Ahamadabad Tour : PMC : अहमदाबाद दौरा वादाच्या भोवऱ्यात! : भाजपला सद्बुद्धी मिळो, साबरमतीआधी ‘पुणे दर्शन’ घडो : प्रशांत जगताप

Categories
Breaking News PMC Political पुणे

अहमदाबाद दौरा वादाच्या भोवऱ्यात

: भाजपला सद्बुद्धी मिळो, साबरमतीआधी ‘पुणे दर्शन’ घडो : प्रशांत जगताप

पुणे : पुणे महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी बुधवारी – गुरुवारी गुजरातच्या अहमदाबाद दौऱ्यावर जात आहेत. साबरमती व इतर प्रकल्पांची पाहणी या शिष्टमंडळाकडून करण्यात येणार असल्याचे समजते. परंतु, पुण्यात करोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असताना सत्ताधारी भाजपची मंडळी पाहणी दौऱ्यात आणि पुणेकरांना संकटात लोटण्यातच धन्यता मानत आहेत. या सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळो व त्यांना साबरमतीआधी पुणे शहरातील समस्यांचे दर्शन घडो, हीच प्रार्थना आम्ही दगडूशेठ गणपतीचरणी करीत आहोत. असा टोला राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी लगावला आहे.
पुण्याचे महापौर मा. मुरलीधर मोहोळ, आयुक्त मा. विक्रम कुमार व सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने विविध प्रकल्पांचा पाहणी दौरा आखला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात राज्यातील अहमदाबाद शहराला भेट देऊन या  शिष्टमंडळाकडून साबरमती नदी प्रकल्प व इतर प्रकल्पांची पाहणी करण्यात येणार आहे. खरे तर संपूर्ण जगभरात करोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून करोना रोखण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. आंतरराज्य प्रवासावर निर्बंध आणण्यात येत आहेत. अशा परिस्थितीत भाजपचे पदाधिकारी मात्र बिनधास्त दौरा आखण्यात व्यग्र आहेत. गेल्या पाच वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपला कोणतेही कर्तृत्व दाखविता आले नाही. आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर हेच पदाधिकारी पुणेकरांपुढे संकट आ वासून उभे असतानाही फेरफटका मारण्यासाठी निघाले आहेत. साबरमती प्रकल्पाची पाहणी करून तसा प्रकल्प पुण्यात उभारण्याचा घाट घालून पुणेकरांपुढील संकट अधिक गहिरे करतात की काय, अशी शंका आहे.
मुळातच साबरमती प्रकल्पावर पर्यावरणतज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. पुण्यातील पर्यावरणतज्ज्ञ आणि सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांनी साबरमतीच्या धर्तीवर पुण्यात मुठा नदीवर प्रकल्प उभारल्यास त्यामुळे निर्माण होणारे धोके अधोरेखित केले आहेत. परंतु, केवळ सत्तेत मश्गुल असलेल्या भाजपला त्याचे काही सोयरसुतक नसल्याचेच दिसून येत आहे. त्यासाठीच हा पाहणी दौऱ्याचा घाट घातला गेला आहे.
भाजप पदाधिकाऱ्यांना फेरफटकाच मारायचा असेल, तर त्यांनी संपूर्ण शहरात फेरफटका मारावा. जवळपास सर्वच ठिकाणी रस्त्यांवर पडलेले खड्डे, वाहनधारकांची होत असलेली कसरत, भरून वाहणाऱ्या कचराकुंड्या, फ्लेक्स आणि बॅनरबाजीतून झालेले शहराचे विद्रुपीकरण याचे दर्शन या शिष्टमंडळाला घडेल. पुणेकर दररोज कोणत्या समस्यांचा सामना करीत आहेत, ते दिसून येईल. आधी या समस्यांतून पुणेकरांची सुटका करावी व नंतर नवीन प्रकल्पाचा पाहणी दौरा आखावा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे देण्यात येत आहे.

Mahavikas Aghadi Vs BJP : Metro Bridge : महाविकास आघाडी म्हणते, विकासाच्या नावाखाली गणेश उत्सव परंपरा नष्ट करण्याचा भाजपचा प्रयत्न; तर भाजप म्हणते, गणेश मंडळ कार्यकर्त्यांच्या आडून महाविकास आघाडीचे राजकारण

Categories
Breaking News PMC Political पुणे

विकासाच्या नावाखाली गणेश उत्सव परंपरा नष्ट करण्याचा भाजपचा प्रयत्न : महाविकास आघाडी

: गणेश मंडळ कार्यकर्त्यांच्या आडून महाविकास आघाडीचे राजकारण : भाजप

पुणे : मेट्रो प्रकल्पाच्या पुलावरून महापालिकेचे मुख्य सभागृह आणि बाहेर देखील महाविकास आघाडी आणि सत्ताधारी भाजप च्या नेत्यामध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली.    मेट्रोच्या पुलाची उंची वाढवण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना व काँग्रेस या महाविकास आघाडीतील तिन्ही घटकपक्षांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या मेट्रो पुलाची उंची न वाढवता काम सुरू ठेवून पुणे शहराची परंपरा मोडीत काढण्याचा दुर्दैवी प्रयत्न सत्ताधारी भाजप करत आहेत असा आरोप या तीनही पक्षांच्या वतीने करण्यात आला. तर भाजपने आरोप केला कि गणेश मंडळ कार्यकर्त्यांच्या आडून महाविकास आघाडी राजकारण करते आहे.

