पुणे महापालिका रणसंग्राम | PMC Election 2022 | महिला आरक्षण | काहींची गणिते जुळली तर काहींना करावे लागणार पक्षांतर! 

Categories
Breaking News PMC Political पुणे

महिला आरक्षण | काहींची गणिते जुळली तर काहींना करावे लागणार पक्षांतर! 

पुणे – महिला आरक्षणाची सोडत निघाल्यामुळे पुणे महापालिका निवडणुकीचे चित्र मंगळवारी जवळपास स्पष्ट झाले. या आरक्षणामुळे प्रस्थापित मधील काही नगरसेवकांचा मार्ग सुकर झाला आहे. तर काहींची मात्र गणिते पूर्णपणे बिघडून गेली आहेत. सोडतीत अनेक नेत्यांच्या प्रभागात महिला आरक्षण पडल्याने त्यांना नवीन प्रभागाचा अथवा घरातील महिलेला रिंगणात उतरावे लागणार असल्याचे समोर आले आहे. तर काही प्रभागांमध्ये पक्षातील इच्छुकांबरोबरच उमेदवारी मिळविण्यासाठी झगडावे लागणार आहे. तर अनेकांना महापालिकेच्या सभागृहात जाण्याच्या इच्छेवर पाणी सोडावे लागणार आहे. अनेक इच्छुकांना पक्षांतराशिवाय पर्याय राहिलेला नाही.

स्थायी समितीचे तीन वेळा अध्यक्षपद मिळवून इतिहास घडविणाऱ्या हेमंत रासने, माजी सभागृह नेते धीरज घाटे हे इच्छुक असलेले प्रभाग क्रमांक १७ मध्ये दोन जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. त्यामुळे या दोघांसह राजेश येनपुरे, दिलीप काळोखे, कृणाला टिळक, युवा मोर्चाचे बापू मानकर, प्रमोद कोंढरे यांच्या अनेक यांच्यामध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. तर प्रभाग क्रमांक २० मधील दोन जागा महिलांसाठी राखीव झाल्याने तेथे देखील उमेदवारीसाठी चुरस निर्माण झाली आहे. माजी महापौर रजनी त्रिभुवन, लता राजगुरू यांना उमेदवारीसाठी झगडावे लागेल. प्रभाग क्रमांक १० मध्ये देखील दोन्ही जागा महिलांसाठी राखीव झाल्याने आजी-माजीसह नगरसेवकांच्या इच्छेवर पाणी फिरले आहे.
बाळासाहेब बोडके, आदित्य माळवे, राजू पवार, चंद्रकांत अमराळे यांच्या अनेकांना आजूबाजूच्या प्रभागाचा आसरा घ्यावा लागणार आहे. प्रभाग क्रमांक २१ मध्ये बंडू गायकवाड आणि उमेदवार गायकवाड समोरासमोर येण्याची शक्यता अधिक असल्याचे सध्या चित्र आहे. या प्रभागात भाजपकडून इच्छुक असलेल्यांची संख्या मोठी असल्याने कोणाच्या गाळात माळ पडणार हा औसुक्याचा विषय राहणार आहे. तर प्रभाग १६ फग्युर्सन कॉलेज-एरंडवणे या प्रभागात मात्र उलटी परिस्थती आहे. महिलासाठी राखीव असलेल्या माधुरी सहस्रबुद्धे, मंजुश्री खर्डेकर, निलीमा खाडे, ज्योत्स्ना एकबोटे या प्रमुख महिलांसह इच्छुकांची संख्या मोठी आहे. प्रभाग २९ घोरपेड पेठ-महात्मा फुले मंडई या प्रभागात दोन महिलांसाठी राखीव जागा आहेत. त्यामुळे अजय खेडेकर, सम्राट थोरात, अजय दरेकर, विजय ढेरे. नाराजय चव्हाण, विष्णू हरिहर, आयुब पठाण, मुनाफ शेख यांच्यासह अनेक इच्छुकांना प्रभाग २८ महात्मा फुले स्मारक-भवानी पेठ या ठिकाणी उमेदवारीसाठी प्रयत्न करावा लागणार आहे. तर प्रभाग क्रमांक ३२ भुसारी कॉलनी-बावधन खुर्द येथे दोन जागा महिलांसाठी राखीव झाल्याने बंडू केमसे, दिलीप वेडेपाटील यांच्यासारख्या अनेक दिग्गज एकमेकांसमोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रभाग क्रमांक ३४ वारजे कोंढवे धावडे एक महिलेसाठी राखीव प्रभाग झाल्याने महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांचा प्रश्‍न मार्गी लागला आहे.मात्र, याच प्रभागात सचिन दोडके, किरण बारटक्के, भारतभूषण बराटे, सचिन दांगट, शुक्राचार्य वांजळे यांच्या दिग्गजांमध्ये लाढाई होण्याची शक्यता आहे. या प्रभागाला लागून असलेल्या ३५ रामनगर-उत्तमनगर दोन जागा महिलांसाठी आरक्षित झाल्याने दिलीप बराटे यांच्या प्रश्‍न मार्गी लागला असल्याची चर्चा आहे. तर प्रभाग क्रमांक ३६ कर्वेनगर प्रभागात एक जागा सर्वसाधारण गटासाठी आल्याने सुशिल मेंगडे, जयंत भावे, राजाभाऊ बराटे, स्वप्नील दुधाणे यांच्यासह अनेकांना उमेदवारी मिळविण्यासाठी झगडावे लागणार आहे. तर सनसिटी-नांदेड सिटी या प्रभाग क्रमांक ५२ अनुकूल असलेल्या प्रभागात दोन जागा महिलांसाठी राखीव झाल्याने मंजूषा नागपुरे, राजश्री नवले, यांचे प्रश्‍न सुटला आहे. तर प्रसन्न जगताप, श्रीकांत जगताप यांच्यासह इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेच होण्याची शक्यता अधिक आहे.
खडकवासला-नऱ्हे प्रभाग ५३ या नव्याने आलेल्या सर्वसाधारण गटाची उमेदवारी मिळविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कमालीची सुरस होण्याची शक्यता आहे.कात्रज परिसरातील प्रभाग क्रमांक ४९ बालाजीनगर-शंकर महाराज मठ या प्रभागात माजी महापौर दत्ता धनकवडे आणि राजेंद्र शिळीमकर एकमेकांसमोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर ५६ चैतन्य नगर भारती विद्यापीठ प्रभागात दोन महिलांसाठी जागा राखीव झाल्याने वर्षा तापकीर या प्रभागातून रिंगणात उतरण्याची शक्यता अधिक निर्माण झाली आहे. तर राष्टवीदीचे विशाल तांबे, युवराज बेलदरे यांच्या पक्षांतर्गत चुरस निर्माण झाले आहे. प्रभाग रचना आणि आरक्षणाचे चित्र स्पष्ट झाल्याने अनेक प्रभागातील लढतीचे सर्वसाधारण चित्र समोर आले आहे.

Sinhagad road | Madhuri Misal | सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ता १५ दिवसांत सुरू होणार

Categories
Breaking News PMC Political पुणे

सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ता १५ दिवसांत सुरू होणार

सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ता १५ दिवसांत सुरू होणार असल्याची माहिती आमदार माधुरी मिसाळ यांनी कळविली आहे. मिसाळ यांनी अधिकाऱ्यांसोबत या रस्त्याची पाहाणी केली.

मिसाळ म्हणाल्या, जनता वसाहत पु. ल. देशपांडे उद्यानामागील रस्ता काँक्रिट करण्याचे काम पूर्ण झाले आहे. या रस्त्यावर वृक्ष छाटणी आणि इलेक्ट्रिक विभागाची कामे १५ दिवसांत पूर्ण होतील. त्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

विश्रांती नगर रस्ता , विठ्ठल मंदिर मागील रस्ता, हिंगणे चौक, कॅनॉल रस्ता आदी कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच सिहगड रस्त्यावरील उड्डाण पुलाच्या जागेची पाहाणी केली.

श्रीनिवास बोनाला, प्रकल्प प्रमुख, व्ही जी कुलकर्णी, पथ विभाग प्रमुख, अमित घुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक, उदयसिंग शिंगाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिहगड रोड वाहतूक विभाग, प्रदीप आव्हाड, क्षेत्रीय अधिकारी सिहगड क्षेत्रीय कार्यालय, अमर शिंदे, कार्यकारी अभियंता पथ , राखी चौधरी, अभियंता पथ, अतुल कडू अभियंता पथ, अजय वायसे, कार्यकारी अभियंता प्रकल्प , सुश्मिता शिर्के, अधिक्षक अभियंता प्रकल्प, महादू थोपटे उपअभियंता , निखिल रंधवे, कनिष्ठ अभियंता, विश्वास ननावरे , प्रवीण दिवेकर , विशाल पवार उपस्थित होते.

Prashant Jagtap | PMC Election 2022 | कारभार कसा करू नये, याचे उत्तम उदाहरण म्हणजे भाजप 

Categories
Breaking News PMC Political पुणे

कारभार कसा करू नये, याचे उत्तम उदाहरण म्हणजे भाजप

: राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची टीका

पुणे : २०१७ ते २०२२ या पाच वर्षांत महानगरपालिकेत सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाचा गैरकारभार आम्ही वेळोवेळी चव्हाट्यावर आणला. विविध माध्यमांतून पुणेकरांना वेठीस धरणाऱ्या भाजपचा आम्ही विविध आंदोलनांतून पर्दाफाश केला. या पाच वर्षांत कारभार कसा करू नये, याचे उत्तम उदाहरण पुणेकरांनी भाजपच्या कारभारातून पाहिले आहे. अशी टीका राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली आहे.

जगताप म्हणाले,  पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२२ साठीची अंतिम प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर आपण ज्या प्रभाग आरक्षणांची वाट पाहात होतो, ते आरक्षण मंगळवार, दि. ३१ मे २०२२ रोजी जाहीर झाले. राज्य निवडणूक आयोगाच्या निवडणूक शाखेने पुणे महानगरपालिकेसह राज्यातील १४ महानगरपालिकांचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर केले आहे. या सोडतीचे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पुणे शहराध्यक्ष या नात्याने स्वागत करतो.

पुणे महानगरपालिका निवडणुकीत घवघवीत यश मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सदस्य महापौरपदी विराजमान व्हावा, यासाठी मागील काही महिन्यांपासून आम्ही सर्व सहकारी व पदाधिकारी जिद्दीने कार्यरत आहोत. २०१७ ते २०२२ या पाच वर्षांत महानगरपालिकेत सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाचा गैरकारभार आम्ही वेळोवेळी चव्हाट्यावर आणला. विविध माध्यमांतून पुणेकरांना वेठीस धरणाऱ्या भाजपचा आम्ही विविध आंदोलनांतून पर्दाफाश केला. या पाच वर्षांत कारभार कसा करू नये, याचे उत्तम उदाहरण पुणेकरांनी भाजपच्या कारभारातून पाहिले आहे. त्यामुळे, या पाच वर्षांत काहीही ठोस कामगिरी करता न आलेला आणि आत्मविश्वास गमावलेला भाजप आमच्याविरोधात निवडणुकीत असणार आहे. या निवडणुकीत तमाम पुणेकरांच्या आशीर्वादाने व सहकार्याने आम्ही निश्चितच चांगली कामगिरी करू शकू, असा विश्वास आहे.

प्रभागनिहाय जे आरक्षण जाहीर झाले आहेत, त्यानुसार सक्षम व ताकदीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. त्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे निश्चितच जड आहे. पक्षाचे उत्तम संघटन व आमचे मार्गदर्शक, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचे नेतृत्व यांमुळे या महानगरपालिका निवडणुकीनंतर पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच महापौर विराजमान होईल, अशी ग्वाही मी शहराध्यक्ष या नात्याने देतो. असे ही जगताप म्हणाले.

NCP Vs Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील जिथे दिसतील, तिथे घेराव घालणार  | पुणे राष्ट्रवादीचा इशारा 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

चंद्रकांत पाटील जिथे दिसतील, तिथे घेराव घालणार

| पुणे राष्ट्रवादीचा इशारा

खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याबाबत बेताल वक्तव्य करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणी त्वरित माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला भगिनी चंद्रकांत पाटील जिथे दिसतील, तिथे घेराव घालतील, असा इशारा पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शुक्रवारी देण्यात आला.

चंद्रकांत पाटील यांनी सुप्रियाताईंबाबत केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सारसबाग येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासमोर निषेध नोंदविण्यात आला. या वेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात घोषणा दिल्या. तसेच, पाटील यांच्या पुतळ्याला जोडेमार आंदोलनही करण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदीप देशमुख, मृणाल वाणी, रुपाली पाटील, संतोष नांगरे व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

‘महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरातील कोथरूड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असलेले चंद्रकांत पाटील हे पुण्याची व महाराष्ट्राची संस्कृती बिघडवण्याचे काम करीत आहेत. सुप्रियाताई यांच्यासारख्या लोकप्रतिनिधींविरोधात व समस्त महिला वर्गाविरोधात त्यांनी केलेले वक्तव्य हे निषेधार्ह आणि तितकेच लाजीरवाणे आहे. ‘घरी जा, स्वयंपाक करा, मसणात जा’ ही त्यांची वक्तव्ये महिलांनी चूल व मूल इतक्यापुरतेच मर्यादित राहावे, त्यांना समाजकारणात व राजकारणात वाव नसावा, या मानसिकतेचे प्रदर्शन करणारे आहे. यातून चंद्रकांत पाटील व भाजपची मनुवादी वृत्ती दिसून येत आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात अशा प्रकारची वृत्ती लादू पाहणाऱ्या चंद्रकांत पाटील यांचा आम्ही निषेध करतो. चंद्रकांत पाटील यांनी त्यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्वरित माफी मागावी अन्यथा ते जिथे दिसतील तिथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला – भगिनी त्यांना घेराव घालतील. त्यासाठी चंद्रकांत पाटील तयार राहावेत,’ असा इशारा  शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिला.

Prashant Jagtap Vs Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांनी घरी दोन घास सुखाने खावे आणि मानसिक उपचार करून आराम करावे | प्रशांत जगताप 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

चंद्रकांत पाटलांनी घरी दोन घास सुखाने खावे आणि मानसिक उपचार करून आराम करावे | प्रशांत जगताप

पुणे : राज्यात महाविकास आघाडी सरकारची सत्ता आल्यापासून राज्यातील भाजप नेते सैरभैर झाले आहेत, तर या ‘सैरभैर टोळी’चे प्रमुख असलेले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे मानसिक संतुलनच बिघडलेले आहे. त्यातूनच, ते काहीही बेताल वक्तव्ये करीत सुटले आहेत. ‘ना घर का ना घाट का,’ अशी अवस्था झालेल्या आणि मानसिक स्वास्थ्य ठीक नसलेल्या व्यक्तींनी असे सार्वजनिक जीवनात वावरणे धोक्याचे आहे. त्यामुळे, त्यांनी घरी जावे. घरातील माय-माऊली स्वयंपाक करून त्यांची वाट पाहात असतील. दोन घास सुखाने खावे आणि मानसिक उपचार करून आराम करावे. असा टोला राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी लगावला आहे.

जगताप  म्हणाले, चंद्रकांत पाटील यांनी संसदरत्न खासदार व आमच्या नेत्या  सुप्रियाताई सुळे यांच्याबाबत बेताल वक्तव्य करून पुन्हा एकदा अकलेच्या दिवाळखोरीचे प्रदर्शन केले आहे. त्यांच्या वक्तव्यातून समस्त महिला वर्गाबाबत पाटील व ते ज्या मुशीत घडले आहेत, त्या मातृसंस्थेची काय मानसिकता आहे, हे दिसून आले आहे. महिला भगिनींना केवळ चूल व मूल इतक्यापुरतेच मर्यादित ठेवण्याच्या या मानसिकतेतून बाहेर येऊन पाटील यांनी सध्या महिला कोणत्या क्षेत्रात किती प्रगती करीत आहेत, हे पाहण्याची गरज आहे. महिला सबलीकरणासाठी लढणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची कन्या सुप्रियाताईंशी पंगा घेण्याचा प्रयत्न चंद्रकांत पाटील यांनी करू नये. सुप्रियाताईंना घरी बसविण्यासाठी लोकसभा निवडणुकीत त्यांनी किती जंग पछाडले आहे आणि आतापर्यंत ते कितीवेळा तोंडावर आपटले आहेत, हे महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे.

एकदा राज्यसभा आणि तीनवेळा लोकसभेत निवडून आलेल्या सुप्रियाताईंचा संसदेतील आणि राजकारणातील अनुभव काय आहे, हे महाराष्ट्रातील जनता जाणून आहे. प्रत्येक स्त्रीला कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळण्याची आणि त्याबरोबरच आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची जन्मजात देणगी मिळाली आहे. आदरणीय सुप्रियाताईही या दोन्ही जबाबदाऱ्या तितक्याच लीलया पार पाडतात, हे महाराष्ट्रातील प्रत्येकाला माहीत आहे. परंतु, चंद्रकांत पाटील यांनी सुप्रियाताईंना महिला म्हणून ‘घरी जा, स्वयंपाक करा, दिल्लीत जा नाहीतर मसणात जा,’ असे म्हणत समस्त महिला वर्गाचा जो अवमान केला आहे, महिलाशक्तीला डिवचण्याचा जो जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे, त्याचे उत्तर त्यांना मिळाल्याशिवाय राहणार नाही.

बरे, सुप्रियाताईंनी ‘मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षण मिळण्यासाठी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत जाऊन कुणाची भेट घेतली होती,’ इतका साधा प्रश्न उपस्थित केला होता. जर, भाजप नेत्यांच्या कृतीमध्ये काही काळेबेरे नव्हते, तर या प्रश्नावर सरळ उत्तर देता आले असते. परंतु, सुप्रियाताईंनी नेमके वर्मावर बोट ठेवल्याचा परिणाम पाटील यांचे मानसिक संतुलन बिघडण्यात झाला असावा, ही शक्यता नाकारता येत नाही.

महिला वर्गाचा अवमान करून पताका फडकावल्याचा आव आणणारे पाटील यांनी घरी जावे. आपल्या घरात स्वयंपाक करणाऱ्या माय – माऊलींपुढे उभे राहून आपण करून आलेला पराक्रम सांगावा. तेव्हा ती माय-माऊलीही तुम्हाला ‘मसणात जा’ बोलल्याशिवाय राहणार नाही, हे मी निश्चितपणे सांगू शकतो.

मुळात, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर आदरणीय शरद पवार साहेबांनी भाजपला घरी बसविल्याचा राग या ‘सैरभैर टोळी’कडून वारंवार कोणत्या ना कोणत्या निमित्ताने व्यक्त होताना दिसत आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकारचे मजबूत सरकार आहे, हे या ‘सैरभैर टोळी’ने समजून घेण्याची गरज आहे. आता घरी बसलाच आहात, तर स्वयंपाकही शिकून घ्या. त्यात कमीपणा काही नाही. पण, जेव्हा तुम्ही घरी स्वयंपाक करू लागाल, तेव्हाच तुम्हाला माय-माऊलींची किंमत कळेल, त्यांचे दु:ख कळेल, एक महिला काय करू शकते, हे उघड्या डोळ्यांनी पाहिल्यास पुन्हा कोणत्याही महिलेचा अनादर करण्यासाठी तुमची जीभ धजावणार नाही, यात तीळमात्र शंका नाही. असे ही जगताप म्हणाले.