SIC Law | RSM | PMC employee | मनपातील कंत्राटी कामगारांनी एस आय सी चे लाभ घ्यावेत

Categories
Breaking News PMC Political social पुणे

मनपातील कंत्राटी कामगारांनी एस आय सी चे लाभ घ्यावेत

– चंद्रकांत पाटील

पुणे :- राष्ट्रीय मजदूर संघातर्फे पुणे महानगरपालिकेमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन (एस आय सी) कामगार राज्य विमा महामंडळ आचे उपायुक्त चंद्रकांत पाटील यांनी केले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून एडवोकेट अभय छाजेड हे उपस्थित होते.

यावेळी बोलताना पाटील म्हणाले, पुणे महानगर पालिके मधील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना एस आय सी हा कायदा लागू होतो. या सर्व कामगारांनी लाभ घेतले पाहिजेत. वैद्यकीय कारणासाठी लहान-मोठे आजार, त्याचप्रमाणे मोठी ऑपरेशन्स यासाठी कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय यांना लाभ दिले जातात. त्याचप्रमाणे इतरही लाभ कसे व कोणते मिळतात याचे विवेचन त्यांनी यावेळी केले. जर एखादा कंत्राटदार ई एस आय सी चे फायदे कर्मचाऱ्यांना देत नसेल, किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असेल, त्यावर खडक कारवाई करण्यात येईल. त्यामध्ये राष्ट्रीय मजदूर संघाने पुढाकार घ्यावा व अशा कंत्राटदारांची नावे आम्हाला कळवावे असेही सांगितले.

यावेळी राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष कामगार नेते सुनील शिंदे यांनी पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचे इतरही अनेक प्रश्न कसे सोडवावेत व संघटनेच्या माध्यमातून संघर्ष कसा उभारावा, यासंदर्भात मार्गदर्शन केले या मार्गदर्शन शिबिरात पुणे महानगरपालिकेतील विविध विभागातील कंत्राटी कामगार उपस्थित होते.

Supriya Sule News Update | Chandrakant Patil | सुप्रिया सुळेंबाबत केलेल्या वक्तव्यावरून चंद्रकांत पाटलांची दिलगिरी 

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

सुप्रिया सुळेंबाबत केलेल्या वक्तव्यावरून चंद्रकांत पाटलांची दिलगिरी

: राज्य महिला आयोगाकडे व्यक्त केली दिलगिरी

पुणे : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषेत वक्तव्य केल्यामुळे भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटलांना राज्यभरातून टीकेचा सामना करावा लागला. शिवाय राज्य महिला आयोगाने देखील पाटील यांच्याकडून खुलासा मागवला होता. यावर आता चंद्रकांत पाटलांनी आयोगाला आपला खुलासा सादर करत दिलगीरी व्यक्त केली आहे.

: महिला आयोगाला चंद्रकांत पाटील यांनी दिलेला खुलासा

आयुष्याची ४५ वर्षे सामाजिक, राजकीय जीवनात गेल्यानंतर स्वयंसिद्धा, Helpers of the Handicap, सावली, आई, संवेदना व वात्सल्य सारख्या संस्थांच्या मागे उभे राहून महिला सबलीकरणासाठी रात्रंदिवस प्रयत्न करणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या पक्षाचा प्रदेश अध्यक्ष असणारा मी, ज्या पक्षाच्या महाराष्ट्र विधानसभेत १२ महिला आमदार व देशाच्या लोकसभेत महाराष्ट्रातून ५ महिला खासदार आहेत. मला सुप्रियाताईंबद्दल व महिलांबद्दल मनात अनादर नसताना ग्रामीण म्हणीचा वापर केल्यामुळे अपमानित व्हावे
लागते यासारखे आयुष्यात दुःख नाही.
 माझ्या ओबीसी बंधू-भगिनींना राजकीय आरक्षण न मिळाल्यामुळे मी त्रागाने केलेल्या उच्चारात सुप्रियाताई किंवा समस्त माता-भगिनींचा अपमान झाला असल्यास मी दिलगिरी व्यक्त करतो.

State Women’s Commission | राज्य महिला आयोगाने मागविला चंद्रकांत पाटील यांच्याकडून खुलासा

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

राज्य महिला आयोगाने मागविला चंद्रकांत पाटील यांच्याकडून खुलासा

ओबीसी आरक्षण आंदोलनासमयी पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी खासदार  सुप्रिया सुळे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबाबत महाराष्ट्र राज्य महिला आयोगास तक्रार अर्ज प्राप्त झाले आहेत.

महिला आज स्वकर्तुत्वावर शिक्षण, व्यवसाय, समाजकारण व राजकारणासह सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत. चंद्रकांत पाटील यांनी केलेले वक्तव्य समस्थ महिला वर्गाच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचविणारे आहे. एका लोकप्रतिनिधीकडून असे वक्तव्य होणे ही खेदाची बाब आहे.
यापुढे महिलांचा सन्मान राखला जाईल याचे भान चंद्रकांत पाटील यांनी राखावे. तसेच केलेल्या वक्तव्याबाबत लेखी खुलासा राज्य महिला आयोगास सादर करण्याबाबतचे निर्देश चंद्रकांत पाटील यांना देण्यात आलेले आहेत.

Prashant Jagtap Vs Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांनी घरी दोन घास सुखाने खावे आणि मानसिक उपचार करून आराम करावे | प्रशांत जगताप 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

चंद्रकांत पाटलांनी घरी दोन घास सुखाने खावे आणि मानसिक उपचार करून आराम करावे | प्रशांत जगताप

पुणे : राज्यात महाविकास आघाडी सरकारची सत्ता आल्यापासून राज्यातील भाजप नेते सैरभैर झाले आहेत, तर या ‘सैरभैर टोळी’चे प्रमुख असलेले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे मानसिक संतुलनच बिघडलेले आहे. त्यातूनच, ते काहीही बेताल वक्तव्ये करीत सुटले आहेत. ‘ना घर का ना घाट का,’ अशी अवस्था झालेल्या आणि मानसिक स्वास्थ्य ठीक नसलेल्या व्यक्तींनी असे सार्वजनिक जीवनात वावरणे धोक्याचे आहे. त्यामुळे, त्यांनी घरी जावे. घरातील माय-माऊली स्वयंपाक करून त्यांची वाट पाहात असतील. दोन घास सुखाने खावे आणि मानसिक उपचार करून आराम करावे. असा टोला राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी लगावला आहे.

जगताप  म्हणाले, चंद्रकांत पाटील यांनी संसदरत्न खासदार व आमच्या नेत्या  सुप्रियाताई सुळे यांच्याबाबत बेताल वक्तव्य करून पुन्हा एकदा अकलेच्या दिवाळखोरीचे प्रदर्शन केले आहे. त्यांच्या वक्तव्यातून समस्त महिला वर्गाबाबत पाटील व ते ज्या मुशीत घडले आहेत, त्या मातृसंस्थेची काय मानसिकता आहे, हे दिसून आले आहे. महिला भगिनींना केवळ चूल व मूल इतक्यापुरतेच मर्यादित ठेवण्याच्या या मानसिकतेतून बाहेर येऊन पाटील यांनी सध्या महिला कोणत्या क्षेत्रात किती प्रगती करीत आहेत, हे पाहण्याची गरज आहे. महिला सबलीकरणासाठी लढणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची कन्या सुप्रियाताईंशी पंगा घेण्याचा प्रयत्न चंद्रकांत पाटील यांनी करू नये. सुप्रियाताईंना घरी बसविण्यासाठी लोकसभा निवडणुकीत त्यांनी किती जंग पछाडले आहे आणि आतापर्यंत ते कितीवेळा तोंडावर आपटले आहेत, हे महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे.

एकदा राज्यसभा आणि तीनवेळा लोकसभेत निवडून आलेल्या सुप्रियाताईंचा संसदेतील आणि राजकारणातील अनुभव काय आहे, हे महाराष्ट्रातील जनता जाणून आहे. प्रत्येक स्त्रीला कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळण्याची आणि त्याबरोबरच आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची जन्मजात देणगी मिळाली आहे. आदरणीय सुप्रियाताईही या दोन्ही जबाबदाऱ्या तितक्याच लीलया पार पाडतात, हे महाराष्ट्रातील प्रत्येकाला माहीत आहे. परंतु, चंद्रकांत पाटील यांनी सुप्रियाताईंना महिला म्हणून ‘घरी जा, स्वयंपाक करा, दिल्लीत जा नाहीतर मसणात जा,’ असे म्हणत समस्त महिला वर्गाचा जो अवमान केला आहे, महिलाशक्तीला डिवचण्याचा जो जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे, त्याचे उत्तर त्यांना मिळाल्याशिवाय राहणार नाही.

बरे, सुप्रियाताईंनी ‘मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षण मिळण्यासाठी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत जाऊन कुणाची भेट घेतली होती,’ इतका साधा प्रश्न उपस्थित केला होता. जर, भाजप नेत्यांच्या कृतीमध्ये काही काळेबेरे नव्हते, तर या प्रश्नावर सरळ उत्तर देता आले असते. परंतु, सुप्रियाताईंनी नेमके वर्मावर बोट ठेवल्याचा परिणाम पाटील यांचे मानसिक संतुलन बिघडण्यात झाला असावा, ही शक्यता नाकारता येत नाही.

महिला वर्गाचा अवमान करून पताका फडकावल्याचा आव आणणारे पाटील यांनी घरी जावे. आपल्या घरात स्वयंपाक करणाऱ्या माय – माऊलींपुढे उभे राहून आपण करून आलेला पराक्रम सांगावा. तेव्हा ती माय-माऊलीही तुम्हाला ‘मसणात जा’ बोलल्याशिवाय राहणार नाही, हे मी निश्चितपणे सांगू शकतो.

मुळात, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर आदरणीय शरद पवार साहेबांनी भाजपला घरी बसविल्याचा राग या ‘सैरभैर टोळी’कडून वारंवार कोणत्या ना कोणत्या निमित्ताने व्यक्त होताना दिसत आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकारचे मजबूत सरकार आहे, हे या ‘सैरभैर टोळी’ने समजून घेण्याची गरज आहे. आता घरी बसलाच आहात, तर स्वयंपाकही शिकून घ्या. त्यात कमीपणा काही नाही. पण, जेव्हा तुम्ही घरी स्वयंपाक करू लागाल, तेव्हाच तुम्हाला माय-माऊलींची किंमत कळेल, त्यांचे दु:ख कळेल, एक महिला काय करू शकते, हे उघड्या डोळ्यांनी पाहिल्यास पुन्हा कोणत्याही महिलेचा अनादर करण्यासाठी तुमची जीभ धजावणार नाही, यात तीळमात्र शंका नाही. असे ही जगताप म्हणाले.

BJP : उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी महापालिका का करत नाही? 

Categories
Breaking News PMC Political पुणे

उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी महापालिका का करत नाही?

: चंद्रकांत पाटील यांचा महापालिका आयुक्तांना सवाल

: पुण्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवर भाजपा प्रदेशाध्यक्ष . चंद्रकांतदादा पाटील‌ यांची आयुक्तांसोबत बैठक

पुणे : महापालिकेत समाविष्ट २३ गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय माननीय उच्च न्यायालयाने दिला आहे. पण तरीही त्याची अंमलबजावणी का होत नाही? असा प्रश्न चंद्रकांत पाटील  यांनी उपस्थित केला. त्यावर महापालिका आयुक्तांनी बांधकाम व्यावसायिकांकडून उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राचा आधार घेऊन, सध्या पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी बांधकाम व्यावसायिकांची असल्याचे नमुद केले. त्यावर आ. पाटील यांनी सध्या सदर गावांमध्ये एक दिवसाने पाणीपुरवठा होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे या भागांमध्ये पाणीपुरवठा दररोज करण्याची मागणी केली. त्यावर बैठक घेऊन निर्णय‌ घेण्याचे आयुक्तांनी मान्य केले.

पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने रद्द केलेला कोथरुड मधील बावधन येथील कचरा‌ संकलन केंद्र सुरू करण्यास भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी विरोध दर्शवत, नागरिकांनी उपस्थित केलेल्या समस्यांचे पूर्ण समाधान होत नाही; तोपर्यंत हा प्रकल्प उभारण्यात येऊ नये, अशी भूमिका आ.‌ पाटील यांनी आज मांडली.‌ तसेच नदी सुधार प्रकल्पासाठीच्या सर्व परवानग्या मिळाल्या असतानाही हा प्रकल्प का रखडला असा सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी आयुक्तांकडे उपस्थित करुन, प्रशासनाचे याकडे लक्ष वेधले.

कोथरूडसह पुण्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवर आज आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी आज आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यात प्रामुख्याने बावधनमधील कचरा प्रकल्प, बालभारती-पौंड फाटा रस्त्याचे काम कधी मार्गी लागणार, २३ गावातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न, रामनदीचा समावेश असलेला नदी सुधार प्रकल्प, शहरातील प्रस्तावित उड्डाणपूलाचे नियोजन यांसह विविध विषयांचा समावेश होता.

या बैठकीला माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपा पुणे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, माजी खासदार प्रदीपदादा रावत, सरचिटणीस दीपक पोटे, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस सुशील मेंगडे, पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, माजी नगरसेवक दिलीप वेडे-पाटील, किरण दगडे-पाटील, नगरसेविका अल्पना वर्पे, भाजपा कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, सेव्ह पुणे ट्रॉफिकचे हर्षद अभ्यंकर, कर्वे रस्ता व्यापारी संघटनेचे मंदार देसाई, नगरकर सराफ यांसह इतर मान्यवर आणि संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत रद्द करण्यात आलेला कोथरूड मधील बावधन कचरा प्रकल्प पुन्हा उभारण्यात येत आहे. या प्रकल्पास स्थानिकांचाही विरोध आहे. तसेच नगरविकास खात्याकडून विखंडनाचा अभिप्राय आलेला नसताना हा प्रकल्प उभारण्याचा अट्टाहास का? असा सवाल त्यांनी आयुक्तांना विचारला. त्यावर बावधनमधील प्रकल्प हा ट्रान्झिट स्टेशन म्हणजे तात्पुरत्या स्वरुपातील कचरा संकलन केंद्र असल्याचे स्पष्टीकरण दिले. पण रामनदीच्या शुद्धीकरणावर याचा परिणाम होणार असल्याने हा कचरा प्रकल्प उभारु नये, अशी भूमिका आ.‌पाटील यांनी मांडली. त्यावर आयुक्तांनी स्वतः प्रत्यक्ष भेट घेऊन नागरिकांनी उपस्थित केलेल्या समस्या जाणून घेऊन, त्यांवर उपाययोजना करण्याचे मान्य केले. त्यानंतर रामनदीच्या शुद्धीकरणास बाधा पोहोचू नये; तसेच नागरिकांचे पूर्ण समाधान होत नाही, तोपर्यंत हा प्रकल्प उभारण्यात येऊ नये, अशी भूमिका आ. पाटील यांनी यावेळी मांडली.

 

कोथरुड मधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या बालभारती-पौड रस्त्याचे‌ काम अद्याप का सुरू झाले नाही? असा सवाल आ. पाटील यांनी आयुक्तांसमोर उपस्थित केला. त्यावर आयुक्तांनी त्याचा विकास आराखडा लवकरच तयार करण्यात येत असल्याचे सांगितले. मात्र या प्रकल्पास काही पर्यावरणप्रेमींनी आक्षेप घेतला असल्याचे पाटील यांनीही सांगितले. त्यावर त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याचे आयुक्तांनी मान्य केले.

तसेच, कोथरूड मधून वाहणाऱ्या रामनदीच्या शुद्धीकरणासाठी त्याचा समावेश पुण्यातील नदी सुधार प्रकल्पात करण्यात आला आहे. त्यासाठी आवश्यक सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. तरीही अद्याप त्याचे काम सुरु झाला नसल्याने नाराजी व्यक्त केली. तसेच हा प्रकल्प का रखडला आहे, असा सवाल आ. पाटील यांनी आयुक्तांना विचारला. त्यावर आयुक्तांनी शासनस्तरावर धारणा स्पष्ट करण्याची सूचना केल्याचे सांगितले. ती धारणा स्पष्ट करुन कोणत्याही परिस्थितीत नदी सुधार प्रकल्प कार्यान्वित करणार असल्याची ग्वाही आयुक्तांनी आ.‌पाटील‌ यांना दिली. त्यावर आ. पाटील यांनी समाधान व्यक्त करुन, तातडीने शासकीय प्रक्रीया पूर्ण करुन नदी सुधार प्रकल्पाचे काम सुरू करण्याची सूचना केली.

दरम्यान, पुण्यातील प्रस्तावित उड्डाणपूलांबाबतही या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. यासाठी ‘सेव्ह पुणे ट्रॉफिक’चे हर्षद अभ्यंकर यांनी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी पीपीटीद्वारे सादरीकरण करुन, त्याबाबत काही सूचना प्रशासनास केल्या. त्यावर आ. पाटील यांनी पुण्यातील प्रस्तावित उड्डाणपुलाचे नियोजन करताना स्थानिक नागरिक, व्यापारी, पर्यावरणप्रेमी, तज्ज्ञ यांच्याशी चर्चा करावी, अशी सूचना केली. तसेच नळस्टॉप चौकातील उड्डाणपूलाखाली स्थानिक व्यापाऱ्यांना ‘पे ॲन्ड पार्किंग’ तत्वावर वाहन लावण्यास आयुक्तांनी या बैठकीत तत्वतः मान्यता दिली. त्याचे नियोजन तातडीने करण्याची सूचना आ.‌पाटील यांनी केली.

Traffic congestion at Nalastop Chowk : नळस्टॉप चौकातील वाहतूक कोंडी सोडवा! : पुणे मनपा, मेट्रो, वाहतूक पोलीस व अन्य अधिकाऱ्यांसह नळस्टॉप चौकाचा पहाणी दौरा

Categories
Breaking News PMC Political social पुणे

 नळस्टॉप चौकातील वाहतूक कोंडी सोडवा!

:  चंद्रकांतदादा पाटील यांच्या सूचना

: पुणे मनपा, मेट्रो, वाहतूक पोलीस व अन्य अधिकाऱ्यांसह नळस्टॉप चौकाचा पहाणी दौरा

कोणत्याही परिस्थितीत कोथरुड मतदारसंघातील नळस्टॉप चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवा, अशा सूचना भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. नव्या उड्डाणपूलामुळे नळस्टॉप चौकातील ७५ टक्के वाहतूक सुरळीत झाली असून, केवळ संध्याकाळी ६ ते ९ यावेळेत कोथरुडकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. यासाठी आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी आज नळस्टॉप चौकाचा प्रत्यक्ष पाहणी दौरा केला.

यावेळी पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपा पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, माधुरी सहस्रबुद्धे, मनपा वाहतूक नियोजन विभागाचे श्रीनिवास बोनाला, मेट्रोचे गौतम बिऱ्हाडे, मनपा पथविभागाचे अभिजीत डोंबे, वाहतूक पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, कर्वे रोड व्यापारी संघाचे ओमप्रकाश रांका, राजू भटेवरा कोथरुड भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष दुष्यंत मोहोळ व इतर नागरीक उपस्थित होते.

दीर्घकालीन उपाययोजनेत बालभारती पौंड फाटा रस्ता झाल्यावर, कोथरूडकरांची वाहतूककोंडीतून सुटका होणार आहे. हे काम वेगाने पूर्ण व्हावे, यासाठी प्रशासनाशी सतत संपर्कात आहोतच, मात्र तोपर्यंत नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये यासाठी आज सर्व बाजूने विचार करुन अनेक उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. असे आ. चंद्रकांतदादा पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले.

यात प्रामुख्याने मेट्रोचे सर्वत्र पडलेले सामान व राडारोडा तातडीने उचलून रस्ता मोकळा करणे, पदपथ सुस्थितीत करणे, शक्य तिथे रस्त्याचे रुंदीकरण करणे, तसेच बस आणि अवजड वाहने उड्डाणपुलावरुनच जातील अशी व्यवस्था करणे, वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणाऱ्या बस स्टॉपच्या जागा तातडीने बदलणे, नळस्टॉप चौकातील सिग्नलच्या वेळेचे नियोजन करणे, आदी उपाययोजना आगामी दहा दिवसांत करण्याच्या सूचना आ. पाटील यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.

Publication of work report : BJP : महापालिकेत जा आणि लोकांची कामे करा 

Categories
Breaking News PMC Political पुणे

महापालिकेत जा आणि लोकांची कामे करा 

: माजी नगरसेवकांना चंद्रकांत पाटलांची सूचना 

 

पुणे : पुणे महापालिका बरखास्तीनंतर अनेक नगरसेवक महापालिकेत गेले नाहीत. हे योग्य नाही, प्रमुख पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांनी दिवस वाटून घेऊन रोज महापालिकेत जा. नगरसेवक असताना जशी कामे केली तशीच कामे आताही करा, जनसंपर्क ठेवा. महापालिका पुन्हा जिंकण्यासाठी आपण माजी नाही तर आजी नगरसेवक आहोत हेच डोक्यात ठेवा. निवडणुका लांबणीवर पडल्या असल्या तरीही पूर्वीप्रमाणे कामे करा, अशा सूचना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.

पुणे महापालिकेत गेल्या पाच वर्षात कार्य अहवालाचे प्रकाशन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी सभागृहनेते गणेश बीडकर, दिलीप कांबळे, योगेश मुळीक, धीरज घाटे, सरस्वती शेंडगे, दीपक नागपुरे, गणेश घोष आदी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, पाच वर्षात भाजपने केलेल्या कामांची यादी पाहून अभिमानाने फुलते. पूर्वी पाणी, गटार, कचरा अशा समस्या सोडविणारा नगरसेवक होता, पण आता ही कामे करतानाच वाहतूक कोंडीचा विचार करणारा, भूसंपादनासाठी प्रयत्न करणारा, मेट्रो, समान पाणी पुरवठा योजना करणारा अशी व्यापक व्याख्या नगरसेवकांची पुण्यात झाली आहे.त्यामुळेच सर्व सर्वेक्षणात भाजपला ८०च्या खाली जागा दाखवली जात नाही. भाजपला सत्ता दिल्याने त्याचे चीज झाले जाणीव लोकांमध्ये आहे. पुण्यात महापालिकेशिवाय भाजप माहिती नाही. देशात, राज्यात काय चालले आहे याची प्रतिक्रिया नसते. किरीट सोमय्यावर यांच्यावर हल्ला झाल्यानंतर आक्रमकपणे रस्त्यावर उतरलो तर भविष्यात पुढे कोणत्या नेत्यांवर हल्ला होण्याची वेळ येणार नाही. केवळ नगरसेवक म्हणून काम करायला जन्माला आला नाहीत. तर संघटनेची लढाई लढावीच लागेल. संघटना आहे तर आपण जिवंत आहोत, अशा शब्दात पाटील यांनी संघटनेसाठीही काम करा असा सल्ला दिला.
२०२४ ला कोल्हापूर गेले‘‘कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत भाजपला ७७ हजार मिळाल्याने अनेकांची झोप उडाली आहे. बंटी पाटलांसह अनेकजण याचा अभ्यास करत आहेत. कोल्हापूरच्या निकालानंतर वृत्तपत्र, सोशल मीडिया, वृत्त वाहिन्यांवरून मी कधी हिमालयात जाणार अशी टीका केली. पण तेव्हा भाषण करणारे अनेक जण २०२४ ला आपल्या हातातून कोल्हापूर गेले, असे मानत आहेत. आपण हे केळन संघटनेच्या जोरावर करू शकलो, अशा शब्दात पाटील यांनी काँग्रेसवर टीका केली.

Jayant Patil Vs Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील म्हणाले, जयंतराव थापा मारून दिवस ढकलणे बंद करा!

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

जयंतराव थापा मारून दिवस ढकलणे बंद करा

: भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन

 

पक्षाच्या संवाद यात्रेत सरकारच्या चांगल्या कामांबद्दल किंवा पक्षाच्या विचारसरणीबद्दल बोलण्यासारखे काहीच नाही म्हणून थापा मारून आणि टिंगल टवाळी करून दिवस ढकलणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बंद करावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी केले.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवार संवाद यात्रेत कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना थापा मारण्याचा उच्चांक केला. काँग्रेस पक्षाने कधीच नाव बदलले नाही म्हणून जयंत पाटील अभिमानाने सांगतात. त्यांनी हे सांगावे की, शरद पवार यांनी १९७८ काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर निवडून येऊन जनता पार्टीच्या मदतीने मुख्यमंत्रिपद मिळवले तो काँग्रेस पक्ष खरा होता की, इंदिरा गांधी यांचा काँग्रेस पक्ष खरा होता ? शरद पवार यांचा काँग्रेस एस हा मूळ काँग्रेस पक्ष होता की, काँग्रेस आय हा मूळ पक्ष होता ? शरद पवारांनी नंतर काँग्रेसमध्ये त्यांचा पक्ष विलीन केला त्यावेळी कधीही नाव न बदलणारा मूळ काँग्रेस पक्ष कोणता होता ? १९९९ साली काँग्रेस पक्षाने शरद पवारांची हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला त्याला अधिकृत काँग्रेस म्हणायचे का ? शरद पवारांनी ज्या सोनिया गांधींना विदेशी म्हणून विरोध केला आणि नंतर त्यांच्याच नेतृत्वाखालील आघाडीत मंत्री झाले त्यांचा काँग्रेस पक्ष खरा का ? काँग्रेसमधून हकालपट्टी झालेल्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपण नेतृत्व करता आणि इंडियन नॅशनल काँग्रेस नावाचा आणखी एक काँग्रेस पक्ष आहे. नक्की कोणत्या काँग्रेसने नाव बदलले नाही म्हणून सांगता, हे सुद्धा जयंतरावांनी स्पष्ट करावे.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, थापा मारण्याचा उच्चांक करताना जयंतराव म्हणाले की, भाजपाचा जन्म होऊन ५० वर्षेही झाली नाहीत व त्याचवेळी त्यांनी सांगितले की, भाजपाने पन्नास वर्षात तीन वेळा नाव बदलले. काय बोलतो हे त्यांनाच समजत नाही. जनसंघाची स्थापना १९५१ साली म्हणजे सत्तर वर्षांपूर्वी झाली. १९७५ साली देशात आणीबाणी लागू करून पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लोकशाहीची हत्या केली त्यावेळी जनसंघाने लोकशाहीच्या रक्षणासाठी लढा दिला व त्याचाच एक भाग म्हणून आपला पक्ष जनता पक्षात विलीन केला. नंतर जनसंघाचे नेते बाहेर पडल्यामुळे १९८० साली भाजपाची स्थापना झाली. आणीबाणीच्या विरोधात लढा देताना भाजपाने त्यावेळची परिस्थिती म्हणून जे निर्णय घेतले त्यामुळे पक्षाच्या नावात बदल झाला. पण आम्ही आमच्या निष्ठा बदलल्या नाहीत आणि हिंदुत्वाचा विचारही सोडला नाही.

त्यांनी सांगितले की, देशातील हिंदुत्वाला पाच हजार वर्षांची परंपरा आहे आणि त्या परंपरेचा पाईक होण्याचा भाजपाला अभिमान आहे. पुण्याच्या कार्यक्रमात मी हेच सांगितले. पण विषय समजून न घेता हिंदुत्वाची कुचेष्टा करणाऱ्यांनी काहीही टिंगल केली तरी आम्ही ही पाच हजार वर्षांची परंपरा सोडणार नाही.

By-election of Kolhapur : भाजपाची मते ४१ हजारांवरून ७८ हजारांपर्यंत वाढली ; मात्र जनतेचा कौल मान्य : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

भाजपाची मते ४१ हजारांवरून  ७८ हजारांपर्यंत वाढली

कोल्हापूर उत्तर मतदारसंघात जनतेचा कौल मान्य

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीची मते ४१ हजारांवरून वाढून ७८ हजार झाली असून जनाधार वाढविण्यासाठी अधिक काय करावे याचा विचार पक्ष करेल, असे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, काँग्रेसच्या विजयी उमेदवार जयश्री जाधव यांचे आपण अभिनंदन करतो. सत्ताधारी महाविकास आघाडीचे तीन पक्ष विरुद्ध एकटा भाजपा अशी अटीतटीची निवडणूक झाली. परंतु, काँग्रेसच्या उमेदवाराचे मताधिक्य जास्त नाही. त्यामुळे कोणी हुरळून जाऊ नये. या निवडणुकीत भाजपाची मते वाढली आहेत आणि निवडणुकीच्या निमित्ताने गल्लोगल्ली चांगले कार्यकर्ते उभे राहिले आहेत.

त्यांनी सांगितले की, राज्यात भाजपाचे सरकार नाही. भाजपाच्या विरोधात दडपशाही, दंडुकेशाही, पैसा व जातीच्या कार्डचा वापर करण्यात आला. भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांच्या अंगावर धाऊन जाण्यापर्यंत दडपशाही झाली. तथापि, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही दडपशाहीला न घाबरता काम केले. भाजपाची मते ४१ हजारांवरून ७८ हजारांपर्यंत वाढली. ही फार मोठी प्रगती आहे.

ते म्हणाले की, भाजपाने ही निवडणूक केवळ विकासाच्या मुद्द्यावर लढली. हिंदुत्व हा काही भाजपाचा निवडणुकीचा अथवा राजकारणाचा मुद्दा नाही तर हिंदुत्व हा भाजपाचा श्वास आहे. आम्ही आमची हिंदुत्वाची भूमिका कधीच लपवली नाही.

Mohan Joshi Vs Chandrakant patil : चंद्रकांतदादा शब्द पाळा…राजकारणातून संन्यास घ्या : चंद्रकांत पाटलांना पुण्यातून कॉंग्रेसचा टोला

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

 

चंद्रकांतदादा शब्द पाळा…राजकारणातून संन्यास घ्या

-माजी आमदार मोहन जोशी

पुणे – विधानसभेच्या पोटनिवडणुकीत कोल्हापूरच्या मतदारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे नेतृत्व नाकारले आहे. स्वगृही भाजपला निवडून आणण्यात पाटील यांना अपयश आले आहे, आता त्यांनी राजकीय संन्यास घ्यावा, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँगेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी व्यक्त केली आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला तर संन्यास घेऊन हिमालयात निघून जाईन, अशी गर्जना चंद्रकांत पाटील यांनी प्रचारात केली होती. कोल्हापूरवासीयांनी महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून देऊन भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला आहे. आता चंद्रकांतदादा शब्द पाळा… राजकीय संन्यास घ्या, असे मोहन जोशी यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. कोल्हापूरमध्ये पराभव होईल अशा भीतीने पाटील १९ साली पुण्यात कोथरुड मतदारसंघात आले, त्यांची लादलेली उमेदवारी भाजपच्याच मतदारांना मान्य नव्हती अनेक खटपटी लटपटी करूनही त्यांना निसटता विजय मिळाला होता. पदवीधर मतदारसंघही पाटील यांना राखता आला नाही आणि खुद्द त्यांच्या कोल्हापूरची जागाही गमवावी लागली आहे, या पोटनिवडणुकीतील प्रचारासाठी कोथरुड मतदारसंघ वाऱ्यावर सोडून पाटील कोल्हापूरात मुक्कामाला होते, एवढेच नाही तर, त्यांनी पुण्यातील भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांची फौज कोल्हापुरात नेली. प्रचाराचा धडाका उडवायचा प्रयत्न केला. कोल्हापुरातील मतदारांनी चंद्रकांत पाटील यांच्या कोणत्याच प्रयत्नांना दाद दिली नाही. उलट मतदारांनी त्यांनाच अस्मान दाखविले, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

निवडणुकीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न भाजपने केला, मतदारांनी या प्रचारालाही दाद दिलेली नाही. महाविकास आघाडीत फूट पाडण्याचा भाजपचा प्रयत्नही फसला, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले असून कोल्हापूरमधील महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई जाधव आणि विजयाचे शिल्पकार, काँग्रेसचे नेते नामदार सतेज पाटील यांचे अभिनंदन केले आहे.