Walchandnagar Industries and VCB Electronics | वालचंदनगर इंडस्ट्रीज आणि व्हीसीबी इलेक्ट्रॉनिक्सचा आपल्याला सार्थ अभिमान | खासदार  सुप्रिया सुळे यांच्याकडून लोकसभेत दोन्ही कंपन्यांचा गौरव

Categories
Breaking News Political social देश/विदेश पुणे

Walchandnagar Industries | VCB Electronics  | वालचंदनगर इंडस्ट्रीज आणि व्हीसीबी इलेक्ट्रॉनिक्सचा आपल्याला सार्थ अभिमान

| खासदार  सुप्रिया सुळे यांच्याकडून लोकसभेत दोन्ही कंपन्यांचा गौरव

Walchandnagar Industries | VCB Electronics  | दिल्ली : ‘चांद्रयान-३’ मोहिमेत (Chandrayaan 3) बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramati Lok Sabha Constituency)  वालचंदनगर येथील वालचंद इंडस्ट्रीज् आणि खेड शिवापूर येथील व्हिसीबी इलेक्ट्रॉनिक्स (Walchandnagar Industries and VCB Electronics ) या दोन कंपन्यांचेही योगदान असल्याचे सांगताना आपल्याला अभिमान वाटतो, असे उद्गार खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी लोकसभेत काढले. लोकसभेत ‘चांद्रयान-३’ मोहिम आणि भारताच्या अवकाश क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल आयोजित चर्चेत सहभागी होताना. त्यांनी आपला मतदार संघ आणि या दोन कंपन्यांचा आवर्जून उल्लेख केला.

प्रधानमंत्री आपल्या भाषणात नेहमी स्वदेशी बनावटीच्या उपकरणांचा उल्लेख करतात. तो धागा पकडून खासदार सुळे यांनी, चांद्रयान मोहिमेतील इलेक्ट्रॉनिक चिप्स आणि इतर उपकरणे आपल्या मतदारसंघात तयार झाली ही अभिमानास्पद बाब असल्याचे नमूद केले. वालचंदनगर इंडस्ट्री ही शंभरहून अधिक वर्षांची तर व्हिसीबी इलेक्ट्रॉनिक्सची तेरा चौदा वर्षांची वाटचाल असल्याचे त्यांनी सांगितले. भानुदास भोसले, सुजाता भोसले, संदिप चव्हाण आणि सोमसुंदर यांनी या कंपनीच्या माध्यमातून चांद्रयान मोहीमेसाठी काम केले. अशा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणे ही आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे, असे त्यांनी नमूद केले.

चांद्रयान मोहीमेबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, गेल्या साठ वर्षांतील आपल्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अथक परीक्षांचे ‘चांद्रयान-३’ हे फलित आहे. आपल्या शास्त्रज्ञांचे प्राविण्य, क्षमता आणि गुणवत्ता यांच्या जोरावर ‘इस्रो’ने हे शक्य करुन दाखविले. इस्रोच्या यशात देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु, थोर शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्यासह इ. व्ही.‌ चिटणिस, प्राफेसर धवन, डॉ ब्रह्मप्रकाश, यू. आर. राव, डॉ. नायर, डॉ. के. कस्तुरीरंगन, डॉ कृष्णा, डॉ शिवम्, डॉ सोमनाथ अशा थोर शास्त्रज्ञांचे अतुलनिय योगदान आहे, असे त्या म्हणाल्या.

चांद्रयान मोहिमेबाबत सरकारच्या वतीने करण्यात आलेले भाषण जोरदार होते. परंतु या भाषणाने किंचित निराशा हाती आली, असे सांगताना सुळे यांनी अंधश्रद्धेवर भाष्य केले. त्या म्हणाल्या, ‘सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या भाषणातून ‘चांद्रयान-४’ किंवा ‘आदित्य एल वन टू थ्री’ मोहिमेबाबत काही वाट दिसेल. भविष्याची दिशा दिसेल अशी अपेक्षा होती. गणित, मापनशास्त्र, अवकाशशास्त्र आदी क्षेत्रात भारतीयांनी प्राचीन काळापासून अतिशय उत्तम कामगिरी केली आहे. ही कामगिरी लक्षात घेता आपण ते ज्ञान पुढे घेऊन जाणे गरजेचे आहे. पण काही लोक अंधश्रद्धेत अडकले आहेत. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा असू नये. महाराष्ट्रात एका भाजपा आमदाराकडे एक बाबा आला होता. ती व्यक्ती अंगावर कांबळं टाकून लोकांना बरे करीत असल्याचा दावा करीत होता. चांद्रयानाची चर्चा करताना दुसरीकडे आपण अशा गोष्टींवर विश्वास ठेवतो हे बरोबर नाही. डॉ नरेंद्र दाभोळकर, गौरी लंकेश, गोविंद पानसरे आणि एम. एम. कलबुर्गी आदींनी अंधश्रद्धेच्या विरोधातील लढ्यात आणि विज्ञाननिष्ठ विचारांसाठी बलिदान दिले, हे आपण विसरता कामा नये’. माजी राष्ट्रपती व थोर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या, ‘झोपेत पडलेली स्वप्ने ही स्वप्ने नव्हेत, तर जी पूर्ण होईपर्यंत तुम्ही झोपत नाही ती खरी स्वप्ने’ या वचनाचा सुळे यांनी उल्लेख केला.


News Title | Walchandnagar Industries and VCB Electronics are rightly proud of us | MP Supriya Sule felicitated both the companies in the Lok Sabha

PMRDA | Supriya Sule | पीएमआरडीए क्षेत्रामधील घरकुलासाठी आर्किटेक्टच्या डीपीआरची अट रद्द होणार

Categories
Breaking News Political social पुणे

PMRDA | Supriya Sule | पीएमआरडीए क्षेत्रामधील घरकुलासाठी आर्किटेक्टच्या डीपीआरची अट रद्द होणार

| स्वतः पीएमआरडीएच डीपीआर करणार असल्याचे खा. सुळे यांना आयुक्तांचे आश्वासन

PMRDA | Supriya Sule | पुणे : पीएमआरडीए क्षेत्रामध्ये (PMRDA Area) घरकुल मागणी करताना त्याचा डीपीआर (DPR) आर्किटेक्टकडून करून घेण्याची अट आहे, ती अट रद्द करून स्वतः पीएमआरडीएनेच घरकुलाचे प्लॅन तयार करुन मंजूरी देणार असल्याचे आश्वासन दिले आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्या सूचनेला पीएमआरडीएने आज मान्य केले असून घरकुलाच्या परवानग्या घेणे आता सोपे होणार असल्याचे मानण्यात येत आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडीए अंतर्गत येणाऱ्या पुरंदर, खडकवासला विधानसभा, मुळशी आणि दौंड तालुक्यातील विविध विषयांसंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल (IAS Rahul Mahiwal) यांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली. यावेळी झालेल्या बैठकीत महिवाल यांनी घरकुलाबाबतची ही सूचना मान्य केल्याचे सुळे यांनी सांगितले. (PMRDA Pune)
पीएमआरडीए मध्ये घरकुल मागणी करताना घरकुलाचा डीपीआर आर्किटेक्टकडून करून घेण्याची अट आहे, ती अट रद्द करण्याची मागणी सुळे यांनी केली. पीएमआरडीएनेच घरकुलाचे प्लॅन तयार करुन मंजूरी द्यावी अशी सूचना त्यांनी यावेळी मांडली. आयुक्तांनी ती मागणी तात्काळ मान्य केली असून आवश्यक ते बदल करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. यासाठी आपण त्यांचे आभार मानतो, असे सुळे यांनी नमूद केले. पीएमआरडीएचे अन्य अधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे खडकवासला विधानसभा अध्यक्ष सोपान(काका) चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे खडकवासला ग्रामीणचे अध्यक्ष त्रिंबक मोकाशी, महादेव कोंढरे, भरत झांबरे, सुधाकर गायकवाड, खुशाल कारांजावणे आदी पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

Jejuri | Supriya Sule | जेजुरी स्थानक अद्ययावत करा | खासदार सुप्रिया सुळे यांचे राज्य सरकारला पत्र

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

Jejuri | Supriya Sule | जेजुरी स्थानक अद्ययावत करा  | खासदार सुप्रिया सुळे यांचे राज्य सरकारला पत्र