: आमचा विरोध हे महापौरांचे हास्यास्पद वक्तव्य – प्रशांत जगताप

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले कि “गणेशोत्सव” म्हणजे पुणे शहराचे सांस्कृतिक वैभव… पुणे शहरातील गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीची भुरळ केवळ महाराष्ट्राला किंवा भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला आहे. मात्र पुणे शहराच्या या वैभवाला गालबोट लागतेय की काय असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. पुणे शहरातील सर्व मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक ही छत्रपती संभाजी महाराज पूल (लकडी पूल) येथून जाते. गेल्या 131 वर्षांपासून ही परंपरा अखंडितपणे चालू आहे. मात्र छत्रपती संभाजी महाराज पुलावरून प्रस्तावित असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या पुलामुळे ही परंपरा खंडीत होणार आहे. या मेट्रोच्या पुलाची उंची वाढवण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना व काँग्रेस या महाविकास आघाडीतील तिन्ही घटकपक्षांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या मेट्रो पुलाची उंची न वाढवता काम सुरू ठेवून पुणे शहराची परंपरा मोडीत काढण्याचा दुर्दैवी प्रयत्न सत्ताधारी भाजप करत आहेत असा आरोप या तीनही पक्षांच्या वतीने करण्यात आला. याबाबत आज महाविकास आघाडीतील पक्षांनी प्रश्न उपस्थित केले असता महाविकास आघाडीचा मेट्रो प्रकल्पास विरोध असल्याचे हास्यास्पद वक्तव्य  महापौरांनी केले आहे.  पालक मंत्री आदेशाने मेट्रोचे काम सुरु झाले असे  महापौर महोदयांनी सांगितले, जर हे खरे असेल तर महापौरांनी सप्टेबर मध्ये काम थांबवताना कोणत्या अधिकारांत मेट्रोचे काम थांबवले होते. पुणे शहराच्या अस्मितेच्या या प्रश्नावर महानगरपालिकेच्या सभागृहात चर्चा व्हावी अशी मागणी महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी केली असता भर सभागृहात महापौरांचं खोटं वक्तव्य उघडं पडेल म्हणून भारतीय जनता पक्षाने चर्चा घडू दिली नाही. पुणेकरांच्या प्रतिनिधींना सभागृहात बोलण्याची संधी न देता महापौरांनी मोदी सरकारच्या हुकूमशाही पॅटर्न पुणे महानगरपालिकेत राबवला आहे.

“राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पुणे शहराच्या विकासाला विरोध नाही तसेच मेट्रोला देखील विरोध नाही, मात्र विकासाच्या नावाखाली पुण्याच्या परंपरेला नष्ट करण्याचा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. हिंदुत्वाचा आणि संस्कृतीचा ठेका घेतलेल्या भाजपचे देवंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जो DPR केला त्यात या चुका झाल्या आहेत त्यामुळे ही नामुष्की ओढवली आहे हे पुणेकरांच्या समोर आणण्यासाठी आज सभागृहात बोलू देण्याची आमची मागणी होती परंतू हे सत्य जनतेसमोर येऊ नये म्हणूनच महापौरांनी आम्हाला सभागृहात बोलू दिलं नाही.” असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.

: महाविकास आघाडीचे नेते गणेश मंडळांची दिशाभूल करत आहेत : महापौर

याबाबत महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, गणेश मंडळ कार्यकर्त्यांच्या आडून महाविकास आघाडीचे राजकारण सुरु आहे. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना खोटे सांगून त्यांची दिशाभूल केली जात आहे. कारण काम सुरु करण्याचे आणि ते ही पोलिस बंदोबस्तात करण्याचे आदेश पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. त्यामुळे आम्ही सभागृहात सर्व नेत्यांना सांगत होतो कि आपण अजित दादांना भेटून हा प्रश्न निकाली लावू. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आमचे ऐकले नाही. आम्हाला सभा चालू द्यायची होती. कारण शहराच्या हिताचे ३०० विषय मंजूर करायचे आहेत. मात्र विरोधी नगरसेवकांनी गोंधळ घालत सभा बंद करण्याचे काम केले. सभागृह नेते गणेश बिडकर म्हणाले, महानगरपालिकेची सर्वसाधारण झाल्यानंतर या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सर्व पक्षाचे पदाधिकारी एकत्र येऊ. यावर काही उपाय काढता येईल का? यासाठी महापौर यांच्या कार्यालयात बैठक घेऊन सर्व पक्षांचे एक शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार तसेच नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊ असा उपाय सुचविला. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना यात रस नव्हता. केवळ राजकारण करून महाविकास आघाडी गणेश मंडळाची, कार्यकर्त्यांची दिशाभूल करत आहेत. अजूनही आम्ही दोन्ही नेत्यांकडे यासाठी पाठपुरावा करण्यास तयार आहोत. तर स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने म्हणाले, विकासाच्या आड कधीही गणेश मंडळ कार्यकर्ता येत नाही. टी पुण्याची परंपरा नाही. मात्र महाविकास आघाडी वेगळेच राजकारण खेळू पाहत आहे.

NCP : Prashant Jagtap : Agitation : अमित शहा चाले जाव, च्या  घोषणा देत राष्ट्रवादी कॉंग्रेस चे आंदोलन : महापुरुषांचा जाणूनबुजून अवमान करण्याचे भारतीय जनता पक्षाचे  धोरण : प्रशांत जगताप

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र

अमित शहा चाले जाव, च्या  घोषणा देत राष्ट्रवादी कॉंग्रेस चे आंदोलन

: महापुरुषांचा जाणूनबुजून अवमान करण्याचे भारतीय जनता पक्षाचे  धोरण : प्रशांत जगताप

पुणे : अवघ्या देशाचे आराध्य दैवत, महाराष्ट्राची अस्मिता युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची भाजपची सत्ता असलेल्या कर्नाटक राज्यात विटंबना करण्यात आली. भाजप नेते अमित शहा यांना निवडणुकीच्या प्रचारासाठी पुणे महानगरपालिकेत आणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा गैरवापर करण्यात आला. प्रत्यक्षात चौकाचौकात लावलेल्या बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो न लावता अमित शहा, नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या अनेक किरकोळ नेत्यांचे फोटो लावण्यात आले. जिथे संधी मिळेल तिथे महापुरुषांचा जाणूनबुजून अवमान करण्याचे भारतीय जनता पक्षाचे हे धोरण आहे, याविरोधात निषेध नोंदवण्यासाठी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज जंगली महाराज रस्त्यावरील झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्याजवळ तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक घालून वंदन करण्यात आले. अशी माहिती शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.

 

कर्नाटक राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली, याबद्दल प्रतिक्रिया देताना ही घटना “किरकोळ” आहे असे वक्तव्य भाजप नेते व कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले. अवघ्या महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय आहेत, छत्रपतींच्या अवमानाची घटना आज भारतीय जनता पक्षाला “किरकोळ” वाटत आहे. महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमी याचे चोख प्रत्युत्तर मतपेटीच्या माध्यमातून निश्चितच देतील. येत्या काळात या शिवद्रोही भाजपचे महाराष्ट्रातील अस्तित्व ‘किरकोळ’ झाल्याशिवाय शिवप्रेमी शांत बसणार नाही. नरेंद्र मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना करणे, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक भाषा वापरणे यांसारखे अनेक प्रकार यापूर्वीही भाजपकडून करण्यात आले आहेत. यावरूनच भाजपचे शिवप्रेम किती खोटे आणि दिखाऊ आहे हे सिद्ध होते. आताही कर्नाटकातील घटनेबद्दल राज्यातील सर्व भाजप नेते मूग गिळून बसले आहेत. देवेंद्र फडणवीस यांची छत्रपती शिवाजी महाराजांवर खरी श्रद्धा असती तर क्षणाचाही विलंब न करता त्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा निषेध केला असता, परंतु त्यांनी तसे केले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानापेक्षा फडनवीसांना त्यांची पक्षनिष्ठा महत्वाची वाटली अशी भावना यावेळी प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.

