Tag: Marathi news
Shinde-Fadnavis Government | बेकायदेशीर शिंदे सरकारने राजीनामा द्यावा | मोहन जोशी
Shinde-Fadnavis Government | महाराष्ट्रातील सत्तापालटातून (Maharashtra Political Crisis) निर्माण झालेल्या प्रश्नांवर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme courth results) दिलेला निकाल हा ऐतिहासिक आहे. शिंदे गटाने प्रतोद नेमण्याचा निर्णय, राज्यपालांचा फ्लोअर टेस्ट बाबतचा निर्णय, बेकायदेशीर ठरून सर्वोच्च न्यायालयाने सत्तेसाठी अधीर बनलेल्या शिंदे – फडणवीस सरकारला मोठी चापराक दिली आहे. आता तरी या बेकायदेशीर सरकारने नैतिक जबाबदारी म्हणून त्वरित राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी महारष्ट्र प्रदेश कॉंग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Mohan Joshi) यांनी केली. (Maharashtra Political crisis News)
मोहन जोशी म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार पाडून शिंदे – फडणवीस सरकार आणण्यासाठी करण्यात आलेली कुटील कारस्थाने सर्वोच्च न्यायाल्यापुढे टिकू शकली नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे – फडणवीस सरकार आणि तत्कालीन राज्यपाल यांच्यावर कडक ताशेरे ओढले आहेत . अशावेळी हवालदिल झालेले शिंदे – फडवणीस सरकार या निर्णयाचे लंगडे समर्थन करीत सत्तेला चिकटून बसत आहेत ही लाजीरवाणी बाब आहे. जनता उघड्या डोळ्यांनी त्यांचा हा तमाशा बघत आहे. या बेकायदेशीर शिंदे – फडणवीस सरकारने जनाची नाही तर मनाची लाज बाळगून त्वरित राजीनामा द्यावा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शिंदे – फडणवीस सरकारच्या बेकादेशीर कृत्यांवर शिक्का मोर्तब झाले आहे. त्यामुळेच आता ,या सरकारने त्वरित राजीनामा दिलाच पाहिजे असे मोहन जोशी यांनी म्हटले आहे.
—-
Shinde-Fadnavis Government | The illegitimate Shinde government should resign Mohan Joshi
PMC Pune Employees Promotion | ‘अनुभव’ आणि ‘सेवा’ या शब्दाच्या गल्लतीमुळे पुणे महापालिकेचे बहुसंख्य कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित!
| महापालिकेने दुरुस्तीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्याची कर्मचाऱ्यांची मागणी
नियमित सेवा” असा बदल करणे आवश्यक आहे.
—
Due to the mistake of the words ‘experience’ and ‘service’, most of the employees of Pune Municipal Corporation are deprived of promotion!
Chandni Chowk pune new Flyover | चांदणी चौकात आकारास येत असलेल्या उड्डाणपुलाला सेनापती बापट यांचे नाव द्यावे
| खासदार सुप्रिया सुळे यांचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिका आयुक्तांना पत्र
PMC Pune Education Department | आता शिक्षण विभागातील कामचुकार सुरक्षा रक्षकावर राहणार करडी नजर
| पुणे महापालिकेकडून जबाबदार अधिकारी नियुक्त
PMC Pune Education Department | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) प्राथमिक शिक्षण विभागाकडे (Primary education department) कार्यरत असलेल्या कायम सुरक्षा रखवालदार व रोजंदारी सुरक्षा रखवालदार यांचेवर आता महापालिकेची करडी नजर राहणार आहे. काही लोक कामचुकारपणा करत असल्याचे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. या लोकांवर परिणामकारक नियंत्रण ठेवणेसाठी राकेश य. विटकर, सुरक्षा अधिकारी पुणे महानगरपालिका यांची नियुक्ती करण्यात येत आहे. अतिरिक्त आयुक्त यांच्याकडून याबाबतचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. (Pune Municipal Corporation News)
२) कोणतीही प्राथमिक शाळा विना सुरक्षा रखवालदार राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
३) प्रत्येक शाळेतील सुरक्षा रखवालदार यांच्या कामाची जबाबदारी निश्चित करुन देण्यात यावी.
