Tag: NCP
रद्द केलेल्या प्रभाग रचनेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादीकडून याचिका दाखल
अब्दुल सत्तार यांना महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्री करा | राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे आंदेलन
टीईटी घोटाळ्याचे धागेदोरे अब्दुल सत्तारांपर्यंत,पोहचल्याने व त्यांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्र रद्द झाल्याने पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी आक्रमक झाली आमदार अब्दुल सत्तार यांना राज्याचे शालेय शिक्षण मंत्री करावे म्हणुन उपरोधक पध्दतीने आंदेलन करण्यात आले.
महीला प्रदेशाघ्यक्ष विद्या चव्हाण यांच्या नेतूत्वाखाली डेंगळे पुल येथे आंदोलन करण्यात आले . या प्रंसंगी बोलताना आ. चव्हाण म्हणाल्या ईडीच्या भीतीपोटी अनेक आमदार भाजपामध्ये सामील होत आहे. त्यामुळे हे सरकार गद्दाराचे आहे आणि गद्दारांकडून आणखी काय अपेक्षा असते ते आपल्याच घराचा उद्धार करणार, अशी टिका त्यांनी केली.
प्रवक्ते प्रदीप देशमुख म्हणाले आ.अब्दुल सत्तारांना भ्रष्टाचारी म्हणू नका कारण ते भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये धुवून निघालेले आहेत आणि ते अत्यंत कुटुंबवत्सल आहेत त्याप्रेमापोटी त्यांच्या मुलीं अपात्र असतानाही पात्र झाल्या आहेत आणि आपल्याच संस्थेवर त्यांनी त्यांना नोकरीही दिलेली असे महान शिक्षणतज्ञ जर या राज्याला शिक्षण मंत्री म्हणून लाभले तर या ईडी सरकारच्या शिरपेचात अजून ऐक मानाचा तुरा रोवला जाईल तसेच पुढील काळात अनेक नापास विधार्थी ही पास होतील व अपात्र विद्यार्थांना खुप मोठ्या संधी उपलब्ध होतील अशी अत्यंत बोचरी टीका प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी यावेळी केली.
सदर प्रसंगी आ. विद्या चव्हाण , प्रवक्ते प्रदीप देशमुख , वैशाली नागवडे ,मृणालिनी वाणी , विद्या ताकवले , दिलशाद अत्तार, लोचन शिवले ,शीला भालेराव, शारदा सोडी , उषा घोगरे, सारिका पारेख , वैजंती घोडके
राजेश्वरी पाटील व इतर महीला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थीत होत्या .
रस्त्यांची दूरावस्था दूर करून नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवा : सुनील टिंगरे
नागरिकांना भेडसावणार्या समस्या तात्काळ सोडविण्याचा सूचना वडगावशेरी मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांनी शुक्रवारी महापालिका प्रशासनास केल्या.
लोहगाव परिसरात पाणी वितरणचे जाळे तयार करा
गोपीचंद पडळकर यांच्यावर कारवाई करण्याची राष्ट्रवादीची मागणी
| पुणे पोलिस आयुक्तांना दिले निवेदन
पुणे | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बदनामी करण्याचे काम गोपीचंद पडळकर यांनी केले आहे, असा आरोप पुणे राष्ट्रवादी कॉंग्रेस ने केला आहे. शिवाय पुणे पोलिसांना निवेदन देत पडळकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे.
राष्ट्रवादीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार गेली साठ वर्षांहून अधिक काळ राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. राजकारणात आरोप-प्रत्यारोप होणे समजू शकते. परंतु भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर हे सातत्याने आदरणीय पवार साहेबांची बदनामी करीत असून त्यांचे वारंवार प्रतिमाहनन करीत आहेत, हे अतिशय गंभीर आणि खेदजनक आहे. गोपीचंद पडळकर हे सातत्याने खोटी आणि बिनबुडाची माहिती पसरवित आहेत. नुकतेच त्यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना -“राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते शिवसेनेचा भगवा मफलर टाकून घोषणा देतात.” उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करणारी ‘पवारांची माणसं’ होती, अशी बेजबाबदार आणि खोटी विधाने केली.
त्यांचे हे विधान अतिशय गंभीर असून आमच्या सामाजिक व राजकीय संस्कृतीला धक्का पोहोचविणारे आहे. आम्ही या विधानाचा जाहिर निषेध करीत असून त्यांनी आमचा पक्ष व सर्वोच्च नेत्याच्या विरोधात खोटीनाटी माहिती पसरवून आमची बदनामी केलेली आहे. याबद्दल त्यांच्यावर योग्य त्या कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना निवेदन देवून त्याचप्रमाने विश्रामाबग पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल माने यांच्याकडे तक्रार अर्ज देण्यात आला
या प्रसंगी प्रवक्ते अंकुश काकडे व प्रदीप देशमुख ,दिपाली धुमाळ रविन्द्र माळवादकर ,वनराज आंदेकर , दत्ता सागरे , महेंन्द्र पठारे ,किशोर कांबळे , मोहसिन शेख ,दिपक पोकळे , रूपाली पाटील व इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थीत होते
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने राज्यपाल कोश्यारींच्या विरोधात आंदोलन
महाराष्ट्र आणि मराठी माणसांचा अपमान करण्यासाठीच केंद्र सरकारने महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून भगतसिंह कोश्यारी यांची नेमणूक केली आहे का ? असा संशय येऊ लागला आहे. याचे कारण म्हणजे श्रीमान कोश्यारी सातत्याने आपल्या विधानांतून महाराष्ट्र आणि मराठी जनतेचा अवमान करीत आहेत. थेट केंद्र सरकार आणि सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने त्यांना मराठी माणसाचे खच्चीकरण करण्याची सुपारी दिली आहे का असाही सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. राज्यपालांच्या या बेताल वक्तव्याचा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अलका चौकात निषेध करण्यात आला.
एका कार्यक्रमात बोलताना कोश्यारी यांनी ‘गुजरात, राजस्थानचे लोक महाराष्ट्रातून निघून गेले तर महाराष्ट्राकडे पैसा राहणार नाही,’ असे अतिशय संतापजनक आणि महाराष्ट्राच्या जनतेला हिनवणारे विधान केले आहे. जगन्नाथ शंकरशेठ हे मुंबईचे शिल्पकार आहेत. त्यांच्या प्रयत्नांतूनच मुंबई आर्थिक राजधानी होण्याकडे पाऊल पडले. याखेरीज लक्षावधी मजूर, कामगार, कष्टकरी जनतेने मुंबई घडविली, वाढविली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ हुतात्म्यांनी आपल्या रक्ताचे शिंपण करुन मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली आहे. राज्यपालांचे हे वक्तव्य म्हणजे त्या हुतात्म्यांच्या हौतात्म्यांचा अवमान तर आहेच याशिवाय मजूर, कामगार आणि कष्टकरी जनतेच्या श्रमाचा देखील राज्यपालांनी उपमर्द केला आहे.
प्रवक्ते प्रदीप देशमुख म्हणाले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे वारंवार महाराष्ट्रातील महापुरुषांची बदनामी करीत आले आहेत.यापुर्वीही त्यांनी क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा अतिशय घाणेरड्या शब्दांत उल्लेख केला होता. कोश्यारी हे भाजपच्या मुशीत घडलेले नेते असल्याने ते आपल्या भाषणात जाणिवपूर्वक भाजपची स्क्रीप्ट वाचून दाखवितात की काय अशे वाटावे त्याप्रमाणे त्यांनी मुंबईविषयी प्रादेशिक वाद निर्माण करणारे वक्तव्य केले. अनावधानाने केलेले वक्तव्य समजू शकते पण कोश्यारी ‘हॅबीच्युअल ऑफेंडर’ असून त्यांना अशी विधाने करण्यात आनंद वाटतो. राज्यांराज्यांमधले संबंध हे सलोख्याचे असावेत यासाठी राज्यपाल व केंद्र सरकारने काम करणे आवश्यक असते. पण राज्यपाल वारंवार राज्यांराज्यांमधील संबंध बिघडविणारे विधान करीत असताना केंद्र सरकार आणि त्यांचा मातृपक्ष भाजपा देखील कसलाही हस्तक्षेप करीत नाही ही अतिशय खेदाची बाब आहे. असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, “भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि त्यांच्या सर्व नेत्यांनी,राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करून महाराष्ट्राची माफी मागावी.महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारी यांनी त्वरीत राजीनामा द्यावा किंवा केंद्र सरकारने त्यांना त्वरीत माघारी बोलावून घ्यावे. महाराष्ट्र राज्य हे प्रगत राज्य असून पूर्वी पासूनच ह्या राज्यात सर्व जाती-धर्माचे लोक एकजुटीने राहत आले आहेत. तसेच महाराष्ट्राच्या प्रगतीत सर्वच घटकांचा समावेश आहे. छत्रपती शिवराय-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांनी चालणाऱ्या महाराष्ट्रात सामाजिक सलोखा बिघडविणाऱ्या राज्यपालांनी महाराष्ट्राच्या आजवरच्या राज्यपालांची परंपरा व इतिहाचे निरपेक्षपणे अवलोकन करण्याची गरज आहे.”
यावेळी राजीनामा द्या राजीनामा द्या राज्यपाल राजीनामा द्या, मुंबई आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, राज्यपाल हटाव महाराष्ट्र बचाव,गो बॅक गो बॅक राज्यपाल गो बॅक अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. सदर आंदोलना साठी प्रवक्ते प्रदीप देशमुख ,बाळासाहेब बोडके वनराज आंदेकर , गणेश नलावडे, संतोष नांगरे , काका चव्हाण ,उदय महाले , लक्ष्मी खत्री, , रूपाली पाटील , संतोष हात्ते,श्रुती गायकवाड, प्रदिप भोसले, कुलदीप शर्मा ,स्वप्नील थोरवे, राहुल पायगुडे, स्वप्नील खडके व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या सह नागरिक ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुण्याला कोणी पालकमंत्री देता का.. पालकमंत्री …..?
| पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अनोखे आंदोलन
राज्यात सरकार स्थापन होऊन एक महिना होत आला तरी दोनच मंत्री काम करत आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही हा महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेचा अपमान असून सरकारने तातडीने अधिवेशन बोलावून मंत्रिमंडळ व सर्व पालकमंत्र्यांची नियुक्ती करावी. अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
पुणे शहर व जिल्हा राज्याचे प्रमुख शैक्षणिक,औद्योगिक व राजकीय केंद्र असून पुण्याचा कारभार गेल्या १ महिन्यापासून पालकमंत्र्यांशिवाय सुरू आहे. राज्यात सध्या अतिवृष्टीचे संकट ओढावले असून या आपत्कालीन परिस्थितीत जर मंत्रीच नसतील तर या खात्यांचा कारभार कोणाच्या भरवश्यावर सुरू असा सवाल देखील या वेळी विचारण्यात आला.
यावेळी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की,” मा. मुख्यमंत्री आणि मा.उपमुख्यमंत्री हे दोघेच काम करत असल्यामुळे अनेक बाबींकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. मागच्या एका महिन्यात राज्यातील विविध भागांमध्ये तब्बल ८९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच कुठले राज्य सरकार स्थापन झाल्या नंतर एका महिन्यात इतक्या जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ही बाब महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी आहे.
“राज्यातील या सर्व आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने अधिवेशन बोलवावे व ओला दुष्काळ जाहीर करत या ८९ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरीव मदत द्यावी”,अशी मागणी यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली.
महाविकास आघाडी सरकार असताना १८ जुलै रोजी पावसाळी अधिवेशन घेण्याचे ठरविले होते. मात्र सत्ताबदल झाल्यानंतर २५ जुलै ही तारीख निश्चित करण्यात आली होती. आता २५ जुलै होऊनही अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तारच झालेला नाही. सरकारकडे बहुमत आहे तर अधिवेशन घ्यायला सरकारला भीती का वाटत आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
तसेच राज्यात नवे सरकार आल्यानंतर जुन्या सरकारच्या योजनांना स्थगिती देण्याचा सपाटा लावला जातोय. वास्तविक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागच्या सरकारच्या काळात महाविकास आघाडी सोबत काम केले आहे. तरीही त्यांनी जुनी कामे स्थगित करण्याचा दणका लावला आहे. कोणतेही सरकार हे कायम नसते, हे दोन्ही नेत्यांनी समजून घ्यायला हवे. मविआ सरकारने पुण्यातील वढू येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी २६५ कोटींचा आराखडा केला होता, त्याचा निधी थांबविण्यात आला आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या कामासंबंधी निधी दिला होता, तोही थांबविण्यात आला आहे. महाराष्ट्रातील महापुरुषांच्या विचारांचे जतन करण्यासाठी काही कामे हातात घेतली होती, त्यांचे शौर्य लोकांना कळावे अशी त्यामागची भावना होती. या कामांचा निधी थांबविण्याचे काहीच कारण नव्हते. इतक्या खालच्या पातळीचे राजकारण कधीच झाले नव्हते, असे मत शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केले.
*या आंदोलनाचे विशेष म्हणजे या आंदोलनात नटसम्राट गणपतराव बेलवलकरांची आठवण करत प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी *……….
|| हे विघात्या तु ईतका कठोर का झालास||
*||हे करूना करा आम्ही पुणेकरांनी कोणाच्या कडे कामे धेवून जायचे *
*पुण्याला , खड्ड्यांची चाळण झालेल्या ह्या शहराला *
*ट्रॅफिक मध्ये जाम मघ्ये आडकलेल्या ह्या शहराला *
अनेक अडचणी असणा-या ह्या शहराला
*कोणी पालक मंत्री *
देता का पालकमंत्री
पालकमंत्री हा संवाद म्हणून दाखवत सरकारला धारेवर धरल
आंदोलनात प्रवक्ते प्रदीप देशमुख मृणालिनी वाणी , किशोर कांबळे विक्रम जाधव , आनंद सवाने , समीर शेख , दिपक जगताप , वेणू शिंदे , शंतनू जगदाळे , नाना नलावडे , महेंन्द्र पठारे व प्रदीप गायकवाड व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत होते
ध्येयापर्यंत जाण्यासाठी दररोजच्या जीवनात कसं वागायचे हे अजितदादांकडून शिकण्यासारखे | प्रशांत जगताप
भारतीय राजकारणात जी प्रमुख राजकीय घराणी आहेत, त्या घराण्यांमध्ये पवार कुटुंबीयांचं नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. प्रामुख्याने राजकीय कुटुंब अथवा राजकीय वारसा याबाबत जेव्हा बोलले जाते त्यावेळी जवळपास सर्वच ठिकाणी मागच्या पिढीने केलेल्या कामात पुढच्या पिढीकडून वाढ करण्याचा प्रयत्न केला जातो. आदरणीय अजितदादा पवार मात्र या नेहमीच्या घराणी पद्धतीतील नेते नाहीत तर त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आणि शिस्तप्रिय,प्रशासनावर मजबूत पकड असणारे,रोखठोक स्वभाव असणारे नेते हीच त्यांची कार्यशैली प्रसिद्ध झाली.
माझ्या राजकीय कारकीर्दीत माझे राजकीय आदर्श तथा श्रद्धास्थान आदरणीय पवारसाहेब असले तरी माझे राजकीय गुरु हे अजितदादाच आहेत. कारण आयुष्यात किती उंचीपर्यंत जाण्याचे धेय्य ठेवायचं हे जरी पवार साहेबांनी शिकवले असलं तरी त्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी दररोजच्या जीवनात कसं वागायचे हे मात्र अजितदादांकडून शिकण्यासारखे आहे.
माझ्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीलाच जसे मी दादांच्या जवळ गेलो तसे तसे दादांकडून काही गोष्टी शिकायला मिळाल्या.ज्यात ” कुठल्याही गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असला तर त्या गोष्टी त्या यंत्रणे कडून करून घेता येतात”, हे मी दादांकडून शिकलो.
साधारणतः राजकीय व्यक्ति नेहमी आपल्या मर्जीतील अधिकारी एखाद्या संस्थेत बसले पाहिजेत, आपल्याला अडचण होणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या पाहिजेत यासाठी आग्रही असतात. परंतु साधारण वीस वर्षांपूर्वी मी दादांजवळ असताना एक किस्सा जवळून पाहिला. बदलीसाठी आलेल्या राजकीय कार्यकर्त्यांना दादांनी खडसावून सांगितले की, “जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यासोबतच जर तुम्ही व्यवस्थित संबंध जपले तर कुठल्याही अधिकाऱ्याची बदली करण्याची वेळ येत नाही. शिवाय जसे राजकीय लोकांचे एकमेकांसोबत संबंध असतात तसेच बदली होऊन जाणारे अधिकारी देखील पुढच्या अधिकाऱ्यांना सांगून जातो की, “ह्या ह्या व्यक्ती पासून सावध रहा”. त्यामुळे राजकीय आयुष्यात वाटचाल करत असताना जी प्रशासकीय यंत्रणा आहे तिच्यासोबत जर व्यवस्थित जुळवून घेतले तर ती यंत्रणा देखील तुमच्यासोबत उत्साहाने काम करू शकते. कुठलेही नियमबाह्य काम करण्यासाठी अधिकाऱ्यांवर कधीही दडपण दबाव आणू नये , अधिकाऱ्यांना देखील काम करण्याची उत्सुकता असते परंतु राजकीय उदासीनतेमुळे अधिकारी काम करू शकत नाहीत. त्यांना जर निपक्षपातीपणें काम करू दिले तर आपल्या भागाचा विकास हा निश्चित होतो”. हे एकच नाही तर अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यात आदरणीय दादांनी संबंध जपण्यापासून संबंध टिकवण्यापर्यंत वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केले. त्याचाच परिणाम म्हणून आज पुणे शहरात आम्ही दादांचे शिलेदार म्हणून अभिमानाने कुठल्याही कार्यालयात जाऊन लोकहिताची कामे करून घेऊ शकतो.
देशाच्या संसदीय कार्यप्रणालीमध्ये तसेच राज्यांच्या विधिमंडळांमध्ये आजवर अनेक मातब्बर नेते होऊन गेले. त्यांनी आपापल्या परीने त्या त्यावेळेस त्यांचा काळ गाजवला , परंतु या सर्व नेत्यांमध्ये केवळ अजितदादा असे आहेत की, जे सकाळी सात वाजता मंत्रालयातील आपल्या दालनात कामासाठी हजर असायचे. कित्येक कार्यक्रमांना अजितदादांनी सकाळी सहा- सात ची वेळ दिली आहे व त्यावेळी किंबहुना वेळेच्या पूर्वी दादा तिथे हजर असतात. स्वतः सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात करणे, दिवसभराच्या आपल्या कामांमध्ये काहीही काम शिल्लक न ठेवणे ,ज्या कार्यक्रमात गेलो आहोत त्या कार्यक्रमात पूर्णपणे त्या त्या विषयावर सखोल माहिती देणे तिथल्या श्रोत्या वर्गाला उगीच काहीतरी भंपक आश्वासने देण्यापेक्षा जी वस्तुस्थिती आहे, त्या वस्तुस्थितीशी निगडित संवाद साधने. आपल्या संकल्पना लोकांवर थोपवण्यापेक्षा लोकांना आपल्याकडून काय हवे आहे..? हे पाहत सुसंवादातून काम पूर्णत्वास घेऊन जाणे हे अजितदादांचे विशेष गुण. कार्यक्रमात आयोजकांना जर अजितदादांना बोलवायचे असेल तर इतर मान्यवरांपेक्षा अजितदादा येणार असल्याने कार्यक्रमाचे नियोजन व्यवस्थितच करावे लागते. याचे कारण म्हणजे दादा एखाद्या इमारतीच्या उद्घाटनास आल्यास त्या इमारतीच्या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर पासून ते सजावटीपर्यंत कामाचा दर्जा, टेक्निकली मेजरमेंट, सजावट,रंगरंगोटी, नीटनेटकेपणा, स्वच्छता या सर्व बाबींमध्ये अजितदादा बारकाईने लक्ष देतात. विशेष म्हणजे यांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आयोजकांच्या कानात सांगण्याची पद्धत दादांकडे नाही, दादा तिथे सगळ्यांसमोर त्या आयोजकास या चुकीबद्दल जाब विचारतात. कारण आपण लोकांच्या पैशातून काम करत असताना , तो निधी योग्य प्रकारे वापरला गेला पाहिजे. त्या निधीतून उभ्या राहणाऱ्या वास्तू या वर्षानुवर्ष टिकल्या पाहिजे. लोकांचा पैसा हा जपून योग्य ठिकाणी वापरत लोकांना उच्च प्रतीच्या सोयी सुविधा निर्माण करून देणे हा देखील अजितदादांनी आम्हास घालून दिलेल्या शिस्तीचाच एक भाग आहे.
राज्याचा कारभार सांभाळत असताना पुणे शहरावर दादांचे विशेष लक्ष असते. दादा पुणे शहर व जिल्ह्याचे पालकमंत्री असताना प्रशासकीय दिरंगाईमुळे कोणी वंचित राहिल्याची एकही घटना घडलेली नाही, याचे कारण म्हणजे दादा पालकमंत्री असताना सातत्याने दर आठवड्यात पुणे जिल्ह्यातील प्रशासनाची आढावा बैठक पार पडत असे. या बैठकीमुळे प्रशासकीय योजनांची अंमलबजावणी असेल, प्रशासकीय पातळीवर काही निर्णय घ्यावयाचे असतील तर ते तात्काळ घेतले जाऊन पुढच्या आठवड्यात त्या निर्णयानच्या अंमलबजावणी मध्ये आलेल्या त्रुटी बाबत दादा आढावा घेत असे. यामुळे प्रशासकीय अधिकारी देखील एक गोष्ट जाणून होते की दादांकडे कुठल्याही विभागाची तक्रार घेऊन नागरिक जाता कामा नये. प्रशासकीय यंत्रणा देखील पूर्ण ताकदीनिशी काम करत असे.
महानगरपालिकेत नव्याने गावे समाविष्ट करत असताना दादांनी स्पष्टपणे भूमिका मांडली होती की, कुठल्याही प्रकारे पुणे शहरालगतच्या परिसरात अनधिकृत बांधकामे वाढता कामा नये. शहरालगतची जी गावे आहेत तेथे बकाल वस्ती होऊ नये यासाठी दादांनी ती गावे महापालिकेत समाविष्ट करून घेतली. तत्कालीन भाजपला त्या गावात सोयी सुविधा देणे शक्य झाले नाही. तरीदेखील दादांचा मात्र हाच आग्रह होता की या गावांना महापालिकेचे सर्व सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे. या गावांचा देखील सुनियोजित विकास झाला पाहिजे. पुण्याचा रिंग रोड प्रकल्प हा देखील दादांचा एक महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे केवळ पुणे शहरातून जाणाऱ्या हायवेमुळे पुणे शहर नागरिकांना रहदारीचा सामना करावा लागू नये तसेच पुण्यातील कुठल्याही भागातून शहराबाहेर पडायचे असल्यास एक ट्राफिक मुक्त महामार्ग असावा या संकल्पनेतूनच दादांनी रिंग रोड प्रकल्प आणला. उपमुख्यमंत्री असताना या प्रकल्पाला भरीव निधी देखील दिला. स्वारगेट ते कात्रज मेट्रो प्रकल्पाला देखील दादांनी मंजुरी दिली. भामा – आसखेड प्रकल्प, एस.आर.ए प्रकल्पांच्या सदनिकांची साईज वाढवणे असे अनेक निर्णय दादांनी पुण्यासाठी घेतले.ज्याचे दीर्घकालीन परिणाम पुणेकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी भविष्यात दिसतील.
कोवीड च्या काळात ज्याप्रमाणे आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेत होतो, त्याचप्रमाणे आदरणीय दादांनी पुणे शहर व जिल्ह्याची काळजी घेतली. अधिकाऱ्यांसोबत कायम सुसंवाद ठेवत जंबो कोवीड सेंटर, खाजगी रुग्णालय – शासकीय रुग्णालयांमध्ये उपचाराचा दर्जा वाढवत सोयी सुविधा निर्माण करणे. पुढच्या काही दिवसांचा विचार करत ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध करून देणे या सर्व गोष्टी दादांनी अतिशय काळजीपूर्वक हाताळल्या.
आज दादांच्या ६३ व्यां वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देत असताना दादांच्या प्रत्येक कार्यकर्त्यांची जी अपेक्षा आहे, तीच मी या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो की , दादांना भविष्यात आम्हाला मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले पाहायचे आहे, त्यासाठी कार्यकर्ता म्हणून वाटेल ती मेहनत घ्यायची आमची तयारी आहे .
दादा औक्षवंत व्हा..!
– प्रशांत जगताप
(अध्यक्ष पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.
महापौर २०१६-१७ )
राज्यात ओबीसींना राजकीय आरक्षण लागू झाल्याच्या आनंदात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला.
ओबीसी आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडी सरकारने गठीत केलेल्या बांठिया समितीचा अहवाल मा.सर्वोच्च न्यायालयाने स्विकारला. यामुळे ओबीसी आरक्षणासह निवडणूका होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्ष कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी पेढे वाटत आनंदोत्सव साजरा केला. महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणासाठी अतिशय प्रामाणिकपणे काम केले त्यामुळेच हे आरक्षण मिळाल्याची प्रतिक्रिया अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली. याबद्दल त्यांनी मा. सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व ज्येष्ठ नेते छगन भुजबळ साहेब, धनंजय मुंडे, विजय वडेट्टीवार यांचे मनापासून आभार मानले.
शरद पवार साहेबांनी त्याकाळात राज्यात मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्याच्या बाजूने ठाम भूमिका घेतली आणि राज्यात ओबीसी आरक्षणाचा निर्णय झाला. ते आरक्षण अबाधित राहिलं, याचा मनापासून आनंद आहे. ओबीसी आरक्षणासाठी ठाम भूमिका घेण्याचं काम सुरुवातीपासून आम्ही केलं व व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची यापुढे देखील हीच भूमिका राहील” , असे देखील शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने काँग्रेस पक्षाला आनंद झाला | अरविंद शिंदे
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, सर्वोच्च्य न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओ. बी. सी. समाजाचे आरक्षण मान्य केले आहे. या निर्णयाचे मी स्वागत करतो. या आरक्षणासाठी काँग्रेस पक्षाने पहिल्यापासूनच पाठपुरावा केला असून महाविकास आघाडीतर्फे एकत्रित सर्वोच्च न्यायालयातील लढाई लढली गेली. मा. बांठिया कमिशन महाविकास आघाडी सरकारने या आरक्षणासाठी नेमले होते. या आयोगाकडून सादर करण्यात आलेला वस्तूनिष्ठ अहवाल मा. सर्वोच्च्य न्यायालयाने मान्य केला यामुळे राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका या ओ. बी. सी. आरक्षणासहित होणार आहेत.
महाराष्ट्रातील तमाम ओ. बी. सी. बांधवांना राजकीय आरक्षण पुन्हा लागू करण्याच्या मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने काँग्रेस पक्षाला आनंद झाला आहे.
महाविकास आघाडीने ओबीसी राजकीय आरक्षणाचे श्रेय घेऊ नये |भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची स्पष्टोक्ती
सर्वोच्च न्यायालयाने सांगूनही महाविकास आघाडी सरकारने तिहेरी चाचणी पूर्ण करण्यासाठी काम केले नाही म्हणून राज्यात ओबीसींचे राजकीय आरक्षण गमावले. अडीच वर्षे वेळ वाया घालविणाऱ्या महाविकास आघाडीने आता ओबीसी राजकीय आरक्षणाचे श्रेय घेऊ नये, असे स्पष्ट प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केले.
चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीला ओबीसींना राजकीय आरक्षण द्यायचे नव्हते त्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने सांगूनही समर्पित आयोग नेमणे व एंपिरिकल डेटा गोळा करण्यासाठी हालचाली केल्या नाहीत. एंपिरिकल डेटाचे काम करण्याच्या ऐवजी सातत्याने केंद्र सरकारकडे २०११ च्या जनगणनेची माहिती मागून केंद्राकडे बोट दाखवत वेळ वाया घालविला. बांठिया आयोग नेमल्याबद्दल आघाडीचे नेते सांगत असले तरी हे काम मार्च २०२२ मध्ये करण्याच्या ऐवजी आधी का केले नाही आणि एंपिरिकल डेटा आधी का गोळा केला नाही याचे उत्तर त्यांनी द्यायला हवे.
ते म्हणाले की, महाविकास आघाडीच्या बेफिकीरीमुळे राज्यात ओबीसी राजकीय आरक्षण पुन्हा स्थापित झाले नाही आणि परिणामी मध्यंतरी सहा जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणुका, भंडारा – गोंदिया जिल्हा परिषदांच्या निवडणुका, १०६ नगरपंचायतींच्या निवडणुका आणि हजारो ग्रामपंचायतींच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय झाल्या. आता ओबीसी राजकीय आरक्षणाबद्दल दावा करणाऱ्या महाविकास आघाडीने याबद्दल उत्तर द्यायला हवे.
त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेची सूत्रे स्वीकारल्यावर तातडीने ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत आढावा घेतला, बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारला, सर्वोच्च न्यायालयात चांगल्या रितीने पाठपुरावा केला त्यामुळे ओबीसी राजकीय आरक्षण परत मिळाले आहे. भाजपा प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणात हस्तक्षेप याचिका दाखल केल्यामुळे न्यायप्रक्रियेत सक्रीय सहाय्य करता आले. ओबीसी राजकीय आरक्षण पुन्हा प्रस्थापित होईपर्यंत भाजपा ओबीसींना निवडणुकीत २७ टक्के तिकिटे देईल, अशीही भूमिका जाहीर केली होती व इतरांना त्याचे अनुकरण करावे लागले.
ते म्हणाले की, शिंदे – फडणवीस सरकारच्या पुढाकारामुळे मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, अनुसूचित जाती – जमातींना पदोन्नतीमध्ये आरक्षण हे प्रश्नही सुटतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
खड्ड्यांत कागदी नाव , बदक , खेकडे , मासे सोडून राष्ट्रवादीचे अभिनव आंदेलन
शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची जी चाळण झालेली आहे त्याला पुर्णत: भाजप जबाबदार असुन या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने स्वारगेट येथे अभिनव पध्दतीने आगळे वेगळे आंदोलन करण्यात आले. पिएमटी डेपो बाहेर केलेल्या ह्या आंदोलनात तेथील रस्त्यावर असणा-या मोठ्या खड्ड्यांमध्ये कागदी होड्या, रबरी बदक सोडण्यात आले. तसेच या खड्ड्यांजवळ अर्घगोलात बसून प्रतिकात्मक मासे, खेकडे देखील पकडण्यात आले.
मागील आठवड्यामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे महानगर पालिका आयुक्तांची भेट घेऊन पुणे शहरातील खड्डे लवकरात लवकर बुजवून नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते द्यावे अशी मागणी केली होती, जर आठवडाभरात पुणे खड्डेमुक्त झालं नाही तर पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यावेळी दिलेला होता .
पुणे शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य झाले असून या खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत असून मागील काही दिवसांत या खड्ड्यांमुळे पुणेकरांचे बळी देखील गेले आहेत.
आज पुण्याच्या रस्त्यावर पडलेले खड्डे हे गेल्या पाच वर्षात रस्त्यांच्या झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामांची साक्ष देत आहेत. गेल्या पाच वर्षात कोट्यवधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेले रस्ते जर दरवर्षी पावसाळ्यात दुरुस्त करावे लागत असतील. तर ५ वर्षात भाजपने केलेल्या रस्त्यांच्या कामाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करण्यात आली.
“खड्डे हा केवळ त्या रस्त्यापुरता मर्यादित विषय नसून या खड्ड्यांमुळे अनेक नागरिकांना पाठीचे , मणक्याचे आजार होत आहेत. काही अपघातांमध्ये जखमी झालेल्या नागरिकांना कायमस्वरुपी अपंगत्व आले आहेत, तर काहींचा या खड्ड्यांमुळे दुर्दैवी मृत्यू देखील झाला आहे. जर सर्वसामान्य पुणेकरांनी भरलेल्या टॅक्समधून कोट्यावधी रुपये खर्चून रस्ते तयार केले जातात. त्याचे निकृष्ट काम केले जाते तर या अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्या नागरिकांच्या मृत्यूस जबाबदारी धरत गेल्या पाच वर्षातील सत्ताधारी भाजपमधील पदाधिकारी, या रस्त्यांचा दर्जा तपासणारे अधिकारी, या रस्त्यांची कामे करणारे ठेकेदार या सर्वांवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा”,अशी मागणी देखील शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी यावेळी केली.
या प्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख,संतोष नांगरे, विपुल म्हैसुरकर, मृणालिनी वाणी, शशिकला कुंभार, श्वेता होनराव, संजय दामोदरे, विजय बगाडे, सोनाली उजागरे, राहुल गुंड, प्रदीप शिवशरण, योगेश पवार, मंथन जागडे,अर्जुन गांजे, आनंद बाफना, बाळासाहेब अटल, रुपेश आखाडे, मोहसीन काझी, गणेश दामोदरे, अर्जुन गांजे, आनंद बाफना, सचिन गांधी, नामदेव पवार, अर्जुन भिसे, संतोष पिसाळ, समीर पवार व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.