Maharashtra Politics | अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तर आठ जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

Maharashtra Politics | अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तर आठ जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

Maharashtra Politics | विधानसभेचे सदस्य अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह नऊ जणांनी आज दुपारी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ (Oath For Minister) घेतली. त्यांना राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांनी राजभवनातील (Raj Bhavan) दरबार हॉलमध्ये पद व गोपनीयतेची शपथ दिली. (Maharashtra Politics)
            आज मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये श्री. छगन चंद्रकांत भुजबळ (Minister Chagan Bhujbal), श्री. दिलीप दत्तात्रय वळसे- पाटील (Minister Dilip walse Patil), श्री. हसन मियालाल मुश्रीफ (Minister Hasan Mushrif), श्री. धनंजय पंडितराव मुंडे (Minister Dhananjay Munde), श्री. धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम (Dharmravbaba Aatram), आदिती सुनील तटकरे (Minister Aditi Tatkare), श्री. संजय बाबूराव बनसोडे (Sanjay Bansode), श्री. अनिल भाईदास पाटील (Anil Patil) यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
            यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, विधानसभेचे सदस्य, लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.
०००००

Buldhana Bus Accident | Samruddhi Mahamarg | पाच लाख देऊन प्रश्न सुटणार नाही | शरद पवार

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

Buldhana Bus Accident | Samruddhi Mahamarg | पाच लाख देऊन प्रश्न सुटणार नाही | शरद पवार

Buldhana Bus Accident | Samruddhi Mahamarg | समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) अपघात झाला की राज्यसरकार पाच लाख रुपये जाहीर करते. या पाच – सहा लाखातून हे प्रश्न सुटणार नाहीत. जे झाले ते वाईट झाले असून यासंदर्भात या देशामध्ये रस्ते व त्याचे नियोजन या सगळ्या संबंधीचे ज्ञान असणारे आणि जे कर्तबगार लोक आहेत त्यांची एक टीम तयार करावी…संपूर्ण रस्त्याची पुन्हा पाहणी करावी… कुठे चूक झालेली आहे… कशामुळे चूक झाली आहे…ती शोधून काढावी आणि याप्रकारे लोक जात आहेत ती स्थिती आणि याप्रकारचे वाढते अपघात आहेत ती स्थिती थांबवण्यास हातभार लावावा. पाच लाख रुपये जाहीर करुन प्रश्न सुटणार नाहीत. जी कमतरता आहे ती शोधून काढली पाहिजे. अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली आहे.
आज पुणे येथील एका कार्यक्रमानंतर समृद्धी महामार्गावर (Samruddhi Expressway) झालेल्या भीषण अपघाताबाबत पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पवार म्हणाले, समृद्धी महामार्गावर अनेक अपघात झाले ही गोष्ट खरी आहे परंतु दुर्दैवाने या महामार्गावर सातत्याने कुठे ना कुठे अपघात होत आहेत. हे गेले काही महिने बघायला मिळते आहे. मध्यंतरी या महामार्गावरुन जात असताना काही लोकांनी याबाबत त्यांचा अनुभव सांगितला. त्यावेळी त्या लोकांनी या महामार्गाची महाराष्ट्रात फार मोठी चर्चा झाली, फार उदोउदो झाला. पण आम्हाला सातत्याने एखाद दुसरा अपघात पहायला मिळत आहेत. त्याचे कारण कदाचित याचे सायंटिफिक  नियोजन केले नसावे त्याचा दुष्परिणाम लोक मृत्युमुखी पडत आहेत. (Buldhana Bus Accident)
हा महामार्ग तयार करण्याच्या कालावधीत, निर्णय घेण्यात, त्याचे नियोजन आखण्यात ज्यांची जबाबदारी होती त्या लोकांना ते कळत – नकळत दोषी ठरवतात. काय झाले असेल ते झाले असेल पण जी दुर्घटना घडली ती दु:खद आहे. (Samruddhi Highway)
पवार पुढे म्हणाले, माझं वैयक्तिक मत आहे. आपण प्रवास करताना डोक्यात काही खुणा असतात, काही वळणे दिसतात, झाडे दिसतात परंतु या प्रवासात रस्त्याची सलगता आहे आणि आजुबाजुला कुठे काही नाही. अनेक ठिकाणी या गोष्टीचा परिणाम वाहन चालवतो त्यांच्यावर होतो का अशी शंका काही लोकांनी बोलून दाखवली आहे. मी काही त्यातला तज्ज्ञ नाही पण यातील जे काही तज्ज्ञ आहेत त्यांचा सल्ला घेतला पाहिजे आणि कुठे दुरुस्ती करायची शक्यता असेल तर ती केली पाहिजे. (Buldhana Bus Accident Update)
एमएसआरडीसीने त्यांच्या ज्या काही कमतरता आहेत त्या दुसर्‍यावर ढकलायचा प्रयत्न केला आहे. माझे मते या देशातील इंडियन रोड काँग्रेसने यांची पाहणी केली असे तुम्ही म्हणत असाल आणि जर हे खरे असेल तर जगातील जे चांगले तज्ज्ञ आहेत त्यांना बोलवावे. त्यांची एक कमिटी करावी. त्यामार्फत चौकशी करावी, त्यांचे रिकमेंडेशन घ्यावे आणि करेक्शन मेजर द्यावीत असा सल्ला दिला तर त्याची अंमलबजावणी करावी कारण लोकांचे प्राण हे महत्वाचे आहेत. असे ही पवार यांनी सांगितले.
 News Title | Buldhana Bus Accident |  Samruddhi Mahamarg |  Paying five lakhs will not solve the problem  Sharad Pawar

Javed Akhtar | Shabana Azami | महिलेला स्वतंत्र विचार करू द्या , तिला सन्मानाची वागणूक द्या

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

Javed Akhtar | Shabana Azami | महिलेला स्वतंत्र विचार करू द्या , तिला सन्मानाची वागणूक द्या

Javed Akhtar | Shabana Azami | महिलांना कोणत्याही क्षेत्रात कमी न लेखता त्यांना बरोबरीची आणि सन्मानाची वागणूक देण्याची गरज असून महिलांचे युग आले आहे, अशा शब्दात जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी आपले मत मांडले. प्रत्येक क्षेत्रात मोठमोठ्या पदावर त्या काम करू लागल्या आहेत. त्यांना आदर नाही, तर एक व्यक्ती म्हणून बरोबरीचे स्थान देण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी नमूद केले. शबाना आझमी (Sbabana Azami) यांनी यावेळी बोलताना महिला ही घरातील एक गरज आहे म्हणून न बघता ती एक स्वतंत्र व्यक्ती असून तिलाही स्वतंत्र विचार करू द्यायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त केली. (Javed Akhtar | Shabana Azami)

महिला धोरण यशस्वी झाले याचे समाधान |  शरद पवार

संधी दिली, की महिला तिचं सोनं करतात, याची खात्री होती. म्हणूनच संपूर्ण देशभरात सर्वप्रथम महाराष्ट्रात महिला धोरण आणलं. ते आज यशस्वी झालेलं पाहून नक्कीच समाधान वाटत आहे, अशा शब्दात खासदार शरद पवार (MP Sharad Pawar) यांनी आज आपल्या भावना व्यक्त केल्या.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने कृषी, साहित्य, उद्योजकता,  सामाजिक, क्रीडा प्रशिक्षण आणि पत्रकारिता क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील सहा यशस्विनींना आज प्रख्यात लेखक आणि कवी जावेद अख्तर आणि अभिनेत्री शबाना आझमी यांच्या हस्ते यशस्विनी सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात सांगली येथील डॉ. सुनिता बोर्डे यांना ‘यशस्विनी साहित्य सन्मान’, सातारा येथील भारती नागेश स्वामी यांना ‘यशस्विनी कृषी सन्मान’,  पुणे येथील लक्ष्मी नारायणन यांना ‘यशस्विनी सामाजिक सन्मान’, ठाणे येथील शर्मिला प्रभाकर कलगुटकर यांना ‘यशस्विनी पत्रकारिता सन्मान’, नांदेड येथील राजश्री पाटील यांना ‘यशस्विनी उद्योजकता सन्मान’ तर नाशिक येथील शैलजा जैनेंद्रकुमार जैन यांना ‘यशस्विनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान’ या पुरस्कारांनी गौरविण्यात आले. सन्मानपत्र, यशवंतराव चव्हाण यांची प्रतिकृती असलेले सन्मानचिन्ह आणि २५ हजार रुपयांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
खासदार श्रीनिवास पाटील, यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. फौझिया खान, सुरेखा ठाकरे, उषा दराडे, आशा मिरगे, अंकुश काकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष माजी महापौर प्रशांत जगताप, विद्या चव्हाण, अजित निंबाळकर, सेंटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीप्ती नाखले, राजलक्ष्मी भोसले, वैशाली नागवडे, मृणालिनी वाणी, भारती शेवाळे, कविता आल्हाट, लोचन शिवले, वासंती काकडे, आमदार, राज्यातील चव्हाण सेंटरचे पदाधिकारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच राज्यभरातून आलेल्या महिला भगिनी यावेळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.
खासदार शरद पवार यांनी यावेळी बोलताना राज्यात महिला धोरण आणताना झालेला विरोध, त्यासाठी करावा लागलेला संघर्ष आणि त्या सर्वांवर मात करत महिला धोरण कसे लागू केले आणि हळूहळू त्यांचा तो निर्णय कसा लोकांना आवडू लागला यावर सविस्तर विवेचन केले. देशाचे संरक्षण मंत्री असताना संरक्षण दलातही महिलांसाठी खास आरक्षण ठेवण्याची गरज आणि त्यानुसार नियोजन कसे केले. आणि आजमितीला संरक्षण दलात महिला अधिकारी कशा कामगिरी बजावत आहेत. हवाई दलातील अपघातांचे प्रमाण महिलांमुळेच कसे कमी झाले, याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. पुरस्कारार्थी सहाही यशस्विनीनी यावेळी पुरस्काराप्रती आपल्या भावना व्यक्त करतानाच त्या त्या क्षेत्रात त्या करत असलेल्या कामांची माहिती दिली. सेंटरचे पुणे केंद्र सचिव अंकुश काकडे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. मनाली भिलारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
—-
News Title | Javed Akhtar  Shabana Azami |  Let the woman think independently, treat her with dignity

Sharad Pawar News | राणेपुत्रांचा पुणे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

Sharad Pawar News | राणेपुत्रांचा पुणे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध

Sharad Pawar News |  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि देशाचे नेते  शरद पवार (NCP Supremo Sharad pawar) यांच्याबाबत अनुदार उद्गार काढणारे माजी खासदार निलेश राणे (MP Nilesh Rane) आणि आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane)  यांच्याविरोधात पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP Pune) वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. (Sharad Pawar News)

यावेळी प्रवक्ते प्रदिप देशमुख, संतोष नांगरे , नितीन कदम , किशोर कांबळे , अमोल ननावरे , अजिंक्य पालकर , मूणालिणी वाणी , शशिकला कुंभार , सुशांत ढमढेरे , मंगेश जाघव ,संकेत शिंदे , प्रतिक कांबळे , बाळासाहेब अटल समिर पवार व पक्षाचे पदाधिकारी , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (NCP Pune Agitation)

राणे बंधू हे सातत्याने आदरणीय पवार साहेबांवर अतिशय खालच्या भाषेत वक्तव्ये करीत आहेत. लोकशाहीत विरोधकांना टिकेचा अधिकार दिला आहे. तो त्यांनी अवश्य वापरावा परंतु आपले वडील देखील ज्यांच्या पायावर नतमस्तक होतात त्यांच्यावर खालच्या भाषेत टिका करताना राणे बंधू यांनी किमान लाज बाळगावी अशी टिका यावेळी करण्यात आली
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.राणे बंधू यांनी यापुर्वी अनेक वेळा मर्यादा सोडून वक्तव्ये केली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता केवळ संसदीय लोकशाहीतील संस्कारामुळे शांत आहे परंतु जर तो भडकला तर राणे बंधूंना पळता भुइ थोडी होइल असा इशारा पक्षाचे प्रवक्ते प्रदिप देशमुख यांनी दिला आहे.


News Title |Sharad Pawar News | Raneputra protested by Pune Nationalist Congress

NCP president Sharad Pawar | महाराष्ट्र की राजनीति में इतने अहम क्यों हैं शरद पवार?

Categories
Breaking News Political social देश/विदेश पुणे महाराष्ट्र हिंदी खबरे

NCP president Sharad Pawar | महाराष्ट्र की राजनीति में इतने अहम क्यों हैं शरद पवार?

| शरद पवार कितनी बार महाराष्ट्र के मुख्यमंत्री रह चुके हैं?  (How many times Sharad pawar was CM of Maharashtra?)