Jejuri | Supriya Sule | पुणे : बारामती लोकसभा मतदार संघातील (Baramati Lok Sabha Constituency) भोर, वेल्हा, मुळशी आदी तालुक्यासह अन्य सर्वच तालुक्यांतील एसटी स्थानकांच्या इमारती तसेच गाड्या आणि अन्य अडचणी दूर कराव्यात अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी राज्य शासनाकडे केली आहे. विशेषतः राज्य आणि देशभरातून येणाऱ्या भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जेजुरी स्थानकाची दुरुस्ती आणि सर्वत्र हिरकणी कक्ष सुरू करण्याबाबतही त्यांनी सरकारचे लक्ष वेधून घेतले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री तथा परिवन मंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे त्यांनी ही मागणी केली असून तसे पत्रही त्यांना पाठवले आहे. नुकताच खासदार सुळे यांनी बारामती लोकसभा मतदार संघाचा दौरा केला. त्यावेळी भोर एसटी स्थानकाला प्रत्यक्ष भेट देऊन त्यांनी पाहणीही केली आहे. याशिवाय ठिकठिकाणच्या ग्रामस्थांकडून, एस. टी. प्रवास करताना येणाऱ्या अडचणींबाबत माहिती मिळाल्याचे त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. परिवहन महामंडळाच्या गाड्यांची संख्या वाढविण्यात यावी, तसेच गाड्यांचे वेळापत्रक नियमितपणे पाळण्यात यावे. बऱ्याच गाड्या फार जुन्या झाल्या आहेत. अस्वच्छ असतात. प्रवासादरम्यान बंद पडतात. अशा गाड्यांची दुरुस्ती वेळोवेळी केली जावी, असे त्यांनी म्हटले आहे. (MP Supriya Sule)
काही गावांच्या जवळ असलेल्या महामार्गावर उड्डाणपूल असलेल्या ठिकाणी एसटी गाड्या पुलावरून जातात परिणामी गावांतील प्रवाशांची गैरसोय होते. तरी गाड्या उड्डाण पुलावरून  न नेता, पुलाच्या खालील मार्गावरून नेली जावी.
काही एस. टी. स्थानकांच्या इमारती जुन्या झाल्या आहेत, गळत आहे. एस. टी. स्थानकांमध्ये अस्वच्छता, कचरा पसरलेला देखील असतो. अशा इमारतींची देखभाल दुरुस्ती होणे व वेळोवेळी स्वच्छता होणे गरजेचे आहे. याबरोबरच प्रत्येक एस. टी. स्थानकावर हिरकणी कक्ष उभारण्यात यावा तसेच महिला, पुरुष व दिव्यांग प्रवाशांसाठी सोयीचे होईल अशा पद्धतीचे स्वच्छतागृह असणे आवश्यक आहे. यासाठी कायमस्वरूपी उपाय योजना करण्यात यावी, असे सुळे यांनी म्हटले आहे.
पुरंदर तालुक्यातील जेजुरी हे नावलौकिक असलेले तीर्थक्षेत्र व भाविकांचे श्रद्धास्थान आहे. लाखो भाविक व पर्यटक जेजुरी येथे एसटीने येतात. अशा या जेजुरी एसटी स्थानकाची मात्र दुरवस्था झाली आहे. तरी या ठिकाणी सुसज्ज, अद्ययावत एसटी स्थानक असणे आवश्यक आहे, जेणेकरून येथे येणारे भाविकांना, वुद्ध, महिला, दिव्यांग व लहान मुले यांना सोयीचे होईल.
याबरोबरच भोर, वेल्हा, मुळशी तालुक्यातील पौड व इंदापूर  एस. टी. स्थानकांची दुरावस्था झाली आहे. या सर्वच एसटी स्थानकातील डांबरीकरण पावसामुळे उखडले गेले असून खड्डे पडले आहेत. तरी या एसटी स्थानकांचे कॉंक्रीटीकरण होणे गरजेचे आहे. याबाबत आपण वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करत आहोत, तरी प्रवाशांच्या सोयीचा सकारात्मक विचार करून राज्य परिवहन मार्गाच्या सेवेत सुधारणा करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात, असे खासदार सुळे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

MP Supriya Sule | Drought in Maharashtra | राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची खासदार सुप्रिया सुळे यांची राज्य सरकारकडे मागणी

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र शेती

MP Supriya Sule | Drought in Maharashtra | राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची खासदार सुप्रिया सुळे यांची राज्य सरकारकडे मागणी

MP Supriya Sule | Drought in Maharashtra | पुणे : संपूर्ण महाराष्ट्रातच  (Maharashtra) यंदा पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहिले असून काही भागात तर अद्याप पाऊस झालाच नाही. शेतकऱ्यांच्या हातचे पिक निघून गेले आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने त्यांना तातडीने विम्याची रक्कम देण्याबरोबरच राज्यात दुष्काळ (Drought) जाहीर करावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी केली आहे. (MP Supriya Sule | Drought in Maharashtra)

महाराष्ट्रात जुन, जुलै या महिन्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यातच या ऑगस्ट महिन्यात देखील सरासरीपेक्षा सुमारे ६८ टक्क्यांनी पाऊस कमी झाला आहे. शिवाय १ ते १८ ऑगस्ट दरम्यान सर्वच विभागांत पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा ८० टक्क्यांनी कमी आहे. अनेक ठिकाणी तर पाऊस पडलेलाच नाही. ही परिस्थिती भीषण असून शेतकऱ्यांचे हातचे पीक निघून गेले आहे. हे पाहता या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणे आवश्यक आहे. यासोबतच महाराष्ट्र शासनाने राज्यात दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे सांगत ट्विट करून सुळे यांनी ही मागणी केली आहे. (Less rain in Maharashtra)

पाऊस आणि उपलब्ध पाणीसाठ्याच्या परीस्थितीचा तातडीने आढावा घ्यावा. तसेच पिण्याच्या पाण्याचे टॅंकर, जनावरांसाठी चारा छावण्या आणि इतर दुष्काळी कामे हाती घेण्यासंदर्भात तातडीने सकारात्मक विचार करुन अंमलबजावणी करावी, असे त्यांनी नमूद केले आहे.

Katraj-Kondhwa Road Accident | कात्रज-कोंढवा रस्त्यावर स्मशानभूमी चौकात कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात | अपघातानंतर खासदार सुळे यांची मागणी

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Katraj-Kondhwa Road Accident | कात्रज-कोंढवा रस्त्यावर स्मशानभूमी चौकात कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात | अपघातानंतर खासदार सुळे यांची मागणी

Katraj-Kondhwa Road Accident |कात्रज-कोंढवा रस्त्यावर (Katraj-Kondhwa Road Accident) खडीमिशन पोलीस चौकीपासून जवळच झालेल्या अपघातानंतर खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी चिंता व्यक्त केली आहे. सातत्याने या ठिकाणी अपघात आणि वाहतूक कोंडी होती असल्याने येथे कायमसावरूपी उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी ट्विटद्वारे केली आहे. (Katraj-Kondhwa Road Accident)

जिल्ह्याचे पालकमंत्री आणि प्रशासनाने याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे सुळे यांनी म्हटले आहे. आज झालेल्या अपघातात कंटेनरचे ब्रेक फेल झाल्यामुळे त्याचा धक्का बसून आठ वाहनांचे नुकसान झाले. यामध्ये स्कुल बसचाही समावेश आहे. शिवाय एका व्यक्तीला प्राण गमावावे लागले. या अपघातामुळे जवळपास दोन तीन तास वाहतूक ठप्प झाली होती, असे त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे. (Pune Accident News)

अपघात जेथे झाला ती जागा उताराची अरुंद असून अपघातप्रवण आहे. येथे सातत्याने दुर्दैवी घटना घडतात. यापूर्वीही अनेक नागरीकांना याठिकाणी झालेल्या छोट्या मोठ्या अपघातांत गंभीर स्वरुपाच्या दुखापतींना सामोरे देखील जावे लागले आहे. हे रोखण्यासाठी येथे कायमस्वरुपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. याबाबत पालकमंत्री पुणे आणि शासनाने सकारात्मक विचार करावा, असे खासदार सुळे यांनी पुढे नमूद केले.  (Pune News)


News Title |Katraj-Kondhwa Road Accident | Permanent measures should be taken at the cemetery square on the Katraj-Kondhwa road MP Sule’s demand after the accident

Baramati Lok Sabha Constituency | बारामती लोकसभा मतदार संघातील रस्त्यांबात खा. सुळे यांची गडकरी यांच्याशी सविस्तर चर्चा

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

Baramati Lok Sabha Constituency | बारामती लोकसभा मतदार संघातील रस्त्यांबात खा. सुळे यांची गडकरी यांच्याशी सविस्तर चर्चा

| लेखी निवेदन देत तातडीने कामे करण्याची मागणी

Baramati Lok Sabha Constituency | दिल्ली : बारामती लोकसभा मतदार संघातून Baramati (Lok Sabha Constituency)जाणारे विविध राष्ट्रीय महामार्ग (National Highways) आणि त्यांवरील प्रलंबित तसेच चालू असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी केंद्रिय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Union Highways and Road Minister Nitin Gadkari) यांच्याकडे केली. (Baramati Lok Sabha Constituency)
दिल्ली येथे गडकरी यांची भेट घेऊन सुळे यांनी या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करून लेखी निवेदन दिले. यात पालखी मार्गावरील नीरा जंक्शन आणि लोणंद सातारा रस्ता हे राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करणे, पुणे सोलापूर रस्त्यावर इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे भुयारी मार्ग तयार करणे तसेच लोणी काळभोर, उरुळी कांचन, यवत, वरवंड, पाटस आदी गावांतील नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी आवश्यक त्या सुरक्षेच्या उपाययोजना करणे ही कामे तातडीने पूर्ण करण्याची गरज असल्याचे सुळे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यात वरवंड विभागात भुयारी मार्ग आणि सहजपुर येथे उड्डाणपूल उभारणे अत्यावश्यक असून याबाबत स्थानिक नागरिक सातत्याने मागणी करत आहेत. ही बाब आपण यापूर्वीही लक्षात आणून दिल्याचे पत्रात म्हटले आहे. पुरंदर तालुक्यात सासवड रस्त्यावर हडपसर ते दिवे घाट या पालखी महामार्गाचे रुंदीकरण, भोर तालुक्यात करंदी-कांबरे आणि भाटघर धरणाकडे राजगड वेळवंड खोऱ्यातून जाणाऱ्या राज्य रस्त्यावर पूल उभारणी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
वेल्हा तालुक्यातील अत्यंत महत्वाचा मढेघाट मार्गे महाड मध्ये जाणारा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्याबाबत खासदार सुळे यांनी पुन्हा एकदा आठवण करून देत निधीचीही मागणी केली आहे. याबरोबरच मुळशी तालुक्यातील भुगाव आणि घोटावडे फाटा येथे उड्डाणपूल उभारणी करण्याबाबत त्यांनी निवेदनात उल्लेख केला आहे. हवेली तालुक्याच्या शहरी भागात येणाऱ्या खडकवासला मतदार संघात मुंबई बंगळूर बाह्यवळण महामार्गाला संलग्न असा वडगाव बुद्रुक येथील उड्डाण पुलापासून वारजे पर्यंत मुठा नदीवर बारा मीटर रुंदीचा पूल उभारणी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
बारामती लोकसभा मतदार संघातील रस्त्यांबाबत या वरील सर्व मागण्यांचा सरकारने सकारात्मक विचार करून तातडीने उपाययोजना कराव्यात, असे सुळे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. दिल्ली येथे केंद्रिय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांना आपल्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली आणि लेखी निवेदन दिले.
—-
News Title | Baramati Lok Sabha Constituency | Street in Baramati Lok Sabha Constituency. Sule’s detailed discussion with Gadkari

Pune Water Cut | दिवसाआड पाणी देणा-या गावामध्ये गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेऊ नये

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Pune Water Cut | दिवसाआड पाणी देणा-या गावामध्ये गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेऊ नये

| खासदार सुप्रिया सुळे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी

Pune Water Cut |  बारामती लोकसभा मतदार संघातील (Baramati Lok Sabha Constituency) आणि पुणे महापालिका हद्दीत (Pune Municipal Corporation Limits) समाविष्ट झालेल्या काही गावांमध्ये दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. या गावांत पुन्हा गुरुवारी पाणी बंद (Water Cut on Thursday) ठेवले अजून विस्कळीतपणा येतो. त्यामुळे अशा गावांत गुरुवारी पाणी बंद ठेऊ नये. अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांच्याकडे केली आहे. (Pune Water Cut)