या आंदोलनप्रसंगी शहराध्यक्ष श्री.प्रशांत जगताप,महिला शहराध्यक्ष सौ.मृणालिनीताई वाणी,प्रदेश प्रतिनिधी श्री.प्रदीप देशमुख,सौ.रुपालीताई ठोंबरे पाटील,राकेश कामठे,अल्पसंख्यांक शहराध्यक्ष समीर शेख,मनाली भिल्लारे,महेश हांडे आदींसह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

GB Meeting : Ganesh Bidkar vs Mahavikas Aghadi : भाजपने शहरात केलेल्या जाहिरातीवर महापुरुषाचे फोटो नसल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस सहित विरोधी नेत्यांचे चे मुख्य सभेत आंदोलन : तर गणेश बिडकर यांनी विरोधी पक्षाची बोलती केली बंद; म्हणाले हे आंदोलन निव्वळ प्रसिद्धीसाठी

Categories
Breaking News PMC Political पुणे

भाजपने शहरात केलेल्या जाहिरातीवर महापुरुषाचे फोटो नसल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस सहित विरोधी नेत्यांचे चे मुख्य सभेत आंदोलन

: तर गणेश बिडकर यांनी विरोधी पक्षाची बोलती केली बंद; म्हणाले हे आंदोलन निव्वळ प्रसिद्धीसाठी

पुणे : १९ डिसेंबर रोजी पुणे महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी तसेच महापालिकेत नव्याने बसवलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी देशाचे गृहमंत्री  अमित शहा येत आहेत. या कार्यक्रमाची जाहिरात म्हणून सत्ताधारी भाजपने संपूर्ण शहरभरात मोठे मोठे होर्डिंग लावले. परंतु या होर्डिंग्जवर कुठेही छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो भारतीय जनता पार्टीने लावले नाही. त्याऐवजी भाजपच्या नेत्यांचे मोठे मोठे फोटोज या बॅनर वरती लावलेले आहेत.  त्यामुळे कॉंग्रेस आणि  राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, पार्टीतर्फे महापुरुषांचा फोटो न लावणाऱ्या  भारतीय जनता पार्टीचा पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत जाहीर निषेध करण्यात आला. शिवाय आंदोलन देखील करण्यात आले. मात्र त्याच वेळी आपल्या भाषणातून सभागृह नेते गणेश बिडकर यांनी देखील जुने दाखले देत विरोधी पक्षाची बोलती बंद केली. विशेष म्हणजे या बाबत निषेधाची तहकुबी देण्याचा राष्ट्रवादी चा प्रयत्न फसलेला दिसून आला.

: करणी आणि कथनी यात फरक – प्रशांत जगताप

शुक्रवार ची सभा सुरु झाल्याबरोबर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या या विषयावरून आंदोलनाला सुरुवात केली.   यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष  प्रशांत जगताप यांनी भाजपला या प्रकारा बाबत माफी मागण्यास सांगितले.  जगताप म्हणाले कि, “या प्रकारातून भाजपचा खरा चेहरा डोळ्यासमोर आला आहे . भारतीय जनता पार्टीला महापुरुषांची आठवण केवळ मते  मागताना येते. भाजपच्या नेत्यांच्या मनात या महापुरुषांबद्दल आदत नसल्याचे या प्रकारातून उघड झाले आहे. त्यांची करणी आणि कथनी यात असलेला फरक् यातून दिसून येतो”.

: आंदोलन निव्वळ प्रसिद्धीसाठी – गणेश बिडकर

या विषयावरून गणेश बिडकर आपल्या भाषणात म्हणाले, महानगरपालिकेने वर्षानुवर्षे सत्ता असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँगेसने त्यांच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे बसविण्याचा प्रयत्न केले नाहीत. केवळ महापुरुषांच्या नावाने राजकारण केले. अनेक वर्षे हातात सत्ता असतानाही आपल्याला जे जमले नाही ते भारतीय जनता पक्षाने करून दाखविले. याचे दुःख असल्याने हा खटाटोप सुरू आहे. या दोन्ही महपुरूषांचे पुतळे पालिकेत बसत असल्याने हा पालिकेच्या इतिहासातील सुवर्णदिवस आहे.

Ambulance : Wanvadi : वानवडीकरांच्या सेवेत अद्ययावत ॲम्बुलन्स व शववाहिनी दाखल.

Categories
Political social पुणे

वानवडीकरांच्या सेवेत अद्ययावत ॲम्बुलन्स व शववाहिनी दाखल

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व एकलव्य प्रतिष्ठान यांच्या वतीने वानवडीकरांच्या सेवेसाठी अद्ययावत ॲम्बुलन्स व शववाहीनीचा लोकार्पण सोहळा आज ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते जगताप चौक वानवडी येथे पार पडला.

याप्रसंगी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष श्री.प्रशांत जगताप म्हणाले की, गेल्यावर्षी करोना महामारीच्या संकटात अनेक रुग्णांना ॲम्बुलन्सअभावी उपचाराविना ताटकळत राहावे लागले. त्याच वेळी माझ्या वानवडी प्रभागासाठी स्वतंत्र ॲम्बुलन्स व शववाहिनी उपलब्ध करून देण्याचे मी ठरवले होते. त्यानुसार आज पासून एक अद्यावत रुग्णवाहिका त्यांच्या सेवेत दाखल झाली असून वर्षाचे ३६५ दिवस कुठल्याही प्रकारचे शुल्क न आकारता ही रुग्णवाहिका आपल्या सेवेत हजर राहील.त्याचप्रमाणे उपचारादरम्यान मृत्यू पावलेल्या नागरिकांच्या सेवेत शववाहिनी देखील वर्षभर विनामूल्य हजर राहील.

