Pune Cantonment Assembly Constituency | पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील ससून रुग्णालय चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांकरीता नूतन निवासी इमारतीचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन 

Categories
Breaking News cultural PMC Political social पुणे

Pune Cantonment Assembly Constituency | पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील ससून रुग्णालय चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांकरीता नूतन निवासी इमारतीचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन

| पुणे चक्राकार मार्गामुळे विकासाच्या नवीन संधी निर्माण होणार |उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

Pune Cantonment Assembly Constituency | पुणे चक्राकार मार्गामुळे (Pune Ring Road) पुणे (PMC), पिंपरी-चिंचवड (PMC), पीएमआरडीए (PMRDA)  क्षेत्रात विकासाच्या नवीन संधी तसेच अडीच लाख कोटी रुपयांची अर्थव्यवस्था नव्याने निर्माण होणार आहे; हा मार्ग येत्या काळात पुण्याच्या विकासाचे ते इंजिन ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी व्यक्त केला

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील ससून रुग्णालय चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांकरीता नूतन निवासी इमारत, महात्मा गांधी पूलगेट बसस्थानकाचे आधुनिकीकरण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराचा विकास, संगम घाटावरील संगमेश्वर गणेश विसर्जन घाटनुतनीकरण व नागरिकांसाठी निवारा केंद्र, आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बॉटनिकल उद्यानाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, माजी मंत्री दिलीप कांबळे, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार योगेश मुळीक, योगेश टिळेकर, माजी महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.

श्री. फडणवीस म्हणाले, पुणे रिंगरोड महत्वाचा असून त्यासाठी ८० टक्के भूसंपादनापर्यंत पूर्ण होत आहे. येत्या काळात या मार्गाचे काम सुरु करण्यात येणार आहे. आयटीपार्कच्या भागात आस्थापनांपर्यत जाण्यासाठी मेट्रोला जोडून स्कायबस सुरू करण्यात येणार असून येत्या काळात भूमीपूजन करण्यात येणार आहे. यामुळे आस्थापनांपर्यंत जाण्यासाठी वाहनाची आवश्यकता लागणार नाही आणि प्रदुषण होणार नाही.

वाहतूक नियोजनासाठी मेट्रोला कनेक्टिव्हिटी देण्याचे काम करण्यात येणार आहे. खोपोली ते खंडाळा दरम्यान ९ किमी मिसिंग लिंकचे काम करण्यात येत असून यामुळे मुंबई-ते पुणे दरम्यान अंतर कमी होऊन वाहतुकीचे प्रश्न सुटणार आहे.

पुणे शहरात २४ X ७ पाणी पुरवठा योजना, नदी सुधार कार्यक्रम यासारख्या विविध प्रकारच्या योजना राबवून विकास कामांच्या माध्यमातून शहराचे चित्र बदलण्याचे काम सुरु आहे. पीएमपीएलच्या माध्यमातून देशातील पहिली इलेक्ट्रीक बसची फ्लिट पुणे शहरात केली आहे. पुण्याचे या मॉडेलची देशात अंमलबजावणी करण्यात येत असून विविध शहराने ते स्वीकारले आहे. मेट्रोचे कामे अतिशय गतीने करण्यात येत आहे. सिव्हील कोर्ट ते स्वागेट मेट्रोचे मुठा नदीच्या गर्भातून भुयारी चाचणी घेण्यात आली असून येत्या काळात मेट्रोचे तीन्ही मार्ग मिळून एकूण ५४ कि.मीचे मेट्रोचे जाळे सुरु करण्यात येत आहे. येत्या वर्षभरात टाटाच्या मेट्रोचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर सौदर्यीकरण आणि ससून रुग्णालय चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांकरीता अतिशय अद्ययावत प्रकारचे निवासस्थान तयार करण्यात येत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून शेवटच्या माणसाचा विचार केला असून त्याच विचारला अनुसरून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांला राहण्याची व्यवस्था होत आहे. महात्मा गांधी पूलगेट बसस्थानकाचा नीट नियोजन करत सर्वांगिण गरजांचा विचार करुन आराखडा तयार करण्यात आला आहे. संगम घाट येथील निवारा केंद्र आणि गणेश विसर्जनाचे नुतनीकरण तसेच छत्रपती संभाजी महाराज बॉटनिकल गार्डन तयार करण्यात येत आहे. विविध विकास कामांच्या माध्यमातून पुणे कॅन्टोन्मेंटमट विधानसभा मतदारसंघात बदल होतांना दिसून येत आहे.

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात संरक्षण विभागाचा भाग असल्याने निर्बंध असून महानगरपालिका आणि शासनाला विकास करतांना समस्या निर्माण होत आहे. महानगरपालिकेप्रमाणे दिल्या जाणाऱ्या वस्तु व सेवाकर स्वरुपात परतावा दिला जातो त्याप्रमाणे कॅन्टोन्मेंट मंडळाला निधी मिळण्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल. महानगरपालिका क्षेत्रातील योजना कॅन्टोन्मेंट मंडळाला लागू करण्याबाबत येत्या काळात पुणे महानगरपालिका, नगर विकास विभाग आणि सर्व संबंधित विभागासोबत बैठक घेण्यात येईल, अशा कॅन्टोन्मेंट मंडळातील प्रलंबित विकास कामे मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

रेल्वेच्या जमिनीवर एसआरएअंतर्गत झोपडपट्टीधारकांना घरे बांधण्यासाठी त्यांचे पुनर्वसन करण्याकरीता जागा उपलब्ध करुन देण्याबाबत विनंती केली आहे. त्याबदल्यात रेल्वे विभागाला इतरत्र राज्य शासनाची जमीन देण्यात येईल किंवा मोबादला देण्यात येणार आहे. यामुळे झोपडपट्टीधारकांचा घरांचा उपलब्ध होईल तसेच अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागेल. याबाबत भारत सरकार सकारात्मक असून येत्या काळात निर्णय होण्याची अपेक्षा आहे. रहिवाशांच्या प्रश्नाबाबत केंद्र सरकार सोबत चर्चा करुन मार्गच काढण्यात येईल, असे आश्वासन श्री. फडणवीस यांनी दिले.

श्री. पाटील म्हणाले, गेल्या दीड वर्षात राज्यातील विकासाला गती मिळाली असून राज्यासह पुण्यातील अनेक पायाभूत सुविधांचा विकास शासनाने केला आहे. लहुजी वस्तादांच्या स्मारकाचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल असे सांगून ससून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी बांधलेल्या निवासाच्या इमारती व पुणे स्टेशन परिसरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील सुशोभीकरण ही कामे महत्त्वपूर्ण असल्याचे श्री पाटील यांनी सांगितले.

आमदार श्री. कांबळे म्हणाले, पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघाच्या विकासासाठी शासनाने गेल्या दीड वर्षात ९० कोटी रुपये निधी उपलब्ध करुन दिला आहे. केंद्र सरकारने कॅन्टोन्मेंटचे महानगरपालिकेकडे विलीनीकरण करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याप्रमाणे कॅन्टोन्मेंट भागातील नागरिकांना न्याय मिळेल, असे श्री कांबळे म्हणाले.

माजी मंत्री श्री.कांबळे यांनी यावेळी विचार व्यक्त केले.

Pune BJP New Office |  शहर भाजपचे नवीन कार्यालय सुरू | देवेंद्र फडणवीस यांच्यासहित विविध नेत्यांकडून शुभेच्छा 

Categories
Breaking News Political पुणे

Pune BJP New Office |  शहर भाजपचे नवीन कार्यालय सुरू | देवेंद्र फडणवीस यांच्यासहित विविध नेत्यांकडून शुभेच्छा

 

Pune BJP New Office | विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आज शहर भाजपच्या एरंडवण्यातील डीपी रस्त्यावरील (DP Road Pune) नूतन कार्यालयाला भेट देऊन शुभेच्छांचा वर्षाव केला. अत्यंत उत्साही वातावरणात जय श्रीरामच्या जयघोषात नूतन कार्यालय कार्यान्वित झाले. शहर भाजपचे पुणे महानगरपालिका (PMC Pune)  परिसरातील मध्यवर्ती कार्यालय नवीन वास्तुत स्थलांतरित करण्याच्या निमित्ताने स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. (Pune BJP New Office)

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athvale), प्रदेश भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) , उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील (Chandrakant Patil), ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (girish Mahajan) यांनी कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक राजकीय सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिली. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate BJP Pune) यांनी स्वागत केले.

सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि पुणे शहराचा गतिमान पारदर्शक विकास करण्यासाठी या कार्यालयाच्या माध्यमातून अविरत प्रयत्न केले जातील असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यालयाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घरोघरी संपर्क साधण्याबरोबर माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नागरिकांपर्यंत पोहोचून संघटनात्मक कार्य बळकट करण्यावर भर दिला जाईल.

आगामी काळातील निवडणुकांचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी आणि भारतीय जनता पार्टीचा विचार प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचविण्यासाठी या कार्यालयाच्या माध्यमातून कार्यकर्ते नियोजन करतील असे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले.

लोकसभा विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुकांमध्ये पुणेकरांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास व्यक्त केला होता. हा विश्वास शहर भाजपने सार्थ ठरविला असून, आगामी काळात तो दृढ करण्यासाठी सर्व कार्यकर्ते एकजुटीने प्रयत्न करतील असे मत शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी व्यक्त केले.

जनसंघापासून भाजपच्या आजवरच्या ज्येष्ठ आणि नव्या कार्यकर्त्यांनी आठवणींना उजाळा देत गप्पा रंगवल्या.

प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, लोकसभा मतदार संघ संयोजक श्रीनाथ भिमाले यांची प्रमुख उपस्थिती होती.या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस च्या खासदार वंदना चव्हाण , श्रीकांत शिरोळे, प्रदीप गारटकर, मनसेचे अजय शिंदे यांच्या सह सर्व पक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते

Media Tower | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मीडिया टॉवर गृहनिर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

Media Tower | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मीडिया टॉवर गृहनिर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन

| पत्रकारांना स्वस्तातील घरे देण्यासाठी सहकार्य करू | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

Media Tower | महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ (Maharashtra Rajya Marathi Patrakar Sangh) यांच्यावतीने साकारण्यात येणाऱ्या ‘मीडिया टॉवर’ (Media Tower) या खाजगी तत्वावरील गृहनिर्माण प्रकल्पाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. पत्रकारांना (Journalist) स्वस्तातील घरे मिळावीत यासाठी गृहकर्जावरील व्याजावर सवलत देण्याची योजना आणण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्यात येईल, असे प्रतिपादन श्री.फडणवीस यांनी यावेळी केले.

हॉटेल जे.डब्ल्यु.मेरिएट येथे आयोजित या कार्यक्रमास पीएमएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, दै.पुढारीचे समूह संपादक डॉ.योगेश जाधव, दै.लोकमतचे संपादक संजय आवटे, दै.सकाळचे संपादक सम्राट फडणीस, भगवती ग्रुपचे बाबासाहेब औटी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे संघटक संजय भोकरे, प्रदेशाध्यक्ष किरण जोशी आदी उपस्थित होते.

