Congress | पुणेकरांना 40% सवलत पूर्ववत करण्यासाठी व व्याज कमी करण्यासाठी प्रभू रामचंद्रांना साकडे

Categories
Breaking News PMC Political social पुणे

पुणेकरांना  40% सवलत पूर्ववत करण्यासाठी व व्याज कमी करण्यासाठी प्रभू रामचंद्रांना साकडे

पुण्यात राहणाऱ्या नागरिकांना1970 सालापासून 40% घरपट्टी सूट मिळत होती. तथापि गेली पाच वर्ष ती बंद करण्यात आली आहे. ती पूर्ववत करण्यासाठी काँग्रेस च्या वतीने प्रभू श्री रामचंद्रांना साकडे घालण्यात आले.

पुणेकरांना मिळणारी 40% सवलत पुन्हा सुरू ठेवावी यासाठी अनेक वेळा आंदोलन झाली.काँग्रेस पक्षाने सहीची मोहीम राबवली. देवेंद्र फडवणीस यांना निवेदन दिले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील साहेबांना पत्र पाठविले. परंतु पाच वर्षे त्यांनी दुर्लक्ष केले होते. कसब्यात भाजपाचा पराभव झाल्यावर पालकमंत्र्यांनी मागील महिन्यात याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे बैठक घेऊन ती पूर्ववत चालू ठेवावी अशी मागणी केली.


परंतु कॅबिनेटमध्ये लगेच निर्णय घेतो असे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आश्वासन देऊन सुद्धा एक महिना लोटला पुणेकरांना याचा आर्थिक बोजा नागरिकांना सोसावा लागत आहे. यासाठी पुणेकर नागरिकांच्या वतीने काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी व आमदार रवींद्र धंगेकर यांच्या नेतृत्वाखाली तुळशीबाग राम मंदिरत, राज्य सरकारला 40% पट्टीतील सवलत सुरू ठेवावी व सावकारी व्याज कमी करावे त्यासाठी आरती करून साकडे घालण्यात आले. यावेळी मोहन जोशी म्हणाले की पुणेकर नागरिकांच्या साठी आम्ही प्रत्येक वेळेस आंदोलन केलीत. मग ते रस्त्यावरील खड्ड्यांच्या असो व पाणीपुरवठा बाबत असो सरकारचे नेतृत्व करणारे नुकतेच आयोध्या वारी करून आलेत आमची म्हणजेच पुण्याचे तुळशीबागेतील राम मंदिर आहे.
आमदार यांनी यांनी भाजपाच्या राजकारणावर टीका केली ज्या मतदारांनी भाजपाला मतदान केले भरमसाठ टॅक्स लावून ते छळत आहेत.40% सवलती सोबत 500 .फीट घरांना टॅक्स माफ करण्यासाठी आम्ही पण रस्त्यावर उतरणार असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे संयोजन प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस संजय बालगुडे यांनी केले होते. यावेळी मंदिरात रामाची आरती करण्यात करिता आरतीला 40 ते 50 कार्यकर्ते हजर होते असे पत्रक संजय बानगुडे यांनी दिले आहे.

Mahatma Phule | लेखणीने त्यांच्या दाखवली समतेची वाट, फुलेंच्या कार्याने उगवली परिवर्तनाची नवी पहाट – मोहन जोशी

Categories
Breaking News cultural Political पुणे महाराष्ट्र

लेखणीने त्यांच्या दाखवली समतेची वाट, फुलेंच्या कार्याने उगवली परिवर्तनाची नवी पहाट – मोहन जोशी

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त पुणे शहर काँग्रेस कमिटी ओ.बी.सी. विभागाच्या वतीने समता भुमी महात्मा फुले वाडा गंज पेठ येथे आयोजित कार्यक्रमात मा.आमदार मोहन (दादा) जोशी व आमदार रविंद्र धंगेकर यांच्या हस्ते महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले . कार्यक्रमाचेअध्यक्ष स्थानी शहराध्यक्ष प्रशांत सुरसे होते.

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून वंचित उपेक्षित, मागास वर्गीय समाजाला तसेच स्त्रियांना शिक्षणाचे दारे खुले करून आजच्या समाजाला आधुनिक उंचीवर नेऊन ठेवले आहे.
महात्मा फुले यांच्या दूरदृष्टीमुळेच महिला या आज सर्व क्षेत्रांमध्ये केंद्रबिंदू म्हणून अग्रस्थानी आहेत. त्याचे कार्य हे न विसरणारे अविस्मरणीय कार्य आहे. असे मनोगत मोहन जोशी यांनी व्यक्त केले.
यावेळी महात्मा फुले व डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे विविध पुस्तके मा.आमदार रविंद्र धंगेकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आली.

यावेळी शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, संजय बालगुडे, बाळासाहेब अमराले, शाबीर खान, आयुब पठाण, सुनिल पंडित, चेतन अग्रवाल, रवि पाटोले, सुरेश कांबळे, राजू देवकर,गणेश साळुंखे, दत्ता मांजरेकर, रुपेश पवार, अक्षय नवगिरे,फैजन अन्सारी, सौरभ अमराळे व पुणे शहर काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे सर्व पदाधिकारी उपस्थित उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन ओ.बी.सी. विभागाचे शहराध्यक्ष प्रशांत सुरसे यांनी केले.

PMC Budget | प्रशासक विक्रम कुमारांनी सादर केलेल्या बजेटबाबत शिवसेना आणि काँग्रेस शहर अध्यक्षांना काय वाटते?

Categories
Breaking News PMC Political पुणे

प्रशासक विक्रम कुमारांनी सादर केलेल्या बजेटबाबत शिवसेना आणि काँग्रेस शहर अध्यक्षांना काय वाटते?

रखडलेल्या प्रकल्पांना चालना देणारे संतुलित बजेट | नाना भानगिरे

शिवसेना शहर अध्यक्ष नाना भानगिरे म्हणाले, शहराच्या विकासाला चालना देणारे अतिशय चांगले बजेट महापालिका आयुक्तांनी सादर केले आहे. समाविष्ट गावासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. कुठलीही कर वाढ करू नये म्हणून भाजप आणि शिवसेनेने आयुक्ताकडे मागणी केली होती. त्याला यश आले, असे म्हणावे लागेल. या बजेटमुळे रखडलेल्या प्रकल्प पुरे होतील. पाणी योजनेसाठी चांगल्या निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे समान पाणीपुरवठा योजना, नदी सुधार योजना मार्गी लागण्यास मदत मिळेल. एकंदरीत हे शहरासाठी अगदी योग्य आणि चांगले बजेट आहे.
—-

भाजपच्या नेत्यांना सोबत घेऊन केलेले नियोजनशून्य बजेट – अरविंद शिंदे

बजेटवर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, या बजेटमधून शहरासाठी कुठलेही शाश्वत आश्वासन देण्यात आलेले नाही. आयुक्तांना संतुलित बजेट करता आलेलं नाही. कारण चालू बजेटमध्येच 2000 कोटीची वित्तीय तूट दिसून आलेली आहे. तरीही आयुक्तांनी साडेनऊ हजार कोटींचे बजेट सादर केले आहे. भाजपच्या नेत्यांना सोबत घेऊन बजेट करण्यापेक्षा नागरिकांना सोबत घेऊन केले असते तर चांगले झाले असते. या बजेटमध्ये उत्पन्नाचा कुठलाही नवीन स्रोत नाही. समाविष्ट गावांसाठी कुठलेही ठोस नियोजन नाही. समान पाणीपुरवठा योजनेसाठी घेतलेल्या बॉन्डवर किती व्याज दिले, त्याचा कसा विनियोग केला, याबाबत कुठलेही तारतम्य दिसून आलेलं नाही. या बजेटमधून करदात्याला कसलाही उलगडा होत नाही. शहरात नवीन उद्याने कुठे होणार, त्याचे आरक्षण कुठे आहे, नवीन शाळा कुठे उभ्या राहणार, याबाबत काही उलगडा केलेला नाही. फक्त नवीन फ्लॅट कसे उभे राहतील हे दिसते आहे. एकंदरीत बजेटमधून तोंडाला पाने पुसण्याचे काम करण्यात आले आहे. एकूणच दूरदृष्टी नसणाऱ्या आणि नियोजनशून्य भाजप नेत्यांना सोबत घेऊन केलेले हे बजेट आहे.