या उद्घाटन सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, नगरसेविका रत्नप्रभा जगताप, सुदामराव जगताप, सुनील जांभूळकर, संदीप जगताप, .प्रफुल्ल जांभूळकर, सुरेश गव्हाणे, शिवराम जांभूळकर तसेच जयहिंद मंडळाच्या ज्येष्ठ नागरीक संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Sharad pawar : आमची पिढी खऱ्या अर्थाने भाग्यवान आहे…. आम्ही असा नेता पहिला 

Categories
cultural Political पुणे महाराष्ट्र

आमची पिढी खऱ्या अर्थाने भाग्यवान आहे…. आम्ही असा नेता पहिला

१२ डिसेंबर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा आज जन्मदिवस. देशाचे लोकनेते असणारे आणि या महाराष्ट्राची संपूर्ण जाण असणारे या राज्यातील,या देशातलं एक दिग्गज व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची खाती ख्याती आहे असे आदरणीय शरद पवार साहेब हे वयाची ८१ वर्ष  पूर्ण करून अर्थात सहस्रचंद्र दर्शनाचा योग पूर्ण करून  ८१ व्या वर्षात पदार्पण करत आहेत, त्यांना वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा….

आमची पिढी खऱ्या अर्थाने भाग्यवान आहे. मी वयाची ८० वर्षे पूर्ण करणारा परंतु या वयात सुद्धा तरुणांनाही लाजवेल अशा प्रकारचा अफाट जनसंपर्क असणारा त्याचबरोबर उदंड उत्साह असणारा या वयातील एकमेव नेता पाहिला , हे भाग्य या पुढच्या पिढीला मिळेल की नाही याबाबत भाकीत वर्तवता येणार नाही. परंतु आम्हाला हा योग मिळाला आहे, हे आम्ही आमचं नशीब समजतो. आज देशात विविध राजकीय पक्षांच्या  विविध विचारधारा मानणारे विविध क्षेत्रातील मंडळी असतील या सर्वांशी एकाच वेळेस थेट संपर्क ठेवणाऱ्या पवारसाहेब आपल्याला परिचित आहेत. महाराष्ट्राच्या भूमीतून दिल्लीत जाणारे आणि तब्बल मागची तीन दशकं आपलं कर्तृत्व सिद्ध करणारे पवार साहेब हे महाराष्ट्रातील एकमेव नेते ठरले आहेत. महाराष्ट्राने यापूर्वी देशासाठी अनेक नेते दिले परंतु त्यांना काम करण्यासाठी खूप कमी वेळ मिळाला. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविल्यानंतर   त्या वेळेपासून देशाच्या, राज्याच्या सर्व राजकीय प्रमुख, राजकीय पक्षांच्या नेत्यांशी  सलोख्याचे संबंध ठेवत असताना आपल्या कारकीर्दीतील खूप जास्तीचा  वेळ विरोधी पक्षात घालवत असताना प्रत्येक सत्ताधारी पक्षाबरोबर दोन हात करण्याची वेळ आदरणीय पवार साहेबांवर आली पण या परिस्थितीमध्ये देखील आपला पक्ष आपली विचारधारा त्याचबरोबर उपेक्षित वंचित घटकांना न्याय देण्याची भूमिका तसेच  आपण ज्या  राज्याला, आपल्या जनतेला, ज्यांच्याशी आपली बांधिलकी आहे त्यांच्याशी आपले उत्तरदायित्व आहे, त्या वर्गाला यांच्याबरोबर पवार साहेबांनी कधीही प्रतारणा केली नाही, सत्ताधाऱ्यांच्या  विरोधात जात केलेला संघर्ष संपूर्ण देशाने ,उभ्या महाराष्ट्राने बघितलेला आहे. साहेबांचा हा लढवय्या स्वभाव निश्चितच आम्ह कार्यकर्त्यांना भाऊन जातो. मागच्या सहा दशकांच्या या राजकीय प्रवासात पवार साहेब अभेद्य का राहिले. ते राजकीय असो व आपल्या वैयक्तिक आयुष्यातील आलेल्या शारीरिक-मानसिक संकटांमध्ये ते का डगमगू  शकले नाही हा अनुभव माझ्या राजकीय आयुष्यात फार जवळून घेता आला यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो.

सप्टेंबर २०१९ ला विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आणि महाराष्ट्रातील भाजप विरोधी पक्षांचा संघर्षाचा काळ होता. या संघर्षाच्या काळात मोदी शहा या जोडीने या देशात भाजपेतर पक्ष्यांच्या सत्ता येणारच नाही अशा प्रकारच्या खोट्या कारवाया सुरू केल्या होत्या.  अर्थात वेगळ्या प्रकारच्या गळचेपीचे राजकारण सुरू केले होते. पण  ६० वर्षाच्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या व्यक्तिगत आयुष्यावर वा त्यांच्या राजकीय जीवनामध्ये त्यांनी घेतलेल्या निर्णयांवर राजकीय पक्षांनी काही जरी बेछूट आरोप केले तरी  ते आरोप एखाद्या सभेपुरते मर्यादित असायचे आरोपांना लेखी तक्रारीचे स्वरूप कधीही प्राप्त झाले नव्हते.  त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेलाही हे कळून चुकलं होतं की पवार साहेबांसारखे  नेतृत्व हे कायम महाराष्ट्राच्या जडण घडणीसाठी काम करणारे व्यक्तिमत्व आहे ,परंतु साहेबांचा राजकीय प्रवास थांबवावा किंवा अडचणीत घ्यावा यासाठी हे आरोप होत आले आहेत  आणि त्यासंदर्भात निवडणुका झाल्यानंतर कुठल्याही प्रकारच्या हालचाली होत नसायच्या असे असताना महाराष्ट्रातील २०१९ची निवडणूक जिंकायची या वैर भावनेने केंद्रातील मोदी सरकारने ईडीच्या माध्यमातून आदरणीय पवार साहेबांना नोटीस पाठवली मुळातच पवार साहेब हे राज्यातील कुठल्याही साखर कारखान्याचे किंवा राज्य सहकारी बँकेचे सभासद नसताना त्या कारखान्यांमधील व्यवहारांमध्ये किंवा राज्य सहकारी बँकेकडून कारखान्यांना देण्यात येणारे कर्जाच्या  कुठल्याही प्रक्रियेमध्ये साहेबांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध आलेला नसताना फक्त विरोधी  पक्षातील सर्वात  दिग्गज नेता आम्ही कसा अडचणीत आणला व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची वाटचाल कशी थांबवयाची  या हेतू पोटी ही नोटीस पाठवली होती. ८० वर्षाच्या योद्ध्याला आयुष्यात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या कायदेशीर नोटीशीला सामोरे जावे लागले होते. ही नोटीस मिळाल्यानंतर इतर कुठलीही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या विपरीत आदरणीय पवार साहेबांनी भूमिका घेतली आणि थेट ईडीला आव्हान  दिले  की, मी तुमच्या कार्यालयांमध्ये तुमच्या भेटीला येत आहे . अशा या अनपेक्षित उत्तराने भांबावलेले मोदी सरकार यांना एकूणच बॅकफूटवर जाण्याची वेळ आली आणि एकूणच भारतात आणि महाराष्ट्रात एक वेगळा संदेश गेला जाणून-बुजून पवार साहेबांना अशाप्रकारे टार्गेट केले जात आहे आणि खुद्द पवार साहेब येत आहेत असं म्हटल्यानंतर ईडीची आणि या एकूणच कट-कारस्थानाची हवाच निघून गेली होती.  त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्वच कार्यकर्त्यांनी अगदी टोकाची भूमिका सार्वजनिक माध्यमांमध्ये जाहीर केल्यामुळे यासंदर्भात आपण अडचणीत येतोय याची जाणीव मोदी सरकारला झाली होती.  मला आठवतंय ज्या दिवशी ईडीच्या कार्यालयांमध्ये पवार साहेब भेट देण्यास जाणार होते. त्या दिवशी पवार साहेबांना पाठिंबा देण्यासाठी मी आणि माझे मित्र नगरसेवक विशाल तांबे आम्ही मुंबईच्या दिशेने निघालो मुंबईचा प्रवास चालू असताना या संपूर्ण प्रवासात आम्ही विविध माध्यमांमध्ये या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून होतो याच वेळी माध्यमांमध्ये एक माहिती अशी मिळाली की,मुंबईच्या कमिशनरने  स्वतः साहेबांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी जात साहेबांना विनंती केली की, आपण ईडीच्या कार्यालयात भेट द्यायला जाणे टाळावे. या गोष्टीतून एक जाणवले की ईडीचे नोटीसमुळे अडचणीत आलेले फडणवीस सरकार आणि एकूणच मोदी सरकार यांनी पवार साहेबांना समोर सपशेल गुडघे टेकले होते आणि हे संपूर्ण चित्र उभ्या महाराष्ट्राने आणि महाराष्ट्रातील जनतेने बघितले होते. असे  असताना आम्ही ईडीच्या कार्यालयात जाणे टाळले  व  थेट साहेबांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी गेलो. आमची गाडी सिल्वर ओक  निवासस्थानी पोहोचे पर्यंत पवार साहेबांची पत्रकार परिषद संपत आली होती तेवढ्यात आम्हाला समजले की पवार साहेब दोन दिवसांच्या पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागातील पाहणी दौऱ्यासाठी जाणार आहेत म्हणून, पवार साहेब पुण्याला जाणार असणाऱ्या ताफ्याजवळ आम्ही थांबलो.  साहेब सिल्वर ओकच्या पायऱ्या उतरून खाली येत असताना तेवढ्यात त्यांचे लक्ष माझ्याकडे गेलं आणि तेव्हा त्यांनी तेवढ्यात मला विचारलं की कधी आलात? मी त्यांना सांगितलं की, साहेब सकाळीच आलोय त्यानंतर आता पुढे कुठे जाणार ? मी म्हटलं साहेब पुण्याला निघणार आहोत ते म्हणाले गाडी कुठे आहे ? मी म्हटलं गाडी सोबतच आहे साहेब . ते म्हणाले ठीक आहे गाडी माझ्या ताफ्यासोबत ठेवा असं म्हटल्यानंतर आम्ही साहेबांच्या ताफ्याच्यामागे गाडी ठेवली हा ताफा वाशीजवळ आल्यानंतर जिल्हा पोलीस बदलासाठी थांबला.

दोन ते तीन मिनिट झाले तरी ताफा हलला नाही म्हणून आम्ही विचारात असतानाच तेवढ्यात साहेबांचे चालक श्री. गामा  मामा आमच्या गाडीजवळ आले आणि त्यांनी सांगितले की पवार साहेबांनी तुम्हाला गाडी जवळ बोलवले आहे त्याचबरोबर मी आणि विशाल दोघेही साहेबांच्या  गाडी जवळ गेलो, साहेबांनी आम्हाला सांगितले की तुम्ही दोघे गाडीत बसा, मी पुढे बसतो तुम्ही दोघे मागे बसा.  त्याचबरोबर मी, विशाल आणि आमदार रोहित पवार आम्ही तिघेही गाडीत मागे बसलो, असा आमचा प्रवास वाशी पासून सुरू झाला.  या प्रवासामध्ये साहेबांनी इतर अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.  मला आठवतंय जसा खोपोलीचा घाट क्रॉस  करून आम्ही वर आलो,तशी साहेबांची तेथील पवनचक्क्यांवर  नजर पडली तसं या पवनचक्क्यांकडे  बोट करून साहेब म्हणाले की या पवनचक्क्यांचा प्रवास तुम्हाला माहिती आहे का? आम्ही म्हंटलं  नाही साहेब? मग साहेबांनी सांगितलेकी ९०च्या दशकामध्ये मी राज्याचा मुख्यमंत्री असताना राज्यामध्ये गुंतवणूक आणण्यासाठी परदेशात  गेलो होतो,लोक तिथेj असणाऱ्या पवनचक्क्यांच्या माध्यमातून विद्युत निर्मिती आणि स्थानिकांना मिळणारा रोजगार याची माहिती घेत ही संकल्पना आपल्या महाराष्ट्रात प्रत्यक्षात उतरेल की नाही याचा अभ्यास घेतला त्यानंतर महाराष्ट्रात एकदा सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना तेथील स्थानिक आमदार श्री. विक्रमसिंह पाटणकर यांच्या मतदारसंघात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट देण्याचा योग आला,तो कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर पवार साहेबांना आजूबाजूच्या परिसरात सर्व पठार दिसले आणि पवार साहेबांनी हेलिकॉप्टर उपलब्ध करण्याच्या सूचना श्री. पाटणकर यांना दिल्या.  थोड्याच वेळात हेलिकॉप्टर आले . हेलिकॉप्टरच्या माध्यमातुन आदरणीय पवार साहेबांनी आजूबाजूच्या डोंगरांची पाहणी केली व या पठारावर  पवनचक्क्या बसवणे शक्य होईल का ?याबाबत चाचपणी केली . त्या माध्यमातून महाराष्ट्रात त्याकाळी कमी असणारे विजेची गरज भागवता येईल तसेच या पठारी भागातील नागरिकांना यातून उत्पन्न सुद्धा सुरू होईल अशी दूरदृष्टी त्या वेळेस साहेबांची होती.  याबाबतची कल्पना त्यांनी स्थानिक लोकांसमोर मांडली त्यावेळी ही कल्पना महाराष्ट्रातील नागरिकांसाठी त्या परिसरातील नागरिकांसाठी थोडी शंकास्पद होती की, ही योजना यशस्वी होईल की नाही परंतु पवार साहेबांनी त्यांची समजूत काढल्यानंतर त्या परिसरातील नागरिकांनी तयार होत  हा बदल स्वीकारला आणि त्यानंतर सुरुवातीला सातारा आणि त्यानंतर संपूर्ण राज्यात  अशाप्रकारे पवनचक्क्यांच्या जाळं उभं राहिलं. त्यानंतर या तंत्रज्ञानाने राज्याभर खूप मोठा विस्तार केला.  एका नव्या व्यवसायाची सुरुवात महाराष्ट्रात झाली ही सगळी माहिती घेत असताना आम्ही पुण्यात कधी पोहोचलो,हे  आम्हाला समजलं नाही.  या प्रवासात लोणावळा पासुनच ठीक ठिकाणी कार्यकर्त्यांनी साहेबांच्या समर्थनार्थ तसेच स्वागतासाठी उभे राहून मोठ्या मोठ्या मोठ्या मोठ्या घोषणा दिल्या, तसेच अनेक  ठिकाणी  साहेबांचा स्वागत करण्यात आले .

