Tag: NCP Pune
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित “उत्कृष्ठ सार्वजनिक गणेशोत्सव देखावे स्पर्धा” व “गौरी गणपती सजावट स्पर्धा २०२२”
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शहरातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या “उत्कृष्ठ सार्वजनिक गणेशोत्सव देखावे स्पर्धा” व “गौरी गणपती सजावट स्पर्धा २०२२” या शहर स्तरावरील स्पर्धांची घोषणा आज शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषदेत केली.
तसेच कोरोनाच्या दोन वर्षांच्या निर्बंधानंतर होणाऱ्या या गणेशोत्सवात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ नेते पुणे शहरातील गणेशोत्सवात सहभागी होणार असून राज्याचे विरोधी पक्षनेते माननीय अजितदादा पवार दि.४ सप्टेंबर रोजी पुण्यात असतील तर दि.३ सप्टेंबर रोजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दि.५ ते ८ सप्टेंबर दरम्यान खासदार सौ.सुप्रियाताई सुळे , २ सप्टेंबर रोजी डॉ.अमोल कोल्हे हे पुणे गणेश दर्शन दौऱ्यावर असणार आहेत.
या स्पर्धेची माहिती देताना श्री.प्रशांत जगताप म्हणाले की , संपूर्ण पुणे शहर स्तरावरील मंडळांसाठी राबविली जाणारी ही सर्वात मोठी स्पर्धा असून या स्पर्धेसाठी तब्बल ५ लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. “सार्वजनिक गणेशोत्सव देखावे स्पर्धा” ही शहरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी घेण्यात येत असून या स्पर्धेसाठी शहरस्तरावर प्रथम क्रमांकाचे बक्षीस एक लाख रुपयांचे आहे. द्वितीय ७५,००० , तृतीय ५१,००० , चतुर्थ ३१,००० , पाचवे २१००० तर विधानसभानिहाय बक्षिसे प्रथम २५,००० ,द्वितीय १५,००० , तृतीय ५००० अशी आहेत. या स्पर्धेसाठी परीक्षकांची टीम संपूर्ण शहरातील गणेशोत्सव मंडळांना भेट देणारा असून या सर्व मंडळांच्या प्रत्यक्ष पाहणी नंतर बक्षिसे जाहीर केली जाणार आहेत. स्पर्धेतील सर्व सहभागी मंडळांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव केला जाणार आहे. या स्पर्धेसाठी गणेश मंडळांनी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.
त्यासाठी या +919096256319,+919096848484 क्रमांकावर संपर्क साधावा. या स्पर्धेत पुणे शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन मी आपणास करत आहे.
पुणे शहरातील सर्व महिला भगिनींसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने खास पुणे शहरस्तरीय “गौरी गणपती” स्पर्धेचे आयोजन केले आहे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महिला भगिनींनी आपल्या घरच्या गौरी गणपतीच्या सजावटीचे फोटोज या क्रमांकावर पाठवायचे आहेत. उत्कृष्ट सजावट केलेल्या महिलाभगिनींना एलईडी स्मार्टटीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन अशा गृह उपयोगी साहित्याची विविध बक्षिसे देण्यात येणार असून, सहभागी प्रत्येक महिलेचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.या स्पर्धेत देखील शहरातील सर्व महिला भगिनींनी सहभागी व्हावे.
महागाईकडे केंद्रातील सत्ताधारी जाणीवूपर्वक दुर्लक्ष करीत आहे
| खासदार सुप्रिया सुळे यांचा आरोप
घरखर्च भागवणे अवघड झाले आहे. मात्र केंद्र सरकारने जनतेच्या प्रश्नावर झोपेचे सोंग घेतले आहे त्याला जागवण्याचे काम राष्ट्रवादी रस्त्यावर येवून करेल. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने कोथरूडला महागाई प्रश्नावर जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या. महागाईचा विषय देशातील सर्वसामान्य जनतेसाठी अत्यंत महत्वाचा आहे. मात्र, या विषयाकडे केंद्रातील सत्ताधारी जाणीवूपर्वक दुर्लक्ष करीत आहेत., असा आरोप खासदार सुळे यांनी यावेळी केला.
खासदार सुळे म्हणाल्या की, तुम्ही केले तर जन कल्याण विरोधकांनी केले तर रेवडी वाटप म्हणायचे. हा अन्याय आहे. केंद्र सरकारकडे असलेल्या यंत्रणांच्या फक्त राजकारण्यांनाच नव्हे तर मिडीयावाल्यांना सुध्दा नोटीसा जात आहेत. अटक केली जात आहे. संविधानाने, डॉ. आंबेडकरांनी जो हक्क दिला, तो आवाज दाबण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. भाजपाचे अध्यक्ष नढ्ढा म्हणतात की, एक पार्टी एक देश. आम्ही संविधान मानणारे आहोत. आम्ही एक देश अनेक पार्टी चा पुरस्कार करतो.
संयोजक शंकर केमसे म्हणाले की, या सरकारच्या काळात जगणं अवघड, मरण सोप झाले आहे. ज्वारी, मुग, साखर सगळेच महाग झाले. मोदीजी तुमच्या राज्यात स्वस्त काय आहे ते सांगा. खोटे बोलायचे पण रेटून बोलायचे एवढेच यांचे धोरण आहे म्हणून आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहोत.
बिल्कीस बानोला न्याय मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मुक निदर्शने
२००२ च्या गोध्रा दंगलीतील पीडिता बिल्कीस बानो यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने SSPMS कॉलेजच्या मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मुक निदर्शने करण्यात आली.
बिलकिस बानोला न्याय मिळावा या मागणीसाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेस, महिला काँग्रेस ,अल्पसंख्यांक विभाग, युवक काँग्रेस या सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांनी काळे वस्त्र परिधान करत Bilkis Wants Justice”,”जातीयवादी भाजपा,महिला विरोधी भाजपा”,”बिल्कीस हम शरमिंदा है,जालीम अभी तक जिंदा है”,”स्मृती इराणी जवाब दो,बिल्कीस बानो को न्याय दो” असे फलक हातात घेत मुक निदर्शने करण्यात आली.
२००२ मध्ये जेव्हा गोध्रा दंगल पेटली त्यावेळी बिल्कीस बानो नावाची अवघ्या २१ वर्षांची तरुणी गावातील हिंदू-मुस्लिम वादाच्या परिस्थितीचा अंदाज आल्याने आपल्या गावापासून काही अंतरावर असणाऱ्या माहेरी जाण्याच्या उद्देशाने आपल्या लहान मुलीला सोबत घेऊन घराबाहेर पडली. तिच्यासोबत तिच्या कुटुंबातील व गावातील काही मुस्लिम नागरिक देखील बाहेर पडले. याचवेळी त्या गावातील २०० ते २५० जणांच्या प्रक्षोभक जमावाने बिलकिस व तिच्या कुटुंबीयांवर हल्ला केला यातील १० ते १२ जणांनी बिल्कीस वर सामूहिक अत्याचार केले. इतक्यावरच ते थांबले नाही तर बिलकसच्या सोबत असणाऱ्या तिच्या कुटुंबियांची देखील यात हत्या करण्यात आली. या अत्याचाराचा कळस म्हणजे बिलकिसच्या लहान मुलीची अक्षरशः दगडावर ठेचून हत्या करण्यात आली. बेशुद्ध पडलेल्या बिलकिसला मृत समजून त्या जमावाने तिथून काढता पाय घेतला परंतु शुद्धीवर आलेल्या बिलकिसने त्यानंतर कसेबसे गावाच्या बाहेरील एका आदिवासी कुटुंबीयांकडे आसरा मागितला तेथील आदिवासी महिलेने बिलकिसची मदत केली. पुढे अनेक सेवाभावी संस्थांच्या मार्फत बिलकीसची ही लढाई सुरू झाली. प्रकरण न्यायालयात गेले, न्यायालयाने अकरा आरोपींना आमरण जन्मठेपेची शिक्षा सुनावली. बिल्कीस बानोला घर आणि नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. बिलकिसने आपली लढाई लढून न्याय मिळवला परंतु दुर्दैव असे की देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून देशात स्त्री सक्षमीकरणाचे भाषण देत असताना गुजरातमधील भाजप सरकारने बिलकीस बानोच्या आरोपींची शिक्षा माफ केली. इतकेच नाही तर या आरोपींची गावातून मिरवणूक काढण्यात आली. विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयात आरोपींचा सत्कार करण्यात आला. भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी या आरोपींचे सत्कार केले. भाजप सरकार आपल्या या सर्व कृतीतून काय संदेश देऊ इच्छित आहे……? असा सवाल मी या निमित्ताने भाजपला करू इच्छितो.देशातील मुस्लिम बांधवांप्रती भारतीय जनता पार्टीच्या मनात इतका द्वेष का आहे…? सुमारे वीस वर्षे चाललेल्या लढाईला अत्यंत निंदनीय असे वळण गुजरातमध्ये लागले आहे.
