Maharashtra Andhashraddha Nirmulan Samiti | महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे चमत्कार सादरीकरण प्रशिक्षण

Categories
Breaking News social आरोग्य पुणे महाराष्ट्र

छद्मविज्ञानाच्या पराभवासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार आवश्यक

– मच्छिन्द्रनाथ मुंडे यांचे प्रतिपादन

– महाराष्ट्र अंनिसचे चमत्कार सादरीकरण प्रशिक्षण

पुणे : विज्ञानाचा आधार असल्याचे सांगून अनेक गोष्टी लोकांवर बिंबविल्या जातात. मात्र त्याला विज्ञानाचा आधार नसून ते छद्मविज्ञान असते. छद्मविज्ञानाचा पराभव करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करण्याची गरज आहे, असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य पदाधिकारी मच्छिन्द्रनाथ मुंडे यांनी व्यक्त केले.

शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर स्थापित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शिवाजीनगर पुणे शाखेने ‘चमत्कार प्रशिक्षण’ आयोजित केले होते. प्रशिक्षणप्रसंगी मुंडे बोलत होते. कागदात असलेले तथाकथित भूत जाळून चमत्कार प्रशिक्षणाचे उदघाटन महाराष्ट्र अंनिसच्या विज्ञान बोध वाहिनीचे राज्य कार्यवाह भास्कर सदाकळे यांनी केले. राज्य पदाधिकारी विशाल विमल यांनी प्रशिक्षणाचा समारोप केला. प्रशिक्षणार्थींना सहभाग प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. सदाकळे यांनी चमत्कारांचे सादरीकरण अत्यंत रंजकपद्धतीने करून दाखविले. चमत्कारामागील वैज्ञानिक कारणे, हातचलाखी, रासायनिक घटकांचा वापर, सादरीकरणातील सफाईदारपणा मुंडे यांनी सांगितला.

डोळ्यांवर कापड बांधूनही वाचता येणे अर्थात ‘मिडब्रेन’, ‘ग्रहणात शिजवलेल्या अन्नावर अनिष्ट परिणाम होतो’, ‘चुंबकांच्या वापराने कर्करोग, मधुमेह कसा समूळ बरा होतो’ असे चमत्काराचे दावे करून छद्मविज्ञान बिबवले जात आहे. मात्र विज्ञानाच्या चष्म्यातून प्रत्येक गोष्टीची चिकित्सा केल्यास छद्मविज्ञान खोटे पडते, असे मुंडे यांनी सांगितले.

आजूबाजूला लहान घडलेली घटना ही दुसऱ्यापर्यंत पोहोचताना मोठ्या स्वरूपात सांगितली जाते. त्यामुळे चुकीची माहिती व गैरसमज पसरतात. लहान बुवाबाजी करणारा ढोंगीबाबा असेल तर त्याला मोठे करण्याचे काम काही जण करत असतात. चमत्काराला नमस्कार करून लोक फसतात आणि त्यातून आर्थिक, मानसिक, शारीरिक शोषण सुरू होते. त्यामुळे चमत्कारी गोष्टीना विरोध करून वास्तविक गोष्टीची कास धरण्याची गरज आहे, असे मत भास्कर सदाकळे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र अंनिसच्या थॉट विथ ऍक्शन जर्नलचे संपादक हर्षदकुमार मुंगे यांनी प्रास्ताविक केले. शाखा सचिव घनश्याम येणगे, शाखा सहसचिव अरिहंत अनामिका यांनी सुत्रसंचलन केले. माधुरी गायकवाड यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. मयूर पटारे, वनिता फाळके, विनोद खरटमोल यांनी गाणी सादर केली. ओंकार बोनाईत आणि सागर तुपे यांनी मनोगत व्यक्त केले. सोशल मीडिया विभागाचे राज्य सहकार्यवाह रविराज थोरात यांनी आभार व्यक्त केले.

Plastic Ban | “इंटरनॅशनल प्लास्टिक बॅग फ्री डे” निमित्त महापालिकेची दंडात्मक कारवाई

Categories
Breaking News PMC social पुणे

“इंटरनॅशनल प्लास्टिक बॅग फ्री डे” निमित्त महापालिकेची दंडात्मक कारवाई

आज  “इंटरनॅशनल प्लास्टिक बॅग फ्री डे”उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्त पुणे महानगरपालिकेच्या १५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत विविध स्थानिक नागरिक गट, मोहल्ला कमिटी सदस्य, विविध स्वयं सेवी संस्था यांच्या सहभागातून भाजी मंडई, मुख्य रस्ते सार्वजनिक ठिकाणी, रहिवासी आस्थापनांमध्ये व शाळा/महाविद्यालयांमध्ये प्लास्टिक बंदी बाबत जनजागृती करून प्लास्टिकला पर्याय असणा-या वस्तुंचे वाटप करण्यात आले.  तसेच दंडात्मक कारवाई करण्यात आली.

केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने व हवामानबदल मंत्रालयाने  प्लॅस्टीक वेस्ट मॅनेजमेंट रुल्स – २०१६ लागू केलेले आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाने  अविघटनशील कचऱ्यामुळे एकूणच नागरिकांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होत असल्याने “महाराष्ट्र प्लॅस्टीक व थर्मोकॉल अविघटनशील वस्तूंचे (उत्पादन, वापर विक्री, वाहतुक, हाताळणी, साठवणूक व तद्नंतर वेळोवेळी केलेल्या सुधारणा) अधिसूचना, २०१८ संपूर्ण राज्यासाठी लागू करण्यात आली आहे.” तसेच तदनंतर  वेळोवेळी सुधारीत अधिसूचना पारीत करण्यात आलेल्या आहेत.

प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियमावली २०१६ मधील तरतुदींचे उल्लंघन होईल अशा प्रकारची प्लास्टिक ने-आन, प्लास्टिक कॅरी बॅग्ज (७५ मायक्रोनपेक्षा कमी), विघटनशील नसलेले प्लास्टिक (प्लास्टिकचे झेंडे, प्लास्टिक प्लेट्स, प्लास्टिकचे चहा कप, पाण्याचे पाऊच, प्लास्टिक स्ट्रॉ इ.) नॉन वॉवन बॅग्ज, स्टायरोफोम, थर्माकोल, प्लास्टिक पत्रके, प्लास्टिक पत्रकांची आवरणे किंवा प्लास्टिक सहित बहुस्तरीय आवरण, वेष्टने असलेल्या वस्तू व सिंगल युज प्लास्टिक कोणतीही व्यक्ती निर्माण करणार नाही, साठवणार नाही, वितरीत/विक्री करणार नाही किंवा वापरणार नाही.
प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम २१६ च्या नियम ४(२) नुसार (सुधारित केल्यानुसार), “पॉलीस्टीरिन आणि विस्तारित पॉलिस्टीरिनसह खालील एकल वापराच्या प्लास्टिक (SUP) चे उत्पादन, आयात, साठा, वितरण, विक्री आणि वापर दिनांक १ जुलै २०२२ पासून प्रभावीपणे प्रतिबंधित असतील.
1. प्लास्टिकच्या काड्या असलेले इअरबड्स, फुग्यासाठी वापण्यात येणा-या प्लास्टिकच्या काड्या, प्लास्टिकचे ध्वज, कँडी स्टिक्स, आइस्क्रीम स्टिक्स, सजावटीसाठीचे पॉलिस्टीरिन;
2. प्लेट्स, कप, ग्लासेस, कटलरी जसे की काटे, चमचे, चाकू, पेंढा, ट्रे, मिठाईचे बॉक्सेस, निमंत्रण पत्रिका आणि सिगारेटची पाकिटे गुंडाळण्यासाठी वापरलेल्या पॅकिंग फिल्म्स, 100 मायक्रॉनपेक्षा कमी आकाराचे प्लास्टिक किंवा पीव्हीसी बॅनर, स्टिरर इ. प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम 2016 च्या नियम ४(१)(क) नुसार (सुधारणा केल्यानुसार) “व्हर्जिन किंवा पुनर्वापर केलेल्या प्लास्टिकची कॅरी बॅग दिनांक ३० सप्टेंबर २०२१ पासून पंचाहत्तर (७५) मायक्रॉनपेक्षा कमी जाडीची नसावी आणि दिनांक ३१ डिसेंबर २०२२ पासून एकशे वीस (१२०) मायक्रॉनपेक्षा कमी जाडीची नसावी.
महाराष्ट्र शासनाच्या २३ मार्च २०१८ च्या अधिसूचनेनुसार, संपूर्ण राज्यात हँडलसह आणि हँडलशिवाय असणा-या प्लास्टिक पिशव्यांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून या सर्व नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्ती/संस्था/कंपन्यांवर पुणे महानगरपालिकेमार्फत प्रभावी दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

आज  “इंटरनॅशनल प्लास्टिक बॅग फ्री डे”उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्त पुणे महानगरपालिकेच्या १५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत विविध स्थानिक नागरिक गट, मोहल्ला कमिटी सदस्य, विविध स्वयं सेवी संस्था यांच्या सहभागातून भाजी मंडई, मुख्य रस्ते सार्वजनिक ठिकाणी, रहिवासी आस्थापनांमध्ये व शाळा/महाविद्यालयांमध्ये प्लास्टिक बंदी बाबत जनजागृती करून प्लास्टिकला पर्याय असणा-या वस्तुंचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे जनजागृतीपर रॅली चे आयोजन करण्यात आले..
या “इंटरनॅशनल प्लास्टिक बॅग फ्री डे” निमित्त पुणे महानगरपालिकेमार्फत बंदी असलेले प्लास्टिक न वापरणेचे आणि प्लास्टिकला पर्यायी वस्तुंचा वापर करण्याचे आवाहन सर्व नागरिकांना करण्यात आले.

Government hostels | सामाजिक न्याय विभागातंर्गत शासकीय वसतिगृतहात प्रवेश प्रक्रियेला सुरवात

Categories
Breaking News Education social पुणे महाराष्ट्र

सामाजिक न्याय विभागातंर्गत शासकीय वसतिगृतहात प्रवेश प्रक्रियेला सुरवात

पुणे : सामाजिक न्याय विभागातंर्गत २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाकरीता मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृह प्रवेश ऑफलाईन पद्धतीने होणार असून प्रवेशाबाबतची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रवेश अर्ज करण्याचा कालावधी १५ जुलै २०२२ आहे. पहिली निवड यादी अंतिम व प्रसिद्ध करावयाची मुदत १८ जुलै आहे. इयत्ता १० वी व ११ वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून प्रवेशासाठी अर्ज करण्याचा कालावधी ३० जुलै आहे. असून पहिली निवड यादी अंतिम व प्रसिद्ध करावयाची अंतिम मुदत ५ ऑगस्ट आहे.

बी.ए.,बी.कॉम.,बी.एस.सी या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या, १२ वी नंतर पदविका किंवा पदवी आणि एम.ए., एम.कॉम, एम.एस.सी. या पदव्युत्तर, पदवी, पदविका आदी अभ्यासक्रमांना (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी २४ ऑगस्टपर्यंत अर्ज करावयाचे असून पहिली निवड यादी ३१ ऑगस्टपर्यंत अंतिम व प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ऑफलाईन प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी ३० सप्टेंबर असून पहिली निवड यादी अंतिम व प्रसिद्ध करावयाचा कालावधी ३ ऑक्टोबर २०२२ असा आहे.

पुणे शहरामधील मुलांच्या शासकीय वसतिगृहामधील अर्जांचे वितरण व स्वीकृती संत ज्ञानेश्वर मुलांचे शासकीय वसतिगृह, विश्रांतवाडी व मुलींच्या शासकीय वसतिगृहामधील अर्जाचे वितरण व स्वीकृती संत जनाबाई मुलींचे शासकीय वसतिगृह, पुणे येथे करण्यात येणार आहे. उर्वरित पुणे जिल्ह्यातील तालुका पातळीवरील शासकीय वसतिगृहांमध्ये अर्जाचे वितरण व स्वीकृती त्याच वसतिगृहामध्ये करण्यात येईल.

पुणे जिल्ह्यात १३ मुलांची व १० मुलींची अशी २३ शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. पुणे शहरात ४ मुलींची व ७ मुलांची अशी ११ वसतिगृहे व ग्रामीण भागात १२ मुलांची शासकीय वसतिगृहे आहेत. एकूण १ हजार २०८ जागा रिक्त आहेत. तरी विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृह योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाजकल्याण सहायक आयुक्त संगिता डावखर यांनी केले आहे.

Assembly Speaker | विधानसभा अध्यक्ष पद | महाविकास आघाडीकडून राजन साळवी तर भाजप कडून राहूल नार्वेकर 

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

विधानसभा अध्यक्ष पद | महाविकास आघाडीकडून राजन साळवी तर भाजप कडून राहूल नार्वेकर

महाराष्ट्रात नवं सरकार आल्यानंतर राजकीय घडामोडींनी आणखी वेग धरला आहे. शिंदेंनी सत्तेत येताच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लावली. मविआ सरकार असताना नाना पटोले यांच्याकडे हे पद होतं. मात्र, त्यांना काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद मिळताच अध्यपदाची जागा रिक्त आहे. मागील सरकारची तीन अधिवेशनं उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वात पार पडली. मात्र आता नव्याने सरकार आल्यानंतर बहुमत चाचणी घेण्याआधीच ही निवडणूक लावण्यात आली आहे.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून आमदार राहुल नार्वेकर, तर मविआकडून राजापूरचे आमदार राजन साळवींना उमेदवारी देण्यात आली आहे.

Special session | महाराष्ट्र विधीमंडळाचे विशेष अधिवेशन २ व ३ जुलै रोजी | पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

महाराष्ट्र विधीमंडळाचे विशेष अधिवेशन २ व ३ जुलै रोजी

महाराष्ट्र विधीमंडळाचे विशेष अधिवेशन २ व ३ जुलै रोजी घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. अधिवेशनात पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर तत्काळ  राज्य मंत्रिमंडळाची मंत्रालयात बैठक घेण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच विविध विभागांचे सचिव उपस्थित होते.

मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील खरीप हंगाम पीक पाणी पीक विमा तसेच कोबी बाबतची परिस्थिती याबाबत सादरीकरण करण्यात आले.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर सचिव आणि वरिष्ठाधिकारी यांच्याशी संवाद साधताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले,” आपण नवीन सुरुवात करत आहोत. आपल्यासोबत अनुभवी उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यामुळे कारभार करण्यास अडचण येणार नाही राज्यातील विकास कामे विविध प्रकल्प आणि समाज घटकाला न्याय देण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी हातात हात घालून काम करावे लागते ही एका रथाची दोन चाके आहेत लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे. तो सार्थ ठरवायाचा आहे. आपल्या कामातून गती किमान शासन प्रशासन आहे. असा संदेश जाणे मेट्रो समृद्धी महामार्ग जलसंपदा विभागांचे महत्त्वाचे प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावयाचे आहेत त्यासाठी प्रशासनाचे सहकार्य मिळेलच, हा विश्वास आहे.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, “आपल्या सोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळाली आहे. गतिशीलता देणे आणि निर्णय क्षमता येणे महाराष्ट्र पुढे नेण्याचा प्रयत्न करूया”

New Government | MLA Sunil Kamble | आमदार सुनील कांबळे यांना मंत्रिपद! | चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

आमदार सुनील कांबळे यांना मंत्रिपद!

पुणे | उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याने भाजप एकनाथ शिंदे गटाला सोबत घेऊन सरकार बनवण्याच्या तयारीत आहे. लवकरच नवीन मंत्रिमंडळ अस्तित्वात येणार आहे. यामध्ये कॅंटोन्मेंट मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांना मंत्रिपद मिळू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर चंद्रकांत पाटील हे पुण्याचे पालकमंत्री होऊ शकतात, अशी चर्चा रंगली आहे.
आमदार सुनील कांबळे हे पुणे भाजपचे जुने नेते आहेत. तसेच त्यांनी नगरसेवक पदी निवडून येण्याचा देखील विक्रम केला आहे. आमदार होण्या अगोदर ते स्थायी समितीचे अध्यक्ष होते. कॅंटोन्मेंट मध्ये आपल्या कामामुळे नेहमी निवडून येतात. खास करून मागासवर्गीय समाजात त्यांना मानणारा वर्ग आहे. याचाच फायदा कांबळे यांना नवीन मंत्रिमंडळात होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण भाजपच्या आमदारांमध्ये मागासवर्गीय आमदार कमी आहेत. कांबळे आणि उमरखेड चे नामदेव ससाणे ही ती नावे आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्याला जर पद द्यायचे असेल आणि मागासवर्गीय समाजाचा प्रतिनिधी म्हणून सुनील कांबळे यांना सामाजिक न्याय मंत्री पद दिले जाऊ शकते. असा कयास व्यक्त केला जात आहे. दिलीप कांबळे यांना देखील हे पद देण्यात आले होते. त्यावेळी गिरीश बापट हे पुण्याचे पालकमंत्री होते. त्यामुळे पुणे परिसरातून तशी मागणी देखील होत आहे.

चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री

मात्र दुसरीकडे अशीही चर्चा आहे कि चंद्रकांत पाटील हे पुण्याचे पालकमंत्री होऊ शकतात. त्यांनाही मंत्रिमंडळात स्थान दिले जाऊ शकते. त्यामुळे पुणे शहरातील या दोन आमदारापैकी कुणाला मंत्री पद मिळणार आणि कुणाला पुण्याचा पालकमंत्री करणार याकडे लक्ष लागले आहे. कारण पुण्याकडे सर्वांचे लक्ष असते. आता आगामी काळात महापालिका निवडणूका येऊ पाहताहेत. त्यामुळे पुणे आणि पिंपरी महापालिकेवर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी पालकमंत्र्यांची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे.

CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा | मुख्यमंत्री जनतेला काय म्हणाले?

Categories
Breaking News Political देश/विदेश महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा | मुख्यमंत्री जनतेला काय म्हणाले?

मी आश्वस्त केले होत जे सुरु केलय ते सुरु राहील. आता पर्यंतची वाटचाल तुमच्या मदतीने. सरकार म्हणून अनेक कामे रायगड, बळीराजाला कर्जमुक्त केले. आपण विसरणार नाही. मला समाधान आयुष्य सार्थकी लागले संभाजीनगर नामकरण आज दिले शिवाय उस्मानाबादचे धाराशिव. सरकारी कर्मचाऱ्यांना हक्काची जागा. एखादी गोष्ट चांगली सुरु असली की दृष्ट लागली. पवारसाहेब, सोनियाजी सहकार्याना धन्यवाद. चारच शिवसेनेची मंत्री आज होते कुणीही विरोध केला नाही. ज्यांनी करायचे होये ते नामानिराळे ज्यांचा विरोध भासवला त्यांनी समर्थन.

अनेकांना शिवसैनिकांना शिवसेनाप्रमुखांनी मोठे केले ज्यांना मोठे केले तेच विसरले. जे देणे शक्य होते ते सगळ दिल. मातोश्रीला अनेक लोक येऊन पाठिंबा देतायत. ज्यांना दिल ते नाराज ज्यांना काहीच मिळाले नाही ते सोबत हीच शिवसेना सामान्यांच्या पाठिंब्याने सुरु आहे.

न्याय देवतेने निकाल दिलाय. फल्ोअर टेस्ट करण्याचा जो निर्णय. राज्यपालांनी २४ तासात लोकशाहीचे पालन केले पण १२ विधानपरिषद यादी आताही निर्णय घ्यावा. मंत्रिमंडळ बैठकीत अशोकराव म्हणाले आम्ही बाहेर पडतो. काल पण आवाहन केले तुमची नाराजी कोणावर आहे? ति सुरतला गुवाहटीला जाऊन सांहण्यापेक्षा मातोश्री समोर येऊन बोला. मला समोरासमोर हवय. त्यांच्याशी वाद नकोय. मुंबईत बंदोबस्त वाढवला स्थानबध्द करत नोटीस आल्या. चीन सीमेची सुरक्षा कदाचित मुंबईत. इतक नाते तोडले. कुणीही शिवसैनिकांनी यांच्या मध्ये येऊ नये. नविन लोकशाहीचा पाळणा हलणार आहे. मी सांगतो तुमच्या मध्ये कुणी येणार नाही. किती आमदार आहे लोकशाहीत डोकी फक्त मोजण्यासाठी होतो. माझ्या विरोधात एक जरी उभा झाला तर मला लाजिरवाणे. मला उद्याचा खेळच करायचा नाही. शिवसेनाप्रमुखांच्या पुत्राला खेचण्याचे पुण्य त्यांना पदरी पडू द्या. त्यांचा आनंद मला हिसकावून घ्यायचा नाही.

आम्ही हपालेले होऊन जात नाही मुंबई हिंदुत्वासाठी झटतो. सगळ्या समोर मी मुख्यमंत्री पदाचा त्याग करतो आहे. मी घाबरणारा नाही. उद्या त्यांचा आनंद त्यांना पेढे खाऊ द्या मला शिवसैनिकांच्या प्रेमाचा गोडवा हवाय. वारकरी म्हणतात उध्दव ठाकरेंच्या हस्ते हवीय. माऊली म्हणतील ते मान्य. महाराष्ट्रात दंगल झाली नाहि मुस्लिमांनि पण ऐकले. मी आलोच अनपेक्षितपणे जातो पण तसाच आहे. नव्याने शिवसेना भवनात बसणार आहे. शिवसेना हिरावून घेऊ शकत नाही. सोबत विधान परिषद सदस्याचा पण राजीनामा. मी पुन्हा येईल अस बोललो नव्हतो. सर्वांचे शासकीस कर्मचारी सहकार्यांचे आभार

Cabinet Meeting | मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

Categories
Breaking News Political social देश/विदेश महाराष्ट्र

आज २९ जून २०२२ मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय थोडक्यात

• औरंगाबाद शहराच्या “संभाजीनगर” नामकरणास मान्यता.
(सामान्य प्रशासन विभाग)

• उस्मानाबाद शहराच्या “धाराशीव” नामकरणास मान्यता. (सामान्य प्रशासन विभाग)

• नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ या नामकरणास मान्यता.
(नगर विकास विभाग)

• राज्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण लागू करणार. हिंगोली जिल्ह्यात मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करणार. (कृषि विभाग)

• कर्जत (जि. अहमदनगर) येथे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) न्यायालय स्थापन करणार
(विधि व न्याय विभाग)

• अहमदनगर – बीड – परळी वैजनाथ या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या सुधारित खर्चास मान्यता व त्यासाठी राज्य शासनाचा हिस्सा देणार
(परिवहन विभाग)

• ग्रामीण भागातील विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबवणार.
(इतर मागास बहुजन कल्याण विभाग)

• विदर्भ विकास मंडळ, मराठवाडा विकास मंडळ व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ ही विकास मंडळे पुनर्गठीत करण्याचा निर्णय.
(नियोजन विभाग)

• निवड झालेल्या परंतु मराठा आरक्षण रद्द झाल्याने नियुक्ती न मिळालेल्या एसईबीसी उमेदवारांकरिता अधिसंख्य पदे निर्माण करण्यासाठी विधेयक मांडण्याचा निर्णय

( सामान्य प्रशासन विभाग)

• शासन अधिसुचना ८ मार्च २०१९ अनुसार आकारावयाच्या अधिमुल्याची रक्कम भरण्याच्या कालावधीस मुदतवाढ देण्याचा निर्णय.
(महसूल विभाग)

Pune Municipal Corporation | महाविकास आघाडी सरकारने दिलेली उद्दिष्ट्ये महापालिका पूर्ण करणार का?

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

महाविकास आघाडी सरकारने दिलेली उद्दिष्ट्ये महापालिका पूर्ण करणार का?

महाविकास आघाडी सरकारने महापालिका प्रशासनाला शाश्वत विकासाची उद्दिष्टे दिली आहेत. यामध्ये शहरी भागातील गरीब कुटुंबांना पाणीपट्टी माफ करणे, मालमत्ता कर सवलत / माफी देणे, अशा विविध योजनांचा समावेश आहे. महापालिका ही उद्दिष्टे पूर्ण करू शकणार का? दोन वर्षांपूर्वीच हे आदेश देण्यात आले आहेत.

ही आहेत उद्दिष्टे

अ) शहरी भागातील दारिद्र्य निर्मूलनासाठी महापालिका व नगरपालिका अंतर्गत कौशल्य विकास व स्वयंरोजगार प्रशिक्षण व अनुदानाचे कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यात यावे.
आ) गरीब महिलांना त्यांचे शहरी स्वयंसहाय्यता बचत गटामार्फत उत्पन्नाची साधने मिळण्यासाठी महापालिका व नगरपालिकांमधून देण्यात येणाऱ्या छोट्या कंत्राटांमध्ये आरक्षण देण्यात यावे.
) शहरी भागातील गरीब कुटुंबांना पाणीपट्टी माफ करणे, मालमत्ता कर सवलत / माफी देणे. (मुंबई महापालिकेने पाचशे चौ. फूट पर्यंत माफी दिली आहे.) महापालिका नगरपालिकांच्या शाळांमध्ये स्मार्ट कोर्सेस सुरु कोर्स उपलब्ध करून देणे, डिजिटल व टॅबदद्वारे शिक्षणावर भर देणे, गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे. महापालिका क्षेत्रात निवारा केंद्र चालवणे.

ऊ) महापालिका / नगरपालिकांचे दवाखाने अधिक बळकट करणे, तेथील डॉक्टर नर्सेसची रिक्त पदे भरणे, वैद्यकीय उपकरणे सेवा सुविधा पुरवणे, साथरोग प्रतिबंधाचे काम अधिक प्रभावी रीतीने करणे.
ए) नगरपालिका / महानगरपालिकांमधील सर्व समित्यांमध्ये महिलांसाठी 50 टक्के आरक्षण ठेवणे.
ऐ) नैसर्गिक आपत्ती पूर/आग याचे प्रतिबंधासाठी सार्वत्रिक प्रभावी उपाययोजना करणे.
ओ) हवेची शुद्धता, सार्वजनिक कचरा विलगीकरण, पुनर्वापर व व्यवस्थापन यानुसार नगरपालिका/महापालिका यांचेमध्ये स्पर्धा ठेवून मानांकन जाहीर करणे यात उत्कृष्ट ठरणाऱ्या संस्थाचा गौरव करणे.
औ) आर्थिक दुर्बल घटकांसाठी आवास योजना योजना चा कार्यक्रम राबवणे.

Shivsena | Kothrud | एकनाथ शिंदेच्या फोटोला जोडे मारत कोथरूड मध्ये शिवसेनेचे जोरदार आंदोलन 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

एकनाथ शिंदेच्या फोटोला जोडे मारत कोथरूड मध्ये शिवसेनेचे जोरदार आंदोलन

कोथरूड येथे  शिवसेना अंगार है, बाकी सब भंगार है, ज्याला भगवा कळेल त्याचेच संकट टळेल, गद्दारांना माफी नाही, उद्धव साहेब आम्हास आपला सार्थ अभिमान आहे.अशी जोरदार घोषणाबाजी करत पुण्यातील कोथरूड येथे एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी बंडखोर आमदारांच्या फोटोला जोडे मारत कोथरूड येथील कर्वे पुतळा चौकात रस्त्यावर उतरत बंडखोर आमदारांचा निषेध करत आंदोलन केले.

आम्ही उध्दव ठाकरे बरोबरच असल्याचे आंदोलकांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांनी असंख्य आमदारांना घेऊन शिवसेनेसोबत बंड केल्याने शिवसैनिकांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. निम्म्यापेक्षा जास्त शिवसेनेचे आमदार हे मंत्री शिंदे यांच्यासोबत आहेत. याच्‍या विरोधात आज कोथरुड येथे शिवसेना व युवासेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे.

शिवसेना, महिला आघाडी, युवासेना, युवतीसेना, अंगिकृत संघटनेतील सर्व पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संखेने सहभागी होते. यावेळी अनेक शिवसैनिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावेळी शहरप्रमूख गजानन थरकुडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले त्याप्रसंगी माजी गटनेता पृथ्वीराज सुतार, योगेश मोकाटे,नितिन शिंदे भारत सुतार, श्रीपाद चिकणे,
किशोर सोनार ,राजेश पळसकर, राम थरकुडे,नितिन पवार, अनिल घोलप,उमेश भेलके वैभव दिघे,नंदकुमार घाटे,दिलिप गायकवाड,कांताआप्पा बराटे,दिनेश बराटे,बाप्पू चव्हाण,अमित आल्हाट
बाळासाहेब धनवडे, अनिल भगत ,योगेश मारणे
राजू कुलकर्णी,गौरव झेंडे, शिवाजी गाढवे,शुभम कांबळे,लखन तोंडे,कूणाल कांदे सविताताई मते,छायाताई भोसले प्रज्ञा लोणकर,भारती भोपळे शर्मिला शिंदे,जोती चांदिरे पल्लवी नागपुरे,अनिल माझीरे जगदीश दिघे,अनिल भगत मंदार धुमाळ,पुरुषोत्तम विटेकर, सागर तनपुरे,दिनेश नाथ,महेश शिंदे
ऋषिकेश कुलकर्णी,आदि उपस्थित होते.