yuvraj sambhajiraje chhatrapati | माघार घेणार की लढणार? | संभाजीराजे छत्रपती आपली भूमिका उद्या स्पष्ट करणार

Categories
Breaking News Political देश/विदेश महाराष्ट्र

माघार घेणार की लढणार?

: संभाजीराजे छत्रपती आपली भूमिका उद्या स्पष्ट करणार

 संभाजीराजे छत्रपती राज्यसभेची निवडणूक लढणार की त्यातून माघार घेणार, हे उद्या स्पष्ट होणार आहे. संभाजीराजे छत्रपती उद्या (२७ मे) आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. उद्या सकाळी ११ वाजता संभाजीराजे छत्रपती यांची मुंबईतील मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद होणार आहे.

संभाजीराजेंना राज्यसभा निवडणूक लढायचीच झाली तर त्यांच्याशी पाठिंब्यासाठी मोठी आर्थिक उलाढाल करावी लागेल, शिवाय विजयाची हमी नसताना अर्ज भरण्यातही काहीच हशील नाही. त्यामुळे एकतरी शिवसेनेचा पर्याय स्वीकारणे किंवा लढतीतून बाजूला होणे हेच दोनच पर्याय आजच्या घडीला त्यांच्यापुढे आहेत. त्यामुळे उद्या पत्रकार परिषदेत संभाजीराजे नेमकी कोणती भूमिका मांडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

विधानसभेच्या २८८ सदस्यांमधून राज्यसभेत निवडून द्यायच्या सहा जागांसाठी १० जून रोजी निवडणूक होत आहे. संख्याबळानुसार महाविकास आघाडीचे चार तर भाजपचे दोन सदस्य राज्यसभेवर जाऊ शकतात. राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर संजय राऊत यांनीही माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेचे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार आणि मी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. भाजपने तिसरी जागा लढवली तरी फरक पडत नाही, त्यांनी कितीही प्रयत्न करू द्या, विजय आमचाच होणार, असा विश्वास व्यक्त करत संजय राऊत यांनी भाजपला फटकारले आहे. तसेच,  शिवसेनेच्या उमेदवारांना संपूर्ण महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे, त्यामुळे विजय निश्चित असल्याचे संजय राऊत म्हणाले.

‘महाराज…तुमच्या नजरेतलं स्वराज्य मला घडवायचंय’-

शिवसेनेने राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी उमेदवार जाहीर केल्यानंतर संभाजीराजे यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र आज त्यांनी ट्विट करुन आपलं मत स्पष्ट केलं आहे. महाराज… तुमच्या नजरेतलं स्वराज्य मला घडवायचंय… मी कटीबद्ध असेन तो तुमच्या विचारांशी… मी बांधील असेन तो फक्त जनतेशी…, अशी भावना संभाजीराजे यांनी व्यक्त केली आहे.

Mulshi Dam | Pune | Water supply | मुळशी धरणातून पुण्याला पाणी मिळणे राहणार स्वप्न! 

Categories
Breaking News PMC social पुणे

मुळशी धरणातून पुण्याला पाणी मिळणे राहणार स्वप्न!

: 5 महिने उलटूनही पाटबंधारे विभागाकडून काही हालचाल नाही

पुणे.  पुणे शहराच्या लोकसंख्येनुसार शहराला  पाणीपुरवठ्यासाठी मिळालेले पाणी अपुरे आहे.  शहराची 18.58 टीएमसी पाण्याची गरज आहे.  त्यातच आता 34 गावांचा महापालिका हद्दीत समावेश झाला आहे.  शहराला सध्या 14.48 टीएमसी पाण्याची परवानगी असली तरी आगामी काळातील पाण्याची गरज पाहता मुळशी जलाशयातून पालिकेला पाच टीएमसी पाणी मिळणे गरजेचे झाले आहे.  त्यानुसार महापालिका मुख्य सभेने प्रस्ताव मान्य करून हा प्रस्ताव राज्य सरकारच्या पाटबंधारे विभागाकडे पाठवला आहे. मात्र गेल्या 5-6 महिन्यापासून पाटबंधारे विभागाने याबाबत कुठलीही हालचाल केलेली नाही. त्यामुळे पुण्याला मुळशी धरणातून पाणी मिळणे हे फक्त स्वप्नच राहणार आहे, असे म्हटले जात आहे. याकडे पालकमंत्री अजित पवार यांनीच लक्ष देणे गरजेचे झाले आहे.

 34 गावांचा समावेश झाल्याने पाण्याची गरज वाढणार

पुणे महानगरपालिका पुणे शहराला तसेच ५ किमीच्या परिघात येणाऱ्या गावांना पाणीपुरवठा करते.  त्यासाठी महापालिका खडकवासला प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार जलाशयातून पाणीपुरवठा केला जातो.  या 4 धरणांमधून नगरपालिकेकडून 11.50 टीएमसी पाणी मंजूर आहे.  गेल्या वर्षीपासून भामाखेड धरणातून २.६४ टीएमसी पाण्याची आवक होत आहे.  तसेच पवना धरणातून ०.३४ टीएमसी पाण्याची आवक होत आहे.  सध्या एकूण 14.48 टीएमसी पाण्याची आवक होत आहे.  मात्र प्रत्यक्षात पुण्याची गरज १८.५८ टीएमसी आहे.  तसेच नुकतेच राज्य शासनाच्या सूचनेनुसार 34 गावांचा महापालिका हद्दीत समावेश करण्यात आला आहे.  या गावांची लोकसंख्या १० लाखांपर्यंत आहे.  त्यामुळे त्याचा बोजा पालिकेवर पडणार आहे.  त्यामुळे पालिकेला अतिरिक्त पाण्याची गरज आहे.

 2005 पासून पाण्याचा कोटा वाढलेला नाही

  खडकवासला प्रकल्पातून शहरासह जिल्ह्यातील 22 ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा केला जातो.  2005 मध्ये खडकवासला प्रकल्पातून शहरासाठी 11.50 टीएमसी पाण्याचा कोटा शासनाच्या उच्चस्तरीय समितीने मंजूर केला होता.  त्यानंतर शहराला तेवढेच पाणी मिळत आहे.  शहराची लोकसंख्या वाढत असताना.  यासोबतच महानगरपालिका हद्दीत गावांचाही समावेश करण्यात येत आहे.  त्यामुळे पालिकेकडून वाढीव पाण्याची मागणी सातत्याने होत होती.  मात्र पाण्याचा कोटा वाढविण्यात आलेला नाही.  त्यामुळे पालिकेला त्रासाला सामोरे जावे लागत आहे.  त्यामुळे आता पुणे शहरासाठी पाण्याचा तिसरा स्त्रोत उपलब्ध होणार असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.  खडकवासला व भामासखेडला पूर्वीचे पाणी येत आहे.  मुळशीतून 5 टीएमसी पाणी मिळाले तर, शहर व परिसरातील गावांची पाण्याची तहान भागणार आहे.

 – 2031 मध्ये 23 टीएमसी पाणी वापरले जाईल

 महापालिका प्रशासनाच्या प्रस्तावानुसार लोकसंख्या वाढली की त्यानुसार पाण्याची गरजही वाढणार आहे.  त्यामुळे प्रशासनाने पाण्याची गरज पाहून पाण्यासंबंधीचे प्रस्ताव तयार केले आहेत.  यामध्ये 2021-22 साठी 20.07 टीएमसी आणि 2031-32 साठी 23.34 टीएमसी पाणी आरक्षित करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.  कारण राखीव पाण्यापेक्षा जास्त पाणी घेतल्यास पाटबंधारे विभागाकडून पाण्याच्या दुप्पट दर आकारला जातो.  त्याचा बोजा पालिकेवरच पडतो.  त्यामुळे सद्यस्थितीत मुळशीला पाच टीएमसी पाणी मिळणे आवश्यक आहे.  हे पाणी उपलब्ध झाल्यास टंचाईच्या काळात शहरावर जलसंकट निर्माण होणार नाही, असे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.
त्यानुसार महापालिका मुख्य सभेने प्रस्ताव मान्य करून हा प्रस्ताव राज्य सरकारच्या पाटबंधारे विभागाकडे पाठवला आहे. मात्र गेल्या 5-6 महिन्यापासून पाटबंधारे विभागाने याबाबत कुठलीही हालचाल केलेली नाही. त्यामुळे पुण्याला मुळशी धरणातून पाणी मिळणे हे फक्त स्वप्नच राहणार आहे, असे म्हटले जात आहे. याकडे पालकमंत्री अजित पवार यांनीच लक्ष देणे गरजेचे झाले आहे.

