Analysis | PMC Election | भाजपला कसली भीती सतावतेय? 

Categories
Breaking News PMC Political पुणे

भाजपला कसली भीती सतावतेय?

पुणे : महापालिका निवडणुकीच्या हालचालींना चांगलाच वेग आला आहे. त्यामुळे आता शहरातील सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. दरम्यान आता या निवडणुकीत कोण बाजी मारणार? भाजप पुन्हा एकदा 100 के पार करणार का? का महाविकास आघाडीचाच जोर चालणार? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र 100 नगरसेवक घेऊन सत्तेत बसलेल्या भाजपाला मात्र आता पुन्हा तेवढ्याच जोमाने सत्ता येईल, असा विश्वास राहिलेला नाही.
भाजपाला हा आत्मविश्वास नसण्याला देखील तशीच कारणे आहेत. कारण भाजपला पूर्ण बहुमत असल्याने शहराचा संतुलित विकास करण्याची संधी होती. त्यानुसार सुरुवातीला भाजपने पुणेकरांना तशी स्वप्ने दाखवली देखील. मात्र त्या स्वप्नाचा पाठपुरावा भाजपाला करता आला नाही. बऱ्याच मोठ्या प्रकल्पाची स्वप्ने दाखवली गेली होती. शिवाय शहराच्या हिताच्या दृष्टीने काही महत्वाचे प्रकल्प आम्ही पूर्ण करणारच, असा विश्वास देखील भाजपने दिला होता. पुणेकरांना देखील हा विश्वास खरा वाटला. मात्र ते प्रकल्प पूर्ण होऊच शकले नाहीत. त्यामध्ये समान पाणीपुरवठा योजना, नदी सुधार योजना, मेट्रो प्रकल्प, उड्डाणपूल, मोठे रस्ते, अशा प्रकल्पांचा समावेश आहे. यातील काही प्रकल्प सुरु होऊन देखील त्याचा फारसा फायदा झालेला दिसला नाही.
शिवाय भाजपने बाहेरून आलेल्या नगरसेवकांना आपले कधी मानलेच नाही. त्यामुळे त्यांनाही भाजप कधी आपलासा वाटला नाही. त्यामुळे पालिकेत काही लोकांचीच मक्तेदारी होऊन बसली. अर्थातच तिथेच विकासाला खीळ बसण्यास सुरुवात झाली. 100 नगरसेवक असताना देखील फक्त तोकडेच लोक प्रतिनिधित्व करताना दिसत होते. ही गोष्ट पुणेकरांच्या देखील ध्यानात यायला वेळ लागला नाही. सत्तेच्या उत्तरार्धात पदाधिकाऱ्यांचे देखील एकमेकांशी पटत नव्हते. यातच कहर म्हणजे निसर्गाने किंवा नशिबाने देखील भाजपाला साथ दिली नाही. कोरोनाचा कहर चांगला दोन वर्ष चालला. याही काळात थोड्याच लोकांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. शिवाय प्रशासनातील प्रमुखांनी देखील भाजपाला फार काही करण्याची संधी दिली नाही. त्यामुळे पूर्ण 5 वर्ष मिळून फार उपयोग झाला नाही.
भाजपमध्ये बरेचसे लोक हे पालिकेत नवीन होते. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी ही गोष्ट हेरली होती. त्यामुळे कामे करताना भाजपच्या नगरसेवकांची फारच दमछाक होऊ लागली. इकडे विरोधी पक्षातील कसलेले नगरसेवक मात्र झटक्यासरशी काम करून घेत होते. भाजपच्या नगरसेवकांना जेव्हा तांत्रिक माहिती समजू लागली, तेव्हा मात्र कोरोना आला आणि कोरोना संपतो तोच कालावधी संपण्याची वेळ आली. त्यामुळे नगरसेवकांची स्वप्ने अधुरीच राहिली. पर्यायाने पुणेकरांचीच स्वप्ने पूर्ण होऊ शकली नाहीत. हळूहळू भाजपच्या ही लक्षात आले कि आपण फार मजल मारू शकलो नाही. त्यामुळे मग भीती सतावू लागली, पुन्हा येऊ का नाही? मग भावनेच्या भरात निर्णय घ्यावे लागले. मग काही कामाचे करार संपललेले नसतानाही नियम डावलत आपल्याच लोकांसाठी मुदत वाढवून देण्यासाठी नवीन करार केले जाऊ लागले. मात्र ही गोष्ट लपून राहिली नाही. मुख्य सभेतही नंतर बहुमताच्या जोरावर निर्णय घेतले गेले. ज्यात पदाधिकाऱ्यांचेच हित सामावले होते.
अशा सगळ्याच गोष्टी सगळ्यांच्याच ध्यानात आल्या आहेत. त्यामुळेच आता भाजपलाच 100 लोक निवडून येण्याचा आत्मविश्वास राहिलेला नाही. बाहेरून आलेले नगरसेवकांनी खरे तर निघून जाण्याची मागेच तयारी केली होती. आता ते पुढील काळात घडू शकेल. आपल्याकडून फार कामे झाली नसल्याची कबुली खुद्द त्यांचेच लोक देताहेत.
आता भाजपसमोर निवडणुकीत बहुमताने निवडून येण्याचे मोठे आव्हान आहे. कारण गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाला खुलं आव्हान देतोय. अशी सगळे आव्हाने पार करून भाजपला बहुमत मिळवणे नक्कीच सोपे नाही. भाजप हे आव्हान कसे पेलणार, यासाठी मात्र खूप प्रयत्नांची आवश्यकता आहे.

Amol Balwadkar Vs Baburao Chandere | बाबूराव चांदेरेंच्या भावनेचा विचार करून राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी द्यावी  : अमोल बालवडकर यांची प्रतिक्रिया 

Categories
Breaking News Political पुणे

बाबूराव चांदेरेंच्या भावनेचा विचार करून राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी द्यावी

: अमोल बालवडकर यांची प्रतिक्रिया

पुणे : बाणेर बालेवाडी परिसरात भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यातील कलगीतुरा नेहमीच पाहायला मिळतो. महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर झाल्याने निवडणुकीला वेग आला आहे. त्यामुळे सगळे कंबर कसून कामाला लागले आहेत. अशातच औंध बालेवाडी प्रभागावर sc चे आरक्षण पडले आहे. राष्ट्रवादीकडून बाबूराव चांदेरे यांनी उमेदवारी मागितली आहे. यावर भाजपचे अमोल बालवडकर यांनी उपहासात्मक टीका केली आहे. बालवडकर यांनी राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्ष्याना विनंती केली आहे कि, चांदेरे यांच्या भावनेचा आदर करून त्यांना प्रभागातून उमेदवारी द्यावी.
बालवडकर म्हणाले, आधी  बाणेर – बालेवाडी प्रभाग स्वतःच्या राजकिय सुरक्षिततेसाठी चुकिच्या पद्धतीने तोडायचा ! परत वर म्हणायचं ‘ मी बालेवाडी -औंध प्रभागातुन इच्छुक आहे. वाह !
एव्हढा कॅान्फिडन्स आणता तरी कुठुन? माझी शहर अध्यक्ष प्रशांतजी जगताप यांना विनंती आहे कि आपण माजी नगरसेवक चांदेरे यांच्या भावनेचा विचार करावा व त्यांना बालेवाडी – औंध मधुन उमेदवारीवर द्यावी.
यावर चांदेरे काय प्रत्युत्तर देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
आगामी पुणे महानगरपालिका निवडणूकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाने जोरदार मोर्चे बांधणी केली आहे. याच अनुषंगाने  पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि बाबुराव चांदेरे साहेबांच्या उपस्थिती मध्ये प्रभाग क्रमांक १२ औंध-बाणेर-बालेवाडी प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची बैठक पार पडली.  यावेळी प्रभाग क्रमांक १२ मधून माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांनी देखील आपण उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे भावना शहराध्यक्ष  प्रशांतदादा जगताप यांना बोलून दाखवली.

BJP Vs NCP | राष्ट्रवादीचा निषेध करण्यासाठी शहर भाजपच्या वतीने आंदोलन

Categories
Breaking News Political पुणे

शहरातील राष्ट्रवादीची गुंडगिरी संपवणार

भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक

पुणे शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते गुंडगिरी करीत असून, त्यांच्यावर पोलिसांचा आणि सरकारचा अंकुश राहिलेला नाही. शहराची संस्कृती बुडविण्याचे पाप करणार्या राष्ट्रवादीची गुंडगिरी संपवणार असल्याचा इशारा भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिला.

राष्ट्रवादीच्या गुंडगिरीचा निषेध करण्यासाठी शहर भाजपच्या वतीने आज अलका टॉकिज चौकात मुळीक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. प्रदेश चिटणीस धीरज घाटे, शहर सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दत्ता खाडे, दीपक नागपुरे, दीपक पोटे, संदीप लोणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुळीक म्हणाले, सोमवारी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात घुसून त्यांच्यावर हल्ला करण्याचा नियोजनबद्ध कट राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आखला होता. त्याप्रमाणे सेनापती बापट रस्त्यावरील चौकात आंदोलन करणारे हॉटेल मेरियेटच्या प्रवेशद्वारातून आत पोहोचले. त्यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या सुरक्षा रक्षकांच्या गाडीवर आक्रमण केले. बालगंधर्व रंगमंदिरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अंडी आणि शाईच्या बाटल्या घेऊन आले होते. या गुंडांवर कोणतेही गंभीर गुन्हे दाखल झालेले नाहीत. उलट भाजपच्या कार्यकर्त्यांवर विनयभंगासारखे गंभी गुन्हे दाखल करण्यात आले. हे गुन्हे तातडीने मागे घ्यावेत आणि राष्ट्रवादीच्या गुंडांवर कडक कारवाई करावी अशी मागणी आम्ही करीत आहोत.

मुळीक पुढे म्हणाले, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपच्या पदाधिकार्यांवर हल्ले करीत आहेत. नागरिकांना दमदाटी करीत आहेत. ठिकठिकाणी हप्ते वसुल करीत आहेत. त्यांच्या विरोधात जे आवाज उठवतील त्यांची पोलिसांच्या मदतीने गंभीर गुन्हे दाखल केले जात आहे. अशा गळचेपीला भाजपचे कार्यकर्ते घाबरत आहेत. शंभर गुन्हे दाखल झाले तरी आम्ही घाबरत नाही. गुंडगिरी विरोधातील आमचा लढा सुरूच राहील.

MVA Vs BJP | Pune | महाविकास आघाडीच्या वतीने भाजपच्या विरोधात मूक आंदोलन 

Categories
Breaking News Political पुणे

महाविकास आघाडीच्या वतीने भाजपच्या विरोधात मूक आंदोलन

दोन दिवसांपूर्वी बालगंधर्व येथे पुणे भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला पदाधिकाऱ्यांना झालेल्या मारहाणीची  घटनेच्या निषेधार्थ पुण्यातील सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने झाशीच्या राणीच्या पुतळ्यासमोर मूक निषेध आंदोलन घेण्यात आले.

महाविकास आघाडीच्या वतीने सांगण्यात आले कि,  सांस्कृतिक व शैक्षणिक राजधानी समजल्या जाणार्‍या पुणे शहरात राजकीय पक्ष व राजकीय नेते यांची देखील एक आदर्श संस्कृती आहे. गेल्या अनेक वर्षात राज्यासह देशातील इतर शहरांमध्ये राजकीय पक्षांमध्ये अनेक चुकीच्या घटना घडल्या परंतु पुणे शहरातील राजकीय कार्यकर्त्यांनी एक आदर्श आचार संहिता जपत कितीही टोकाचे आंदोलन असले तरी कधी कुठल्या महिला भगिनीवर हात उचलल्यापर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाची मजल आजपर्यंत गेली नाही. परंतु दोन दिवसांपूर्वी बालगंधर्व येथे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमांमध्ये आपले निवेदन देण्यासाठी गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला भगिनींना पुणे भाजपच्या चार ते पाच कार्यकर्त्यांनी अक्षरशः जोर-जोरात फटके मारले त्यांचा पदर ओढण्यापर्यंत या कार्यकर्त्यांची मजल गेली. ही घटना अतिशय दुर्दैवी असून पुण्याच्या राजकीय संस्कृतीला काळिमा फासणारी आहे. राजकारणात राजकीय मतभेद असू शकतात विचारसरणी मध्ये भिन्नता असू शकते. परंतु विचारांची लढाई ही विचारांनीच लढली गेली पाहिजे,त्या लढाईला कुठेही गालबोट लागता कामा नये. असे असताना काल घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. पुण्याची हीच राजकीय संस्कृती टिकवण्यासाठी पुणे शहरातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी एकत्र येत आज निषेध आंदोलन करण्यात आले. सुमारे एक तास चाललेल्या या निषेध आंदोलनात सर्वपक्षीय नेत्यांनी महात्मा गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत काळया रंगाच्या फिती लावत सुमारे एक तास शांतपणे बसून या घटनेचा निषेध व्यक्त केला.

यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष  प्रशांत जगताप म्हणाले की, “कार्यकर्त्यांनी कुठल्याही आंदोलनात कसे वागावे याबाबतची आचारसंहिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ठरवून दिली असून कुठल्याही आंदोलनात वैचारिक मतभेद असले तरी विचारांची लढाई विचारानेच लढली गेली पाहिजे.प्रत्येक आंदोलन हे आदर्श आंदोलन झाले पाहिजेत यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असतो. आम्हाला तशी शिकवण आम्हाला आदरणीय पवार साहेबांनी घालून दिलेली आहे. असे असताना आमच्या महिला भगिनींना झालेली मारहाण अत्यंत निषेधार्ह असून या घटनेचा मी तीव्र निषेध करतो. त्या आरोपींवर परवा गुन्हा दाखल झाला असून पोलीस प्रशासनास विनंती आहे की, सदर आरोपींवर कठोरात कठोर कार्यवाही व्हावी , या कारवाईमुळे सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना एक संदेश दिला जाईल की पुन्हा कोणीही अशा प्रकारची गैरवर्तन करण्याची कोणाची हिंमत होणार नाही. परवा ज्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून अशा प्रकारचे गैरवर्तन झाले त्या भाजपच्या देवेंद्र फडणवीस ,चंद्रकांत पाटील यांनी साधी दिलगिरी देखील व्यक्त केली नाही.  याउलट यापुढील काळात यापेक्षा उत्तमप्रकारे प्रत्युत्तर काढण्याची भाषा करत असतील तर ते एक प्रकारे महिलांना झालेल्या मारहाणीच्या घटनेची पाठराखण करण्यासारखेच आहे. राज्याचे मुख्यमंत्री राहिलेल्या फडणविसांनी, भाजप सारख्या पार्टी विथ डिफरन्सचा नारा पिटनाऱ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अशी भाषा करणे खरोखरच अशोभनीय आहे. या गोष्टीचा देखील आम्ही या मूक आंदोलनात निषेध व्यक्त करतो”.

या आंदोलनात प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप अंकुशअण्णा काकडे, वैशालीताई नागवडे, काँग्रेसचे रमेश दादा बागवे, मोहन जोशी, संगीताताई तिवारी, शिवसेनेचे शहरप्रमुख गजानन थरकुडे,संजय मोरे, आम आदमी पार्टीचे मनोज माने, बाबुराव चांदेरे,बाळासाहेब बोडके,प्रदीप देशमुख,मृणालीनीताई वाणी, सदानंद शेट्टी,आप्पा रेणूसे,उदय महाले,किशोर कांबळे,सुषमा सातपुते,विक्रम जाधव,महेश हांडे,दयानंद इरकल,दिपक कामठे, निलेश वरे आदींसह मोठ्या अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Amit Shah : Book : ‘अमित शाह आणि भाजपची वाटचाल’ पुस्तकाचे सोमवारी प्रकाशन

Categories
Breaking News cultural Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र

‘अमित शाह आणि भाजपची वाटचाल’ पुस्तकाचे स्मृती इराणी यांच्या हस्ते सोमवारी प्रकाशन

पुणे : ‘अमित शाह आणि भाजपची वाटचाल’ या पुस्तकाचे केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते येत्या सोमवारी (१६ मे) सायंकाळी साडेपाच वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे शहर भाजपच्या वतीने प्रकाशन करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी कळविली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, खासदार प्रकाश जावडेकर, खासदार गिरीश बापट यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. पुस्तकाचे मूळ लेखक शिवानंद द्विवेदी, मराठी अनुवादक डॉ. ज्योत्स्ना कोल्हटकर आणि प्राची जांभेकर उपस्थित राहणार आहेत.

Congress Vs BJP : भाजप मिस कॉलने करोडो सभासद केले अशी घोषणा करतो  : कॉंग्रेसचा भाजपला टोला

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

भाजप मिस कॉलने करोडो सभासद केले अशी घोषणा करतो

: कॉंग्रेसचा भाजपला टोला

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार संघटनात्मक निवडणुकीच्या प्रक्रिया चालू आहे. पुण्याचे निवडणुक निर्णय अधिकारी दौलत राम नायक यांच्या उपस्थितीत आज काँग्रेस भवन येथे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली.

     आपल्या प्रास्ताविकपर भाषणात शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार पुणे शहरामध्ये संघटनात्मक निवडणुका घेण्यात येणार आहे. त्याच्या तयारीसाठी आज दौलत राम नायक यांच्या उपस्थितीत ही बैठक बोलविण्यात आली आहे. बुथ पातळीवरून शहर पातळीपर्यंत टप्प्या टप्प्याने निवडणुका घेण्यात येणार आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण संघनात्मक निवडणुक व्‍यवस्थित पार पाडू.’’

     मुख्य निवडणूक अधिकारी दौलत राम नायक म्हणाले की, ‘‘अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी व काँग्रेस कार्यकारिणीच्या आदेशानुसार देशात काँग्रेस पक्षाचे संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. संघटनात्मक निवडणुका पारदर्शक करण्यासाठी राहुल गांधी यांनी यावेळी डिजीटल सभासद नोंदणीची प्रक्रिया राबविली. या डिजीटल सभासद नोंदणीच्या प्रक्रियेमध्ये कार्यकर्त्यांनी बुथ पातळीवर सभासद नोंदणी केली आहे. बुथ पातळीवरची निवडणुक २८ मे पर्यंत आपल्याला पूर्ण करायची आहे. त्यानंतर ब्लॉक व शहर पातळीवरच्या निवडणुका होणार. ज्यांनी संघटनेसाठी काम केलेले आहे त्यांना संघटनेमध्ये स्थान देण्यात येणार आहे. १० जून पर्यंत शहर काँग्रेची निवडणुकीची सर्व प्रक्रिया पूर्ण करावी. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदाची निवडणुक ऑगस्ट महिन्यामध्ये घेण्यात येणार आहे.’’

     यानंतर माजी आमदार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी म्हणाले की, ‘‘काँग्रेस पक्षाची संघटनात्मक निवडणुक मिस कॉलने करता येत नाही. भारतीय जनता पक्ष मिस कॉलने करोडो सभासद केले अशी घोषणा करतात. वास्तविक पाहता मिस कॉलद्वारे केलेली  निवडणुक प्रक्रिया पारदर्श नसते. काँग्रेस एकमेव पक्ष आहे की ज्याची निवडणुक प्रक्रिया बुथ पातळीवरून अखिल भारतीय पातळीपर्यंत पारदर्शक पध्दतीने राबविली जाते. मला खात्री आहे की, आपणा सर्वांच्या सहकार्याने आपण संघटनात्मक निवडणूक यशस्वीपणे पार पाडू.’’

     यावेळी माजी आमदार माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड यांची भाषणे झाली.

      यावेळी महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस अरविंद शिंदे, कमल व्‍यवहारे, पुजा आनंद, गोपाळ तिवारी, रमेश अय्यर, लता राजगुरू, रविंद्र धंगेकर, अजित दरेकर, रफिक शेख, राजेंद्र शिरसाट, मेहबुब नदाफ, प्रविण करपे, सतिश पवार, रमेश सोनकांबळे, विजय खळदकर, सचिन आडेकर, राजेंद्र भुतडा, सुनील घाडगे, शोएब इनामदार, प्रदीप परदेशी, साहिल केदारी, शिलार रतनगिरी, राहुल तायडे, शानी नौशाद, स्वाती शिंदे, प्रकाश पवार, सुरेश कांबळे, रजनी त्रिभुवन, अंजली सोलापूरे, गीता तारू, पपिता सोनावणे, शारदा वीर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Congress Vs BJP : भाजप शिष्टमंडळाची भेट निव्वळ स्टंटबाजी : भाजपच्या ५ वर्षाच्या कारभारात पुणे गेले ‘ खड्डयात ‘

Categories
PMC Political पुणे

भाजपच्या ५ वर्षाच्या कारभारात पुणे गेले ‘ खड्डयात ‘

भाजप शिष्टमंडळाची भेट निव्वळ स्टंटबाजी

– माजी आमदार मोहन जोशी

पुणे : भारतीय जनता पक्षाच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात महापालिकेचा कारभार ढासळला आणि जाता जाता रस्ते खोदाई करून भाजपने पुणे शहर अक्षरशः खड्डयात घातले, अशी खरमरीत टीका महाराष्ट् प्रदेश काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी केली आहे .

गेले वर्ष, सव्वा वर्ष झाली शहराच्या मध्यवस्तीत रस्ता खोदाईची कामे चालू आहेत. या कामांमुळे वाहतूक विस्कळीत झाली असून रहिवासी आणि दुकानदार वैतागले आहेत. रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने व्हावीत, अशा मागणीचे निवेदन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी मोहन जोशी यांनी आज ( गुरुवारी ) दिले.

नवीन जलवाहिनी टाकणे, ड्रेनेज लाईन टाकणे अशा विकास कामांना काँग्रेस पक्षाचा विरोध नाही. परन्तु महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपने पाच वर्ष ठोस कामे केली नाहीत आणि निवडणुका जवळ येताच घाईघाईने काम सुरू केली. त्यामुळे रस्ते खोदले गेले पण नियोजन नसल्याने कामे लांबत गेली, खोदाईनंतर रस्त्यांची डागडुजी अशास्त्रीय आणि निकृष्ट पद्धतीने केली जात आहे. काही ठिकाणी अर्धा रस्ता डांबरी आणि अर्धा काँक्रीटचा अशी अवस्था झाली आहे. सततच्या खोदकामामुळे वातावरणात धूळ पसरून रहिवासी, दुकानदार यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवाय वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे, असे मोहन जोशी यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

महापालिकेच्या कामांबद्दल तक्रार करणारे निवेदन भाजपच्या शिष्टमंडळाने आयुक्तांना नुकतेच दिले. हा प्रकार निव्वळ स्टंटबाजीचा आहे. दि. १५मार्च २०२२पर्यंत भाजपची सत्ता होती. त्या ५ वर्षाच्या कार्यकाळात उदासिनता दाखविली आणि आता सत्ता गेल्यावर विकासकामे लवकर व्हावीत याची आठवण भाजपला झाली, हा ढोंगीपणा पुणेकरांच्या लक्षात आला आहे. मुळा मुठा नदी सुधारणा, समान पाणी पुरवठा, रस्ते दुरुस्ती अशा कोणत्याच मोठ्या प्रकल्पातही भाजपला कार्यक्षम दाखविता आलेली नाही, असा आरोप मोहन जोशी यांनी केला आहे.

Pune BJP : Jagdish Mulik : निवडणुका कधीही झाल्या तरी भाजप निवडणुकीसाठी सज्ज

Categories
Breaking News PMC Political पुणे

निवडणुका कधीही झाल्या तरी भाजप निवडणुकीसाठी सज्ज

: शहर अध्यक्ष जगदीश मुळीक

निवडणुका कधीही झाल्या तरी भाजप निवडणुकीसाठी सज्ज आहे. पुणे महापालिकेत भाजपचे शंभरहून अधिक नगरसेवक निवडून येतील असा विश्वास शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी व्यक्त केला.

मुळीक म्हणाले, गेल्या पाच वर्षांत महापालिकेच्या माध्यमांतून केलेली विकासकामे, पक्षाने कोरोना काळात केलेले सेवा कार्य, बूथ स्तरापर्यंतची भक्कम संघटनात्मक यंत्रणा आणि पुणेकरांचा विश्वास या जोरावर भाजपची महापालिकेत पुन्हा सत्ता येईल, असा विश्वास वाटतो.

मुळीक पुढे म्हणाले, ओबीसींच्या आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार हे आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडी सरकारला ट्रिपल टेस्ट पूर्ण करून हे आरक्षण पुन्हा लागू करणे शक्य होते. परंतु गेल्या दोन वर्षांत एंपिरिकल डेटा गोळा करून तिहेरी चाचणी पूर्ण करता आली असती. न्यायालयात ओबीसींची बाजू मांडण्यात महाविकास आघाडी अपयशी ठरली. महाविकास आघाडी सरकारच्या राजकीय उदासिनतेमुळे ओबीसींना राजकीय आरक्षण गमवावे लागले आहे. हा या समाजावर मोठा अन्याय झाला आहे.

Property Tax Bills : वाढीव मिळकतकर बिलांसाठी कायदेशीर सल्ला घेणार : भाजपच्या शिष्टमंडळाला महापालिका आयुक्तांचे आश्वासन 

Categories
Breaking News PMC social पुणे

वाढीव मिळकतकर बिलांसाठी कायदेशीर सल्ला घेणार

: भाजपच्या शिष्टमंडळाला महापालिका आयुक्तांचे आश्वासन

पुणेकरांना मिळकतकराची बिले ४० टक्के वाढील आकारण्यात आली आहेत. त्यामुळे मिळकतकर भरण्याची इच्छा असूनही वाढीव बिलांमुळे तो भरला जात नाही. याबाबत पुणेकरांच्या भावना तीव्र असल्याचे भाजपच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले असता याबाबत कायदेशीर सल्ला घेण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. ते म्हणाले, मिळकतकरात मुख्य सभेने मंजूर केलेल्या ठरावानुसार ४० सूट दिली जाते. परंतु २०१२ मध्ये लोकलेखा समितीने कायदेशीर आधार नसल्याने अशा प्रकारची सूट देता येणार नाही असे सांगितले. याबाबत मुख्य सभेने वारंवार ठराव करून सुट दिली. राज्य सरकारने त्यासाठी मंजुरी दिली. आता प्रकरण उच्च न्यायालयात आहे. या संदर्भात पुणेकरांना दिलासा देण्यासाठी कायदेशीर सल्ला घेण्यात येईल.

 

तसेच पावसाळ्या पूर्वीची कामे १५ जून पूर्वी करण्याचे आश्वासन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आज शहर भाजपच्या शिष्टमंडळाला दिले.

शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली संघटन सरचिटणीस राजेश पांडे, माजी सभागृह नेते गणेश बिडकर, माजी आमदार योगेश टिळेकर, बापूसाहेब पठारे, सरचिटणीस गणेश घोष, दत्ता खाडे, राजेश येनपुरे, दीपक नागपुरे, दीपक पोटे, संदीप लोणकर, माजी नगरसेवक योगेश मुळीक, सुशील मेंगडे, धनंजय जाधव, संदीप खर्डेकर, तुषार पाटील, शशिकांत कुलकर्णी यांचा शिष्टमंडळात समावेश होता.

मुळीक म्हणाले, ‘पावसाळी गटारे आणि नाल्यांच्या साफसफार्इची कामे अपेक्षित वेगाने सुरू नाहीत. पाणी साठून पुरस्थिती निर्माण होणार्या ३२८ स्पॉटवर उपाययोजना झालेल्या नाहीत. रस्त्याची कामे झाल्यानंतर ड्रेनेजची झाकणे समपातळीवर आली नसल्याने, अपघात होत आहेत. धोकादायक वाडे आणि इमारतींबद्दल सुस्पष्ट धोरण नाही. सध्या नदीमध्ये जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढल्याने डासांचा त्रास होत आहे. समाविष्ट गावांतील पाणीपुरवठ्याचा प्रश्न, शहराच्या विविध भागांमध्ये कमी दाबाने होत असलेल्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त आहेत आदी बाबींकडे आयुक्तांचे लक्ष वेधले.’

कुमार म्हणाले, ‘पावसाळी गटारे आणि नाल्यांच्या साफसफाईसाठी आवश्यक असलेली निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, १५ जूनपूर्वी ही कामे पूर्ण केली जाणार आहेत. आंबील ओढ्यातील सुरक्षिततेची कामे अंतिम टप्प्यात आहेत. शहरातील मॅनहोल समपातळीत आणण्याची कामे ३० मे पर्यंत पूर्ण केली जातील. पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी विविध ठिकाणी उपाययोजना सुरू आहेत. धोकादायक वाडे आणि इमारतींबाबत शहर अभियंतांच्या नेतृत्वाखालील पथक योग्य त्या उपाययोजना करीत आहेत. गेल्या वर्षी दररोज १३०० एमएलडी पाणी उचलले जायचे. पाण्याचा वापर वाढला आहे. आता दररोज १६०० एमएलडी पाणी लागते. समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत टाक्या उभारण्याची कामे सुरू आहेत. या टाक्यांच्या चाचण्या सुरू आहेत. त्या पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल.

 

 

Publication of work report : BJP : महापालिकेत जा आणि लोकांची कामे करा 

Categories
Breaking News PMC Political पुणे

महापालिकेत जा आणि लोकांची कामे करा 

: माजी नगरसेवकांना चंद्रकांत पाटलांची सूचना 

 

पुणे : पुणे महापालिका बरखास्तीनंतर अनेक नगरसेवक महापालिकेत गेले नाहीत. हे योग्य नाही, प्रमुख पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांनी दिवस वाटून घेऊन रोज महापालिकेत जा. नगरसेवक असताना जशी कामे केली तशीच कामे आताही करा, जनसंपर्क ठेवा. महापालिका पुन्हा जिंकण्यासाठी आपण माजी नाही तर आजी नगरसेवक आहोत हेच डोक्यात ठेवा. निवडणुका लांबणीवर पडल्या असल्या तरीही पूर्वीप्रमाणे कामे करा, अशा सूचना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.

पुणे महापालिकेत गेल्या पाच वर्षात कार्य अहवालाचे प्रकाशन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी सभागृहनेते गणेश बीडकर, दिलीप कांबळे, योगेश मुळीक, धीरज घाटे, सरस्वती शेंडगे, दीपक नागपुरे, गणेश घोष आदी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, पाच वर्षात भाजपने केलेल्या कामांची यादी पाहून अभिमानाने फुलते. पूर्वी पाणी, गटार, कचरा अशा समस्या सोडविणारा नगरसेवक होता, पण आता ही कामे करतानाच वाहतूक कोंडीचा विचार करणारा, भूसंपादनासाठी प्रयत्न करणारा, मेट्रो, समान पाणी पुरवठा योजना करणारा अशी व्यापक व्याख्या नगरसेवकांची पुण्यात झाली आहे.त्यामुळेच सर्व सर्वेक्षणात भाजपला ८०च्या खाली जागा दाखवली जात नाही. भाजपला सत्ता दिल्याने त्याचे चीज झाले जाणीव लोकांमध्ये आहे. पुण्यात महापालिकेशिवाय भाजप माहिती नाही. देशात, राज्यात काय चालले आहे याची प्रतिक्रिया नसते. किरीट सोमय्यावर यांच्यावर हल्ला झाल्यानंतर आक्रमकपणे रस्त्यावर उतरलो तर भविष्यात पुढे कोणत्या नेत्यांवर हल्ला होण्याची वेळ येणार नाही. केवळ नगरसेवक म्हणून काम करायला जन्माला आला नाहीत. तर संघटनेची लढाई लढावीच लागेल. संघटना आहे तर आपण जिवंत आहोत, अशा शब्दात पाटील यांनी संघटनेसाठीही काम करा असा सल्ला दिला.
२०२४ ला कोल्हापूर गेले‘‘कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत भाजपला ७७ हजार मिळाल्याने अनेकांची झोप उडाली आहे. बंटी पाटलांसह अनेकजण याचा अभ्यास करत आहेत. कोल्हापूरच्या निकालानंतर वृत्तपत्र, सोशल मीडिया, वृत्त वाहिन्यांवरून मी कधी हिमालयात जाणार अशी टीका केली. पण तेव्हा भाषण करणारे अनेक जण २०२४ ला आपल्या हातातून कोल्हापूर गेले, असे मानत आहेत. आपण हे केळन संघटनेच्या जोरावर करू शकलो, अशा शब्दात पाटील यांनी काँग्रेसवर टीका केली.