या सर्व काळात साहेबांनी एकदा देखील असे म्हटले नाही की केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने माझ्यावरती सूडबुद्धीने  कार्यवाही केली किंवा मला त्यांचा राग आहे असं साहेब बोलले देखील नाही.  खूप साऱ्या  लोकांना अशा प्रकारची काही घटना घडल्यानंतर एकमेकांना फोन करून शेखी  मिरवण्याची सवय असते अशा प्रकारचे चित्र मी रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये बघत असतो परंतु या संपूर्ण दोन तासाचा प्रवासामध्ये साहेबांनी एकदाही मोबाईलला हात लावला नाही किंबहुना मी आज मोदी अथवा फडणवीस सरकारला कसा धडा शिकवला अशा प्रकारचा एकही वाक्य वापरलेले नाही त्याही पलीकडे जाऊन आपल्या साठ वर्षांच्या राजकीय जीवनामध्ये महाराष्ट्रात गुंतवणूक कशी आली, इतर सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील काही मंडळींच्या आठवणी आम्हाला सांगितल्या  हा आमच्यासाठी निश्चितच एक वेगळा अनुभव होता.  मी पुन्हा एकदा सांगेल आयुष्यामध्ये एवढी मोठी घडामोडी घटना दिवस ज्याने त्याच्या आयुष्यात आला त्याच दिवशी पवार साहेबांचा सोबत प्रवास करण्याचा योग पवार साहेबांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला उपलब्ध करून दिला ही माझ्या आयुष्यातील सुवर्णमय घटना आहे.  आयुष्यात कितीही वादळ आली,संकट  आली तरी ङगमगायचे  नसतं ,त्याला जायचं असत आणि त्याला सामोरे जात असताना त्याची शेखी मिळून घ्यायची नसते तर या वादळ वाऱ्यामध्ये सुद्धा जमिनीवर पाय घट्ट रोवून त्या परिस्थितीची सामना कसा करावयाचा हे पवार साहेबांनी सांगितले हा एक पुढच्या काळात राजकीय व सामाजिक जीवनात काम करत असताना संकटांशी दोन हात करण्याचा वेगळा विचार पवार साहेबांच्या कृतीतून आम्हाला आम्ही शिकलो आदरणीय पवार साहेबांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना दिला हे ऋण  कधीच न फिटणारे आहे या हिमालयाएवढ्या उत्तुंग कर्तृत्व असणाऱ्या नेतृत्वाला मी मनापासून सलाम करतो वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो.  साहेब आपण शतायुषी व्हा..  शतायुषी होत असताना या देशाचं पंतप्रधानपद भूषवावे ,  ही माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची निश्चितच अपेक्षा राहील.  पंतप्रधानपद हे कुठल्याही वयाच्या चौकटीत मोजले जाणारे नाही ते या देशात सुराज्य आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीच्या हातात यावे , यासाठीचा काळ असून येत्या काळात आपण हे पद भूषवाल,  अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अपेक्षा आहे.  पुन्हा एकदा आपणांस  वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…

 

श्री. प्रशांत सुदाम जगताप

शहराध्यक्ष. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.

OBC Reservation : NCP : खासदार गिरीश बापटांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल

Categories
Breaking News Political पुणे

  खासदार गिरीश बापटांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल

: OBC आरक्षणासाठी आंदोलन

पुणे : मोदी सरकारच्या नाकर्तेपणामुळे आपल्या अठरा पगड जातीतील ओबीसी बांधवांचं हक्काचं आरक्षण हिरावले गेलं आहे. म्हणून आज मोदी सरकारमधील खासदार, पुणेकरांचे संसदेतील प्रतिनिधी असलेल्या खा. गिरीश बापट यांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

याबाबत  राष्ट्रवादी कॉंग्रेस चे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, कि  मोदी सरकारने ओबीसी बांधवांच्या आरक्षणासाठी आवश्यक असलेला इम्पिरिकल डेटा सादर न केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने केवळ महाराष्ट्रातील नवे तर देशभरात अनेक राज्यांतील ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिली आहे. मोदी सरकार सत्तेत येण्यापूर्वी जानेवारी २०१४ मध्ये डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात UPA सरकारने ओबीसी बांधवांचा इम्पिरिकल डेटा स्वीकारून ओबीसी बांधवांचं आरक्षण अबाधित राखले होते. मात्र मे २०१४ मध्ये देशातील जनतेला फसवून नरेंद्र मोदींचं सरकार सत्तेत आलं आणि इम्पिरिकल डेटा मध्ये दोष आहेत असं कारण देत मोदी सरकारने ओबीसी आरक्षणाच्या वाटेत काटे पेरले. नरेंद्र मोदींच्या या कृतीमागे भाजपची व RSS ची मनुवादी वृत्ती आहे. या देशातील ओबीसी बांधव, दलित बांधव प्रगती करत आहेत ही बाब भाजपच्या मनुवाद्यांना नेहमीच खटकते. महाराष्ट्रातील ओबीसी बांधवांचं आरक्षण स्थगित होण्यालाही भाजप कारणीभूत आहे.

जगताप पुढे म्हणाले,  अवधूत वाघ नावाच्या एका इसमाने औरांगाबाद खंडपीठात ओबीसी आरक्षणाला आव्हान दिलं. हा अवधूत वाघ भारतीय जनता पक्षाचा राज्य सरचिटणीस आहे, राज्य प्रवक्ता आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना, राज्यात भाजपची सत्ता असतानाच भाजपचा पदाधिकारी असलेल्या अवधूत वाघ याने ओबीसी आरक्षणाला आव्हान दिलं हा केवळ योगायोग नाही, हा भाजपने विचारपूर्वक रचलेला कट आहे. असे असतानाही भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी काल ओबीसी बांधवांबाबत खोटा कळवळा दाखवत आंदोलन केले, ओबीसी बांधवांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने तीव्र शब्दांत निषेध केला. हा निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आज भाजपचे खा. गिरीश बापट यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. बापट हे संसदेचे सदस्य आहेत, दिल्लीत संसदेचे अधिवेशन सध्या सुरु आहे. खा. बापट यांनी इम्पिरिकल डेटा जाहीर करण्याची मागणी संसदेत करावी, त्यात काय दोष आहेत तेही देशासमोर जाहीर करावे अशी मागणी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली. केवळ RSS चा मनुवादी अजेंडा राबवण्यासाठी नरेंद्र मोदींनी आमच्या ओबीसी बांधवांना वेठीस धरण्याच काम करू नये असा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देण्यात आला. देशाचे नेते  शरदचंद्रजी पवार साहेबांच्या कार्यकाळात १९९० साली मंडल अयोग्य स्वीकारून ओबीसी बांधवांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण देणारे महाराष्ट्र पहिले राज्य होते. त्यानंतर आमच्या ओबीसी बांधवांना जिल्हा परिषद, महानगरपालिकेत प्रतिनिधित्व मिळालं, राज्यात ओबीसी नेतृत्व उभं राहिलं. हीच बाब भाजपच्या मनुवाद्यांनी खटल्यामुळे ओबीसी आरक्षण घालवण्याचा कुटील डाव भाजपने रचला आहे. याचा जाब येत्या काळात ओबीसी बांधवांकडून भाजपला नक्कीच विचारला जाईल.

या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप,ओबीसी सेल शहराध्यक्ष .संतोष नांगरे,महिला शहराध्यक्षा .मृणालिनीताई वाणी, प्रदेश प्रतिनिधी .प्रदीप देशमुख, कसबा विधानसभा अध्यक्ष गणेश नलावडे,दिपक पोकळे आदिंसह मोठ्यासंख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Jayant Patil : Prashant Jagtap : “खोट बोल पण रेटून बोल ” ही भाजपची प्रवृत्ती : प्रशांत जगताप

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

“खोट बोल पण रेटून बोल ” ही भाजपची प्रवृत्ती

: राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप

पुणे : जलसंपदा विभागाच्या एका कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याचा पत्राचा संदर्भ देत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पाण्याचे राजकारण करू पाहत आहेत. पुण्यात कुठलीही पाणी कपात करण्यात आलेली नाही. जलसंपदामंत्री  जयंतराव पाटील यांच्या खुलाश्यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या प्रकरणातून माघार घेत असल्याचे जाहीर केले. खर बघायला गेलं तर भारतीय जनता पार्टीच्या देश पातळीवरील नेत्यांपासून सर्वांचीच “खोट बोल पण रेटून बोल ” ही प्रवृत्ती असून पुणेकर या प्रवृत्तीला येत्या काळात निश्चितच धडा शिकवतील. असा टोला राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी लगावला आहे.

: पाणी कपात नाही : जयंत पाटील

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहरातील प्रतिनिधींसोबत जलसंपदा मंत्री .जयंत पाटील  यांनी सिंचन भवन येथे आज ४.०० वाजता बैठक आयोजित केली होती. या बैठकी दरम्यान राष्ट्रवादी  शिष्टमंडळाने  बाबतचे निवेदन जलसंपदा मंत्र्यांना दिले असता .पाटील  म्हणाले की, “अश्या प्रकारची कुठलीही पाणी कपात करण्यात आलेले नाही किंवा राज्य सरकार अश्या प्रकारच्या विचाराधीन नाही. गेल्या ५ वर्षात फडणवीस सरकारच्या काळात देखील तब्बल ११ वेळा अश्या प्रकारचे पत्र जलसंपदा विभागाकडून महानगरपालिकेला पाठवण्यात आली होती तसेच फडणवीस सरकारने एक महिना 180 mld क्षमतेचा एक पंप बंद ठेवत पुणेकरांवर पाणी कपात लादली होती. आम्ही मात्र कुठल्याही प्रकारच्या पाणी कपातीचा निर्णय घेतलेला नसून पुणे व पिंपरी चिंचवड या महानगरांच्या भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता भविष्यात रिसायकलिंगद्वारे तसेच पश्चिम घाटातील पाणी या महानगरांकडे वळवण्याच्या विचाराधीन आहोत.”

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या प्रकरणातून माघार घेतली : जगताप

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष .प्रशांत जगताप म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी गेल्या १७ वर्षाच्या पालकमंत्री पदाच्या काळात कधीही पाणी कमी पडू दिले नाही, परंतु केवळ अधिकारी स्तरावरील एका पत्राचा आधार घेत देवेंद्र फडणवीस पाण्याचे राजकारण करू पाहत आहे. या शहराच्या पाणी व्यवस्थापनात नेहमीच आदरणीयअजितदादांनी पुणे शहराचा नव्याने होणारा विस्तार विचारात घेत पाणी व्यवस्थापन करण्यात आले.एवढेच नाही तर या पाण्याव्यतिरिक्त भामा-आसखेड प्रकल्पातील २.५ TMC पाणी अजितदादांमुळे पुणे शहरास मिळाले. गेल्या ५ वर्षांच्या काळात पुणेकरांनी मोठ्या विश्वासाने भाजपच्या हातात महानगरपालिकेची सत्ता दिली मात्र देशात,राज्यात सत्ता असूनही फडणवीसांना पुणे शहरासाठी काहीही करता न आल्याने पाणी प्रश्नाआडून महापालिकेचे राजकारण फडणवीस करू पाहत आहेत.विशेष म्हणजे यात देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या एक दिवस अगोदर अश्या प्रकारचे पत्र बाहेर येणे हे सुद्धा संशयास्पद आहे.  जलसंपदामंत्री नामदार जयंतराव पाटील साहेबांच्या या खुलाश्यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या प्रकरणातून माघार घेत असल्याचे जाहीर केले. खर बघायला गेलं तर भारतीय जनता पार्टीच्या देश पातळीवरील नेत्यांपासून सर्वांचीच “खोट बोल पण रेटून बोल ” ही प्रवृत्ती असून पुणेकर या प्रवृत्तीला येत्या काळात निश्चितच धडा शिकवतील.
या शिष्टमंडळात आमदार चेतन तुपे,आमदार सुनील टिंगरे,विरोधीपक्षनेत्या दिपालीताई धुमाळ,  जयदेवराव गायकवाड,  रविंद्र माळवदकर, देशमुख आदी उपस्थित होते.

Pune : BJP Vs Prashant Jagtap : राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप म्हणाले, भाजप पुणेकरांच्या आरोग्याशी खेळत आहे

Categories
Breaking News Political पुणे

भाजपचा पुणेकरांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न

: राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांची टीका

पुणे : पुणे महानगरपालिकेतील सत्ताधारी व राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी करण्यात आले. या नव्या कार्यालयाच्या उद्घाटनाबद्दल आम्ही भाजपचे अभिनंदन करतो तसेच शुभेच्छा देतो. परंतु, या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपने जे नियम पायदळी तुडवले आहेत, पुणेकरांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न केला आहे, त्याकडे मात्र अजिबात दुर्लक्ष करता येणार नाही. याचे उत्तर भाजपने पुणेकरांना देण्याची गरज आहे. असे राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले.

पुणे महानगरपालिका परिसरात भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्याबद्दल आम्ही भाजपचे अभिनंदन करतो व शुभेच्छा देतो. परंतु, या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपने महानगरपालिका परिसरात, महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर, महानगरपालिका इमारतीच्या चारही बाजूला होर्डिंग्स लावून या परिसराचे विद्रुपीकरण करण्याचे काम केले आहे. ज्या महानगरपालिकेत सत्तेत आहोत, त्या परिसरातील विद्रुपीकरण रोखणे तर दूरच उलट स्वत:च विद्रुपीकरण करण्यातच धन्यता मानणारा भाजप शहरातील विद्रुपीकरण कसे रोखणार, हा खरा पुणेकरांचा प्रश्न आहे. तसेच, भाजपकडून आपल्या परिसराचे विद्रुपीकरण केले जात असताना महानगरपालिका आयुक्त व प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असतील, तर यावरून महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपची दादागिरी आपल्या सहज लक्षात आल्याशिवाय राहत नाही. याबाबत ‘पार्टी विथ डिफरन्स’चा नारा देणाऱ्या भाजपने थोडे अंतरंगात डोकावून पाहण्याची गरज आहे.

तसेच, देशातील विविध राज्यांत कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने प्रवेश केला आहे. त्यामुळे देशात आणि राज्यात या नव्या व्हेरिएंटची धास्ती आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार हा व्हेरिएंट राज्यात प्रवेश करू नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. त्यासाठी काही निर्बंध घातले जात आहेत. मात्र, अशा परिस्थितीत भाजपने हा कार्यक्रम घेत एकप्रकारे पुणेकरांचे आरोग्य धोक्यात घालण्याचाच प्रयत्न केला आहे. किंबहुना हा नवा व्हेरिएंट पुण्यात प्रवेश करणार नाही, याचे स्वप्न भाजप नेत्यांना पडले असावे, त्यामुळेच त्यांची वर्तणूक अशी बेफिकीरीची दिसून येत आहे. आधीच पुणेकरांना कोरोनामुळे अनेक संकटांचा सामना करावा लागला असताना भाजप नेत्यांनी आपण या संकटात भर का टाकत आहोत, याचा विचार करण्याची गरज आहे. ईश्वर भाजप नेत्यांना असा विचार करण्याची सद्बुद्धी देवो, एवढीच प्रार्थना. असे ही जगताप म्हणाले.

Gov. Schemes : Abhijit Barawkar : शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दत्तवाडीत शासकीय योजनांचे कार्ड वाटप : शहर चिटणीस अभिजित आणि दिपाली बारवकर यांचा उपक्रम 

Categories
Political पुणे

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दत्तवाडीत शासकीय योजनांचे कार्ड वाटप

: शहर चिटणीस अभिजित आणि दिपाली बारवकर यांचा उपक्रम

पुणे : लोकनेते खासदार  शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तपोभूमी मैदान, दत्तवाडी, पुणे येथे विविध शासकीय योजनांच्या कार्ड वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. हा  कार्यक्रम राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष  प्रशांत जगताप यांच्या हस्ते पार पडला. यामध्ये प्रामुख्याने शहरी गरीब योजना, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, रेशन कार्ड वाटप डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना मीटर, याचे वाटप करण्यात आले.

यावेळी प्रशांत जगताप म्हणाले की देशाचे नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर चिटणीस  अभिजित बारवकर व  दिपाली अभिजित बारवकर यांनी विविध शासकीय योजनांसाठी आवश्यक असणारे कार्ड वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. पवार साहेबांनी नेहमीच लोकसेवेला प्राधान्य दिलं आहे, आज हा लोकोपयोगी उपक्रम राबवल्याबद्दल साहेबांनाही निश्चितच आपल्या कार्यकर्त्यांचा अभिमान वाटेल हा विश्वास व्यक्त करतो.

यावेळी ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, माजी शहराध्यक्ष  रविंद्र माळवदकर, नगरसेविका अश्विनी कदम, नगरसेविका प्रिया गदादे, पर्वती विधानसभा अध्यक्ष  नितीन कदम, कसबा विधानसभा अध्यक्ष  गणेश नलवडे, शहर प्रसिद्धीप्रमुख अमोघ ढमाले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष  महेश हांडे व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते