Tag: Meri mati mera desh abhiyan
Meri Mati Mera Desh | PMC | पुणे शहरात रविवारी ‘माझी माती माझा देश’ उपक्रमाची सांगता
Tilak Maharashtra Vidyapeeth | मेरी माटी मेरा देश अभियानाअंतर्गत टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने घेरा पानवडी येथे वृक्षारोपण मोहीम संपन्न!
Meri Mati Mera Desh | PMC Pune | पुणे महापालिकेकडून ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियाना अंतर्गत विविध कार्यक्रम संपन्न
Meri Mati Mera Desh | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांनी घेतली पंचप्रण शपथ
Meri Mati Mera Desh | स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘‘माझी माती माझा देश” (Meri Mati Mera Desh) अंतर्गत पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) हिरवळीवर कर्मचाऱ्यांकडून पंचप्रण शपथ (Panchpran Shapath) घेण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. (Meri Mati Mera Desh)
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव या उपक्रमाचा सांगता सोहळा 9 ऑगस्ट पासून सुरु झाला आहे. सदर सांगता सोहळ्याच्या निमित्त राज्यात ‘‘मेरी माटी मेरा देश हा उपक्रम देशभर साजरा करण्यात येत आहे. सदर कार्यक्रमा अंतर्गत आज पुणे महापालिका (PMC Pune) प्रांगणातील महात्मा ज्योतिबा फुले यांचे पूर्णाकृती पुतळ्यानजीक हिरवळीवर ‘‘पंचप्रण शपथ घेण्यात आली.
याप्रसंगी अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) रविंद्र बिनवडे, उप आयुक्त (सामान्य प्रशासन) सचिन इथापे, मुख्य कामगार अधिकारी अरुण खिलारी व अन्य अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
Meri Mati Mera Desh | ‘माझी माती, माझा देश’ अभियानास उद्यापासून सुरुवात
“MERI MAATI MERA DESH” CAMPAIGN TO PAY TRIBUTE TO THE ‘VEERS’ WHO LAID DOWN THEIR LIVES FOR THE COUNTRY
NATION-WIDE JAN-BHAGIDHARI PROGRAMMES TO BE ORGANISED FROM VILLAGE TO NATIONAL LEVEL
SHILAPHALAKAMS (MEMORIAL PLAQUES) TO BE INSTALLED IN GRAM PANCHAYATS
SOIL FROM VARIOUS CORNERS OF THE COUNTRY TO BE BROUGHT TO DELHI IN AMRIT KALASH YATRA FOR CREATING AMRIT VATIKA
Prime Minister of India, Shri Narendra Modi, recently announced the ‘Meri Maati Mera Desh’ campaign during his Mann Ki Baat broadcast. This campaign aims to honour the brave freedom fighters and bravehearts who sacrificed their lives for the country. The campaign will include various programs across the country to remember the bravehearts (Veers). Shilaphalakams (memorial plaques) commemorating them will be installed in gram panchayats, close to Amrit Sarovars. This information was shared at a joint press conference held by Secretary, Information and Broadcasting and Department of Telecommunications, Shri Apurva Chandra; Secretary, Culture Shri Govind Mohan and Secretary, Youth Affairs, Smt. Meeta Rajivlochan in New Delhi today. CEO, Prasar Bharti Shri Gourav Dwivedi was also present on the occasion.
Addressing the press conference, Shri Apurva Chandra said that Meri Maati Mera Desh will be the concluding programme of Azadi ka Amrit Mahotsav which celebrates 75 years of India’s Independence. The nationwide campaign Har Ghar Tiranga organised last year was a roaring success and this year even a more ambitious programme ‘Meri Maati Mera Desh’ is being rolled out under Azadi ka Amrit Mahotsav, he added. Sh. Apurva Chandra explained that installing Shilaphalakam as tribute to bravehearts, Mitti ka Naman and Veeron ka Vandan are the key components of the campaign Meri Maati Mera Desh. Har Ghar Tiranga will also be organised this year but as an important component of Meri Maati Mera Desh, he added. The Secretary also highlighted the role of media in generating awareness about the campaign and taking it to every nook and corner of the country.
Secretary, Culture,Shri Govind Mohan in his presentation informed that the campaign will feature programs like the establishment of Shilaphalakams dedicated to freedom fighters and security forces, as well as initiatives like Panch Pran Pledge, Vasudha Vandan, Veeron ka Vandan which venerates the gallant sacrifices of our bravehearts. Shilaphalakam or Memorial plaques saluting the spirit of sacrifice of local bravehearts from the village, panchayat, block, town, city, municipality etc. are to be erected across urban and rural areas. It will have Prime Minister’s message with the names of those who have laid down their lives for the nation belonging to that region.
Sh Govind Mohan said that this campaign is the concluding event of ‘Azadi ka Amrit Mahotsav,’ which began on 12th March, 2021, and has witnessed widespread public participation (Jan Bhagidari) with over 2 lakh programs organized across India. From 9th- 30th August, 2023, the ‘Meri Maati Mera Desh’ campaign will include programs at the village, and block levels , by local urban bodies, as well as state and national level.
He further elaborated that an ‘Amrit Kalash Yatra’ will be conducted, carrying soil from all corners of the country in 7500 kalash to create an ‘Amrit Vatika’ in Delhi This ‘Amrit Vatika’ will symbolize the commitment to ‘Ek Bharat Shreshtha Bharat’.
Giving further details, Culture Secretary said that to encourage mass participation (Jan Bhagidari), a website, https://merimaatimeradesh.gov.in, has been launched where people can upload selfies holding soil or an earthen lamp. By doing so, they take the pledge of Panch Pran, with focus to make India a developed country, eliminate the mentality of slavery, be proud of our rich heritage, uphold unity and solidarity, fulfill duties as citizens, and respect those who protect the nation. Once the pledge is taken, a digital certificate of participation can be downloaded from the website. Last year, “Har Ghar Tiranga” programme, became a grand success owing to participation of one and all. This year too, Har Ghar Tiranga will be celebrated between 13th -15th August, 2023. Indians everywhere can hoist the national flag, click selfie with the Tiranga and upload on Har Ghar Tiranga website. (harghartiranga.com).
Secretary Ministry of Youth Affairs and Sports Smt. Meeta Rajivlochan informed that the details of the nationwide campaign can be accessed on the portal https:// yuva.gov.in/meri_maati_mera_desh. Not only will the portal contain relevant information on various activities under Meri Maati Mera Desh campaign, the youth can also join the campaign through this portal by uploading their activities like selfies and planting of saplings on this website. She urged the youth to take part in the campaign with enthusiasm and to also engage all around them in the nation wide effort to pay tribute to our Bravehearts and our Motherland.
Chief Executive Officer (CEO), Prasar Bharti Shri Gourav Dwivedi gave the details of media coverage of Meri Maati Mera Desh campaign through Akashvani, Doordarshan and other digital platforms of Prasar Bharti.
The ‘Meri Maati Mera Desh’ campaign will start on 9th August, with scheduled programs until Independence Day on 15thAugust,2023. Subsequent events will take place from 16th August , 2023 onwards at block, municipality/corporation, and state levels. The closing ceremony is scheduled for 30th August, 2023, on the Kartavya Path, New Delhi in the presence of dignitaries.
****
Meri Mati Mera Desh Abhiyan | देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या ‘वीरांना’ श्रद्धांजली वाहण्यासाठी “मेरी माटी मेरा देश” मोहीम
गावापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत देशव्यापी जन-भागीदारी कार्यक्रम आयोजित केले जाणार
ग्रामपंचायतींमध्ये शिलाफलक (स्मारक फलक) बसवण्यात येणार
अमृत वाटिका निर्मितीसाठी अमृत कलश यात्रेत देशाच्या कानाकोपऱ्यातून दिल्लीत माती आणली जाणार
Meri Mati Mera Desh Abhiyan | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नुकतेच त्यांच्या मन की बात (Man Ki Bat) प्रसारणादरम्यान ‘मेरी माटी मेरा देश’ मोहिमेची (Meri Mati Mera Desh Abhiyan) घोषणा केली होती. देशासाठी बलिदान दिलेल्या शूर स्वातंत्र्यसैनिकांचा आणि शूरवीरांचा सन्मान करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. या मोहिमेत शूरवीरांच्या (वीर) स्मरणार्थ देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. (Meri Mati Mera Desh Abhiyan)
त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अमृत सरोवरांजवळील ग्रामपंचायतींमध्ये शिलाफलक (स्मारक फलक) उभारले जातील. माहिती आणि प्रसारण तसेच दूरसंचार विभागाचे सचिव अपूर्व चंद्रा , सांस्कृतिक सचिव गोविंद मोहन आणि युवा व्यवहार सचिव मीता राजीवलोचन यांनी आज नवी दिल्लीत आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी देखील उपस्थित होते.
पत्रकार परिषदेला संबोधित करताना अपूर्व चंद्रा म्हणाले की, ‘मेरी माटी मेरा देश ‘ हा भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करणाऱ्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा समारोप कार्यक्रम असेल. गेल्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या हर घर तिरंगा या देशव्यापी अभियानाला अभूतपूर्व यश मिळाले आणि यावर्षी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत ‘मेरी माटी मेरा देश’ हा आणखी एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सुरु करण्यात येत आहे असे ते म्हणाले. (Aazadi ka Amrit Mahotsav)
शूरवीरांना आदरांजली म्हणून शिलाफलक बसवणे , मिट्टी का नमन आणि वीरों का वंदन हे मेरी माटी मेरा देश या मोहिमेचे प्रमुख घटक असल्याचे अपूर्व चंद्रा यांनी स्पष्ट केले. मेरी माटी मेरा देश या मोहिमेचा एक महत्त्वाचा घटक म्हणून या वर्षीही हर घर तिरंगा अभियान आयोजित केले जाईल असे ते पुढे म्हणाले. या मोहिमेबद्दल जागरूकता निर्माण करण्यात आणि ती देशाच्या कानाकोपऱ्यात नेण्यात माध्यमांची भूमिकाही त्यांनी अधोरेखित केली.
सांस्कृतिक सचिव गोविंद मोहन यांनी आपल्या सादरीकरणात माहिती देताना सांगितले की या मोहिमेमध्ये आपल्या शूरवीरांच्या बलिदानाला अभिवादन म्हणून स्वातंत्र्यसैनिक आणि सुरक्षा दलांना समर्पित शिलाफलकांची उभारणी तसेच पंच प्रण प्रतिज्ञा, वसुधा वंदन, वीरों का वंदन यांसारखे उपक्रम सादर केले जातील. वीरहृदयांची. गाव, पंचायत, गट, शहर, नगरपालिका क्षेत्रातील स्थानिक शूरवीरांच्या त्यागाच्या भावनेला वंदन करणारे शिलाफलक किंवा स्मारक फलक शहरी आणि ग्रामीण भागात उभारले जाणार आहेत. त्यामध्ये त्या भागातील ज्या शूरवीरांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली त्यांच्या नावांबरोबर पंतप्रधानांचा संदेश असेल. ही मोहीम 12 मार्च 2021 रोजी सुरू झालेल्या ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ या विशेष आयोजनाच्या समारोपाचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमांतर्गत भारतभरात 2 लाखाहून अधिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. देशभरातील जनतेने यात व्यापक लोकसहभाग (जन भागीदारी) नोंदवला आहे, अशी माहिती गोविंद मोहन यांनी दिली. 9 ते 30 ऑगस्ट, 2023 दरम्यान, ‘मेरी माटी मेरा देश’ मोहिमेत गाव आणि गट स्तरावर स्थानिक शहरी संस्था तसेच राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांचा समावेश असेल, असेही त्यांनी सांगितले.