एक समाज म्हणून पाहताना केवळ बिलकिस बानो कुठल्या धर्माची आहे, ह्या गोष्टींकडे न पाहता बिलकिस एक महिला आहे. सर्व धर्म समभाव जपणाऱ्या भारत देशात बिलकिस सारख्या महिलेला सर्वोच्च न्यायालयाने दिलेला न्याय भाजप सारखा राजकीय पक्ष मोडून काढत असेल, तर हा न्यायालयाचा देखील अवमान असल्याचे मी या ठिकाणी नमूद करतो”, अशी प्रतिक्रिया शहराध्यक्ष श्री प्रशांत जगताप यांनी दिली.
या आंदोलन प्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदीप देशमुख, मृणालीनी वाणी, किशोर कांबळे, सुषमा सातपुते , समीर शेख , शमीम पठान , तनवीर शेख, चांद मणूरे , हमिदा शेख, परवीन तांबे ,जरीना आपा,हलीमा आपा , जिशान कुरेशी, बादशाह नायकवडी व ईतर पदाधिकारी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
९ कोटी नागरीकांसाठी योग्य तो निर्णय होईल | प्रशांत जगताप
पुणे | सरकारने गेल्या दीड महिन्याच्या कालावधीत निवडणुकांसंदर्भात ( महानगरपालिका चार सदस्यीय प्रभाग रचना, जनतेतून थेट सरपंच/नगराध्यक्षाची निवड) या सर्व निर्णयांना स्थगिती दिलेली आहे. तसेच या सरकारने घेतलेल्या वरील निर्णयांची अंमलबजावणी न करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाला निर्देश देखील दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाचे मी स्वागत करतो. तसेच अंतिम सुनावणीमध्ये देखील सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्रातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थेतील सुमारे ९ कोटी नागरीकांसाठी योग्य तो निर्णय घेऊन, राज्यातील व देशातील लोकशाही अधिक मजबूत व बळकट करेल, असा मला ठाम विश्वास आहे. अशी भावना राष्ट्रवादी कॉंग्रेस चे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.
जगताप म्हणाले, एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांपैकी पुण्यासह राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका या चार सदस्यीय प्रभाग रचनेद्वारे करण्याबाबत घेण्याबाबत निर्णय गेल्या महिन्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला.
या निर्णयाच्या विरोधात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.त्याच बरोबर ९२ नगरपरिषद – नगरपंचायतींच्या निवडणुका या ओ.बी.सी आरक्षणासहित व्हाव्यात यासाठी राज्य सरकारच्यावतीने पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. या सर्वच याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने आज सर्वोच्च न्यायालयामध्ये शपथपत्र दाखल करून संबंधित निवडणुकांच्या बाबतीत निर्देश व्हावेत अशा प्रकारची विनंती सर्वोच्च न्यायालयामध्ये केली. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय रामन्ना साहेब यांनी आज एक आदेश परित केला असून त्या आदेशान्वये एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने गेल्या दीड महिन्याच्या कालावधीत निवडणुकांसंदर्भात ( महानगरपालिका चार सदस्यीय प्रभाग रचना, जनतेतून थेट सरपंच/नगराध्यक्षाची निवड) या सर्व निर्णयांना स्थगिती दिलेली आहे.