MLA Ravindra Dhangekar | आमच्या लढ्याला यश आले | आता ५०० फुटाच्या घरांना देखील मुंबई महापालिके प्रमाणे सवलत द्या | आमदार रविंद्र धंगेकर

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

आमच्या लढ्याला यश आले | आता ५०० फुटाच्या घरांना देखील मुंबई महापालिके प्रमाणे सवलत द्या | आमदार रविंद्र धंगेकर

शहरातील नागरिकांना मिळकतकरातील 40% सवलत कायम राहावी, यासाठी आम्ही सर्वजण लढा देत होतो. त्या लढ्याला यश आले आहे.  काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बैठक झाली. त्यामध्ये शहरातील मिळकतकरात ४० टक्के सवलत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. असा दावा काँग्रेस पक्षाचे कसबा विधानसभा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केला. तसेच ते म्हणाले कि, पुणे शहरातील ५०० फुटाच्या घरांना देखील मुंबई महापालिके प्रमाणे सवलत देण्यात यावी. (MLA Ravindra Dhangekar)

आमदार धंगेकर पुढे म्हणाले, कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत शिंदे आणि फडणवीस यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे त्यांचे डोळे उघडले असून आता ते निर्णय घ्यायला लागले आहेत. त्यामुळे मी कसबा मतदार संघातील सर्व नागरिकाचे आभार मानत असल्याचे त्यांनी सांगितले.

धंगेकर यांनी सांगितले कि, शहरात जवळपास १० लाख मिळकती आहे. त्या सर्व मिळकतधारकांना दररोज अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून त्यांच्याकडून महापालिका प्रशासन मिळकतकर वसुली करीत होती. त्यामुळे मिळकतकरात सवलत मिळाली पाहिजे अशी मागणी महापालिकेच्या सभागृहात नगरसेवक म्हणून आजवर मांडत आलो आणि आमदार म्हणून विधिमंडळात गेल्यावर तीच मागणी केली होती. त्या मागणीला काही प्रमाणात तरी यश आल्याच म्हणावं लागेल. कारण काल मुख्यमंत्री यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ४० टक्के मिळकतकराची सवलत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पण हा निर्णय शिंदे फडणवीस सरकारला केवळ नुकत्याच झालेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे घ्यावा लागला असून त्यामुळे मी तमाम कसबा मतदार संघातील नागरिकांचा आभारी आहे.

 आमदार धंगेकर म्हणाले, मुंबई महापालिकेने ज्या प्रकारे ५०० स्क्वेअर फुटाच्या घराना सवलत दिली आहे. त्यानुसार पुणे शहरातील ५०० फुटाच्या घरांना देखील मुंबई महापालिके प्रमाणे सवलत देण्यात यावी, ही मागणी विधिमंडळात करणार असून आमची मागणी मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरून आवाज उठवणार असल्याची भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

Cantonment Board Elections | पराभवाच्या भीतीने भाजपने कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका पुढे ढकलल्या | मोहन जोशी

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

पराभवाच्या भीतीने भाजपने कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका पुढे ढकलल्या
| मोहन जोशी

देशभरात होणाऱ्या कॅन्टोन्मेंट बोर्डच्या निवडणुका भाजपने पराभवाच्या भीतीने देशभरात त्यांना होत असलेला विरोध लोकांमध्ये असलेली प्रचंड नाराजी या भूमिकेतून पुढे ढकलण्यात आल्या आहेत. असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केला आहे.

मोहन जोशी म्हणाले, निवडणूक आयोगातर्फे निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन उमेदवारांचे फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली होती. अशा परिस्थितीत त्यांचा आलेल्या सर्वे तसेच देशभरात होत असलेली त्यांच्याविरुद्धची वातावरण नुसतीच आश्वासने देणे, महागाई,  बेरोजगारी याचबरोबर स्थानिक पातळी वरील प्रश्न न सोडवणे, यासारखे अनेक समस्या पण आता डोकेदुखीच्या ठरत आहेत.

पुण्यामध्ये महाविकास आघाडीचा कसबा विधानसभा मध्ये झालेला विजय हा नवीन पॅटर्नची नांदी ठरवतो. त्यामुळे पराभवाच्या छायेत पासून दूर राहण्यासाठी आता नवीनच प्रकार सुरु केला आहे.  ही एकप्रकारे संविधानाची मोडतोड सुरू आहे. जी म्हणजे निवडणूक प्रक्रिया सुरू होऊन निवडणूक रद्द करणे,  यामुळे लोकांचा आता नक्की निवडणुका होणार, कधी देशामध्ये अघोषित हुकुमशाही याचे रूपांतर आता घोषित हुकूमशाही मध्ये
होणार की काय असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी विचारला आहे.

