Hanuman Chalisa and Iftar party : दुसर्‍या धर्माचा द्वेष बाळगणे या देशाची संस्कृती नाही : अजित पवारांचा  टोला 

Categories
Breaking News cultural Political social पुणे महाराष्ट्र

दुसर्‍या धर्माचा द्वेष बाळगणे या देशाची संस्कृती नाही

: अजित पवारांचा  टोला

पुणे : आपल्या भारत देशात प्रत्येकाला आपल्या धर्माचा अभिमान असणे , यात काही गैर नाही. परंतु आपल्या धर्माचा अभिमान बाळगत असताना दुसर्‍या धर्माचा द्वेष बाळगणे या देशाची संस्कृती नाही. गेल्या काही वर्षांमध्ये देशातील वातावरण चुकीच्या दिशेने जात असून या वातावरणामुळे धार्मिक व प्रांतिक सख्य धोक्यात आले असून ही गोष्ट निश्चितच भूषावह नाही. असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने कर्वेनगर येथील हनुमान मंदिरात मुस्लिम बांधवांच्या हस्ते हनुमान जयंतीची आरती घेण्यात आली व या मंदिराच्या प्रांगणात हिंदू – मुस्लिम बांधवांना रोजा इफ्तार देण्यात आला. यावेळी आलेल्या सर्व मुस्लिम बांधवांनी आपल्या पवित्र रोजाचा उपवास सोडला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सामाजिक सलोख्यासाठी घेतलेल्या या अभिनव कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंतर पाटील , खासदार  सुप्रियाताई सुळे,महिला आयोगाच्या अध्यक्षा  रुपालीताई चाकणकर , शहराध्यक्ष प्रशांत जगताप,आमदार चेतन तुपे आदी नेत्यांसह प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते व मोठ्या संख्येने सर्वधर्मीय बांधव उपस्थित होते.

या कार्यक्रमप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले की, “विविधतेतून एकतेने नटलेल्या भारतभूमीमध्ये सर्व धर्म, प्रांत व जातीचे नागरिक गुण्या गोविंदाने राहतात.या धर्म जात प्रांत यांचे वेगवेगळे सण असून सर्व नागरिक एकमेकांचे सण उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करतात प्रत्येक जण आपापल्या जातीची ,धर्माची परंपरा मोठ्या निष्ठेने पार पाडतात. अशा आपल्या भारत देशात प्रत्येकाला आपल्या धर्माचा अभिमान असणे , यात काही गैर नाही. परंतु आपल्या धर्माचा अभिमान बाळगत असताना दुसर्‍या धर्माचा द्वेष बाळगणे या देशाची संस्कृती नाही. गेल्या काही वर्षांमध्ये देशातील वातावरण चुकीच्या दिशेने जात असून या वातावरणामुळे धार्मिक व प्रांतिक सख्य धोक्यात आले असून ही गोष्ट निश्चितच भूषावह नाही.या द्वेषाची सुरवात उत्तरेतील राज्यांमध्ये झाली असली तरी गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात देखील काही मंडळी अश्या गोष्टी करू पाहत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर या देशातील सलोखा टिकवून ठेवणे ही देशातील सर्व सजग नागरिकांची जबाबदारी आहे म्हणून हा कार्यक्रम घेण्यात आल्याचे सांगितले”.

या कार्यक्रमात इफ्तारपूर्वी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पूर्ण हनुमान चालीसा पठण केले तर सोहेल शेख यांनी नमाज पठण केले.

NCP’s agitation : शरद पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पुणे राष्ट्रवादीचे आंदोलन 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

शरद पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पुणे राष्ट्रवादीचे आंदोलन

पुणे : शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानी महाराष्ट्राच्या झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी बालगंधर्व चौक येथे तीव्र निषेध आंदोलन केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष  प्रशांत जगताप म्हणाले, एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपाचा विषय हा पूर्णपणे न्यायप्रविष्ट असताना तसेच  शरद पवारसाहेबांचा या विषयाशी काहीही संबंध नसताना निव्वळ विरोधी पक्ष भाजप व भाजपचे प्रवक्ते असणारे वकील गुणरत्न सदावर्ते एसटी कर्मचाऱ्यांची माथी भडकवण्याचे काम करत आहेत. जेव्हापासून  पवारसाहेबांच्या महाविकास आघाडीच्या प्रयोगामुळे राज्यातील सत्ता देवेंद्र फडणवीस यांच्या हातून गेली आहे, तेव्हापासून वारंवार फडणविसांनी वेगवेगळ्या माध्यमातून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या बाबतीत टीका-टिप्पणी करण्यासाठी आपल्या बगलबच्च्यांना पुढे केले आहेत. गोपीचंद पडळकर,चित्रा वाघ, प्रसाद लाड, गुणरत्न सदावर्ते ही पूर्णपणे भाजपची पिलावळ असून देशाच्या विकासात अमुल्य योगदान देणाऱ्या देणे शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याबद्दल इतक्या खालच्या पातळीचे राजकारण महाराष्ट्राच्या इतिहासात यापूर्वी कधीही झाले नव्हते. एकीकडे ईडी, सीबीआय या सर्व केंद्रीय यंत्रणा खोट्या कारवाया करत आमच्या नेत्यांना बदनाम करत आहेत, तर दुसरीकडे अतिशय खालच्या पातळीवर जाऊन आपल्या दुसऱ्या फळीतील नेत्यांकडून अशा प्रकारची विधाने करून घेणे, एसटीचा संप चिघळवणे या सर्व खेळ्यानमागचे सूत्रधार देवेंद्र फडणवीस हेच आहेत.

“आज झालेला हा हल्ला पूर्णपणे भाजप प्रणित आहे त्याची उच्चस्तरीय चौकशी करावी व हल्ल्याच्या मागचे नेमके सूत्रधार शोधून काढावेत” ,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष  प्रशांत जगताप यांनी केली आहे.

यावेळी संपूर्ण परीसर “देश का नेता कैसा हो …शरद पवार जैसा हो” , “महाराष्ट्राचा बुलंद आवाज, शरद पवार.. शरद पवार…” , ” पवार साहेब तुम आगे बढो..हम तुम्हारे साथ है….” या घोषणांनी संपूर्ण जंगली महाराज रस्ता दणाणून सोडला होता.

या प्रसंगी शहराध्यक्ष  प्रशांत जगताप प्रवक्ते प्रदीप देशमुख, दिपक मानकर, रवींद्र माळवदकर,वनराज आंदेकर,महेंद्र पठारे,रुपाली ठोंबरे पाटील,महेश हांडे,मृणालिनी वाणी, गणेश नलावडे,रेखा टिंगरे,अब्दुल हाफिज,विक्रम जाधव,दिपक कामठे, आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रीय नेते, खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या निवासस्थानी झालेल्या भ्याड हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. पवार साहेब यांनी विविध घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आयुष्य वेचले. मात्र एस टी कर्मचाऱयांची दिशाभूल करून त्यांना भडकाविन्याचा प्रयत्न काही मंडळींनी सातत्याने केला. या हल्ल्यामागील असलेला “मास्टर माईंड” शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी आमची मागणी आहे.

– सुनिल टिंगरे, आमदार, वडगाव शेरी.

Khandeshi Melava in Baner : बाणेर मध्ये रंगला खानदेशी मेळावा 

Categories
cultural Political पुणे

बाणेर मध्ये रंगला खानदेशी मेळावा

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगेच्या वतीने बाणेर येथील धनकुडे फार्म येथे खानदेशातील नागरिकांसाठी खानदेशी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

ह्या कार्यक्रमाचे निमित्त एकच होते की खानदेशी नागरिकांची एकमेकांशी ओळख व्हावी आणि सुख-दुःखात एकमेकांना मदत करता यावी. या हेतुने खानदेशी नागरिकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते .
या कार्यक्रमात खास खानदेशी पध्दतीच्या आल्पभोजणाचे तसेच लहान मुलांसाठी “फॅंसी ड्रेस” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी डॉ. राजेश देशपांडे ,सौ. सरला चांदेरे, प्रा. रुपाली बालवडकर ,सौ. सुषमा ताम्हाणे , दत्तात्रय कळमकर , मनोज बालवडकर ,सौ.अंजना चांदेरे, प्राजक्ता ताम्हाणे , हरिश झोपे, वंदना पाटील, प्राची वराडे, छाया चौधरी, प्राची कोतकर आणि खानदेशी बंधू – भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन नितीन कळमकर, सौ.पुनम विशाल विधाते, डॅा.सागर बालवडकर व समिर बाबुराव चांदेरे यांनी केले होते. तर प्रस्तावित भूमिका नेहते यांनी केले आणि खुशबू अत्तरदे यांनी आभार मानले .

Sharad Pawar : AIMIM : एमआयएम सोबत जाण्याबाबत शरद पवारांनी केले महत्वाचे वक्तव्य 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

एमआयएम सोबत जाण्याबाबत शरद पवारांनी केले महत्वाचे वक्तव्य

पुणे : कुणी कुठल्या पक्षासोबत जायचं हे ते स्वत: सांगू शकतात. परंतु ज्यांच्यासोबत जायचंय त्या पक्षाने तरी होकार दिला पाहिजे. हा राजकीय निर्णय आहे. हा निर्णय महाराष्ट्रापुरता कुणी प्रस्तावित केला असला तरी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष म्हणून अशा प्रकारचा राजकीय निर्णय राज्याला घेण्याचा अधिकार देत नाही. राज्याला या निर्णयाबाबत राष्ट्रीय समितीने स्पष्ट करेपर्यंत कोणत्याही राज्यात अशा प्रकारची भुमिका ते घेऊ शकत नाहीत. त्यामुळं महाराष्ट्रात गेली दोन दिवस जो एमआयएमबाबत ज्या बातम्या येतायत. तो पक्ष निर्णय नाही, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘एमआयएम’सोबत जाण्याची शक्यता नसल्याचे सांगितले.

एमआयएम चे खासदार इम्तियाज जलील यांनी ‘एमआयएम’ला महाविकास आघाडीत सामील करून घेण्याचे आवाहन आघाडीच्या नेत्यांना केले आहे .या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या राजकीय चर्चेला पवार यांनी राष्ट्रवादीच्या वतीने पूर्ण विराम दिला आहे. माळेगाव येथील निवासस्थानी रविवारी (दि २०)सायंकाळी पत्रकारांशी पवार बोलत होते.

Nawab Malik Portfolios : नवाब मलिक आता बिनखात्याचे मंत्री  : ‘या’ नेत्यांवर सोपवली जबाबदारी 

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

नवाब मलिक आता बिनखात्याचे मंत्री

: ‘या’ नेत्यांवर सोपवली जबाबदारी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी गुरुवारी रात्री उशीरापर्यंत सुरु असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडललेल्या या बैठकीत सध्या संक्तवसुली संचालनालयाच्या म्हणजेच ईडीच्या ताब्यात असणाऱ्या नवाब मलिक यांच्याकडून अल्पसंख्यांक मंत्रीपदाचा कारभार काढून घेण्यात आलाय. नवाब मलिक यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला नसला तरी राष्ट्रवादीच्या या निर्णयामुळे ते बिनखात्याने मंत्री झालेत.

खाती कोणाकडे?


राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्यणानुसार गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे अल्पसंख्याक विभागाचा कार्यभार सुपूर्द करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे राजेश टोपे यांच्याकडे नवाब मलिक यांच्याकडे असणारं दुसरं खात्याचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलाय. राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री असणारा राजेश टोपे आता कौशल्य विकास आणि रोजगार या विभागाचा कार्यभारही पाहतील.

पालमंत्रीपदाची जबाबदारी कोणाकडे?
दोन विभागांबरोबरच नवाब मलिक यांच्याकडे असणारी गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारीही काढून घेण्यात आलीय. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलाय. तर परभणीचे पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

मलिक यांच्याकडील जबाबदाऱ्या का काढल्या?
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना बैठकीत झालेल्या निर्णयांबद्दल सांगताना नवाब मलिक यांच्याकडून जबाबदारी काढून घेण्यात आल्याचं सांगितलं. “नवाब मलिक यांचा जामीन पुन्हा फेटाळण्यात आला आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडच्या जबाबदाऱ्या या इतरांना देण्याचं काम हे या दोन-चार दिवसांत पूर्ण होईल. नवाब मलिक जोपर्यंत पुन्हा उपलब्ध होत नाहीत, तोपर्यंत ज्या जिल्ह्याचे त्यांच्याकडे पालकमंत्रीपद आहे ते जिल्हे आणि त्यांच्याकडच्या खात्यांची जबाबदारी ते नसल्यामुळे काम थांबू नये, यासाठी तात्पुरती व्यवस्था करायचं आम्ही ठरवलं आहे,” असं जयंत पाटील म्हणाले.

मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारीही काढली
मुंबईचे राष्ट्रवादीचे अध्यक्षपद नवाब मलिकांकडे आहे आणि लवकरच मुंबई महापालिका निवडणुक आहे, यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, “नवाब मलिक हे मुंबईचे अध्यक्ष आहेत आणि आज ते उपलब्ध होऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्याबरोबर कार्याध्यक्ष म्हणून नरेंद्र राणे आणि राखी जाधव या दोघांची नेमणूक आम्ही करणार आहोत. नवाब मलिक उपलब्ध नसल्याने पक्ष संघटनेची येणाऱ्या निवडणुका आणि अन्य सर्व गोष्टींची हाताळणी, आमचे हे दोन कार्याध्यक्ष नवाब मलिक यांच्यासमवेत करतील.”

आज मुख्यमंत्र्यांना पाठवणार पत्र
“नवाब मलिकांकडे दोन जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद होतं. तिथे आता परभणीत धनंजय मुंडे हे पालकमंत्री असतील आणि गोंदियात प्राजक्त तनपुरे हे पालकमंत्री असतील, हा निर्णय आम्ही घेतला आहे. उद्याच (शुक्रवारी) मी मुख्यमंत्र्यांनी मी पत्र पाठवून आमच्या पक्षाकडून हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना कळवला जाणार आहे, मुख्यमंत्री त्यावर अंतिम निर्णय घेतील. नवाब मलिकांच्या अनुपस्थितीमुळे त्यांच्या विभागाचं काम पूर्णपणे ठप्प झालं आहे. यामुळेच ही जबाबदारी दुसऱ्या मंत्र्यांना देण्याची आवश्यकता आहे,” असंही जयंत पाटील यांनी सांगितलं.

चुकीच्या पद्धतीने अटक
“नवाब मलिक आणि अनिल देशमुख या दोघांना चुकीच्या पद्धतीने डांबून ठेवलेलं आहे. अनिल देशमुखांनी अटक झाल्यावर स्वत:हून राजीनामा दिला. नवाब मलिक यांची जी अटक झालेली आहे ती चुकीच्या पद्धतीने झाली आहे, अशी आमची धारणा आहे. त्या पद्धतीने न्यायालयात लढाई सुरू आहे.तोपर्यंत त्याच्या विभागाचा भार हा दुसऱ्यांना सोपवला जात आहे, नवाब मलिक हे मंत्रिपदावर कायम राहतील,” असंही जयंत पाटील यांनी सांगितलं.

Delegation Of NCP : PMC Administrator : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाने घेतली  महानगरपालिकेच्या प्रशासकांची भेट : पुणेकरांच्या समस्याबाबत राहणार सहकार्य : प्रशांत जगताप 

Categories
Breaking News PMC Political पुणे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाने घेतली  महानगरपालिकेच्या प्रशासकांची भेट

: पुणेकरांच्या समस्याबाबत राहणार सहकार्य : प्रशांत जगताप

पुणे : महानगरपालिकेवर प्रशासक म्हणून नियुक्त झालेले पुणे महानगरपालिकेचे आयुक्त  विक्रम कुमार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. महापालिकेला पुणेकरांच्या समस्या बाबत आमचे सहकार्य राहील. असे आश्वासन यावेळी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिले.

महापौर,सभागृह नेते,स्थायी समिती सभापती यांचा कार्यकाळ जरी संपला असला तरी ,पुणेकरांच्या समस्या मात्र संपल्या नाहीत. येत्या काळात निवडणुकांचा कालावधी जरी लांबला तरी विक्रम कुमार यांच्या माध्यमातून पुणेकरांच्या समस्या सुटतील. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रशासनास पूर्णपणे सहकार्य करेल अशी खात्री यानिमित्ताने या शिष्टमंडळाने दिली.  असे जगताप यांनी सांगितले.

या शिष्टमंडळात शहर अध्यक्ष प्रशांत जगताप,  माजी महापौर  राजलक्ष्मी भोसले, वैशाली बनकर, माजी उपमहापौर दिपक मानकर, दिलीप बराटे, मा.सभागृह नेते सुभाष जगताप, स्थायी समितीचे माजी चेअरमन  विशाल तांबे , बाबुराव चांदेरे, अश्विनी कदम, बाळासाहेब बोडके, नगरसेवक सचिन दोडके, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष प्रदीप धुमाळ, शहर समन्वयक महेश हांडे आदी उपस्थित होते.

Last Day Of PMC : Administrator : नगरसेवक, सत्ताधाऱ्यांचा आज शेवटचा दिवस! : उद्यापासून महापालिकेवर प्रशासक 

Categories
Breaking News PMC Political पुणे

नगरसेवक, सत्ताधाऱ्यांचा आज शेवटचा दिवस!

: उद्यापासून महापालिकेवर प्रशासक 

पुणे – पुणे महापालिकेच्या (Pune Municipal कॉर्पोरेशन) सभागृहाचा आज अखेरचा दिवस असणार आहे. सर्व पक्षीय नगरसेवक आणि सत्ताधारी भाजपचा हा शेवटचा दिवस आहे. निवडणुका होईपर्यंत मंगळवारपासून महापालिकेत प्रशासक (Administrator) सुरू होणार आहे. दरम्यान, आज शेवटच्या दिवशी महापालिकेची निरोपाची ऑनलाइन सभा (Online Meeting) होणार आहे. त्यामुळे या शेवटच्या सभेत एकमेकांवर कुरघोड्या, पाच वर्षांच्या कारभाराचा मागोवा घेतानाच सत्ताधारी व विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता असल्याने याकडे लक्ष लागले आहे.

कोरोना आणि ओबीसी आरक्षणामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे गेल्या आहेत. पुणे महापालिकेसाठी तीन सदस्यांच्या प्रभाग निश्चित केला आहे. या प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा जाहीर होऊन त्यावर हरकती-सूचना मागविण्यात आल्या. त्याची सुनावणी होऊन प्रारूप आराखड्यात आवश्‍यक असलेल्या बदलांचा अहवाल निवडणूक आयोगाकडे सादर केला आहे. त्यामुळे अंतिम आराखडा जाहीर करून आरक्षणाची सोडत जाहीर करण्याची प्रक्रिया अद्याप शिल्लक आहे. त्यातच राज्य सराकरने विधिमंडळात नवीन कायदा पारित करून निवडणूक आयोगाचे अधिकार स्वतःकडे घेतले आहेत. त्यामुळे या निवडणुका किमान सहा महिने पुढे जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

: स्थायी समितीच्या बैठकीत काय होणार?

 दुपारी सव्वाबारा वाजता स्थायी समितीची अंदाजपत्रकाची बैठक आहे. यामध्ये भाजपकडून उपसूचना मांडून त्यांना आयुक्तांनी मांडलेल्या अंदाजपत्रकात हवे ते बदल करून घेतले जाण्याची शक्यता आहे. मात्र, आयुक्तांनी मांडलेल्या अंदाजपत्रकात बदल करता येत नाहीत. त्यासाठी मुख्यसभेची मान्यता घ्यावी लागते, असा पवित्रा विरोधकांनी घेतला आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या बैठकीत वाद होण्याची शक्यता आहे. दुपारी तीन वाजता आॅनलाइन मुख्यसभा होणार आहे. या मुख्यसभेत महत्त्वाचे विषय नाहीत. पण या सभेत गेल्या पाच वर्षांचा मागोवा घेणारी भाषणे व भावनिक भाषणे होण्याची शक्यता आहे. सुविधा काढून घेणारमंगळवारपासून आयुक्त विक्रम कुमार हे प्रशासक म्हणून महापालिकेचा कारभार सांभाळणार आहेत. महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांची कार्यालय, गाड्या व इतर सुविधा काढून घेतल्या जातील. त्याबाबतही प्रशासनाकडून तयारी सुरु झाली आहे.

स्थायी समितीच्या बैठकीत आयुक्तांनी मांडलेल्या अंदाजपत्रकावर चर्चा होणार आहे. याचवेळी भाजपकडून स्थायी समिती बरखास्त होऊ शकत नाही, त्यामुळे अध्यक्ष हेमंत रासने हेच पुढील वर्षाचे अंदाजपत्रक मांडणार असे सांगत आहेत. त्यास विरोधीपक्षांनी विरोध केला आहे.  बैठकीत अंदाजपत्रकावर उपसूचना देऊन त्यात बदल करायचे प्रस्ताव भाजपकडून केले जाऊ शकणार आहेत. तर प्रशासनाने राज्य सरकारकडे भाजपच्या दाव्याबाबत खुलासा मागितलेला असून, त्यावर उत्तर न मिळाल्यास प्रशासनाला कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे.

: भाजप पुन्हा नको; शिवसेना करणार आंदोलन

दरम्यान शहर शिवसेना आज दुपारी महापालिकेत आंदोलन करणार आहे. भाजप पुन्हा नको रे बाबा, अशा पद्धतीच्या घोषणा शिवसेनेने तयार केल्या आहेत. तसेच   पुणे महापालिकेत मागील पाच वर्षात केलेला भ्रष्टाचार पथनाट्याच्या माध्यमातून जनतेसमोर मांडण्यात येणार आहे. तसेच पालिकेतील भ्रष्टाचाराची उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणी आंदोलनाद्वारे करण्यात येणार आहे.

Prashant Jagtap Vs Hemant Rasne : स्थायी समिती अध्यक्षांच्या हट्टाचे मला हसू येते!  : राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली आलोचना 

Categories
Breaking News PMC Political पुणे

स्थायी समिती अध्यक्षांच्या हट्टाचे मला हसू येते!

: राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली आलोचना

पुणे :  महानगरपालिकेत कायद्यानुसार सहावे बजेट कोणालाही सादर करता येत नाही. महानगरपलिकेच्या आयुक्तांना केवळ कर्मचारी अधिकाऱ्यांचे पगार व मेंटेनन्सचा खर्च यासाठी तीन किंवा सहा महिन्याचं बजेट करता येते. असे असताना सुद्धा महानगरपालिका आयुक्तांनी बजेट सादर केले. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी निश्चितच या बजेटचे स्वागत करते. कारण उद्या निवडणुका जर सहा महिने किंवा वर्षभरासाठी पुढे गेल्या तरीसुद्धा पुणे शहराच्या विकासाला खीळ बसू नये ,यासाठी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने ही भूमिका घेतली. असे असताना देखील पुणे महानगर पालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष यांनी जो खटाटोप चालवला आहे किंवा हट्ट धरला आहे, या गोष्टीचे मला निश्चितच हसू येते. अशा शब्दात राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आलोचना केली आहे.

जगताप म्हणाले,   पुणे महापालिकेत महापौरपद ,सभागृहनेतेपद, स्थायी समितीचे अध्यक्षपद या पदांची उंची मोठी आहे. या पदावर बसलेल्या माणसाने तसा प्रगल्भ विचार करायला हवा. दुर्दैवाने अशा पद्धतीने विचार करण्याची प्रगल्भता स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने करत नाहीत याचे आम्हाला महापालिकेचे सभासद म्हणून निश्चितच वाईट वाटते. गेल्या निवडणुकीच्यावेळी १४ मार्च २०१७ पर्यंत मी महापौर म्हणून कामकाज पाहिले त्यानंतर १५ मार्चला  मुक्ता टिळक शहराच्या महापौर झाल्या. कायद्याने १४ मार्च २०२२ रोजी या सभागृहाची मुदत संपल्यानंतर सहाजिकच या सभागृहाचा एक भाग असलेल्या स्थायी समितीची देखील मुदत संपणार आहे. असे असताना स्थायी समितीचे अध्यक्ष  हेमंत रासने यांना असे दिव्य ज्ञान होत आहे की, आपली मुदत काही संपत नाहीये किंवा स्थायी समितीचे आपले पद अविरत अबाधित राहणार आहे. आयुक्तांनी सादर केलेल्या बजेटवर माहिती स्थायी समितीमध्ये चर्चा होणे गरजेचे आहे. ती चर्चा घेण्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कुठलीही हरकत नाही; परंतु वेगवेगळ्या उपसूचनाद्वारे स्थायी समिती चे अध्यक्ष आपलं वेगळं बजेट सादर करू पाहत आहे. या सर्व ठराव व उपसूचना विखंडित करण्याबाबत आम्ही नगरविकास विभागाकडे तक्रार करणार आहोत. वेळप्रसंगी न्यायालयात जाण्याची सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची तयारी आहे.

जगताप म्हणाले,  मुळात आपली मुदत संपत आली असताना सुद्धा बजेट करण्याचा मोह स्थायी समितीच्या अध्यक्षांना आवरत नाहीये ही बाब दुर्दैवी आहे. मुळात महानगरपालिकेत मोठ्या पदावर असताना तेव्हा आपणास काम करण्याची बुद्धी सुचते. याउलट सत्ताधारी मंडळी मंडळींत मात्र जेवढे जास्तीत जास्त लुटता येईल तेवढे पुणे शहराला लुटण्याची स्पर्धा सुरू आहे. याचे कारण म्हणजे गेल्या ६ महिन्यांपासून वेगवेगळ्या विषयावरील चुकीचे ठराव स्थायी समितीमध्ये मांडण्यात येत आहे. याबाबत आमचे स्थायी समितीचे सदस्य \ विशाल तांबे, अश्विनी कदम प्रदीप गायकवाड, बंडू गायकवाड, नंदाताई लोणकर या मंडळींनी वेळोवेळी या ठरावला विरोध केला. त्यापैकी एक विषय असा होता की गेल्या सहा महिन्यापूर्वी ई- बाईकच्या विषयांवर भारतीय जनता पार्टीच्या एका नगरसेवकाच्या निवेदनावर एक डॉकेट आले होते. पुणे शहरात चार्जिंग बाईकसाठी चार्जिंग स्टेशन,पार्किंग स्टेशन्स याबाबतचे हे डॉकेट होते. अशाप्रकारे डॉकेट आणून चुकीच्या पद्धतीने चुकीच्या व्यक्तीच्या हातात या गोष्टी देण्याचा सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचा घाट होता व या डॉकेटच्या माध्यमातून पुणेकरांच्या पैशांची मोठ्या प्रमाणात लूट होणार होती. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने स्थायी समितीमध्ये याला विरोध केला व  नगरविकासमंत्री यांच्याकडे हा ठराव विखंडित करण्याबाबतची मागणी केली होती. असे असताना काल अचानकपणे पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी घाई-गडबडीमध्ये पुन्हा हे डॉकेट आणले. मुळात महापालिकेच्या सर्व खाते प्रमुखांनी या डॉकेटला निगेटिव्ह अहवाल दिलेला असताना सुद्धा हे डॉकेट पुन्हा का आणण्यात आले? याबाबतच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आक्षेप आहे.  महानगरपालिका आयुक्तांनी हे डॉकेट रद्द करावे अन्यथा आम्हाला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, नगरविकास मंत्री यांच्याकडे तक्रार दाखल करावी लागेल. अशी स्पष्ट सूचना मी आपल्या माध्यमातून देऊ इच्छितो. या डॉकेट मध्ये जर नीट लक्ष दिल्यास असे लक्षात येईल की या माध्यमातून पुणेकरांची लूट करण्याचा घाट घातला आहे. आपणास मी सांगू इच्छितो की मुळात चार्जिंग स्टेशन किंवा पार्किंग स्लॉटच्या नावाखाली शहरातील तब्बल ७८० ठिकाणे हे आपल्या मर्जीतल्या ठेकेदारास देण्याचा घाट घातला असून या माध्यमातून पुणे महानगरपालिकेला वर्षाला अवघे तीन लाख रुपये मिळणार आहेत. म्हणजे प्रत्येक प्रत्येक पार्किंग स्टेशनच्या बदल्यात महापालिकेला वर्षाला केवळ पन्नास रुपये मिळणार आहेत. विशेष म्हणजे यासाठी कुठल्याही प्रकारच्या निविदा मागविण्यात आलेल्या नाही. केवळ एका डॉकेट च्या माध्यमातून हा विषय मंजूर करण्याचा घाट घातला आहे. केवळ सत्ताधारी भाजपच्या राजकीय कार्यकर्त्यांना तीस वर्ष हक्काची वसुलीचे केंद्र देण्याचा घाट या पार्किंग स्टेशनच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांनी भाजपनेही घातला असून ही अक्षरशः पुणेकरांची लूट सुरू आहे या गोष्टीचा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कडाडून विरोध करते.

 

Silent Agitation Against PM Modi : पंतप्रधानाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस उद्या करणार मूक आंदोलन 

Categories
Breaking News Political पुणे

पंतप्रधानाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस उद्या करणार मूक आंदोलन

: सकाळी १० वाजता आंबेडकर स्मारक येथे होणार आंदोलन

पुणे : २०१४ मध्ये नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आले तेव्हापासून सातत्याने सरकारमधील विविध घटक मंत्री, राज्यपाल सातत्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला दिलेल्या राज्यघटनेचा अवमान करत आहे, दलितांचा आवाज वारंवार दाबण्याचा प्रयत्न होत आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र भूमिचा अपमान करत आहे आणि पुन्हा त्यांच्याच हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा पुण्यात अनावरण होत आहे, या घटनेच्या निषेधार्थ मूक आंदोलन म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी उद्या ६ मार्च रोजी ससून हॉस्पिटल जवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे शांततेच्या मार्गाने काळे कपडे परिधान करत महात्मा गांधीजी व महापुरुषांची भजने गात मूक आंदोलनासाठी बसणार आहेत. अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस चे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.

जगताप म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते होणाऱ्या पुणे मेट्रोच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वी मी आज फेसबुक लाईव्ह द्वारे सदर मेट्रो मार्गाची पाहणी केली. अवघ्या पाच किलोमीटरच्या या मेट्रो मार्गाचे काम अर्धवट स्वरूपात असून, हे काम पूर्ण होण्यास किमान तीन महिने लागतील.एस एन डी टी कॉलेज जवळील स्टेअरकेस, पत्रे ,प्लास्टर, पेंटिंग, वेल्डिंग, रेलिंग ही सर्वच काम अर्धवट परिस्थितीत असून ,ही काम पूर्ण नाही झाली तर पुणेकर ही मेट्रो वापरू शकत नाहीत. मेट्रोच्या कामाची अत्यंत दयनीय परिस्थिती असताना ,निव्वळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पुणेकरांची फसवणूक करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोलवण्यात येत आहे. मुळात उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशातील निवडणुकांमधून मोदींनी युक्रेन मध्ये अडकलेल्या मुलांसाठी वेळ काढला नाही, परंतु अर्धवट स्वरूपात असलेल्या मेट्रोसाठी वेळ काढला. यावरून  भाजपची कामकाजाची पद्धत आपणा सर्वांना दिसून येते. असे ही जगताप म्हणाले.

: शहर कॉंग्रेस कडून देखील होणार निदर्शने

दरम्यान शहर कॉंग्रेस कडून देखील पंतप्रधानाच्या विरोधात निदर्शने करण्यात येणार आहेत. शहर कॉंग्रेस च्या वतीने घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाजवळ आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती शहर कॉंग्रेस कडून देण्यात आली.

 

Music School PMC : Deeapali Dhumal : संत तुकाराम महाराज संगीत विद्यालय नियमित सुरू करा  : शिक्षण समिती समोर प्रस्ताव

Categories
Education PMC Political पुणे

संत तुकाराम महाराज संगीत विद्यालय नियमित सुरू करा

: शिक्षण समिती समोर प्रस्ताव

पुणे : 2013 साली महापालिकेच्या वतीने प्रभात रोड वर श्री.संत तुकाराम महाराज संगीत विद्यालय सुरू करण्यात आले होते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून हे बंद आहे. कोरोनाचा प्रसार आता कमी झाला आहे. त्यामुळे आता हे संगीत विद्यालय सुरु करावे. अशी मागणी विरोधी पक्ष नेत्या दीपाली धुमाळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस चे नगरसेवक अब्दुल गफूर पठाण यांनी केली आहे. तसा प्रस्ताव शिक्षण समिती समोर ठेवण्यात आला आहे.

: राष्ट्रवादी नगरसेवकांचा प्रस्ताव

शिक्षण समिती समोर ठेवलेल्या प्रस्तावानुसार २०१३ साली शिक्षण मंडळ अस्तित्वात असताना पुणे प्रभात रोड गल्ली नं.१५ पुणे महानगरपालिकेच्या इमारती मध्ये पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या वतीने ई-लर्निंग व श्री.संत तुकाराम महाराज संगीत विद्यालय सुरू करण्यात आले होते. आज तगायात हजारो विद्यार्थी या संगीत विद्यालयाच्या माध्यमातुन तबला वादन, हार्मोनियम, गायन इति या संगित क्षेत्रात या संगित विद्यालयामार्फत घडविण्यात आले आहेत. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयामध्ये संगित प्रशिक्षणा मध्ये अनेक विद्यार्थी प्रथम श्रेणी मध्ये उर्तीण झाले आहे. हा एक आगळा वेगळा उपक्रम पुणे मनपाच्या शाळांमध्ये सुरू आहे.परंतु मागील दोन वर्षापासुन कोरोना काळात सदर उपक्रम बंद होता. सद्यस्थितीत कोरोनाचा प्रार्दुभाव कमी झाल्यामुळे सर्व शाळा देखील पुर्ववत नियमित सुरू झाल्या असुन श्री.संत तुकाराम महाराज संगीत विद्यालय नियमित सुरू करण्यात यावे. अशी मागणी प्रस्तावात करण्यात आली आहे.