Monkeypox virus | PMC | मन्कीपॉक्स बाबत पुणे महापालिका सजग | नायडू हॉस्पिटलला सतर्क राहण्याच्या सूचना 

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे महाराष्ट्र

मन्कीपॉक्स बाबत पुणे महापालिका सजग

: नायडू हॉस्पिटलला सतर्क राहण्याच्या सूचना

मंकीपाॅक्स या आजाराबाबत पुणे महापालिका आराेग्य खाते सजग झाले आहे. विभागाकडून नायडू हाॅस्पिटल प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. संशयित रुग्ण आढळल्यास त्याबाबत माहिती घ्या, असे सांगण्यात आले आहे. दरम्यान  अद्याप आपल्याकडे असा संशयित रुग्ण आढळून आलेला नाही.

नायडू हे महापालिकेचे संसर्गजन्य राेगांच्या रुग्णांवर उपचार करणारे हाॅस्पिटल आहे. स्वाइन फ्लूपासून काेराेनापर्यंतचे सर्व रुग्ण येथेच प्रथम दखल करण्यात आले. कारण येथे विलगीकरण कक्षदेखील आहे. राज्याच्या साथराेग विभागाला राष्ट्रीय राेग निवारण केंद्राकडून सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार राज्याने सर्व जिल्ह्यांना आणि महापालिका यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. या सूचनांनुसार ज्या देशांत मंकीपाॅक्सचा प्रादुर्भाव झाला आहे तेथून आपल्याकडे प्रवास करून आलेल्या प्रवाशांवर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आलेले आहे.

हे प्रवासी गेल्या २१ दिवसांमध्ये जर प्रादुर्भावग्रस्त देशांत जाऊन आले असतील आणि त्यांना ताप, अंगावर पुरळ येणे असे मंकीपाॅक्सचे संशयित लक्षणे असतील तर त्यांना विलगीकरण करून त्यांचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या सूचना प्राप्त झाल्यावर पुणे महापालिकेनेदेखील खबरदारी घेतली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना पुणे महापालिकेचे सहायक साथराेग अधिकारी डाॅ. संजीव वावरे म्हणाले की, याबाबत नायडू रुग्णालयाला सूचना देण्यात आल्या आहेत. जर असे रुग्ण आढळलेच तर त्यांच्यावर नायडू रुग्णालयात उपचार करण्यात येतील. तशी साेयदेखील तेथे उपलब्ध आहे.

मंकीपाॅक्स सद्यस्थिती

– आतापर्यंत ११ देशांत ९२ रुग्ण आढळलेले आहेत.
– मंकीपाॅक्स हा प्राण्यांपासून मानवामध्ये पसरलेला एक विषाणू आहे.
– ताे प्राण्यांपासून माणसांत किंवा माणसापासून माणसात पसरू शकताे.
– त्वचेद्वारे किंवा श्वासाेच्छ्वासाद्वारे त्याचा प्रसार हाेताे.
– यामध्ये ताप येणे, अंगावर पुरळ येणे आणि लिंफनाेडला सूज येते.
– ही लक्षणे २ ते ४ आठवड्यांपर्यंत राहतात.

TulsiBag | PMC | तुळशी बागेतील फक्त 4 व्यावसायिकांनी पूर्ण भाडे भरले  :19 मे पासून तुळशी बाग बंद 

Categories
Breaking News PMC पुणे

तुळशी बागेतील फक्त 4 व्यावसायिकांनी पूर्ण भाडे भरले

:19 मे पासून तुळशी बाग बंद

पुणे : तुळशी बागेतील व्यावसायिकांनी भाडे न भरल्याच्या विरोधात महापालिका प्रशासनाने इथली दुकाने 19 मे पासून बंद केली आहेत. 2018 पासून या व्यावसायिकांनी थकबाकी भरलेली नाही. दरम्यान अशी माहिती समोर आली आहे कि फक्त 4 व्यावसायिकांनी पूर्ण भाडे भरलेले आहे . अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
पुण्यातील तुळशीबाग ही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. राज्य भरातून लोक इथे खरेदी करण्यासाठी येतात. इथे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना महापालिका प्रशासनाने शुल्क ठरवून दिले आहे. इथले व्यावसायिक अ+ गटात मोडतात. इथे एकूण 221 व्यावसायिक आहेत. 2018 सालापासून या व्यावसायिकांनी हे शुल्क भरलेले नाही. त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून तुळशी बाग बंद करण्यात आली आहे. त्यानंतर आता काही व्यावसायिकांनी थकबाकी भरण्यास सुरुवात केली आहे. 4 व्यावसायिकांनी पूर्ण भाडे भरले आहे. तर 123 लोकांनी 15-20 हजार रुपये भाडे महापालिकडे जमा केले आहे. महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले कि सगळ्या व्यावसायिकांनी भाडे भरल्याशिवाय तुळशीबाग चालू केली जाणार नाही.

DA | PMC | सुधारित दराने महागाई भत्त्याचा 4 महिन्याचा फरक मे पेड इन जून वेतनात

Categories
Breaking News PMC पुणे

सुधारित दराने महागाई भत्त्याचा 4 महिन्याचा फरक मे पेड इन जून वेतनात

: महापालिका प्रशासनाचा निर्णय

पुणे : महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना केंद्र सरकारी सेवकाप्रमाणे महागाई भत्ता जसाच्या तसा लागू केला जातो. 1 जानेवारी पासून 7 व्या वेतन आयोगानुसार महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ करून तो 34% करण्यात आला आहे. त्यानुसार महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देखील लागू करण्यास महापालिका आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. त्यानुसार  जानेवारी ते एप्रिल अशा चार महिन्याचा सुधारित दराने फरक  मे पेड इन जून वेतनात देण्यात येणार आहे. नुकतेच याबाबतचे आदेश महापालिका प्रशासनाने जारी केले आहेत.

पुणे महानगरपालिका अधिकारी / सेवकांना दिनांक ०१.११.१९७७ पासून मे केंद्र शासनाचे सेवकांप्रमाणे महागाई भत्ता देण्यास तसेच त्या मध्ये वेळोवेळी होणारे बदल जसेच्या तसे लागू करण्यास  मनपा सभा २३.१२.१९७७ ने धोरणात्मक मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार वेळोवेळी कार्यवाही करण्यात येत आहे. सद्यस्थितीत दिनांक ०१ / ०१ / २०२२ पासुन ३१% दराने महागाई भत्ता आदा करण्यात येत आहे. ७ व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या अधिकारी  कर्मचाऱ्यांसाठी  महागाई भत्त्याचा दर दिनांक ०१/०१/२०२२ पासुन ३१% वरून ३% ने वाढवून ३४ % इतका करण्यात आलेला आहे. हा ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित दर ३% वाढवून ३१% वरून ३४% इतका करणेत आला आहे. सदरचा दर ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित करण्यात आलेल्या वेतन श्रेण्यांना लागू करण्यात आला आहे. पुणे महानगरपालिकेतील अधिकारी / सेवकांना व सेवानिवृत्ती अधिकारी / कर्मचारी सेवकांना कुंटूंबनिवृत्ती वेतनधारक यांना
दिनांक ०१/०१/२०२२ पासुन ३% दराने महागाई भत्ता वाढवुन म्हणजेच एकुण ३४% दराने महागाई भत्ता फरकासह आदा करणेस आयुक्त यांची  प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.

त्यानुसार  माहे जाने २०२२ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता सुधारित दराने (३१% वरून ३४%) या दराने अदा केला जाणार आहे. तसेच माहे जाने २०२२ ते एप्रिल २०२२ या चार महिन्याचे ७ व्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता सुधारित दराने (३१% वरून ३४%) फरक माहे मे २०२२ पेड इन जुन २०२२ चे वेतनातून अदा करणेस मान्यता दिली आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांना याचा लाभ दिला जाईल.

Vaikunth Smashanbhumi | PMC | वैकुंठ स्मशानभूमीसाठी आता टेक्निकल कन्सल्टन्ट!  | 15 लाखांचा येणार खर्च 

Categories
Breaking News PMC social पुणे

वैकुंठ स्मशानभूमीसाठी आता टेक्निकल कन्सल्टन्ट!

: 15 लाखांचा येणार खर्च

पुणे : वैकुंठ  स्मशानभूमीचे परिसरातील नागरिकांकडून स्मशानभूमीमधून बाहेर पडणाऱ्या धुराबाबत व तेथील प्रदूषणाबाबत वारंवार पुणे मनपाकडे लेखी व ऑनलाईन स्वरुपात तक्रारी येत असून याबाबत स्थानिक नागरिकांनी मएन. जी. टी मध्ये तसेच उच्च न्यायालय, मुंबई येथे दावा दाखल केलेला आहे. या सर्व बाबींचा विचार करून वैकुंठ स्मशानभूमी येथील प्रदूषण कमी करण्यासाठी तेथे अस्तित्वात असलेल्या सर्व यंत्रणेची तपासणी नीरी या केंद्रशासनाचे संस्थेमार्फत त्रयस्त पद्धतीने करून घेण्यासाठी  नीरी नागपुर यांना कार्यादेश देण्यात आलेला आहे. यासाठी महापालिकेला वर्षभरासाठी 15 लाखांचा खर्च येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून स्थायी समिती समोर ठेवण्यात आला आहे.

पुणे महानगरपालिकेचे अंतर्गत वैकुंठ स्मशानभूमी येथे पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील शवदहन करण्यासाठी एकुण सहा वुड पायर सिस्टिम असलेले चार ए. पी. सी शेड, एक गॅस दाहिनी व तीन विदुयत दाहिनी कार्यान्वित आहेत. सदर दाहीन्यांमधून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी तीन विदुयत दाहीन्यांसाठी तीन स्वतंत्र स्क्रबर व ब्लोअर युनिट बसविण्यात आले आहे, एक गॅस दाहिनीसाठी
स्वतंत्र स्क्रबर व ब्लोअर युनिट बसविण्यात आले आहे. शवदहनानंतर दाहीनिमधून बाहेर पडणाऱ्या धुरावर प्रक्रिया करून ३०.५ मी. उंचीच्या चिमणी मधून हवेमध्ये धूर सोडण्यात येत आहे. तसेच वूड पायर सिस्टिमचे
चार शेडमधील शवदहनानंतर होणारा धूर प्रक्रिया करून चार स्वतंत्र स्क्रबर ब्लोअर व चिमणीद्वारे हवेमध्ये सोडण्यात येतो.

परंतु बैकुंठ स्मशानभूमीचे परिसरातील नागरिकांकडून स्मशानभूमीमधून बाहेर पडणाऱ्या धुराबाबत व तेथील प्रदूषणाबाबत वारंवार पुणे मनपाकडे लेखी व ऑनलाईन स्वरुपात तक्रारी येत असून याबाबत स्थानिक नागरिकांनी मे.एन. जी. टी मध्ये तसेच मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दावा दाखल केलेला आहे. या सर्व बाबींचा विचार करून वैकुंठ स्मशानभूमी येथील प्रदूषण कमी करण्यासाठी तेथे अस्तित्वात असलेल्या सर्व यंत्रणेची तपासणी मे नीरी या केंद्रशासनाचे संस्थेमार्फत त्रयस्त पद्धतीने करून घेण्यासाठी  नीरी नागपुर यांना कार्यादेश देण्यात आलेला आहे. त्याअनुषंगाने मे. नीरी, नागपुर यांनी वैकुंठ स्मशानभूमी येथील ए.पी.सी. सिस्टीम बदलण्यासाठीचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे.

 वैकुंठ स्मशानभूमी येथील ए.पी.सी. सिस्टीम बदलण्यासाठी
नीरी नागपुर टेक्निकल कन्सल्टंट, कॉमन व सेप्रेट ए.पी.सी. युनिटचे डिजाइन करणे, निविदा प्रक्रिया राबविणेसाठी टेक्निकल स्पेसिफिकेशन पुरविणे, ए.पी.सी. सिस्टीम बसविणे व ऑपरेशन करणे या कामी टेक्निकल सपोर्ट देणे, ए.पी.सी. सिस्टीम चे एक वर्षे कालावधीसाठी परफॉर्मन्स टेस्टिंग करणे, आवश्यकता भासल्यास ए.पी.सी. सिस्टीम मध्ये सुधारणा करणे व वैकुंठ स्मशानभूमीमधील इतर प्रदूषण विषयक समस्यांना कन्सल्टंट म्हणून एक वर्षासाठी काम करणे इ. कामे करून घेण्यात येणार आहेत.

Petrol-Diesel Price | राज्यात पेट्रोल, डिझेल आणखी स्वस्त 

Categories
Breaking News Commerce Political social देश/विदेश महाराष्ट्र

राज्यात पेट्रोल, डिझेल आणखी स्वस्त

राज्यातील नागरिकांना पेट्रोल डिझेल बाबत अजून दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने काल पेट्रोल आणि डिझेलचे  अबकारी कर कमी केल्यानंतर राज्य शासनाने आज 22 मेपासून पेट्रोल आणि डिझेलवरील  मूल्यवर्धित करात ( VAT) अनुक्रमे २ रुपये ८ पैसे आणि १ रुपया ४४ पैसे प्रती लिटर कपात केली आहे. यामुळे वार्षिक सुमारे २५०० कोटी रुपये राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे. तर राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे.

मूल्यवर्धित कर कमी केल्याने पेट्रोलकरिता ८० कोटी रुपये महिन्याला आणि १२५ कोटी रुपये डिझेलकरिता इतके महसुली उत्पन्न कमी होणार आहे. १६ जून २०२० ते ४ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे ७ रुपये ६९ पैसे आणि १५ रुपये १४ पैसे प्रती लिटर कर आकारात होते. मार्च आणि मे २०२० मध्ये केंद्राने पेट्रोल आणि डिझेलच्या अबकारी दरात अनुक्रमे १३आणि १६ रुपये अशी वाढ केली होती.

इंधनाच्या भडकलेल्या किमती आणि महागाईमुळे होरपळलेल्या जनतेला केंद्र सरकारने काल मोठा दिलासा दिला. सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे ८ आणि ६ रुपये प्रति लिटर कपात करण्याची घोषणा केली. तसेच उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना घरगुती गॅसवर प्रति सिलिंडर २०० रुपये अनुदान देण्याचेही सरकारने जाहीर केले. याशिवाय किमती कमी करण्यासाठी काही उत्पादनांवरील आयात शुल्कातही कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

Raj’s interaction with students | राज ठाकरेंच्या सभेला उपस्थित अंध विद्यार्थ्यांसोबत राज यांचा संवाद! | काय प्रश्न विचारला राज ठाकरेंनी? 

Categories
Breaking News Political पुणे

राज ठाकरेंच्या सभेला उपस्थित अंध विद्यार्थ्यांसोबत राज यांचा संवाद! काय प्रश्न विचारला राज ठाकरेंनी?

पुण्यातील राज ठाकरेंच्या सभेला काही अंध विद्यार्थी उपस्थित होते. ठाकरेंनी त्यांना सन्मानाने व्यासपीठावर बसवले.  अंध विद्यार्थ्यांनी राज ठाकरे कडून काही अपेक्षा व्यक्त केल्या. दरम्यान व्यासपीठावर सभा झाल्यानंतर राज ठाकरेंनी या विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी याल का असा प्रश्न विचारला, त्यावेळी त्यांनी सांगितले कि आम्ही कुठेही यायला तयार आहोत.

राज यांच्या प्रत्येक भूमिका महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्वाची असून त्यांनी महागाई, गॅस दरवाढ अशा मुद्दयांना हात घातला पाहिजे असे मत या अंध तरुणांनी व्यक्त केले आहे.

ते म्हणाले, लहानापासूनच राज यांची भाषण ऐकत आलो आहे. राज ठाकरेंच्या सगळ्या भूमिका आक्रमक आहेत. महाराष्ट्राच्या विकासासाठी आक्रमक दाखवणारे दुसरे नेतृत्व नाही. बाळासाहेबानंतर राज साहेबच राज्याचा विकास करू शकतात असं ते यावेळी म्हणाले आहेत.

सामान्य माणसांच्या समस्येवरही बोलायला हवे 

आम्हाला त्यांचे  मराठी पाट्या, भोंगे हे मुद्दे महत्वाचे वाटतात. अयोद्धेबाबत ते आज बोलणार आहेत. त्यांनी सर्वच लाऊडस्पिकर बंद करण्याची भूमिका घेतली आहे. ती सामान्य नागरिकांसाठी योग्यच आहे. पण त्याबरोबरच राज यांनी महागाई, गॅस दरवाढ याबाबत बोलायला पाहिजे. एखाद्या वेळेस  नोकरदार वर्ग गॅस घेऊ शकतो. पण गोरगरिबाने कुठं जायचं. त्यांना गॅस दरवाढ परवडत नाही. जर राज ठाकरेंनी याबाबत भूमिका घेतल्यास दरवाढ कमी होण्याची शक्यता आम्हाला वाटते. असा राज ठाकरेंवरचा विश्वास या अंध तरुणांनी यावेळी व्यक्त केला आहे.

Raj Thackeray | अयोध्या दौऱ्याला विरोध हा ट्रॅप; राज ठाकरेंचा रोख कुणाकडे? | मुख्यमंत्री, संजय राऊत, आदित्य ठाकरे बद्दल काय म्हणाले राज ठाकरे? 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

अयोध्या दौऱ्याला विरोध हा ट्रॅप; राज ठाकरेंचा रोख कुणाकडे? 

: मुख्यमंत्री, संजय राऊत, आदित्य ठाकरे बद्दल काय म्हणाले राज ठाकरे? 

पुणे : मनसे प्रमुख राज ठाकरेंची आज पुण्यात सभा झाली. यावेळी त्यांनी अयोध्या दौरा का रद्द केला? याचं कारण सांगितलं. तसेच त्यांच्या अयोध्या दौऱ्यावरून ज्या घडामोडी घडल्या त्याला महाराष्ट्रातून रसद पुरविण्यात आल्याचा आरोप देखील त्यांनी केला. इतकंच नाहीतर मुख्यमंत्र्यांवर, संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्यावर  देखील जोरदार टीका केली. 

.औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवून जातात.

अफजल खानाच्या कबरीचा विस्तार किती झालाय? त्याच्या कबरीसाठी फंड येतो कुठून? औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवून जातात. तरीही महाराष्ट्र थंड आहे. आम्हाला काहीही वाटत नाही. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सकाळची अजान बंद झाली. अजानचा आवाज हळूहळू वाढणार. भोंग्यांचा विषय सुरू झाला तर एकदा तुकडा पाडून टाका. हे आंदोलन आहे. २८ हजार मनसे कार्यकर्त्यांना नोटीस आली. जे कायद्यानुसार वागतात त्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करणार का? जे कायदे पाळत नाहीत त्यांच्यासोबत चर्चा करणार का? आंदोलने होत राहणार आहे. आमची टीम तयार आहे. हे आंदोलन सुरू ठेवायचं आहे. त्यासाठी एक पत्र देणार आहे आणि ते प्रत्येक हिंदू बांधवांच्या घरी पोहोचवायची आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

”पवारांनी बाळासाहेबांची विश्वासार्हता घालवली” – 

”औरंगाबादेत बघता बघता एमआयएमचा खासदार झाला. कोणीतरी येतं आणि औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवतं? तुम्ही काय करता? एमआयएमच्या अवलादी हे औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्त होतात. याचं शिवसेनेला काहीच वाटत नाही. कारण शिवसेनेसाठी सत्ता महत्वाची आहे. औरंगजेब हा शरद पवारांना सुफी संत वाटतो का? शरद पवार बाळासाहेबांची विश्वासार्हता घालवत आहेत. तरीही शिवसेना पवारांसोबत आहे”, असा टोलाही पवारांनी लगावला.

तुम्ही कोण? महात्मा गांधी कि वल्लभभाई पटेल?

”राज ठाकरे आंदोलन अर्धवट सोडतो, असं म्हणतात. पण, मला एक आंदोलन दाखवा जे अर्धवट सोडलं. टोल नाक्यापासून सर्वच आंदोलन यशस्वी झाले. तुमच्या अंगावर एकतरी आंदोलन केल्याचा गुन्हा आहे का? हे उद्धव ठाकरेंनी सांगावं. भूमिका कुठलीच घ्यायची नाही. संभाजीनगरचं नामकरण झालं की नाही झालं काय फरक पडतो असं म्हणतात. मी आहे असं सांगतात. पण तू कोण आहे ? वल्लभभाई पटेल की महात्मा गांधी?” अशी जोरदार टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली.

राऊत-राणा एकत्र जेवतात 

राणा दाम्पत्य आणि शिवसेनेत इतका राडा झाला. त्यानंतर संजय राऊत आणि रवी राणा हे लेहमध्ये जेवण करताना दिसले. मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचण्यासाठी आलेल्यांसोबत तुम्ही फिरताय. हे सर्व ढोंगी आहेत. यांचं हिंदूत्व फक्त बोलण्यापुरतं आहे. त्यादिवशी मुख्यमंत्र्यांची सभा झाली. काय पोरकटपणा लावलाय? यांचं हिंदूत्व खोटं आणि आमचं खरं असं सांगतात, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

राज ठाकरेंचा रोख कोणाकडे? –

कारसेवकांना ठार करून शरयू नदीत मृतदेह सोडले होते. त्या ठिकाणाचं देखील दर्शन मला घ्यायचं होतं. पण, राजकारणात अनेकांना भावना समजत नाही. अयोध्येत काही झालं असतं तर आपले कार्यकर्ते त्यांच्यावर धावून गेले असते. तुमच्यावर गुन्हे दाखल करून तुम्हाला तुरुंगात टाकलं असतं. आपल्या कार्यकर्त्यांची मला काळजी आहे. आता आठवलं का? राज ठाकरेंनी माफी मागावी? आतापर्यंत कुठे गेले होते? विषय माफी मागण्याचा आहे ना? गुजरातमध्ये अल्पेश ठाकूर नावाची व्यक्त आहे. त्यांनी उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांना मारलं होतं. त्यांना गुजरातमधून हाकलण्यात आलं. तिथून कोण माफी मागणार का? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.

अयोध्या दौऱ्याला विरोध हा ट्रॅप, महाराष्ट्रातून रसद पुरविली – राज ठाकरे 

पायाचं दुखणं वाढलं आहे. कंबरेला त्रास होतो. त्यामुळे येत्या १ जूनला शस्त्रक्रिया करणार आहे. अयोध्या दौरा तात्पुरता स्थगित केल्यानंतर अनेकांना वाईट वाटलं. अनेकजण कुत्सितपणे बोलायला लागेल. पण, मुद्दाम त्यांना बोलण्यासाठी दोन दिवस वेळ दिला आणि आज भूमिका सांगण्यासाठी सभा घेतली. माझ्या अयोध्या दौऱ्याच्या घोषणेनंतर ज्या काही राजकीय नाट्यमय घडामोडी घडल्या तो एक ट्रॅप होता. त्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरविण्यात आली. अयोध्या वारी खुपणाऱ्यांनी हे काम केलं आहे., असा आरोप देखील राज ठाकरेंनी केला.

भाषणाच्या सुरुवातीला पवारांना टोला –

निवडणुका नाही, उगाच कशाला पावसात भिजत भाषण करायचं, असं म्हणत भाषणाच्या सुरुवातीलाच शरद पवारांना टोला लगावला.

अंध विद्यार्थ्यांना मंचावर स्थान –

पुण्यातील अंध विद्यार्थ्यांची राज ठाकरेंच्या सभेला उपस्थिती लावली आहे. त्यांना व्यासपीठावर बोलावून राज ठाकरेंनी त्यांचा सन्मान केला. त्यांना मंचावर स्थान देण्यात आले.

Gas subsidy | Petrol-diesel price | पेट्रोल डिझेल नंतर घरगुती गॅस वरही सबसिडी | किती जाणून घ्या!

Categories
Breaking News Political social देश/विदेश महाराष्ट्र

पेट्रोल डिझेल नंतर घरगुती गॅस वरही सबसिडी

सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत केंद्र सरकारने शनिवारी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे आठ आणि सहा रुपयांनी कपात केली. यानंतर पेट्रोलचे दर प्रतिलिटर 9.5 रुपये आणि डिझेलचे दर 7 रुपयांनी कमी होणार आहेत. याशिवाय, केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या 9 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना प्रति गॅस सिलेंडर (12 सिलिंडरपर्यंत) 200 रुपये सबसिडी देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे केंद्राला दरवर्षी जवळपास सहा हजार कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. मात्र, या निर्णयामुळे माता-भगिनींची विस्कटलेली आर्थिक गणितं स्थिर होण्यास मदत होणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या.

देशातील सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रातील परभणीमध्ये 123.46 रुपये प्रति लिटर, तर आंध्र प्रदेशातील चित्तूरमध्ये डिझेल 107.61 रुपये प्रति लिटर आहे. त्याच वेळी, पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल 91.45 रुपये आणि डिझेल 85.83 रुपये प्रति लिटर असून, देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 105.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा आजचा दर 96.67 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोल 120.51 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 104.77 रुपये दराने विकले जात आहे. मात्र, आता उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होणार आहेत.

निर्मला सीतारामन म्हणाल्या, “पंतप्रधान मोदींनी जेव्हापासून पदभार स्वीकारला, तेव्हापासून केंद्र सरकार गरीबांच्या कल्याणासाठी समर्पित आहे. आम्ही गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या मदतीसाठी अनेक पावले उचलली आहेत. परिणामी, आमच्या कार्यकाळात सरासरी महागाई दर पूर्वीच्या सरकारांच्या तुलनेत कमी आहे.”