देशभरातल्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नागरिकांनाही यासंदर्भात निवडणुका घेवून त्यांची जन्मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. हा एका प्रकारे संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार वारंवार पुढे ढकलणे अथवा विहित कालावधीत निवडणूक न घेणे म्हणजे लोकशाही ची एक प्रकारे पायमल्लीत होत आहे.  याचबरोबर राज्यातील महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाही एक प्रकारे पुढे ढकलून जनमताचा अनादरच सुरू आहे. ही एका प्रकारे भाजपकडून ही एका प्रकारे लोकशाही ची पायमल्ली सुरू आहे. असे जोशी यांनी म्हटले आहे.

Ghanshyam Nimhan | मिळकतकराबाबत आतातरी शहाणे व्हा! | काँग्रेस सरचिटणीस घनश्याम निम्हण यांचा सरकारला सल्ला

Categories
PMC Political social पुणे

मिळकतकराबाबत आतातरी शहाणे व्हा! | काँग्रेस सरचिटणीस घनश्याम निम्हण यांचा सरकारला सल्ला

नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केले तर काय होते, याचा उत्तम धडा कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांना मिळाला. पुणेकरांची मिळकतकराची ४० टक्क्यांची सवलत रद्द करून थकबाकीची वसुली करण्याचा प्रकार पुणेकरांवर अन्याय करणारा आहे. हा निर्णय रद्द करून नागरिकांच्या डोक्यावरील टांगती तलवार ३१ मार्च पूर्वी कायमची दूर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा. असा सल्ला काँग्रेस चे सरचिटणीस घनश्याम निम्हण यांनी दिला आहे.

निम्हण म्हणाले, गेली वर्षभरापासून पुणेकर त्यांच्यावर लादलेल्या  मिळकतकराच्या थकबाकीने त्रस्त आहेत. या संदर्भात वेळोवेळी त्यांनी आवाज उठवला. पालकमंत्री, नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले, पण ३१ मार्च जवळ आला तरी त्याबाबत निर्णय झालेला नाही. जेव्हा कसब्याच्या प्रचारात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्येश्वराबाबत काँग्रेसची भूमिका काय असे विचारत होते, त्यावेळी कॉंग्रेसचे नगरसेवक संजय बालगुडे गल्लीबोळात कोपरा सभेत मिळकत कराच्या जादा आकारणी बाबत हे सरकार काहीच निर्णय घेत नसल्याचे सांगत होते*. सहाजिकच नागरिकांना मिळकतकराचा प्रश्न महत्त्वाचा वाटला.
राज्य सरकारने १९७० पासून पुणे महापालिकेतील मिळकतकराची ४० टक्के सवलत रद्द करण्याचा निर्णय २०१९ मध्ये घेतला होता. यामध्ये महापालिकेने दोन संस्थांकडून शहरातील मिळकतींचे सर्वेक्षण केले. त्यामध्ये जेथे भाडेकरू राहत आहेत आणि ज्यांची घरे बंद आहेत, त्यांचे दुसरे घर असणार असा अंदाज लावत त्यांचीही ४० टक्के सवलत रद्द केली. अशा प्रकारे ९७ हजार ५०० नागरिकांची सवलत रद्द केली. या नागरिकांना २०१९ ते २०२२ या तीन वर्षांतील फरकाची रक्कम भरा, अशा नोटिसा बजावल्याने खळबळ एक उडाली. तीन वर्षांच्या ४० टक्के रकमेच्या वसुलीला महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी तात्पुरती स्थगिती दिली असली तरी पुणेकरांच्या डोक्यावर पाच हजार कोटी रुपयांच्या थकबाकीचा बोजा कायम आहे. त्याची कधीही वसुली होऊ शकते. त्यामुळे याबाबत राज्य सरकारने निर्णय घेणे आवश्यक आहे. निवासी मिळकतींची ४० टक्के सवलत काढू नये तसेच कोविड सारख्या रोगांवर उपचार (लॉकडाऊन) दरम्यान महानगर पालिकाच दुकाने उघडू देत नव्हती व उघडली तर दंड वसूल केले जात होते अशा आपत्तीत व्यापारी लोकांचे पेकाट मोडलेले आहे आणि देखभाल -दुरुस्तीचा खर्च पाच टक्के कमी केला आहे त्याची वसुली करू नये अशी राज्य सरकारकडे मागणी आहे. ही मागणी मान्य करण्यात तसाही राज्य सरकारला कोणताही आर्थिक भुर्दंड बसणार नाही. पुणे महापालिकेसही त्याचा फटका बसणार नाही, मग निर्णय का होत नाही हा खरा प्रश्न आहे.
 निम्हण पुढे म्हणाले, राज्य सरकारने ४० टक्के सवलत कायम ठेवावी. तसेच महापालिकेने नव्या वर्षात ४० टक्के कर कमी आकारावेत आणि  नव्या बिलातून थकबाकीची रक्कम वगळावी.
—-

Kasba by-election | विजयाबद्दल काँग्रेस नेत्यांचे काय आहे विश्लेषण!

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या भावी राजकारणाला नेमकी दिशा देणारा विजय –    मोहन जोशी

पुण्याच्या कसबा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजप उमेदवाराचा केलाला दणदणीत पराभव ही महाराष्ट्रातील भावी राजकारणाची दिशा दाखवते. सलग ३० वर्षे भाजपचा बालेकिल्ला असणारा हा मतदारसंघ देखील महाविकास आघाडीच्या एकत्रित प्रयत्नांमुळे महाविकास आघाडीने स्वतःकडे खेचून आणला. या मतदारसंघात भाजपने निवडणूक जिंकण्यासाठी धनशक्ती व गुंडशक्ती याबरोबरच सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करूनही मतदारांनी भाजपला त्यांच्या बालेकिल्ल्यातच नाकारले. केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अनेक मंत्री, त्यांचे प्रदेशाध्यक्ष असा फौजफाटा घेऊन उतरलेल्या भाजपने आजारी असणाऱ्या खा.गिरीश बापट यांनादेखील प्रचारात उतरविण्याचा प्रयत्न केला. काहीही करून निवडणूक जिंकायची यासाठी भाजप कोणत्या थरापर्यंत जातो, त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. मात्र कसब्यातील सुज्ञ मतदारांनी भाजपला धिडकारून महाविकास आघाडीला दणदणीत मतांनी विजयी केले. याबद्दल सर्व मतदारांना मी धन्यवाद देतो.


कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या एकीचा विजय – पृथ्वीराज चव्हाण
कसबा पोटनिवडणुकीचा निर्णय हा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचा निर्णय आहे. गेली 32 वर्षे पुणे शहरातील कसबा विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता. 2019 च्या निवडणुकीत मुक्ता टिळक या भाजप कडून निवडून आल्या होत्या. त्यांच्या दुःखद निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार निवडून येण्यामध्ये महाविकास आघाडीच्या एकीचा विजय झाला असल्याचे मत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडले.
यापुढे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, महाविकास आघाडीने एका विचाराने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली व त्यांना महाविकास आघाडी मधील सर्व पक्षांनी मदत केल्यामुळे हा विजय झाला आहे. यामुळे आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडी भाजप व शिंदे गटाला धूळ चारल्याशिवाय राहणार नाही.
विरोधकांच्या मतांची विभागणी टाळली तर आमचा विजय होऊ शकतो. चिंचवड ला हेच आम्हाला बघायला मिळेल की, विरोधकांच्या मतांची विभागणी करण्यासाठी तिसरा उमेदवार उभा केला गेला. आणि त्यामुळे बरीच मत हि तिसऱ्या उमेदवाराने खाल्ल्यामुळे भाजपचा उमेदवार निवडून आला. पण भाजपविरोधी जनमत मोठे असल्याचे या दोन्ही निवडणुकीच्या निकालातून समजून आले आहे.
वंचित आघाडीने त्यांची ताकद नसताना फक्त महाविकास आघाडीच्या मतांचे विभाजन करून भाजपला फायदा करून देण्याकरिता तिसरा उमेदवार उभा केला.

