Hoardings in Merged villages | समाविष्ट गावातील होर्डिंग व्यावसायिकांना प्रति चौरस फूट २२२ रुपये शुल्क भरावे लागणार | उच्च न्यायालयाचे आदेश

Categories
Breaking News PMC पुणे

समाविष्ट गावातील होर्डिंग व्यावसायिकांना प्रति चौरस फूट २२२ रुपये शुल्क भरावे लागणार

| उच्च न्यायालयाचे आदेश

पुणे महापालिकेत (PMC Pune) समाविष्ट झालेल्या (Merged villages) गावातील होर्डिंग व्यावसायिकांनी (Hoarding) महापालिकेने निश्‍चीत केलेले प्रति चौरस फूट २२२ रुपये शुल्क भरून अधिकृत परवाना घ्यावा असे आदेश उच्च न्यायालयाने (High court) दिले आहेत. त्यामुळे महापालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे. महापालिका हद्दीत गावे समाविष्ट झाल्यापासून हे शुल्क भरावे लागणार आहे. असे आदेशात म्हटले आहे. तसेच महापालिकेने व्यावसायिकावर कारवाई करू नये, असे देखील आदेशात म्हटले आहे.

समाविष्ट गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिंग उभे आहेत. अनेक होर्डिंग हे राष्ट्रीय महामार्गाला लागून किंवा त्या परिसरातील इमारतीवर असल्याने तेथे कायम जाहिराती लागलेल्या असतात. महापालिकेत ही गावे आल्यानंतर आकाश चिन्ह विभागाने या होर्डिंग व्यावसायिकांना शुल्क भर अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा दिला. पण शुल्क न भरल्याने त्यांच्यावर कारवाई सुरू केली होती. त्यातील काही व्यावसायिकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून याविरोधात दाद मागितली. त्यावरून सुनावणी झाल्यानंतर प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला व न्यायमूर्ती एस. जी. चपळगावकर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. त्यावेळी याचिकाकर्त्यांना महापालिकेने मागणी केलेले संपूर्ण शुल्क भरावे आणि महापालिकेने या होर्डिंगवर कोणताही कारवाई करू नये असे आदेश दिले. (pune municipal corporation)

त्याच प्रमाणे नव्याने समाविष्ट झालेल्या गावांच्या हद्दीत व्यवसाय करण्यासाठी महापालिकेकडे अर्ज करावा व धोरणाप्रमाणे २२२ रुपये प्रति चौरस फुटाने पैसे भरावेत असे आदेश दिले आहेत. ॲड. अभिजित कुलकर्णी यांनी महापालिकेच्या वतीने न्यायालयात युक्तिवाद केला, अशी माहिती मुख्य विधी अधिकारी निशा चव्हाण यांनी दिली.

High Court : पालिका निवडणुकीत बहुसदस्यीय प्रभाग रचना योग्यच!  : राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका हायकोर्टाने फेटाळल्या 

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

पालिका निवडणुकीत बहुसदस्यीय प्रभाग रचना योग्यच!

: राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका हायकोर्टाने फेटाळल्या

मुंबई : मुंबई महानगरपालिका वगळता राज्यातील सर्व महापालिका व नगरपालिकांच्या निवडणुकांत बहुसदस्यीय प्रभाग रचना पुन्हा आणण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. यामुळे सरकारला दिलासा मिळाला आहे. बहुसदस्यीय रचना योग्य असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी (ता.पाच) महाविकास आघाडी सरकारला दणका दिला आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC Reservation) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टाळाटाळ न करता घेणयाचे आदेश न्यायालयाने दिले आहे.तसेच दोन आठवड्यांमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यासही न्यायालयाने सांगितले आहे. यामुळे मुंबईसह १८ हून अधिका पालिका व२५ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय महापालिका, झेडपी, नगरपालिका व ग्रामपंचायतींच्या निवडणुका न घेण्याचा महाविकास आघाडीने निर्णय घेतला होता. महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिका व नगरपालिकांच्या निवडणुकांत बहुसदस्यीय प्रभाग रचना पुन्हा आणण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयात याचिक दाखल करण्यात आल्या होत्या. त्या सर्व याचिक न्यायालयाने फेटाळल्या आहेत.

Sus Mahalunge Water Supply : Amol Balwadkar : सूस म्हाळूंगे वासियांच्या पाणी पुरवठा प्रश्नावर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

Categories
Breaking News PMC Political social पुणे

सूस म्हाळूंगे वासियांच्या पाणी पुरवठा प्रश्नावर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

पुणे : सूस आणि म्हाळुगे परिसरात शेकडो गृहनिर्माण संस्था आणि
निवासी संकुले आहेत. त्यापैकी कोणालाही पीएमसी किंवा पीएमआरडीएकडून अद्याप पाणीपुरवठा होत नाही. यासाठी या गृहनिर्माण संस्थांनी पीएमसी, पीएमआरडीएकडे संपर्क साधूनही, दोन्ही शासकीय संस्थांनी पाणी पुरवठ्यासारख्या गंभीर व निकडीच्या समस्येवर कोणताही तोडगा अद्याप काढलेला नाही. त्यामुळे अमोल बालवडकर यांनी याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
यापूर्वी ही दोन गावे पीएमआरडीएच्या अखत्यारीत होती. जुलै २०२१ पासून सूस आणि म्हाळुगे (अन्य २१ गावांसह) आता पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट झालेली आहेत. या निवासी इमारतींमधील रहिवाशांना पाणीपुरवठा करण्यासाठी कोणतेही नियोजन किंवा तरतूद केलेली नसतानाही पीएमआरडीए यांचेकडून या गावांमध्ये नवीन बांधकामांना सर्रासपणे परवानगी देण्यात येत आहे. या गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या परिसरातील पाणी पुरवठ्याच्या गंभीर व निकडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी  भाजपचे माजी नगरसेवक अमोल रतन बालवडकर यांच्याशी संपर्क साधला आहे. त्यानुसार अमोल  बालवडकर यांनी पीएमसी आणि पीएमआरडीए या दोन्ही प्राधिकरणातील संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे. परंतु दोन्ही सरकारी संस्थांनी संदिग्ध प्रतिसाद दिला असून सदरची समस्या सोडवण्यासाठी कोणीही जबाबदारी घेतली नाही. त्यामुळे या गावांना गेल्या अनेक वर्षांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने ते खासगी टँकरवर अवलंबून आहेत.
या विषयावर बोलताना अमोल बालवडकर म्हणाले की,
१. सूस आणि म्हाळुगे गावांना पाणीपुरवठा होत नसल्याच्या समस्येचे गांभीर्य ओळखण्यात पीएमआरडीए आणि पीएमसी दोन्ही अपयशी ठरले आहेत.
२. पीएमआरडीए आणि पीएमसीने या गंभीर समस्येचा सामना करण्यासाठी कोणताही कृती आराखडा राबविण्याची कोणतीही कार्यवाही केलेली नाही.
३. सूस आणि म्हाळुगे येथील रहिवाशांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी कोणाची आहे ? याचा स्पष्टपणे खुलासा करण्यासाठी पीएमआरडीए आणि पीएमसी दोघेही पुढे येत नाहीत.
४. पीएमआरडीएने या प्रदेशाला पाणीपुरवठा करण्यासाठी कोणताही आराखडा तयार न करता किंवा कोणत्याही पायाभूत सुविधांचा विकास न करता निवासी इमारतींच्या नविन बांधकामाना परवानगी दिली जात आहे. जर पीएमआरडीए पाणीपुरवठ्यासाठी तरतूद करू शकत नसेल तर पीएमआरडीएने या गावांतील नवीन बांधकामांना परवानग्या देणे बंद करावे.
५. या गंभीर समस्येचा सामना करण्यासाठी पीएमआरडीए आणि पीएमसी यांच्यात कोणताही संयुक्त विभाग कार्यरत नाही. यावेळी, श्री अमोल रतन बालवडकर असेही म्हणाले की – सूस आणि म्हाळुगे येथील रहिवाशांच्या पाणी पुरवठ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी व ती समस्या सोडवण्याची जबाबदारी कोणत्या प्राधिकरणाची आहे हे निश्चित करण्यासाठी माननीय मुंबई उच्च न्यायालयात मी जनहित याचिका दाखल केलेली आहे.
अॅड. सत्या मुळे यांनी अशी माहिती दिली की, नव्याने बांधलेल्या इमारतींना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी बिल्डरांची असेल, असे पीएमआरडीए आणि पीएमसी यांचेकडून सांगण्यात येते व त्याआधारे बिल्डरांकडून शपथपत्र किंवा हमीपत्र घेण्याची पद्धत पीएमआरडीए आणि
पीएमसीने लागू केलेली आहे. अशा प्रकारचे हमीपत्र (पाण्याचे हमीपत्र) दाखल केल्याशिवाय पीएमआरडीए नवीन बांधकामांना प्रारंभ प्रमाणपत्र देत नाही. हे एक बेकायदेशीर कृत्य आहे, कारण भारतीय राज्यघटनेनुसार पाणी पुरवठा करणे हे पीएमआरडीए आणि पीएमसी चे मूलभूत कर्तव्य आहे आणि अये मूलभूत कर्तवय ते बिल्डरला देऊ शकत नाहीत. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर बिल्डर निघून जातो आणि रहिवाशांना स्वत:चा त्रास सहन करावा लागतो आणि ते टँकर माफियांच्या ताब्यात येतात. पाण्याचे हमीपत्र घेण्याच्या या पद्धतीला देखील प्रस्तुत जनहित याचिकेत आव्हान देण्यात आले आहे. सूस आणि म्हाळुगे गावांतील रहिवाशांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पीएमसी किंवा पीएमआरडीएने तातडीने पुढे यावे. पाणी हे जीवनावश्यक मूलभूत गरजांपैकी एक आहे आणि भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद २१ अंतर्गत संरक्षित प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. तसेच भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद २४३ अंतर्गत पाणी पुरवठा करणे हे पीएमसी किंवा पीएमआरडीए यांचे मूलभूत कर्तव्य आहे. या अधिकारांची अंमलबजावणी करण्यासाठी बालवडकर यांनी याचिका दाखल केली आहे. 

Corporator Abdul Gafoor Pathan Vs Anuradha Shinde : नगरसेवक अब्दुल गफूर पठाण यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र उच्च न्यायालयाकडून रद्दबातल

Categories
Breaking News PMC Political पुणे

नगरसेवक अब्दुल गफूर पठाण यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र उच्च न्यायालयाकडून रद्दबातल

: अनुराधा मदनराव शिंदे यांनी पठाण यांच्या निवडीला दिले होते आव्हान

पुणे : कोंढवा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अब्दुल गफूर पठाण यांचे दगडफोडू जातीचे जात पडताळणी प्रमाणपत्र उच्च न्यायालयाने रद्दबादल केले आहे. त्यामुळे त्यांचे नगरसेवक पद धोक्यात आले असून त्यास तीन महिन्यात पुणे विभागीय जात पडताळणी समितीने या प्रमाणपत्राची फेर पडताळणी करून निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत.

गेल्या पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये कोंढवा येथील प्रभाग क्र. 27 मधून गफूर पठाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढवली होती त्यांच्या निवडीला प्रतिस्पर्धी भाजपा उमेदवर अनुराधा मदनराव शिंदे, हुसेन खान यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. ए. सय्यद आणि न्यायमूर्ती एस. जी. डीगे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने पठाण यांचे 17 जुलै 2017 रोजी दिलेले जात पडताळणी प्रमाणपत्र रद्दबातल केले.

न्यायालयाने हा निर्णय देताना विभागीय जात पडताळणी समिती, दक्षता पथक ,गफूर पठाण, तत्कालीन जुन्नर प्रांताधिकारी आणि दगडफोडू असल्याचा दाखला देणाऱ्या बेल्हे येथील बेल्हेश्वर मजूर सहकारी संस्थेवर कडक ताशेरे ओढले आहेत. हा निर्णय देताना उच्च न्यायालयाने अनुराधा मदनराव शिंदे यांनी दाखल केलेले सर्व पुरावे ग्राह्य धरून पठाण यांचा संपूर्ण युक्तिवाद फेटाळून लावला.

पठाण यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवताना दगडफोडू मुसलमान असल्याचा दावा केला होता. मात्र हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पठाण यांनी खोटी कागदपत्रे सादर केली. ती न्यायालयात टिकू शकली नाहीत. त्यांचे वडील व चुलते गवंडी तथा दगडफोडू असल्याचा बेल्हे श्वर मजूर सहकारी संस्थेचा जोडलेला 1985 मधील दाखला हा संगणकावर म्हणजेच फॅब्रिकॅटेड तयार केला असल्याचा ठपका न्यायालयाने निकालपत्रात ठेवला आहे.

दक्षता पथकाकडून हलगर्जीपणा करण्यात आला तसेच तत्कालीन जुन्नर उपविभागीय अधिकारी पांढरे यांनी अपुऱ्या कागदपत्रांवर जातीचा दाखला दिला असल्याचा निष्कर्ष न्यायालयाने काढला आहे. या प्रकरणात पठाण यांनी सादर केलेला निकाहनामा देखील बनावट असल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आली. अनुराधा मदनराव शिंदे यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे पठाण यांनी दाखले मिळवली असून त्यासाठी अधिकारी आणि पडताळणी समितीने संगणमत केले असल्याचे न्यायालयात सांगितले. न्यायालयाने गफूर पठाण यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र रद्दबादल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला या प्रकरणी जात पडताळणी समितीने येत्या तीन महिन्यात सुनावणी घेऊन दोन्ही बाजूचे म्हणणे घेऊन या प्रमाणपत्रावर निर्णय करावा असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणी उच्च न्यायालयात शिंदे यांच्या बाजूने सीनियर काउंसलर Ad.अनील अंतुरकर Ad. सुगंध देशमुख ,Ad.संदीप पाठक, यांनी काम पाहिले.

Big Breaking News : मोठी बातमी : गणेश  बिडकर  यांचे  सभागृह  नेते  पद  रद्द!

Categories
Breaking News PMC Political पुणे

गणेश  बिडकर  यांचे  सभागृह  नेते  पद  रद्द

: पुण्यात भाजपाला मोठा धक्का 

पुणे : भाजपने स्विकृत नगरसेवक गणेश बीडकर (Ganesh Bidkar)  यांना देण्यात आलेले सभागृहनेते पद (House leader) उच्च न्यायालयाने रद्द केले आहे. त्यामुळे महापालिकेची मुदत अवघ्या दोन आठवड्यात संपणार असताना हा भाजपला( BJP)  मोठा धक्का बसला आहे.

गणेश बीडकर यांची महापालिकेच्या सभागृहनेते पदी निवड केल्याने याविरोधात काँग्रेसचे पुरस्कृत अपक्ष नगरसेवक रविंद्र धंगेकर ((Corporator Ravindra Dhangekar)  यांनी उच्च न्यायालयात मार्च २०२१ मध्ये याचिका दाखल केली होती. या न्यायमूर्ती ए.ए. सय्यद व एस. जी. दिघे यांच्या खंडपिठाने सप्टेंबर महिन्यात सुमारे २० तास याचिकवेर सुनावणी घेतली. तेव्हापासून याचा निर्णय प्रलंबित होता. त्यानंतर आज यावर सुनावणी झाली, अशी माहिती धंगेकर यांचे वकील कपील राठोड यांनी दिली.
स्विकृत नगरसेवकास सभागृहनेतेपद देता येत नाही, त्यामुळे बीडकर यांचे पद रद्द करावी आणि त्यांच्या काळात झालेले सर्व निर्णयही रद्द करावेत अशी मागणी केली होती. सुनावणीनंतर पद रद्द केल्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. याची आॅर्डर दोन दिवसानंतर निघणार आहे, त्यानंतर बीडकर यांना यावर सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी १० दिवसांची मुदत असेल, असे राठोड यांनी सांगितले. दरम्यान न्यायालयाची निकालाची प्रत आल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करू असे बिडकर यांनी सांगितले.