खासदार सुळे यांच्या पत्रानुसार बारामती लोकसभा मतदार संघातील पुणे महानगर पालिकेत समाविष्ट गावांना दिवसाआड आणि अनियमित पाणी पुरवठा होतो. तसेच नव्याने समाविष्ट धायरी, न-हे, नांदोशी सणसनगर या गावात विभागानुसार फक्त अर्धातास ते एक तास ऐवढाच पाणी पुरवठा केला जातो. त्यातच काही ठिकाणी महावितरणकडून त्या परिसरातील लाईट गेली तर त्या परिसरात पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. सद्य स्थितीत अनेक सोसायटयांमध्ये व गावांमध्ये असलेल्या पाण्याच्या कुपनलिका उन्हाळ्यामुळे बंदा पडलेल्या आहेत. त्यामुळे आत्ताच नागरीक पाणी समस्यांमुळे हैराण आहेत. (PMC Pune News)

सुळे यांनी म्हटले आहे कि, जर पुणे महानगर पालिकेने दिवसाआड पाणी देणा-या गावामध्ये गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेवला तर त्या परिसरामध्ये पाण्यासाठी नागरीकांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता निर्माण होऊ शकते. त्यामुळे ज्या गावात दिवसाआड पाणी पुरवठा आहे त्या ठिकाणचे पाणी आहे त्या प्रमाणे चालू ठेवावे. त्या मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करू नये. अशी मागणी सुळे यांनी केली आहे. (Pune Water Cut Update)
——
News Title |Pune Water Cut | Water supply should not be shut off on Thursday in a village that provides water during the day | MP Supriya Sule’s request to Municipal Commissioner

Vetal Tekadi | वेताळ टेकडीला नैसर्गिक वारसास्थळ म्हणून जाहीर करण्याच्या मागणीला जोर | खासदार सुप्रिया सुळे यांचे समर्थन 

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Vetal Tekadi | वेताळ टेकडीला नैसर्गिक वारसास्थळ म्हणून जाहीर करण्याच्या मागणीला जोर | खासदार सुप्रिया सुळे यांचे समर्थन

Vetal Tekadi | पुणे शहरातील वाहतूक कोंडी (Pune Traffic) कमी करण्यासाठी पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) वेताळ टेकडीवर रस्ता व बोगदा तयार केला जाणार असल्याने पुणेकरांचा याला विरोध होत आहे.  टेकडीवरील प्रकल्प रद्द करून वेताळ टेकडीला नैसर्गिक वारसास्थळ, विकास क्षेत्र म्हणून जाहीर करण्याची मागणी केली जात आहे. याचे खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी देखील समर्थन केले आहे. याबाबत सुळे यांनी महापालिका आयुक्तांना (PMC Commissioner) पत्र लिहीत पर्यावरण तज्ज्ञांशी चर्चा करून तोडगा काढण्याची मागणी केली आहे. (Vetal Tekadi)

 सुप्रिया सुळे  १८ एप्रिल २०२३ रोजी वेताळ टेकडीवर जाऊन पाहणी केली. या प्रकल्पाअंतर्गत बालभारती ते पौड फाटा रस्ता आणि कोथरुड, पाषाण आणिसेनापती बापट रोड यांना जोडणारे दोन बोगदे तयार केले जाणार आहेत. यासाठी वेताळ टेकडी फोडून त्या जागेवर दोन बोगदे आणि एक पूल बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होणार असल्यामुळे वेताळ टेकडी बचाव कृती समिती व पुणेकरांचा याला विरोध आहे. (Pune News)

विकास करत असताना पर्यावरणाचा समतोल राखणे देखील गरजेचे आहे. वेताळ टेकडी बचाव कृती समितीने टेकडीवरील प्रकल्प रद्द करून वेताळ टेकडीला नैसर्गिक वारसास्थळ, विकास क्षेत्र म्हणून जाहीर करण्याची मागणी केली आहे. तरी स्थानिक नागरिक, पर्यावरण तज्ञ, तांत्रिक तज्ञ यांच्याशी चर्चा सर्वमान्य मार्ग काढावा. असे सुळे यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. (Pune Municipal Corporation News)
News Title | Vetal Tekadi | Demand to declare Vetal hill as a natural heritage site Support of MP Supriya Sule

Government Certificates | महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासकीय दाखले मिळण्यातील अडचणी दूर करा | खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

Government Certificates | महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासकीय दाखले मिळण्यातील अडचणी दूर करा

| खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी

Government Certificate’s | सध्या महाविद्यालयीन प्रवेश (College Admissions) सुरु आहेत. यासाठी विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले (Certificate’s) आवश्यक आहेत. परंतु शासकीय यंत्रणांकडून विविध कारणांमुळे दाखले देण्यास उशीर होत आहे. शासनाने याची दखल घेऊन ही प्रक्रिया सुलभ आणि जलद करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी ट्विटद्वारे (Twitter) केली आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रवेशदरम्यान जात (Cast Certificate), उत्पन्न (Income Certificate), नॉन क्रिमिलेअर, अधिवास (Residential Certificate) आदी दाखले अत्यावश्यक असतात. त्यासाठी संबंधित मुलांसह त्यांचे पालकही सेतू केंद्रामध्ये (Setu Kendra) चकरा मारत आहेत. तथापि सर्व्हर डाउन असण्यापासून अन्य वेगवेगळ्या अडचणी येत असून अर्जदार विद्यार्थ्यांचा खोळंबा होत आहे. पुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हा, मुळशी, या दुर्गम तालुक्यांसह अन्य भागातून आणि खुद्द पुणे शहरातूनही अशा अडचणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबतच्या बातम्याही वृत्तपत्रादी माध्यमांतून प्रसिद्ध होत आहेत. गेल्या आठवडाभरापासून हे प्रकार होत आहेत. याची दखल घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हा प्रशासनाला सूचना केल्या आहेत. तातडीने या अडचणी सोडवून विद्यार्थांची गैरसोय दूर करावी, असे त्यांनी म्हटले आहे.

महाविद्यालयांना देखील या दाखल्यांसाठी मुलांचे प्रवेश थांबवून ठेऊ नयेत. हमीपत्र घेऊन त्यांना प्रवेश द्यावेत. याबाबत शासनाने देखील अधिक गोंधळ टाळण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.

Pune Property Tax | समाविष्ट गावांत मिळकतकर ग्रामपंचायतीच्या दरानेच आकारावा |  महापालिका अधिनियम १२९ अ (१) चा अवलंब व्हावा

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Pune Property Tax | समाविष्ट गावांत मिळकतकर ग्रामपंचायतीच्या दरानेच आकारावा |  महापालिका अधिनियम १२९ अ (१) चा अवलंब व्हावा

| खा. सुप्रिया सुळे यांच्या सूचनेनुसार स्थानिक लोकप्रतिनिधींची अतिरिक्त आयक्तांसोबत बैठकीत चर्चा

Pune Property Tax |  महापालिकेत (Pune Municipal Corporation) नव्याने समाविष्ट केलेल्या गावांतील (Merged Villages) नागरिकांना मिळकतकर, समावेश केलेल्या तारखेपासून दुसऱ्या वर्षीच्या ३१ मार्च पर्यंत ग्रामपंचायतीच्या दरानेच आकारावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी केली आहे. याबरोबरच या भागातील औद्योगिक क्षेत्र आणि व्यावसायिक गाळे यांसाठी आकारण्यात येणाऱ्या मिळकत करांसाठी महानगरपालिका अधिनियम १२९ अ (१) चा अवलंब करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. (Pune Property Tax)

महापालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या बारामती लोकसभा मतदार संघातील (Baramati Lok sabha Constituency) वारजे, धायरी, वडगाव, खडकवासला आदी गावांतील नागरिकांची ही मागणी असून अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांवर याबाबत उहापोह करण्यात आला आहे. या आशयाचे पत्र खासदार सुळे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना लिहिले आहे. सुळे यांच्या सुचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक लोकप्रतिनिधी सचिन दोडके, बाबा धुमाळ, अतुल दांगट, विकास दांगट, अविनाश जोगदंड, संजय धावडे, अतुल धावडे, राहुल दांगट, चंद्रशेखर मोरे, सुरेंद्र कामठे सचिन देशमुख, चेतन दांगट, सौरभ दांगट, सागर दांगट आदींनी आज अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार (Additional Commissioner Kunal Khemnar) यांच्यासोबत बैठक घेऊन विषयावर सविस्तर चर्चा केली. (PMC Pune Property Tax Department)

महापालिकेत गाव समाविष्ट झाल्यापासून त्यांनतर पुढील दर वर्षी मार्च महिन्यापासून सर्वसाधारण कर व इतर सेवा कर यांच्या एकत्रित बेरजेतून ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण करातील उर्वरित रकमेच्या २० टक्के वाढीसह कर आकारणी करण्यात आली आहे. असे न करता महाराष्ट्र महागरपालिका अधिनियम नियम १२९ अ (१) अन्वये समाविष्ट गावात, समावेश करण्याच्या तारखेपासून, त्या वर्षीनंतरच्या दुसऱ्या वर्षाच्या ३१ मार्च पर्यंत ग्रामपंचायत दरानेच कर आकारणी करण्यात यावी व त्यानंतरच्या पुढील वर्षापासून महानगरपालिकेच्या दराने कर आकारण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. (PMC Pune News)

या मुख्य मागणीच्या पुष्ट्यर्थ खासदार सुळे यांनी पत्रात नमूद केलेले मुद्दे पुढीलप्रमाणे :-

* ज्या सालचे घर, त्या सालचा दर या दराने महापालिके मार्फत कर आकारणी केली गेल्याचे दिसून येत आहे. त्यास अनुसरून पूर्वीपासून महापालिकेत असणारे क्षेत्र व नव्याने समाविष्ट गावे या दोन्ही ठिकाणी आकारल्या जाणाऱ्या कराकरिता एकच निकष लावण्यात आलेला आहे. वास्तविक १९९७ साली समाविष्ट झालेली गावे व २०१७ साली समाविष्ट झालेली गावे यांत तब्बल तीस वर्षाचा फरक आहे. वार्षिक करपात्र रक्कम ठरविताना त्या ठिकाणी भाडे किती मिळते याचा विचार करून त्या ठिकाणचे दर हे नव्याने करणे आवश्यक आहे.

* समाविष्ट गावांत मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र आहे. त्यासाठी उभारण्यात आलेल्या शेडचा ग्रामपंचायत मध्ये असतानाचा कर व महापालिकेत आल्यानंतरचा कर हा साधारणत: दहा पटीने वाढलेला दिसून येत आहे. तरी वार्षिक करपात्र रक्कम ठरविताना या ठिकाणी भाडे किती मिळते याचा विचार होऊन त्यानुसार कर आकारणीमध्ये बदल करण्यात यावेत.

* समाविष्ट गावांतील औद्योगिक क्षेत्राची ग्रामपंचायत नमुना नं. ८ ला नोंद दगड वीट बांधकाम अशी आहे. महानगरपालिकेकडे झोपडी, साधे बांधकाम, पत्रा शेड, लोडबेअरिंग व आरसीसी या प्रमाणे वर्गीकरण नसून, पत्रा शेडसाठी लोड बेअरिंगच्या दराने कर आकारणी केली जात आहे. त्या कर आकारणीमध्ये बदल करण्यात यावेत.

* सामाविष्ट गावांमध्ये मोठ्या प्रमाणात रहिवासी इमारती आहेत. या रहिवासी फ्लॅट व दुकानांची ग्रामपंचायत नमुना नं. ८ वर विक्रीयोग्य प्रतीनुसार क्षेत्र नमूद करण्यात आले आहे. पुणे महापालिकेचा कर हा कारपेट क्षेत्रावर आकारला जातो. विक्रीयोग्य क्षेत्रातून महापालिकेमार्फत १० टक्के क्षेत्र वजा केले जाते. परंतु महापालिकेमार्फत सामाविष्ट गावातून केल्या गेलेल्या सर्वेनुसार आलेल्या अहवालात २० ते २५ टक्के अधिक क्षेत्र वजा करावे असे सांगितले आहे. तरी या मिळकतीचे क्षेत्र कारपेट नुसार आकारण्याकरिता अजून २० ते २५ टक्के क्षेत्रफळाची कपात करण्यात यावी.


News Title | Pune Property Tax | In the included villages, income tax should be levied at the Gram Panchayat rate only Municipalities Act 129 A (1) should be adopted