Pune Traffic Update | ट्रॅफिक प्रश्नासाठी ‘वेकअप पुणेकर’ कडून पाठपुरावा चालू | वाहतूक उपायुक्तांशी चर्चा

Categories
Breaking News Political social पुणे

Pune Traffic Update | ट्रॅफिक प्रश्नासाठी ‘वेकअप पुणेकर’ कडून
पाठपुरावा चालू | वाहतूक उपायुक्तांशी चर्चा

-संयोजक, माजी आमदार मोहन जोशी

 

Pune Traffic Update | पुणे – विविध चौकांमध्ये होणाऱ्या ट्रॅफिक जॅम च्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी ‘वेकअप पुणेकर’ मार्फत पाठपुरावा चालू आहे.

याबाबत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्याशी चर्चा करण्यात आली. अशी माहिती ‘वेकअप पुणेकर’ चे संयोजक, माजी आमदार मोहन जोशी यांनी  दिली.

कोरेगाव पार्क येथील साधू वासवानी पुलाच्या पाडकामाआधी करण्यात आलेल्या प्रायोगिक वाहतूक बदलामुळे निर्माण झालेल्या समस्या नागरिकांनी ‘वेकअप पुणेकर’ च्या निदर्शनास आणून दिल्या. मंगलदास रोड वाहतुकीसाठी एकेरी न ठेवता पूर्वीसारखीच दुतर्फा वाहतूक चालू ठेवावी, मोबोज हॉटेल चौकातील बॅरिकेड्स ताबडतोब काढण्यात यावेत, त्या चौकातील रसत्यांवर तीन ते चार ट्रॅफिक वॉर्डन दिवसभरासाठी तैनात व्हावेत, अशा उपाययोजना नागरिकांनी ‘वेकअप पुणेकर’ला सुचविल्या होत्या. पोलीस उपायुक्तांकडे त्या सूचनांचे निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली, असे मोहन जोशी यांनी सांगितले.

दहावी, बारावी आणि इतर वार्षिक परीक्षेनंतर पुलाचे पाडकाम करावे, अशीही सूचना नागरिकांकडून आली होती, ती ही उपायुक्तांकडे दिल्याचे मोहन जोशी यांनी सांगितले.

ट्रॅफिक समस्येवर नागरिका़ंकडून ‘वेकअप पुणेकर’ मार्फत उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी स्वयंसेवी संघटना, जागरूक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, तज्ज्ञ यांना ‘वेकअप पुणेकर’ने एकत्रित आणले आहे. ट्रॅफिक प्रश्नातून पुणेकरांची लवकरात लवकर सुटका व्हावी, असा प्रयत्न असल्याचे मोहन जोशी यांनी सांगितले.

वाहतूक उपायुक्तांसमवेत झालेल्या बैठकीत धैर्यशील वंदेकर, वीरेंद्र किराड, प्रथमेश आबनावे, प्रशांत सुरसे, संकेत गलांडे, किशोर मारणे, प्रा.यशराज पारखी, सचिन भोसले, पल्लवी सुरसे, विश्वजीत जाधव आणि अधिकारी वर्ग सहभागी झाला होता.

 Wakeup Punekar movement  Known problems at Swargate Chowk  |  Convenor Mohan Joshi

Categories
Breaking News Political social पुणे

 Wakeup Punekar movement  Known problems at Swargate Chowk  |  Convenor Mohan Joshi

 

 Wake Up Punekar Movement |  Pune – The organizer mohan joshi informed that this movement started with the intention of solving the civil problems of the city should be done by the citizens of Pune.  Mohan Joshi (Mohan Joshi Pune Congress) gave this information today (Thursday).
 Under this movement, the subject of traffic has been taken as a priority and the campaign ‘Adaklai Punekar’ has been started from 5th.  The campaign has been started in a manner such as meetings of representatives of voluntary organizations, suggestions, guidance of volunteers to know the reactions of Pune residents, going to people and starting work.  Questionnaires are being filled all over the city so that the people of Pune can suggest solutions and problems related to traffic.  Punekars are giving their feedback by scanning the QR code of the questionnaire of ‘Wakeup Punekar’ in various squares.  Mohan Joshi informed that since the campaign started, majority of Punekars have given feedback about traffic improvement.
 A discussion was held with Assistant Commissioner Khade of the Traffic Branch of Police and the engineers of Smart City to find an immediate solution to the traffic problems at Swargate Chowk.  Also, Mohan Joshi has informed that the problems of the citizens were known through Facebook Live at Swargate Chowk.
 Datta Bahirat, Prathamesh Abnave, Suresh Kamble, Ayub Pathan, Prashant Surse, Shabir Khan Kanhoji Jedhe, Prathamesh Labhde, Avinash Adsul, Ashish Vayve, Sahil Bhinge, Sagar Kamble, Gorakh Palaskar, Baba Syed, Sachin in the ‘Adaklai Punekar’ campaign at Swargate Chowk.  Bahirat, Ravi Patole, Tilesh Mota, Aniket Sonwane, Naresh Dhotre, Swati Shinde, Shobha Paneerkar, Manisha Gaikwad, Jayashree Park, Anita Makhwani, Rekha Jain Sunita Nemur, Jyoti Adhagale, Vanita Subkade, Sonu Sheikh, Kumar Shinde, Ashok Gaikwad, Jayakumar  Thombre Patil, Deepak Oval, Ashok Netke, Ramvilas Maheshwari, Pushkar Abnave, Bharat Surna etc. participated.

Wake Up Punekar Movement | वेकअप पुणेकर चळवळ | स्वारगेट चौकात जाणून घेतल्या समस्या

Categories
Breaking News Political social पुणे

Wake Up Punekar Movement | वेकअप पुणेकर चळवळ | स्वारगेट चौकात जाणून घेतल्या समस्या

| संयोजक मोहन जोशी

 

Wake Up Punekar Movement | पुणे – शहरातील नागरी प्रश्नांची सोडवणूक पुणेकरांमार्फतच व्हावी, या हेतूने सुरू केलेल्या या चळवळीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती संयोजक मा. आ. मोहन जोशी (Mohan Joshi Pune Congress)  यांनी आज (गुरुवारी) दिली.

या चळवळी अंतर्गत ट्रॅफिक हा विषय प्राधान्याने घेतला असून दि.५ पासून ‘अडकलाय पुणेकर’ या मोहीमेला प्रारंभ करण्यात आला. स्वयंसेवी संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठका, सूचना, पुणेकरांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी स्वयंसेवकांना मार्गदर्शन, लोकांमध्ये जावून काम सुरू करणे अशा पद्धतीने मोहीम सुरू करण्यात आली आहे. ट्रॅफिक बाबतच्या समस्या आणि उपाययोजना पुणेकरांनीच सुचवाव्यात यासाठी शहरभर प्रश्नावली भरून घेण्यात येत आहेत. विविध चौकांमध्ये ‘वेकअप पुणेकर’ च्या प्रश्नावलीचा क्यूआर कोड स्कॅन करून पुणेकर अभिप्राय देत आहेत. मोहीम सुरू झाल्यापासून बहुसंख्य पुणेकरांनी ट्रॅफिक सुधारण्याविषयी अभिप्राय दिलेले आहेत, अशी माहिती मोहन जोशी यांनी दिली.

the karbhari - wake up punekar movement
विविध चौकांमध्ये ‘वेकअप पुणेकर’ च्या प्रश्नावलीचा क्यूआर कोड स्कॅन करून पुणेकर अभिप्राय देत आहेत.

पोलीसांच्या वाहतूक शाखेचे सहाय्यक आयुक्त खाडे तसेच स्मार्ट सिटी चे इंजिनिअर्स यांच्या समवेत स्वारगेट चौकातल्या वाहतूक समस्यांबद्दल तात्काळ मार्ग काढण्यासाठी चर्चा करण्यात आली. तसेच स्वारगेट चौकात फेसबुक लाइव्ह करून नागरिकांकडून समस्या जाणून घेण्यात आल्या, अशी माहिती मोहन जोशी यांनी दिली आहे.

स्वारगेट चौकातील ‘अडकलाय पुणेकर’ या मोहीमेत दत्ता बहिरट, प्रथमेश आबनावे, सुरेश कांबळे, आयुब पठाण, प्रशांत सुरसे, शाबीर खान कान्होजी जेधे, प्रथमेश लभडे, अविनाश अडसूळ, आशिष व्यवहारे, साहिल भिंगे, सागर कांबळे, गोरख पळसकर, बाबा सय्यद, सचिन बहिरट, रवी पाटोळे, तिलेश मोटा, अनिकेत सोनवणे, नरेश धोत्रे, स्वाती शिंदे, शोभा पनीरकर, मनीषा गायकवाड, जयश्री पारक, अनिता मखवाणी, रेखा जैन सुनिता नेमूर, ज्योती आढागळे, वनिता सुबकडे, सोनू शेख, कुमार शिंदे, अशोक गायकवाड, जयकुमार ठोंबरे पाटील, दिपक ओव्हाळ, अशोक नेटके, रामविलास माहेश्वरी, पुष्कर आबनावे, भरत सुरना आदी सहभागी होते.

  ‘Wakeup Punekar’ public movement to solve the problems of Punekar | ‘Stuck Punekar’ campaign to break the traffic jam

Categories
Breaking News Political social पुणे

  ‘Wakeup Punekar’ public movement to solve the problems of Punekar | ‘Stuck Punekar’ campaign to break the traffic jam

 |  Former MLA Mohan Joshi’s information in a press conference

 Wakeup Punekar |  Adaklay Punekar  Pune: We are starting the people’s movement ‘#Wakeup Punekar’ from Monday, February 5 to take answers from the Pune people themselves and present them to the concerned department to solve the civil problems that Pune people face in their daily life.  (Mohan Joshi Pune Congress) said in a press conference today (Sunday).  He explained that he will implement the campaign ‘#Adaklai Punekar’ to break the traffic congestion in Pune.  Praveen Kumar Biradar, Prathamesh Abnave, Rohan Suravse Patil, Milind Gawandi etc were present on this occasion.  (Pune News)
 Mohan Joshi said, “Pune has expanded in the last ten years, the population has increased along with the problems of traffic, water supply, health, sanitation, air pollution.  What should be the solutions to these questions?  Answers should be taken from the people of Pune, it will create awareness among the people of Pune, once the level of public opinion is formed, it will be easier to solve the problem precisely.  We are raising a people’s movement ‘#WakeupPunekar’ with such a purpose.  It will be attended by NGOs, conscious citizens, experts in various fields, social activists.”
 We are taking up the issue of traffic faced by the people of Pune on priority.  The number of two-wheelers and four-wheelers is increasing in Pune.  The use of vehicles is mandatory for going to schools, colleges, offices, hospitals.  Parking problem is increasing.  Arguments arise over the issue of parking.  Drivers have to bear heartache to cover long distances.  For these reasons, the issue of traffic has been given importance.  Volunteers of ‘#WakeUpPunekar’ will stop at traffic jam spots, traffic signals in all parts of the city and collect questionnaire form from motorists.  Answers to the problem are also expected in this questionnaire.  After 15 days information will be collected on the basis of this form and efforts will be made through ‘Wakeup’ Punekar to scrutinize the measures suggested by the Punekar.  Mohan Joshi said that placards with slogans such as ‘#Stuck Punekar’, ‘#WakeupPunekar’ will also be put up in the city in the face of traffic jams.
 This campaign will be continued on civic issues like traffic.  Organizations working in the field, police administration, schools and colleges will be associated with this people’s movement.  Conferences and workshops will be held on various topics.  Mohan Joshi said that the measures suggested by the people of Pune will be presented to the concerned department and followed up, social media platform will also be used for these problems.

Wakeup Punekar | Adaklay Punekar | पुणेकरांच्या समस्या सोडविण्यासाठी ‘वेकअप पुणेकर’ लोकचळवळ |वाहतुक कोंडी फोडण्यासाठी ‘अडकलाय पुणेकर’ मोहीम 

Categories
Breaking News cultural social पुणे

Wakeup Punekar | Adaklay Punekar | पुणेकरांच्या समस्या सोडविण्यासाठी ‘वेकअप पुणेकर’ लोकचळवळ |वाहतुक कोंडी फोडण्यासाठी ‘अडकलाय पुणेकर’ मोहीम

|  माजी आमदार मोहन जोशी यांची पत्रकार परिषदेत माहिती;

 

Wakeup Punekar | Adaklay Punekar | पुणे : पुणेकरांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या नागरी समस्यांवर (Pune Problems) उत्तरेही पुणेकरांकडूनच घेऊन ती संबंधित खात्याकडे मांडून त्यावर उपाययोजना करण्यासाठी ‘#वेकअप पुणेकर’ ही लोकचळवळ सोमवार,  ५ फेब्रुवारीपासून सुरू करीत आहोत, अशी माहिती ‘#वेकअप पुणेकर’चे संयोजक माजी आमदार मोहन जोशी (Mohan Joshi Pune Congress) यांनी आज (रविवारी) पत्रकार परिषदेत बोलताना दिली. पुण्यातील वाहतुक कोंडी (Pune Traffic congestion) फोडण्यासाठी ‘#अडकलाय पुणेकर’ मोहीम राबविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रवीणकुमार बिरादार, प्रथमेश आबनावे, रोहन सुरवसे पाटील, मिलिंद गवंडी आदी उपस्थित होते. (Pune News)

मोहन जोशी म्हणाले, “गेल्या दहा वर्षात पुण्याचा विस्तार झाला, लोकसंख्या वाढली त्याबरोबर ट्रॅफिक, पाणीपुरवठा, आरोग्य, स्वच्छता, हवेचे प्रदुषण याबाबतचे प्रश्नही निर्माण झाले. या प्रश्नांवर उपाययोजना काय असाव्यात? याची उत्तरे पुणेकरांकडूनच घ्यावीत, त्यातून पुणेकरांमध्ये जागृती निर्माण होईल, जनमताचा रेटा निर्माण झाला की समस्या नेमकेपणाने सोडविणे अधिक सोपे जाईल. अशा उद्देशाने ‘#वेकअप पुणेकर’ ही लोकचळवळ उभी करीत आहोत. यात स्वयंसेवी संस्था, जागरूक नागरिक, विविध विषयांचे तज्ञ, सामाजिक कार्यकर्ते सहभागी असतील.”

the karbhari - wake up punekar movement

पुणेकरांना भेडसावणारा ट्रॅफिक हा विषय प्राधान्याने हाती घेत आहोत. पुण्यात दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या वाढते आहे. शाळा, कॉलेजेस, ऑफिसेस, रूग्णालये येथे जाण्यासाठी वाहनांचा वापर अनिवार्य झालेला आहे. पार्किंगची समस्या वाढते आहे. पार्किंगच्या मुद्द्यावरून वादावादीचे प्रसंग उदभवतात. दूर अंतरावर जाण्यासाठी वाहनचालकांना मनःस्ताप सहन करावा लागतो. या कारणांनी ट्रॅफिक या मुद्द्याला महत्त्व देण्यात आले आहे. शहराच्या सर्व भागातील वाहतुकीची कोंडी होणारी ठिकाणे, ट्रॅफिक सिग्नल्स या ठिकाणी ‘#वेकअप पुणेकर’चे स्वयंसेवक थांबतील आणि वाहनचालकांकडून प्रश्नावलीचा फॉर्म भरून घेतील. या प्रश्नावलीत समस्येवरील उत्तरेही अपेक्षित केलेली आहेत. १५ दिवसांनंतर या फॉर्म च्या आधारे माहिती संकलित केली जाईल आणि पुणेकरांनी सुचविलेल्या उपाययोजनांची छाननी करून ती राबविण्यासाठी ‘वेकअप’ पुणेकर मार्फत कसोशीने प्रयत्न करण्यात येतील. वाहतुकीच्या कोंडीत ‘#अडकलाय पुणेकर’, ‘#वेकअप पुणेकर’ अशी घोषवाक्य लिहीलेले फलकही पूर्ण शहरात लावण्यात येतील, असे मोहन जोशी यांनी सांगितले.

the karbhari - pune traffic congestion

ट्रॅफिक आदी नागरी प्रश्नांवर या मोहीमा राबविण्यात सातत्य ठेवण्यात येईल. क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, पोलीस प्रशासन, शाळा-महाविद्यालयांना या लोकचळवळीशी जोडून घेतले जाणार आहे. विविध विषयांवर परिषदा, कार्यशाळा घेतल्या जातील. संबंधित खात्याकडे पुणेकरांनी सुचविलेल्या उपाययोजना मांडून त्याचा पाठपुरावा केला जाईल, या समस्यांसाठी सोशल मिडिया चा प्लॅटफॉर्मही वापरण्यात येईल, असे मोहन जोशी यांनी सांगितले.

Budget 2024 News | अर्थसंकल्प 2024 | पुणे शहरातून संमिश्र प्रतिक्रिया 

Categories
Breaking News Commerce Political social पुणे

Budget 2024 News | अर्थसंकल्प 2024 | पुणे शहरातून संमिश्र प्रतिक्रिया

 

Budget 2024 News | अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी अंतरिम अर्थसंकल्प 2024 (Budget 2024) सादर केला. याबाबत पुणे शहरातून संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. जाणून घेऊया कोण काय म्हणाले. (Budget 2024 News)


विकसित भारताकडे जाणारा अर्थसंकल्प…

आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही, ही पगारदार वर्गासाठी दिलासादायक बाब आहे. गरीब कल्याणाचा अजेंडा पुढे नेत महिला, शेतकरी, गरीब आणि युवा या सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून केलेला आहे.

दहा वर्षांत करसंकलन तीन पटीने वाढले आहे असून २५ कोटी गरीब लोकांना दारिद्र्याबाहेर काढण्यात मोदी सरकारला यश आले, ही निश्चित समाधानाची बाब आहे.

१ कोटी कुटुंबियांना सोलर यंत्रणा देऊन ३०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा संकल्पही महत्त्वाचा ठरणारा आहे. शिवाय स्वतःचं घर साकारण्याची योजना, युवकांसाठी स्टार्टअप, लखपती दिदी योजना, महिला बचत गटांचे सक्षमीकरण, पायाभूत सुविधांसाठी उपलब्ध करुन दिलेला निधी या सर्व बाबी विकसित भारताची दिशा ठरवणाऱ्या आहेत. विकसित भारताच्या दिशेने जाणारा अर्थसंकल्प दिल्याबद्दल मोदी सरकारचे अभिनंदन !

मुरलीधर मोहोळ,
प्रदेश सरचिटणीस, भाजपा महाराष्ट्र


फसवे निराशाजनक बजेट – मोहन जोशी !

मोदी सरकारचे या टर्मचे अखेरचे अंतरिम अंदाजपत्रक भांडवलदारांना पूरक आणि गरीब व मध्यमवर्गीय जनतेला मारक असणार अपेक्षितच होते. त्या मुळेच या बजेटचे कोणीच स्वागत करताना दिसत नाही. बढ्या उद्योगपतींना पूरक धोरणे राबवून त्याच्यावरील कर कमी करून त्यांच्या नफेखोरीला या बजेट मध्ये प्रोत्साहन दिले आहे. मात्र गरीब व मध्यमवर्गीयांसाठी कररचनेत काहीही बदल न करता कोट्यावधी जनतेच्या तोंडाला मोदी सरकारने पाने पुसली आहेत. मध्यमवर्गीयांप्रमाणेच शहरी गरीब ग्रामीण भारत आणि शेतकरी या कुणालाच या फसव्या बजेटमुळे दिलासा मिळालेला नाही. त्यामुळेच मोदी राजवटीला पुन्हा बजेट मांडण्याची संधी मिळू नये. असेच नागरिकांना वाटत आहे.

मोहन जोशी.
– उपाध्यक्ष – महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी.


भारतीय जनता पार्टीची पराभूत मानसिकता उघड करणारा अर्थसंकल्प !

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला हा अर्थसंकल्प कोणतीही दिशा नसलेला स्वतंत्र भारताच्या इतिहासातील पहिलाच अर्थसंकल्प असेल. टॅक्स स्लॅब मध्ये कोणतीही सूट न देणे ही बाब देशाची अर्थव्यवस्था किती दोलायमान स्थितीत आहे हे स्पष्ट करते. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचे आहे हे स्वतःच दिलेले वचन भारतीय जनता पक्षाने या अर्थसंकल्पातून पुसले आहे. युवकांच्या रोजगाराबाबत एक अक्षरही या अर्थसंकल्पातून मांडण्यात आलेले नाही.
देशातील जनतेच्या डोक्यावर महागाईचा डोंगर असताना जनतेला दिलासा देण्याचा कोणताही प्रयत्न या अर्थसंकल्पातून करण्यात आलेला नाही. महिला, युवक, मध्यमवर्गीय व गरिबांसाठी हा अर्थसंकल्प म्हणजे निव्वळ शब्दफेक आहे. श्री. नरेंद्र मोदींच अपयश झाकण्यासाठी पोकळ आकड्यांची टाकलेली चादर एवढेच विश्लेषण या अर्थसंकल्पाचे करता येईल.

प्रशांत सुदामराव जगताप
पुणे शहराध्यक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी


सबका साथ सबका विकास करणारे अंतरिम बजेट-प्रवीण चोरबेले

केंद्राचा अंतरिम अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर करत असताना सबका साथ सबका विकास करणारा हे बजेट सादर केले यामध्ये टॅक्स मध्ये कुठलाही बदल केला गेला नाही नवीन कर प्रणालीनुसार ७ लाख पर्यंत कुठलीही उत्पादन कर नाही व जुने परतावे २५ हजार पर्यंत आहे ते विड्रॉल केले जाणार असल्यामुळे एक दिलासा मिळणार आहे

सर्वसामान्यसाठी ५ वर्षात २ कोटी घर बांधणार व त्याचप्रमाणे स्वतःचे घर घेण्यासाठी आर्थिक मदत करणार त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे तेल बियाणेसाठी आत्मनिर्भर करणे व तसेच शेतमालाच्या साठवणुकीला प्राधान्य देणार व इलेक्ट्रॉनिक वाहनांना प्राधान्य देणार,पर्यटन स्थळ विकसित करणार, असे चांगले निर्णय घेतल्यामुळे विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्याचा हा बजेट अत्यंत दिलासादायक आहे असे मत.दि पूना मर्चंट चेंबर मा.अध्यक्ष- प्रवीण चोरबेले यांनी व्यक्त केले


शेतकऱ्यांना गृहीत धरण्याच्या केंद्र सरकारच्या वृत्तीचा निषेध.
शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं स्वप्नं दाखवून सलग दोन वेळा सत्तेत आलेल्या भाजपप्रणित सरकारने आपल्या शेवटच्या अर्थसंकल्पातही शेतकऱ्यांना केवळ आश्वासनं देण्याचं काम केलं. खते, बी बियाणे, कीटक नाशक आणि शेती औजारांच्या वाढत्या किंमतीबद्दल अर्थ संकल्पात ब्र शब्द काढण्यात आला नाही. राज्याच्या आणि शेतकऱ्यांच्या खिशातून खाजगी कपंनीच्या नफेखोरीला उत्तेजन देणाऱ्या पंतप्रधान पिक विमा योजनेला पुन्हा प्रोत्साहन देण्याचेचं काम अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलें. इथेनॉल आणि कांदा निर्यात बंदीमुळे आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे हजारो कोटीं रुपयांचे नुकसान झालेले असताना त्यांच्या तोंडावर शेतकरी सन्मान निधीचे सहा हजार फेकून पुन्हा स्वतःची टिमकी वाजवण्याचे काम या अर्थसंकल्पात करण्यात आले आहे. लाखों टन दूध पावडर आणि इतर दुग्धजण्य पदार्थ धूळ खातं पडून असल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आलेला असताना या क्षेत्राला पुन्हा दुर्लक्षित करण्यात आलं आहे. शेतमालाला दीडपट हमी भाव देणं आणि कृषी क्षेत्रातील स्टार्टप उद्योगाला बळ देण्याच्या आपल्याच संकल्पाचा या सरकारला जणू विसरच पडला असल्याचे चित्र आहे. तूरडाळ आणि खाद्य तेलाच्या आयतीला प्रोत्साहन पण आपल्याच शेतकऱ्यांच्या तूर, सोयाबीनला कवडीमोल भाव या दुटप्पी धोरणावर ही सरकार या अर्थ संकल्पात ठाम राहिलं आहे. खतांच्या अनुदानाला कात्री लावतं पुन्हा शेतकऱ्यांना फसवलं आहे. शेतकऱ्यांना गृहीत धरण्याच्या केंद्र सरकारच्या वृत्तीचा मीं काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध करतो.
हनुमंत पवार, प्रवक्ता.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस.
———

उच्च शिक्षण क्षेत्रात संशोधन, नाविन्यता, उद्योजकता आणि पायाभूत सुविधा निर्मितीवर अर्थसंकल्पात भर | राजेश पांडे

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2024 चे महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय सेवा योजना समितीचे सल्लागार सदस्य राजेश पांडे यांनी स्वागत केले आहे.

पांडे म्हणाले, पुणे हे शैक्षणिकदृष्ट्या आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचे केंद्र बनत आहे. अर्थसंकल्पातील उच्च शिक्षणासाठी केलेल्या तरतुदींमुळे गुणवत्तापूर्ण आणि किफायतशीर दरात दर्जेदार शैक्षणिक सुविधा देणारे शहर अशी पुण्याची ओळख जगाच्या पाठीवर होऊ शकेल असा विश्वास वाटतो. तसेच शिक्षण क्षेत्रातील प्रगतीमुळे पुण्याच्या अर्थकारणाला मोठी गती मिळेल.

पांडे म्हणाले, उच्च शिक्षण क्षेत्रात संशोधन, नाविन्यता, उद्योजकता आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी या अर्थसंकल्पात भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. विकसित भारताचे स्वप्न साकार करताना ज्ञानसंपन्न विद्यार्थी हा मोठा आधार असणार आहे. त्यासाठी या अर्थसंकल्पाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.

पांडे पुढे म्हणाले, अर्थमंत्र्यांनी शिक्षण क्षेत्रासाठी 112 लाख कोटी रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी वेगाने आणि प्रभावीपणे करणे शक्य होणार आहे. या अर्थसंकल्पामुळे खाजगी क्षेत्राचा शिक्षणातील सहभाग वाढणार आहे. अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरची उभारणी होणार असून, विद्यार्थ्यांना हायब्रीड मॉडेलच्या अंतर्गत अध्ययन सुविधा उपलब्ध होतील. पेपर फुटी आणि कॉपीसारख्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कायदा करण्याची घोषणा स्वागतार्ह असून, त्यामुळे पारदर्शकता येणार आहे. नवीन वैद्यकीय महाविद्यालय आणि नर्सिंग कॉलेजच्या उभारणीमुळे वैद्यकीय क्षेत्रातील भारतीय विद्यार्थ्यांच्या टॅलेंटला अधिक संधी मिळणार असून, भारतातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी हा निर्णय उपयुक्त ठरणार आहे.

Pune Airport New Terminal Inauguration | लोहगाव टर्मिनल 2 चे 19 फेब्रुवारीला नरेंद्र मोदींच्या हस्ते उदघाटन होण्याची शक्यता 

Categories
Breaking News Political social पुणे

Pune Airport New Terminal Inauguration | लोहगाव टर्मिनल 2 चे 19 फेब्रुवारीला नरेंद्र मोदींच्या हस्ते उदघाटन होण्याची शक्यता

Pune Airport New Terminal Inauguration | पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) फेब्रुवारी महिन्यात पुणे दौऱ्यावर (PM Modi in Pune Tour) आहेत. यावेळी 19 फेब्रुवारीला मोदी लोहगाव विमानतळ टर्मिनल २ चे उद्धाटन (Pune Airport New Terminal Inauguration) करण्याची शक्यता आहे.
दरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी लोहगाव विमानतळ टर्मिनल २ सुरू व्हावे, यासाठी काँग्रेस पक्षाने आंदोलने केली, सातत्याने पाठपुरावा केला, त्यामुळे येत्या १९ फेब्रुवारीला त्याचे उदघाटन होते आहे. काँग्रेसच्या लढ्याला आलेले हे यश आहे, असे  माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Mohan Joshi Pune congress) यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. (Pune Airport New Terminal News)
वाहतूक कोंडी सुटावी याकरिता शिवाजीवर एसटी स्थानक पूर्ववत जागी यावे, अशी मागणी घेऊन काँग्रेस पक्षाने आंदोलन केले, त्याला यश मिळाले. त्यानंतर लोहगाव विमानतळावरील टर्मिनल २ वापरासाठी खुले व्हावे, अशी विमान प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन, काँग्रेस पक्षाने आंदोलन केले. ऑगस्ट २०२३मध्येच टर्मिनलचे २ चे काम पूर्ण झाले होते. चाचण्याही झाल्या होत्या. केवळ पंतप्रधानांना सोयीची वेळ मिळावी यासाठी उदघाटन लांबवले जात होते. ही बाब लक्षात आल्यावर डिसेंबर महिन्यात केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना निवेदन पाठविले आणि जानेवारी महिन्यात टर्मिनल २ खुले करावे, अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी विमान प्रवाशांशी संवाद साधला आणि मागणीचा रेटा निर्माण केला. यामुळे मंत्रीमहोदयांनी घाईघाईने विमानतळाची पाहाणी केली आणि आता १९ फेब्रुवारीला उदघाटन होत आहे. काँग्रेसच्याच पाठपुराव्याला आलेले हे यश आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले  आहे.
व्यापार आणि उद्योग क्षेत्रासाठी पुणे हे महत्त्वाचे केंद्र बनले आहे. याकरिता गतीमान विमानसेवा ही गरज आहे. लोहगाव विमानतळावर वर्षाकाठी ७०लाख प्रवासी असतात. ती संख्या आता ९०लाखावर गेली, हे ही लक्षात घ्यायला हवे होते. वाढत्या गर्दीमुळे विमान लॅन्डिंगमध्ये अडथळे येत होते. अनेक गैरसोयी निर्माण झाल्या. विमानतळाला एसटी स्थानकासारखे स्वरूप आले होते.  त्यात लक्ष घालून टर्मिनल २ वापरासाठी खुले करण्याऐवजी भारतीय जनता पक्ष श्रेयाचे राजकारण करू लागला, तो प्रकार संतापजनक होता, असे मोहन जोशी पत्रकात म्हटले आहे.

Pune Police News Today | पत्रकार, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते यांच्यावर लाठीमार करणारे पोलीस निरीक्षक पांढरे यांना त्वरित निलंबित करा | माजी आमदार मोहन जोशी

Categories
Breaking News Political पुणे

Pune Police News Today | पत्रकार, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते यांच्यावर लाठीमार करणारे पोलीस निरीक्षक पांढरे यांना त्वरित निलंबित करा | माजी आमदार मोहन जोशी

 

Pune Police News Today | पुणे | शांततेने कार्यक्रम करणाऱ्या महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते आणि पत्रकार यांच्यावर नाहक लाठीमार करणारे चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बालाजी पांढरे (Balaji Pandhare PI) यांना तातडीने निलंबित करावे, अशी मागणी माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Mohan Joshi Pune Congress) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त रितेश कुमार (Pune Police Commissioner Ritesh Kumar) यांच्याकडे निवेदनाद्वारे आज (शनिवारी) केली. (Pune Police News Today in Marathi)

या शिष्टमंडळात आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar MLA Pune), शिवसेना शहरप्रमुख गजानन थरकुडे, अभय छाजेड, संजय बालगुडे, विरेंद्र किराड, रमेश अय्यर, प्रथमेश आबनावे, प्रशांत सुरसे, चैतन्य पुरंदरे आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.

माजी नगरसेवक दत्ता बहिरट (Datta Bahirat Patil) यांच्या पुढाकाराने माता रमाई बाबासाहेब आंबेडकर जलकुंभ आशानगर , जनवादी येथे उभारणी केली. पालिकेच्या सभेत उदघाटनाचा ठरावही मंजूर करण्यात आला होता. असे असतानाही भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दत्ता बहिरट यांना विश्वासात न घेता, आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी हाच कार्यक्रम आपला म्हणून घेण्याचे ठरविले.

या प्रकाराचा निषेध नोंदवत महाविकास आघाडीने प्रतिकात्मक उदघाटनाचा कार्यक्रम ठेवला. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्याशी चर्चाही केली. शासनाच्या कार्यक्रमाच्या वेळी आम्ही कोणीही जाणार नाही, असेही त्यांना सांगितले. तरीही पांढरे यांनी सर्वांना ताब्यात घेण्याचे आदेश पोलीसांना दिले. त्यानंतर पोलिसांनी काँग्रेस नेते मोहन जोशी, आमदार रवींद्र धंगेकर, रमेश बागवे, गजानन थरकुडे, संजय बालगुडे, दत्ता बहिरट आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते यांना धक्काबुक्की केली आणि लाठीमार करण्यात आला. एखाद्या अट्टल गुन्हेगाराला द्यावी तशी वागणूक आम्हाला दिली, त्याचा आम्ही निषेध करीत आहोत, असे पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

तसेच पुढारी वृत्तपत्र समूहाचे पत्रकार आणि कॅमेरामन यांचा कॅमेरा हिसकावून त्यांना धक्काबुक्की केली, अटक करण्याचा प्रयत्न झाला, पोलीसांच्या या गैरवर्तणुकीचा आम्ही निषेध करीत आहोत, असे निवेदनात म्हटले आहे.

या प्रकाराची दखल घेऊन चौकशीसाठी समिती नेमत असून त्याचा अहवाल तीन दिवसांत येईल. त्यानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पोलीस आयुक्तांनी शिष्टमंडळाला दिले.

या शिष्टमंडळातउमेश वाघ,प्रवीण डोंगरे, चेतन अगरवाल, सुरेश कांबळे, आयुब पठाण, किशोर मारणे, जयकुमार ठोंबरे, दीपक ओव्हाळ, गोरख पळसकर, ज्योती परदेशी, गणेश शेडगे, फैय्याज अन्सारी, महेंद्र चव्हाण, रवी रजपूत, मंगेश थोरवे, राजू नाणेकर, कान्होजी जेधे, बाबा सय्यद, प्रशांत मिठापल्ली, सचिन बहिरट, नितीन जाधव, शेखर थोपटे, प्रथमेश लभडे, साहिल राऊत, गोरख बाळंदे, राज गेहलोत, साहिल भिंगे, उमेश काची, मंदार लांजेकर, समीर गांधी, युवराज मदगे, हेरॉल्ड मेस्सी, रोहन जाधव, अक्षय पाटील-खांगटे आदींचा समावेश होता.

Video | PMC Water Tank  | Datta Bahirat Patil | काँग्रेसने केले आशानगर पाण्याच्या टाकीचे उदघाटन |उद्घाटना नंतर धक्काबुक्की! 

Categories
Breaking News PMC Political social पुणे

PMC Water Tank  | Datta Bahirat Patil | काँग्रेसने केले आशानगर पाण्याच्या टाकीचे उदघाटन |उद्घाटना नंतर धक्काबुक्की!

| श्रेय घेण्याचा प्रयत्न भाजपच्या अंगलट | माजी नगरसेवक दत्ता बहिरट

 

PMC Water Tank  | Datta Bahirat Patil |पुणे : काँग्रेस आणि महापालिकेच्या (Pune Municipal Corporation PMC) प्रभाग क्रमांक ११ (PMC Ward no 11)  येथील आशा नगर (PMC Ashanagar Water Tank) येथील माता रमाई बाबासाहेब आंबेडकर जलकुंभाचे उदघाटन काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आज (गुरुवारी) प्रजासत्ताक दिनी करण्यात आले. दरम्यान उद्घाटन झाल्यानंतर आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ranindra Dhangekar), मोहन जोशी  (Mohan Joshi Pune congress) तसेच काही पत्रकारांना धक्का बुक्की झाल्याचे पाहण्यास मिळाले. दरम्यान या प्रकारामुळे पालकमंत्री अजित पवार यांनी उद्घाटनास येण्यास टाळल्याचे दिसून आले. (PMC Water Tank  | Datta Bahirat Patil)

See Video Here|https://www.instagram.com/reel/C2kAhQwNxoO/?utm_source=ig_web_copy_link

याप्रसंगी माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी, आमदार रविंद्र धंगेकर, माजी मंत्री रमेश बागवे, दीप्ती चवधरी, संजय बालगुडे, अभय छाजेड, विरेंद्र किराड, अविनाश बागवे, शिवसेना शहरप्रमुख गजानन थरकुडे, उदय महाले, राहुल शिरसाट आदी नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. स्थानिक रहिवाशांच्या प्रतिसादाने कार्यक्रम उत्साहात पार पडला.

काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या सहकार्याने पाण्याच्या टाकीची उभारणी मी करू शकलो. भारतीय जनता पक्षाचे आमदार यांचा कामाचा श्रेय घेण्याचा प्रकार त्यांच्या अंगलट आला. रहिवाशांनी त्यांना दाद दिली नाही. यापुढे विकास कामात काँग्रेस आघाडीवर राहील, असे यावेळी बोलताना माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांनी सांगितले.

पाण्याच्या टाकीसाठी बहिरट यांनी प्रयत्न केले हे सर्वाँना माहीत आहे. काँग्रेसच्या कामाचे श्रेय घेण्याचा खटाटोप भाजप करीत आले आहे. पण लोकांकडून त्यांना प्रतिसाद मिळेनासा झाला आहे, असे मोहन जोशी यांनी यावेळी बोलताना सांगितले.

टाकीसाठी विना मोबदला जागा बहिरट यांनी मिळवून दिली. लोकांचा त्यांच्यावर विश्वास असल्याने हे घडले, असे आमदार धंगेकर यांनी सांगितले.

महापालिकेच्या मुख्य सभेने टाकीचे उदघाटन कसे करावे? हे ठरवून दिले होते, परंतु, भाजपच्या आमदारांनी टाकीसाठी काहीही न करता उदघाटनाचा घाट घातला आहे, हे सर्व जनता ओळखून आहे. शिवाजीनगर मतदारसंघातील जनतेला दत्ता बहिरट यांच्या कामाची चांगली माहिती आहे. जनता बहिरट यांच्यावर विश्वास ठेवेल, असे बागवे यांनी सांगितले.

या कार्यक्रमात ॲड.शाबीर खान, विनोद रणपिसे, उदय वाघ, प्रविण डोंगरे, आशुतोष जाधव, अजित जाधव, राजेंद्र भुतडा, रमेश पवळे, चेतन अगरवाल, सुरेश कांबळे, राजश्री ताई अडसूळ, संगीता ताई रूपटक्के, राजन नायर, भरत ठाकूर, कुणाल काळे, प्रसाद वाघमारे, स्वप्नील नाईक, साहिल राऊत, प्रथमेश लभडे, वाल्मिकी जगताप, जावेद नीलगर, विनोद बांदल, सनी यादव आदी महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.

Datta Bahirat Patil | आशानगर पाण्याच्या टाकीचे उदघाटन कॉंग्रेस करणार | श्रेय उपटण्याची भाजपची संतापजनक धडपड | माजी नगरसेवक दत्ता बहिरट

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Datta Bahirat Patil | आशानगर पाण्याच्या टाकीचे उदघाटन कॉंग्रेस करणार | माजी नगरसेवक दत्ता बहिरट

| श्रेय उपटण्याची भाजपची संतापजनक धडपड – बहिरट

 

Datta Bahirat Patil | पुणे | महापालिकेच्या (Pune Municipal Corporation PMC) प्रभाग क्रमांक ११ (PMC Ward no 11) येथील आशा नगर पाण्याच्या टाकीची (PMC Aasha Nagar Water Tank) उभारणी काँग्रेसच्या आणि माझ्या प्रयत्नातून झाली असून प्रजासत्ताक दिनी (Republic Day 2024) उदघाटन कॉंग्रेस कार्यकर्ते करतील, असे माजी नगरसेवक दत्ता बहिरट (Datta Bahirat Ex Corporator) यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. (Datta Bahirat Patil Pune Shivajinagar)

या पत्रकार परिषदेला माजी आमदार, प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Mohan Joshi Pune Congress)आणि आमदार रविंद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) उपस्थित होते.

The karbhari - Datta Bahirat pune shivajinagar
पत्रकार परिषदेला दत्ता बहिरट यांच्यासोबत माजी आमदार, प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी आणि आमदार रविंद्र धंगेकर उपस्थित होते.

नगरसेवक या नात्याने  २० एप्रिल २०१२ रोजी आशानगर टाकीचे काम सुचविले. टाकीसाठी आशा नगर हौसिंग सोसायटी यांच्याशी संवाद साधून विनामोबदला जागा मिळवून दिली. नंतर सातत्याने पाठपुरावा केला, सर्व प्रकारच्या मंजुरी मिळविल्या. माता रमाई बाबासाहेब आंबेडकर जलकुंभ असे नाव निश्चित केले,अशी माहिती बहिरट यांनी दिली. भाजपचे स्थानिक आमदार केवळ श्रेय उपटू पहात आहेत, असा आरोप बहिरट यांनी केला.

आशानगर आणि परिसरातील पाण्याचा प्रश्न सुटावा याकरिता दत्ता बहिरट यांनी सन २०१रपासून अथक प्रयत्न केले. वीस लाख लिटर्स क्षमतेची टाकी झाली आणि आता भाजपचे स्थानिक आमदार आयत्या बिळावर रेघोट्या मारत पालकमंत्र्यांच्या हस्ते २६ तारखेला उदघाटन करीत आहेत, हा प्रकार निषेधार्ह आहे, असे मोहन जोशी यांनी यावेळी बोलताना सांगितले.

टाकी उभारणी कामाचे श्रेय बहिरट यांचे मान्य करावे, त्यांना डावलू नये अशी विनंती पालकमंत्री अजित पवार यांना केली आहे. या उपरही टाकी उदघाटन कार्यक्रम होणार असेल तर कॉंग्रेस कार्यकर्ते दि. २६ रोजी सकाळी ११ वाजता करतील, असे आमदार रवि धंगेकर यांनी सांगितले.