्रतिपूर्ती करावी अशी मागणी केली आहे. याबाबत मा. आयुक्तांना सुद्धा पत्र पाठवून आपले म्हणणे कळविले आहे. प्रत्यक्ष भेटून चर्चा करण्यासाठीही वारंवार प्रयत्न केला परंतू त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे भेट होऊ शकली नाही. अर्थात चर्चेने प्रश्न सोडविण्याची आपली गेल्या ८० वर्षांपासूनची
आहे आणि प्रसंग पडला तरच आंदोलन केले आहे.
खरे तर सी.एच.एस. दर पत्रकात अंतर्भूत नसलेल्या (नॉट इन शेडयुल्ड) सर्व प्रोसिजर व तपासणीची देयकांची प्रतीपूर्ती नाकारण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही कारण वेळोवेळी वैद्यकिय सहाय्य योजना समिती बैठकित अशा देयकांना आपण कायमच मंजुरी देत आलेलो आहोत. त्याचबरोबर ही योजना प्रथम १९६७ साली सुरू झाली व नंतर १९९७ साली नियमांत सुधारणा करून सुधारित योजना लागू केली. त्यानंतर २०२२ सालापर्यंत मोठा काळ मध्ये गेला आहे. त्यामुळे नवनवीन उपचार व तपासणी पद्धती निर्माण झाल्या. त्यामुळे त्यात सुधारणा करणे हे अपेक्षित आहे आणि हे ग्राह्य धरूनच आता पर्यंत प्रतिपूर्ती केल्या आहेत. सूचीमध्ये यासर्व प्रसोजिर व तपासणीची नोंद करणे या सर्व तांत्रिक बाबी आहेत. त्याकरिता उपचारच थांबविणे हा मार्ग होऊ शकत नाही.
पुणे महानगरपालिकेला लागू असलेली अंशदायी योजना ही केंद्र सरकारच्या धर्तीवर आधारित आहे. केंद्र सरकारने ज्या उपचार व प्रोसिजरला मान्यता दिली आहे तेच आपण मान्य करून त्याचीच प्रतिपूर्ती आजपर्यंत करत आहोत. फक्त सूचित त्याचा उल्लेख करणे एवढी तांत्रिक बाब आहे. पण त्याची पूर्तता न करता उपचाराची प्रतिपूर्ती थांबवून कार्यरत तसेच
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची कोंडी करण्याचे काम प्रशासनाने केले आहे. हे फक्त आणि फक्त आपली आहे ती अंशदायी सहाय्य योजना मोडित काढून ही योजना मेडिक्लेम कंपन्याकडे सुपूर्त करण्यासाठी हे चालले आहे असा रास्त प्रश्न निर्माण झालेला आहे. खाजगी मेडिक्लेम कंपन्या या निव्वळ नफ्याच्या तत्वावर निर्माण झाल्या असून त्यांच्या व्यवहाराचा आपल्याला चांगलाच अनुभव आहे. त्यामुळे मेडिक्लेम कंपन्याच्या भूलभूलैय्याला आपण बळी पडता कामा नये व आपल्या अंशदायी योजनेचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी सिद्ध झाले पाहिजे.
प्रशासनाने सुद्धा मेडिक्लेम कंपनीच्याद्वारे वैद्यकिय योजना राबवून एका पैशाचीही बचत होणार नाही हे लक्षात घेतले पाहिजे. उलट कामगार, कर्मचाऱ्यांना मात्र नाहक पैशांचा भुर्दंड त्रास सहन करावा लागणार आहे. यात फक्त मेडिक्लेम कंपन्यांचा फायदा होणार आहे. आता वेळ आली आहे. पुणे शहराचे आरोग्य चांगले रहावे म्हणून स्वतःच्या आरोग्याची हानी करून घेणाऱ्या आणि प्रसंगी बलिदान देणाऱ्या (कोवीड महामारी मृत सेवक ) कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी अंशदायी योजनेचे रक्षण करण्याची
आणि त्यासाठी गुरुवार दि. १२ मे २०२२ रोजी वेळ सकाळी १०.३० वा. मनपा भवन येथे निदर्शन आयोजित केले आहे.
त्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा व अंशदायी वैद्यकिय सहाय्य योजना मोडीत काढण्याचा डाव हाणून पाडूया !

congress Agitation : सर्व सामान्य महिलांसाठी मोदी हे विकास पुरुष नसून विनाश पुरुष  :  अभय छाजेड

Categories
Breaking News Political पुणे

सर्व सामान्य महिलांसाठी मोदी हे विकास पुरुष नसून विनाश पुरुष  :  अभय छाजेड

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष  नानाभाऊ पटोले तसेच पुणे शहर अध्यक्ष  रमेश बागवे यांच्या सूचनेनुसार पंडित नेहरू स्टेडियम ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने आज दांडेकर पूल चौक येथे ‘ महागाई जुमला आंदोलन ‘ घेण्यात आले.

यावेळी बोलताना कमलताई व्यवहारे म्हणाल्या ” मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेच्या खिशावर डल्ला मारला आहे. महिलांच्या डोळ्यातून महागाईचे अश्रू वाहत असून महिलांसाठी मोदी हे महागाईचे प्रतीक झाले असून अनेक ठिकाणी महिला रस्त्यावर उतरून मोदी सरकारचा व भाजपा सरकारचा धिक्कार करीत आहेत.”

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अॅड. अभय छाजेड यावेळी म्हणाले ” केंद्रातील भाजपा प्रणित सरकारमधील सर्वेसर्वा असलेले नरेंद्र मोदी हे हुकूमशहा प्रमाणे काम करीत असून केवळ जुमलेबाजी करणारे प्रचार मंत्री म्हणून काम बघत आहेत. नोटबंदी सारख्या देशाला मागं येणाऱ्या घोषणेनंतर जीएसटी ची चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी तसेच निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये खोटी आश्वासने देणे , देशातील प्रमुख राज्यांमध्ये निवडणुका असताना संपूर्ण देशामध्ये पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ न करता निवडणुकीचा निकाल लागल्याबरोबर घरगुती गॅस दर पेट्रोल डिझेल खाद्यतेल सर्व जीवनावश्यक वस्तू मध्ये वाढ करणे अशा प्रकारे मोदी सरकारने सर्वसामान्यांना देशोधडीला लावले असून मोदी हे विकास पुरुष नसून सर्वसामान्यांसाठी व महिलांसाठी विनाश पुरुष झाले आहेत. सर्वसामान्यांच्या खिशाला झळ पोहोचणाऱ्या या केंद्रातील मोदी सरकारचा मी जाहीर निषेध करतो.”

सदर आंदोलनामध्ये पं. नेहरू ब्लॉक कांग्रेसचे अध्यक्ष सचिन आडेकर , द स पोळेकर , सौ अनिता अनिल धिमधिमे , रोहिणी मल्हाव , स्वाती शिंदे , पपीता सोनवणे सोनिया ओव्हाळ , किरण मात्रे , अविनाश खंडारे , अविनाश अडसूळ , राजाभाऊ नकाते , किरण सोमवंशी , विजय घोलप , अमित काळे , अजय खुडे, दिलीप लोळगे उपस्थित होते.

Shivapur toll plaza : पुणेकरांच्या टोल मुक्तीसाठी शहरातील सामाजिक संघटना एकवटल्या

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

महाराष्ट्र दिनी कात्रज चौकात टोलनाक्याविरूद्ध धरणे आंदोलन!

: पुणेकरांच्या टोल मुक्तीसाठी शहरातील सामाजिक संघटना एकवटल्या

पुणे :  पुणेकरांच्या टोल मुक्तीसाठी शहरातील सामाजिक संघटना एकवटल्या आहेत. महाराष्ट्र दिनी १ मे ला सकाळी 10.30 वा. कात्रज चौकात टोलनाक्याविरूद्ध धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

शिवापुर टोलनाक्या विरोधात आज पुण्यातील कात्रज येथे सरहद संस्थेच्या सभागृहात पुणे शहरातील सामाजिक संस्था व संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. पुणेकरांची बाजू कृती समितीने आंदोलनात वारंवार मांडली आहे. मात्र पुणेकरांचे लोकप्रतिनिधी प्रतिसाद देणार नसतील तर सामान्य जनतेसोबत हि लढाई लढावी लागेल. मात्र लोक प्रतिनिधींची टोलनाक्यांबाबतची अनास्था अकालनीय आहे. पुणे शहरातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी MH12 च्या टोल मुक्तीसाठी संघटित व्हा अन्यथा शिवापूर टोलनाक्याचे भूत पुणेकरांच्या मानगुटीवर कायमस्वरूपी बसेल!
यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी मराठा महासंघाच्या सर्व शाखा या आंदोलनात उतरतील असे जाहीर करत हे आंदोलन जन आंदोलन म्हणून उभे करू असे जाहीर केले. तसेच *ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट असोशिएशनचे बाबा मामा शिंदे यांनी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने १ मे रोजी कात्रज चौकात शिवापूर टोलनाक्या विरुद्ध पुणेकरांच्या वतीने धरणे आंदोलनाची हाक देत सर्व पक्षीय लोक प्रतिनिधी व कार्यकर्ते यांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. मराठा सेवा संघाचे शहर अध्यक्ष सचिन आडेकर यांनी सर्व आमदारांच्या दारात पुणेकरांच्या टोल मुक्तीसाठी भविष्यात घंटानाद आंदोलन करण्यात येईल त्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ,असा इशारा बैठकीत दिला.

केवळ २० किलोमीटर साठी पुणेकरांना ८० किलोमीटरचा टोल भरावा लागत आहे. महामार्गाचे काम अपूर्ण असतानाही तब्बल १० वर्षे पुणेकरांकडून बेकायदा टोल वसूल केला गेला तरीही पुण्यातील लोकप्रतिनिधी थंड कसे? काहीतरी गौड बंगाल आहे असा आरोप कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत केला आहे. १ मे च्या आंदोलनात सह्यांची मोहित राबवण्यात येणार असून MH12 साठी टोल मुक्तीची आग्रही मागणी करण्यात येणार असल्याची माहिती कृती समितीकडून देण्यात आलेली आहे.तसेच पुणेकर कोल्हापूरच्या धर्तीवर हे जन आंदोलन उभे करतील असा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.

यावेळी ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट असोशिएशनचे बाबा मामा शिंदे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, पुणे डॉक्टर असोशिएशनचे डॉ. राहुल सूर्यवंशी, मराठा सेवक समितीचे प्रमोद आरसूळ, मराठा सेवा संघाचे शहर अध्यक्ष सचिन आडेकर, राष्ट्रशक्ती संघटनेचे सचिव शहाजी आरसूळ , राष्ट्रीय मानव अधिकार संघाचे नितीन दसवडकर, भारती विद्यापीठ वकील असोशिएशनचे अजय कपिले, स्वागत फौंडेशनचे योगेश मोरेडी, शिव शंभू प्रतिष्ठानचे नितीन जांभळे, माय पीपल माय कंट्री फाउंडेशनचे बाळकृष्ण भोसले, नागरी कृती समितीचे पद्माकर खडके, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ खोपडे, वंदे मातरम संघटनेचे मयूर मसुरकर, सामाजिक कार्यकर्ते शंकर कडू, मलिक सय्यद, राजेंद्र फरांदे, दशरथ गोळे, भोर कृती समितीचे समन्वयक डॉ. संजय जगताप, शुभम यादव, कुणाल शेटे आदी विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीचे संयोजन सचिन कोळी यांनी केले.

Agitation of NCP Pune : राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचे अनोखे आंदोलन : दरवाढीविरोधात  मुंडन करत नोंदवला  निषेध

Categories
Political पुणे

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी दरवाढीविरोधात  मुंडन करत नोंदवला  निषेध

पुणे : केंद्र सरकारच्या अख्यारीत असणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये दररोज वाढ होत असून, ही वाढ थांबावी या हेतूने पर्वती विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सातारा रोड येथे निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात गॅस सिलेंडरची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. तर काही कार्यकर्त्यांनी यावेळी मुंडन करत आपला निषेध नोंदवला.

“दैनंदिन जीवन जगत असताना घरगुती गॅस, पेट्रोल, डिझेल या आपल्या जीवनावश्यक वस्तू आहेत. या वस्तूंचे दर वाढत राहिले तर एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाचे महिन्याचे बजेट कोलमडते. गेल्या काही महिन्यात निवडणुका असल्यामुळे थांबवलेले ही दरवाढ आता अचानकपणे पुन्हा सुरू करण्यात आली आहे. म्हणजे केवळ निवडणुकीपुरते लोकांची फसवणूक करायची निवडणूक संपली ,की पुन्हा लोकांच्या खिशावर दरोडा टाकायचा हेच केंद्र सरकारचे धोरण आहे. सर्वसामान्य नागरिकांवर ही भाववाढ लादत असताना केवळ देशातल्या काही बड्या उद्योगपतींना याचा फायदा होत असून, भारतीय जनता पार्टीला आपले हितसंबंधी उद्योगपती यांची जपणूक करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळेच केवळ सर्वसामान्य जनतेवर ती महागाई लादयची आणि उद्योगपतींची संपत्ती वाढवणे हाच भाजपचा गेल्या ७ वर्षातील अजेंडा राहिला आहे. परंतु जर देशातील जनतेची ही लूट थांबली नाही तर भविष्यात तुमच्या आमच्यासारखे मध्यमवर्गीय मारले जाणार असून हा देश पुन्हा मोठ्या आर्थिक संकटात येईल त्यामुळेच केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने देशातील जी जनतेची लूट चालवली आहे, ही लूट थांबवावी, यासाठी आजचे आंदोलन असून सर्वसामान्य नागरिकांनी यातून धडा शिकावा व पुन्हा भारतीय जनता पार्टीला गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत कुठेही सत्तेत बसवु नये” , असे आवाहन शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले.

या आंदोलन प्रसंगी  पर्वती विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष  संतोष नागरे, महिला शहराध्यक्ष .मृणालिनीताई वाणी ,प्रवक्ते  प्रदीप देशमुख, विपुल म्हैसुरकर,श्वेता कामठे होनराव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

PM Modi Pune Tour : ६ मार्चला राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे “मोदी गो बॅक आंदोलन” 

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे

६ मार्चला राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे “मोदी गो बॅक आंदोलन”

: पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निषेध आंदोलन

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस “मोदी गो बॅक आंदोलन” ६ मार्चला संपूर्ण पुणे शहरात करणार आहे. या महाराष्ट्रद्रोही भाजप सरकारने दुटप्पीपणाने आजतागायत आपल्या भूमीला आणि जनतेला कमी लेखले आहे. अशा पंतप्रधान मोदींच्या निषेधार्थ सर्वांनी काळे कपडे घालून, फ्लेक्स, बॅनर लावत मोदी गो बॅक निषेध आंदोलन छेडले जाणार आहे. अशी माहिती पक्षाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली. क्स, बॅनर लावत मोदी गो बॅक निषेध आंदोलन छेडले जाणार आहे.

मागील काही दिवसांपासून सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा तसेच त्यांच्या स्वराज्य भूमी असणाऱ्या महाराष्ट्राचा वारंवार अपमान केला जात आहे. अगदी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कोरोना काळाचा संदर्भ देत स्वराज्य भूमी महाराष्ट्राचा अपमान केला.त्याच नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे महानगरपालिकेमधील शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा घाट पुणे भाजपाच्या सत्ताधाऱ्यांनी घातला आहे.

याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे “मोदी गो बॅक आंदोलन” ६ मार्चला संपूर्ण पुणे शहरात करणार आहे. या महाराष्ट्रद्रोही भाजप सरकारने दुटप्पीपणाने आजतागायत आपल्या भूमीला आणि जनतेला कमी लेखले आहे. अशा पंतप्रधान मोदींच्या निषेधार्थ सर्वांनी काळे कपडे घालून, फ्लेक्स, बॅनर लावत मोदी गो बॅक निषेध आंदोलन छेडले जाणार आहे.

Pune Congress : पंतप्रधान संसदेत खोटे बोलले आणि आपल्या अपयशाचे खापर त्यांनी महाराष्ट्र काँग्रेसवर फोडले : रमेश बागवे  

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र

पंतप्रधान संसदेत खोटे बोलले आणि आपल्या अपयशाचे खापर त्यांनी महाराष्ट्र काँग्रेसवर फोडले : रमेश बागवे

 

पुणे :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत असे सांगितले की, महाराष्ट्र काँग्रेसमुळे देशात कोरोना पसरला. पंतप्रधानांच्या या वक्तव्‍याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यव्‍यापी आंदोलनाची घोषणा केली. त्यानुसार आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिका जवळील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयासमोर निदर्शने -आंदोलन करण्यात आले.

पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात घोषणा दिल्या. ‘‘महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या पंतप्रधान मोदींचा धिक्कार असो’, ‘माफी मागों माफी मागों, मोदीजी माफी मागों’ अशा प्रकारचे फलक घेवून कार्यकर्ते निदर्शनाच्या ठिकाणी जमले होते.

      यावेळी बोलताना शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘१२ फेब्रुवारी २०२० साली राहुल गांधी यांनी मोदी सरकारला कोरोना संसर्गाबाबत, योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे असे सांगितली होते. परंतु तात्कालीन केंद्रिय आरोग्य मंत्री यांनी त्या विषयाचे गांभीर्य समजून न घेता राहुल गांधीची खिल्ली उडविली होती. पतंप्रधान मोदी यांनी चीनवरून येणाऱ्या विमानावर बंदी घातली नाही. ते नमस्ते ट्रम म्हणत अमेरीकेचे तात्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पाहुणचार मग्न होते. परिणामी देशात कोरोना मोठ्या प्रमाणावर पसरला. २४ मार्च २०२० रोजी कोठलेही पूर्वनियोजन न करता पंतप्रधांनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली. पंतप्रधानांच्या या निर्णयामुळे गोरगरीब, कष्टकरी, मजूर व छोट्या व्‍यावसियिकांचे हाल झाले.‌ भितीपोटी गोरगरीब कष्टकरी मजूर आपल्या गावाकडे हजारो किलोमीटर चालत गेले. यात त्यांना वाटेत अन्न व पाणी न मिळाल्यामुळे मृत्युमुखी पडले. मोदी सरकारने कोरोना संसर्ग हाताळण्यात हलगर्जीपणा दाखविला. कोरोनावर मात करण्यासाठी उपयोजना न ठरवता मोदींनी देशातल्या जनतेला थाळी वाजवा, टाळी वाजवा, घराची लाईट बंद करून आपल्या घराबाहेर दिवे पेटवण्यास भाग पाडले. आपले अपयश झाकण्यासाठी ते महाराष्ट्र काँग्रेसवर आपले खापर फोडत आहे. पंतप्रधान संसदेत खोट बोलले आणि त्यांनी जाणून बुजून महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केला आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या व देशाच्या जनतेची माफी मागावी अन्याता जनता त्यांना सत्तेतून पायउतार केल्याशिवाय राहणार नाही.’’

      माजी आमदार मोहन जोशी म्हणाले की, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सत्तेत आल्यापासून प्रत्येकवेळी कोणत्या न कोणत्या कारणावरून महाराष्ट्राचा अपमान करीत आहे. संसदेत कोरोना विषयी ते खोटे बोलून देशातील जनतेची दिशाभूल करीत आहेत.   महाराष्ट्रात भाजपाची सरकार आली नाही म्हणून आकसापोटी महाराष्ट्राचा अपमान करीत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी त्यांनी सुरूवातीच्या काळात कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही त्यामुळे लाखो देशवासियांच्या जीव गेला. गंगेत बहुसंख्य प्रेत फेकून देण्यात आले होते. अनेकांचे संसार उध्वस्त होऊन मुले अनाथ झाले. राहुल गांधींनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील संसदेत आपली भूमिका मांडली. त्यांनी सरकार अनेक धोरणावर कसे अपयशी ठरले याचा पर्दाफाश केला. परंतु पंतप्रधान मोदी राष्ट्रपतींच्या भाषणावर न बोलता निवडणुकीचे भाषण करत होते. भारताच्या संसदेत आजपर्यंत अशा पध्दतीने कोणतेही पंतप्रधान बोलले नाही. महाराष्ट्र काँग्रेसने यु.पी. आणि बिहारच्या लोकांना रेल्वेने आपल्या गावाला पाठविले त्यामुळे कोरोना पसरला असे खोटे आरोप पंतप्रधानांनी केले. रेल्वे तर केंद्र सरकारच्या अखत्यारित आहे. मग महाराष्ट्र काँग्रेसने कसा काय कोरोना पसरविला याचे उत्तर द्यावे.’’

      यानंतर नगरसेवक अरविंद शिंदे यांचेही भाषण झाले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ॲड. अभय छाजेड, बाळासाहेब शिवरकर, संजय बालगुड, कमल व्‍यवहारे, दिप्ती चवधरी, गटनेते, आबा बागुल, वीरेंद्र किराड, नीता रजपूत, शानी नौशाद, अविनाश बागवे, लता राजगुरू, वैशाली मराठे, सुजाता शेट्टी, अरूण वाघमारे, कैलास गायकवाड, शखेर कपोते, मुख्तार शेख, राजेंद्र शिरसाट, सुरेखा खंडागळे, प्रविण करपे, सचिन आडेकर, सतीश पवार, रमेश सोनकांबळे, प्रदिप परदेशी, सुनिल घाडगे, अजित जाधव, विनय ढेरे, नुरूद्दीन सोमजी, विजय वारभुवन, दिपक ओव्‍हाळ, राहुल वंजारी, जयकुमार ठोंबरे, परवेज तांबोळी, सादिक कुरेशी, नितीन परतानी, राजू नाणेकर, गणेश शेडगे, भगवान कडू, राजेंद्र पेशने, वाल्मिक जगताप, राहुल तायडे, सुजित यादव, यासीन शेख, दयानंद अडागळे, रोहित अवचिते, दत्ता जाधव, हेमंत राजभोज, शाबिर खान, चेतन अगरवाल, रवि पाटोळे, भारत पवार, कान्होजी जेधे, अभिजीत रोकडे, डॉ. अनुप बेगी, रवि आरडे, बबलू कोळी व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Pune Congress :  प्रभात फेरी व कोपरा सभा घेत महागाईच्या  विरोधात कॉंग्रेस जनजागरण करणार : शहर अध्यक्ष रमेश बागवे

Categories
PMC Political पुणे महाराष्ट्र

 प्रभात फेरी व कोपरा सभा घेत महागाईच्या  विरोधात कॉंग्रेस जनजागरण करणार

शहर अध्यक्ष रमेश बागवे यांची महिती

पुणे : केंद्रातील भाजप सरकारने केलेल्या महागाईच्या विरोधात अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या वतीने दि. १४ ते दि. २९ नोव्हेंबर २०२१ पर्यंत देशात ”जनजागरण अभियान” आयोजित केले आहे. नेहरू स्टेडियम येथील पं. जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुणे शहर जिल्हा  कॉंग्रेस कमिटीच्या वतीने लोकमान्य टिळक पुतळा, मंडई पर्यंत प्रभात फेरी काढण्यात आली. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाक गॅस भाववाढीमुळे त्रस्त झालेल्या जनतेचे छायाचित्रांचे फलक घेवून, मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देत कॉंग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या प्रभात फेरीमध्ये सहभागी झाले. यावेळी शहर अध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितले कि पुढच्या १५ दिवसात पुणे शहराच्या विविध वॉर्डात प्रभात फेरी व कोपरा सभा घेवून या महागाईच्या विरोधात जनतेमध्ये जनजागरण करणार आहोत.

१४ ते  २९ नोव्हेंबर २०२१ पर्यंत जनजागरण अभियान राबविण्याचे आदेश

यावेळी बोलताना शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ”आज भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांची १३२ वी जयंती आहे. देश सुजलाम सुफलाम करण्यासाठी त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले. भाक्रा नांगल धरण प्रकल्प, हिंदुस्थान एरोनॉटिक्स, आय.आय.टी., आय.आय.एम., एम्स, हिंदुस्थान अँटी बॉटिक्स, भाभा अटोमिक संशोधन केंद्र, एन.डी.ए. सारख्या संस्थेची स्थापना केली.

     देशाच्या स्वातंत्र्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी देशाची प्रगती केली त्यामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणतात. आज भारतीय जनता पक्षाच्या राजवटीत सामान्य जनतेचे जगणे कठिण झाले आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. कॉंग्रेसच्या राजवटीत स्थापन केलेले सरकारी संस्थांचे भाजप सरकार खाजगीकरण करीत आहे, या खाजगी करणाच्या नावाखाली अनेकांची नोकरी संपुष्टात आली आहे. देशात बेरोजगारी वाढत आहे. कॉंग्रेस पक्षाने आंदोलनामार्फत या भाववाढीकडे आणि इतर ज्वलंत प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न केले, परंतु सरकार कानाडोळा करीत आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा श्रीमती. सोनियाजी गांधी यांनी महागार्इच्या विरोधात जनजागरण करण्यासाठी दि. १४ ते दि. २९ नोव्हेंबर २०२१ पर्यंत जनजागरण अभियान राबविण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार आज पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने पं. जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करून प्रभात फेरी काढली. पुढच्या १५ दिवसात पुणे शहराच्या विविध वॉर्डात प्रभात फेरी व कोपरा सभा घेवून या महागार्इच्या विरोधात जनतेमध्ये जनजागरण करणार आहोत.

जनतेच्या हिताकरीता आज कॉंग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून जनजागरण करीत आहे. केंद्रातील भारतीय जनता पक्षाने त्वरीत जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी करावे अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलनाचा मार्ग स्विकारावा लागेल.”

यानंतर महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी, माजी महापौर कमल व्यवहारे यांचीही भाषणे झाली.

 यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अड. अभय छाजेड, माजी आमदार दिप्ती चवधरी, दत्ता बहिरट, वीरेंद्र किराड, अमीर शेख, लता राजगुरू, मनीष आनंद, पुजा आनंद, नीता रजपूत, सोनाली मारणे, प्रकाश पवार, विशाल मलके, भूषण रानभरे, संगिता तिवारी, राजेंद्र शिरसाट, द. स. पोळेकर, सचिन आडेकर, प्रवीण करपे, राजेंद्र भुतडा, सतिश पवार, रमेश सोनकांबळे, रमेश सकट, शिलार रतनगिरी, अमित बागुल, बाळासाहेब अमराळे, प्रशांत सुरसे, किशोर वाघेला, नितीन परतानी, जावेद निलगर, सादिक लुकडे, अनुसया गायकवाड, तार्इ कसबे, मिरा शिंदे, अॅड. राजश्री अडसूळ, ज्योती परदेशी, कल्पना उनवणे, राधिका मखामले, रजिया बल्लारी, संगिता क्षिरसागर, अविनाश अडसूळ, क्लेमेंट लाजरस, राकेश नामेकर, सुरेश कांबळे, भरत सुराणा, बबलू कोळी, गणेश शेडगे, दिलीप लोळगे, अक्षय माने आदींसह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू आणि आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंती निमित्त पुणे शहर जिल्या कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे व माजी आमदार दिप्ती चवधरी यांनी कॉंग्रेस भवन येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अपर्ण करून अभिवादन केले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.