४) सदर सुरक्षा रखवालदार यांची तिनही पाळ्यांमध्ये उपस्थिती तपासावी, तसेच सदर सुरक्षा रखवालदार विहीत वेळेत पूर्णवेळ उपस्थित असतात अगर कसे ? याबाबत तपासणी करावी.
५) सदर सुरक्षा रखवालदार हे मान्य गणवेश परिधान करीत आहेत अगर कसे? याबाबत तपासणी करावी.
६) सुरक्षा विभाग, पुणे महानगरपालिका यांचेकडे कार्यरत असलेल्या प्रभारी सहाय्यक सुरक्षा अधिकारी व प्रभारी सुरक्षा जमादार यांचेमार्फत प्राथमिक शिक्षण विभागाकडील सुरक्षा रखवालदार यांचे कामकाजावर देखरेख करणे, नियंत्रण ठेवणे, तसेच वेळोवेळी कामकाजाचे ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देण्याची कार्यवाही करावी.
७) वरिल बाबींच्या अनुषांने केलेल्या कामकाजाचा अहवाल श्री. राकेश विटकर यांनी दरमहा अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) पुणे महानगरपालिका, यांचेकडे सादर करावा. असे आदेशात म्हटले आहे.
G 20 Summit Pune | पुणेकर नागरिकांच्या सहकार्याने जी-२० बैठक यशस्वी करू
| पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही
G 20 Summit Pune | जानेवारी महिन्यात झालेल्या जी-२० ‘इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुप’च्या बैठकीचे यजमान पद पुण्याने यशस्वीपणे भूषविल्याने जूनमध्ये तिसरी ‘डिजिटल इकॉनॉमी वर्किंग ग्रुप’ बैठक आणि चौथी ‘एज्युकेशन वर्किंग ग्रुप’ बैठक अशा दोन्ही बैठकांचे पुणेकर नागरिकांच्या सहकार्याने यशस्वी नियोजन करू, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Guardian Minister Chandrakant patil) यांनी आज दिली. (G 20 Summit in Pune)
चौथ्या जी-२० ‘एज्युकेशन वर्किंग ग्रुप’ बैठकीच्या नियोजनाच्या अनुषंगाने पुण्यातील विविध शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींसोबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय शिक्षण विभागाच्या सहसचिव निता प्रसाद, अर्चना शर्मा, जी-२० चे समन्वयक विपीन कुमार, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू कारभारी काळे, प्रा. प्रफुल्ल पवार, रवी शिंगणपूरकर, प्र-कुलगुरू संजीव सोनावणे यांच्यासह पुण्यातील विविध शैक्षणिक संस्थांचे प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, पुण्याने गेल्या दोन जी-२० बैठकांचे यजमानपद यशस्वीपणे भूषविल्याने, देशातील चौथ्या बैठकीचे यजमानपद पुण्याला मिळाले, ही सर्व पुणेकरांसाठी आनंदाची बाब आहे. पुणे हे सांस्कृतिक राजधानीचे शहर आहे. त्यामुळे इथल्या सांस्कृतिक परंपरेचा वैभवशाली वारसा संपूर्ण जगाला दाखविण्याची संधी पुणेकरांना मिळाली आहे. त्यामुळे चौथ्या जी-२० परिषदेच्या नियोजनात पुणेकर कुठेही कमी पडणार नाहीत.
पुण्यात होणाऱ्या जी-२० च्या चौथ्या बैठकीत नागरिकांच्या सहभागावर सर्वाधिक भर आहे. पुण्यात होणाऱ्या बैठकीत शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी व्यापक विचार मंथन होणार आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला जी-२० शी जोडण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबविले जाणार आहेत. त्यामुळे शैक्षणिक संस्थांनीही यात सहकार्य करावे असे आवाहन श्रीमती प्रसाद यांनी केले.
पुण्याची ओळख ही संपूर्ण जगात ‘अशिया खंडातील ऑक्सफर्ड’ म्हणून गणलं जातं. त्यामुळे सर्व शैक्षणिक संस्थांचा समावेश करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करु आणि ही बैठक यशस्वी करु, अशी ग्वाही विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे यांनी दिली.
बैठकीचे प्रास्ताविक कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी केले.
PMC Assistant Commissioner | Why is the charge of Assistant Commissioner given to Deputy Engineer only?
| The question of employees of Pune Municipal clerical cadre staff
| Administration officer should be given charge post
PMC Assistant commissioner | सहायक आयुक्त यांचा प्रभारी पदभार उप अभियंत्यालाच का दिला जातो?
| पुणे महापालिका लेखनिकी संवर्गातील कर्मचाऱ्यांचा सवाल
Pune PMC DA Hike Circular | मनपा कर्मचाऱ्यांना सुधारित दराने महागाई भत्ता देण्याबा बतचे परिपत्रक जारी
| फरकासह महागाई भत्ता मे पेड इन जून च्या वेतनातून दिला जाणार
: असे आहे परिपत्रक
१. माहे जानेवारी २०२३ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता सुधारित दराने (३८% वरून ४२%) या दराने अदा करणेस
२. माहे जानेवारी २०२३ ते एप्रिल २०२३ या चार माहिन्याचे ७ व्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता सुधारित दराने (३८% वरून ४२%) फरक माहे मे २०२३ पेड इन जुन २०२३ चे वेतनातून अदा करणेस
३. सेवानिवृत्ती अधिकारी / कर्मचारी सेवकांना व कुंटूंबनिवृत्ती वेतनधारकाना माहे जानेवारी २०२३ ते माहे में २०२३ या पाच माहिन्याचे ७ व्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता सुधारित दराने (३८% वरून ४२% ) फरक माहे जुन २०२३ पेड इन जुलै २०२३ चे निवृत्ती वेतनात अदा करणेस.
यानुसार कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
—-
Maharashtra to set up committee to explore Telangana Model| शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी राज्यस्तरीय समिती | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
| मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा
Maharashtra to set up committee to explore Telangana Model | शेतकऱ्यांचा उत्पादनखर्च कमी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिले. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आज विनायकराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा केली, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, आमदार ज्ञानराज चौगुले यांचेसह वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती आभा शुक्ला, मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीजपुरवठा देण्याच्या उद्दिष्टाने सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेतून ६ हजार कृषि फीडर्स सौर ऊर्जेवर आणण्यात येणार आहेत असे सांगून शेतकऱ्यांच्या थकीत वीजबिलासाठी वीज पुरवठा खंडीत करु नये असे निर्देश दिले असून त्याची अंमलबजावणी होत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सव्वा दोन लाख सौर कृषि पंप देण्याचे उद्दिष्ट असून गेल्या वर्षी ७५ हजार सौर कृषिपंप बसविण्यात आले आहेत. ज्यांना वीजेची जोडणी नाही त्यांना प्राधान्याने सौर कृषिपंप देण्याचे धोरण असून ज्यांच्याकडे वीजजोडणी आहे, त्यांनी मागणी केल्यास त्यांनाही सौर कृषिपंप देण्यासाठी सविस्तर कार्यक्रम तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.
केवळ एक रुपया भरुन प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होता येईल, असा निर्णय अर्थसंकल्पात घेतला असून विम्याच्या हप्त्याची रक्कम शासन भरणार आहे, त्यासाठी ३३१२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला ठिबक अशा विविध योजना शासन राबवित असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला जागतिक बॅंकेने मान्यता दिली आहे. गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतून अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबास दोन लाख रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान देण्यात येईल. प्रधानमंत्री कृषि सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना जाहीर केली आहे, यात प्रतिवर्ष प्रति शेतकरी ६ हजार रुपये अतिरिक्त राज्य शासनाकडून देण्यात येणार आहेत, त्यासाठी ६ हजार ९०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अवकाळी, गारपीटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ७ हजार कोटी रुपये वाटप केले आहे, सिंचनाच्या २८ योजना मंजूर केल्या आहेत, त्यातून ५ लाख हेक्टर सिंचनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
कर्जवसुलीसाठी मोठ्या थकबाकीदारांवर लक्ष द्या, छोट्या शेतकऱ्यांच्या मागे लागू नका, त्यांना त्रास देऊ नका अशा सूचना जिल्हा बॅंकांना देण्यात आल्या आहेत. हे सर्वसामान्य, शेतकऱ्यांचे सरकार असून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिली.