Code Of Conduct | आदर्श आचारसंहिता पाळण्याबद्दल सर्वच राजकीय पक्षांचे एकमत

Categories
Breaking News Political पुणे

आदर्श आचारसंहिता पाळण्याबद्दल सर्वच राजकीय पक्षांचे एकमत

आज पुणे शहराचे पोलीस कमिशनर अमिताभजी गुप्ता यांनी शहरात राजकीय पक्षांच्या सद्यस्थितीत असलेल्या वातावरणा संदर्भात सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीस राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ,भाजप ,शिवसेना ,वंचित बहुजन आघाडी, एम.आय.एम, मनसे या सर्व राजकीय पक्षांचे अध्यक्ष व प्रतिनिधी उपस्थित होते.  बैठकीत यापुढे आंदोलन करत असताना पोलिसांनी घालून दिलेली आदर्श आचारसंहिता पाळण्याबद्दल सर्वच राजकीय पक्षांचे एकमत झाले.

देशाची सांस्कृतिक व शैक्षणिक राजधानी समजल्या जाणार्‍या पुणे शहरात राजकीय पक्ष व राजकीय नेते यांची देखील एक आदर्श संस्कृती आहे. गेल्या अनेक वर्षात राज्यासह देशातील इतर शहरांमध्ये राजकीय पक्षांमध्ये अनेक चुकीच्या घटना घडल्या परंतु पुणे शहरातील राजकीय कार्यकर्त्यांनी एक आदर्श आचार संहिता जपत कितीही टोकाचे आंदोलन असले तरी कधी कुठलेही गैरप्रकार झाले नव्हते. राजकारणात राजकीय मतभेद असू शकतात विचारसरणीमध्ये भिन्नता असू शकते. परंतु विचारांची लढाई ही विचारांनीच लढली गेली पाहिजे,त्या लढाईला कुठेही गालबोट लागता कामा नये. पुण्याची हीच राजकीय संस्कृती टिकवण्यासाठी पुणे शहरातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांना एकत्र घेत घेतलेल्या या बैठकीनंतर नंतर पुणे शहरात राजकीय सलोखा टिकेल असे मत शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केले.

 

या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष  प्रशांत जगताप अंकुशअण्णा काकडे,भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक,शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे , मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर,आमदार माधुरीताई मिसाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख यांच्यासह सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Raj Thackeray’s morning Rally | राज ठाकरेंच्या सकाळच्या सभेमुळे भुवया उंचावल्या! 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

राज ठाकरेंच्या सकाळच्या सभेमुळे भुवया उंचावल्या!

: राजकीय वर्तुळात  चर्चाना उधाण

पुण्यात रविवारी गणेश कला क्रीडा मंच येथे राज ठाकरे यांची सकाळी सभा होणार आहे. मात्र ठाकरे यांच्या सकाळच्या सभेच्या वेळेमुळे मात्र भुवया उंचावल्या गेल्या आहेत. कारण ठाकरे नेहमी संध्याकाळी सभा घेतात. त्याला प्रतिसाद देखील तसाच मिळतो. मात्र आता सकाळी सभा असल्याने राजकीय चर्चाना उधाण आले आहे.

शहरात सभेसाठी दोन ठिकाणे पाहण्यात आली होती. त्यापैकी एक मुळा मुठा नदीपात्र निश्चित करण्यात आले होते. परंतु पावसाचे कारण देत कार्यकर्त्यांनी नदीपात्रात सभा रद्द झाल्याचे सांगितले. अखेर स्वारगेटला रविवारी गणेश कला क्रीडा मंच येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पण राज ठाकरे  नेहमी सायंकाळी सभा घेतात. पण यावेळी मात्र चक्क सकाळी सभा ठेवल्याने चर्चाना उधाण आल्याचे दिसत आहे. सायंकाळच्या सभेवरूनच अजित पवारांनी  राज ठाकरेंचं नाव न घेता टीका केली होती. आता सकाळी सभा घेऊन राज यांनी पवारांचे  चॅलेंज स्वीकारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

‘आम्ही सकाळी, दुपारी सभा घेतो. यांनी कधी दुपारी सभा घेतली आहे का, तसेच कधी कष्ट घेतले आहेत का, यांची सभा कधी होते तर संध्याकाळी होते,’ अशा शब्दात अजित पवार यांनी राज यांच्यावर निशाणा साधला होता. मात्र राज ठाकरेंनी सकाळी सभा आयोजित करून अजित पवार यांचे आव्हान स्वीकारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

