Tag: Deepali Dhumal
वारजे परिसरामध्ये कायम योग वर्गाचे उद्घाटन
| जागतिक योग दिन
| दिपाली धुमाळ आणि बाबा धुमाळ मित्र परिवारचा उपक्रम
योग विद्नान संस्थान दिल्ली, शाखा पुणे व वारजे हायवे परिसर विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने वारजे येथील राजमाता जिजाऊ योग साधना केंद्र मध्ये जागतिक योग दिनाचे औचित्य साधून कायमस्वरूपी योग वर्गाचे शुभारंभ करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन मा. विरोधी पक्ष नेत्या दिपाली प्रदीप धुमाळ व मा नगरसेवक बाबा धुमाळ व मित्र परिवार यांनी केले.
याप्रसंगी योग विद्नान संस्थान दिल्ली पुणे शाखेचे प्रमुख शिवप्रकाश मानधनी; दत्तात्रय रेड्डी, राजाभाऊ अभ्यंकर, दिलीप सोमवंशी, उदय हर्डीकर, श्रीधर डुरेपाटील,सौ सुलेखा मानधनी व मीनाताई गावडे यांनी योगा संदर्भात मानवाच्या दैनदिन जीवनामध्ये किती महत्वाचे स्थान आहे, याचे महत्व पटवून दिले. योगा मधील प्रत्येक आसने किती महत्वाचे आहे व या आसना मुळे काय काय फायदे होतात व कोणते रोग अथवा शरीराला अपायकारक असणाऱ्या ज्या गोष्टी कशा दुर करायचे यावर शास्त्रोक्त पध्दतीने योग साधकांना योगाद्वारे व प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून पटवून दिले.
आजच्या या वर्गाच्या शुभारंभ प्रसंगी जवळपास दोनशे योग साधकांनी सहभाग घेऊन प्रत्यक्ष योग साधना केली. सदर योग वर्ग रोज सकाळी साडे सहा ते आठ यावेळेत कायमस्वरूपी सुरू राहिल. या योग वर्गात जास्तीतजास्त योग साधकांनी व नागरिकांनी सहभागी होऊन आपले शरीर तंदुरुस्त व निरोगी , आनंदी राहण्यासाठी रोज योगा करावे असे आवाहन सौ दिपाली धुमाळ यांनी केले. सदर योग वर्ग यशस्वी होण्यासाठी श्री महादेव गायकवाड सर व सौ मानसी नलावडे व वारजे हायवे परिसर विकास प्रतिष्ठान च्या सर्व पदाधिकारी यांनी प्रयत्न केले. अशी माहिती प्रदीप ऊर्फ बाबा धुमाळ यानी दिली.
हे योगावर्ग विनामूल्य आहे. या वर्गामध्ये योगसाधना चे वर्ग घेणारे है प्रशिक्षक है शास्त्रोक्त पध्दतीने उच्च शिक्षित व अनुभवी आहेत. या वर्गातून अनेक योगशिक्शक घडविण्याचे उद्दीष्ट आहै. असेही धुमाळ म्हणाले.
केतकी चितळे सारख्या समाजातील वाईट प्रवृत्तींचा बीमोड करणे आवश्यक
: दिपाली धुमाळ यांची मागणी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पवार यांच्यासारख्या महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्याबद्दल आक्षेपार्ह शब्दात पोस्ट करणारी केतकी चितळे म्हणजे समाजातील वाईट प्रवृत्ती असून तिचा वेळीच बीमोड करणे आवश्यक आहे. अभिनय क्षेत्रात काम मिळत नाही म्हणून स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात आणण्यासाठी चितळे ने केलेला हा प्रयत्न म्हणजे तिला मिळालेल्या संस्काराचे दर्शन आहे. अशा विकृत मनोवृत्ती असणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांनी कडक कारवाई करावी. अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्या दिपाली धुमाळ यांनी केली आहे.
केतकी चितळे, वकील नितीन भावे आणि निखील भामरे यांची पोस्ट समाजात तेढ निर्माण करणारी व असंतोष पसरवणारी आहे. त्यांचा बोलविता धनी कोण आहे याचा शोध पोलिसांनी घ्यावा. संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाची छेडछाड करून महाराष्ट्र घडवण्यासाठी अविरत झटणाऱ्या पवार साहेब यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करून महाराष्ट्राच्या संस्कृतिला परंपरेला छेद देण्याचा प्रयत्न अशा समाज कंटकांकडून सुरू असून त्यांना वेळीच त्यांची जागा दाखवावी लागणार आहे.
कलाकारांनी आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांचे मनोरंजन करायचे असते पण या स्वतःला अभिनेत्री म्हणवणाऱ्या केतकी चितळे मध्ये वेगळेच कलागुण असून ते समाजाला घातक असल्याने तिच्यावर पोलिसांनी योग्य कारवाई करून बंदोबस्त करावा. असे धुमाळ म्हणाल्या.
महापालिका कर्मचाऱ्यांना त्रासदायक ठरणारे परिपत्रक तत्काळ मागे घ्या
: माजी विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांची मागणी
पुणे : अंशदायी सहाय्य योजना अंतर्गत मनपा सेवक व शहरी गरीब योजनेअंतर्गत गोरगरिबांना वैद्यकीय सेवा सुविधा पुरविण्यात येत आहेत. प्रशासनाने नव्याने सी. एच. एस. दरपत्रकात अंर्तभूत नसलेल्या बिलांचे पैसे मनपा देणार नाही, असे पत्र पॅनल वरील हॉस्पिटल ला दिले असून यामुळे सेवानिवृत्त व सेवेतील कर्मचारी हवालदिल झाले आहेत. मनपा अधिकारी व कर्मचारी यांना त्रास देणाऱ्या असे सर्व निर्णय व परिपत्रक तातडीने मागे घेण्यात यावे, अशी मागणी महापालिकेच्या माजी विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांनी महपालिका आयुक्तांकडे केली आहे.
धुमाळ यांच्या निवेदनानुसार महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या अंशदायी वैद्यकीय सहाय योजना मोडीत काढण्या संदर्भात मनपा अधिकारी व कर्मचारी आंदोलन, निदर्शने करण्याच्या भूमिकेत असून यास आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. भाजपच्या कार्यकाळात पुणे मनपाने अंशदायी सहाय्य योजना व शहरी गरीब योजना बंद करण्यासाठी प्रयत्न केले होते. याचाच भाग म्हणून सल्लागार नेमण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आणली गेली होती, परंतु वेळोवेळी आम्ही विरोधी पक्षात असताना यास कडाडून विरोध केला होता. त्यावेळी अपयशी ठरलेले मनसुबे आता प्रशासक राज्यात पूर्ण करण्याचा डाव चालू असून त्याचाच हा भाग असून मनपा अधिकारी व कर्मचारी यांच्या व शहरातील गोरगरीब नागरिकांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कायम पाठीशी राहणार आहे.
अंशदायी सहाय्य योजना अंतर्गत मनपा सेवक व शहरी गरीब योजनेअंतर्गत गोरगरिबांना वैद्यकीय सेवा सुविधा पुरविण्यात येत आहेत. शहरी गरीब योजना ही 2009 पासून सुरू झाली असून मनपा सेवकांची योजना अनेक वर्षांपासून सुरू आहे प्रशासनाने नव्याने सी. एच. एस. दरपत्रकात अंर्तभूत नसलेल्या बिलांचे पैसे मनपा देणार नाही, असे पत्र पॅनल वरील हॉस्पिटल ला दिले असून यामुळे सेवानिवृत्त व सेवेतील कर्मचारी हवालदिल झाले आहेत.यामुळे पुणे महापालिका कामगार युनियन, पीएमसी एम्प्लोइज युनियन, अभियंता संघ आणि पुणे मनपा निवृत्त सेवक संघ हे आंदोलनाच्या भूमिकेत असून यास आमचा पाठिंबा आहे मनपा सेवकांच्या व सेवानिवृत्त सेवकांच्या वेतनातून अंशदायी सहाय्य योजने साठी रक्कम कापली जाते असे असताना त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाल्यावर आवश्यकता असणारे सर्व उपचार, सर्जरी तपासण्या याचा अंतर्भाव हा या योजनेमध्ये असणे क्रमप्राप्तच असते. असे असतानाही निव्वळ तत्सम मान्यता तसेच कागदोपत्री अडचणी न सोडविता विविध कारणे दाखवून हजारो अधिकारी व कर्मचारी यांना हॉस्पिटलला एक साधे पत्र पाठवून वेठीस धरणे कितपत योग्य आहे, याचाही विचार प्रशासनाने करावा.
आता पुन्हा नव्याने पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका होणार असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य सर्वाधिक निवडून येतील याचा मला विश्वास असून राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर पुणे महानगरपालिकेत बसल्यानंतर गोरगरिबांना त्रास देणारे व मनपा अधिकारी व कर्मचारी यांना त्रास देणाऱ्या असे सर्व निर्णय व परिपत्रक तातडीने मागे घेण्यात येतील. असे शब्द या वेळी मी देते. प्रत्येक क्षेत्रात खाजगी कंपन्यांना नफा कमवून देणे व खाजगी कंपन्यांकडून सर्व कामे करून घेणे ही भूमिका योग्य नसून वर्षानुवर्ष पुणे महानगरपालिकेमध्ये चालू असलेली अंशदायी सहाय्य योजना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात सुरू झालेली शहरी गरीब योजना या अत्यंत प्रभावीपणे राबवाव्यात अशी मागणी मी यानिमित्ताने करते. असे धुमाळ यांनी म्हटले आहे.
शहराच्या चारही दिशांना शहरी गरीब योजनेचे कार्ड मिळण्याची सुविधा उपलब्ध करा
: माजी विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांची मागणी
पुणे : आर्थिक वर्ष चालू झाल्यानंतर शहरातील अनेक नागरिकांनी शहरी गरीब योजनेचे कार्ड काढण्यासाठी महानगरपालिकेकडे धाव घेतली. महानगरपालिकेच्या नवीन इमारतीच्या तळमजल्यावर शहरी गरीब योजनेचे कार्यालय असून या ठिकाणी नागरिकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. या योजनेचे कार्ड काढण्यासाठी लांब रांग होऊन कार्ड काढण्यास वेळ जात असल्याने नागरिकांची चिडचिड होऊन त्यामधून वादाचे प्रसंग देखील घडत आहेत. त्यामुळे शहराच्या चारही दिशांना शहरी गरीब योजनेचे कार्ड मिळण्याची सुविधा उपलब्ध करा, अशी मागणी महापालिकेच्या माजी विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.
धुमाळ यांच्या पत्रानुसार महानगरपालिकेची सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचलेली आणि यशस्वी ठरलेली एकमेव योजना म्हणजे शहरी गरीब योजना. सर्वसामान्य, गोरगरीब नागरिक व दारिद्रयरेषेखालील नागरिक यांना या योजनेचा अनेक वर्षांपासून लाभ मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकाळामध्ये ही योजना चालू झाली व गेले अनेक वर्षे अत्यंत प्रभावीपणे पुणे शहरात ही योजना चालू आहे. यामुळेच एक एप्रिलला आर्थिक वर्ष चालू झाल्यानंतर शहरातील अनेक नागरिकांनी शहरी गरीब योजनेचे कार्ड काढण्यासाठी महानगरपालिकेकडे धाव घेतली. महानगरपालिकेच्या नवीन इमारतीच्या तळमजल्यावर शहरी गरीब योजनेचे कार्यालय असून या ठिकाणी नागरिकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. या योजनेचे कार्ड काढण्यासाठी लांब रांग होऊन कार्ड काढण्यास वेळ जात असल्याने नागरिकांची चिडचिड होऊन त्यामधून वादाचे प्रसंग देखील घडत आहेत.
महाराष्ट्रातील सर्वात मोठे क्षेत्रफळ असलेली पुणे महानगरपालिका आहे.
खडकवासला,कोंढवे-धावडे, उत्तमनगर, शिवने, नऱ्हे-आंबेगाव, नादोशी,नांदेड, किरकीट वाडी, वाघोली, शिवणे, फुरसुंगी, उरुळी देवाची, लोहगाव कात्रज इत्यादी महापालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या नवीन गावांमधून व शहराच्या वेगवेगळ्या भागातून नागरिक शहरी गरीब योजनेचे कार्ड काढण्यासाठी येत असतात. महानगरपालिकेच्या सेवा सुविधा व योजना नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी महानगरपालिकेचे त्या त्या परिसरामध्ये क्षेत्रीय कार्यालय मिळकत कर भरणा केंद्र अशा प्रकारचे विविध कार्यालये आहेत. अशा शहराच्या चारही बाजूस असलेल्या कार्यालयांमध्ये शहरी गरीब योजनेचे कार्ड मिळण्याची सुविधा उपलब्ध केल्यास त्याच परिसरात नागरिकांना सदर योजनेचे कार्ड मिळेल. तसेच ही योजना सुटसुटीतपणे व अधिक सक्षमपणे राबविली जावी, अशी मागणी धुमाळ यांनी केली आहे.
विद्यार्थ्यांना तत्काळ शिष्यवृत्ती उपलब्ध करून द्या
: माजी विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांची मागणी
पुणे: महापालिकेतर्फे इयत्ता १०वी,१२वीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीची २० कोटी रुपयांची तरतूद संपल्याने २ हजार ७७७ विद्यार्थ्यांना अद्याप शिष्यवृत्ती मिळालेली नाही. यासाठी ६ कोटी रुपयांची गरज असल्याने हा निधी उपलब्ध करून घेण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आणखी काही दिवस विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची वाट पहावी लागणार आहे. विद्यार्थ्यांना फार वेळ वाट पाहायला न लावता तत्काळ ही शिष्यवृत्ती उपलब्ध करून द्यावी. अशी मागणी महापालिकेच्या माजी विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.
धुमाळ यांनी महापालिका आयुक्त यांना दिलेल्या पत्रानुसार महापालिका हद्दीत राहणाऱ्या इयत्ता दहावीमधील विद्यार्थ्यांना भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अर्थसाहाय्य योजनेतंर्गत शिष्यवृत्ती दिली जाते. यासाठी दहावी व बारावीमध्ये खुल्या गटातील विद्यार्थ्यांनी ८० टक्केपेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहेत आणि महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी, मागासवर्गीय विद्यार्थी आणि ४० टक्के अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना ६५ टक्केपेक्षा जास्त गुण मिळाले तर १०वीच्या विद्यार्थ्यांना १५ हजार आणि १२वीसाठी २५ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.
२०२०-२१ साठी महापालिकेकडे इयत्ता १०वीचे ७ हजार ८७८ आणि इयत्ता १२वीचे ८ हजार ९६ असे १५ हजार ९७४ विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते. पडताळणीनंतर १३ हजार ३१ अर्ज पात्र ठरले आहेत. तर २ हजार ९४३ जणांचे अर्ज अपात्र ठरले.
धुमाळ यांनी पुढे सांगितले कि, पात्र विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची रक्कम ३१ मार्च पूर्वी थेट बँक खात्यात जमा केली जाणार होती. १०वीच्या ५ हजार ५५३ जणांच्या बँक खात्यात ८ कोटी ३२ लाख ९५ हजार रुपये तर १२वी च्या ४ हजार ७०१ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात ११ कोटी ७५ लाख २५ हजार रुपये जमा केले.
इयत्ता १०वीच्या ७९८ तर इयत्ता १२वीच्या १ हजार ९७९ विद्यार्थ्यांना अद्याप शिष्यवृत्ती मिळालेली नाही. महापालिकेकडून या विद्यार्थ्यांना तुमचा शिष्यवृत्तीचा अर्ज मंजूर झाला आहे, शिष्यवृत्ती जमा केली जाईल असे मेसेज मोबाईलवर गेले आहेत. पण एप्रिल महिना संपत आला तरी पैसे जमा न झाल्याने पालक, विद्यार्थ्यांकडून याची चौकशी सुरू आहे. २०२०-२१ च्या अंदाजपत्रकातील शिष्यवृत्तीची २० कोटीची तरतूद संपली आहे. उर्वरित २ हजार ७७७ जणांच्या शिष्यवृत्तीसाठी ६ कोटी १४ लाख ४५ हजार रुपयांची गरज आहे. विद्यार्थ्यांना फार वेळ वाट पाहायला न लावता तत्काळ ही शिष्यवृत्ती उपलब्ध करून द्यावी. अशी मागणी महापालिकेच्या माजी विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.
संत तुकाराम महाराज संगीत विद्यालय नियमित सुरू करा
: शिक्षण समिती समोर प्रस्ताव
: राष्ट्रवादी नगरसेवकांचा प्रस्ताव
पुणे महापालिकेत स्व. डॉ. विश्राम रामजी घोले यांच्या तैलचित्राचे अनावरण
: विरोधी पक्ष नेत्या दीपाली धुमाळ यांची संकल्पना
या प्रसंगी तटकरे म्हणाले, महापुरुषांच्या बाबत वारंवार चुकीची वक्तव्ये केली जात आहेत. हेच जर सतत होणार असेल तर महापुरुषांच्या बाबत आता वेगळी कार्यप्रणाली तयार करण्याची आवश्यकता आहे.
महापालिकेच्या शाळांमध्ये आता व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा
: राजीव गांधी ई लर्निंग स्कूल व शामराव श्रीपत बराटे शाळा यामधून होणार सुरुवात
: महिला बाल कल्याण समितीची मान्यता
याबाबतचा प्रस्ताव विरोधी पक्ष नेत्या दीपाली धुमाळ (Deepali Dhumal) आणि काँग्रेस गटनेते आबा बागूल (Aba Bagul) यांनी महिला बाल कल्याण समिती समोर दिला होता. त्यानुसार पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये प्रामुख्याने गोरगरीब व दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील विदयार्थी शिक्षण घेतात. अशा कुटुंबातील विदयार्थ्यांना इतर खाजगी शाळांप्रमाणे सेवा सुविधा व शिक्षणाचा दर्जा देण्याबाबत प्रामाणिक प्रयत्न महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून नेहमीच केला जातो. विदयार्थ्यांच्या दृष्टीने त्यांच्या भविष्यातील यशस्वी कारकीर्दीसाठी शालांत / माध्यमिक म्हणजेच इयत्ता १० वीच्या परीक्षेच्या टप्पा महत्वाचा असतो, किंबहुना यशस्वी कारकीर्द घडण्यासाठी महत्वाचा मानला जातो. इयत्ता ७ वी ते १० वी या शैक्षणिक टप्प्यात विदयार्थ्यांच्या शारिरिक वाढीसोबत मानसिक व वैचारिक धारणांमध्ये दिर्घ परिणाम करणारे बदल होत असतात. खाजगी शाळांमध्ये जाणारे बहुतांशी विदयार्थी हे समाजाच्या मध्यम / उच्च मध्यम वर्गाचे प्रतिनिधीत्व करतात. अशा विदयार्थ्यांना खाजगी शाळांमधून तसेच त्यांच्या कुटुंबामधून अथवा विविध उपलब्ध साधनांद्वारे व्यक्तिमत्व विकासाचे मार्गदर्शन उपलब्ध होते. पुणे मनपाच्या विविध शाळांमधील इयत्ता ७ वी ते १० वी या इयत्तांमधील विदयार्थ्यांना त्यांचे व्यक्तिमत्व विकासासाठी शिक्षणेतर उपक्रम महापालिकेच्या माध्यमातून राबविणे हे अतिशय हितावह व दूरगामी सामाजिक परिणाम करणारे ठरेल. गेली अदमासे २ वर्षे कोविड प्रादुर्भावामुळे विदयार्थ्यांचे शालेय शिक्षण प्रत्यक्ष तासिकांद्वारे होवू शकलेले नाही. याचा थेट परिणाम मुलांच्या मानसिक आरोग्यावर देखील झालेला आहे हे नाकारता येणार नाही. सबब पुणे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये कौशल्य प्रशिक्षण अंतर्गत विदयार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा सुरू करावी. याची सुरूवात प्रायोगिक तत्वावर राजीव गांधी ई लर्निंग स्कूल व शामराव श्रीपत बराटे शाळा, दिगंबरवाडी येथून करण्यात यावी. या प्रस्तावाला समितीने मान्यता दिली आहे.
लाल महालातील स्वच्छतागृहांची दुरुस्ती व स्वच्छता रखडली!
: विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी वेधले लक्ष
: महापालिका आयुक्तांना दिले पत्र
धुमाळ यांच्या पत्रानुसार कसबा पेठेत राजमाता जिजाऊ लाल महाल आहे. सदर लाल महाल मध्ये राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांचे ऐतिहासिक स्मारक असल्याने त्या लाल महालाला ऐतिहासिक ओळख आहे. त्यामुळे रोज अनेक हजारो शिवप्रेमी नागरिक या लाल महालामध्ये दर्शनासाठी येत असतात. तसेच शनिवार दिनांक. १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असल्यामुळे सदर ठिकाणी अनेक कार्यक्रम होणार आहे. लाल महाल सद्यस्थितीत अस्तिवातात असलेले स्वच्छतागृहांची अवस्था खुपच बिकट व अनेक अडचणी आहेत. पाण्याचे नळ तुटलेले आहे, फरशीचे टाईल्स तुटलेले आहे व दैनदिन स्वच्छता ठेवण्याची गरज आहे. १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असल्यामुळे हजारोच्या संख्येने नागरिक येणार आहेत. त्यामुळे लाल महालातील स्वच्छतागृहांची दुरुस्ती व परिसराची स्वच्छता करणे अत्यंत आवश्यक आहे.
तरी लाल महाल येथील स्वच्छतागृहांची दुरुस्ती व परिसराची स्वच्छता तातडीने करण्यात यावी. तसेच काही जागी आवश्यक असल्यास रंगरंगोटी करण्यात यावी. तसेच लाल महाल येथील देखभाल दुरुस्ती व स्वच्छता करण्यासाठी कामय कामगरांची नियुक्ती तातडीने करण्यात यावी.