Tag: Murlidhar mohol
PMC Teachers Agitation Update | शिक्षण सेवक आमरण उपोषण 4था दिवस | उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला असताना प्रस्ताव नगरविकास विभागाकडे का पाठवला?
| विविध पक्षांच्या नेत्यांचा महापालिका प्रशासनाला प्रश्न
PMC Teachers Agitation Update | पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागात (PMC Education Department) काम करणाऱ्या रजा मुदतीतील ९3 शिक्षण सेवकांना नियमित वेतनश्रेणी २०१७ (एप्रिल) पासून लागू करावी. या मागणीसाठी सर्व शिक्षण सेवक गेल्या चार दिवसापासून महापालिका भवनासमोर आमरण उपोषणास (Agitation) बसले आहेत. त्यांच्या आंदोलनाला सर्वच राजकीय पक्षांनी आणि विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे. या शिक्षण सेवकांना कायम करण्याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने राज्याच्या नगरविकास विभागाकडे पाठवला आहे. मात्र उच्च न्यायालयाने सेवकांच्या बाजूने निर्णय दिलेला असताना पुन्हा हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्याची काय आवश्यकता होती, असा प्रश्न राजकीय नेत्यांनी महापालिका प्रशासनाला विचारला आहे. (PMC Teachers Agitation update)
93 शिक्षण सेवकांना कायम करण्याबाबतचा आदेश २४ फेब्रुवारीस महापालिका प्रशासनास प्राप्त झाला आहे. मात्र आज ४ महिने होऊनही उच्चन्यायालयाच्या आदेशास केराची टोपली दाखवून प्रशासन आम्हास झुलवत आहे. असा आरोप आंदोलनकर्त्या शिक्षण सेवकांनी केला असून ते गेल्या 4 दिवसापासून आंदोलास बसले आहेत. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसा
दरम्यान चौथ्या विविध पक्षाच्या राजकीय नेत्यांनी या आंदोलनकर्त्यांची भेट घेत त्यांना दिलासा दिला. काही लोकांनी प्रशासनाशी संवाद करत सेवकांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
| आंदोलनकर्त्यांना आज कोण भेटले?
आमदार सुनिल टिंगरे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, दत्ता धनकवडे, माजी नगरसेवक विशाल तांबे, दीपक मानकर, काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष रमेश बागवे, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष प्रदीप धुमाळ.
| काही आंदोलकांची प्रकृती ढासळली
एका आंदोलक महिलेला चक्कर आली व पाठीत दुखत होते. तसेच उलटी झाल्याने व बसण्यास त्रास होत असल्याने कमला नेहरू रुग्णालयात admit करण्यात आले.
—–
शिक्षण सेवकांना कायम करून घेण्याबाबत उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. याबाबत सरकारला दंड देखील करण्यात आला आहे. असे असताना शिक्षण सेवकांना कायम करण्याबाबतचा प्रस्ताव राज्याच्या नगरविकास विभागाकडे पाठवण्याची गरज नव्हती. तरीही आम्ही राज्य सरकारकडे याचा पाठपुरावा करून शिक्षण सेवकांना न्याय मिळवून देऊ.
– मुरलीधर मोहोळ, माजी महापौर
—
आमरण उपोषणास बसलेल्या शिक्षण सेवकांचा प्रश्न समजून घेत याबाबत महापालिका आयुक्तांशी चर्चा केली. याबाबत आयुक्तांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.
– सुनिल टिंगरे, आमदार, वडगावशेरी.
—
उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार या शिक्षण सेवकांना महापालिका सेवेत कायम करून घेणे आवश्यक आहे. त्यानुसार मी आणि आमदार सुनिल टिंगरे यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. आयुक्तांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
दत्ता धनकवडे, माजी महापौर
——-
News Title | PMC Teachers Agitation Update | 4th day of hunger strike by education workers | Why was the proposal sent to the Urban Development Department when the High Court had given its decision?
‘पुणेकरांच्या आरोग्य योजना महापालिकेने पुन्हा सुरु कराव्यात’
| माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची मागणी
महापालिका हद्दीतील पुणेकरांसाठी पाच वर्षांपूर्वी सुरु केलेल्या पंडित दिनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजना आणि डॅा. श्यामा प्रसाद मुखर्जी ज्येष्ठ नागरिक मोफत आरोग्य योजना (PMC Health Schemes) बंद न करता पुनर्रचना करुन पुन्हा करा, अशी मागणी माजी महापौर आणि भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ (Ex Mayor Murlidhar Mohol) यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Pune Commissioner Vikram Kumar) यांच्याकडे केली आहे.
मा. महापौर मोहोळ यांनी आयुक्तांकडे विमा आणि आरोग्य तपासणी योजना पनर्रचनेसर पुन्हा सुरु करण्याची मागणी केली असून मा. महापौर मोहोळ स्थायी समितीचे अध्यक्ष असताना या योजना कार्यान्वित केल्या होत्या आणि सलग पाच वर्षे सुरुही ठेवल्या. मात्र प्रशासक म्हणून अंदाजपत्रक मांडताना या योजनांना तरतूद न दिल्याने योजना बंद आहेत. या पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी भेट घेत मागणीचे निवेदन दिले आहे. (Ex mayor murlidhar mohol met with pmc pune commissioner vikram kumar)
याबाबत माहिती देताना मोहोळ म्हणाले, या दोन्ही योजना गरजू पुणेकरांसाठी पुन्हा सुरु होणे आवश्यक असून प्रशासनाने या योजनांची तातडीने अभ्यास करुन पुनर्रचना करावी. या योजना पुणेकरांसाठी अत्यावश्यक आहेत. त्यामुळे यावर लवकरच घेण्यात यावा’ (pmc pune health schemes)
‘ रजामुदतीच्या एकूण ९३ शिक्षकांना सेवेत कायम करणे आणि १५२ समूह संघटक आणि संघटिका यांना सेवेत कायम करणे, याही मागण्या आयुक्तांकडे केल्या आहेत. शिवाय बिबवेवाडी-धनकवडी पुनर्वसन योजनेंतर्गत वाटप करण्यात आलेल्या जवळपास ८ हजार निवासी आणि बिगरनिवासी गाळे हस्तांतरण प्रक्रियेची कार्यवाही त्वरीत करण्यात यावी, अशीही मागणी केल्याची माहिती मोहोळ यांनी दिली. (Ex mayor Murlidhar Mohol)
‘चांदणी चौकातील स्वराज्य शिल्पाचे काम त्वरित सुरु करा’
चांदणी चौकातील जिजाऊ मॅांसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य शिल्प साकारण्यात येणार असून या शिल्पाची निविदा प्रक्रिया लवकर करावी, अशीही मागणी मोहोळ यांनी आयुक्तांकडे केली आहे.
मुरलीधर मोहोळ यांचा आरोप म्हणजे स्वत:च्या पक्षाचे अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न | आमदार सुनिल टिंगरे आणि चेतन तुपे
| भाजपच्या टिकेला राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर
| काय म्हणाले होते मुरलीधर मोहोळ?
‘पुणेकरांची मिळकत करातील ४०% सवलत कायम ठेवावी’
| भाजपाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची भेट
| निर्णयासाठी पुढील आठवड्यात बैठक : मुरलीधर मोहोळ
पुणे महापालिका हद्दीत मिळकत करात पुणेकरांना देण्यात येणारी ४० टक्के सवलत कायम ठेवावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. शिवाय देखभाल दुरुस्ती खर्च १ एप्रिल २०१० पासून १५ टक्क्यांहून १० टक्के फरकाची रक्कम मिळकतींकडून वसूल करण्यात येऊ नये, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. या दोन्ही मागण्यांसदर्भात पुढील आठवड्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बैठक घेणार असल्याची माहिती माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, माजी महापौर मोहोळ यांच्यासमवेत यावेळी आ. माधुरीताई मिसाळ, आ. भीमराव तापकीर, आ. सिद्धार्थ शिरोळे उपस्थित होते.
मिळकत करातील ४०% सवलत दि. १/८/२०१९ पासून स्व: वापर करीत असलेल्या निवासी मिळकतीची काढण्यात येऊ नये आणि देखभाल दुरुस्ती खर्च दि. १/४/२०१० पासून १५% हून १०% फरकाची रक्कम मिळकतींकडून वसूल करण्यात येऊ नये, अशा दोन मागण्या या निवदेनातून करण्यात आल्या आहेत.
या संदर्भात माहिती देताना माजी महापौर मोहोळ म्हणाले, ‘निवासी मिळकतींना देण्यात येणारी ४०% सवलत आणि १५% हून १०% देखभाल दुरुस्ती खर्च नवीन आकारणी होत असलेल्या मिळकतीना दिनांक १/४/२०१९ पासून बंद करण्यात आली आहे. यासंदर्भात २०१९ आणि २०२२ ला महापालिकेच्या मुख्य सभेचा पुन्हा ठराव केला होता. त्याद्वारे हीसवलत रद्द न करता सुरू रहावी, असा ठराव राज्य सरकारकडे पाठवण्याला होता. मात्र तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने कोणाताही निर्णय घेतला नाही’.
महारापालिकेच्या २०१९ आणि २०२२ च्या ठरावाच्या आधारावर राज्य सरकारकडे या मागण्या केल्या असून याबाबत तातडीने पुढील आठवड्यातच बैठक घेऊन याबाबत पुणेकरांना मोठा दिलासा मिळेल, हा विश्वास आहे, असेही मोहोळ म्हणाले.
| महाविकास आघाडीच्या आमदारांचे आंदोलन केवळ नौटंकी : मोहोळ
आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यावर पुण्यातील महाविकास आघाडीच्या आमदारांना जाग आली आणि त्यांनी घाईघाईने विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलनाची नौटंकी केली. स्वतःची निष्क्रियता छाकण्यासाठी केलेल्या आंदोलनाच्या नौटंकीला पुणेकर भुलणार नाहीत, अशा शब्दात मोहोळ यांनी उत्तर दिले.
‘महाराष्ट्र केसरी’चा अधिकृत मान ‘संस्कृती प्रतिष्ठान’कडेच!
| भारतीय कुस्ती महासंघाने दिले आयोजनाच्या जबाबदारीचे पत्र; मुरलीधर मोहोळ यांची माहिती
पुणे : महाराष्ट्राच्या कुस्ती विश्वातील सर्वात प्रतिष्ठेची असणाऱ्या ६५ व्या ‘महाराष्ट्र केसरी’ (Maharashtra Kesari) स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान संस्कृती प्रतिष्ठानला (sanskriti pratisthan) मिळाला आहे. या संदर्भात कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाची अधिकृत जबाबदारी संस्कृती प्रतिष्ठानला दिल्याचे पत्र भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खा. ब्रिजभूषण सिंह (MP Brijbhushan singh) यांच्याकडून स्वीकारल्याची माहिती संयोजक माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Ex Mayor Murlidhar Mohol) यांनी दिली. स्पर्धेच्या तारखा आणि ठिकाण लवकरात लवकर कळवण्याच्या सूचना या पत्रात कुस्ती महासंघाने दिल्या आहेत. Maharashtra Kesari
नवी दिल्ली येथे बृजभूषण सिंह यांनी यांनी मोहोळ यांना हे पत्र दिले. यावेळी राज्य कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, पुणे जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष पै. संदीप भोंडवे, पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष योगेश दोडके समवेत होते. दरम्यान, ब्रिजभूषण सिंह यांना या स्पर्धेचे निमंत्रण देण्यात आले असून, ते त्यांनी स्वीकारले असल्याचेही मोहोळ यांनी नमूद केले. ‘महाराष्ट्र केसरी’ अधिकृतपणे कोण भरवणार याबाबत संभ्रम होता. मात्र, कुस्ती महासंघाने संस्कृती प्रतिष्ठानच्या आयोजनावर शिक्कामोर्तब केल्याने हा संभ्रम दूर झाला असून, महासंघाच्या अस्थायी समितीचे पदाधिकारी यासंदर्भातील कार्यभार पाहत आहेत.
“महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे संस्थापक आणि ‘महाराष्ट्र केसरी’चे जनक स्व. मामासाहेब मोहोळ यांच्या कुटुंबियांकडे ‘महाराष्ट्र केसरी’चे आयोजन येणे, ही निश्चितच समाधान देणारी बाब आहे. प्रत्येकाच्या आठवणीत राहील आणि कुस्तीला आणखी उंचीवर नेता येईल, अशा प्रकारचे आयोजन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न असेल. लवकरच महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला जाईल,” असे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
ब्रिजभूषण सिंह म्हणाले, “महाराष्ट्राला कुस्तीची मोठी परंपरा लाभलेली आहे. ११ ते १५ जानेवारी २०२३ या कालावधीत पुण्यात ही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भरवली जावी. या स्पर्धेसाठी आपण स्वतः उपस्थित राहणार आहोत. शाहू महाराजांनी कुस्तीला प्रोत्साहन दिले. त्यातून अनेक कुस्तीगीर घडले. तालीम संघ मोठ्या प्रमाणावर आहेत. तेव्हा ही स्पर्धा चांगल्या स्वरूपात पार पडेल.”
बुडत्या काँग्रेसच्या आधाराने शिल्लक सेना वाचविण्याची धडपड!
| भाजपाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांची घणाघाती टीका
महाराष्ट्राच्या राजकारणातून अस्तित्व पुसले जाण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली असून बुडत्या काँग्रेसला वाचविण्यासाठी शिल्लक सेनेचा हात पुढे करण्याची ठाकरे यांची तडजोड आता दोन्ही पक्षांना बुडविणार आहे, अशी घणाघाती टीका भाजपचे प्रदेश सरचिटणीस श्री. मुरलीधर मोहोळ यांनी आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. शिवाजी पार्कवरच्या मेळाव्यास गर्दी जमविण्यासाठी काँग्रेसने कार्यकर्ते पुरविण्याच्या मोबदल्यात राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेसाठी महाराष्ट्रातील शिल्लक सेनेची कुमक पुरविण्याची ठाकरे यांची धडपड केविलवाणी असून आता पेंग्विन सेनेने हिंदुत्वाशी कायमची फारकत घेतल्याचे स्पष्ट झाले आहे, असा आरोपही त्यांनी केला.
दसरा मेळाव्याकरिता गर्दी जमविण्याचे अभूतपूर्व आव्हान ठाकरे यांच्यासमोर उभे असल्याने उरल्यासुरल्या पेंग्विन सेनेच्या आवाक्याबाहेरच्या या आव्हानास सामोरे जाऊन लाज वाचविण्यासाठी ठाकरे यांची जोरदार धडपड सुरू आहे. त्यासाठी त्यांनी शिल्लक सेनादेखील काँग्रेसच्या दावणीला बांधून इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे. अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसपुढे गुडघे टेकल्याने ठाकरे यांचे नेतृत्व संपले, आता काँग्रेसच्या वळचणीस जाऊन उरलीसुरली सेना संपविण्याचा त्यांचा इरादा स्पष्ट झाला आहे. विश्वासघाताने, जनादेश धुडकावून मिळविलेले मुख्यमंत्रीपद टिकविण्याच्या धडपडीतून राष्ट्रवादी काँग्रेसकडे पक्ष गहाण टाकून त्यांनी अगोदर शिवसेनेची विल्हेवाट लावली. आता शिवाजी पार्कवरील मेळाव्याचा फज्जा उडण्याच्या भीतीने त्यांनी काँग्रेसच्या कुबड्या घेतल्या आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रात फज्जा उडणार याची जाणीव असल्याने काँग्रेसने ‘गांधी यात्रे’ची लाज वाचविण्यासाठी सैनिकांची कुमक देण्याच्या अटीवर ठाकरे यांच्या मेळाव्यासाठी गर्दी पुरविण्याची ग्वाही दिली आहे, असा गौप्यस्फोट श्री. मोहोळ यांनी केला.
मुख्यमंत्रीपदाची हाव आणि पुत्रप्रेमाच्या लालसेपोटी बाळासाहेब ठाकरे यांचा संपूर्ण पक्ष पणाला लावणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचे भवितव्यच या मेळाव्यातील शक्तिप्रदर्शनावरच अवलंबून असल्याने काँग्रेसने त्यांना कोंडीत पकडले आहे. बाळासाहेबांच्या पक्षाची त्यांच्या कौटुंबिक वारसाने केलेली केविलवाणी अवस्था केलेली पाहून कीव येते, असेही त्यांनी नमूद केले. ठाकरे यांनी २०१९ मध्ये जनादेशाचे पालन केले असते, तर आपल्या हाताने पक्षाच्या विसर्जनाची वेळ त्यांच्यावर आली नसती, असा टोलाही श्री. मोहोळ यांनी लगावला.