मशिदींवरील भोंग्याचा मुद्द्यावरून राज ठाकरे यांची मुंबई, ठाणे, औरंगबाद येथे जाहीर सभा झाली होती. या सभेत राज ठाकरे यांनी भोंगे, हिंदुत्व, या मुद्द्यांना हात घातला होता. त्याचबरोबर शरद पवार आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली होती. पुण्याच्या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान राज यांनी अयोध्या दौरा स्थगित केला आहे. त्याबाबतही ते पुण्यातील सभेत सविस्तर बोलणार असल्याचे ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे.

पुण्यात होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेचा टिझर मनसे द्वारा  प्रदर्शित

टिझरमध्ये राज ठाकरेंच्या सुरुवातीला औरंगाबादच्या सभेतील एकदा काय ते होऊनच जाऊ दे… हे वाक्य घेण्यात आले आहे. तर टिझरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे गाणंही वाजत आहे. या टीझरवरून पुण्यातील सभा जोरदार होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्या अनुषंगाने मनसेचे पुण्यातील सर्व पदाधिकारी जोमाने कामाला लागले आहेत.

MNS : Police Commissioner : जनजागृती अभियान कार्यक्रम हाती घेऊन पुणे शहरातील ध्वनिप्रदूषण थांबवा : मनसेची पोलिस आयुक्तांकडे मागणी

Categories
Breaking News Political पुणे

जनजागृती अभियान कार्यक्रम हाती घेऊन पुणे शहरातील  ध्वनिप्रदूषण थांबवा

: मनसेची पोलिस आयुक्तांकडे मागणी

पुणे : पुणे शहरातील अनेक धार्मिकस्थळांवर बेकायदेशीर  लाऊडस्पीकर लावण्यात आलेले आहेत त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. नागरिकांनी फोन, व्हाट्सएप, मेल अथवा पत्र पाठवून कळविले तरी आपण गंभीर दखल घेऊन त्याबाबतीतही  योग्य ती  कार्यवाही करावी. तसेच ध्वनिप्रदूषणाच्या विषयी पुणे पोलिसांकडून जनजागृती अभियान कार्यक्रम हाती घेऊन पुणे शहरातील
ध्वनिप्रदूषण थांबवावे, अशी मागणी शहर मनसे कडून पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबत मनसेच्या शिष्टमंडळाने आयुक्तांना निवेदन देखील दिले आहे.
मनसेच्या शिष्टमंडळाचे पोलीस आयुक्तांना निवेदन
शहर मनसेच्या निवेदनानुसार राजसाहेब ठाकरे यांनी सातत्याने आवाज उठवत सर्वसामान्य जनतेला त्रासदायक ठरणाऱ्या भोंग्या  बाबत मनसे ची भूमिका मांडली आहे . या भूमिके नुसार व सर्वोच्च न्यायालयाने पर्यावरण संरक्षणाचा कायदा सन 1986 व ध्वनी प्रदूषण अधिनियम 2000 मधील तरतूदींचे सक्त पालन करण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. त्यानूसार रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत लाऊड स्पीकर, फटाके, वाद्ये वाजविण्यास सक्त बंदी केलेली आहे.
 तसेच सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत सुध्दा लाऊड स्पीकर, फटाके, वाद्ये इत्यादी मर्यादा ठेवण्यात आल्या आहेत.
ध्वनिप्रदूषणाचा त्रास हा लोकांच्या आरोग्यालाही होतो. त्याचे दुष्परिणाम खूप आहेत. ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करा, असे आदेश उच्च न्यायालयाने वारंवार दिल्यानंतरही पुणे पोलिसांकडून सक्त कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे शहरातील ध्वनिप्रदूषणाला चाप लावण्यासाठी काय करणार, असा यक्ष प्रश्न निर्माण झालेला आहे. या विषयी  कृती आराखडाच आता उच्च न्यायालयाने मुंबई पोलिस आयुक्तांकडे मागितला असल्याचे समजते. अशी वेळ पुणे पोलीसांवर येऊ नये  पोलिसांच्या या कारवाई दिरंगाईबद्दल सर्वसामान्यांमध्येही नाराजी आहे.
ध्वनिप्रदूषणाचाअत्यंत गंभीर प्रश्न असून ध्वनिप्रदूषणाच्या बाबतीत पोलिसांकडून अजूनही अपेक्षेप्रमाणे कार्यवाही होताना दिसत नाही . फोनवरील तक्रारीची तात्काळ दखल घेऊन कारवाई केली जातानाही पाहायला मिळत नाही. आता न्यायालयाच्या दट्ट्यानंतर तरी पोलिस या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन कार्यवाही करावी अशी सामान्य जनतेची  अपेक्षा आहे. पुणे शहरातील अनेक धार्मिकस्थळांवर बेकायदेशी लाऊडस्पीकर लावण्यात आलेले आहेत त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. नागरिकांनी फोन, व्हाट्सएप, मेल अथवा पत्र पाठवून कळविले तरी आपण गंभीर दखल घेऊन त्याबाबतीतही  योग्य ती  कार्यवाही करावी. तसेच ध्वनिप्रदूषणाच्या विषयी पुणे पोलिसांकडून जनजागृती अभियान कार्यक्रम हाती घेऊन पुणे शहरातील
ध्वनिप्रदूषण थांबवावे. असे मनसेच्या वतीने निवेदनात म्हटले आहे.

Heat wave increasing : Signal : दुपारी १२ ते ४ पुणे शहरातील सिग्नल बंद ठेवा 

Categories
Breaking News Political social पुणे

दुपारी १२ ते ४ पुणे शहरातील सिग्नल बंद ठेवा

: मनसे ची वाहतूक पोलिसांकडे मागणी

पुणे : शहरातील सर्व गरजेचे मुख्य चौक सोडुन सर्व वाहतूक सिग्नल दुपारी १२ ते ४ बंद करण्यात यावे. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वाहतूक शाखेकडे केली आहे. याबाबत मनसे चे शहर उपाध्यक्ष प्रशांत कनोजिया यांनी पत्र दिले आहे.
वाहतूक पोलिसांना दिलेल्या पत्रानुसार पुणे शहरातील उन्हाचा तडाखा वाढत चालला आहे.  ४०-४३ सेल्सिअस च्या पेक्षा जास्त दिवसें दिवस तापमानात वाढ होत चालली आहे.  पुणेकरांना सिग्नल वर कडक उन्हाचे चटके सहन करत थांबावे लागत आहे. त्यामुळे अनेक पुणेकरांना उष्णतेमुळे घोळणा फुटणे, त्वचा रोग, डोकेदुखी अशक्तपणा, चक्कर येणे, शरीरातील पाण्याची कमतरता होणे. असे अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. आपणांस विनंती आहे पुणे शहरातील सर्व वाहतूक सिग्नल दुपारी १२ ते ४ बंद ठेवण्यात यावेत.

Congress : MNS : Sanjay Jagtap : मनसे पदाधिकाऱ्यांचा कॉंग्रेस मध्ये प्रवेश

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

मनसे पदाधिकाऱ्यांचा कॉंग्रेस मध्ये प्रवेश

पुणे : काँग्रेस भवन, पुणे येथे पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार  संजय चंदूकाका जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काँग्रेस विचारसरणीने प्रेरित झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या देहूरोड येथील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी मलिक हसन शेख, असिफ इसा सय्यद, हसन शेख, जावेद शेख, हुसेन शेख, जेदिन नाडार, सुरज गायकवाड, अजय बाला, संकेत गायकवाड, आकाश सुतार, अजय रामोशी रवी स्वामी, शरद सोनी व माजी पोलीस अधिकारी आबूबकार लांडगे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आगामी काळात देहूरोड परिसरात काँग्रेस पक्षाची विचारधारा तळागाळातील जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा निश्चय केला.
या सर्वांचे स्वागत करत असताना पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष-आमदार संजय चंदूकाका जगताप म्हणाले की, काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडी मध्ये एकत्रितपणे काम करण्याचा निर्णय घेतला तेव्हापासूनच इतर दोन पक्षाला कधीही दुखावण्याचा प्रयत्न केला नाही किंवा भविष्यातदेखील आम्ही कधीही तो प्रयत्न करणार नाही. सध्या वर्तमानपत्रातून मावळ परिसरातील अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी इतर पक्षांमध्ये प्रवेश केल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसात सातत्याने येत आहेत.  या निमित्ताने मला मित्र पक्षाला सूचित करायचे आहे की, काँग्रेस पक्षाला अनेक जणांनी संपवण्याचा प्रयत्न केला, पण तो कधीही संपला नाही कारण काँग्रेस जनसामान्यांची मजबूत विचारधारा आहे.  तसेच आजही देहूरोड लोणावळा मावळ या ठिकाणी काँग्रेस पक्ष अतिशय सक्षम असून या ठिकाणच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर ती अशा कोणत्याही वाऱ्या वादळाचा काहीही फरक पडणार नाही. जे आता या पक्षातून दुसरीकडे गेले आहेत ते काँग्रेस पक्षात किती दिवस होते याचा देखील अभ्यास करावा असे संजय जगताप म्हणाले.
  यावेळी मावळ परिसरातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत  सातकर, मावळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मा यशवंत मोहोळ, देहूरोड काँग्रेसचे अध्यक्ष हाजीमलंग मारीमुत्तू, लोणावळा शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, खजिनदार महेश बापु ढमढेरे, सरचिटणीस पृथ्वीराज पाटील,दीपक साचसर वेंकटेश कोळी,गफूरभाई शेख, राणी पाडियन, मेहबूब गोलंदाज, बबन टोपे व इतर मान्यवर उपस्थित होते.

PMPML : पीएमपीएमएलच्या खासगी बस ठेकेदारांचा संप मागे : बससेवा पूर्वपदावर

Categories
Breaking News social पुणे

पीएमपीएमएलच्या खासगी बस ठेकेदारांचा संप मागे; बससेवा पूर्वपदावर

आज  पीएमपीएमएलच्या खासगी बस ठेकेदारांनी सकाळच्या सत्रात प्रशासनाला कोणतीही पूर्वकल्पना न देता आडमुठे धोरण स्वीकारून संप पुकारला होता. यामुळे ६८३ बस बंद होत्या तर फक्त ९९ बस रस्त्यावर होत्या. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. त्यामुळे पीएमपी प्रशासनाकडून ठेकेदारांवर अत्यावश्यक सेवा कायद्यान्वये (मेस्मा) कारवाई करण्याची नोटीस देण्यात आली आहे. दरम्यान पारी प्रशासन व ठेकेदार चर्चेअंती संप मागे घेण्यात आला व बस सेवा पूर्वपदावर आली. अशी माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.

या संपामध्ये मे.ओलेक्ट्रा ग्रीनटेक, मे.ट्रॅव्हलटाईम कार रेटल प्रा.लि, मे.अॅन्टोनी गॅरेजेस प्रा.लि, मे. हंसा वहन इंडिया प्रा.लि., मे.एमपी इन्टरप्रायजेस अॅन्ड असोसिएटस लि, मे. इव्ही ट्रान्स प्रा.लि या कंपन्यांनी संपात सहभाग घेतला होता.

ठेकेदारांनी कोणतीही पूर्वसूचना न देता हा संप पुकारला असल्याने ठेकेदारांवर अत्यावश्यक सेवा कायद्यान्वये (मेस्मा) कारवाई करण्याची नोटीस पीएमपीएमएल प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

शुक्रवारी दुपारी प्रशासन व ठेकेदार चर्चेअंती संप मागे घेण्यात आला व बस सेवा पूर्वपदावर आली.

: मनसे कडून आंदोलन

पुणेकरांच्या सेवेसाठी असणाऱ्या  बसची सुविधा अचानकपणे बंद केल्यामुळे बसप्रवासी, नागरीक, विध्यार्थी, कामगार, छोटे व्यापारी असे अनेक घटक आज अचानकपणे अनेक मार्गावरील बस सुविधा बंद केल्या मुळे अनेकांना मोठी अडचण निर्माण झाली. त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहराच्या वतीने शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वाखाली पी एम पी एल प्रशासन कार्यालया समोर ठिय्या आंदोलन करून प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.  बस सेवा पुरवणाऱ्या ठेकेदारांची बिले थकवल्याने त्यांनी सेवा बंद केली परंतु प्रशासनाच्या या ढिसाळ नियोजनाचा पुणेकरानी त्रास का सहन करायचा असा प्रश्न उपस्थित करून प्रशासनाला जाब विचारण्यात आला पी एम पी एल सीएमडी मिश्रा यांना पक्षच्या वतीने निवेदन देण्यात आले.

BJP and MNS alliance : Sharad Pawar : भाजप आणि मनसे युतीबाबत शरद पवारांचे सूचक वक्तव्य 

Categories
Breaking News Political देश/विदेश महाराष्ट्र

भाजप आणि मनसे युतीबाबत शरद पवारांचे सूचक वक्तव्य

राज ठाकरेंनी मनसेच्या पाडवा मेळाव्यात केलेल्या भाषणापासूनच भाजपा आणि मनसे यांच्या संभाव्य युतीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राज ठाकरेंनी भाजपावर टीका करणं टाळून फक्त महाविकास आघाडीच्याच नेत्यांवर टीका केल्यामुळे या चर्चेला अधिकच बळ मिळालं आहे. त्यामुळे राज्य सरकारविरोधात मनसे भाजपासोबत जाऊन कडवं आव्हान उभं करणार का? यावर तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांनी हाच प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारला असता शरद पवारांनी केलेलं सूचक विधान मनसेच्या भविष्यातील राजकारणाविषयी तर्क-वितर्कांमध्ये भर घालणारं ठरलं आहे.

जळगावमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी मनसेच्या राजकीय भवितव्याविषयी देखील भाष्य केलं. सध्याच्या राजकीय वर्तुळामध्ये मनसे त्यांच्या भूमिकेच्या आधारावर आपली जागा निर्माण करू शकेल का? असा प्रश्न विचारला असता आत्तापर्यंत तसं काही झालं नसल्याचं शरद पवार म्हणाले. “ते मला सांगता येणार नाही. आत्तापर्यंत तर काही झालं नाही. पण सामाजिक ऐक्य धोक्यात येता कामा नये”, असं शरद पवार म्हणाले

“तुम्ही काहीही भूमिका घेतली तरी आमची भूमिका महत्त्वाची नाही. आमच्याबद्दल लोकांची भूमिका महत्त्वाची आहे. राज ठाकरेंबद्दल लोकांनी गेल्या निवडणुकीत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे”, असा टोला देखील त्यांनी लगावला.

राज ठाकरे हिंदूजननायक?

दोन दिवसांपासून राज ठाकरेंचा उल्लेख हिंदुजननायक म्हणून करणाऱ्या बॅनरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यासंदर्भात विचारणा केली असता मनसेला त्यांचं धोरण ठरवण्याचा अधिकार असल्याचं शरद पवार म्हणाले. “त्यांची जी भूमिका दिसली, त्यात पहिल्यांदा त्या सभेतलं त्यांचं भाषण ऐकल्यानंतर असं दिसतंय की त्या रस्त्याने जायचा त्यांचा कार्यक्रम दिसतोय. प्रत्येक पक्ष आपला कार्यक्रम ठरवत असतो. त्यांनीही तसा कार्यक्रम ठरवला असेल”, असं शरद पवार म्हणाले.

मनसे आणि भाजपाची युती होऊ शकते?

दरम्यान, यावेळी सध्या चर्चेत असलेल्या भाजपा-मनसे युतीविषयी माध्यमांनी विचारणा करताच शरद पवारांनी ते शक्य असल्याचं नमूद केलं आहे. “मी सांगू शकत नाही. पण दोघांचंही लक्ष सध्या सत्तेत असणाऱ्या संघटनेवर आहे. त्यांना एकत्र यायचं असेल तर ते येऊ शकतात”, असं शरद पवार यावेळी म्हणाले आहेत.

Last Day Of PMC : Administrator : नगरसेवक, सत्ताधाऱ्यांचा आज शेवटचा दिवस! : उद्यापासून महापालिकेवर प्रशासक 

Categories
Breaking News PMC Political पुणे

नगरसेवक, सत्ताधाऱ्यांचा आज शेवटचा दिवस!

: उद्यापासून महापालिकेवर प्रशासक 

पुणे – पुणे महापालिकेच्या (Pune Municipal कॉर्पोरेशन) सभागृहाचा आज अखेरचा दिवस असणार आहे. सर्व पक्षीय नगरसेवक आणि सत्ताधारी भाजपचा हा शेवटचा दिवस आहे. निवडणुका होईपर्यंत मंगळवारपासून महापालिकेत प्रशासक (Administrator) सुरू होणार आहे. दरम्यान, आज शेवटच्या दिवशी महापालिकेची निरोपाची ऑनलाइन सभा (Online Meeting) होणार आहे. त्यामुळे या शेवटच्या सभेत एकमेकांवर कुरघोड्या, पाच वर्षांच्या कारभाराचा मागोवा घेतानाच सत्ताधारी व विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता असल्याने याकडे लक्ष लागले आहे.

कोरोना आणि ओबीसी आरक्षणामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे गेल्या आहेत. पुणे महापालिकेसाठी तीन सदस्यांच्या प्रभाग निश्चित केला आहे. या प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा जाहीर होऊन त्यावर हरकती-सूचना मागविण्यात आल्या. त्याची सुनावणी होऊन प्रारूप आराखड्यात आवश्‍यक असलेल्या बदलांचा अहवाल निवडणूक आयोगाकडे सादर केला आहे. त्यामुळे अंतिम आराखडा जाहीर करून आरक्षणाची सोडत जाहीर करण्याची प्रक्रिया अद्याप शिल्लक आहे. त्यातच राज्य सराकरने विधिमंडळात नवीन कायदा पारित करून निवडणूक आयोगाचे अधिकार स्वतःकडे घेतले आहेत. त्यामुळे या निवडणुका किमान सहा महिने पुढे जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

: स्थायी समितीच्या बैठकीत काय होणार?

 दुपारी सव्वाबारा वाजता स्थायी समितीची अंदाजपत्रकाची बैठक आहे. यामध्ये भाजपकडून उपसूचना मांडून त्यांना आयुक्तांनी मांडलेल्या अंदाजपत्रकात हवे ते बदल करून घेतले जाण्याची शक्यता आहे. मात्र, आयुक्तांनी मांडलेल्या अंदाजपत्रकात बदल करता येत नाहीत. त्यासाठी मुख्यसभेची मान्यता घ्यावी लागते, असा पवित्रा विरोधकांनी घेतला आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या बैठकीत वाद होण्याची शक्यता आहे. दुपारी तीन वाजता आॅनलाइन मुख्यसभा होणार आहे. या मुख्यसभेत महत्त्वाचे विषय नाहीत. पण या सभेत गेल्या पाच वर्षांचा मागोवा घेणारी भाषणे व भावनिक भाषणे होण्याची शक्यता आहे. सुविधा काढून घेणारमंगळवारपासून आयुक्त विक्रम कुमार हे प्रशासक म्हणून महापालिकेचा कारभार सांभाळणार आहेत. महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांची कार्यालय, गाड्या व इतर सुविधा काढून घेतल्या जातील. त्याबाबतही प्रशासनाकडून तयारी सुरु झाली आहे.

स्थायी समितीच्या बैठकीत आयुक्तांनी मांडलेल्या अंदाजपत्रकावर चर्चा होणार आहे. याचवेळी भाजपकडून स्थायी समिती बरखास्त होऊ शकत नाही, त्यामुळे अध्यक्ष हेमंत रासने हेच पुढील वर्षाचे अंदाजपत्रक मांडणार असे सांगत आहेत. त्यास विरोधीपक्षांनी विरोध केला आहे.  बैठकीत अंदाजपत्रकावर उपसूचना देऊन त्यात बदल करायचे प्रस्ताव भाजपकडून केले जाऊ शकणार आहेत. तर प्रशासनाने राज्य सरकारकडे भाजपच्या दाव्याबाबत खुलासा मागितलेला असून, त्यावर उत्तर न मिळाल्यास प्रशासनाला कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे.

: भाजप पुन्हा नको; शिवसेना करणार आंदोलन

दरम्यान शहर शिवसेना आज दुपारी महापालिकेत आंदोलन करणार आहे. भाजप पुन्हा नको रे बाबा, अशा पद्धतीच्या घोषणा शिवसेनेने तयार केल्या आहेत. तसेच   पुणे महापालिकेत मागील पाच वर्षात केलेला भ्रष्टाचार पथनाट्याच्या माध्यमातून जनतेसमोर मांडण्यात येणार आहे. तसेच पालिकेतील भ्रष्टाचाराची उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणी आंदोलनाद्वारे करण्यात येणार आहे.

Raj Thackeray : पालिका निवडणुका पुढे का ढकलल्या.. : राज ठाकरेंनी सांगितले कारण 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

पालिका निवडणुका पुढे का ढकलल्या..

: राज ठाकरेंनी सांगितले कारण

पुणे: राज्यातील महापालिका निवडणुका पुढे ढकलण्यामागचं खरं कारण ओबीसींचं आरक्षण नव्हे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठीक नाही, हे निवडणुका पुढे ढकलण्यामागचं प्रमुख कारण असल्याचं मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले. मनसेच्या १६ व्या वर्धापनदिनानिमित्त ते पुण्यात बोलत होते. ओबीसींचं आरक्षण केवळ लोकांना सांगण्यापुरतं असल्याचं राज यांनी म्हटलं.

निवडणुका लांबणीवर पडणार असल्याचं मी माझ्या सहकाऱ्यांना नोव्हेंबरपासूनच सांगत होतो. निवडणुका जवळ आल्या की जाणवतं. निवडणूक चढायला लागते. मला तसं काहीच जाणवत नव्हतं. ओबीसी समाजाचं आरक्षण गेल्यानं निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या हे कारण खोटं आहे. मुख्यमंत्र्यांची प्रकृती निवडणुका पुढे ढकलण्यामागचं खरं कारण आहे, असं राज ठाकरे म्हणाले. निवडणुका पुढे ढकलणं सरकारसाठी सोयीचं आहे. तीन महिन्यांनी निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तीन महिन्यांनी निवडणूक म्हणजे जून महिना उजाडेल. पावसात निवडणुका घेणार आहात का, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. पालिकांची मुदत संपली की प्रशासक नेमायचा. तो आपल्या मर्जीतला नेमला की मग पालिका आपल्याच हातात, असा सरकारचा डाव असल्याचं राज ठाकरे म्हणाले.

निवडणुका लोकांना हव्यात का याचा राजकीय पक्षांनी जरा कानोसा घ्यावा. लोकांना काहीच वाटत नाही. तुमच्या निवडणुका झाल्या काय आणि नाही झाल्या काय लोकांना त्याचं काहीच वाटत नाही, हे कानोसा घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. मार्च-एप्रिलमध्ये निवडणुका लागल्या असत्या तरीही लोकांच्या आयुष्यात काही बदल झाला नसता. निवडणुका आता थेट दिवाळीनंतरच लागतील, असा अंदाज राज यांनी वर्तवला.

Raj Thackeray : राज्यपाल आणि संजय राऊत यांची राज ठाकरे यांनी केली नक्कल 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

राज्यपाल आणि संजय राऊत यांची राज ठाकरे यांनी केली नक्कल

पुणे – मनसेच्या वर्धापन दिनानिमित पुण्यात झालेल्या कार्यक्रमात मनसे सुप्रीमो राज ठाकरे  यांनी बऱ्याच काळातनंतर तुफान बॅटिंग केली. यावेळी राज ठाकरे  यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानावरून राज्यपालांवर जोरदार निशाणा साधला. तुम्हाला शिवराय समजतात का? जर एखाद्या विषयातलं आपल्याला समजत नसेल तर त्यावर भाष्य कशाला करायचं, अशा शब्दात राज ठाकरे  यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा समाचार घेतला. शिवाय आपल्या ठाकरी शैलीत राज्यपाल आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची नक्कल केली.

राज्यपालांवर निशाणा साधताना राज ठाकरे म्हणाले. सध्या महाराष्ट्रात महापुरुषांवरून माथी भडकवण्याचं काम सुरू आहे. त्यात हे आपले राज्यपाल. एकदा मी त्यांना भेटायला गेलो तर वाटलं हे तर कुडमुडे ज्योतिषी आहेत की काय. त्यांनी शिवरायांबाबत एक विधान केलं. पण आपल्याला ज्या विषयातील माहिती नाही, त्या विषयावर बोलायचं कशाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपण कधी रामदास स्वामींचे शिष्य असल्याचं सांगितलं नाही. ना रामदास स्वामींनी आपण शिवरायांचा गुरू असल्याचा दावा केलाय. पण रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांवर जेवढं चांगलं लिहिलंय, तेवढं कुणीही लिहिलेलं नाही. निश्चयाचा महामेरू… हे सुभाषित आज पुन्हा वाचा, असा सल्लाही राज ठाकरे यांनी दिला.

यावेळी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा अवमान करण्यावरूनही राज ठाकरेंनी राज्यपालांवर निशाणा साधला. इतक्या छोट्या वयात लग्न व्हायची, हे मला माहितच नव्हतं, असे राज्यपाल म्हणाले, पण त्याकाळात लहानपणी लग्न व्हायची. बालविवाह व्हायचे. पण तुमचे अजून झाले नाही, असा टोला त्यांनी लगावला.