Khadakwasla Water Discharge | खडकवासलातून पाण्याचा विसर्ग केला बंद | पावसाचा जोर ओसरला 

Categories
Breaking News पुणे

खडकवासलातून पाण्याचा विसर्ग केला बंद | पावसाचा जोर ओसरला

| चार धरणात 18.89 TMC पाणी जमा

खडकवासला धरण साखळीतील पावसाचा जोर ओसरल्याने खडकवासला धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग आज सकाळी सहा वाजता पूर्ण बंद केला आहे. खडकवासला धरण सध्या १०० टक्के भरले आहे. परंतु या धरणात मागील चार- पाच दिवसात मोठा पाऊस झालेला नाही. पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी झाला आहे. परिणामी ओढ्याचे पाणी कमी झाल्याने धरणातील येवा बंद झाल्याने धरणातील विसर्ग पूर्णपणे बंद केला आहे.

धरणातील विसर्ग एक हजार ७१२ क्यूसेक होता. तो आज पहाटे पाच वाजता ८५६ क्यूसेक केला. सहा वाजता पूर्ण बंद केला. खडकवासला धरण मागील मंगळवारी सकाळी(१२ जुलै रोजी) शंभर टक्के भरले होते. त्यानंतर त्यातून धरणातून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला होता. आज सकाळी सहा वाजता बंद केला या दरम्यान धरणातून ३.३४टीएमसी पाणी मुठा नदीत सोडले. पुढे हे पाणी उजनी धरणात जमा होते.

खडकवासला धरण साखळीत मिळून एकूण पाणीसाठा १८.८९ टीएमसी झाला आहे. पानशेत आणि वरसगाव धरणांनंतर टेमघर धरणही निम्मे भरले आहे. खडकवासला धरणाच्या परिसरात सहा मिलिमीटर, पानशेत धरण क्षेत्रात ३२ मिलिमीटर, वरसगाव ३७ आणि टेमघर धरण क्षेत्रात २०मिलिमीटर पाऊस पडला आहे.

Water Storage | पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली | चार धरणामध्ये 50% हून अधिक पाणीसाठा 

Categories
Breaking News PMC social पुणे

चार धरणामध्ये 50% हून अधिक पाणीसाठा

| पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली

पुणे : खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील वरसगाव आणि पानशेत ही दोन मोठी धरणे शुक्रवारी ५० टक्क्यांपेक्षा जास्त भरली. त्यामुळे पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. सध्या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे एकूण पाणीसाठा ५५ टक्क्यांवर पोहोचला आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीत सुरू असलेला ४७०८ क्युसेकचा विसर्ग शुक्रवारी कायम ठेवण्यात आला.

खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणात सध्या १५.९४ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच ५४.६९ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या २४ तासांत चारही धरणांमध्ये १.२६ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत चारही धरणांमधील पाणीसाठा १४.६८ टीएमसी होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्या धरणांमध्ये तब्बल ६.५८ टीएमसीने पाणीसाठा जास्त आहे. खडकवासला धरणातून गुरुवारी सकाळी सहा वाजल्यापासून ४७०८ क्युसेकने मुठा नदीत पाणी सोडण्यात येत असून शुक्रवारी दिवसभर हा विसर्ग कायम ठेवण्यात आल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

Rain Water | Dams | चार धरणातील पाणी साठ पोहोचला ३.६७ टीएमसी वर  | धरण क्षेत्रात जोरदार पाऊस 

Categories
Breaking News social पुणे

चार धरणातील पाणीसाठा  पोहोचला ३.६७ टीएमसी वर

| धरण क्षेत्रात जोरदार पाऊस

पुणे : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत गेल्या तीन दिवसापासून  जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडवासाला या चारही धरणाचा एकूण पाणीसाठा ३.६७ टीएमसी  झाला आहे. मागील वर्षी याच दिवशी हा साठा ८.६७ टीएमसी इतका होता.

हा पाणी साठा २ जुलै रोजी २.५१ टीएमसी पर्यंत खाली आला होता. मात्र, गेल्या तीन ते चार दिवसापासून या चारही धरणात पावसाला सुरुवात झाली होती. तर सोमवारी रात्री नंतर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने रात्रीत शहराचे ८ दिवसांचे पाणी वाढले आहे.

 

सोमवारी सायंकाळी हा पाणीसाठा २.७६ टीएमसी होता तो मंगळवारी सकाळी ०.२० ने वाढून २.९६ झाला असल्याची पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. तर बुधवारी सकाळी हा पाणी साठा ३.६७ टीएमसी झाला हे. या चारही धरणात अद्यापही पासून सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात ओढे, नाले तसेच आसपासच्या परिसरातून पाणी येत असल्याने हा साठा आणखी वाढेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार, खडकवासला १९ मिमी, पानशेत ६८  मिमी, वरसगाव ७०  मिमी तर टेमघर धरणात ६५  मिमी पावसाची नोंद गेल्या २४ तासात झाली आहे.

Rain | Dams | धरण क्षेत्रातील जोरदार पावसाने पाणीसाठ्यात वाढ 

Categories
Breaking News पुणे

धरण क्षेत्रातील जोरदार पावसाने पाणीसाठ्यात वाढ

 

पुणे : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत गेल्या दोन दिवसापासून  जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडवासाला या चारही धरणाचा एकूण पाणीसाठा २.९६ झाला आहे.

हा पाणी साठा २ जुलै रोजी २.५१ टीएमसी पर्यंत खाली आला होता. मात्र, गेल्या दोन ते दिवसापासून या चारही धरणात पावसाला सुरुवात झाली होती. तर सोमवारी रात्री नंतर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने रात्रीत शहराचे चार दिवसांचे पाणी वाढले आहे.

 

सोमवारी सायंकाळी हा पाणीसाठा २.७६ टीएमसी होता तो मंगळवारी सकाळी ०.२० ने वाढून २.९६ झाला असल्याची पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. तर या चारही धरणात अद्यापही पासून सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात ओढे, नाले तसेच आसपासच्या परिसरातून पाणी येत असल्याने हा साठा आणखी वाढेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार, खडकवासला १९ मिमी, पानशेत ५० मिमी, वरसगाव ५३ मिमी तर टेमघर धरणात सर्वाधिक ६६ मिमी पावसाची नोंद गेल्या २४ तासात झाली आहे.

Water Crisis in pune | पुणेकरांवर पाणीसंकट | चालू आठवड्यापासूनच एक दिवसाआड पाणी! 

Categories
Breaking News PMC social पुणे

पुणेकरांवर पाणीसंकट | चालू आठवड्यापासूनच एक दिवसाआड पाणी!

| महापालिका लवकरच निर्णय जाहीर करणार

पुणे | पावसाने ओढ दिल्याने पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणामध्ये खूपच कमी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातच पावसाची कुठलीच चिन्हे दिसेनात. त्यामुळे पुणेकरांवर पाणीसंकट ओढवले आहे. त्यामुळे आता पुणेकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. पुणेकरांना आता एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. याचे नियोजन देखील महापालिका प्रशासनाने तयार केले आहे. या आठवड्यापासूनच म्हणजे गुरुवार – शुक्रवार पासूनच एक दिवसाआड पाणी देण्याबाबत अमल करण्यात येणार आहे. अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.
पुणे शहराला खडकवासला धरण साखळीच्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. याशिवाय भामा आसखेड आणि पवना धरणातून देखील पाणी घेतले जाते. शहर आणि समाविष्ट गावांना या धरणातून पाणी दिले जाते. शहराला महिन्याला 1.50 टीएमसी पेक्षा अधिक पाण्याची आवश्यकता आहे. मात्र शहर आणि धरण क्षेत्रात पावसाचा अभाव आहे. जून महिना संपत आला तरीही पाणीसाठा वाढलेला नाही. आहे तो पाणीसाठा नाममात्र आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार जुलै महिन्यात देखील अपुरा पाऊस असणार आहे. त्यामुळे आता पुणेकरांवर पाणीसंकट ओढवले आहे. यामुळेच महापालिका प्रशासन पाणीकपात करण्याचा निर्णय घेत आहे.
याबाबत महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीत आज बैठक होणार होती. मात्र ती होऊ शकली नाही. मात्र आयुक्तांच्या निर्देशानुसार पाणीपुरवठा विभागाने एक दिवसाआड पाणी देण्याबाबत नियोजन सुरु केले आहे. शहरात पाणीपुरवठा विभागाचे तीन झोन आहेत. यामध्ये पर्वती, एसएनडीटी आणि लष्कर  विभागाचा समावेश आहे. या अंतर्गत येणाऱ्या परिसरात कशा प्रकारे एक दिवसाआड पाणी देण्यात येईल याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. कारण काही परिसरात एक दिवसाआड पाणी देण्यात तांत्रिक अडचणी आहेत. तिथे पाणी कमी कसे देता येईल. याचेही नियोजन सुरु आहे.
प्रशासनाच्या या नियोजनावर या आठवड्यातच अंमल करण्यात येणार आहे. लवकरच महापालिकेकडून याची घोषणा केली जाईल.

Canal Advisory Committee : यंदा उन्हाळ्यात पाणी कपात नाही  : पुणे शहराला मिळणार मुबलक पाणी 

Categories
Breaking News PMC पुणे

यंदा उन्हाळ्यात पाणी कपात नाही

: पुणे शहराला मिळणार मुबलक पाणी

पुणे : शहरामध्ये उन्हाळ्यात पाणीपुरवठ्यात(Water supply) कोणतीही कपात करण्यात येणार नाही. शिवाय, जिल्ह्यातील सिंचनासाठी दोन उन्हाळी आवर्तने देण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच, खडकवासला प्रकल्पात सध्या उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिल्या. उन्हाळी पिकांसाठी आवर्तन आणि शहरातील पाण्यासंदर्भात कालवा सल्लागार समितीची बैठक शनिवारी पार पडली.

राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार राहूल कूल, अशोक पवार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक विलास राजपूत, मुख्य अभियंता हनुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता संजीव चोपडे, कार्यकारी अभियंता विजय पाटील आदी या वेळी उपस्थित होते. खडकवासला प्रकल्पामधून इंदापूर, दौंड, बारामती आणि हवेली तालुक्यातील सिंचनासोबत काही गावांना पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्यात येतो. सध्या रब्बी हंगामासाठी आवर्तन सुरू आहे. परंतु उन्हाळी हंगामासाठी प्रकल्पामधील पाणीसाठ्याच्या उपलब्धतेनुसार नियोजन करण्यात येते. त्यानुसार यंदाच्या उन्हाळ्यात सिंचनासाठी दोन आवर्तने सोडण्यात येणार असून, त्यासाठी जलसंपदा विभागाने योग्य नियोजन करावे, अशा सूचना पवार यांनी दिल्या.भामा आसखेड धरणामधून जेवढे पाणी घेतले जात आहे, तेवढे पाणी खडकवासला प्रकल्पामधून कमी करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. मात्र, समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत कामे प्रगतीपथावर आहेत. कामे होतील त्यानुसार खडकवासलामधून पाणी कमी करू, असे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.

 

तर, यंदा धरणात पाणी कमी असल्यामुळे महापालिकेने पाणी काटकसरीने वापरावे, असा मुद्या जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत मांडला. आळंदीला दोनशे दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) पाणी देण्याबाबत चर्चा झाली. मात्र, महापालिकेने स्वतंत्रपणे हे पाणी द्यावे, असा नियम नाही. त्यांच्यासाठी स्वतंत्र पाणीकोटा मंजूर करावा, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले.

खडकवासला प्रकल्पातून शेतीला आवर्तने देताना शहराची पाण्याची गरज पूर्ण व्हावी, ही आमची भूमिका होती. त्यावर बैठकीत शिक्कामोर्तब झाले, याचे समाधान आहे. शहरात नवीन समाविष्ट २३ गावे आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता पुरेसे पाणी मिळणे आवश्यकच होते. पाणीगळती रोखण्यासाठी आम्ही युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहोत. शिवाय २४ बाय ७ समान पाणीपुरवठा योजनेचे काम वेगाने सुरु असून, लवकरच पूर्ण करणार आहोत.

         – मुरलीधर मोहोळ, महापौर