Congress | Mohan joshi | कर्नाटक विधानसभा निवडणूक निरीक्षकपदी  मोहन जोशी

Categories
Breaking News Political पुणे

कर्नाटक विधानसभा निवडणूक निरीक्षकपदी  मोहन जोशी

पुणे – अखिल भारतीय कॉँग्रेस कमिटीने कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली असून प्रत्येक जिल्ह्यात लोकसभा मतदार संघ निहाय ज्येष्ठ नेत्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कॉँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रदेश कॉँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांची  चिकोडी लोकसभा मतदार संघासाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. तशा आशयाचे पत्र कॉँग्रेस कमिटीचे सरचिटणीस (संघटन) खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी पाठविले आहे.

मोहन जोशी यांनी कॉँग्रेस पक्ष संघटनेमध्ये विविध पदांवर काम केले असून आतापर्यंत 12 राज्यांमध्ये पक्ष संघटनेच्या कामांसाठी प्रभारी म्हणून काम पाहिले आहे.

Mohan Joshi Vs Prakash Javdekar | पुण्याच्या सांस्कृतिक कोपर्‍यावर प्रकाश जावडेकरांनी का हातोडा मारला? | मोहन जोशी यांचा सवाल

Categories
Breaking News cultural Political पुणे महाराष्ट्र

पुण्याच्या सांस्कृतिक कोपर्‍यावर प्रकाश जावडेकरांनी का हातोडा मारला? | मोहन जोशी यांचा सवाल

पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (National Film Archive of India) चा स्वतंत्रपणे चालणारा कारभार संपवून नॉशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये (National Film Development Corporation) पुण्याचे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय(नॉशनल फिल्म अर्कईव्ह ऑफ इंडिया),फिल्म्स डिव्हिजन, डायरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिव्हल, चिलड्रन्स फिल्म सोसायटी ऑफ इंडिया या नेहरु काळात स्थापन झालेल्या संस्थांचे विलिनीकरण करण्याचा निर्णय भाजपाच्या केंद्र सरकारने घेतला. यामुळे पुण्याच्या सांस्कृतिक कोपर्‍यावर जणू हतोडाच मारला गेला आहे आणि तोही स्वतःला पुणेकर म्हणवणारे तेव्हा केंद्रात माहिती आणि नभोवानी मंत्री असणारे प्रकाश जावडेकर यांच्या संमतीने! पुण्यातील प्रभात रोडवरील या सांस्कृतिक कोपर्‍याचे स्वतंत्र अस्तित्व नष्ट करण्याच्या केंद्र सरकारच्या या निर्णयाला मंत्री प्रकाश जावडेकर यांनी संमती का दिली? कदाचित त्यांना हा विषय कळलाच नसेल आणि तरी त्यांनी संमती दिली. या सर्व गोष्टींचा निषेध कॉँग्रेस पक्षातर्फे आम्ही करतो. असे महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Pradesh Congress Vice President Mohan Joshi) यांनी म्हटले आहे.

जोशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनानुसार नॉशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ही फायदा मिळवणारी कंपनी असून त्यामध्ये वरील सर्व संस्थांचे विलीनीकरण झाल्यामुळे त्यांची स्वायत्ता आणि लोकाभिमूखता संपली असून या सर्व संस्थांमधून पैसा मिळवणे. हे ध्येयधोरण राबवले जाणार आहे. याशिवाय पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, फिल्म ऑड टेलिव्हीजन इंस्टटयुट, मुंबईतील फिल्मस डिव्हिजन यांच्या शेकडो एकर जमिनीदेखील विकासाच्या नावाखाली व्यावसायिकदृष्ट्या विकसीत करुन त्यापासून करोडो रुपये मिळवणे हे काही वर्षातच घडू शकते. यासोबतच राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयासारख्या लोकाभिमूख संस्थेच्या सेवा आता अधिक महाग होतील.

पुण्याचे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला आतापर्यंत चित्रपटाचे अभ्यासक असणारे अनेक संचालक लाभले आणि त्यामुळे ही संस्था भरभराटीला आली. आता मात्र पुण्याचा सांस्कृतिक कोपरा असणार्‍या या संस्थेवर केंद्रातील अधिकारी राज्य करणार तेथून या वैभवशाली संस्थेला ओहोटी लागू शकते. त्यामुळेच प्रत्येक पुणेकरांनी पुण्याच्या सांस्कृतिक वैभवावर हतोडा मारणार्‍या या निर्णयास संमती अथवा मूकसंमती देणार्‍या तत्कालीन मंत्री प्रकाश जावडेकर यांचा निषेध केलाच पाहिजे. कदाचित याचे खाजगीकरण करण्याचाही केंद्रातील भाजपा सरकारचा हा डाव असावा. पुण्याच्या हिताला बाधा पाहोचवणार्‍या या पापास क्षमा नाही. असे ही जोशी यांनी म्हटले आहे.

Congress | Fuel price hike | हात गाडीवर पेट्रोल डिझेलचे बॅरल ठेवून इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन

Categories
Breaking News Political पुणे

हात गाडीवर पेट्रोल डिझेलचे बॅरल ठेवून इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन

सातत्याने होत असलेल्या इंधन दरवाढीच्या (fuel price hike) निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी व रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली आज हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडचे कार्यालय येथे काँग्रेस पक्षाच्या (congress party) वतीने अनोखे आंदोलन (agitation) करण्यात आले.

हात गाडीवर पेट्रोल डिझेलचे बॅरेल ठेवून गेल्या सहा महिन्यात झालेल्या इंधन वाढीची माहिती बॅनर वर लिहून मोर्चा हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन पुणे मुख्य कार्यालयाकडे पोहोचला.

या ठिकाणी केंद्र सरकारच्या विरुद्ध घोषणा देण्यात आले.यावेळी बोलताना वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी म्हणाले की सहा महिन्यापूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव 129 डॉलर प्रति बॅरल होते. त्यावेळी पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर शंभर रुपयापेक्षा अधिक होते. आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर प्रति बॅलर 76 डॉलर ते 80 डॉलरच्या दरम्यान आहे. असे असताना सुद्धा आज पेट्रोलचा भाव 106 रुपये तर डिझेलचा भाव 94 रुपये प्रतिलिटर आहे.यामुळे सर्वसामान्य जनतेची पिळवणूक होत आहे. केंद्र सरकारने जनतेच्या हिताकरिता त्वरित पेट्रोल आणि डिझेलचे दर 70 रुपये प्रति लिटर करावे,अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण शहरभर तीव्र आंदोलन करण्यात येईल.

यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना माजी गृराज्यमंत्री प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, इंधन दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंचे चे भाव वाढले आहे. सर्व तेल कंपन्यांकडे तेलाचा साठा मोठ्या प्रमाणात आहे. रशियाने भारतला कच्च्या तेलाचा साठा पुरवला आहे. कच्च्या तेलाचे साठा मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे भारत इंधन फ्रान्स, हॉलंड व अनेक देशांना निर्यात करीत आहे.एकीकडे इंधन निर्यात करून तेल कंपनी व सरकार मोठ्या प्रमाणावर नफा मिळवत आहे आणि दुसरीकडे कच्च्या तेलाचे भाव कमी असताना सुद्धा ग्राहकांना जास्तीच्या दराने इंधन देत आहे हे अन्याकारक आहे. काँग्रेसपक्ष नेहमी जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून आंदोलन करत असते जर केंद्र सरकारने इंधन चे दर कमी केले नाही तर काँग्रेस पक्षातर्फे उग्र आंदोलन करण्यात येईल.

यानंतर काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशनचे मुख्य व्यवस्थापक श्री मनीष अग्रवाल यांना भेटून निवेदन दिले.

याप्रसंगी नगरसेवक रवींद्र धंगेकर अविनाश बागवे,नरुद्दीन सोमजी, रमेश अय्यर,प्रशांत सुरसे, शेखर कपोते, शाबिर खान,चेतन आगरवाल, मंजूर शेख, शिलार रतनगिरी, स्वाती शिंदे,कान्होजी जेधे, बबलू कोळी, सुनील घाडगे ,प्रदीप परदेशी, दया आडगळे,रोहित अवचिते, अंजली सोलापुरे, दिलीप थोरात ,संगीता थोरात, रॉबर्ट डेव्हिड,क्लेमेंट, लाजरस , सुनील बावकर , हुसेन शेख ,अस्लम बागवान , रामदास मारणे, सुरेश कांबळे, फैयाज शेख, विपुल उमंदे, सोनिया ओव्हाळ,सनी ओव्हाळ, मंगला चव्हाण, व असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Sunil Gogle | Congress | राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक सुनील गोगले यांचा बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक सुनील गोगले यांचा बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश

पुणे महानगरपालिकेत वर्ष 2007/ 2012 राष्ट्रवादीचे नगरसेवक सुनील गोगले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहनदादा जोशी माजी गृहराज्यमंत्री रमेश दादा बागवे यांच्या उपस्थिती विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे

यावेळी गोगले म्हणाले, ‘आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोहन जोशी , रमेश बागवे यांच्याशी संपर्क झाला माझ्यावर विश्वास दाखवून मला कॉंग्रेस पक्षात येण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच भाजपच्या शासन काळातील वाढलेली महागाई, बेरोजगारी, शेतकन्यांवरील अत्याचार, समाजा समाजातील कटुता, संविधानाला निर्माण झालेला धोका, राष्ट्रीय असुरक्षितता, शोषित, दलीत, महिला,अल्पसंख्याक यांच्यावरील अन्याय इ. अनेक समस्यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाचे आदरणीय राष्ट्रीय नेते सन्माननीयश्री राहुलजी गांधी यांच्या ऐतिहासिक ” भारत जोडो यात्रा” मुळे मी आत्यंतिक प्रभावित झालो आणि काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.

काँग्रेस पक्षाचा एक सैनिक म्हणून आपण जी जबाबदारी माझ्यावर सोपवाल ती प्रामाणिकपणे निभावण्याचा प्रयत्न करीन व पक्षाच्या ध्येय धोरणांना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचे योजले आहे

MLA Balasaheb Thorat | भाजपच्या बेभान, बेताल नेत्यांना वठणीवर आणावे लागेल |काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

भाजपच्या बेभान, बेताल नेत्यांना वठणीवर आणावे लागेल

|काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

| १८ व्या सेवा कर्तव्य त्याग सप्ताहाचा समारोप

पुणे : “गेल्या काही वर्षात लोकशाही, राज्यघटना आणि महापुरुषांवर सातत्याने आघात होत आहेत. लोकशाहीचे मूल्ये, तत्वांना पायदळी तुडवले जात आहे. समाजात द्वेष पसरवून अराजकता माजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकशाहीचे, राज्यघटनेचे संरक्षण करण्यासाठी विद्यार्थी, तरुणांसाठी राज्यघटनेच्या मूल्यांवर, तत्वांवर शिबिरे घेऊन जागृती करायला हवी,” असे प्रतिपादन काँग्रेसचे नेते माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. भारतीय जनता पार्टीचे नेते बेभान झाले असून, त्यांना वठणीवर आणण्यासाठी निवडणुकीतून उत्तर देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. (MLA Balasaheb thorat)

श्रीमती सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त (Soniya Gandhi Birthday) आयोजिलेल्या १८ व्या सेवा कर्तव्य त्याग सप्ताहाचा समारोप बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत झाला. काँग्रेस भवनात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवा कर्तव्य त्याग सप्ताहाचे संयोजक व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी होते. यावेळी माजी मंत्री रमेश बागवे, माजी आमदार दीप्ती चवधरी, माजी महापौर कमल व्यवहारे, गटनेते आबा बागुल, दत्ता बहिरट, संजय बालगुडे, वीरेंद्र किराड, माजी नगरसेवक रविंद्र धंगेकर,अविनाश बागवे, चंदुशेठ कदम, लता राजगुरू, मनीष आनंद, सुजाता शेट्टी, रफिक शेख, पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष कैलास कदम, रजनी त्रिभुवन, प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे, रोहन सुरवसे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष राहुल सिरसाट, भूषण रानभरे, शिवा मंत्री, कैलास गायकवाड, प्रवीण करपे, विजय खळदकर, रमेश सोनकांबळे, सतीश पवार, रमेश सकट, राजेंद्र भुतडा, अजित जाधव, सुनील धाडगे, चंद्रशेखर कपोते, रतनगिरी शिलार, प्रशांत सुरसे, रामदास मारणे, भरत सुराणा, बाळासाहेब अमराळे, भीमराव पाटोळे, बाळासाहेब मारणे, भगवान धुमाळ, ऍड. शब्बीर खान, सीमा सावंत, स्वाती शिंदे, प्राची दुधाने, रमेश पवळे, किशोर मारणे, रमेश अय्यर, चेतन अगरवाल, जया किराड, गौरव बोराडे, कान्होजी जेधे, अजय पाटील, अस्लम बागवान, निलेश बोराटे, द. सु. पोळेकर, रेखाताई घलोत, अनुसया गायकवाड, साहिल केदारी, विशाल मलके, श्रीकृष्ण बराटे आदी उपस्थित होते.

बाळासाहेब थोरात म्हणाले, “सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ‘युपीए’ सरकारने सामान्य नागरिक केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेतले. मुक्त अर्थव्यवस्थेला चालना दिली. माहिती अधिकार, शिक्षणाचा अधिकार, अन्न सुरक्षा योजना, रोजगार हमी योजना अशा लोकोपयोगी निर्णय घेतले गेले. त्यांच्या या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न मोहन जोशी या सप्ताहाद्वारे करत आहेत. सलग १८ वर्षे हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्याचे काम केवळ मोहन जोशी करू शकतात. भारत जोडो यात्रेला ते माझ्याबरोबर सहसमन्वयक म्हणून काम पाहत होते. त्यांचे काम एखाद्या लॅपटॉपप्रमाणे आहे. सगळ्या गोष्टींच्या बाबतीत ते अपडेट असतात. पक्षासाठी एकनिष्ठ व कर्तव्य भावनेने करत असलेल्या मोहन जोशी यांचे कार्य कौतुकास्पद आहे.”

“आज देशात वेगळी परिस्थिती आहे. नोटबंदी, जीएसटीसारखे चुकीचे निर्णय लादले गेले. त्यातून महागाई वाढत आहे. स्वायत्त संस्थांचे अस्तित्व धोक्यात येत आहे. महाराष्ट्राची सातत्याने अवहेलना सुरु आहे. प्रकल्प गुजरातला जाताहेत, कर्नाटकचे मुख्यमंत्री रोज दडपशाहीची भाषा वापरात आहेत. राज्यातील सरकार, मुख्यमंत्री त्यावर बोलत नाही. याउलट छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकर यांच्यासह इतर महापुरुषांचा अवमान करण्याची चढाओढ भाजप त्यांच्या नेत्यांमध्ये लागल्याचे दिसते. त्यामुळे बेताल आणि बेभान वागणाऱ्या भाजपचा बुरखा फाडून खरा चेहरा जनतेसमोर आणण्याचे काम आपल्याला करावे लागेल,” असे बाळासाहेब थोरात यांनी नमूद केले.

बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले, “राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. देशासाठी कठीण असणाऱ्या या कालखंडात राहुल गांधी पायी चालत महागाई, बेरोजगारी, द्वेषभावना याला वाचा फोडत आहेत. सामान्यांचा, शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्याचे काम या यात्रेतून होत आहे. हजारोंच्या संख्येने लोक उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहे. एका चांगल्या हेतूने देशहितासाठी निघालेल्या राहुल गांधींच्या यात्रेमुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे. देशवासियांना आशेचा किरण दाखवण्याचे काम या यात्रेने केले आहे. गुजरातमध्ये भाजपाला चांगल्या जागा मिळाल्या असल्या, तरी त्यांचा नैतिक पराभव तिथे झाला आहे. आप, एमआयएम पक्षाने काँग्रेसची मते खाल्ल्याने भाजपाला गुजरातमध्ये यश मिळाले. मात्र हिमाचलमध्ये काँग्रेस आणि दिल्लीमध्ये आप पक्षाला मिळालेला वीज भाजपाला जनतेने दाखवलेला लाल कंदील आहे,”

प्रास्ताविकात मोहन जोशी (Former MLA Mohan Joshi)  यांनी सप्ताहात झालेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. मोहन जोशी म्हणजे, “श्रीमती सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून २ ते ९ डिसेंबर या कालावधीत हा अठरावा सप्ताह उत्साहात साजरा झाला. शहराच्या विविध भागात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवले. आरोग्य शिबिरे, शालेय साहित्याचे वाटप, शिष्यवृत्तीचे वाटप, जनजागृतीचे कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी यंदा हा सप्ताह एका वेगळ्या उंचीवर गेला आहे.”

आबा बागुल, कैलास कदम यांनीही मनोगते व्यक्त केली. वीरेंद्र किराड यांनी सूत्रसंचालन केले. रवींद्र धंगेकर यांनी आभार मानले.

Dr. Ganesh Devi | ‘भारत जोडो’मुळे सामाजिक ऐक्य, सलोखा वाढेल : डॉ. गणेश देवी

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

‘भारत जोडो’मुळे सामाजिक ऐक्य, सलोखा वाढेल : डॉ. गणेश देवी

– अठराव्या सेवा कर्तव्य त्याग सप्ताहांतर्गत ‘भारत जोडो’ महाराष्ट्रातील यात्रेच्या छायाचित्रांचे तीन दिवसीय प्रदर्शन

पुणे : “राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी १०२ वर्षांपूर्वी देशभर झपाटून प्रवास केला. हजारो अनुयायांना स्वातंत्र्यसंग्रामात आणले. आज राहुल गांधी (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रेतून (Bharat Jodo Yatra) तितक्याच झपाट्याने प्रवास करताहेत. देशातील द्वेष संपवून समाजाला जोडण्याचे काम राहुल गांधी करत आहेत. भारत जोडो यात्रेमुळे सामाजिक ऐक्य, सलोखा वाढेल. तसेच सामाजिक, राजकीय व अध्यात्मिक उद्देशाने निघालेल्या ‘भारत जोडो’ यात्रेतुन काँग्रेसही उभारी घेईल,” असे प्रतिपादन ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी (Dr Ganesh Devi) यांनी केले.

श्रीमती सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित १८ व्या सेवा कर्तव्य त्याग सप्ताहांतर्गत महाराष्ट्रातील ‘भारत जोडो’ पदयात्रेतील छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. देवी यांच्या हस्ते झाले. बालगंधर्व कलादालनात हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. येत्या शुक्रवारपर्यंत (दि. ९) सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी (Fomer MLA Mohan Joshi) होते. यावेळी सौ. देवी, शिक्षक मतदारसंघाचे आमदार जयंत आसगावर, माजी मंत्री रमेश बागवे, शेतकरी नेते गजानन अमदाबादकर, राजस्थान काँग्रेसचे नेते जुगल प्रजापती, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस वीरेंद्र किराड, दत्ता बहिरट, चंद्रशेखर कपोते, रमेश अय्यर, चेतन अगरवाल, प्रशांत सुरसे, आयुब पठाण, प्रथमेश आबनावे, पुष्कर आबनावे आदी उपस्थित होते.

डॉ. गणेश देवी म्हणाले, “महात्मा गांधींचा जो झंजावात होता, तोच झंझावात राहुल गांधींच्या यात्रेत दिसत आहे. आपल्या हातून झालेल्या चुकांचा पश्चाताप करण्याची ही वेळ आहे. मात्र, या कठोर तपश्चर्येतून समाजातील तणाव, दुरावा दूर करून समाज व देशाला एकसंध ठेवण्याचा प्रयत्न राहुल गांधी करत आहेत. भाजपच्या धोरणामुळे समाज विभागाला जात आहे. हे थांबवण्यासाठी द्वेषमुक्तीचा हा लढा अधिक विस्तृत व्हायला हवा. त्यासाठी भारत जोडो यात्रेत प्रत्येक भारतीयाने सहभागी व्हावे. आजचा अंधार दूर करून उद्याची पहाट उजाडणार, हा आशावाद या यात्रेने दिला आहे.”

प्रास्ताविकात मोहन जोशी म्हणाले, “देशाच्या इतिहासात ‘भारत जोडो’ यात्रा एक महत्त्वाची घटना आहे. दोन आठवडे ही यात्रा महाराष्ट्रातून गेली. या देदीप्यमान यात्रेत अनेकांना सहभागी होता आले नाही. त्यामुळे या छायाचित्र प्रदर्शनातून ही यात्रा पुणेकरांना अनुभवता येईल. निवडक २०० छायाचित्रातून ही चित्ररूपीयात्रा साकारली आहे.”

जयंत आसगावकर म्हणाले, “मोहन जोशी यांच्या प्रयत्नातून सुरु असलेल्या या सप्ताहाचे सातत्य खूप महत्वाचे आहे. राहुल गांधी झपाट्याने काम करताहेत. द्वेषभावना संपवण्याचे ध्येय घेऊन चालत आहेत. यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अधिक लोकांनी यात सहभागी होऊन एकजूट दाखवावी. यातून तरुण कार्यकर्त्यांनाही प्रोत्साहन मिळत आहे.”

गजानन आमदाबादकर म्हणाले, “राहुल गांधींची भारत जोडो यात्रा भविष्याची नांदी आहे. शेतकरी या देशाचे चित्र बदलू शकतो. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राहुल गांधी प्रयत्न करताहेत. त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेताहेत. त्यामुळे शेतकरी या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले. आपल्या मुलांच्या मनात द्वेष पसरवण्याचे काम होतेय, हे थांबले पाहिजे.”

अजित जाधव यांनी सूत्रसंचालन केले. प्रथमेश आबनावे यांनी आभार मानले.

Health check-up camp for women journalists | सेवा कर्तव्य त्याग सप्ताहांतर्गत महिला पत्रकारांसाठी दोन दिवसीय आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन

Categories
Breaking News Political social आरोग्य पुणे

सेवा कर्तव्य त्याग सप्ताहांतर्गत महिला पत्रकारांसाठी दोन दिवसीय आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन

पुणे : श्रीमती सोनिया गांधी (Soniya Gandhi Birthday) यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अठराव्या सेवा कर्तव्य त्याग सप्ताहात महिला पत्रकारांसाठी (Women Journalists) आयोजिलेल्या दोन दिवसीय आरोग्य तपासणी शिबिराचे (health check-up cam) उद्घाटन बुधवारी झाले. पुणे श्रमिक पत्रकार संघ, (PUWJ) पूना हॉस्पिटल (Poona Hospital) यांच्या सहकार्याने हे शिबीर होत आहे.

सेवा कर्तव्य त्याग सप्ताहाचे मुख्य संयोजक व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी (Former MLA Mohan Joshi), प्रसिद्ध उद्योगपती राजकुमार चोरडिया, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष स्वप्नील बापट, पूना हॉस्पिटलचे डॉ. विनोद शहा, डॉ. गिरीश देशमुख, डॉ. इना गांगुली, वरिष्ठ पत्रकार चैत्राली चांदोरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन झाले.

प्रसंगी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे अध्यक्ष प्रशांत सुरसे, रमेश अय्यर, गौरव बोऱ्हाडे, चेतन अग्रवाल, सुरेश कांबळे, आयुब पठाण, धनजय भिलारे, किरण गायकवाड, राजेश सुतार, कान्होजी जेधे, आयुब पठाण, स्वाती शिंदे, अंजली सोलापूरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

मोहन जोशी म्हणाले, “राजकीय कार्यक्रम घेण्यापेक्षा समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. धकाधकीच्या जीवनात महिला पत्रकारांनी आरोग्याची काळजी घ्यायला हवी. त्यांच्यासाठी हे विशेष शिबीर असून, यामध्ये सर्व प्रकारच्या तपासण्या केल्या जाणार आहेत. यामध्ये पूना हॉस्पिटल सहकार्य करीत आहे.

स्वप्नील बापट म्हणाले, “एक हेतू, उद्देश घेऊन सलग अठरा वर्षापासून एखादा उपक्रम चालणे कौतुकास्पद आहे. सेवा कर्तव्य त्याग या तिन्ही गोष्टी पत्रकारांशी निगडित आहेत. कामाच्या ओघात आरोग्याकडे दुर्लक्ष होते त्याचे गंभीर परिणाम होतात, हे गेल्या दोन वर्षात अनेकदा दिसले. त्यामुळे पत्रकारांच्या आरोग्यासाठी सातत्याने उपक्रम राबवत आहोत.”

राजकुमार चोरडिया म्हणाले, “संवेदनशील वृत्तीने मोहन जोशी समाजातील प्रत्येक घटकासाठी उपयुक्त असा उपक्रम राबवत असतात. गेल्या अठरा वर्षात या सप्ताहाने भरीव असे योगदान दिले आहे. सामाजिक उपक्रमांतून वाढदिवस साजरा करण्याची ही परंपरा आदर्शवत आहे.

प्रास्ताविक राजू नानेकर यांनी केले. प्रशांत सुरसे यांनी सूत्रसंचालन केले. रमेश अय्यर यांनी आभार मानले.

Sonia Gandhi’s birthday |  सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, त्याग, कर्तव्य सप्ताह २०२२ | ‘एक पाऊल विश्वासाचे ‘ उपक्रमाने २ डिसेंबर रोजी प्रारंभ

Categories
Breaking News cultural Political देश/विदेश पुणे

 सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, त्याग, कर्तव्य सप्ताह २०२२

| ‘एक पाऊल विश्वासाचे ‘ उपक्रमाने २ डिसेंबर २०२२ रोजी प्रारंभ

 |भारत जोडो यात्रा प्रदर्शन, सोनिया शक्ती शिष्यवृत्ती प्रारंभ, महिला पत्रकारांसाठी आरोग्य शिबीर आदी विविध कार्यक्रम.

पुणे : कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या, सोनियाजी गांधी (Soniya Gandhi, Congress Leader) यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. एक पाऊल विश्वासाचे या उपक्रमाने सप्ताहाचे उदघाटन माजी मंत्री मा. जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते शुक्रवार, दि. २ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता एस.एम. जोशी सभागृह येथे होणार आहे. याप्रसंगी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे, आमदार संग्रामदादा थोपटे, ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार उपस्थित राहाणार आहेत, अशी माहिती सप्ताहाचे मुख्य संयोजक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी (Former MLA Mohan Joshi) यांनी दिली.

सोनियाजी गांधी यांनी २००४ साली पंतप्रधानपदाचा (Prime Minister) त्याग केला. तेव्हापासून त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने २००४ सालापासून सलग हा सप्ताह साजरा केला जात असून यंदा १८वे वर्ष आहे. या सप्ताहात दि. २ ते ९ डिसेंबरपर्यंत विविध कार्यक्रम होतील. महाराष्ट्रातील दिग्गज नेतेही मार्गदर्शन करणार आहेत.

भारत जोडो यात्रा प्रदर्शन

काँग्रेस नेते खा. राहुल गांधी (MP Rahul Gandhi)  यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra)  चालू असून जनतेचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रातील यात्रेदरम्यानच्या निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन दि. ७ ते ९ डिसेंबर रोजी भरविण्यात येणार आहे.

महिला पत्रकारांसाठी आरोग्य शिबीर

पत्रकारितेच्या व्यस्त जीवनात स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे बऱ्याच महिला पत्रकारांना (Woman Journalist) जमत नाही. हे लक्षात घेऊन पूना हॉस्पिटल येथे दि. ७ ते ९ डिसेंबर मोफत आरोग्य शिबीर आयोजित केले आहे.

सोनिया शक्ती शिष्यवृत्ती योजना

सोनियाजी गांधी यांचा ७६ वा वाढदिवस आहे. यानिमित्त महाविद्यालयीन ७६ विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

माजी मुख्य मंत्री  पृथ्वीराजजी चव्हाण यांचे दि. ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी ‘ राज्यघटनेचे संरक्षण आवश्यक विषयावर व्याख्यान.

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग संस्थांमध्ये विविध कार्यक्रम.

एडस नियंत्रण जनजागृतीसाठी (AIDs control) देवदासींच्या उपस्थितीत सामुदायिक शपथ आणि चित्र प्रदर्शन. बुधवार पेठेतील गुजराती शाळेत दि. ७ रोजी कार्यक्रम होईल.

गाथा रयतेच्या राजाची, हा शाहिरी पोवाड्यांचा जोशपूर्ण कार्यक्रम. दोन तासांचा हा कार्यक्रम शहरात विविध भागात सादर केला जाईल.

सफाई कर्मचाऱ्यांना मोफत साडी वाटप.

तृतीय पंथीयांशी संवाद आणि सन्मान.

सुकन्या समृध्दी योजना कार्ड वाटप.

महाआरोग्य तपासणी शिबीर

स्त्री पुरुष समानता विषयावर चर्चा.

आईला सुटी हा गृहिणींसाठी अभिनव उपक्रम.

बॉक्सिंग स्पर्धा.

महिलांसाठी रोजगार मेळावा.

Ramdev Baba Vs Congress | रामदेवबाबा यांच्या उत्पादनांवर बहिष्कार घाला | माजी आमदार मोहन जोशी | पतंजली दुकानासमोर काँग्रेसची तीव्र निदर्शने

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र

रामदेवबाबा यांच्या उत्पादनांवर बहिष्कार घाला

|  माजी आमदार मोहन जोशी

| पतंजली दुकानासमोर काँग्रेसची तीव्र निदर्शने

| रामदेवबाबा यांच्यावर गुन्हा दाखल करा – माजी मंत्री रमेश बागवे
पुणे : भारतीय संस्कृतीला (Indian culture) काळीमा फासणारी वक्तव्ये आणि महिलांचा अवमानकारक उल्लेख करणाऱ्या रामदेवबाबा (Ramdevbaba) यांच्या उत्पादनांवर बहिष्कार घाला, असे आवाहन माजी आमदार, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी (Mohan joshi) यांनी केले आहे. तसेच रामदेवबाबा यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माजी गृह राज्यमंत्री आणि प्रदेश उपाध्यक्ष रमेश बागवे (Ramesh Bagwe) यांनी केली.
महिलांविषयी असभ्य आणि विकृत उद्गार काढल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या (congress party) वतीने मुकुंदनगर येथील पतंजली दुकांनासमोर तीव्र निदर्शन शनिवारी करण्यात आली. रामदेवबाबा यांच्या प्रतिमेला चपला आणि बांगड्यांचा हार घालण्यात आला.काळी शाई फासून निषेध करण्यात आला. आधुनिक दुर्योधन रामदेवबाबाचा निषेध असो, नारी शक्तीचा अवमान करणाऱ्या बाबावर बहिष्कार घाला, अशा घोषणांचे फलक कार्यकर्त्यांनी हाती घेतले होते.
बाबा रामदेव यांनी आपली संकुचित आणि विकृत मनोवृत्ती वेळोवेळी दाखवली आहे. या बेताल बाबांना वठणीवर आणण्यासाठी त्यांच्या पतंजली उत्पादनांवर बहिष्कार टाकला पाहिजे तरच त्याला आळा बसेल, असे मोहन जोशी यांनी यावेळी बोलताना  सांगितले.
उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांच्या उपस्थितीत लाजिरवाणे विधान रामदेव बाबा यांनी केले. उपमुख्य मंत्री फडणवीस यांनी गांभीर्याने दखल घेऊन रामदेव बाबांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रमेश बागवे यांनी केले.
या निदर्शनामध्ये प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी,प्रदेश उपाध्यक्ष रमेश बागवे,अभय छाजेड,आबा बागुल,रमेश अय्यर,प्रवीण करपे,प्रशांत सुरसे,चेतन आगरवाल,प्रथमेश आबनावे,अक्षय जैन,रोहन सुरवसे पाटील,पुष्कर आबनावे,सुरेश कांबळे,विश्वास दिघे,स्वाती शिंदे,पल्लवी सुरसे,सीमा महाडिक,अनुसया गायकवाड,अंजली सोलापुरे, सोनिया ओव्हाळ,आयेशा शेख,मनीषा सुपकडे,पपिता सोनवणे,बेबी ताई राऊत,योगिता सुराणा आदी सामील होते.

Congress Vs PM Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यापारी आणि जनता भिकारी ! मोहन जोशी | गॅस सिलिंडरवर मर्यादा लावून मोदी सरकारकडून जनतेची क्रूर थट्टा

Categories
Breaking News Commerce Political social पुणे महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यापारी आणि जनता भिकारी ! मोहन जोशी

| गॅस सिलिंडरवर मर्यादा लावून मोदी सरकारकडून जनतेची क्रूर थट्टा

जागतिक बाजारात क्रूड ऑईलचे दर सध्या सर्वात निच्चांकी पातळवीर आहेत पण देशात पेट्रोल, डिझेल व गॅसचे दर मात्र मोदी सरकार कमी करत नाही. मागील तीन महिन्यापासून क्रूड ऑईलचे दर कमी होत आहेत पण पेट्रोल, डिझेलचे दर कमी न करता मोदी सरकार त्यातून जनतेची लूट करत आहे. आतातर मोदी सरकारने घरगुती सिलिंडर वापरावरच मर्यादा आणून जनतेची क्रूर थट्टा केली आहे. नरेंद्र मोदींच्या व्यापारी वृत्तीमुळे जनता मात्र भिकारी झाली आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली आहे.

केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे फक्त भांडलदारांचे हित जोपासणारे सरकार आहे. या सरकारच्या काळात मोजक्या भांडवलदारांची संपत्ती झपाट्याने वाढत आहे तर गरिब, मध्यमवर्ग, सर्वसामान्य जनता मात्र समस्यांच्या गर्तेत ढकलली जात आहे. नरेंद्र मोदींनी व्यापारी वृत्तीमुळे देशातील सगळी संपत्ती विकून टाकली आहे. केवळ हम दो हमारे दो, हेच मोदी सरकारचे काम आहे. सर्वसामान्य जनता महागाई, बेरोजगारी सारख्या समस्यांनी त्रस्त आहे आणि मोदी व मोदींचे मित्र मात्र मस्त आहेत. महागाईच्या आगडोंबाने जनतेला जगणे कठीण झाले आहे तसेच जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावून महागाई वाढवण्यात आणखी हातभार लावला जात आहे. पेट्रोल, डिझेलच्या करातून मोदी सरकारने २७ लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे. मोदी देश विकून देश चालवत आहेत त्यांच्या या व्यापारीवृत्तीमुळे देश रसातळाला जात आहे असेही मोहन जोशी म्हणाले.