तसेच या सरकारने घेतलेल्या वरील निर्णयांची अंमलबजावणी न करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाला निर्देश देखील दिले आहेत. त्याच बरोबर पुढील पाच आठवड्यानंतर होणाऱ्या अंतिम सुनावणीपूर्वी कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ( महानगरपालिका/जिल्हा परिषद/नगरपालिका/ग्रामपंचायत) निवडणुका जाहीर करू नये या बाबतचे दोन स्वतंत्र आदेश पारित केले आहेत. त्याच बरोबर पुढील महिन्यात होणाऱ्या एकत्रित सुनावणीच्या वेळी होणाऱ्या निर्णयानंतरच निवडणुका किती सदस्य प्रभाग रचनेनुसार घ्यायच्या व कधी घ्यायच्या त्याबाबत चे निर्देश माननीय सर्वोच्च न्यायालय देणार आहेत. आदरणीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाचे मी स्वागत करतो.तसेच अंतिम सुनावणीमध्ये देखील माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्रातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थेतील सुमारे ९ कोटी नागरीकांसाठी योग्य तो निर्णय घेऊन, राज्यातील व देशातील लोकशाही अधिक मजबूत व बळकट करेल, असा मला ठाम विश्वास आहे. अशी जगताप म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी गोविदांना आरक्षण देण्याची घोषणा करुन आरक्षणाच्या जनकांचा अपमान केला
| राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनोख्या पद्धतीने आंदोलन
पुणे – भाजपाच्या कच्छपी लागून पन्नास आमदारांना खोक्यात घालून सत्ता स्थापन करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आरक्षणाची सरेआम खिल्ली उडविली. या सरकारमधील मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी देखील यात तेल ओतण्याचे काम केले आहे. असा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला. तसेच या सर्वांचा निषेध करण्यासाठी पुणे राष्ट्रवादी काँग्रेस युवती विभागाने पक्षाने पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर मंगळागौरी ,डोंबारी, लुडो ,गोट्या खेळत अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला.
यावेळी राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, देशात बेरोजगारीचा दर अतिशय गंभीर म्हणजे ७.८ एवढा असून केंद्र सरकारच्या सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमी (CMIE) संस्थेच्या अहवालात बेरोजगारीचे हे भीषण वास्तव नमूद कऱण्यात आले आहे दुसरीकडे केंद्र सरकारने एकामागून एक सरकारी कंपन्या आपल्या मित्रांच्या घशात घालण्याचा सपाटा लावला असून गोरगरीब, मेहनती तसेच होतकरु विद्यार्थ्यांच्या वाट्याच्या हक्काच्या नोकऱ्या संपविण्याचा उद्योग लावला आहे. त्यातच भरीत भर म्हणून लॅटरल एन्ट्रीच्या नावाखाली विशिष्ट विचारसरणीच्या लोकांना सरकारी नोकरीत सामावून घेण्यास सुरवात केली आहे. हे सर्व प्रकार स्पर्धा परिक्षांचा दर्जा कमी करण्यासाठी येत असून जनतेच्या हक्काचा रोजगार हेतुपुरस्सरपणे संपविण्याचे कारस्थान आखले जात आहे. ही सर्व परिस्थिती एकीकडे तर दुसरीकडे महात्मा जोतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या विचारवंतांच्या अथक वैचारीक मंथनातून पुढे आलेल्या सामाजिक आरक्षणाची “गोविंदांना आरक्षण देण्याची’ सवंग घोषणा करुन खिल्ली उडविण्याचे कपट कारस्थान सत्ताधारी सरकारच्या माध्यमातून आखण्यात येत आहे, हे अतिशय संतापजनक आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत विविध नवीन खेळ सहभागी करून परीक्षेचा दर्जा कमी करणाऱ्या सरकारचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त यांनी जोरदार निषेध व्यक्त केला. नऊवारी नेसून आलेल्या महिला मंगळागौरीची गाणी गात फर्गुसन रस्त्यावर सोमवारी सकाळी पहावयास मिळाल्या. त्याच सोबत वेगवेगळे तरुण गोट्या खेळून सरकारचा निषेध करताना दिसले.
यावेळी काही युवक आणि युवती सापशिडी, विटी दांडू असे खेळ खेळून सरकारचा निषेध व्यक्त करताना दिसले. याच प्रसंगी काही तरुणांनी तरुणांनी अभ्यास करत पुस्तके घेऊन अभ्यास करत, अभ्यास करणाऱ्यांना सरकार कमी लेखत असल्याचे दाखवून दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पुणे अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, राज्य सरकारने एमपीएससीच्या परीक्षेत दहीहंडीतील खेळाडूंनाही आरक्षण मिळेल असे सांगून गुणवत्तेची खिल्ली उडविली.’ पन्नास खोके, एकदम ओके’ यानुसार हे सरकार सत्तेत आले असून त्यांच्याकडून दुसऱ्या अपेक्षा नाही.ते पुढे म्हणाले विद्यार्थ्यांनी अभ्यास सोडून दहीहंडी फोडणे ,डोंबऱ्याचे खेळ करणे ,मंगळागौरी खेळ करणे, सापशिडी खेळणे , विटी दांडू खेळणे असे उद्योग करावे लागतील. सरकारने या गोष्टीचा वेळीच निर्णय घेऊन त्याबाबत ठोस पावले उचलावीत. अन्यथा, आगामी काळात आम्ही आणखी आक्रमक पद्धतीने आंदोलन करू.
पक्षाचे प्रवक्ते प्रदिप देशमुख म्हणाले, “या देशातील सामाजिक आरक्षणाला एक मोठी वैचारीक परंपरा आहे. आरक्षणाच्या माध्यमातून हळूहळू सामाजिक समतेचे तत्त्व प्रत्यक्षात येऊ लागले आहे. ज्यांच्या विचारसरणीचा पायाच मुळी विषमतेवर आधारलेला आहे, त्यांच्याकडून आरक्षणाची खिल्ली उडविण्याची अपेक्षित आहे.हे अतिशय दुःखद आणि असंवेदनशीलतेचा कहर आहे. मुख्यमंत्रीपदी असणाऱ्या व्यक्तीकडे किमान विचारांचे हे सामाजिक अभिसरण समजून घेण्याचा आवाका असणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आरक्षणाच्या बाबतीत बेजबाबदार आणि असंवेदनशील विधाने करुन डॉ बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांचा अवमान देखील केला आहे. आम्ही त्याचा निषेध करतो. ”
याप्रंगी यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे व प्रदीप देशमुख, सुषमा सातपुते, मूणलिनी वाणी ,संदीप बालवडकर , सायली वांजळे लक्ष्मण आरडे ,किशोर कांबळे महेश हंडे , विक्रम मोरे , चारुदत्त घाडगे , असिफ शेख़ , यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
PMC Election 2022 | प्रभाग रचना बदलाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती
सुप्रीम कोर्टाकडून पुणे महापालिका निवडणुकीसाठी केलेल्या प्रभाग रचना बदलाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस चे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली. हा निर्णय शिंदे फडणवीस सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात समाधान आहे.
राज्य सरकारच्या सत्ता संघर्षानंतर नव्याने स्थापन झालेल्या शिंदे – फडणवीस सरकारने महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या तयारीचा चुकीचे दिशेने प्रवास चालू करत, निवडणुका चार सदस्य प्रभाग पद्धती प्रमाणे घ्याव्यात असे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले. हा एकूणच देशातील लोकशाही व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकशाही संपवण्याचे कट कारस्थान आहे थेट आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला होता.
राज्यातील महानगरपालिकांच्या (Corporation) निवडणुका पुढे ढकलून राज्य सरकार ७३ व्या घटना दुरूस्तीने झालेल्या कायद्याचा अवमान करीत आहे. ही भूमिका सर्वोच्च न्यायालयात (Suprme Court Of India) मांडली असून या संदर्भातील याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती.
त्यानुसार सुप्रीम कोर्टाकडून आता पुण्याच्या प्रभाग रचना बदलला स्थगिती मिळाली असल्याची माहिती समोर येत आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे राज्य सरकारला मोठा धक्का बसणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित “महागाईची दहीहंडी”
देशभरात अगदी नगण्य अशा सुई पासून ते मोठमोठ्या प्रॉपर्टीजपर्यंत सर्वत्र जी.एस.टी ची जोरदार वसुली सुरू आहे. जोपर्यंत सेवा आणि वस्तूंवर जीएसटी लागत होता तोपर्यंत या निरागस जनतेने कुठलीही तक्रार न करता नियमितपणे जीएसटी भरला. परंतु आता दररोजच्या जीवनात जीवनावश्यक असणाऱ्या दूधx, तूप, तेल, पनीर अगदी या गोष्टींवर देखील जीएसटी लावण्याचा काळा कायदा नुकत्याच झालेल्या जीएसटी परिषदेत केंद्र सरकारने लावला आहे. या घटनेच्या निषेधार्थ जी.एस.टी भरून आणलेल्या दूध व दह्याची दहीहंडी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने फोडली. विशेषतः या दहीहंडीला बक्षीस म्हणून जुमला बँकेचे १५ लाखाचे चेक देण्यात आले.
याप्रसंगी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, ” एकीकडे हिंदुत्ववादी म्हणून हिंदूंची मत मिळवायची दुसरीकडे त्या हिंदूंना त्यांचा कुठलाही सण साजरा करता येणार नाही इतकी महागाई वाढवून ठेवायची, ही मोदी सरकारची नीती आहे. देशावर दीडशे वर्ष राज्य करणाऱ्या इंग्रजांनी देखील कधी दूध आणि दह्यावर कर लावला नाही. परंतु सत्तेच्या धुंदीत असणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारने अगदी दूध दह्यापासून जीएसटी लावण्याची प्रथा सुरू केली आहे. भारतातील सर्वसामान्य नागरिकांच्या जाणीवपूर्वक होणाऱ्या पिळवणुकीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तीव्र शब्दात निषेध करते . देशात बेरोजगारी, महागाई, इंधन दरवाढ असे अनेक मुद्दे असताना या नागरिकांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारकडे पैसे नाहीत परंतु विरोधी पक्ष सत्ता असणारी राज्य सरकारने पाडणे , तेथील आमदारांना विकत घेणे यासाठी केंद्राकडे पैसा आहे.हनुमान चालीसा, राम मंदिर,हिंदू मुस्लिम यावर वाद निर्माण करणे या सर्व गोष्टी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीकडे पैसा आणि वेळ दोन्ही गोष्टी आहेत. देशात महत्वाचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना अधून मधून आपल्या प्रवक्त्यांमार्फत निव्वळ प्रसिद्धीसाठी काही चुकीचे स्टेटमेंट करून घेणे आणि जनतेचे मूळ मुद्द्यांवरून लक्ष हटवणे ही भारतीय जनता पार्टीची गेल्या आठ वर्षातील कामगिरी राहिलेली आहे.परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही जनतेची काळजी घेणारी पार्टी आहे. जनतेच्या सुखदुःखात उभी राहणारी पार्टी आहे. आम्ही मात्र जनतेला या गोष्टीची एकही दिवस विसर पडू देणार नाही, मागे महागाईची होळी केली होती आता महागाईची दहीहंडी करत आहोत आणि पुढे या महागाईच्या रावणाचा वध देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच करणार असा विश्वास त्यांनी या निमित्ताने व्यक्त केला.
या प्रसंगी युवकाध्यक्ष किशोर कांबळे , मा.नगरसेवक महेंद्र पठारे , मा. नगरसेवक सदानंद शेट्टी , कार्याध्यक्ष मनोज पाचपुते, अजिंक्य पालकर , प्रदेश सरचिटणीस महेश हांडे , वेणू शिंदे, गिरीश गुरनानि ,दिपक कामठे, आनंद सागरे , भूषण बधे, गजानन लोंढे, राहुल तांबे, मंगेश मोरे, वैभव कोठुळे , फहीम शेख,राखी श्रीराव ,जावेद इनामदार,आमोल ननावरे, केतन ओरसे , रोहन पायगुडे, कुलदीप शर्मा, उमेश कोढाळकर , स्वप्नील थोरवे आदींसह मोठ्या संख्येने युवक पदाधिकारी उपस्थित होते.
बदललेल्या प्रभाग रचनेने समाविष्ट गावांवर अन्याय होणार | प्रशांत जगताप
पुणे : राज्य सरकारच्या सत्ता संघर्षानंतर नव्याने स्थापन झालेल्या शिंदे – फडणवीस सरकारने महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या तयारीचा चुकीचे दिशेने प्रवास चालू करत, निवडणुका चार सदस्य प्रभाग पद्धती प्रमाणे घ्याव्यात असे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले. हा एकूणच देशातील लोकशाही व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकशाही संपवण्याचे कट कारस्थान आहे असा आमचा थेट आरोप आहे. असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.
राज्यातील महानगरपालिकांच्या (Corporation) निवडणुका पुढे ढकलून राज्य सरकार ७३ व्या घटना दुरूस्तीने झालेल्या कायद्याचा अवमान करीत आहे. ही भूमिका सर्वोच्च न्यायालयात (Suprme Court Of India) आम्ही मांडली असून या संदर्भातील याचिका न्यायालयाने दाखल करून घेतल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.
जगताप म्हणाले, ‘‘आम्ही दाखल केलेल्या याचिकेवर येत्या काही दिवसात सुनावणी होईल. देशातील लोकशाही बळकट करण्यासाठी आम्ही सुरू केलेल्या या लढ्यामध्ये नक्की यशस्वी होऊ.येत्या काही दिवसात कोर्टाचा निकाल होऊन येत्या दोन ते तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका होतील. त्यानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नवनियुक्त सदस्य कारभार पाहतील,असा मला विश्वास आहे.’’
महाविकास आघाडी सरकारने केलेल्या त्रिसदस्य प्रभाग रचना पद्धतीमध्ये लोकसंख्येच्या तुलनेत पुणेकरांना तब्बल 173 नगरसेवक मिळणार होते परंतु हा नव्याने निर्णय करत असताना यात सात नगरसेवक कमी करण्यात आले आहे त्यामुळे पुणेकरांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळणार नाही. तसेच प्रभागाची संख्या देखील कमी केल्याने या नव्याने समाविष्ट गावांवर निश्चितच अन्याय होणार आहे.
राज्य सरकारचा नव्याने असा प्रयत्न सुरू आहे की, २०१७ सालची प्रभाग रचना व आरक्षण कायम ठेवून त्यावर लवकर निवडणुका घेत असल्याचे कोर्टासमोर दाखवणे. परंतु या रचनेमध्ये नव्याने आलेल्या समाविष्ट गावांचा एकच प्रभाग ते करणार असून , या समाविष्ट ३४ गावांमध्ये तब्बल 15 ते 16 लाख मतदार असून क्षेत्रफळानुसार 50 ते 60 किलोमीटर असा वर्तुळाकार हा प्रभाग करने ही लोकशाहीची एकप्रकारे थट्टाच करण्याचा हा प्रकार चालवला आहे त्याला आमचा विरोध आहे.
सर्व मुद्द्यांचा समावेश असणारी याचिका सुप्रीम कोर्टाने दाखल करून घेतली असून या याचिकेद्वारे पुणेसह महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांना दिलासा मिळवून देण्याचा पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रयत्न आहे. असे ही जगताप म्हणाले.
समस्यांची आठवण करून देण्यासाठी मोदी यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून प्रतिकात्मक राखी
राखी म्हणजे रक्षण करण्याचे वचन. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नागरिकांप्रति असलेल्या या कर्तव्याची जाणिव करून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर शासकीय योजना सेलच्या वतीने रक्षाबंधनानिमित्त राखी पाठविण्यात आली.
महागाईचा भस्मासुर नागरिकांवर हल्ला करतोय. बेरोजगारीच्या राक्षसाने तरुणांचे जीवन उध्वस्त केले आहे.इंधन दरवाढीने नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. गॅस सिलेंडर दरवाढ महिलांच्या डोळ्यात पाणी आणत आहे. महिला सुरक्षा, शेतकरी आत्महत्या असे प्रश्न आ वासून उभे आहेत. मात्र सरकार शासकीय यंत्रणांचा गैरवापर करून नागरिकांचा आवाज दाबत आहे.देशाचे पालक म्हणून या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी पंतप्रधान भावनेला हात घालून समाजात दुही पसरविणाऱ्या अनेकांना समर्थन देत आहेत.
या आणि अनेक समस्यांची आठवण करून देणारी राखी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना प राखी पाठविण्यात आली . सिटीपोस्टातून पोस्टाद्वारे ह्या राख्या पाठविण्यात आल्या.
प्रवक्ते प्रदीप देशमुख यांच्या नेतृत्वात झालेल्या ह्या कार्यक्रमात वेणू शिंदे , मृणालिणी वाणी,मीना मोरे , अरुंधती जाधव,पूजा काटकर, उषा घोगरे ,सोनाली उजागरे,गणेश नलावडे , शशिकांत जगताप, रोहन पायगुडे व इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थीत होते