नवी दिशा देणारा प्रकल्प पुण्यात उभारला जात असल्याचे नमूद करून उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रातील इतर शहरात असे प्रकल्प होतांना पहायला मिळतील. पत्रकारांच्या अनेक अडचणी आहेत. त्यांची स्वत:ची हक्काची घरे आढळून येत नाही.  त्यामुळे मोहिम म्हणून पत्रकारांच्या घराचा प्रकल्प हाती घ्यावा लागेल. माध्यमांची संख्या आणि प्रकार वाढले आहेत. सर्वसामान्य घरातील तरुण-तरुणी या व्यवसायात कार्यरत आहेत. त्यांच्या जीवनात स्थैर्य येणे ही महत्वाची बाब आहे. माध्यमे स्वतंत्र आणि नि:ष्पक्ष राहण्यासाठी माध्यम संस्थेतील शेवटच्या घटकांना सामाजिक सुरक्षा द्यावी लागेल, असे ते म्हणाले.

पत्रकार हल्ला विरोधी कायदा मंजूर करण्यात आला आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजना सर्व पत्रकारांना लागू करण्यात आली आहे, त्याची व्याप्ती वाढवून त्यांचे कुटुंबियही या योजनेच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न आहे. म्हाडाच्या लॉटरीतही पत्रकारांना मुंबईत घरे मिळाली. मात्र पत्रकारांच्या वाढती संख्या लक्षात घेता त्या प्रमाणात ही संख्या कमी आहे. महापालिका आणि पीएमआरडीएने नियमात बसवून घरांची किंमती कमी करण्याबाबत  विचार करावा. मीडिया टॉवरसाठी जागा मिळविणे महत्वाची बाब असून महसूली मुख्यालयी असे प्रकल्प उभारण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, त्यासाठी आवश्यक असल्यास स्वतंत्र अधिकारी नेमण्यात येईल.

पुणे येत्या काळात देशातील महत्वाचे औद्योगिक केंद्र असेल

येत्या २० वर्षातील देशाचे ग्रोथ इंजिन होण्याची पुण्याची आणि पीएमआरडीएची क्षमता आहे. नव्या युगाचे उद्योग समाविष्ट करण्याची क्षमता असणारे हे शहर आहे.म्हणून रिंगरोडसारखे विकासाचे प्रकल्प प्राधान्याने हाती घेण्यात येत आहेत. पुण्याच्या वेगवान विकासासाठी नवे विमानतळ आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांना याबाबतच्या शंका असल्यास त्यांचे निरसन करण्यात येईल. विमानतळासाठी जमीन दिलेल्यांना समृद्ध होण्याचा अनुभव होईल, असे पॅकेज देण्यात येईल. पुण्याच्या  विकासासाठी जनआंदोलन उभे राहण्याची गरज आहे. देशाचे येत्या काळातील महत्वाचे केंद्र म्हणून पुण्याची ओळख प्रस्थापित होईल.

यावेळी श्री.जाधव, श्री.आवटे, श्री.फडणीस, श्री.औटी, श्री.भोकरे, श्री. जोशी यांनीही यावेळी विचार व्यक्त केले.

Atal Sanskriti Gaurav Purskar | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अटल संस्कृती गौरव पुरस्कारचे वितरण

Categories
Breaking News cultural Political social पुणे महाराष्ट्र

Atal Sanskriti Gaurav Purskar | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अटल संस्कृती गौरव पुरस्कारचे वितरण

| अटल संस्कृती गौरव पुरस्काराच्या माध्यमातून देशाला गौरव वाटेल अशा व्यक्तिमत्वांचा सन्मान | देवेंद्र फडणवीस

 

Atal Sanskriti Gaurav Purskar | अटल संस्कृती गौरव पुरस्काराच्या माध्यमातून देशाला गौरव वाटेल अशा व्यक्तिमत्वांचा सन्मान करण्यात आला असून या पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून भारतरत्न स्व.अटलबिहारी वाजपेयी (Atalbihari Vajpeyi) यांचे विचार आणि शब्द कायम स्मरणात राहतील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले.

श्री.फडणवीस यांच्या हस्ते ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांना २०२२ साठी आणि उद्योजक डॉ.प्रमोद चौधरी यांना २०२३ साठी संस्कृती प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या अटल संस्कृती गौरव पुस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार प्रकाश जावडेकर, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर, पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर, पद्मभूषण डॉ.शां.ब. मुजुमदार, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.

अटलजींच्या नावाचा पुरस्कार मिळविणारे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व कार्यक्रमात उपस्थित असल्याचे नमूद करून उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, अटलबिहारी वाजपेयी आपल्या ध्येयनिष्ठेमुळे आपल्याला परिचीत आहेत. देशाची अणूसंपन्नता स्थापित करण्यासाठी कुठल्याही दबावासमोर न झुकता त्यांनी अणुस्फोटाची अनुमती दिली. शक्तिशाली राष्ट्र शांतता प्रस्थापित करू शकतात या विचाराने त्यांनी अणुस्फोट घडवून आणला. त्यानंतर अनेक देशांनी लादलेल्या प्रतिबंधाना न जुमानता त्यांनी जगाला आपल्यासमोर झुकविण्याचे कार्य केले. त्यांच्या स्वभावातील हीच दृढता त्यांच्या काव्यातूनही प्रकट होते.

स्व.अटलजींनी देशाला एका सूत्रात जोडण्याचे कार्य केले
अटलजींनी अर्थकारणाची चांगली जाण होती. ग्रामीण भागातील अर्थकारणाला चालना देण्यासाठी त्यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना सुरू केली. त्यांनी खऱ्या अर्थाने नवभारताची सुरुवात केली. सुवर्ण चतुष्कोणच्या माध्यमातून देशाला एका सूत्रात जोडण्याचे कार्य त्यांनी केले. निराशेतून बाहेर पडण्यासाठी संघर्षाने पुढची वाटचाल कशी करावी याची प्रेरणा त्यांच्या शब्दातून मिळते.

प्रभाताईंच्या स्वरात नादब्रह्माची अनुभूती
काही व्यक्तिमत्त्व इतकी मोठी असतात की त्यांचं वर्णन करण्यासाठी शब्दही अपुरे पडतात, असे नमूद करून श्री.फडणवीस म्हणाले, प्रभाताईंनी संगीताची सेवा करताना भारतीय शास्त्रीय संगीत जनमानसात रुजविण्याचे आणि नव्या गायक-गायिकांना घडविण्याचे कार्य केले आहे. सृष्टीतल्या लय आणि नादाची अनुभूती सामान्य माणसाला करून देणारा प्रभाताईंचा स्वर आहे. त्यांच्या ‘एनलाईटनिंग द लिसनर्स’ या पुस्तकाचं प्रकाशन स्व.अटलजींनीच केलं होतं. केवळ गायनातूनच नव्हे, तर लेखनातूनही त्यांनी संगीत सर्वांपर्यंत पोहोचवलं. त्यांना पुरस्कार दिल्याने पुरस्काराची उंची वाढली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांच्या कार्याचा गौरव केला.

डॉ.चौधरी महाराष्ट्राचे सुपूत्र असल्याचा अभिमान
स्व. अटलजींनी इथेनॉलचे महत्व सर्वप्रथम ओळखले आणि सर्वप्रथम भारताचे इथेनॉल, बायोफ्युएल धोरण तयार केले. या धोरणाची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी करण्याचे काम डॉ. प्रमोद चौधरी यांच्या प्राज उद्योगाने केले. त्याचा देशाला मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे. महाराष्ट्रातील साखर कारखाने आज इथेनॉल तयार करत आहेत. त्याचे तंत्रज्ञान तयार करण्याचं काम त्यांनी केलं. आज इथेनॉल करणाऱ्या अनेक संस्था पुढे येत आहेत, त्यांचा आधार डॉ.चौधरी यांचे कार्य आहे. ते महाराष्ट्राचे सुपूत्र असल्याचा अभिमान वाटतो, असे कौतुगोद्गार श्री.फडणवीस यांनी काढले.

मंत्री श्री.पाटील म्हणाले, प्रभाताईंच्या तरुणपणीच्या शास्त्रीय संगीत गातांनाच्या भावमुद्रा आजही चेहऱ्यावर दिसतात, ही त्यांच्या साधनेची शक्ती आहे. डॉ. चौधरी यांच्या कार्यामुळे इंधन आयातीवर खर्च होणारे परकीय चलन मोठ्या प्रमाणात वाचले आहे. या दोघांचे कार्य महान आहे, अशा शब्दात त्यांनी दोन्ही पुरस्कार प्राप्त व्यक्तीमत्वांच्या कार्याचा गौरव केला.

ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे म्हणाल्या, प्रकृती ठीक नसतांनाही वाजपेयींजींचा आशिर्वाद पाठीशी असावा म्हणून पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहता आले. त्यांच्यासारख्या कवीमनाच्या, राष्ट्रप्रेमी अधिकारी पुरुषाच्या नावामुळे पुरस्काराची उंची वाढली आहे, असे त्या म्हणाल्या.

यावेळी डॉ.चौधरी यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. अटलबिहारी वाजपेयी यांनी स्वदेशी इंधन असल्याने त्याला प्रोत्साहन दिले होते. त्यामुळे त्यांच्या नावाने पुरस्कार मिळणे हा चांगला योग आहे, असे ते म्हणाले.

श्री.मोहोळ यांनी प्रास्ताविकात अटल संस्कृती गौरव पुरस्कारामागची संकल्पना मांडली. स्व. अटलबिहारी वाजपेयी आणि पुण्याचे वेगळे नाते होते. त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी त्यांच्या नावाने पुरस्काराची सुरुवात करण्यात आली. अटलजींचा ज्या क्षेत्रात वावर होता त्या क्षेत्रातील व्यक्तींना या निमित्ताने सन्मानित करण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

कार्यक्रमापूर्वी श्री.फडणवीस यांनी भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘अटलपर्व’ प्रदर्शनास भेट दिली. कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार सुनील कांबळे, भीमराव तापकीर, पद्मश्री मनोज जोशी, अभिनेत्री मृणाल देव कुलकर्णी, धीरज घाटे, राजेश पांडे, हेमंत रासने आदी उपस्थित होते.

Property Survey | Devendra Fadnavis | सर्व महानगरपालिका हद्दीतील मालमत्तांचे सर्वेक्षण करणार | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Categories
Breaking News PMC Political social पुणे महाराष्ट्र