ठाकरे गटाच्या शिवाजी पार्कवरील मेळाव्याची हवा अगोदरच निघून गेली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्याईचा वापर करून गर्दीसमोर वल्गना करण्यापलीकडे राज्याचे नेतृत्व करण्याची ठाकरे यांची क्षमता नाही, हे त्यांनी स्वतःच अडीच वर्षांच्या सत्ताकाळात दाखवून दिले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कुबड्यांखेरीज पक्षाचे अस्तित्व टिकविणे शक्य नाही याची जाणीव झाल्यामुळेच उरतणीला लागलेल्या या पक्षांच्या आधाराने उरलासुरला गट टिकविण्याची धडपड संपूर्ण महाराष्ट्र पाहात आहे, असेही ते म्हणाले.
बापटांनी मोहोळांच्या घरात किती दाबाने पाणी येते ते पाहावे आणि जनतेला सांगावे
: राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांचा टोला
पुणे : पुण्यातील पाणी प्रश्नावरुन राजकारण तापलं आहे. खासदार गिरीश बापट कालवा समितीच्या बैठकीतून सभात्याग करत बाहेर पडले होते. आयुक्तांच्या ( Pune Municipal Commissioner)घरी पाण्याचे प्रेशर चांगलं, पण त्यांना इतर प्रेशरच जास्त’ असा टोला गिरीश बापट यांची लगावला होता. यावरुन आता राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे (Ankush Kakade)यांनी गिरीश बापटांवर निशाणा साधला आहे. “गिरीश बापट यांना आत्ताच पाण्याची टंचाई का जाणवू लागली ” असा प्रश्न अंकुश काकडे यांनी उपस्थित केला आहे. तसेच बापटांनी मोहोळांच्या घरात किती दाबाने पाणी येते ते पाहावे आणि जनतेला सांगावे, असा टोलाही काकडे यांनी लगावला आहे.
”पुणे महानगरपालिकेत गेली पाच वर्षे भारतीय जनता पक्षाचे निर्विवाद बहुमत होतं, त्यांची सत्ता होती तेव्हापासून पुण्याच्या पाणीपुरवठ्यात खंड पडत आहे, अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने मिळत आहे ही वस्तुस्थिती आपली भाजपची कारकीर्द संपल्यानंतर गिरीश बापट यांच्या लक्षात आली हे आश्चर्य आहे,” असा टोला काकडेंनी बापटांना लगावला आहे.
”बापटांनी आयुक्तांच्या घराची पाहणी केली, माझी त्यांना विनंती आहे की माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या घरात किती दाबाने पाणी येते ते देखील त्यांनी पाहावे आणि जनतेला सांगावे. गेल्या पाच वर्षातील आपल्या अपयशी कारकिर्दीची ठपका आता महापालिका आयुक्त वर ठेवून काही उपयोग नाही. येणाऱ्या महानगरपालिकेत निवडणुकीत पुणेकर जनता गेल्या पाच वर्षातील भाजपचा महापालिका कारभार पाहून तुम्हाला घरी पाठवेल यात शंका नाही,” असे अंकुश काकडे म्हणाले.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून सत्ताधारी नगरसेवकांच्या कामांचे कौतुक
: मधुकर बिडकर रक्तपेढीचे लोकार्पण संपन्न
पुणे : महानगपालिकेमध्ये सत्ताधारी म्हणून काम करताना भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी केवळ रस्ते, ड्रेनेज, कचरा यामध्ये अडकून न राहता मेट्रो, नदी सुधार प्रकल्प, स्वतःचे वैद्यकीय महाविद्यालय असे प्रकल्प करण्यावर भर दिला. कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये उभारण्यात आलेला रक्तपेढीचा महत्वकांक्षी प्रकल्प हा त्याचाच एक भाग आहे, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी पक्षाच्या नगरसेवकांच्या कामांचे कौतुक केले.
पुणे महानगपालिकेच्या वतीने मंगळवार पेठेतील कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये मध्ये उभारण्यात आलेल्या मधुकर सखाराम बिडकर रक्तपेढीचे लोकार्पण प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. महापौर मुरलीधर मोहोळ, नंदिनी मधुकर बिडकर, निलेश आल्हाट, बाळासाहेब पाटोळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्थानिक नगरसेवक गणेश बिडकर यांच्या पुढाकारातून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.
पाटील पुढे म्हणाले की, पालिकेकडे स्वतःची अशी रक्तपेढी नव्हती. रक्ताची निर्मिती कृत्रिम पद्धतीने करता येत नाही. त्यामुळे रक्त संकलन आणि रक्तसाठा करण्यासाठी रक्तपेढीची गरज होती. ही बाब लक्षात घेत पालिकेची स्वतःची पहिली रक्तपेढी सुरू होत आहे, याबद्दल बिडकर यांचे विशेष कौतुक केले पाहिजे. पालिकेत नगरसेवक म्हणून जबाबदारी पार पाडताना भाजपच्या नगरसेवकांनी सतत पुणेकरांच्या हिताचे प्रकल्प राबविले आहेत. २४ बाय ७ पाणी पुरवठा योजना, नदी सुधारणा, सांडपाणी प्रकल्प याबरोबरच विविध भागात उड्डाणपूल, अर्बन स्ट्रीट डिझाईनचे रस्ते यांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश असल्याचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सांगितले.
महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले की, नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी करोनाच्या काळात पालिकेने आपली आरोग्य व्यवस्था सक्षम केली. पालिकेकडे आज काही हजार ऑक्सिजन बेड, व्हेंटीलेटर उपलब्ध आहेत. पालिका स्वतःचे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करत आहे. यासाठी स्वतःची रक्तपेढी असणे आवश्यक होते. ती जबाबदारी बिडकर यांनी घेतली आणि यशस्वीपणे पूर्ण केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना बिडकर यांनी ही रक्तपेढी उभारण्यामागची संकल्पना स्पष्ट केली. जगात प्रत्येक दिवशी विविध प्रकारच्या उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात रक्ताची आवश्यकता भासते. पालिकेची स्वतःची अशी एकही रक्तपेढी नव्हती. परिणामी रक्ताची गरज भासल्यास प्रत्येकवेळी इतर रक्तपेढ्यांवर अवलंबून राहावे लागत होते. ही गरज ओळखून गेल्या वर्षीच्या पालिकेच्या अंदाजपत्रकात रक्तपेढीसाठी तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार गेले वर्षभर काम करून पालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात ‘मधुकर बिडकर रक्तपेढी’ची निर्मिती करण्यात आली आहे. याचा मोठा फायदा निश्चितपणे सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. हा प्रकल्प पूर्णत्वाला गेल्याने विशेष आनंद वाटत आहे. शहरातील सर्वात अद्यावत अशी ही रक्तपेढी असल्याचे बिडकर यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर पवार यांनी केले. तर आभार उद्धव मराठे यांनी मानले.
कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये गणेश बिडकर यांच्या विकास निधीतून अत्याधुनिक लिफ्टची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच रुग्णालयाच्या सर्व मजल्यांवर नवीन एलईडी लाईट, पंखे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्येक महिन्याला २५ किलोवॅट विजेची बचत होत असल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली.
टीपी स्किमचा प्रारुप आराखडा प्रसिद्ध करण्यास मुख्य सभेची मान्यता
पुणे : उरूळी देवाची (Uruli Devachi) आणि फुरसुंगी (Fursungi) येथील सुमारे ६५० हेक्टर जागेवरील नियोजीत टीपी स्किमचा प्रारुप आराखडा (PMC Draft plan of TP scheme) हरकती व सूचना मागविण्यासाठी प्रसिद्ध करण्यास सर्वसाधारण सभेने (PMC General Body Meeting) आज मान्यता दिली.
पुणे महापालिकेने उरूळी देवाची, फुरसंगी या नव्याने समाविष्ट गावांमधून जाणार्या ११० मी. व सुधारीत ६५ मी. रुंदीच्या बाह्य वळण मार्गाच्या दुतर्फा टीपी स्कीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मार्च २०१९ मध्ये यासंदर्भात कार्यवाही करण्यासाठी सर्वसाधारण सभेने मान्यता दिली आहे. सुमारे ६५० हेक्टर क्षेत्रावर तीन टीपी स्किम (PMC TP scheme) राबविण्यात येणार आहेत. दरम्यानच्या काळातील लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहिता तसेच कोरोनामुळे प्रारुप आराखडा तयार करण्यास विलंब झाला आहे. हा प्रारुप आराखडा तयार झाला असून त्यावर नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत. या हरकती व सूचनांवर सुनावणी घेउन योग्य त्या दुरूस्त्या केल्यानंतर सर्वसाधारण सभेच्या मान्यतेने राज्य शासनाकडे (Maharashtra Government) अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. (Pune Corporation)
—
पालिका प्रशासनाने मागील तीन वर्षांच्या कालावधीत तीन टी. पी. स्कीमसाठी मे. डिझाईन पॉईंट कन्स्ल्टंट प्रा. लि. (Design Point Consultant Pvt. Ltd) यांची सल्लागार म्हणून नेमणूक केली. नगर रचना कायद्यातील तरतुदींनुसार टी. पी. स्किम क्षेत्रातील मिळकतधारकांसोबत बैठका घेउन स्किमचे महत्व व त्यातून मिळणार्या सोयी सुविधांची माहिती दिली. तसेच नागरिकांना आवश्यक कागदपत्रे गोळा करण्याबाबत मार्गदर्शनही करण्यात आले आहे. दरम्यानच्या काळात पीएमआरडीएचा विकास आराखडा तयार करताना येथील बाह्यवळण मार्गाची रुंदी ११० मी. वरून ६५ मी. पर्यंत कमी केली आहे. ही बाबही संबधित नागरिकांच्या निदर्शनास आणून देउन टी. पी. स्किमचा दुरूस्त आराखडा तयार केला आहे. या आराखड्यावर नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यासाठी तो प्रसिद्ध करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आला आहे. यापैकी फुरसुंगी येथील टी. पी. एस. १० चा आराखडा नव्याने करण्यात येणार आहे.
या आहेत टी. पी. स्किम
१. टी. पी. एस. ६ – उरूळी देवाची – १०९.७८ हेक्टर
२. टी. पी. एस. ९ – फुरसुंगी – २६०.६७ हेक्टर
३. टी. पी. एस. १० – फुरसुंगी – २७९.७१ हेक्टर
‘उरुळी देवाची आणि फुरसुंगी या गावांमध्ये टीपी स्किम राबविल्यामुळे सदर गावांचा नियोजनबद्ध विकास होण्यास मदत होणार आहे. ६५ मीटर रिंगरोडसाठी क्षेत्र ताब्यात घेण्यासाठी भूसंपादनापोटी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करावी लागली असती. तथापि टीपी स्किममुळे सदर रिंगरोड तसेच सोयीसुविधा क्षेत्र आणि रस्त्यांखालील क्षेत्र विनामोबदला ताब्यात येणार आहे. टीपीस्कीम सहामध्ये अर्बन फॉरेस्ट सुमारे १८ एकर क्षेत्रावर प्रस्तावीत आहे. तसेच नाल्याच्या कडेने ग्रीन बेल्ट प्रस्तावित करण्यात आलेले आहे. मोठ्या रुंदीचे रस्ते प्रस्तावित केलेले आहेत. टीपी स्कीममुळे नागरिकांना सोयी सुविधा वेळेत उपलब्ध होणार असून त्यामुळे नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.
मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे
—-
पुणे शहरात गेल्या ४० वर्षात एकही टाऊन प्लॅनिंग (टीपी) स्कीम झालेली नाही. ज्या भागात टीपी स्कीम होते त्या भागाचा सर्वांगिन विकास होत असतो. कोणत्याही नागरिकांवर अन्याय होत नाही. त्यामुळे फुरसुंगी, उरुळी देवाची या भागात टीपी स्कीम करण्यास पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली. नागरिकांना सुलभ आणि सर्वसमावेशक आरक्षणे मिळावी, असे धोरण भारतीय जनता पक्षाचे होते. त्यानुसार हा प्रस्ताव मुख्य सभेत मान्य करण्यात आला आहे.