 NCP president Sharad Pawar | शरद पवार एक प्रमुख भारतीय राजनीतिज्ञ और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (NCP) के संस्थापक हैं।  वह पांच दशकों से अधिक समय तक भारतीय राजनीति में एक प्रमुख व्यक्ति रहे हैं और भारत सरकार में कई महत्वपूर्ण पदों पर रहे हैं, जिसमें महाराष्ट्र के मुख्यमंत्री के रूप में चार कार्यकाल शामिल हैं। NCP president Sharad Pawar
 शरद पवार का जन्म कब हुआ था?  (How old is Sharad pawar?)
  12 दिसंबर 1940 को महाराष्ट्र के एक छोटे से शहर बारामती में जन्मे, पवार ने 1960 के दशक के अंत में भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के सदस्य के रूप में अपना राजनीतिक जीवन शुरू किया।  वह पहली बार 1967 में महाराष्ट्र विधान सभा के लिए चुने गए और कांग्रेस पार्टी में विभिन्न पदों पर रहे।
  शरद पवार ने एनसीपी क्यों स्थापित की?  (Why Sharad pawar formed NCP?)
  1999 में, शरद पवार ने भारतीय राष्ट्रीय कांग्रेस से नाता तोड़ लिया और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का गठन किया।  एनसीपी एक क्षेत्रीय राजनीतिक दल है जो मुख्य रूप से महाराष्ट्र राज्य में काम करता है, लेकिन इसने भारत के अन्य राज्यों में भी अपनी पैठ बना ली है।
 शरद पवार जिन्होंने किस क्षेत्र में काम किया?
  शरद पवार महाराष्ट्र के विकास में एक महत्वपूर्ण व्यक्ति हैं, खासकर कृषि और उद्योग में।  उन्होंने 2005 से 2008 तक भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) के अध्यक्ष के रूप में भारत में क्रिकेट के विकास में भी महत्वपूर्ण भूमिका निभाई।
  वर्षों से, पवार कई प्रमुख राजनीतिक गठबंधनों का हिस्सा रहे हैं और उन्होंने भारत के राजनीतिक परिदृश्य को आकार देने में महत्वपूर्ण भूमिका निभाई है।  उन्होंने भारत सरकार में रक्षा मंत्री, कृषि मंत्री और उपभोक्ता मामले, खाद्य और सार्वजनिक वितरण मंत्री के रूप में कार्य किया है।  उन्होंने अंतर्राष्ट्रीय क्रिकेट परिषद (आईसीसी) के अध्यक्ष के रूप में भी काम किया है।
 महाविकास अघाड़ी में शरद पवार का क्या योगदान है?
  शरद पवार को भारतीय राजनीति की गहरी समझ के साथ एक चतुर और चतुर राजनेता के रूप में जाना जाता है।  उन्हें अक्सर सर्वसम्मति निर्माता के रूप में वर्णित किया गया है और सफल गठबंधन बनाने के लिए विभिन्न राजनीतिक दलों और नेताओं को एक साथ लाने में सक्षम हैं।
  हाल के वर्षों में, पवार भारत की सत्तारूढ़ भारतीय जनता पार्टी (भाजपा) के खिलाफ एकजुट विपक्ष बनाने के प्रयासों में सक्रिय रूप से शामिल रहे हैं।  वह विभिन्न विपक्षी दलों को एक साथ लाने और भाजपा के खिलाफ एक संयुक्त मोर्चा बनाने के उद्देश्य से कई बैठकों और चर्चाओं में सबसे आगे रहे हैं।
  शरद पवार भारत में एक राजनीतिक दिग्गज नेता हैं और उनका प्रभाव महाराष्ट्र से बाहर तक फैला हुआ है।  उनके राजनीतिक कौशल और भारत के विकास के प्रति प्रतिबद्धता के लिए उनका व्यापक रूप से सम्मान किया जाता है।  अपने अस्सी के दशक में होने के बावजूद, पवार भारतीय राजनीति में एक सक्रिय और प्रभावशाली व्यक्ति बने हुए हैं और भारतीय राजनीति में उनके योगदान को हमेशा याद किया जाएगा।
 —-
 राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का गठन कब हुआ था?  (When was national congress party formed?)
 राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (एनसीपी) भारत में एक क्षेत्रीय राजनीतिक दल है, जो मुख्य रूप से महाराष्ट्र राज्य में काम कर रही है।  पार्टी की स्थापना 1999 में प्रमुख भारतीय राजनीतिज्ञ और महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री शरद पवार ने की थी।  (शरद पवार)
 |  राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का गठन कैसे हुआ?  (How was NCP formed?)
  राकांपा का गठन भारतीय राष्ट्रीय कांग्रेस में विभाजन का परिणाम था, वह राजनीतिक दल जिसका पवार कई वर्षों से हिस्सा थे।  1990 के दशक के अंत में, सोनिया गांधी की नेतृत्व शैली से महाराष्ट्र के कुछ कांग्रेस नेताओं में असंतोष बढ़ रहा था, जिन्होंने अपने पति राजीव गांधी की हत्या के बाद पार्टी अध्यक्ष का पद ग्रहण किया था।
 शरद पवार ने कांग्रेस पार्टी क्यों छोड़ी?
  पवार सहित कुछ कांग्रेस नेताओं ने पार्टी के भीतर सत्ता के केंद्रीकरण पर नाराजगी जताई और महसूस किया कि क्षेत्रीय नेताओं के विचारों को नजरअंदाज किया जा रहा है।  युवा नेताओं को मौके नहीं मिलने से पार्टी के भीतर भी असंतोष का माहौल था।
 एनसीपी की स्थापना किसने की?  (Who formed ncp in 1999?)
  1999 में, पवार और तारिक अनवर और पी.  एक।  संगमा ने कई अन्य कांग्रेस नेताओं के साथ कांग्रेस से अलग होने और महाराष्ट्र के लोगों की जरूरतों के प्रति अधिक संवेदनशील एक नई राजनीतिक पार्टी बनाने का फैसला किया।
  एनसीपी को आधिकारिक तौर पर 25 मई 1999 को लॉन्च किया गया था, जिसके संस्थापक और अध्यक्ष पवार थे।  पार्टी के संस्थापक सदस्यों में महाराष्ट्र के अन्य प्रमुख राजनेताओं में छगन भुजबल, प्रफुल्ल पटेल और अजीत पवार शामिल थे।
  एनसीपी का गठन महत्वपूर्ण था क्योंकि यह पहली बार था जब भारत में मौजूदा राजनीतिक ढांचे के बाहर एक प्रमुख राजनीतिक दल का गठन किया गया था।  पार्टी किसी भी प्रमुख राष्ट्रीय राजनीतिक दल जैसे कांग्रेस, भारतीय जनता पार्टी (बीजेपी) या भारतीय कम्युनिस्ट पार्टी (सीपीआई) से संबद्ध नहीं थी।
 राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की अवधारणाएं और नीतियां क्या हैं?  (What is the concept of ncp and ideology of ncp?)
  शुरुआती दिनों में, एनसीपी ने एक मजबूत संगठनात्मक संरचना बनाने और महाराष्ट्र में अपना राजनीतिक आधार विकसित करने पर ध्यान केंद्रित किया।  पार्टी ने अपने राजनीतिक प्रभाव को बढ़ाने के लिए अन्य क्षेत्रीय दलों के साथ गठबंधन बनाने का काम किया।
—–

NCP president Sharad Pawar | शरद पवार यांना महाराष्ट्राच्या राजकारणात एवढे महत्व का आहे? 

Categories
Breaking News Political social देश/विदेश पुणे महाराष्ट्र

NCP president Sharad Pawar | शरद पवार यांना महाराष्ट्राच्या राजकारणात एवढे महत्व का आहे?

| शरद पवार किती वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते? (How many times Sharad pawar was CM of Maharashtra?)

NCP president Sharad Pawar | शरद पवार हे एक प्रमुख भारतीय राजकारणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) चे संस्थापक आहेत.  ते पाच दशकांहून अधिक काळ भारतीय राजकारणातील प्रमुख व्यक्ती आहेत आणि त्यांनी भारत सरकारमध्ये चार वेळा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासह अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.
शरद पवार यांचा जन्म कधी झाला? (How old is Sharad pawar) 
 12 डिसेंबर 1940 रोजी महाराष्ट्रातील बारामती या छोट्याशा शहरात जन्मलेल्या पवार यांनी 1960 च्या उत्तरार्धात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य म्हणून राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली.  1967 मध्ये ते पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले आणि त्यांनी काँग्रेस पक्षात विविध पदे भूषवली.
 शरद पवार यांनी NCP ची स्थापना का केली? (Why Sharad pawar formed NCP?) 
 1999 मध्ये शरद पवार यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून फुटून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली.  NCP हा एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे जो प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यात कार्यरत आहे, परंतु भारतातील इतर राज्यांमध्येही त्याने प्रवेश केला आहे.
शरद पवार यांनी कोण कोणत्या क्षेत्रात काम केले? 
 शरद पवार हे महाराष्ट्राच्या विकासात विशेषत: कृषी आणि उद्योगक्षेत्रातील महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व आहे.  2005 ते 2008 या कालावधीत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष म्हणूनही त्यांनी भारतातील क्रिकेटच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
 गेल्या काही वर्षांत पवार अनेक प्रमुख राजकीय आघाड्यांचा भाग राहिले आहेत आणि त्यांनी भारताच्या राजकीय परिदृश्याला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.  त्यांनी भारत सरकारमध्ये संरक्षण मंत्री, कृषी मंत्री आणि ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री म्हणून काम केले आहे.  आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे.
महाविकास आघाडीत शरद पवार यांचे योगदान काय? 
 शरद पवार हे भारतीय राजकारणाची सखोल जाण असलेले एक चतुर आणि चतुर राजकारणी म्हणून ओळखले जातात.  त्यांचे अनेकदा सहमती निर्माण करणारे म्हणून वर्णन केले गेले आहे आणि यशस्वी युती तयार करण्यासाठी विविध राजकीय पक्ष आणि नेत्यांना एकत्र आणण्यात ते सक्षम आहेत.
 अलिकडच्या वर्षांत, भारतातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) विरोधात एकसंघ विरोध निर्माण करण्याच्या प्रयत्नांमध्ये पवार सक्रियपणे सहभागी झाले आहेत.  विविध विरोधी पक्षांना एकत्र आणून भाजपच्या विरोधात संयुक्त आघाडी स्थापन करण्याच्या उद्देशाने अनेक बैठका आणि चर्चेत ते आघाडीवर राहिले आहेत.
 शरद पवार हे भारतातील राजकीय हेवीवेट नेते आहेत आणि त्यांचा प्रभाव महाराष्ट्राच्या पलीकडे पसरलेला आहे.  त्यांची राजकीय कुशाग्रता आणि भारताच्या विकासाप्रती त्यांची बांधिलकी यासाठी त्यांचा सर्वत्र आदर केला जातो.  ऐंशीच्या दशकात असूनही पवार हे भारतीय राजकारणातील सक्रिय आणि प्रभावशाली व्यक्तिमत्त्व आहेत आणि भारतीय राजकारणातील त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील.
—-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केंव्हा झाली? (When was national congress party formed?) 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे, जो प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यात कार्यरत आहे.  या पक्षाची स्थापना 1999 मध्ये प्रख्यात भारतीय राजकारणी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी केली होती. (Sharad pawar)
| राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा स्थापन झाला? (How was NCP formed?) 
 राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये (Indian national congress) फूट पडल्याचा परिणाम होता, पवार अनेक वर्षांपासून ज्या राजकीय पक्षाचा भाग होते.  1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात, पती राजीव गांधी यांच्या हत्येनंतर पक्षाच्या अध्यक्षपदी विराजमान झालेल्या सोनिया गांधी यांच्या नेतृत्वशैलीबद्दल महाराष्ट्रातील काही काँग्रेस नेत्यांमध्ये असंतोष वाढत होता.
शरद पवार यांनी काँग्रेस पक्ष का सोडला? 
 पवारांसह काही काँग्रेस नेते पक्षांतर्गत सत्तेच्या केंद्रीकरणावर नाराज होते आणि प्रादेशिक नेत्यांच्या विचारांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे त्यांना वाटले.  पक्षांतर्गत तरुण नेत्यांना संधी न मिळाल्याने नाराजीचेही वातावरण होते.
Ncp कुणी स्थापन केला? (Who formed ncp in 1999?) 
 1999 मध्ये, पवार आणि तारिक अन्वर आणि पी. ए. संगमा यांच्यासह इतर अनेक कॉंग्रेस नेत्यांनी कॉंग्रेसपासून फारकत घेण्याचा आणि महाराष्ट्रातील लोकांच्या गरजांना अधिक प्रतिसाद देणारा नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
 25 मे 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृतपणे सुरुवात झाली, त्याचे संस्थापक आणि अध्यक्ष पवार होते.  पक्षाच्या संस्थापक सदस्यांमध्ये छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक प्रमुख राजकारण्यांचा समावेश होता.
 NCP ची स्थापना महत्त्वपूर्ण होती कारण विद्यमान राजकीय चौकटीच्या बाहेर भारतात प्रथमच मोठा राजकीय पक्ष स्थापन झाला होता.  काँग्रेस, भारतीय जनता पार्टी (भाजप), किंवा भारतीय कम्युनिस्ट पार्टी (सीपीआय) यासारख्या कोणत्याही प्रमुख राष्ट्रीय राजकीय पक्षांशी हा पक्ष संलग्न नव्हता.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संकल्पना आणि धोरणे काय आहेत? (What is the concept of ncp and ideology of ncp?) 
 सुरुवातीच्या काळात, राष्ट्रवादीने एक मजबूत संघटनात्मक रचना तयार करण्यावर आणि महाराष्ट्रात आपला राजकीय पाया विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले.  पक्षाने आपला राजकीय प्रभाव वाढवण्यासाठी इतर प्रादेशिक पक्षांसोबत युती करण्याचे काम केले.
 गेल्या काही वर्षांत राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात तो महत्त्वाचा खेळाडू बनला आहे.  हा पक्ष राज्यातील अनेक सत्ताधारी युतींचा एक भाग आहे आणि भारतीय संसदेतही त्याचे प्रतिनिधित्व केले आहे.
 आज, राष्ट्रवादी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्षांपैकी एक आहे आणि इतर राज्यातही त्याचे लक्षणीय अस्तित्व आहे.  या पक्षाचे नेतृत्व शरद पवार करत आहेत, ज्यांना भारतातील सर्वात प्रभावशाली राजकारणी म्हणून ओळखले जाते.
 —

शरद पवार यांच्या परिवाराविषयी 

शरद पवार, प्रमुख भारतीय राजकारणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक, सार्वजनिक सेवा आणि राजकीय सक्रियतेचा दीर्घ इतिहास असलेल्या कुटुंबातून येतात.  पवारांनी राजकारणी म्हणून आपला ठसा उमटवलेल्या महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक विकासात त्यांच्या कुटुंबाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
बारामती आणि शरद पवार यांचे नाते काय? (How are Baramati and Sharad pawar related?)
 पवार यांचा जन्म 12 डिसेंबर 1940 रोजी महाराष्ट्रातील बारामती शहरात झाला.  त्यांचे वडील गोविंदराव पवार हे शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते होते ज्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता.  गोविंदराव पवार (Govindrao pawar) हे देखील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते आणि त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून काम केले होते.
 शरद पवार यांचे भाऊ अप्पासाहेब पवार (Aapasaheb pawar) हे देखील महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकीय व्यक्तिमत्व होते.  भाऊसाहेब पवार हे मुंबई विधानसभेचे सदस्य होते आणि 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता.
 शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार (Pratibha pawar) याही राजकारण आणि सामाजिक कार्यात सक्रिय असतात.  त्यांनी  महिला सक्षमीकरण आणि आरोग्यसेवा यासह अनेक सामाजिक उपक्रमांवर त्यांनी काम केले आहे.
शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे नाते काय आहे? (How are Supriya Sule and Sharad pawar related?)
 शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे याही एक प्रमुख राजकारणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्या आहेत.  तिने भारतीय संसदेच्या सदस्या म्हणून काम केले आहे आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे.
शरद पवार आणि अजित पवार यांचे नाते काय आहे? (How are Ajit Pawar and Sharad pawar Related?) 
 पवारांचे पुतणे, अजित पवार हे देखील एक प्रमुख राजकारणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत.  त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून काम केले असून राज्याच्या विकासात त्यांचा सक्रिय सहभाग आहे.
 पवार कुटुंबाला लोकसेवा आणि राजकीय कार्याचा मोठा इतिहास आहे आणि त्यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.  खुद्द शरद पवार हे भारतीय राजकारणातील पाच दशकांहून अधिक काळ महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व राहिले आहेत आणि भारतीय राजकारणातील त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील.
 —

Ajit Pawar Maharashtra Tour | विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून शरद पवारांच्या निर्णयाचे स्वागत

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

Ajit Pawar Maharashtra Tour | विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून शरद पवारांच्या निर्णयाचे स्वागत

| विरोधी पक्षनेते अजित पवार उद्यापासून आठ दिवस पुणे, सातारा, उस्मानाबाद, लातूर, नाशिक दौऱ्यावर 

Ajit Pawar Maharashtra Tour | शरद पवार (Sharad pawar) साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम रहावे हा राज्यातील, देशातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांचा आग्रह मान्य करुन पदावर कायम राहण्याचा घेतलेला निर्णय माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) प्रत्येक कार्यकर्त्याचा उत्साह वाढवणारा, राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडी, देशातील विरोधी पक्षांच्या एकजुटीला बळ देणारा आहे. साहेबांनींच राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम रहावे, असा आग्रह धरत, अध्यक्ष निवड समितीने साहेबांच्या निवृत्तीचा निर्णय फेटाळून लावला आणि साहेबांनीच अध्यक्षपदी कायम रहावे, (NCP president) हा निर्णय एकमताने घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे एक कुटुंब असून साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्ष राज्यात आणि देशात उज्जवल यश संपादन करेल,” असा विश्वास व्यक्त करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. (NCP president News)
 साहेबांनी राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहण्याचा निर्णय आपल्या सर्वांच्या आग्रहाखातर घेतला असून त्यांचे वय आणि प्रकृतीची काळजी घेऊन आपण सर्वांनी येणाऱ्या काळात अधिक जबाबदारी उचलावी, एकजुटीने आणि अधिक जोमाने काम करावे, साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करावा, असे आवाहनही अजित पवार यांनी केले आहे. (Ajit pawar news)
साहेबांच्या सकारात्मक निर्णयानंतर आम्ही सर्वजण आता पुन्हा नव्या जोमाने पक्षाच्या कामाला लागलो आहोत. आज उशीरापर्यंत मुंबईत थांबल्यानंतर उद्या 6 तारखेला मी दौंड, कर्जत दौऱ्यावर जात आहे. 7 तारखेला बारामती, 8 तारखेला कोरेगाव, सातारा, 9 तारखेला सातारा, फलटण. 10 तारखेला उस्मानाबाद, लातूर, 11 तारखेला नाशिक आणि 12 तारखेला पुणे असा माझा दौरा कार्यक्रम असणार आहे, अशी माहितीही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे. (Ajit pawar Maharashtra tour)
००००००

NCP New Chief Hindi News|  समिति ने शरद पवार का इस्तीफा नामंजूर कर दिया | नया प्रमुख कौन होगा?

Categories
Breaking News Political देश/विदेश महाराष्ट्र हिंदी खबरे

NCP New Chief Hindi News|  समिति ने शरद पवार का इस्तीफा नामंजूर कर दिया  नया प्रमुख कौन होगा?

NCP New Chief Hindi News| शरद  पवार (Sharad pawar) ने एनसीपी प्रमुख (ncp chief) के पद से हटने का फैसला किया है, लेकिन उनके इस्तीफे को चयन समिति ने खारिज कर दिया है।  समिति ने प्रस्ताव दिया है कि शरद पवार को पद पर बने रहना चाहिए।  प्रफुल्ल पटेल ने यह प्रस्ताव दिया है।  (NCP new chief Hindi news)
 मुंबई में एनसीपी के क्षेत्रीय कार्यालय में इस समय बैठक चल रही है।  सोलह सदस्यीय समिति ने पवार का इस्तीफा नामंजूर कर दिया है.  एनसीपी के कार्यालय के सामने कार्यकर्ताओं का हंगामा है।  कार्यकर्ता शरद पवार के नाम से ऐलान कर रहे हैं।  एक कार्यकर्ता ने अपने शरीर पर मिट्टी का तेल डालकर आत्मदाह करने का प्रयास किया।  उसे पुलिस ने हिरासत में लिया है।  (Sharad pawar News)
 शरद पवार ने मंगलवार को पद से हटने का फैसला किया है.  इससे पार्टी नेताओं, पदाधिकारियों व कार्यकर्ताओं में हड़कंप मच गया है।  नेता और कार्यकर्ता पवार से अध्यक्ष पद नहीं छोड़ने की गुहार लगा रहे हैं.  (Sharad pawar News)

NCP New Chief News | शरद पवार यांचा राजीनामा समितीने फेटाळला | कोण होणार नवीन अध्यक्ष? 

Categories
Breaking News Political देश/विदेश महाराष्ट्र

NCP New Chief News | शरद पवार यांचा राजीनामा समितीने फेटाळला | कोण होणार नवीन अध्यक्ष?

NCP New chief news : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन (NCP Chief) पायउतार होण्याचा निर्णय शरद पवार (Sharad pawar) यांनी घेतला आहे, पण त्यांचा राजीनामा निवड समितीने फेटाळला आहे. शरद पवारांनीच पदावर कायम राहावं, असा प्रस्ताव समितीने मांडला आहे. प्रफुल्ल पटेल यांनी या प्रस्ताव मांडला आहे. (NCP New Chief News)

मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात सध्या बैठक सुरु आहे. सोळा सदस्यांच्या समितीने पवारांचा राजीनामा फेटाळला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांचा गोंधळ सुरु आहे. कार्यकर्ते हे शरद पवार यांच्या नावानं घोषणा देत आहे. एका कार्यकर्त्याचा यावेळी अंगावर रॉकेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. (Sharad pawar news)

शरद पवार यांनी मंगळवारी पदावरून बाजूला होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. पवारांनी अध्यक्षपद सोडू नये, यासाठी नेते आणि कार्यकर्त्यांकडून त्यांची मनधरणी सुरू आहे. (NCP Sharad pawar)

NCP Pune Resigns Marathi news | अखेर पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

NCP Pune Resigns Marathi news | अखेर पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

NCP Pune Resigns Marathi news | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar retirement) यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. ही बातमी समजली आणि पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP Pune) सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. शरद पवार (Sharad Pawar resigns) यांना साकडे घालण्यासाठी राष्ट्रवादी भवनमध्ये कार्यकर्ते जमा झाले. प्रवक्ते प्रदीप देशमुख यांच्या प्रमुख उपस्थित सर्व कार्यकर्ते पक्ष कार्यालयाबाहेर उपस्थीत होते. (NCP Pune Resigns Marathi news)

याप्रसंगी बोलताना देशमुख म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस हा एक परिवार आहे. पवारसाहेब हे घरातील वडीलधारे कर्ते आहेत. घरातील वडीलधारे कधीही रिटायर होऊ शकत नाही. त्यामुळे साहेब निर्णय बदलत देत नाही तोपर्यंत आम्हीही सर्वजन राजीनाम्यावर ठाम आहोत. (Sharad pawar Latest News)

सगळ्याच कार्यकर्त्यांना यावेळी भावना अनावर झाल्या होत्या.अश्रू आवरत नव्हते. राजीनामा मागे घ्या अशा घोषणा दिल्या जात होत्या. (NCP Pune Resigns news)

प्रवक्ते प्रदीप देशमुख , रविंन्द्र माळवदकर , सदानंद शेट्टी , मुणालिनी वाणी , निलेश निकम , काका चव्हाण अजिंक्य पालकर, विक्रम जाधव , फईम शेख , गुरूमितसिंग गिल व इतर प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Pune Rashtravadi news)