Empirical Data | OBC Reservation | ओबीसींचा इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश 

Categories
Breaking News PMC Political social पुणे

ओबीसींचा इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश

: सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सूचना 

 
पुणे | मध्य प्रदेश प्रमाणे महाराष्ट्र राज्यातही ओबीसी आरक्षण लागू करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. यासाठी राज्य सरकार कसून प्रयत्न करत आहे. सरकारने नुकतेच सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाना  ओबीसींचा इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने देखील तयारी सुरु केली आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी या बाबतच्या सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीवर ओबीसी आरक्षणाची छाप राहणार, हे सिद्ध होत आहे.
गेल्या काही दिवसापासून ओबीसी आरक्षणाबाबत जोरदार चर्चा झाडत आहेत. मात्र राज्यात हे आरक्षण लागू झालेले नाही. यामुळे फेब्रुवारीत होणाऱ्या निवडणुका देखील पुढे ढकलल्या होत्या. मात्र सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे हा विषय मागे पडला होता. मात्र मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षण लागू झाल्याने राज्य सरकारच्या आणि ओबीसी नेत्यांच्या देखील अपेक्षा उंचावल्या आहेत.
दरम्यान सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेण्याची प्रक्रिंय सुरु केली आहे. या निवडणुकी पर्यंत ओबीसी आरक्षण लागू होऊ शकते, असा कयास बांधला जात आहे. कारण राज्य सरकारने तशी तयारी सुरु केली आहे. कारण सरकारने नुकतेच सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाना  ओबीसींचा इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार पुणे महापालिकेने देखील तयारी सुरु केली आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी या बाबत महापालिका अधिकाऱ्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत अतिरिक्त आयुक्तांनी ही जबाबदारी क्षेत्रीय कार्यालयावर सोपवली आहे. तशा सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत.
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार आता क्षेत्रीय कार्यालयातील कुठलाही कर्मचारी ज्याला संबंधित परिसराची सर्व माहिती असेल, त्याला ओबीसी नागरिकांची माहिती गोळा करण्यास सांगितले जाईल. आडनावा नुसार जात, उपजात च उल्लेख करत हा डाटा गोळा करायचा आहे. गोळा झालेला डाटा राज्य सरकारच्या लिंकवर अपलोड करायचा आहे.
त्यानुसार सरकार पुढील प्रक्रिया करणार आहे. 
 
महापालिका निवडणुकीची तयारी महापालिका प्रशासनाने सुरु केली आहे. sc,st आणि महिला आरक्षण देखील जाहीर झाले आहे. त्यामुळे इच्छुक तयारीला लागले होते. मात्र आता ओबीसी आरक्षण लागू झाले तर गणिते बदलणार आहेत. त्यामुळे इच्छुकांना आरक्षणाची वाट पहावी लागणार आहे. 

पुणे महापालिका रणसंग्राम | PMC Election 2022 | महिला आरक्षण | काहींची गणिते जुळली तर काहींना करावे लागणार पक्षांतर! 

Categories
Breaking News PMC Political पुणे

महिला आरक्षण | काहींची गणिते जुळली तर काहींना करावे लागणार पक्षांतर! 

पुणे – महिला आरक्षणाची सोडत निघाल्यामुळे पुणे महापालिका निवडणुकीचे चित्र मंगळवारी जवळपास स्पष्ट झाले. या आरक्षणामुळे प्रस्थापित मधील काही नगरसेवकांचा मार्ग सुकर झाला आहे. तर काहींची मात्र गणिते पूर्णपणे बिघडून गेली आहेत. सोडतीत अनेक नेत्यांच्या प्रभागात महिला आरक्षण पडल्याने त्यांना नवीन प्रभागाचा अथवा घरातील महिलेला रिंगणात उतरावे लागणार असल्याचे समोर आले आहे. तर काही प्रभागांमध्ये पक्षातील इच्छुकांबरोबरच उमेदवारी मिळविण्यासाठी झगडावे लागणार आहे. तर अनेकांना महापालिकेच्या सभागृहात जाण्याच्या इच्छेवर पाणी सोडावे लागणार आहे. अनेक इच्छुकांना पक्षांतराशिवाय पर्याय राहिलेला नाही.

स्थायी समितीचे तीन वेळा अध्यक्षपद मिळवून इतिहास घडविणाऱ्या हेमंत रासने, माजी सभागृह नेते धीरज घाटे हे इच्छुक असलेले प्रभाग क्रमांक १७ मध्ये दोन जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. त्यामुळे या दोघांसह राजेश येनपुरे, दिलीप काळोखे, कृणाला टिळक, युवा मोर्चाचे बापू मानकर, प्रमोद कोंढरे यांच्या अनेक यांच्यामध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. तर प्रभाग क्रमांक २० मधील दोन जागा महिलांसाठी राखीव झाल्याने तेथे देखील उमेदवारीसाठी चुरस निर्माण झाली आहे. माजी महापौर रजनी त्रिभुवन, लता राजगुरू यांना उमेदवारीसाठी झगडावे लागेल. प्रभाग क्रमांक १० मध्ये देखील दोन्ही जागा महिलांसाठी राखीव झाल्याने आजी-माजीसह नगरसेवकांच्या इच्छेवर पाणी फिरले आहे.
बाळासाहेब बोडके, आदित्य माळवे, राजू पवार, चंद्रकांत अमराळे यांच्या अनेकांना आजूबाजूच्या प्रभागाचा आसरा घ्यावा लागणार आहे. प्रभाग क्रमांक २१ मध्ये बंडू गायकवाड आणि उमेदवार गायकवाड समोरासमोर येण्याची शक्यता अधिक असल्याचे सध्या चित्र आहे. या प्रभागात भाजपकडून इच्छुक असलेल्यांची संख्या मोठी असल्याने कोणाच्या गाळात माळ पडणार हा औसुक्याचा विषय राहणार आहे. तर प्रभाग १६ फग्युर्सन कॉलेज-एरंडवणे या प्रभागात मात्र उलटी परिस्थती आहे. महिलासाठी राखीव असलेल्या माधुरी सहस्रबुद्धे, मंजुश्री खर्डेकर, निलीमा खाडे, ज्योत्स्ना एकबोटे या प्रमुख महिलांसह इच्छुकांची संख्या मोठी आहे. प्रभाग २९ घोरपेड पेठ-महात्मा फुले मंडई या प्रभागात दोन महिलांसाठी राखीव जागा आहेत. त्यामुळे अजय खेडेकर, सम्राट थोरात, अजय दरेकर, विजय ढेरे. नाराजय चव्हाण, विष्णू हरिहर, आयुब पठाण, मुनाफ शेख यांच्यासह अनेक इच्छुकांना प्रभाग २८ महात्मा फुले स्मारक-भवानी पेठ या ठिकाणी उमेदवारीसाठी प्रयत्न करावा लागणार आहे. तर प्रभाग क्रमांक ३२ भुसारी कॉलनी-बावधन खुर्द येथे दोन जागा महिलांसाठी राखीव झाल्याने बंडू केमसे, दिलीप वेडेपाटील यांच्यासारख्या अनेक दिग्गज एकमेकांसमोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रभाग क्रमांक ३४ वारजे कोंढवे धावडे एक महिलेसाठी राखीव प्रभाग झाल्याने महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांचा प्रश्‍न मार्गी लागला आहे.मात्र, याच प्रभागात सचिन दोडके, किरण बारटक्के, भारतभूषण बराटे, सचिन दांगट, शुक्राचार्य वांजळे यांच्या दिग्गजांमध्ये लाढाई होण्याची शक्यता आहे. या प्रभागाला लागून असलेल्या ३५ रामनगर-उत्तमनगर दोन जागा महिलांसाठी आरक्षित झाल्याने दिलीप बराटे यांच्या प्रश्‍न मार्गी लागला असल्याची चर्चा आहे. तर प्रभाग क्रमांक ३६ कर्वेनगर प्रभागात एक जागा सर्वसाधारण गटासाठी आल्याने सुशिल मेंगडे, जयंत भावे, राजाभाऊ बराटे, स्वप्नील दुधाणे यांच्यासह अनेकांना उमेदवारी मिळविण्यासाठी झगडावे लागणार आहे. तर सनसिटी-नांदेड सिटी या प्रभाग क्रमांक ५२ अनुकूल असलेल्या प्रभागात दोन जागा महिलांसाठी राखीव झाल्याने मंजूषा नागपुरे, राजश्री नवले, यांचे प्रश्‍न सुटला आहे. तर प्रसन्न जगताप, श्रीकांत जगताप यांच्यासह इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेच होण्याची शक्यता अधिक आहे.
खडकवासला-नऱ्हे प्रभाग ५३ या नव्याने आलेल्या सर्वसाधारण गटाची उमेदवारी मिळविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कमालीची सुरस होण्याची शक्यता आहे.कात्रज परिसरातील प्रभाग क्रमांक ४९ बालाजीनगर-शंकर महाराज मठ या प्रभागात माजी महापौर दत्ता धनकवडे आणि राजेंद्र शिळीमकर एकमेकांसमोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर ५६ चैतन्य नगर भारती विद्यापीठ प्रभागात दोन महिलांसाठी जागा राखीव झाल्याने वर्षा तापकीर या प्रभागातून रिंगणात उतरण्याची शक्यता अधिक निर्माण झाली आहे. तर राष्टवीदीचे विशाल तांबे, युवराज बेलदरे यांच्या पक्षांतर्गत चुरस निर्माण झाले आहे. प्रभाग रचना आणि आरक्षणाचे चित्र स्पष्ट झाल्याने अनेक प्रभागातील लढतीचे सर्वसाधारण चित्र समोर आले आहे.

PMC Election 2022 | Women Reservation | महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागातील महिला आरक्षणाची सोडत उद्या | महापालिका प्रशासनाकडून रंगीत तालीम; जय्यत तयारी 

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागातील महिला आरक्षणाची सोडत उद्या

: महापालिका प्रशासनाकडून रंगीत तालीम; जय्यत तयारी

पुणे : आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागातील महिला आरक्षणाची सोडत उद्या (ता. ३१) सकाळी ११ वाजता स्वारगेट येथील गणेश कला क्रिडा मंच येथे काढली जाणार आहे. त्यांची रंगीत तालीम सोमवारी सायंकाळी महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. ही सोडत लॉटरी पद्धतीने होणार असून शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते ती काढण्यात येणार आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. अशी माहिती निवडणूक विभागाचे उपायुक्त यशवंत माने यांनी दिली.

महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना अंतिम झाली आहे. ५८ प्रभागांत १७३ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. त्यामध्ये २३ जागा अनुसूचित जाती तर दोन जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षीत आहेत. ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणूका होणार असल्याने सर्वसाधारण प्रवर्गासाठी जास्त जागा उपलब्ध झालेल्या आहेत. १७३ सदस्यांपैकी ८७ जागा या महिलांसाठी आरक्षीत आहेत. यामध्ये १२ अनुसूचित जाती, एक अनुसूचित जमातीसाठी आरक्षण असतील. तर ७४ ठिकाणी खुल्या प्रवर्गातील महिलांचे आरक्षण असणार आहे. तीन सदस्यांचा प्रभाग असल्याने २९ प्रभागांमध्ये दोन महिला असणार आहेत.

: असे असेल नियोजन

उपायुक्त माने यांच्या माहितीनुसार सकाळी 11 वाजता आरक्षण सोडत कार्यक्रम सुरु होईल. त्यासाठी महापालिका कर्मचारी 9:30 पासूनच उपस्थित असतील. अनुसूचित जाती, जमाती व महिला आरक्षणासाठी चिठ्ठ्या तयार करणे, सोडतीचे व्हिडिओ चित्रीकरण करणे, सोडतीचे लाइव्ह प्रसारण करणे, स्टेजवर तसेच बाहेरील बाजूस एलईडी स्क्रीन बसविणार आहेत. या ठिकाणी कोणताही गोंधळ होऊ नये, यासाठी पोलिस बंदोबस्ताचेही नियोजन केले आहे.

दरम्यान आज सायंकाळी आरक्षण सोडतीची रंगीत तालीम घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, निवडणूक उपायुक्त यशवंत माने, सहायक आयुक्त आशिष महाडदळकर, सांख्यिकी व संगणक विभागाचे राहुल जगताप, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, उपस्थित होते.

Analysis | PMC Election | भाजपला कसली भीती सतावतेय? 

Categories
Breaking News PMC Political पुणे

भाजपला कसली भीती सतावतेय?

पुणे : महापालिका निवडणुकीच्या हालचालींना चांगलाच वेग आला आहे. त्यामुळे आता शहरातील सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. दरम्यान आता या निवडणुकीत कोण बाजी मारणार? भाजप पुन्हा एकदा 100 के पार करणार का? का महाविकास आघाडीचाच जोर चालणार? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र 100 नगरसेवक घेऊन सत्तेत बसलेल्या भाजपाला मात्र आता पुन्हा तेवढ्याच जोमाने सत्ता येईल, असा विश्वास राहिलेला नाही.
भाजपाला हा आत्मविश्वास नसण्याला देखील तशीच कारणे आहेत. कारण भाजपला पूर्ण बहुमत असल्याने शहराचा संतुलित विकास करण्याची संधी होती. त्यानुसार सुरुवातीला भाजपने पुणेकरांना तशी स्वप्ने दाखवली देखील. मात्र त्या स्वप्नाचा पाठपुरावा भाजपाला करता आला नाही. बऱ्याच मोठ्या प्रकल्पाची स्वप्ने दाखवली गेली होती. शिवाय शहराच्या हिताच्या दृष्टीने काही महत्वाचे प्रकल्प आम्ही पूर्ण करणारच, असा विश्वास देखील भाजपने दिला होता. पुणेकरांना देखील हा विश्वास खरा वाटला. मात्र ते प्रकल्प पूर्ण होऊच शकले नाहीत. त्यामध्ये समान पाणीपुरवठा योजना, नदी सुधार योजना, मेट्रो प्रकल्प, उड्डाणपूल, मोठे रस्ते, अशा प्रकल्पांचा समावेश आहे. यातील काही प्रकल्प सुरु होऊन देखील त्याचा फारसा फायदा झालेला दिसला नाही.
शिवाय भाजपने बाहेरून आलेल्या नगरसेवकांना आपले कधी मानलेच नाही. त्यामुळे त्यांनाही भाजप कधी आपलासा वाटला नाही. त्यामुळे पालिकेत काही लोकांचीच मक्तेदारी होऊन बसली. अर्थातच तिथेच विकासाला खीळ बसण्यास सुरुवात झाली. 100 नगरसेवक असताना देखील फक्त तोकडेच लोक प्रतिनिधित्व करताना दिसत होते. ही गोष्ट पुणेकरांच्या देखील ध्यानात यायला वेळ लागला नाही. सत्तेच्या उत्तरार्धात पदाधिकाऱ्यांचे देखील एकमेकांशी पटत नव्हते. यातच कहर म्हणजे निसर्गाने किंवा नशिबाने देखील भाजपाला साथ दिली नाही. कोरोनाचा कहर चांगला दोन वर्ष चालला. याही काळात थोड्याच लोकांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. शिवाय प्रशासनातील प्रमुखांनी देखील भाजपाला फार काही करण्याची संधी दिली नाही. त्यामुळे पूर्ण 5 वर्ष मिळून फार उपयोग झाला नाही.
भाजपमध्ये बरेचसे लोक हे पालिकेत नवीन होते. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी ही गोष्ट हेरली होती. त्यामुळे कामे करताना भाजपच्या नगरसेवकांची फारच दमछाक होऊ लागली. इकडे विरोधी पक्षातील कसलेले नगरसेवक मात्र झटक्यासरशी काम करून घेत होते. भाजपच्या नगरसेवकांना जेव्हा तांत्रिक माहिती समजू लागली, तेव्हा मात्र कोरोना आला आणि कोरोना संपतो तोच कालावधी संपण्याची वेळ आली. त्यामुळे नगरसेवकांची स्वप्ने अधुरीच राहिली. पर्यायाने पुणेकरांचीच स्वप्ने पूर्ण होऊ शकली नाहीत. हळूहळू भाजपच्या ही लक्षात आले कि आपण फार मजल मारू शकलो नाही. त्यामुळे मग भीती सतावू लागली, पुन्हा येऊ का नाही? मग भावनेच्या भरात निर्णय घ्यावे लागले. मग काही कामाचे करार संपललेले नसतानाही नियम डावलत आपल्याच लोकांसाठी मुदत वाढवून देण्यासाठी नवीन करार केले जाऊ लागले. मात्र ही गोष्ट लपून राहिली नाही. मुख्य सभेतही नंतर बहुमताच्या जोरावर निर्णय घेतले गेले. ज्यात पदाधिकाऱ्यांचेच हित सामावले होते.
अशा सगळ्याच गोष्टी सगळ्यांच्याच ध्यानात आल्या आहेत. त्यामुळेच आता भाजपलाच 100 लोक निवडून येण्याचा आत्मविश्वास राहिलेला नाही. बाहेरून आलेले नगरसेवकांनी खरे तर निघून जाण्याची मागेच तयारी केली होती. आता ते पुढील काळात घडू शकेल. आपल्याकडून फार कामे झाली नसल्याची कबुली खुद्द त्यांचेच लोक देताहेत.
आता भाजपसमोर निवडणुकीत बहुमताने निवडून येण्याचे मोठे आव्हान आहे. कारण गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाला खुलं आव्हान देतोय. अशी सगळे आव्हाने पार करून भाजपला बहुमत मिळवणे नक्कीच सोपे नाही. भाजप हे आव्हान कसे पेलणार, यासाठी मात्र खूप प्रयत्नांची आवश्यकता आहे.