NCP | Balbharti-paud Fata Road | विकास हवाय परंतु पर्यावरणाचे नुकसान करून नको | राष्ट्रवादीची बालभारती पौड रस्ताबाबत भूमिका

Categories
Breaking News PMC Political पुणे

विकास हवाय परंतु पर्यावरणाचे नुकसान करून नको

| राष्ट्रवादीची बालभारती पौड रस्ताबाबत भूमिका

पुणे शहरात पुणे महानगरपालिकेने वेताळ टेकडी येथे प्रस्तावित केलेल्या बालभारती ते वनाज या नव्या रस्त्याच्या कामास शहरातील पर्यावरण प्रेमींनी विरोध दर्शवला आहे. या कामामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणार असून वेताळ टेकडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असुन, पर्यावरणाची खूप मोठी हानी होणार आहे. यासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली.

शहारात विकास नक्कीच व्हायला हवाय परंतु पर्यावरणाचे नुकसान होवून नाही, ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची भूमिका असुन पक्षाचे पदाधिकारी , कार्यकर्ते शनिवारी होणा-या टेकडी बचाव कूती समितीच्या बालभारतीपासून निघणा-या मोर्चात सहभागी होणार आहेत.

या बैठकीसाठी खा.वंदना चव्हाण, माजी आमदार जयदेवराव गायकवाड, दीपक मानकर, रवींद्र माळवदकर, निलेश निकम , उदय महाले व पदाधिकारी उपस्थित होते.

Iftar Party | सर्व धर्मीयांमध्ये सौहार्द प्राप्त होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक | अजित पवार | राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन

Categories
Breaking News Political social पुणे

सर्व धर्मीयांमध्ये सौहार्द प्राप्त होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक | अजित पवार

| राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मोमीनपुरा येथे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले सदर प्रसंगी मुस्लिम समाजातील नागरिकांची अत्यंत मोठ्या प्रमाणावर उपस्थित होती.

अजितदादा पवार यांनी रोजे ठेवणाऱ्या सर्व मुस्लिम बांधवांना या पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या, याप्रसंगी बोलताना ते म्हणाले या पवित्र महिन्यामध्ये सर्वांनाच सुख-समृद्धी प्राप्त व्हावी तसेच समाजात शांतता प्रस्थापित करण्याकरिता तसेच देशातील सर्व धर्मीयांमध्ये सौहार्द  प्राप्त होण्याकरता आपण सर्वांनीच एकत्र येऊन या पुढील काळात निश्चित प्रयत्न करायला हवेत रोजा ठेवणाऱ्या सर्व बांधवांना आत्मिक बळ प्राप्त व्हावे हीच आपण प्रार्थना करूयात.


सदर प्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप ,खा. वंदना चव्हाण , सह पोलिस आयुक्त संदीप कर्णीक , पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल , जयदेव गायकवाड अंकुश काकडे प्रदीप देशमुख , इकबाल शेख समीर शेख, इकराम ख़ान इम्तियाज़ तांबोळी, यूसुफ़ शेख़,जिमी पटेल गणेश कल्याणकर , मौलाना काजमी
ह भ प गणेश ठकार , भंते हर्षवर्धन शाक्य ,ग्यानी प्रताप सिंह , व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते

 

Ajit Pawar | माध्यमांनी विनाकारण बदनामी करणे थांबवावे | खात्री करुनच यापुढे माध्यमांनी बातम्या द्याव्यात | विरोधी पक्षनेते अजित पवार

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

माझ्याविषयी चुकीच्या बातम्या चालविल्यामुळे व्यथीत झालो

| माध्यमांनी विनाकारण बदनामी करणे थांबवावे

| खात्री करुनच यापुढे माध्यमांनी बातम्या द्याव्यात | विरोधी पक्षनेते अजित पवार

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महाराष्ट्रभर दौरे झाले, धावपळीत विश्रांती व्यवस्थित मिळाली नाही. दौऱ्याची दगदग, झोप व्यवस्थित न मिळाल्याने पित्ताचा त्रास वाढून तब्बेत बिघडली. त्यामुळे दौरा सोडून डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेऊन पुण्यातल्या जिजाई निवासस्थानी विश्रांती घेत होतो, अशी माहिती देत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांनी ‘नॉट रिचेबल’च्या चुकीच्या बातम्या दाखवल्यामुळे माझी विनाकारण बदनामी झाल्याची नाराजी व्यक्त करत यापुढे माध्यमांनी खात्रीकरुनच बातम्या दाखवाण्याची सूचना माध्यमांना दिला.

 

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, काल शुक्रवारी पुण्यात होतो, दुपारपर्यंत नियोजित वेळापत्रकानुसार माझा कार्यक्रम सुरु होता. मात्र गेल्या काही दिवस मी महाराष्ट्रभर दौऱ्यावर होतो. या दौऱ्याच्या काळात प्रचंड दगदग झाली, विश्रांती मिळाली नाही, झोपही पूर्ण होत नव्हती. त्याचा प्रतिकुल परिणाम माझ्या तब्बेतीवर झाला, पित्त वाढले. त्यामुळे काल दुपारी अचानक अस्वस्थ वाटायला लागले. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेत औषधे घेऊन पुण्यातल्या ‘जिजाई’ या निवास्थानी विश्रांती घेतली. मात्र या काळात मी ‘नॉट रिचेबल’ असल्याच्या चुकीच्या बातम्या माध्यमांनी चालविल्या. कोणतीही खातरजमा न करता एखाद्याची किती बदनामी करायची याला काही लिमीट असते. माध्यमात माझ्या विषयी आलेल्या बातम्या बघून मी व्यथित झालो. आम्ही पब्लिक फिगर असल्याने आमच्या विषयी बातम्या करण्याचा माध्यमांना अधिकार आहे. मात्र कोणतीही खातरजमा न करता चुकीच्या बातम्या चालविणे योग्य नाही अशा शब्दात आपली नाराजी व्यक्त करत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांनी खात्रीकरुनच यापुढे बातम्या चालविण्याची सूचना माध्यमांना केली. पुणे येथे एका नियोजित कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली.
*****

MLA Sunil Tingre Vs Jagdish Mulik | निष्क्रिय मुळीकांना 2019 लाच वडगावशेरीकरांनी जागा दाखविली | आमदार सुनिल टिंगरेंचे प्रत्युत्तर

Categories
Breaking News PMC Political पुणे

निष्क्रिय मुळीकांना 2019 लाच वडगावशेरीकरांनी जागा दाखविली

| आमदार सुनिल टिंगरेंचे प्रत्युत्तर

पुणे : वडगाव शेरी मतदारसंघातील नागरिकांनी 2019 लाच जगदिश मुळीकांना घर पाठवून ते किती निष्क्रिय आहेत हे दाखवून दिले आहे. मोदी लाटेतही त्यांना निवडून येता आले नाही. आता माझ्या कामांचा धडका पाहून आता मुळीकांच्या पायाखालची वाळू सरकरली आहे असे प्रतिउत्तर आमदार सुनिल टिंगरे यांनी दिले आहे.

मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांसाठी आमदार सुनिल टिंगरे यांनी महापालिका भवनासमोर केलेल्या उपोषणावर मुळीक यांनी टिका केली होती. त्यावर उत्तर देताना आमदार टिंगरे म्हणाले, राजकिय आरोप न करता केवळ मतदारसंघातील प्रश्नांसाठी मी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला. मात्र, या उपोषणाला केवळ मतदारसंघातूनच नाही तर शहरातून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे मुळीक़ घाबरून गेले. खर तर पाच वर्ष ते आमदार होते. महापालिकेत त्यांची एकहात्ती सत्ता होती. असे असताना त्यांना हे प्रश्न सोडविता येऊ शकले नाही. मी विरोधी पक्षात असून मतदारसंघासाठी सर्वाधिक निधी आणला आहे. प्रमुख प्रश्न मार्गी लागत आहे. त्यामुळे घाबरलेल्या मुळीकांनी निरर्थक पोपटपंची केली आहे.

MLA Sunil Tingre Vs Jagdish Mulik | सुनिल टिंगरे यांच्या निष्क्रियतेचा भोपळा फुटला | भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांचा टोला

Categories
Breaking News PMC Political पुणे

सुनिल  टिंगरे यांच्या निष्क्रियतेचा भोपळा फुटला

| भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांचा टोला

वडगाव शेरी मतदार संघाचे आमदार सुनील टिंगरे यांनी पुणे महापालिका प्रशासनाच्या विरोधात केलेले लाक्षणिक उपोषण म्हणजे त्यांच्या निष्क्रियतेचा भोपळा फुटला असेच म्हणावे लागेल. असा टोला भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी लगावला.

मुळीक म्हणाले, वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ भाजपच्या माध्यमातून विविध विकास कामे आणि प्रकल्प पूर्णत्वास येत आहेत. पुणे मेट्रोचे काम 60 टक्के पूर्ण झाले आहे. भामा आसखेड पाणी प्रकल्पामुळे या भागातील पाणीपुरवठ्याची समस्या बहुतांश सुटली आहे. समान पाणीपुरवठा योजनेचे कामही 70 टक्के पेक्षा अधिक झालेले आहे. वडगाव शेरी च्या विविध भागात पीपीपी तत्त्वावर रस्ते निर्मितीची कामे सुरू आहेत. नगर रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी गोल्फ चौकात उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून खराडी ते शिरूर उड्डाणपूल निर्मितीच्या कामाला वेग आलेला आहे. पुणे विमानतळाचे विस्तारीकरण आणि पार्किंग ची सुविधा उपलब्ध होत आहे. मी आमदार असताना प्रस्तावित केलेले लोहगाव येथील उपजिल्हा रुग्णालय आता अंतिम टप्प्यात आहे. खराडीत पंतप्रधान आवास योजनेचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर टिंगरे यांची निष्क्रियता आणि अकार्यक्षमता मतदारांसमोर आली आहे या भीतीतून त्यांनी लाक्षणिक उपोषणाची स्टंटबाजी केली आहे.

मुळीक पुढे म्हणाले, राज्यात तीन वर्षे महाविकास आघाडीचे सरकार होते. त्या काळात राज्य शासनाच्या माध्यमातून टिंगरे यांना वडगाव शेरी तील मोठ्या प्रकल्पांसाठी शून्य भोपळा निधी मिळाला. आपले अपयश लपविण्यासाठी टिंगरे हे सातत्याने भाजपने पुढाकार घेऊन सुरू केलेल्या किंवा सुरू करीत असलेल्या प्रकल्पाबाबत पत्रव्यवहार करतात आणि त्या कामाचे श्रेय घेण्यासाठी पुढे येतात. वडगाव शेरीच्या गेल्या काही वर्षातील विकासात टिंगरे यांचे शून्य योगदान आहे. हे अपयश लपविण्यासाठी ते स्टंटबाजी करतात हे जनतेला माहिती असून त्याचे योग्य उत्तर मतपेटीद्वारे मिळेल.

 

नगर रस्त्यासाठी वाहतूक आराखडा भाजपने केला

केंद्र सरकारच्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत सन 2019 मध्ये पुणे शहरातील 200 किलोमीटर रस्त्यांचे रोड सेफ्टी ऑडिट करण्यात आले होते. त्यात पुणे नगर रस्ता हा वाहतुकीसाठी सर्वात धोकादायक असल्याची बाब समोर आली होती याचा विचार करून स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष योगेश मुळीक यांनी पुणे नगर रस्ता हे एक एकक मानून नगर रस्ता एकात्मिक वाहतूक आराखडा तयार केला. त्यामध्ये मेट्रो मार्गाचे नियोजन, ठीकठिकाणी उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर, भुयारी मार्ग अशा उपायोजना करून महापालिकेच्या सन 2019-20 च्या अंदाजपत्रकात सुचविल्या होत्या. त्यासाठी निधीची तरतूद केली होती. त्यापैकी गोल्फ चौकातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. खराडी, कल्याणी नगर ते कोरेगाव पार्क उड्डाणपुलाचे विस्तारीकरण, येरवडा, शास्त्री नगर येथे उड्डाणपूल, विश्रांतवाडी येथे राष्ट्रीय महामार्ग योजनेअंतर्गत उड्डाणपूल सुचविण्यात आले होते. विश्रांतवाडी येथील पुलाच्या कामासाठी तज्ञ सल्लागार नियुक्त करण्यात आला आहे. त्याचे पूर्व गणन पत्रक तयार करण्यात येत आहे. म्हणजे नजीकच्या काळात ही सर्व विकासकामे सुरू होणार आहेत. त्याचे श्रेय घेण्यासाठी सुनील टिंगरे स्टंटबाजी करत आहेत.

यावेळी माजी आमदार बापूसाहेब पठारे माजी नगरसेवक योगेश मुळीक,संतोष खांदवे,अर्जुन जगताप,,राजू बाफना,विजय चौगुले आदी उपस्थित होते

Road Digging | NCP | रस्ते खोदाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन

Categories
Breaking News PMC Political पुणे

रस्ते खोदाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन

पुणे शहरामध्ये नुकत्याच डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्त्यांवर रिलायन्स जिओची (Reliance Jio) केबल टाकण्यासाठी खोदाईची त्वरित परवानगी पुणे महानगरपालिकेच्या (PMC Pune) प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिली. अश्या पद्धतीने वारंवार नियोजनशून्य कारभारामुळे पुणेकरांच्या कररुपी पैशाचा अपव्यय होत आहे. असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस च्या (ncp pune) वतीने महापालिकेच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. (Ncp agitation)

राष्ट्रवादीच्या निवेदनानुसार सदाशिव  पेठेतील निंबाळकर तालीम चौक ते खुन्या मुरलीधर चौक रस्त्यावर ४-५ दिवसांपूर्वी नव्याने डांबरीकरण करण्यात आलेला रस्ता ह्याच जिओ च्या केबल टाकण्यासाठी खोदाईचे काम सुरू आहे व परिसात केबल टाकण्याचे काम सुरू आहे.
अश्या पद्धतीने वारंवार नियोजनशून्य कारभारामुळे पुणेकरांच्या कररुपी पैशाचा अपव्यय होत आहे. या सर्व प्रकाराला कारणीभूत असणाऱ्या पुणे महानगरपालिका प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी याकरिता पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, कसबा विधानसभा संघाच्या वतीने शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप यांच्या सूचनेनुसार खून्या मुरलीधर चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी पुणे मनपा प्रशासनाचा, प्रशासनावर अंकुश नसणाऱ्या पुण्याच्या पालकमंत्र्यांचा धिक्कार असो, पुणेकरांना खड्यात घालणाऱ्या पुणे मनपा प्रशासनाचा धिक्कार असो, पुण्याच्या वाहतुकीचा प्रश्न निर्माण करणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार असो अश्या घोषणा देण्यात आल्या. (PMC Pune)


सदर प्रसंगी मतदारसंघाचे अध्यक्ष गणेश नलावडे, रोहन पायगुडे,अजिंक्य पालकर, राहुल पायगुडे, अरूण गवले,सारिका पारेख, गजनान लोंढे,आप्पा जाधव, संजय गायकवाड, हेमंत येवलेकर, शंकर शिंदे, संतोष बनकर, हर्षवर्धन दिघे, हर्षल भोसले, मदन कोठुळे, युवराज दिसले, देवा वाल्लेकर, सागर करपे, सतिश दबडे, ऋषिकेश शहाणे, राणी शिंदे आदि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

NCP | Agitation | झाडे वाचवण्यासाठी राष्ट्रवादीचे झाडावर चढून आंदोलन!

Categories
Breaking News PMC Political पुणे

झाडे वाचवण्यासाठी राष्ट्रवादीचे झाडावर चढून आंदोलन!

पुणे महानगरपालिकेने (PMC Pune) मुळा मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प (Mula mutha river revival project) हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. हे काम करताना नदी लगत असणारी काही वृक्ष ( trees) बाधित होणार आहेत. हे वृक्ष तोडू नयेत या मागणीसाठी राष्ट्रवादी कडून (ncp pune) संभाजी उद्यानासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रवक्ता प्रदीप देशमुख यांनी झाडावर चढून बसत झाडे न तोडण्याचा पुनरुच्चार केला. यावेळी कार्यकर्त्यांनी भाजप विरोधात घोषणाबाजी केली.

या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले. ते म्हणाले की, पुणे शहरात विकास कामांना आमचा विरोध नाही. पण विकास काम करत असताना, पर्यावरणाचा देखील भाजप आणि महापालिका प्रशासन थोडा विचार करायला पाहिजे होता. तो त्यांनी केला नसल्याने आता नदी पात्र सुधार प्रकल्प अंतर्गत हजारो झाडांची कत्तल करण्यात येत आहे.

नियमानुसार आम्ही झाड लावणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र आजवर पुणे महापालिका प्रशासनामार्फत झाडे काढल्यावर कोणत्याही ठिकाणी झाडे लावण्यात आली नाही. यामुळे या नदी पात्रात झाडांचे देखील तेच होणार आहे. यामुळे झाडांची कत्तल झाल्यास आम्ही न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस आणि पर्यावरण प्रेमींनी यावेळी दिला.

प्रवक्ते प्रदिप देशमुख म्हणाले की, केवळ आपल्या बॉसेसना खुश करण्यासाठी हा खटाटोप करण्यात येत आहे.या सर्व झाडांचे पुनर्रोपण करता येणे अशक्य आहे. आम्ही देखील विकासाचे समर्थक आहोत पण पर्यावरणाचा बळी देऊन होणारा विकास आम्हाला अमान्य आहे.

यावेळी शहाराघ्यक्ष प्रशांत जगताप , प्रवक्ते  प्रदीप  देशमुख , दिपाली धुमाळ ,किशोर कांबळे ,  नितीन कदम , अजिंक्य पालकर , मनोज पाचपुते ,  कैलास मकवान , विक्रम जाधव , हरीश लडकत , फईम शेख,  शिल्पा भोसले इ प्रमुख  उपस्थित होते.

PMC Budget | महापालिका आयुक्तांनी सादर केलेल्या बजेटबाबत राष्ट्रवादी आणि भाजपला काय वाटते?

Categories
Breaking News PMC Political पुणे

 महापालिका आयुक्तांनी सादर केलेल्या बजेटबाबत राष्ट्रवादी आणि भाजपला काय वाटते?

पुणेकरांनी भाजपला योग्य धडा शिकवावा | प्रशांत जगताप

राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, आज पुणे महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक विक्रम  कुमार यांनी पुणे महानगरपालिकेचे जे बजेट मांडलेले आहे ते अत्यंत निराशाजनक तथा अवास्तव आहे, असे आमचे ठाम मत आहे. गेल्या वर्षी स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी साडेआठ हजार कोटींचे बजेट मांडल्यानंतर आज २४ मार्च २०२३ रोजी देखील पुणे महानगरपालिकेला या आर्थिक वर्षात साडेपाच ते सहा हजार कोटींचे पुढे उत्पन्न गाठण्यात यश आलेले नाही, असे असताना देखील पुणे महानगरपालिकेचे प्रशासक म्हणून  विक्रम कुमार यांनी यावर्षी साडेनऊ हजार कोटींचे बजेट मांडले ही एक प्रकारे पुणेकरांची थट्टाच केली आहे. हे बजेट किमान ३ हजार कोटींच्या तुटीचे बजेट आहे,असा आमचा थेट आरोप आहे.
गेली अनेक दशके लोकप्रतिनिधींच्या आड लपून हे स्थायी समितीने फुगवलेले बजेट आहे, असा आरोप करणारे प्रशासन आज वास्तववादी बजेट मांडू शकले नाही, हे या बजेट चे ठळक वास्तव आहे.

२०१७ ते २०२२ या पाच वर्षाच्या भाजपच्या काळात पुणे महानगरपालिकेची झालेली घसरण लपविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या दबावाखाली आज माननीय महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी हे बजेट मांडले आहे,असा आमचा आरोप आहे. पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता असताना पुणे महानगरपालिकेकडे कर भरणाऱ्या तब्बल १० लाख मालमत्ता होत्या,त्यावेळी ५ ते ६ हजार कोटींची जमा रक्कम येत होती. आज पुणे महानगरपालिकेमध्ये ३४ गावे समाविष्ट होऊन नव्याने ६ लाख मिलकती येवून सुधा तब्बल ३ हजार कोटींच्या तुटीचे बजेट मांडण्याची वेळ पुणे महानगरपालिका आयुक्तांवर आली, अर्थात या संपूर्ण फसलेल्या बजेटचे श्रेय पुणे भाजपला जाते. त्यांच्या दबावाखाली व त्यांचा गेल्या पाच वर्षातील भोंगळ कारभार लपविण्यासाठीच अशा प्रकारचे बजेट सादर करण्यात आलेले आहे, ही बाब ओळखून येणारे काळात पुणेकरांनी याबाबत भाजपला योग्य तो धडा शिकवावा, अशी माझी पुणेकरांना विनंती राहील.


पुण्याच्या विकासाला चालना देणारे बजेट |जगदीश मुळीक

भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले,  पुणे महापालिका आयुक्तांनी सादर केलेले अंदाजपत्रक हे शहराच्या विकासाला चालना देणारे आहे.
शहर भाजपने केलेल्या मागणीनुसार कोणतीही करवाढ पुणेकरांवर लादण्यात आलेली नाही.
भाजपने सुरू केलेली मेट्रो, नदी शुद्धीकरण आणि सुशोभीकरण आरोग्य यंत्रणांचे सक्षमीकरण, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय निर्मिती, ठिक ठिकाणी उड्डाणपूल, रस्ते विकास याला प्राधान्य देण्यात आले आहे. भाजपच्या कारकिर्दीत सुरू झालेली विविध विकासकामे पूर्ण होण्यास या अर्थसंकल्पामुळे चालना मिळेल.

 

NCP Vs BJP | मुरलीधर मोहोळ यांचा आरोप म्हणजे स्वत:च्या पक्षाचे अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न | आमदार सुनिल टिंगरे आणि चेतन तुपे

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

मुरलीधर मोहोळ यांचा आरोप म्हणजे स्वत:च्या पक्षाचे अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न | आमदार सुनिल टिंगरे आणि चेतन तुपे

| भाजपच्या टिकेला राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर

पुणे | मिळकतकरातील 40 टक्के सवलत पुन्हा लागू करावी यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांनी एकत्र येऊन विधी मंडळाचे काम सुरू होतानाच आंदोलन केले. मात्र याला भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांनी नौटंकी असे संबोधले होते. या टीकेला राष्ट्रवादी आमदार सुनिल टिंगरे आणि चेतन तुपे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
आमदार सुनिल टिंगरे आणि चेतन तुपे म्हणाले, मिळकतकरातील 40 टक्के सवलत पुन्हा लागू करावी यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांनी एकत्र येऊन विधी मंडळाचे काम सुरू होतानाच आंदोलन केले. मात्र, कसबा निवडणूकीतील पराभवाच्या कारणांचा अहवाल देण्यासाठी आलेल्या माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना या राष्ट्रवादीच्या आमदारांनी केलेल्या आंदोलनाची माहिती समजल्यानंतर लगेचच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच्या भेटीचा देखावा करून सवलतीची मागणी केली. मुळातच आमचे आंदोलन नियोजित होते, म्हणूनच या आंदोलनाचे फलकही आधीच तयार केले होते. त्यामुळे त्यांच्या भेटीनंतर आघाडीच्या आमदारांना जाग आली हा मोहोळ यांचा आरोप हास्यास्पद तर आहेच पण स्वत:च्या पक्षाचे अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्नही आहे. पुणेकरांना ही सवलत पुन्हा लागू व्हावी हीच आमची प्रामाणिक भुमिका असून त्यासाठी आम्ही आवाज उठविणारच.

| काय म्हणाले होते मुरलीधर मोहोळ?

आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यावर पुण्यातील महाविकास आघाडीच्या आमदारांना जाग आली आणि त्यांनी घाईघाईने विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलनाची नौटंकी केली. स्वतःची निष्क्रियता छाकण्यासाठी केलेल्या आंदोलनाच्या नौटंकीला पुणेकर भुलणार नाहीत, अशा शब्दात मोहोळ यांनी टीका केली होती.

Kasba By Election | कसबा पोटनिवडणूक | कॉंग्रेस, राष्ट्रवादीची आज बैठक तर शिंदे गट, भाजपची उद्या बैठक

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

कसबा पोटनिवडणूक | कॉंग्रेस, राष्ट्रवादीची आज बैठक तर शिंदे गट, भाजपची उद्या बैठक

कसबा च्या जागेसाठी कॉंग्रेस च्या इच्छुकांनी मुलाखती दिल्यानंतर कॉंग्रेस ची आज मुंबईत बैठक होणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने कसब्याच्या जागेवर दावा केल्यानंतर त्यासंदर्भात विरोधीपक्ष नेते अजित पवार हे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची आज बारामती हॉस्टेलवर बैठक घेणार आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षाच्या बैठकांमध्ये काय निर्णय होणार याकडे लक्ष लागले आहे. यातच आता पुण्यात शुक्रवारी शिंदे गटाची बैठक होणार आहे. कसबा पोटनिवडणुकीसंदर्भात शिंदे गटामध्ये खल होणार असल्याची माहिती आहे. शुक्रवारी शिंदे गट आणि भाजपमध्ये ही बैठक संपन्न होईल.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची बैठकीला उपस्थितीत राहणार असल्याची माहिती आहे. शिंदे गट कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपला पाठिंबा जाहीर करणार असल्याचं स्पष्ट आहे.

आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाल्याने या रिक्त झालेल्या जागेची पोट निवडणूक जाहीर झाली आहे. या जागेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासही सुरुवात झाली आहे. मात्र, अद्याप एकाही पक्षाने उमेदवार जाहीर केलेला नाही.

दरम्यान, महाविकास आघाडी ही निवडणूक लढविणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. तसेच आघाडीत ही जागा कॉंग्रेसकडे असल्याचेही राष्ट्रवादी कबूल करते मात्र, या निवडणुकीसाठी कॉंग्रेसकडून राष्ट्रवादी आणि शिवसेनेला (ठाकरे गट) काहीच प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे ठाकरे गट आणि राष्ट्रवादीनेही निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. मात्र, दोन्ही पक्षांकडून अधिकृतपणे अद्याप काहीच सांगण्यात येत नव्हते. मात्र, आता अजित पवार स्वत: बैठक घेणार असल्याने राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट होणार आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्‍ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेवर 26 फेब्रुवारीला पोट निवडणूक होणार आहे. तर अर्ज भरण्यासाठी दि. 7 फेब्रुवारी ही अंतीम मुदत आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत युती मध्ये ही जागा भाजपकडे तर आघाडीत कॉंग्रेसकडे होती. तर शिवसेनेचा उमेदवार बंडखोरी करत अपक्ष म्हणून उभा राहिला होता. त्यामुळे, निवडणूक जाहीर होताच कॉंग्रेसने या जागेवर दावा केला असून त्यांच्याकडून 16 जण इच्छूक आहेत. निवडणूक जाहीर झाल्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने ही जागा कॉंग्रेसची असल्याने महाविकास आघाडीचा धर्म पाळणार असल्याचे सांगितले होते.

कुणाल टिळक यांना दिल्लीतून फोन
दरम्यान, भाजपमध्ये तिकिटासाठी रस्सीखेच सुरू असतानाच कुणाल टिळक यांना भाजपच्या दिल्लीतील राष्ट्रीय कार्यालयातून बोलत असून तुम्हाला कसबा मतदारसंघासाठी तिकिट जाहीर झाले आहे. तुम्ही ऑनलाईन ७६  हजार रूपये पाठवा असा फोन बुधवारी आला. मात्र, हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे लक्षात आल्याने कुणाल यांनी तत्काळ संबधितांना सुनावले. दरम्यान, याची कोणतीही तक्रार करण्यात आलेली नसली तरी, खरबदारीचा उपाय म्हणून पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि शहराध्यक्ष मुळीक यांना ही बाब टिळक यांच्याकडून कळविण्यात आली असून, या प्रकरणी राष्ट्रीय कार्यालयास माहिती देऊन अशा प्रकारे फसवणुकीचे फोन केले जात असल्याने खबरादारीच्या सूचना देण्याबाबत कळविण्यात आले आहे.

 

कसबा’साठी ‘वाडेश्‍वर कट्ट्या’वर सर्वपक्षीयांची चर्चा

आमदार मुक्‍ताताई टिळक यांच्या अकाली निधनानंतर कसबा विधानसभा मतदार संघात होणाऱ्या पोटनिवडणुकीत अन्य पक्षांपेक्षा भाजपच्याच इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त आहे. येत्या दोन दिवसांत आपापल्या पक्षाकडून उमेदवाराची घोषणा होईल, अशी अपेक्षा सर्वच इच्छुकांनी बुधवारी “वाडेश्‍वर कट्ट्या’वर व्यक्त केली. याशिवाय आपणच कसे योग्य उमेदवार आहोत तसेच आपण मतदार संघासाठी काय करू शकतो, याविषयी सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रवक्‍ते अंकुश काकडे, श्रीकांत शिरोळे, डॉ. सतीश देसाई, रवींद्र माळवदकर तसेच इच्छुक उमेदवार उपस्थित होते.