Mohan Joshi Vs Chandrkant Patil | चंद्रकात पाटील यांना मंत्रीमंडळातून बडतर्फ करा | मोहन जोशी यांची मागणी

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

चंद्रकात पाटील यांना मंत्रीमंडळातून बडतर्फ करा

| मोहन जोशी यांची मागणी

| न्यायालयाने सरकारला दंड केल्याचे प्रकरण

पुणे | थोर पुरूषांची बदनामी प्रकरणात काँग्रेसच्या कार्यकर्त्याला अटक केल्याप्रकरणी न्यायालयाने सरकारवर ताशेरे मारले. २५ हजार रूपयांचा दंड केला. सरकारवर ही वेळ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अरेरावीमुळे आली. त्यामुळे त्यांना मंत्रीमंडळातून बडतर्फ करा. अशी मागणी मोहन जोशी, प्रदेश उपाध्यक्ष कॉंग्रेस यांनी केली .

पाटील यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ पोस्ट केला म्हणून पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यावर कारवाई केली होती.
काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी सांगितले की पालकमंत्री पाटील यांनी या प्रकरणात सरकारी पदाचा गैरवापर केला. पोलिसांवर दबाव टाकला. महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर पाटील यांनी अवमानकारक वक्तव्ये केली होती. काँग्रेसचे कार्यकर्ते संदीप कुदळे यांनी त्याबाबतचा व्हिडिओ समाजमाध्यमावर टाकला असा आरोप करून कुदळे यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली. त्याआधी पाटील यांनी, याप्रकरणात कारवाई झाली नाही तर मी उपोषण करेन वगैरे भाषा वापरली.

पोलिसांच्या कारवाईला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिल्यावर न्यायालयाने अटकेची कारवाई बेकायदा ठरवली आहे. तसेच सरकारला २५ हजार रूपयांचा दंडही केला आहे. पाटील यांनी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर केला असल्याचे यात स्पष्ट दिसते. कसब्याच्या निवडणुकीतही त्यांनी याच प्रकारे आपल्या अधिकारांचा गैरवापर केला आहे. त्यामुळे त्यांना मंत्रीमंडळातून काढून टाकावे असे जोशी म्हणाले.

कसबा पोटनिवडणुक | छोट्या पक्षांचा पाठिंबा मिळविण्यावर काँग्रेस, भाजपचा भर

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

कसबा पोटनिवडणुक | छोट्या पक्षांचा पाठिंबा मिळविण्यावर काँग्रेस, भाजपचा भर

 कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे हेमंत रासने यांच्यासमोर कडवे आव्हान उभे करणारे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना शहरातील विविध संघटना आणि अनेक राजकीय पक्षांच्या स्थानिक घटकांनी पाठिंबा दिला आहे. याचाच सामना करत, भाजपने मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेली कसबा जागा राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत आणि पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांना आणि आघाडीतील भागीदारांना एकत्र केले आहे.
 26 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असून आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक प्रचारात भाग घेतला आहे.
 सोशलिस्ट पार्टी ऑफ इंडियानेही धंगेकरांना पाठिंब्याचे पत्र दिले असून, त्यांचे कार्यकर्ते त्यांचा प्रचार करतील.  दीपक निकाळजे गटाच्या नेतृत्वाखालील आरपीआय आणि ऑल इंडिया रिपब्लिकन पक्षानेही धंगेकरांना पूर्ण पाठिंबा देण्याची ग्वाही दिली असून, माकपचे अजित अभ्यंकर यांनी त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.
 समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची आणि भाजपचा एकजुटीने सामना करण्याची वेळ आली आहे.  कसबा पोटनिवडणूक धर्मनिरपेक्षतेवर विश्वास ठेवणारा उमेदवार निवडून आणण्यासाठी आणि विधानसभेत जनतेचे प्रतिनिधित्व करण्याच्या रणनीतीचा एक भाग आहे,” असे सोशलिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या एका नेत्याने सांगितले.
 दुसरीकडे, भाजपला राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, आरपीआय (ए)चे केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या नेत्यांनी रासनेना पाठिंबा दिला आहे.  भाजपने शहराचे खासदार गिरीश बापट यांनाही आजारी असताना सभेला संबोधित करण्यासाठी आणले आणि मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील सदस्यांना रासने यांच्या प्रचारासाठी राजी केले.  पक्षाचे तिकीट न मिळाल्याने टिळक कुटुंबीयांनी यापूर्वी नाराजी व्यक्त केली होती.
महादेव जानकर म्हणाले, “आम्ही भाजपसोबतच्या युतीसाठी वचनबद्ध आहोत आणि कसब्यात त्यांच्या उमेदवाराला सर्वतोपरी पाठिंबा देऊ.
 अलीकडच्या काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाजपसोबतची वाढती जवळीकही रासणेंना दिलासा देणारी ठरली आहे.  मनसेने हिंदुत्वाचा अजेंडा आणि विकासावर लक्ष केंद्रित करत भाजपला पाठिंबा दिला आहे.  मात्र, निवडणूक प्रचारात सक्रिय सहभाग घेतलेला नाही.
 योगायोगाने, कॉंग्रेसचे धंगेकर हे मनसेचे माजी नेते आहेत ज्यांनी 2017 मध्ये पक्ष बदलला परंतु त्यांच्या पूर्वीच्या पक्षातील स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत.
 रासने  यांच्या प्रचारासाठी भाजपने माजी राज्यसभा खासदार संजय काकडे यांच्यासह शहरभरातील पक्षाचे माजी नगरसेवकही घेतले आहेत.  रासने यांच्यासाठी घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर आहे.

BBC | Congress | केंद्रातील मोदी सरकारने देशामध्ये अघोषित आणीबाणी लागू केली आहे | अरविंद शिंदे

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

केंद्रातील मोदी सरकारने देशामध्ये अघोषित आणीबाणी लागू केली आहे | अरविंद शिंदे

 

केंद्र सरकारच्या अखतारित असलेल्या आयकर खात्याने काल BBC या आंतरराष्ट्रीय वृत्त समुहाच्या दिल्ली व मुंबई येथील कार्यालयांवर छापे टाकून तेथील कामगारांना बंदीस्त करून कारवाई केली याच्या निषेधार्थ आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने नवी पेठ पत्रकार भवन येथे तोंडाला काळीफित बांधून शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मूक आंदोलन करण्यात आले.

यावेळी बोलताना शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘नरेंद्र मोदी हे हुकूमशाहीपद्धतीने काम करत असून देशात लोकशाही व्यवस्था, संविधान सर्व काही धाब्यावर बसवले आहे. मोदी व शहांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांवर कारवाई करुन तो आवाज दडपण्याचे काम केले जाते. BBC च्या दिल्ली व मुंबईतील कार्यालयावर आयकर विभागाचे छापे हे त्याचाच भाग आहे. BBC ने गुजरात दंगलीसंदर्भात दोन आठवड्यापूर्वी एक डॉक्युमेंटरी प्रसारित केली होती, त्याचा राग धरूनच ही छापेमारी केली असून हा योगायोग नसून देशात अघोषीत आणीबाणी अल्याचेच हे द्योतक आहे, BBC ने तयार केलेली डॉक्युमेंटरी भारतात दाखवू नये यासाठी मोदी सरकारने तात्काळ त्यावर बंदी घातली. बंदी घातली असतानाही काही ठिकाणी ही डॉक्युमेंटरी दाखवण्यात आली. बीबीसीच्या या डॉक्युमेंटरीमुळेच मोदी सरकारचे पित्त खवळले व त्यांच्या आवडत्या अस्त्रातील आयकर विभागाचे छापे टाकून बीबीसीला गप्प करण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारच्या विरोधात बोलल्यास त्याच्यावर ईडी, सीबीआय अथवा आयकर विभागाच्या माध्यमातून कारवाई करून गप्प करण्याचा प्रयत्न केला जातो. याचा निषेध म्हणून आज आम्ही पत्रकारांच्या संरक्षणासाठी व लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाच्या स्वातंत्र्यासाठी हे मूक आंदोलन करीत आहोत.’’

यावेळी प्रदेश पदाधिकारी ॲड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, गोपाळ तिवारी, संगीता तिवारी, सोनाली मारणे, रजनी त्रिभुवन ब्लॉक अध्यक्ष सचिन आडेकर, सतिश पवार, रमेश सोनकांबळे, लता राजगुरू, सुजाता शेट्टी, रफिक शेख, सुधीर काळे, भरत सुराणा, मारूती माने, सचिन भोसले, आनंद गांजवे, भगवान कडू, प्रकाश पवार, राजेंद्र नखाते, शिवाजी भोईटे, सुनिल पंडित, भोला वांजळे, राजू नाणेकर आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.