दिल्लीत ‘अमृत वाटिका’ तयार करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून 7500 कलशांमध्ये माती घेऊन ‘अमृत कलश यात्रा’ काढण्यात येणार असून ही ‘अमृत वाटिका’ ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या वचनबद्धतेचे प्रतीक असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जनसहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी (जन भागीदारी) https://merimaatimeradesh.gov.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले असून लोक माती किंवा मातीचा दिवा हाती धरून काढलेला सेल्फी या संकेतस्थळावर अपलोड करू शकतील, असे या मोहिमेबद्दल अधिक माहिती देताना सांस्कृतिक सचिवांनी सांगितले. या कृतीतून लोक भारताला विकसित देश बनवणे, गुलामगिरीची मानसिकता दूर करणे, आपल्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगणे, एकता आणि बंधुता टिकवून ठेवणे, नागरिकाची कर्तव्ये पार पाडणे आणि देशाचे रक्षण करणाऱ्यांप्रति आदर व्यक्त करणे यावर लक्ष केंद्रित करून पंच प्रणांची प्रतिकात्मक प्रतिज्ञा घेतात. अशा प्रकारे राष्ट्र प्रतिज्ञा घेतल्यानंतर सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र वेबसाइटवरून डाउनलोड केले जाऊ शकते. गेल्या वर्षी सर्वांच्या सहभागामुळे “हर घर तिरंगा”उपक्रम यशस्वी झाला होता. या वर्षी देखील, 13 ते 15 ऑगस्ट 2023 दरम्यान ‘हर घर तिरंगा’ उपक्रम साजरा केला जाणार आहे. भारतीय सर्वत्र राष्ट्रध्वज फडकावू शकतात आणि तिरंग्यासोबत सेल्फी काढून ‘हर घर तिरंगा’ संकेतस्थळावर अपलोड करू शकतात. (harghartiranga.com).
या देशव्यापी मोहिमेचा तपशील https://yuva.gov.in/meri_maati_mera_desh या पोर्टलवर पाहता येईल, अशी माहिती युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या सचिव मीता राजीवलोचन यांनी दिली. पोर्टलवर केवळ ‘मेरी माटी मेरा देश’ मोहिमेतील विविध उपक्रमांची संबंधित माहिती नसून,तरूण या वेबसाइटवर सेल्फी आणि रोपे लावण्यासारखे उपक्रम अपलोड करून या पोर्टलद्वारे मोहिमेत सामील होऊ शकतात. तरुणांनी या मोहिमेत उत्साहाने सहभागी होण्याचे तसेच आपल्या शूरवीरांना आणि आपल्या मातृभूमीला आदरांजली वाहण्यासाठी देशव्यापी कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन मीता राजीवलोचन यांनी केले.
प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) गौरव द्विवेदी यांनी आकाशवाणी, दूरदर्शन आणि प्रसार भारतीच्या इतर डिजिटल व्यासपीठाद्वारे ‘मेरी माटी मेरा देश’ मोहिमेच्या प्रसारमाध्यमांवरच्या प्रसारणाची माहिती दिली.
‘मेरी माटी मेरा देश’ मोहीम 9 ऑगस्ट रोजी सुरू होईल आणि 15 ऑगस्ट 2023 रोजी स्वातंत्र्य दिनापर्यंत नियोजित कार्यक्रमांसह चालणार आहे. त्यानंतरचे कार्यक्रम 16 ऑगस्ट 2023 पासून गट, नगरपालिका/ नगरपरिषद आणि राज्य स्तरावर होतील. 30 ऑगस्ट 2023 रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत कर्तव्य पथ, नवी दिल्ली येथे समारोप समारंभ होणार आहे.
Meri Mati Mera Desh | तिरंगा ध्वज वाटपासाठी नोडल ऑफिसरची नेमणूक करण्याचे क्षेत्रीय कार्यालयांना आदेश
Meri Mati Mera Desh | स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमाअंतर्गत “मेरी माटी मेरा देश” (Meri Mati Mera Desh) उपक्रम राबविणेकामी तिरंगा ध्वज वाटपासाठी नोडल ऑफिसर (Nodal Officer) यांची क्षेत्रीय कार्यालय (PMC Ward Office’s) आणि परिमंडळ स्तरावर नेमणूक करण्याचे आदेश उपायुक्त्त चेतना केरुरे (Deputy Commissioner Chetana Kerure) यांनी दिले आहेत. (Meri Mati Mera Desh)
Meri Mati Mera Desh Abhiyan | “मेरी माटी, मेरा देश” : देशव्यापी अभियानाच्या महाराष्ट्र प्रदेश संयोजकपदी भाजपचे राजेश पांडे
महाविजय २०२४: पुणे महानगरपालिकेसोबतच पांडे यांच्याकडे शिरूर लोकसभेच्या समन्वयाची जबाबदारी
Meri Mati Mera Desh Abhiyan |’मन की बात’ (Man ki Bat) या लोकप्रिय कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मांडलेल्या “मेरी माटी, मेरा देश” (Meri Mati Mera Desh Abhiyan) या देशव्यापी आणि लोकाभिमुख अभियानाच्या महाराष्ट्र प्रदेश संयोजकपदी भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष राजेश पांडे (Rajesh Pande BJP) यांची निवड प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली आहे. तसेच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत विजयासाठी भारतीय जनता पार्टीच्या ‘महाविजय २०२४’ साठी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे समन्वयकपद म्हणून पांडे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. बावनकुळे यांच्या हस्ते दोन्ही निवडीचे पत्र पांडे यांना बुधवारी (२ जुलै २०२३) मुंबईत प्रदेश कार्यालयात प्रदान करण्यात आले. (Meri Mati Mera Desh Abhiyan)
देशासाठी प्राणांची बाजी लावलेल्या हुतात्म्यांच्या सन्मानार्थ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘मेरी माटी, मेरा देश’ उपक्रम साकार होत आहे. या देशव्यापी अभियानात ‘मिट्टी यात्रा’, ‘वसुधा वंदन’, ‘वीरो को वंदन’, ‘ध्वज वंदन’, शिलाफलकांची उभारणी अशा उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाची महाराष्ट्रात राज्यभर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पांडे यांच्यावर असेल.
उपक्रमाचा समारोप दिल्लीत कर्तव्य पथावर ७५०० युवकांच्या उपस्थितीत होईल. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत युवकांना पंचप्राण शपथ देऊन देशभरातून गोळा केलेल्या मातीतून अमृत वाटिकेचे निर्माण करण्यात येईल. या अभियानाने ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ स्मारकाचे समर्पण करण्यात येईल.
———
देशाच्या अमृतमहोत्सवानिमित्त आम्ही यापूर्वी ‘हर घर तिरंगा’ विश्वविक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मदतीने राबविला. देशाचा अभिमान जागविणारे “मेरी माटी, मेरा देश” अभियान महाराष्ट्रात प्रत्येक नागरिकांपर्यंत आणि ४० लाख युवकांपर्यंत घेऊन जाण्याचा आमचा संकल्प आहे. ‘संघटन हेच सामर्थ्य’ या विश्वासातून मी गेली ४० वर्षे संघटनेत कार्यरत आहे. नवीन जबाबदारीतही त्याच निष्ठेने पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी सर्वांसोबत काम करेन. माझ्यावर विश्वास ठेवून दिलेल्या जबाबदारीबद्दल मी मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे आणि उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे मनापासून आभार मानतो.
| राजेश पांडे उपाध्यक्ष, भाजप , महाराष्ट्र प्रदेश-
News Title |Meri Mati Mera Desh Abhiyan | “Meri Mati, Mera Desh”: BJP’s Rajesh Pandey as Maharashtra Pradesh Coordinator of Nationwide Campaign