Property Survey | Devendra Fadnavis | सर्व महानगरपालिका हद्दीतील मालमत्तांचे सर्वेक्षण करणार | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Property Survey | Devendra Fadnavis | पुण्यातील स्पार्कल कँडल तयार करण्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड(PCMC), पुणे  महानगरपालिका (PMC) या ठिकाणच्या 75 हजार औद्योगिक मालमत्तांचे सर्वेक्षण (Property Survey) करण्याचे काम सुरू केले असून राज्यातील इतरही महानगरपालिकांमध्ये टप्प्याटप्प्याने सर्वेक्षण करण्याचे काम करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी विधानपरिषदेत सांगितले.
नियम 97 अन्वये अल्पकालीन चर्चा श्रीमती उमा खापरे यांनी उपस्थित केली होती. यावेळी सर्वश्री सचिन अहिर, भाई जगताप यांनी सहभाग घेतला होता. यावेळी श्री. फडणवीस बोलत होते.
            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, “पुणे जिल्ह्यातील तळवडे येथील मे. राणा इंजिनियरिंग, ज्योतिबा नगर येथे स्पार्कल कॅन्डल तयार करण्याच्या कारखान्यात 8 डिसेंबर, 2023 रोजी स्फोट होऊन एकूण 11 कामगार मृत्यूमुखी पडले असून या मध्ये 6 महिला कामगारांचा समावेश आहे. 10 कामगार जखमी झाले होते. या घटनेच्या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी पाहणी केली. ज्याठिकाणी दुर्घटना घडली तेथे कच्चे बांधकाम असलेल्या इमारती व एक शटर असलेल्या शेडमध्ये औद्योगिक कारखाना सुरु असल्याचे निदर्शनास आले. या कारखान्यात शोभेच्या दारुपासून वाढदिवसाकरीता वापरण्यात येणारे स्पार्कल कॅन्डल तयार करण्याचे काम सुरु होते. या ठिकाणी व्यवसाय मालकाव्दारे नियुक्त महिला कामगार काम करीत होत्या. हा व्यवसाय अवैध असून परवानगी घेतलेली नव्हती. ही जागा रेड झोनमध्ये समावीष्ट असून तळवडे परिसरात साधारणपणे 3000 विविध प्रकारच्या आस्थापना कार्यरत आहेत. या ठिकाणी कोणत्याही उपाययोजना न केल्याने  ही घटना घडली. दुर्घटनेच्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड पोलीसांनी कंपनीवर गुन्हा दाखल केला आहे. संबंधित आरोपींना अटक करण्यात आली आहे. कंपनीवर कामगार कायद्याअंतर्गत  कारवाई करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी नियमाचे उल्लंघन झाले आहे त्या संदर्भात कारवाई करण्यात आली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
            अपघात झालेल्या ठिकाणी सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. धोकादायक उद्योगांवर निर्बंध टाकण्याचे काम करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच अशा धोकादायक ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात येत असून येऊन कंपनींच्या आत व परीसरातील अवैध कामांवर निर्बंध  घालण्यात येईल असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

Police Bharti | गृह विभागात 23 हजार 628 पदांची भरती | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र

Police Bharti | गृह विभागात 23 हजार 628 पदांची भरती | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

Police Bharti | नागपूर | गृह विभागातील 1976 पासून आकृतीबंध नुसार पदभरती केली जात होती. आता लोकसंख्यनुसार किती अंतरावर पोलिस स्टेशन, कर्मचारी, युनिट असले पाहिजे याबाबत नवीन आकृतीबंध तयार करण्यात आला असून याअंतर्गत 23 हजार 628 पोलिस शिपाई पदे भरली जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधान परिषदेत सांगितले.

गृह विभागातील पोलीस शिपाई भरती तातडीने करण्याबाबत लक्षवेधी सूचना सतेज उर्फ बंटी पाटील यांनी मांडली होती. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

नवीन आकृतीबंधानुसार मोठ्या प्रमाणात पोलीस भरती करण्यात येणार आहे. यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. 8 हजार 400 लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता होती, ती वाढवण्यात आली आहे. कोरोना काळात अनेक उमेदवारांची वयोमर्यादा संपत आल्याने उमेदवार निराश झाले होते. यासंदर्भात गृह विभागाशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

पोलीस शिपायाची परीक्षा एजन्सीकडे दिली असून यात अनुचित प्रकार होऊ नये म्हणून जॅमर बसवण्याचा प्रायोगिक तत्त्वावर वापर करण्यात येणार आहे. यासाठी सायबर प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत असून यामध्ये सोशल मीडिया साईट,गेम सॉफ्टवेअरचा अंतर्भाव केला जाणार आहे. सायबर गुन्ह्याचे प्रमाण कमी करण्यासाठी ठोस पावले उचलण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

सीसीटीव्हीसंदर्भात नियमावली तयार करण्याबाबत गृह विभागाला सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सायबर सुरक्षेच्या दृष्टीने एक हजार लोकांना प्रशिक्षित करून त्याचा उपयोग सायबर गुन्ह्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी केला जाणार असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

या लक्षवेधी सूचनेच्या वेळी भाई जगताप यांनी चर्चेत सहभाग घेतला.


Join Our | Whattsup Channel : https://whatsapp.com/channel/0029Va6UN2aC1FuKS0Sc203o

MANS Vs Bageshwar Dham Sarkar | राज्याच्या गृह खात्याचे संविधान विरोधी कृत्यांना पाठबळ | धिरेंद्र शास्त्रीच्या दरबारात गृहमंत्री, पोलीस अधिकारी नतमस्तक | महा. अंनिस चा आरोप 

Categories
Breaking News cultural Political social पुणे महाराष्ट्र

MANS Vs Bageshwar Dham Sarkar | राज्याच्या गृह खात्याचे संविधान विरोधी कृत्यांना पाठबळ | धिरेंद्र शास्त्रीच्या दरबारात गृहमंत्री, पोलीस अधिकारी नतमस्तक | महा. अंनिस चा आरोप

 

MANS Vs Bageshwar Dham Sarkar |वादग्रस्त असलेल्या बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांचा पुण्यातील संगमवाडी परिसरातील तीन दिवशीय सत्संग आणि दरबार कार्यक्रम 22 नोव्हेंबर २०२३ रोजी संपला असला तरी आमचे काम अद्याप संपलेले नाही. अशास्त्रीय, अवैज्ञानिक, घटनाबाह्य, दिशाभूल, फसवणूक करणारे आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे वक्तव्य, भाष्य, कृत्य धिरेंद्र शास्त्री सतत करत असून त्याची पुनरावृत्ती पुण्यात देखील झाली आहे, असा आरोप महा. अंनिसने केला आहे. गुन्हे दाखल करून कारवाईची मागणी पोलीस यंत्रणेकडे कार्यक्रमपूर्व केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून थेट राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस अधिकारी धिरेंद्र शास्त्री यांच्या चरणी लिन झाले आहेत. राज्याचा गृह विभाग अशास्त्रीय, अवैज्ञानिक, घटनाबाह्य वक्तव्य, भाष्य, कृत्य करणाऱ्याला, दिशाभूल, फसवणूक करणाऱ्याला व अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्याला बळ, पाठींबा देत आहेत. उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस प्रशासनाचे हे वर्तन संविधान विरोधी आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पूर्णवेळ कार्यकर्ते विशाल विमल यांनी केले आहे. महा. अंनिसने मागण्यांचे निवेदन पुन्हा गुरुवारी पोलीस प्रशासनाला दिले आहे. पुणे शहर अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त आर राजा यांची भेट घेतली. यावेळी विशाल विमल, एकनाथ पाठक, प्रतीक पाटील उपस्थित होते.

अपरिचित व्यक्तीच्या भूतकाळात घडलेल्या गोष्टी अचूकपणे कागदावर लिहून दाखवतो. लोकांच्या मनात काय सुरू आहे ते ओळखतो. असाध्य आजार बरे करतो. भूत प्रेते पळवून लावतो. लिंबूद्वारे समाधान प्राप्त करून देतो, आदी दावे धीरेंद्र शास्त्री यांनी त्यांच्या कार्यक्रमातून केले आहेत. तसेच संतांसंबंधी चुकीची बदनामीकारक वक्तव्य केली आहेत. धिरेंद्र शास्त्री यांनी महा. अंनिसच्या चमत्कार सिद्ध चाचणीला सामोरे जाण्याऐवजी पळवाट काढली आहे. तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी भक्त आणि संयोजकांमध्ये हाणामारी झाली. शहरात पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, आदी सर्व बाबी या तत्सम कायद्यांच्या नियमांचा भंग करणाऱ्या असून कारवाईसाठी पात्र आहे. त्यामुळे वरील बाबींसंदर्भात गुन्हे दाखल करून कारवाई व्हावी, अशीही मागणी महा. अंनिसने केली आहे.

 

१) पुण्यात झालेल्या सदर कार्यक्रमाचे व्हिडीओ शूटिंग करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे पोलीस प्रशासनाकडे केली होती. ते व्हिडीओ शूटिंग उपलब्ध करून द्यावे. प्रचलित कायद्यांच्या विसंगत विधाने, भाष्य, वक्तव्ये, इशारे, कृत्य धिरेंद्र शास्त्री यांनी केल्याचे प्रसारमाध्यमातून समोर आले आहे. त्यामुळे संपूर्ण कार्यक्रमाचा व्हिडीओ तपासून धिरेंद्र शास्त्री यांच्यावर जादूटोणाविरोधी कायदा, ड्रग्ज अँड मॅजिक ॲक्ट आणि तत्सम कायद्यांनुसार गुन्हा दाखल करून कारवाई करावी. २) संतांसंबंधी धिरेंद्र शास्त्री यांनी चुकीची, बदनामीकारक वक्तव्य केली आहे. त्यामुळे धिरेंद्र शास्त्री यांना समज देण्यात यावी आणि तत्सम कायद्यांच्या आधारे गुन्हे दाखल करून कारवाई करावी. ३) धिरेंद्र शास्त्री हे चमत्काराचे अशास्त्रीय, अवैज्ञानिक, अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे दावे करत आहेत. ते दावे त्यांनी सिद्ध करून दाखवावेत आणि आमचे 21 लाख रुपये बक्षीस मिळवावे, असे आव्हान आहे. राज्यात सोईच्या ठिकाणी, तज्ञ कमिटीसमोर, निवडक कार्यकर्त्यांसह ही दावे सिद्धता चाचणी होईल. ही चाचणी घेण्यासाठी पोलीस यंत्रणेने सहकार्य करावे आणि धिरेंद्र शास्त्री यांना हजर करावे. ४) वर्दीवर असणारे पोलीस अधिकारी हे धिरेंद्र शास्त्री यांच्या दरबारात जाऊन शास्त्रीपुढे नतमस्तक झाले. त्यांनी अशास्त्रीय पद्धतीने समस्यांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न केला असून त्यांचे दरबारात जाणे हे महाराष्ट्र सेवा अधिनियम व तत्सम कायद्यांचा भंग करणारे आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी. ५) धिरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी भक्त आणि संयोजक यांच्यामध्ये हाणामारी झाली आहे. तसेच शहरात वाहतूक कोंडी आणि पार्किंगचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे यासंबंधी संबंधितांवर कारवाई व्हावी. ६) धिरेंद्र शास्त्री यांची विधाने, भाष्य, कृत्ये याला महा. अंनिसचा विरोध असून त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे पोलीस प्रशासनाकडे कार्यक्रमपूर्व केली होती. पण त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. पुण्यातील कार्यक्रमात देखील पुन्हा धिरेंद्र शास्त्री यांनी अशास्त्रीय, अवैज्ञानिक, घटनाविरोधी, अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे, चुकीची माहिती देणारे वक्तव्य, भाष्य, कृत्य केली आहेत. धिरेंद्र शास्त्री यांची ही कार्यपद्धती थांबत नाही. त्यामुळे पुन्हा पुण्यात धिरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये. पुन्हा होणाऱ्या कार्यक्रमाला महा. अंनिसचा विरोध असणार आहे. ७) धीरेंद्र शास्त्री हे करत असलेले दावे अशास्त्रीय असल्याची उकल करून शास्त्रीय विचारधारा समाजात रुजवण्यासाठी शासन संस्थेने प्रसारमाध्यमे, शिक्षण संस्था आदींमार्फत प्रयत्न करावेत. ८) धीरेंद्र शास्त्री यांच्या दाव्यांविरोधी महा. अंनिस शास्त्रीय माहिती, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करण्याचे काम करत आहे, त्याला पाठबळ द्यावे.

भारतीय राज्यघटनेने व्यक्तीला देव धर्म श्रद्धा उपासना स्वातंत्र्य दिले. त्याचा महा. अंनिस संघटना आदर करते. मात्र व्यक्तीची देव धर्म श्रद्धा उपासनेच्या आधारे फसवणूक, दिशाभूल, शोषण होत असेल, त्यातून सार्वजनिक आरोग्य, नीतिमत्ता, कायदा सुव्यवस्थेला अडथळा येत असेल तर त्याविरोधी संघटना भूमिका, प्रबोधन, प्रतिकार, कृतिकार्यक्रम करत आली आहे. महा. अंनिसचे हे वर्तन घटनेशी सुसंगत असून मानवी जीवन समृद्ध करण्यासाठीचे आहे. धीरेंद्र शास्त्री हे लोकांच्या देव, धर्म, श्रद्धा, उपासना आणि भावना, अगतिकता, अज्ञान यांचा गैरफायदा घेऊन लोकांना देव धर्म श्रद्धा उपासनेशी निगडित विसंगत, अशास्त्रीय, अवैज्ञानिक बाबी सांगत आहेत. लोकांना ते सांगून प्रभावित करत असून अशास्त्रीय मार्गाने जगण्यास प्रवृत्त करत आहेत. हे भारतीय राज्यघटनेच्या दृष्टीने विसंगत आहे. भारतीय राज्य घटनेत वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करणे हे नागरिकांचे कर्तव्य असल्याचे सांगितले आहे. मात्र धीरेंद्र शास्त्री हे अशास्त्रीय, अवैज्ञानिक दावे करून लोकांना प्रभावित करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी करत आहोत.

Chandrakant Patil | Ajit Pawar | जनकल्याणासाठी पुण्यात दोन्ही दादा एकत्र! | नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन

Categories
Breaking News Political social पुणे

Chandrakant Patil | Ajit Pawar | जनकल्याणासाठी पुण्यात दोन्ही दादा एकत्र! | नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन

| युतिका सोसायटीतील एमएनजीएलसाठी डीआरएस प्रणालीचे लोकार्पण

 

Chandrakant Patil | Ajit Pawar | राज्याच्या प्रगतीसाठी एकनाथजी (Eknath Shinde) आणि देवेंद्रजी (Devendra Fadnavis) कार्यरत आहेत. त्यातच अजितदादा पवार (Ajit Pawar) यांचीही साथ मिळाली आहे. त्यामुळे लोककल्याणासाठी पुण्यात दोन्ही दादा एकत्र आहेत. त्यामुळे जनहिताचे प्रकल्पांना गती मिळत आहे, असे प्रतिपादन नामदार चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांनी केले.

कोथरुड मतदारसंघातील बाणेर पश्चिम, सूस- म्हाळुंगे आणि पाषाण येथील सोसायटी भागातील नागरिकांची अनेक वर्षांपासून महानगर गॅस व्यवस्था उपलब्ध व्हावी; अशी मागणी होती. त्यांची ही मागणी पूर्ण करण्यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी पाठपुरावा करून महाराष्ट्र नॅचरल गॅसला डीआरएस प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी महापालिकेची जागा उपलब्ध करून दिली. त्यामुळे बाणेरमधील पाच हजार नागरिकांना महानगर गॅसची व्यवस्था उपलब्ध झाली. याचे लोकार्पण युतिका सोसायटीत आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी भाजपा नेते गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, भाजपा कोथरुड उत्तर अध्यक्ष सचिन पाषाणकर, लहु बालवडकर, उमाताई गाडगीळ, अस्मिता करंदीकर, नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, युवा मोर्चा अध्यक्ष रोहन कोकाटे, सचिन दळवी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष समीर चांदोरे यांच्या सह युतिका सोसायटीचे सर्व रहिवासी उपस्थित होते.

नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचा देशातील वर्षानुवर्षे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आग्रह आहे. त्यांच्याच प्रेरणेतून राज्यात एकनाथजी आणि देवेंद्रजी फडणवीस यांचे सरकार काम करत आहे. त्यात आता अजितदादा पवार यांचीही साथ मिळाली आहे. त्यामुळे जनहिताचे प्रकल्पांना गती मिळत आहे. पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी शहरात मेट्रोचं जाळं उभारलं जात आहे. डिसेंबर मध्ये विमानतळ परिसरातील मेट्रो प्रकल्प कार्यान्वित होईल.तसेच २४×७ च्या माध्यमातून ८२ पाण्याच्या टाक्या उभारल्या जात आहेत. याशिवाय सांडपाणी शुद्धीकरणासाठी एसटीपी प्रकल्प उभारले जात आहेत.

नामदार पाटील पुढे म्हणाले की,‌कोथरुड मध्ये १०० आदर्श सोसायटी निर्माण करण्याचा प्रयत्न असून, त्यासाठी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या सोसायटी मध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग, कचरा निर्गत प्रकल्प यांसारखे उपक्रम सुरू करावेत.‌यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली. तसेच, कोथरुड मधील पाचशे सोसायटींमध्ये लोकसहभागातून सॅनिटरी पॅड व्हेडिंग आणि व्हॅनिशिंग मशीन कार्यान्वित करण्यात येत असून, त्याचाही सोसायटीने लाभ घ्यावा असे आवाहन श्री. पाटील यांनी यावेळी केले.

Lalit Patil | Devendra Fadnavis | ड्रग माफिया ललित पाटीलला अभय देणारे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस  राजीनामा द्या | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ससून रुग्णालयाबाहेर तीव्र आंदोलन

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

Lalit Patil | Devendra Fadnavis | ड्रग माफिया ललित पाटीलला अभय देणारे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस  राजीनामा द्या

| राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ससून रुग्णालयाबाहेर तीव्र आंदोलन

 

Lalit Patil  | Devendra Fadnavis | ड्रग माफिया ललित पाटीलला (Drug Dealer lalit Patil) अभय देणाऱ्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Maharashtra Home Minister Devendra Fadnavis) यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (NCP Pune) वतीने ससून रुग्णालयाबाहेर तीव्र आंदोलन करण्यात आले.

 

याबाबत पुणे राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी सांगितले कि, हजारो कोटी रुपयांचे ड्रग्स तयार करून विकणाऱ्या ललित पाटील या ड्रग माफियाने राज्यातील तरुण पिढीला विनाशाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवलं आहे. अशा माणसाला जास्तीत जास्त कडक शिक्षा करण्याचे सोडून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक बडे मंत्री व अधिकारी हे ललित पाटीलची गुलामी करण्यात, त्याला पाठीशी घालण्यात व्यस्त होते. अगदी पोलीसांच्या तावडीतून त्याला सहीसलामत पळवून लावण्याइतपत यांची मजल गेली. या प्रकरणाबाबत नागरिकांनी प्रश्न विचारायला सुरुवात करताच सरकारवरील दबाव वाढला. म्हणूनच ललित पाटीलला तात्पुरती अटक करून प्रकरण शांत करण्याचा देवेंद्र फडणवीसांचा प्रयत्न आहे.

हा अटकेचा खेळ करून नागरिकांना फसवण्याचा प्रयत्न गृहमंत्र्यांनी करू नये. ललित पाटील राज्यात ड्रग्जचे साम्राज्य उभारेपर्यंत राज्यातील कायदा व सुव्यवस्था झोपेत होती का ? याची चौकशी करावी. ललित पाटील अटकेत असताना त्याला ससून रुग्णालयात, पंचातारांकीत हॉटेलमध्ये सेवा कोण पुरवत होते ? याची चौकशी करावी, सरकारमधील कोणते मंत्री , अधिकारी ललित पाटीलचे बटीक म्हणून काम करत आहेत हे जनतेसमोर आणावे, तसेच राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास सक्षम नसल्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या वतीने शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष प्रशांत जगताप, कणव चव्हाण,किशोर कांबळे, विक्रम जाधव, शेखर धावडे, मीनाताई पवार, आसिफ शेख, मनाली भिलारे, गणेस नलावडे, रोहन पायगुडे, नरेश पगाडालू, शिल्पा भोसले यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

BJP Vs Mahavikas Aaghadi | कंत्राटी पद्धत हे महाविकास आघाडीचे पाप | धीरज घाटे

Categories
Breaking News Political पुणे

BJP Vs Mahavikas Aaghadi | कंत्राटी पद्धत हे महाविकास आघाडीचे पाप | धीरज घाटे

BJP Vs Mahavikas Aaghadi | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी आघाडी सरकारच्या (MVA Government) काळात सुरू झालेल्या कंत्राटी भरतीचा (Contract Recruitment) भांडाफोड केल्यानंतर आज भारतीय जनता पार्टी पुणे (BJP Pune) शहराच्या वतीने शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate) यांच्या नेतृत्वाखाली  गुडलक चौक (Goodluck Chowk Pune) आंदोलन  येथे करण्यात आले.
‘महाविकास आघाडीच्या काळात मोठ्या प्रमाणावर कंत्राटी कामगार भरती पध्द्त अवलंबण्यात आली. महायुतीचे सरकार आल्यानंतर ही कंत्राटी पद्धत कशी चुकीची आहे, हे महाविकास आघाडीचे नेते सांगत आहे. ही पद्धत कोणी आणली हे महाविकास आघाडीला विचारले पाहिजे. कंत्राटी भरतीची परंपरा हे काँग्रेस च्या काळात सुरू झाली. ती शिवसेना प्रणित महाविकास आघाडी सरकारच्या काळा पर्यंत कायम होती. हीच कंत्राटी पद्धत महायुतीचे सरकार आल्यानंतर मोडीत काढण्यात आली. त्याचाच तिळपापड होऊन आज महाविकास आघाडीचे नेते आज बेभान होऊन प्रतिक्रिया देत आहेत.  ह्या सर्व गोष्टींची माफी महाविकास आघाडी ने मागितली पाहिजे असा घणाघात धीरज घाटे यांनी केला.
यावेळी घाटे यांच्या सह महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ , महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे ,पुणे  शहर सरचिटणीस पुनीत जोशी , राघवेंद्र मानकर , राहुल भंडारे,वर्षा तापकिर ,महिला आघाडी अध्यक्ष हर्षदा फरांदे , युवा मोर्चा अध्यक्ष करण मिसाळ, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर विजय चोरमारे यांच्या सह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते