Answer sheet Check | उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार | मुख्य नियामक हिंदी विषयाची संयुक्त सभा रद्द

Categories
Breaking News Education social पुणे महाराष्ट्र

उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार

| मुख्य नियामक हिंदी विषयाची संयुक्त सभा रद्द

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकांच्या मागण्या जैसे थे असल्याने, त्यांनी बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. त्यानुसार परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी हिंदीच्या उत्तरपत्रिका तापसणीवर मुख्य नियामकांनी (चिफ मॉडरेटर) बहिष्कार घातला असून, यापुढील विषयांच्या उत्तरपत्रिकाही न तपासण्याची भूमिका महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या शिक्षकांनी मांडली.

संयुक्त सभेवर बहिष्कार

महासंघाच्या पुणे विभागाच्या वतीने शिक्षकांनी उत्तरपत्रिकांच्या तपासणीवर बहिष्कार टाकण्याचे आंदोलन बुधवारी केले आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या पदाधकाऱ्यांनी व हिंदी विषयाच्या मुख्य नियामक यांनी संयुक्त सभेवर बहिष्कार टाकला. व अतिशय सनदशीर मार्गाने तसे निवेदन राज्य मंडळाच्या सचिव  अनुराधा ओक व सह सचिव प्रिया शिंदे यांना देण्यात आले.त्यामुळे आजची हिंदी विषयाची मुख्य नियामकांची सभा रद्द करण्यात आली आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत उत्तरपत्रिका तपासण्यात येणार नाही; तसेच संयुक्त सभेवरही बहिष्कार घालण्याचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. त्यामुळे यापुढील सभा ही आमच्या मागण्या मान्य केल्या जात नाही तोपर्यंत युक्त सभेबाबत निर्णय होणार नसल्याचे शिक्षकांनी सांगितले.
यावेळी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघाचे अध्यक्ष व पुणे जिल्हा शिक्षक संघटनेचे कोषाध्यक्ष डॉ मिलिंद कांबळे ( हिंदी विषय तज्ञ), पुणे शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष डॉक्टर तुकाराम साळुंखे माननीय पडवळ सर माननीय शहापुरे सर प्राध्यापक राहुल गोलांडे. हिंदी संघाचे सचिव प्राध्यापक रेवदनाथ कर्डिले खजिनदार आनंद काशीकर ,कोल्हापूर शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व नऊ विभागातून आलेले हिंदी विषयाचे सी.एम तसेच विषय तज्ञ म्हणून डॉक्टर नेहा बोरसे व डॉक्टर दीप्ती सावंत, हिंदी अध्यापक संघटनेचे व पुणे जिल्हा शिक्षक संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Thackeray Group | Pune| निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या निषेधार्थ पुण्यात ठाकरे गटाची निदर्शने

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या निषेधार्थ पुण्यात  ठाकरे गटाची निदर्शने

पुणे | सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना देखील रात्रीत निवडणूक आयोगाच्या मार्फत मिंधे सरकारने शिवसेनेचे धनुष्यबाणावर घाला घातला. मिंधे सरकारने धनुष्य जरी चोरून नेले असले तरी सच्चा शिवसैनिक शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मातोश्री बरोबर एकनिष्ठ आहे. भविष्यात मिंधे सरकारला त्यांची जागा दाखवल्या शिवाय सच्चा शिवसैनिक गप्प बसणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रीय शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केली. 

निवडणूक आयोगाने काल (दि. १७) शिवसेना नाव आणि पक्षाचे चिन्ह असलेले धनुष्यबाण शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला. निवडणूक आयोगाने घेतलेल्या या निर्णयामुळे शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांमध्ये संतापाची लाट उसळळी असून, निवडणूक आयोगाच्या या निर्णयाच्या निषेधार्थ  पुणे शहर  (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तर्फे झाशीची राणी लक्ष्मीबाई चौक येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, माजी नगरसेवक प्रशांत बधे, अशोक हरणावळ, विशाल धनवडे, उपशहरप्रमुख प्रशांत राणे, महिला शहर संघटिका पल्लवी जावळे, राजेंद्र शिंदे, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, युवासेना शहर अधिकारी सनी गवते, राम थरकुडे, युवा शहर अधिकारी निकिता मारतकर ,युवराज पारीख, छाया भोसले, नंदू येवले, गजानन पंडित, परेश खंडके, तानाजी लोहकरे, मकरंद पेठकर, तेजस मर्चंट, विलास सोनवणे, राजेश मोरे, चंदन साळुंके, सुरज लोखंडे, युवराज शिंगाडे, करूणा घाडगे, वैजयंती फाटे, दिपाली राऊत, गायत्री गरुड, किरण शिंदे आदी यावेळी उपस्थित होते. 

मोरे म्हणाले, आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आपल्या विरुद्ध लागू शकतो या भीतीपोटीच मिंधे सरकारने निवडणूक आयोगाला हाताशी धरून धनुष्यबाणावर घाला घातला आहे. कालच्या निर्णयानंतर प्रत्येक शिवसैनिक पटून उठला असून तो मातोश्री आणि उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ आहे. चिन्ह चोरणारे ४० चोर आणि भाजप यांना जमिनीत गाडल्या शिवाय सामान्य शिवसैनिक गप्प बसणार नाही. याची सुरूवात कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकी पासून करणार आहे. या पोटनिवडणुकीत मिंधे सरकार आणि भाजपला चारीमुंड्या चित केल्या शिवाय आम्ही शांत बसणार नाही.

थरकुडे म्हणाले, चिन्ह गेले म्हणून गळून जाणारे आम्ही लेचेपेचे शिवसैनिक नाही. आम्ही हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सैनिक आहोत. आगामी काळात या मिंधे सरकार आणि भाजपला त्यांची जागा दाखवून दिल्या शिवाय आम्ही गप्प बसणार नाही.

यावेळी ‘शिवसेना आमच्या ठाकरेंची नाही गद्दारांच्या बापाची’, ‘उद्धव साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘चिन्ह आणि नाव चोरणार्‍या गद्दारांचा धिक्कार असो’, ‘५० खोके एकदम ओके, ५० खोके माजले बोके’ अशा घोषणा शिवसैनिकांनी दिल्या.

Nana patole | congress | अदानी समुहात केलेली गुंतवणूक धोक्यात आली असून जनतेचा पैसा बुडण्याची भिती | नाना पटोले

Categories
Breaking News Commerce Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र

अदानी समुहात केलेली गुंतवणूक धोक्यात आली असून जनतेचा पैसा बुडण्याची भिती | नाना पटोले

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वाखाली आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अलका टॉकीज र्चाक येथील LIC बिल्डींगच्या समोर अदानी समुहात केंद्र सरकारच्या आदेशावरून केलेल्या गुंतवणुकीच्या निषेधार्थ निदर्शने आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. आ. नानाभाऊ पटोले, माजी गृहमंत्री मा. सुशिलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री आ. अशोक चव्हाण, आ. पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम, पुणे जिल्हा निरीक्षक आ. संग्राम थोपटे, आ. अमर राजूरकर, आ. संजय जगताप, माजी आ. उल्हास पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री आ. अशोक चव्हाण म्हणाले की, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाने ७० वर्षात कमावलेली संपत्ती उद्योगपती मित्र अदानीला देण्याचा सपाटा लावला आहे. एवढ्यावरच न थांबता त्यांनी देशातील  जनतेने मोठ्या कष्टाने कमावलेला व भविष्याची तरतूद म्हणून SBI, LIC मध्ये गुंतवलेले हजारो कोटी रुपये ही अदानीच्या कंपन्याना दिले. आता हे हजारो कोटी रुपये बुडण्याची भिती निर्माण झाली आहे. तरीही केंद्र सरकार मूग गिळून गप्प बसले आहे. ‘अदानी’ समूहातील गैरकारभाराची चौकशी करावी व जनतेचा पैसा सुरक्षित रहावा यासाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरला आहे.’’

यानंतर माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, ‘‘एलआयसी व स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या देशाचे गौरव आहेत. या वित्तीय संस्थांमध्ये सर्वसामान्य, मध्यमवर्ग, नोकरदार, छोटे व्यापारी यांनी आपल्या मेहनतीचा पैसा गुंतविला आहे. परंतु मोदी सरकारने अदानींच्या कंपन्यांमध्ये हा पैसा जबरदस्तीने गुंतविला आहे. अदानी समुहातील गैरकारभारामुळे एलआयसीच्या ३९ कोटी पॉलिसीधारक व गुंतवणूकदारांचे ३३ हजार कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे तसेच भारतीय स्टेट बँक व इतर बँकांनी मिळून तब्बल ८० हजार कोटी रूपयांचे कर्ज दिले आहे. एलआयसी, स्टेट बँक ऑफ इंडिया व इतर सरकारी वित्तीय संस्थांमधील अदानी समुहात केलेल्या मोठ्या गुंतवणुकीसंदर्भात संसदेत चर्चा व्हावी व गुंतवणूक दारांच्या पैशाला संरक्षण मिळावे यासाठी सरकारने योग्य ते निर्णय घ्यावा.’’

यानंतर प्रदेशाध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले म्हणाले की, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपती मित्र गौतम अदानी यांच्या उद्योग समुहात एसबीआय, एलआयसी व इतर सरकारी वित्तीय संस्थांचा पैसा नियम डावलून गुंतवला. अदानी समुहातील ही गुंतवणूक आता धोक्यात आली असून जनतेचा पैसा बुडण्याची भिती निर्माण झाली आहे. अदानी समुहातील आर्थिक गैर कारभाराचा पर्दाफाश करणाऱ्या हिडनबर्ग संस्थेच्या अहवालाची संयुक्त संसदीय समितीतर्फे चौकशी व्हावी अथवा सर्वोच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशी करावी अशी मागणी आम्ही करीत आहोत. उद्योगपती गौतम अदानी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे घनिष्ट संबंध जगजाहीर आहेत. या संबंधातूनच सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि विमा कंपन्यांनी जनतेच्या कष्टाचा पैसा अदानीच्या उद्योग समुहात कसलाही विचार न करता गुंतवला आहे. विमानतळ, रेल्वे, वीजसेवा, रस्ते, बंदरे यासह देशातील सर्व महत्वाचे सरकारी उद्योग अदानींच्या घशात घातलेले आहेत. यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक व सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी मधील जनतेचा पैसाही अदानीच्या खिशात घातला आहे. अदानीच्या गैरकारभाराचा फुगा आता फुटला असून लाखो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, हा पैसा जनतेचा आहे. एवढा मोठा घोटाळा होऊनही मोदी सरकार, पंतप्रधान आणि अर्थमंत्री गप्प आहेत हे अतिशय लाजीरवाणे व असंवेनशीलपणाचे लक्षण आहे.’’

या आंदोलनाचे सूत्रसंचालन ब्लॉक अध्यक्ष सचिन आडेकर यांनी केले तर आभार सुजित यादव यांनी मानले.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, ॲड. अभय छाजेड, बाळासाहेब शिवरकर, दिप्ती चवधरी, कमल व्यवहारे, गोपाळ तिवारी, वीरेंद्र किराड, अमिर शेख, लता राजगुरू, रफिक शेख, अजित दरेकर, शिवाजी केदारी, पुजा आनंद, मेहबुब नदाफ, नीता रजपूत, राजेंद्र शिरसाट, मुख्तार शेख, सुनिल शिंदे, साहिल केदारी, राहुल शिरसाट, प्रवीण करपे, सतिश पवार, सुनिल घाडगे, शोएब इनामदार, रमेश सकट, भुषण रानभरे, अनिल सोंडकर, भरत सुराणा, राहुल तायडे, रवि आरडे, शिवराज भोकरे, हेमंत राजभोज, अक्षय माने, सुंदरा ओव्हाळ, पपिता सोनावणे, राधिका मखामले, सुमन इंगवले, सौरभ अमराळे, वाल्मिक जगताप, अजय खुडे, राकेश नामेकर, राजू नाणेकर, राजू शेख, गणेश शेडगे आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

NCP Strike | हक्काच्या पाण्याकरिता स्वारगेट पाणी पुरवठा विभाग येथे राष्ट्रवादीचे उपोषण

Categories
Breaking News PMC Political social पुणे

हक्काच्या पाण्याकरिता स्वारगेट पाणी पुरवठा विभाग येथे राष्ट्रवादीचे उपोषण

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या वतीने स्वारगेट पाणी पुरवठा विभाग येथे आज विधान सभा अध्यक्ष संतोष नांगरे यांच्या नेतृत्वाखाली योगेश पवार सुशांत ढमढरे, गणेश दामोदरे, गौरव घुले, आदीसह बेमुदत आमरण उपोषण आज सुरू करण्यात आले.

वारंवार पर्वती जलकेंद्रातून पाणी मुबलक मिळत नसल्यामुळे, पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीची उंची भरत नसल्यामुळे, वीज विद्युत वितरण कडून खंडित वीज पुरवठा होत असल्यामुळे, मुख्य पाईपलाईनचे गेट पडल्यामुळे, तसेच पद्मावती पंपिंग स्टेशनमध्ये बिघाड झाल्यामुळे पाणीपुरवठा होत नसल्याच्या विविध कारणे रोज अधिकारी देत असल्यामुळे त्याला वैतागून स्थानिक नागरिक, महिला, यांच्यासह पर्वती विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांसह उपोषणास सुरुवात झाली.

गेल्या अनेक दिवसांपासून पर्वती मतदार संघातील बिबेवाडी या पाण्याच्या टाकीतून पाणी पुरवठा होणाऱ्या सर्वच भागाला पाणीपुरवठा अत्यंत कमी दाबाने होत आहे विशेष करून प्रभाग क्रमांक जुना 28, 36, 35, 37, 39 या प्रभागांमध्ये अत्यंत कमी दाबाने पाणी येत आहे तर काही ठिकाणी पाणी येत नाही त्याच्या मुळे नागरिक त्रस्त झालेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने या संदर्भामध्ये 9 मे 2022 रोजी देखील दोन दिवसांचे उपोषण केलं होतं काही दिवस समस्या सुटल्या परंतु त्या पुन्हा उदभवू लागल्या आहेत. त्याकरिता हे उपोषण सुरु करण्यात आले.

आंदोलनाला दुपारी मुख्य अभियंता पाणीपुरवठा विभाग पुणे शहर अनिरुद्ध पावसकर व त्यांचे खात्याचे संबंधित अधिकारी यांनी आंदोलन स्थळला भेट दिली. तसेच यावेळी नागरिकांनी महिलांनी तसेच कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भागात होणाऱ्या अडचणीचा पाढा त्यांच्यासमोर मांडला व त्यांनी देखील पर्वती विधानसभा मतदारसंघांमध्ये येणाऱ्या अडचणी, समस्या, त्रुटी येत्या येत्या शनिवार पर्यंत सोडवण्याचे आश्वासन यावेळी दिले. तसे लेखी पत्र उप अभियंता अजित नाईकनवरे व सौ अंजुषा रेड्डी यांनी दिले.

आपण जर दिलेल्या मुदतीत समस्या सोडविल्या नाहीतर अत्यंत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी विधासभा अध्यक्ष संतोष नांगरे यांनी दिला.

या आंदोलनास शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे, प्रदीप देशमुख, रविंन्द्र माळवदकर , महेश शिंदे, मृणालिनी वाणी, शशिकला कुंभार, विपुल म्हैसूरकर, बाळासाहेब अटल, दिलीप अरुंदेकर, समीर पवार, संजय दामोदरे, विजय बगाडे, राहुल गुंड, सतीश धर्मावत, विनय पाटील, विद्या ताकवले, रुपाली बिबवे, राणी दामोदरे, अमोल ननावरे, लखन वाघमारे, तुषार शेषनाईक, राजेंद्र चोरघे, शंकर सहाणे,प्रतिक कोंडे,अमोल शिंदे, कृणाल गायकवाड, सौरभ माने, संतोष पोले, अविनाश शिखापुरे , अमोल परदेशी, संदेश नाक्ते आदी पदाधिकारी व महिला भगिनी व नागरिक उपस्थित होते

NCP Women Wing | उद्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जनजागर यात्रेचा पुण्यात शुभारंभ

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

उद्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जनजागर यात्रेचा पुण्यात शुभारंभ

स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेला एक जानेवारी २०२३ रोजी १७५ वर्षे पूर्ण झाली असून, या निमित्ताने राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने उद्या दिनांक ४ जानेवारी २०२३ पासून संपूर्ण राज्यात जनजागर यात्रा सुरू करण्यात येणार आहे.

शहर राष्ट्रवादी कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणातून तत्कालीन समाज सुशिक्षित झाला त्यांनी केलेल्या शिक्षणाच्या जागरामुळे बहुजन समाजावर होत असलेल्या अन्याय- अत्याचारा विरोधात समाज पेटून उठला व समाजातील अनिष्ट रूढी परंपरा संपवण्यात आल्या व एका आदर्श समाजाची निर्मिती फुले दांपत्याकडून त्यावेळी करण्यात आली.

आजच्या काळात गेल्या आठ वर्षापासून मोदी सरकार सर्वसामान्य जनतेवर करत असलेल्या महागाई- बेरोजगारी च्या अन्याय अत्याचारा विरोधात देखील अशाच प्रकारचा जागर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने करण्यात येत असून, संपूर्ण राज्यभरात महिला भगिनींकडून याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृतीपर जागर यात्रा करण्यात येणार असून ही यात्रा महाराष्ट्राच्या प्रत्येक शहर व तालुक्यात जाणार आहे.

गेल्या ९ वर्षात गॅस सिलेंडर, जीवनावश्यक वस्तू , पेट्रोल , डिझेल सीएनजी यांच्या किमतींमध्ये झालेली वाढ, सर्वसामान्य लोकांच्या खाजगी क्षेत्रातील नोकऱ्यांवर आलेली कुऱ्हाड, सुशिक्षित तरुणांवर कोसळलेले बेरोजगारीचे संकट, महाराष्ट्रातून मोठमोठ्या कंपन्या इतर राज्यांमध्ये पळविण्याचे सुरू असलेले उद्योग व राज्यातील लोकशाहीला घातक असणाऱ्या घडामोडी घडत राज्य सरकार पाडण्यासाठी केले गेलेली कट कारस्थाने, महिला भगिनींवर होणारे अत्याचार अशा विविध मुद्द्यांवरती समाजाचे जागर करण्याचं काम ही जन-जागर यात्रा करणार आहे. पुणे शहरातील हॉटेल सेंट्रल पार्क येथे आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या जन -जागर यात्रेचा शुभारंभ उद्या दिनांक ४ जानेवारी २०२३ रोजी दुपारी ०४.०० वाजता करण्यात येणार आहे. त्यानंतर पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण असे करत महाराष्ट्रातील सर्वच विभागांमध्ये ही जनजागृती यात्रा जाणार आहे, माहिती राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार फौजीया खान, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख, वैशालीताई नागवडे, मृणालिनी वाणी, आशा मिरगे यादेखील यांसह मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

Agitation Against CM | मुख्यमंत्र्यांच्या विरोधात पुण्यात उद्या आंदोलन! | शिवसेना (ठाकरे गट) करणार आंदोलन

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात पुण्यात उद्या आंदोलन!

| शिवसेना (ठाकरे गट) करणार आंदोलन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या विरोधात पुण्यात उद्या आंदोलन (Agitation) करण्यात येणार आहे. शिवसेना (ठाकरे गट) यांच्या वतीने हे आंदोलन  सकाळी 11.00 वा. छ संभाजी महाराज पोलीस चौकी, अलका टॉकीज चौक, येथे हे आंदोलन होईल. अशी माहिती शहर प्रमुख संजय मोरे यांनी दिली. Shivsena (Uddhav Balasaheb Thackeray)

मोरे यांच्या माहितीनुसार महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनात भूखंडाच्या विषयावरून मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला, परंतू जुने पुराणे विषय काढून हे अधिवेशन भरकटवल जातय. भूखंडाचे श्रीखंड खाणार्‍या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे.

Congress | Fuel price hike | हात गाडीवर पेट्रोल डिझेलचे बॅरल ठेवून इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन

Categories
Breaking News Political पुणे

हात गाडीवर पेट्रोल डिझेलचे बॅरल ठेवून इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन

सातत्याने होत असलेल्या इंधन दरवाढीच्या (fuel price hike) निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी व रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली आज हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडचे कार्यालय येथे काँग्रेस पक्षाच्या (congress party) वतीने अनोखे आंदोलन (agitation) करण्यात आले.

हात गाडीवर पेट्रोल डिझेलचे बॅरेल ठेवून गेल्या सहा महिन्यात झालेल्या इंधन वाढीची माहिती बॅनर वर लिहून मोर्चा हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन पुणे मुख्य कार्यालयाकडे पोहोचला.

या ठिकाणी केंद्र सरकारच्या विरुद्ध घोषणा देण्यात आले.यावेळी बोलताना वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी म्हणाले की सहा महिन्यापूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव 129 डॉलर प्रति बॅरल होते. त्यावेळी पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर शंभर रुपयापेक्षा अधिक होते. आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर प्रति बॅलर 76 डॉलर ते 80 डॉलरच्या दरम्यान आहे. असे असताना सुद्धा आज पेट्रोलचा भाव 106 रुपये तर डिझेलचा भाव 94 रुपये प्रतिलिटर आहे.यामुळे सर्वसामान्य जनतेची पिळवणूक होत आहे. केंद्र सरकारने जनतेच्या हिताकरिता त्वरित पेट्रोल आणि डिझेलचे दर 70 रुपये प्रति लिटर करावे,अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण शहरभर तीव्र आंदोलन करण्यात येईल.

यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना माजी गृराज्यमंत्री प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, इंधन दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंचे चे भाव वाढले आहे. सर्व तेल कंपन्यांकडे तेलाचा साठा मोठ्या प्रमाणात आहे. रशियाने भारतला कच्च्या तेलाचा साठा पुरवला आहे. कच्च्या तेलाचे साठा मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे भारत इंधन फ्रान्स, हॉलंड व अनेक देशांना निर्यात करीत आहे.एकीकडे इंधन निर्यात करून तेल कंपनी व सरकार मोठ्या प्रमाणावर नफा मिळवत आहे आणि दुसरीकडे कच्च्या तेलाचे भाव कमी असताना सुद्धा ग्राहकांना जास्तीच्या दराने इंधन देत आहे हे अन्याकारक आहे. काँग्रेसपक्ष नेहमी जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून आंदोलन करत असते जर केंद्र सरकारने इंधन चे दर कमी केले नाही तर काँग्रेस पक्षातर्फे उग्र आंदोलन करण्यात येईल.

यानंतर काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशनचे मुख्य व्यवस्थापक श्री मनीष अग्रवाल यांना भेटून निवेदन दिले.

याप्रसंगी नगरसेवक रवींद्र धंगेकर अविनाश बागवे,नरुद्दीन सोमजी, रमेश अय्यर,प्रशांत सुरसे, शेखर कपोते, शाबिर खान,चेतन आगरवाल, मंजूर शेख, शिलार रतनगिरी, स्वाती शिंदे,कान्होजी जेधे, बबलू कोळी, सुनील घाडगे ,प्रदीप परदेशी, दया आडगळे,रोहित अवचिते, अंजली सोलापुरे, दिलीप थोरात ,संगीता थोरात, रॉबर्ट डेव्हिड,क्लेमेंट, लाजरस , सुनील बावकर , हुसेन शेख ,अस्लम बागवान , रामदास मारणे, सुरेश कांबळे, फैयाज शेख, विपुल उमंदे, सोनिया ओव्हाळ,सनी ओव्हाळ, मंगला चव्हाण, व असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

MLA Sunil Tingre | आमदार सुनिल टिंगरे यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

आमदार सुनिल टिंगरे यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन

महाराष्ट्र सरकार मधील मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या बाबत अपशब्द वापरले. त्याविरोधात वडगांवशेरी मतदारसंघात विश्रांतवाडी येथे आमदार सुनिल टिंगरे यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले.
आंदोलनाला मतदारसंघ अध्यक्ष ॲड. नानासाहेब नलावडे, माजी नगरसेवक भैय्यासाहेब जाधव, हनिफ शेख, सतिश म्हस्के, शशिकांत टिंगरे, युवक कार्याध्यक्ष मनोज पाचपुते, विनोद पवार, किरण खैरे, जावेद शेख, स्वप्निल पठारे हे उपस्थित होते.

NCP Pune | पुणे  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महागाई, बेरोजगारीच्या रावणाचे प्रतीकात्मक दहन 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

पुणे  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महागाई, बेरोजगारीच्या रावणाचे प्रतीकात्मक दहन

गेल्या आठ वर्षांमध्ये केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सातत्याने वाढणारी महागाई, सुशिक्षित तरुणांवर आलेले बेरोजगारीचे संकट, अन्नधान्यावरील जीएसटी, इंधन दरवाढ, विकास कामांमधील भ्रष्टाचार, सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण, सातत्याने देशातील विविध भागात सुरू असणाऱ्या धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या घटना, शेतकरी बळीराजाच्या आत्महत्या, सातत्याने महिलांवर होणारे अत्याचार, केंद्र सरकारची लोकशाही विरोधी धोरणे या सर्व अन्यायकारक व जुलूमकारक गोष्टींमुळे भारतातील जनता त्रस्त झाली आहे. अनेक वेळा आंदोलने, मोर्चे, निवेदने देत लोकशाहीच्या मार्गाने केलेल्या विरोधाने देखील केंद्र सरकारला जाग येत नाही, त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे विजयादशमीच्या पूर्वसंध्येला देशातील या दृष्ट प्रवृत्तींच्या रावणाचे दहन करण्यात आले. तसेच “महागाईचा रावण जाळलाच पाहिजे…,बेरोजगारीचा रावण जाळलाच पाहिजे….,धार्मिक द्वेष करणारा रावण जाळलाच पाहिजे….” या घोषणा देत केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. भारतीय नागरिकांवर या गोष्टी लादणाऱ्या भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून दूर ठेवण्याचा दृढ निश्चय देखील युवकांनी यावेळी केला.

यावेळी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, “देशातील युवक हा देशाच्या विकासाचा प्रमुख शिलेदार असतो परंतु हाच युवक आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत देशाच्या राजसत्तेच्या विरोधात बंड पुकारत आहे. केंद्र व राज्यातील सत्ताधारी भाजपने बेरोजगारीमुळे युवकांवर ही वेळ आणली आहे.राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने देखील ज्या दृष्ट प्रवृत्तीचे रावण दहन झाले आहे, त्या दृष्ट प्रवृत्ती देशातील युवक,युवती, महिला यांसह समाजातील प्रत्येक घटकासाठी अतिशय घातक आहेत. या सर्व गोष्टी आपल्या जनतेवर लादण्याचे काम भारतीय जनता पार्टीने केले आहे. आज या महागाईमुळे तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या घरातून बचत ही जवळपास हद्दपार झाली आहे. देशातील प्रत्येक नागरिकाने केवळ आपली नोकरी, व्यवसाय, छोटा मोठा काम- धंदा करणे व त्यातून जमा झालेल्या पैशात आपल्या कुटुंबाच्या उदर निर्वाहासाठी ज्या काही जीवनावश्यक गोष्टी खरेदी करतील, त्या प्रत्येक गोष्टीवर भरमसाठ टॅक्स भरणे केवळ हेच कालचक्र सध्या सुरू आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास भविष्यकाळात भारतीय नागरिकांची परिस्थिती श्रीलंकेतील नागरिकांसारखी होण्याची दाट शक्यता आहे. ही परिस्थिती जर उद्भवू द्यायची नसेल तर गल्लीपासून -दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टी नावाच्या दृष्ट राक्षसाचा वध करणे हे ही काळाची गरज बनली आहे.

या आंदोलन प्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख ,युवक शहराध्यक्ष किशोर कांबळे,विशाल वाकडकर, मनोज पाचपुते,महेश हांडे, अजिंक्य पालकर,रोहन पायगुडे,कुणाल पोकळे, ॲड.निखिल मलानी,मंगेश मोरे,स्वप्निल जोशी,योगेश सुतार,गजानन लोंढे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

NCP Agitation | बोट दाखवा, बोट थांबवा | भाजपाच्या विरोधात, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपरोधिक आंदोलन

Categories
Breaking News Uncategorized

बोट दाखवा, बोट थांबवा | भाजपाच्या विरोधात, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपरोधिक आंदोलन

पुणे शहरात सुरु असलेल्या पावसामुळे शहरातील रस्ते, वाहतूक, ड्रेनेज व्यवस्था आदींच्या बाबतीतील महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या नियोजनाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या असून त्याचा त्रास नागरीकांना होत आहे. याचा निषेध करण्यासाठी पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महापालिकेच्या समोर खरीखुरी बोट आणि ती वल्हवत ‘बोट दाखवा,बोट थांबवा’ हे उपरोधिक आंदोलन करण्यात आले.

शहरात झालेल्या पावसामुळे सर्वत्र पाणी साठले आहे. त्यातच अनेक ठिकाणी महापालिकेने कसलाही विचार न करता खोदकाम केले आहे. या खड्ड्यांमध्येही पाणी साठले असून भविष्यात येथेही एखादा मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपाच्या या नियोजनशून्य कारभाराचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदिप देशमुख यांच्या नेतूत्वाखाली आंदोलन करण्यात आहे याप्रंगी बोलताना ते म्हणाले की, भाजपाने गेली पाच वर्षांत अतिशय नियोजशून्य पद्धतीने कारभार करुन पुण्यासारख्या सुंदर शहराचे वाटोळे केले. शहरांतील अनेक रस्त्यांवर पावसाचे पाणी साठून शहराला एखाद्या तळ्याचे रुप आले होते. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले. ही अतिशय दारुण अवस्था असून भाजपाने पुणे शहर अक्षरशः बुडविले आहे. एवढेच नाही तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे शहराला स्मार्ट सिटी बनविण्याचे आश्वासन दिले होते. परंतु पुण्यातील भाजपा नेत्यांनी हे शहर बकाल करुन खुद्द पंतप्रधानांना खोटे पाडले आहे. देशाच्या पंतप्रधानांच्या शब्दाचाही मान त्यांना ठेवता आला नाही. याच शहरात स्मार्ट सिटी योजनेचे उद्घाटन करताना पंतप्रधान म्हणाले होते की, शहरांमध्ये गरीबीला पचविण्याची ताकद आहे. त्यामुळे शहरांचा नियोजनबद्ध पद्धतीने विकास करणे आवश्यक आहे. पण पुण्यातील भाजपा नेत्यांनी पायाभूत सुविधांसाठी आलेला पैसा गिळंकृत करुन आपली गरीबी पचविली. शहराच्या विकासाला तिलांजली दिल्यामुळे आता पुणेकरांना बस, रिक्षा किंवा मेट्रोची नाही तर बोटीची गरज पडणार असून पुण्यामध्ये भविष्यात बोट दाखवा, बोट थांबवा ही योजना केंद्र व राज्य सरकारने हाती घ्यायला हवी असा सल्ला देखील देशमुख यांनी दिला.

प्रवक्ते प्रदीप देशमुख , मूणालिनी वाणी ,विनोद पवार , उदय महाले , संतोष नांगरे ,भूषण बधे, वनिता जगताप , मंगल पवार , शालीनीताई जगताप , स्वप्निल जोशी , मीना पवार, भावना पाटील , सुरेश खाटपे, सुगंधा तिकोने व इतर प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते