Distribution of petrol | दुचाकीस्वारांना रुपये कमी दराने पेट्रोल वाटप | ऍड स्वप्निल जोशी यांच्याकडून कार्यक्रमाचे आयोजन

Categories
Political social पुणे

दुचाकीस्वारांना रुपये कमी दराने पेट्रोल वाटप | ऍड स्वप्निल जोशी यांच्याकडून कार्यक्रमाचे आयोजन

प्रशांतदादा जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त दुचाकीस्वारांना रुपये ५.८६ /- कमी दराने पेट्रोल वाटप कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचा लाभ सुमारे 550 ते 600 लोकांनी घेतला.कार्यक्रमाचे पूर्ण आयोजन ऍड स्वप्निल जोशी यांनी केले होते.

यावेळी शहर अध्यक्ष किशोर कांबळे, माजी स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके,राजू साने, संदीप बालवडकर,बाळासाहेब आहेर, व्ही. जे. एन. टी. शहर अध्यक्ष गोविंद पवार,विशाल मोरे,विध्यार्थी अध्यक्ष विक्रम जाधव,शुभम मताळे,महेश हांडे,लावण्या शिंदे,मतदार संघ कार्याध्यक्ष केतन ओरसे, निलेश रुपटक्के खडकीब्लॉक युवक अध्यक्ष सागर हुले विध्यार्थी अध्यक्ष कार्तिक थोटे व सर्व युवक पदाधिकारी छत्रपती शिवाजीनगर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी प्रशांत जगताप खासदार होण्याआधी त्यांचा साधा कार्यकर्ता स्वप्निल हा दोन तासासाठी ५ रुपये कमी दराने पेट्रोल स्वखर्चातुन देतो तर  अजितदादा मुख्यमंत्री आणि प्रशांतदादा खासदार झाले तर नक्कीच पुण्याचा विकास होईल असे मनोगत किशोर कांबळे यांनी व्यक्त केले.

Illegal Hoardings | आरक्षित जागेवर अनधिकृत होर्डिंग्स | प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात जनआंदोलन

Categories
Breaking News PMC Political social पुणे

आरक्षित जागेवर अनधिकृत होर्डिंग्स

| प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात जनआंदोलन

पुणे |  वानवडी स.नं.६४ येथील अनधिकृत होर्डिंग व बेकायदेशीर राडारोडयाच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस चे शहर अध्यक्ष यांच्या नेतृत्वात नागरी जनआंदोलन करण्यात आले. तसेच होर्डिंग नाही काढल्यास न्यायालयात खेचण्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आला.
प्रशांत जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार वानवडी सर्वे नंबर ६४ या ठिकाणी पुणे महानगरपालिकेचे प्ले ग्राउंड, पार्किंग, HCMTR  – रिंग रोड अशा विविध बाबींकरिता आरक्षण आहे. या आरक्षणाच्या जागेमध्ये मागील २०दिवसात तब्बल १५ होर्डिंग्स अनाधिकृतपणे उभी केलेली आहेत. क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांवर दबाव आणून,धमक्या देऊन अशाप्रकारे हे होर्डिंग उभे केलेले आहेत, असा आमचा थेट आरोप आहे. याबाबत प्रशासनाने कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही, ही कारवाई करावी याकरिता तसेच मार्केट यार्ड परिसरातील विविध बिल्डरचा राडारोडा या ठिकाणी टाकून पुराची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्या विरोधामध्ये आज जनआंदोलन करण्यात आले. हे जनआंदोलन करण्यात येत असताना पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी पुढच्या काही दिवसांमध्ये कारवाई केली नाही, तर त्यांना थेट न्यायालयात खेचण्याचा इशारा देण्यात आला. या आंदोलनासंदर्भात निवेदन स्वीकारण्याकरिता वानवडी रामटेकडी, क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त श्याम तारू हे उपस्थित होते.
 प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात केलेल्या आंदोलनामध्ये मा.नगरसेविका रत्नप्रभाताई जगताप, मा. नगरसेविका नंदाताई लोणकर, मा. नगरसेवक  अशोकभाऊ कांबळे,  प्रफुल्ल जांभुळकर,  केविन मॅन्युअल, प्रीती चड्डा, मृणालिनीताई वाणी, संदीप जगताप ,  स्वाती चिटणीस,   गणेश नायडू व वानवडी परिसरातील तसेच सोसायटीतील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

MP Girish Bapat | खासदार गिरीश बापट यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडून श्रद्धांजली | शहरातील विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया

Categories
Breaking News cultural Political पुणे महाराष्ट्र

खासदार गिरीश बापट यांच्या जाण्याने समाजाचे, महाराष्ट्राचे मोठे नुकसान- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

खासदार गिरीश बापट यांचे काम पुणे कधी विसरू शकणार नाही- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, दि. 29 : खासदार गिरीश बापट यांची एक दिलदार, मोकळ्या मनाचा माणूस अशी ओळख होती. अशा कणखर मनाचा नेता आपल्यातून गेल्यामुळे त्यांच्या जाण्याने भारतीय जनता पक्षाचेच नव्हे तर समाजाचे, महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले असून न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली.

मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार गिरीश बापट यांच्या शनिवार पेठेतील निवासस्थानी त्यांचे पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले व पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली. त्यांनी खासदार स्व. बापट यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

मुख्यमंत्री म्हणाले, विधानसभेत सर्वांना सोबत घेऊन त्यांनी काम केले. अशी माणसे दुर्मिळ असतात. सर्वांना सोबत घेताना विरोधकांनादेखील आपलेसे करण्याची गिरीशभाऊ यांची हातोटी होती. कुठलाही राजकीय अभिनिवेश न ठेवता त्यांनी सर्वांनाच मदत केली. पुणे शहरात भारतीय जनता पक्ष वाढविण्यात त्यांचे फार मोठे योगदान होते. पक्षाच्या, राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी काम केले. सर्वांना हवाहवासा नेता आपण गमावला. कोणताही राजकीय अभिनिवेश मनात न ठेवता सर्व धर्मियांना मदत केली. राजकारणाच्या पलिकडे जाऊन त्यांनी काम केले. अशा शब्दात त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

गिरीश बापट यांचे काम पुणे कधी विसरू शकणार नाही- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
खासदार गिरीश बापट हे एक अनमोल रत्न होते. पुण्याच्या जडणघडणीमध्ये त्यांचा वाटा अतिशय मोठा आहे. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, सलग पाच वेळा आमदार, खासदार, पालकमंत्री म्हणून त्यांनी केलेले काम पुणे कधी विसरु शकणार नाही. त्यांच्या जाण्याने भारतीय जनता पक्षाची, राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली.

श्री. फडणवीस म्हणाले, पुणे हे नररत्नाची खाण असल्याचे आपण म्हणतो, त्यापैकी खासदार गिरीश बापट हे एक अनमोल रत्न होते. त्यांच्यामध्ये माणसे जपण्याची कला होती. महत्वाचे म्हणजे रस्त्यावरच्या माणसालाही आपला वाटेल असा हा माणूस होता. बोलण्यामध्ये ते खूप चपखल होते. कोणालाही न दुखावता शालजोडीतून शब्द वापरुन आपला मुद्दा पटवून देण्याची हातोटी होती. पक्षाच्या भिंतीपलीकडचे त्यांचे सर्व नेत्यांशी, पक्षांशी, समाजाशी त्यांचे अतिशय चांगले संबंध होते. संसदीय कार्यमंत्री म्हणूनही त्यांचे कार्य नोंद घेण्यासारखे होते. शेतीवरही त्यांचे प्रचंड प्रेम होते. कृष्णा खोरे विकास महामंडळाचे प्रमुख म्हणून त्यांनी सिंचनाचे केलेले काम सुवर्णाक्षरात लिहून ठेवण्यासारखे आहे. त्यांचे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. त्यांना सगळ्या क्षेत्रातील प्रचंड ज्ञान होते. असे नेते तयार होण्यासाठी चाळीस- चाळीस वर्षे लागतात, अशा शब्दात त्यांनी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून बापट कुटुंबियांचे सांत्वन
मुख्यमंत्री श्री.शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी शनिवार पेठ येथील खासदार गिरीश बापट यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी खासदार बापट यांच्या पत्नी गिरीजा बापट, मुलगा गौरव बापट, सून स्वरदा बापट, बहिण माधुरी गोखले, आमदार उमा खापरे, महेश लांडगे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, जगदिश मुळीक उपस्थित होते.


खासदार गिरीश बापट यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना शोक

 

मुंबई, दि. 29 : राज्यपाल रमेश बैस यांनी खासदार गिरीश बापट यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

“लोकप्रिय खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दुःख झाले. आपल्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत गिरीश बापट यांनी संसद सदस्य, राज्य विधानसभेचे सदस्य, कॅबिनेट मंत्री, संसदीय समित्यांचे सदस्य यांसह विविध पदांवर उल्लेखनीय कार्य केले. कामगार संघटनेच्या माध्यमातून राजकारणात आलेले गिरीश बापट हे कुशल संघटक होते. त्यांचा जनसंपर्क अतिशय व्यापक होता. राजकारणात ते अजातशत्रू होते. त्यांच्या निधनामुळे राज्याने एक लोकप्रिय नेता व अनुभवी संसदपटू गमावला आहे”, असे राज्यपाल बैस यांनी आपल्या शोकासंदेशामध्ये म्हटले आहे.


राजकारणातील मित्रत्व जोपासणारे लोकाभिमुख नेतृत्व गमावले | राधाकृष्ण विखे पाटील यांची श्रद्धांजली

 

मुंबई, दि. 29 : “भाजपचे नेते आणि खासदार गिरीष बापट यांच्या निधनाने राजकारणातील मित्रत्व जोपासाणारे लोकाभिमुख नेतृत्व गमावले” अशी भावना राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

आपल्या शोकसंदेशात मंत्री विखे पाटील म्हणाले की, गेली अनेक वर्षे विधिमंडळात त्यांचा सहवास लाभला. विरोधी पक्षनेता म्हणून काम करताना त्यावेळी श्री. बापट संसदीय कामकाज मंत्री म्हणून काम पाहायचे. राजकारणात फार कटूता येऊ न देता सभागृहातील निर्माण होणाऱ्या पेचप्रसंगावर संवादाने मार्ग काढण्याची त्यांची हातोटी होती.

महानगरपालिका ते लोकसभा हा गिरीष बापट यांचा राजकीय प्रवास त्यांच्या लोकाभिमुख कार्याचा होता. पुणे आणि गिरीष बापट हे एक अतूट नाते होते. त्यांच्या जाण्याने भारतीय जनता पक्षाचे मोठे नुकसान झाले असून पक्षाच्या वाटचालीतील एक अनुभवी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची संवेदना व्यक्त करून मंत्री विखे पाटील यांनी गिरीष बापट यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.


पुणे शहराचे खासदार आणि माझे दीर्घकाळापासूनचे मित्र गिरीश बापट यांच्या निधनाने अतीव दुःख झाले. गेला काही काळ त्यांचे आजारपण चालू होते पण त्यामुळे त्यांना मृत्यू इतका लवकर येईल हे मात्र अपेक्षित नव्हते. कार्यकर्ता, नगरसेवक, आमदार, मंत्री, पालकमंत्री आणि खासदार अशी उत्तम राजकीय वाटचाल करताना त्यांनी स्वतःचा कार्यकर्त्याचा पिंड मात्र सोडला नाही. याच बरोबर राजकीय स्पर्धा असली तरी विरोधी पक्षांशी वितुष्ट असता कामा नये, ही राजकारणातील चांगली भावना त्यांनी सदैव जपली. त्यामुळेच सर्व राजकीय पक्षामध्ये त्यांचे चांगले मित्र होते. पुण्याच्या विकासात त्यांनी निश्चितच भरीव योगदान दिले. मात्र, शहराच्या विकासात त्यांनी कधी राजकारण आणले नाही. हे त्यांचे अजून एक ठळक वैशिष्ट्य सांगता येईल. पुण्याच्या मध्यवस्तीतील कसबा विधानसभा मतदारसंघात सलग पाच वेळा म्हणजेच सलग २५ वर्षे ते आमदार म्हणून निवडून येत होते. यातूनच त्यांच्या लोकसंपर्काची प्रचीती येते. पुण्यातील गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आणि मी प्रतिस्पर्धी म्हणून निवडणूक लढविली. मात्र, तरीही आमच्या मैत्रीत खंड पडला नाही. समाजातील सर्व समाज घटकांना सोबत घेऊन पुढे जाणारा आनंदी वृत्तीचा हा उमदा मित्र आज हरपला. यामुळे कुटुंबातील व्यक्ती गेल्यासारखेच दुःख मला झाले आहे. ईश्वर इच्छेपुढे कोणाचा इलाज नाही. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो ही प्रार्थना.

मोहन जोशी उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी


मागील ३ ते ४ दशकापासून पुणे शहराच्या सामाजिक राजकीय व सामाजिक क्षेत्राशी जोडलेले नाव म्हणजे गिरीशजी बापट.
अत्यंत संघर्षातून महानगरपालिका,विधानसभा व लोकसभा सदस्य या पदांवर काम करत असताना तसेच पुण्यासारख्या सांस्कृतिक राजधानीचे पालकमंत्रीपद भूषाविताना त्यांनी जपलेले पुणेरीपण ही बाब चिरकाल स्मरणात राहील. पुण्यातील सर्वच राजकीय पक्षांशी त्यांचे अत्यंत सलोख्याचे संबंध होते ,त्यांच्या अकाली निधनामुळे पुणे शहराच्या राजकीय व सामाजिक चळवळीचे अपरीमित नुक़सान झाले आहे .
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बापट कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.

| प्रशांत सुदामराव जगताप.
अध्यक्ष, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.


गिरीश बापट – कामगार नेता ते खासदार असा प्रेरणादायी राजकीय प्रवास. सर्वसामान्य व्यक्ती ज्यांच्यापर्यंत सहज पोहचू शकेल असा खासदार. दांडगा जनसंपर्क, राजकारणातील मुत्सद्दी तरीही सर्व राजकीय पक्षातील लोकांशी राजकारणापलीकडील मैत्री जपणारा दिलदार मित्र ….भावपूर्ण श्रद्धांजली!

वंदना चव्हाण खासदार, राज्यसभा


गिरिष बापटांसारखा नेता, असा खासदार पुनः होणे नाही : डॉ. नीलम गोऱ्हे

दुःखद निधनाबद्दल वाहिली आदरांजली

पुणे, ता. २८ : दीर्घ काळापासून पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांची पुण्याचा आवाज म्हणून ओळख होती ते पुण्याचे खासदार श्री. गिरिष बापट यांचे आज नुकतेच निधन झाल्याचे समजले. त्यांना सर्व प्रथम मी महाराष्ट्र विधान परिषदेची उप सभापती, शिवसेनेची उपनेता तथा स्त्री आधार केंद्राची अध्यक्षा या नात्याने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते.

त्यांचा आणि माझ्या गेल्या तीन दशकांपासून अधिक काळ परिचय होता. पुणे शहरातून कसबा विधान सभेतून आमदार म्हणून काम करीत असताना त्यांचा परिचय आमच्या कुटुंबात आमची आई कै. श्रीमती लतिका दिवाकर गोऱ्हे यांच्याशी सर्वप्रथम झाला.
त्यानंतर शिवसेना-भाजप युतीचे सरकार असतानाही सातत्याने संपर्कात असत.

२०१४ नंतर ते पुण्याचे पालकमंत्री आणि लोकसभेचे खासदार देखील झाले. या संपूर्ण कालावधीत त्यांनी पुणेकरांच्या असंख्य प्रश्न सोडवितानाच अष्टविनायक, पुणे शहरातील वाडे, संसदीय कार्यमंत्री असताना दोन्ही सभागृहांचा समन्वय त्यांनी अत्यंत उत्तम पद्धतीने केला होते. ते मंत्री असतांना विधान परिषदेत नेहमीच येत होते. सर्व पक्षांच्या आमदारांचे एक चांगले स्नेही म्हणून ते परिचित होते.

स्त्री आधार केंद्राच्या कार्यक्रमाना देखील अनेकदा ते आले होते. महात्मा फुले संग्रहालयाच्या ठिकाणाहून त्यांचा सर्वांचा संपर्क होत असे. असा नेता, असा खासदार पुनः होणे नाही अशी भावना मी व्यक्त करीत आहे.


खासदार गिरीश बापट यांनी पक्षीय राजकारणाच्या पलिकडे जाऊन आपुलकी, प्रेम आणि मैत्री जपण्याचे काम केले. मला व्यक्तिशः त्यांनी मुलाप्रमाणे वागणूक दिली. त्यांच्याकडे घेऊन गेलेले काम त्यांनी पक्ष न पाहता वैयक्तिकरित्या लक्ष घालून मार्गी लावून देण्याचे काम केले. प्रत्येक घटकाला ते नेहमी आपलेसे वाटायचे. त्यांच्या निधनाने पुण्यातील आमच्या सारख्या कार्यकर्त्यांचा हेडमास्तर गमविला असून ही पोकळी कधीही न भरून निघणारी आहे. त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची ताकद मिळो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

सुनिल टिंगरे, आमदार वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ

—–

NCP Vs Gopichand Padalkar | आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा | राष्ट्रवादी काँग्रेसचे पोलिसांना निवेदन

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा | राष्ट्रवादी काँग्रेसचे पोलिसांना निवेदन

भाजपचे आमदार गोपाचंद पडळकर हे सातत्याने शरद पवार यांच्यावर गरळ ओकत आहेत. त्यामुळे त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. अशी मागणी पुणे राष्ट्रवादी कॉंग्रेस ने पुणे पोलिसांना केली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या निवेदनानुसार लवासा, बारामती व मगरपट्टा हे तीन वेगवेगळे राज्य करण्यात यावे, या तिन्ही राज्यांचे वेगवेगळे मुख्यमंत्री असावेत आणि या तिन्ही राज्यांचा मिळून एक वेगळा देश निर्माण करावा ज्याचे पंतप्रधान पवार साहेबांना करावे, असे वक्तव्य करत देशाचे तुकडे करण्याची भाषा केली आहे. त्यांचे हे वक्तव्य भारताच्या संघराज्य व्यवस्थेला छेद देणारे असून याबाबत गोपीचंद पडळकर यांच्यावर तातडीने देशद्रोषाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच इंदापूर येथील जाहीर सभेत बोलताना “पवार हे या देशाला लागलेली कीड आहे” , असे वक्तव्य करत पवार आडनाव असलेल्या अठरापगड जाती -धर्मातील विविध कुटुंबीयांचा व त्यांच्या जातीचा अवमान केला आहे.यापैकी आदिवासी व मागासवर्गीय या समाजाचे प्रतिनिधित्व करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी वडार समजाचे महेश पवार व घिसाडी समाजाचे माधव पवार यांनी त्यांच्या आडनाव व समाजाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा.

ज्या गुन्हे अंतर्गत राहुल गांधींना दोषी ठरविण्यात आलं तोच गुन्हा गोपीचंद पडळकर यांच्यावर दाखल करत व आम्हाला देखील न्याय मिळावा, अशी मागणी या पदाधिकाऱ्यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त यांच्याकडे केली.  पुणे शहर पोलीस आयुक्त या घटनेचा गांभीर्याने विचार करून यावर कार्यवाही करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे, असे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.

सदर शिष्टमंडळात प्रवक्ते प्रदीप देशमुख , किशोर कांबळे , महेश पवार , माधव पवार , मधुकर पवार , महेश हंडे, शशिकांत जगताप , दिपक कामठे , शुभम मताळे इ प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

NCP | Agitation | झाडे वाचवण्यासाठी राष्ट्रवादीचे झाडावर चढून आंदोलन!

Categories
Breaking News PMC Political पुणे

झाडे वाचवण्यासाठी राष्ट्रवादीचे झाडावर चढून आंदोलन!

पुणे महानगरपालिकेने (PMC Pune) मुळा मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प (Mula mutha river revival project) हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. हे काम करताना नदी लगत असणारी काही वृक्ष ( trees) बाधित होणार आहेत. हे वृक्ष तोडू नयेत या मागणीसाठी राष्ट्रवादी कडून (ncp pune) संभाजी उद्यानासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रवक्ता प्रदीप देशमुख यांनी झाडावर चढून बसत झाडे न तोडण्याचा पुनरुच्चार केला. यावेळी कार्यकर्त्यांनी भाजप विरोधात घोषणाबाजी केली.

या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले. ते म्हणाले की, पुणे शहरात विकास कामांना आमचा विरोध नाही. पण विकास काम करत असताना, पर्यावरणाचा देखील भाजप आणि महापालिका प्रशासन थोडा विचार करायला पाहिजे होता. तो त्यांनी केला नसल्याने आता नदी पात्र सुधार प्रकल्प अंतर्गत हजारो झाडांची कत्तल करण्यात येत आहे.

नियमानुसार आम्ही झाड लावणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र आजवर पुणे महापालिका प्रशासनामार्फत झाडे काढल्यावर कोणत्याही ठिकाणी झाडे लावण्यात आली नाही. यामुळे या नदी पात्रात झाडांचे देखील तेच होणार आहे. यामुळे झाडांची कत्तल झाल्यास आम्ही न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस आणि पर्यावरण प्रेमींनी यावेळी दिला.

प्रवक्ते प्रदिप देशमुख म्हणाले की, केवळ आपल्या बॉसेसना खुश करण्यासाठी हा खटाटोप करण्यात येत आहे.या सर्व झाडांचे पुनर्रोपण करता येणे अशक्य आहे. आम्ही देखील विकासाचे समर्थक आहोत पण पर्यावरणाचा बळी देऊन होणारा विकास आम्हाला अमान्य आहे.

यावेळी शहाराघ्यक्ष प्रशांत जगताप , प्रवक्ते  प्रदीप  देशमुख , दिपाली धुमाळ ,किशोर कांबळे ,  नितीन कदम , अजिंक्य पालकर , मनोज पाचपुते ,  कैलास मकवान , विक्रम जाधव , हरीश लडकत , फईम शेख,  शिल्पा भोसले इ प्रमुख  उपस्थित होते.

PMC Budget | महापालिका आयुक्तांनी सादर केलेल्या बजेटबाबत राष्ट्रवादी आणि भाजपला काय वाटते?

Categories
Breaking News PMC Political पुणे

 महापालिका आयुक्तांनी सादर केलेल्या बजेटबाबत राष्ट्रवादी आणि भाजपला काय वाटते?

पुणेकरांनी भाजपला योग्य धडा शिकवावा | प्रशांत जगताप

राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, आज पुणे महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक विक्रम  कुमार यांनी पुणे महानगरपालिकेचे जे बजेट मांडलेले आहे ते अत्यंत निराशाजनक तथा अवास्तव आहे, असे आमचे ठाम मत आहे. गेल्या वर्षी स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी साडेआठ हजार कोटींचे बजेट मांडल्यानंतर आज २४ मार्च २०२३ रोजी देखील पुणे महानगरपालिकेला या आर्थिक वर्षात साडेपाच ते सहा हजार कोटींचे पुढे उत्पन्न गाठण्यात यश आलेले नाही, असे असताना देखील पुणे महानगरपालिकेचे प्रशासक म्हणून  विक्रम कुमार यांनी यावर्षी साडेनऊ हजार कोटींचे बजेट मांडले ही एक प्रकारे पुणेकरांची थट्टाच केली आहे. हे बजेट किमान ३ हजार कोटींच्या तुटीचे बजेट आहे,असा आमचा थेट आरोप आहे.
गेली अनेक दशके लोकप्रतिनिधींच्या आड लपून हे स्थायी समितीने फुगवलेले बजेट आहे, असा आरोप करणारे प्रशासन आज वास्तववादी बजेट मांडू शकले नाही, हे या बजेट चे ठळक वास्तव आहे.

२०१७ ते २०२२ या पाच वर्षाच्या भाजपच्या काळात पुणे महानगरपालिकेची झालेली घसरण लपविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या दबावाखाली आज माननीय महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी हे बजेट मांडले आहे,असा आमचा आरोप आहे. पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता असताना पुणे महानगरपालिकेकडे कर भरणाऱ्या तब्बल १० लाख मालमत्ता होत्या,त्यावेळी ५ ते ६ हजार कोटींची जमा रक्कम येत होती. आज पुणे महानगरपालिकेमध्ये ३४ गावे समाविष्ट होऊन नव्याने ६ लाख मिलकती येवून सुधा तब्बल ३ हजार कोटींच्या तुटीचे बजेट मांडण्याची वेळ पुणे महानगरपालिका आयुक्तांवर आली, अर्थात या संपूर्ण फसलेल्या बजेटचे श्रेय पुणे भाजपला जाते. त्यांच्या दबावाखाली व त्यांचा गेल्या पाच वर्षातील भोंगळ कारभार लपविण्यासाठीच अशा प्रकारचे बजेट सादर करण्यात आलेले आहे, ही बाब ओळखून येणारे काळात पुणेकरांनी याबाबत भाजपला योग्य तो धडा शिकवावा, अशी माझी पुणेकरांना विनंती राहील.


पुण्याच्या विकासाला चालना देणारे बजेट |जगदीश मुळीक

भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले,  पुणे महापालिका आयुक्तांनी सादर केलेले अंदाजपत्रक हे शहराच्या विकासाला चालना देणारे आहे.
शहर भाजपने केलेल्या मागणीनुसार कोणतीही करवाढ पुणेकरांवर लादण्यात आलेली नाही.
भाजपने सुरू केलेली मेट्रो, नदी शुद्धीकरण आणि सुशोभीकरण आरोग्य यंत्रणांचे सक्षमीकरण, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय निर्मिती, ठिक ठिकाणी उड्डाणपूल, रस्ते विकास याला प्राधान्य देण्यात आले आहे. भाजपच्या कारकिर्दीत सुरू झालेली विविध विकासकामे पूर्ण होण्यास या अर्थसंकल्पामुळे चालना मिळेल.

 

Mahabudget | राज्याच्या अर्थसंकल्पाबद्दल विरोधी पक्षांना काय वाटते?

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

 विरोधी पक्षांना बजेट बद्दल काय वाटते?

राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळात अर्थसंकल्प सादर केला. याबाबत विरोधी पक्षांनी जोरदार टीकेची झोड उठवली आहे.

मुंबई पाठोपाठ राज्यातील सर्वाधिक महसूल पुणे शहरातून जमा होतो. मात्र, राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्याच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहे. विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या पुरंदर विमानतळ, रिंग रोड, पुणे मेट्रोतील नवीन मार्ग यांनाही पुरेशा निधीची तरतूद न करता केवळ वाटण्याच्या अक्षता दाखविन्याचे काम शिंदे- फडणवीस सरकारने केले आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गत वर्षी सादर केलेल्या अनेक योजनांची नावे बदलून त्या मांडण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुणेकरावर अन्यायकारक असा अर्थसंकल्प आहे.

– सुनील टिंगरे, आमदार, वडगाव शेरी.

—— 

“पुणेकरांना गृहीत धरत, त्यांना ठेंगा दाखविण्याचे काम या बजेट ने केले आहे”

राज्याचे अर्थमंत्री म्हणून माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी मांडलेले हे पहिलेच बजेट आहे. पुढील लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्यासाठी बंडखोर आमदारांचा विचार करून मांडलेले हे बजेट आहे.

या बजेट मधून राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील जनतेला काहीही मिळालेले नाही. पुणे शहर व पुणे जिल्ह्याचा विचार करता पुणेकरांना गृहीत धरत, त्यांना ठेंगा दाखवण्याचे काम देवेंद्रजी फडणवीस यांनी केले आहे. आज झालेले बजेट पाहता, नुकत्याच कसबा विधानसभा निवडणुकीत झालेल्या मानहानीकारक पराभवातून देखील देवेंद्रजी फडणवीस यांनी काहीही बोध घेतलेला नाही असे यातून दिसून येते.

– प्रशांत सुदामराव जगताप.
अध्यक्ष, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.

——-

अंगणवाडी ताईंच्या मानधनात तुटपुंजी वाढ, एस. टी महामंडळाच्या दुरावास्थेकडे सपसेल दुर्लक्ष, जुनी पेन्शन योजना लागू करण्यास नकार, वाढत्या महागाईने जनता होरपळत असताना पेट्रोल, डिझेल, गॅस वरील टॅक्स मध्ये एक छदाम ही या सरकारने कमी केलेला नाही. पुणे शहराच्या गरजा लक्षात घेऊन या सरकारने या शहरातील विविध विकास कामांना प्राधान्य द्यायला हवे होते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसबा पोटनिवडणूकीत प्रचाराला येऊन मोठं मोठ्या घोषणा केल्या होत्या त्या सर्व घोषणाचा अर्थसंकल्पात सरकारला सोईस्कर विसर पडलेला दिसतोय. हे सरकार पडतंय कां टिकतंय हे या सरकारलाच माहित नसल्यामुळे निव्वळ घोषणांचा पाऊस पण प्रत्यक्ष लोकांना कोणताच दिलासा नाही असा अर्थसंकल्प आज विधिमंडळात सादर झाला.

– सोनाली मारणे, सचिव.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी.


राज्याचा अर्थसंकल्प फक्त आकडेवारी देऊन फुगा तयार करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न होता या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसले कुठलीही भरीव मदत शेतकरी बांधवांना मिळालेली नाही तसेच जुन्या पेन्शन योजनेचा गंभीर मुद्दा दुर्लक्षित करण्यात आला या अर्थसंकल्पात उत्तर महाराष्ट्राला झुकते माप दिलेले नाही शेतकऱ्यांना कुठलीही भरीव मदत झालेली नाही दत्तक घेतलेल्या नाशिकला अर्थमंत्र्यांनी दुर्लक्षित ठेवले हे अत्यंत दुर्दैवी आहे.

– *आकाश छाजेड*
अध्यक्ष, महाराष्ट्र एस.टी वर्कर्स कॉंग्रेस (इंटक) आणि
अध्यक्ष, नाशिक शहर काँग्रेस कमिटी


बोलाचाच भात अन बोलाचीच कडी…

शिंदे – फडणवीस सरकारने शेती आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करणारा अर्थसंकल्प आज सादर केला आहॆ. नमो शेतकरी सन्मान योजनेच्या थातूर मातूर मलम पट्टीमुळे शेतकऱ्यांच्या विज बिल माफिबद्दलचे देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन लोकं विसरतील ही यांची अपेक्षा दिसतेय. शेतकरी विज बिलाबद्दल अवाक्षर ही नाही. शेतकऱ्यांना लुटून खाजगी कंपन्याची तुंबडी भरणाऱ्या पंतप्रधान पिक विमा योजनेतून या कंपन्यांपुढेच या अर्थसंकल्पात सरकारने लोटांगण घेतलं आहॆ. नैसर्गिक आपत्तीतून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याबद्दल सरकार मूग गिळून गप्प आहॆ. 75 हजार नोकर भरतीबद्दल या अर्थसंकल्पात साधा उल्लेख ही नाही, बेरोजगार युवकांना वाऱ्यावर सोडणाऱ्या या सरकारचा मी निषेध करतो.

– हनुमंत पवार, प्रवक्ता.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी.


असंघटित कामगारांसाठी महामंडळ तयार करण्याची घोषणा यापूर्वीच करण्यात आली होती परंतु त्याचे अंमलबजावणी झालेली नव्हती आता नव्याने पुन्हा एकदा सरकारने त्याचीच घोषणा केली आहे निधी मात्र कोणत्याही त्यासाठी जाहीर केलं नाही कशा पद्धतीची निर्मिती असणार या संदर्भातही काही भाष्य सरकारने केलेले नाही सध्या अस्तित्वात असलेले घरेलू कामगार कल्याण मंडळ निधी अभावी 2014 सालापासून आजपर्यंत त्याचे कामकाज पूर्णपणे थांबले आहे त्याचबरोबर माथाडी मंडळ राज्यामध्ये विविध ठिकाणी आहेत त्या मंडळातील कर्मचारी स्टाफ हा उपलब्ध नाही त्यामुळे तिथले काम अतिशय मंद गतीने चालू आहे त्यासाठी नोकर भरतीची घोषणा गरजेचं होतं परंतु त्या संदर्भातली कुठली घोषणा नाही एकंदरीतच सगळी नव्याने उदयास येत असलेल्या खूप मोठ्या प्रमाणावरच काम क्षेत्र आहे ज्या कामगार क्षेत्राला कोणताही कामगार कायदा लागू नाही त्यांची उपेक्षाच या सरकारने केली आहे

– सुनील शिंदे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेस

——

राज्याला दिशाभूल करणारा अर्थसंकल्प – पृथ्वीराज चव्हाण

: शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज विधानसभेत अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. अर्थसंकल्पातून रोजगार निर्मिती नाही. शेतीसाठी ठोस तरतूद नाही, आरोग्य, शिक्षणाकडेही अपेक्षित फोकस नाही त्यामुळे अत्यंत निराशाजनक व दिशाभूल करणारा हा अर्थसंकल्प आहे, असे मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याच्या अर्थसंकल्पावर व्यक्त केले.

यापुढे बोलताना माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, काल सादर केलेला आर्थिक पाहणी अहवाल एक चिंताजनक स्थिती प्रस्तुत करतो. महाराष्ट्राचा आर्थिक विकासदर हा पहिल्यांदाच देशाच्या आर्थिक विकासदराच्या खाली गेलेला आहे. आतापर्यंतची परंपरा आहे कि, आपला राज्याचा आर्थिक विकासदर हा देशाच्या आर्थिक विकसदरापेक्षा ४ ते ५ टक्के तरी अधिक असतो. जर आपण महाराष्ट्राला देशाचं आर्थिक इंजिन मानतो तर आज महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न पाचव्या क्रमांकावर गेलेलं आहे, हि चिंताजनक बाब आहे. तेलंगणा, कर्नाटक, हरियाणा, तामिळनाडू हि राज्ये आपल्या पुढे गेलेली आहेत. ती परिस्थिती बदलण्याकरिता काहीही उपाययोजना नाहीत.

आज शेतकऱ्यांना सरकारकडून दोनच महत्वाच्या अपेक्षा असतात एक म्हणजे पिकवलेल्या धान्याला किफायतशीर मोबदला व हमीभावाचा शाश्वती आणि दुसरा नैसर्गिक आपत्तीमध्ये सरकारकडून योग्य ती भरपाई. पण या दोन्हीबाबतीत सरकारचे जैसे थे धोरण आहे. राज्यातला शेतकरी सरकारकडे आसा लावून बसला आहे. कारण दोन दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत कोणतेही घोषणा आज सरकाकडून झालेली नाही. सरकारच्या या वेळकाढू धोरणामुळे शेतकरी हवालदिल होत आहे. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी नुसार शेतकऱ्याला खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचे आश्वासन केंद्राने दिले होते. परंतु त्याबद्दल राज्य सरकारकडून कोणत्याही उपाययोजना केलेल्या दिसून येत नाही.

कालच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार कृषी व उद्योग आर्थिक विकासदर हा मंदावलेला दिसतो. राज्य सरकार फक्त सामंजस्य कराराची यादी जाहीर करते पण त्या कंपन्या राज्यात आल्या कि नाही याबाबत कोणतेही भाष्य केले जात नाही. अनेक मोठे उद्योग शेजारच्या राज्यात हायजॅक केले आहेत. त्याचबरोबर केंद्राच्या PLI योजनेअंतर्गत किती हायटेक नवीन उद्योग आपल्या राज्यात आले?

केंद्र सरकारच्या एका अहवालानुसार गेल्या ४५ वर्षात सर्वात मोठी बेरोजगारी आपल्या देशात आहे म्हणजे ती परिस्थिती आपल्या राज्यात सुद्धा आहे. याबाबत राज्य सरकारने कोणतेही धोरण स्पष्ट केलेले नाही. आज राज्य सरकारमध्ये २ लाख ३० हजार पदे रिक्त आहेत पण सरकारने आज पुन्हा ७५ हजार पद भरतीची घोषणा केलेली आहे. त्या कधी पूर्ण करणार आहेत याचे ठोस नियोजन दिसत नाही.

उद्योगांच्या बाबतीत सामंजस्य कराराबाबत सरकार सांगत आहे पण त्यामधील किती उद्योग आपल्याकडे गुंतवणूक खरंच करणार आहेत याची कोणतीही स्पष्टता दिलेली नाही, किंवा जे उद्योग आपल्या राज्याला सोडून बाहेरच्या राज्यात जात आहेत त्याबद्दल कोणतेही स्पष्टीकरण दिसत नाही. त्यामुळे माझा चिंतेचा विषय आहे कि, महाराष्ट्राला पुन्हा नंबर एक वर आणण्यासाठी कोणतेही ठोस उपाय या सरकारने राबविलेले दिसत नाहीत.

मुंबईचे महत्व कमी होत आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र गुजरात ला पळविले गेले, याबद्दल कोणतेही स्पष्टीकरण सरकारने दिलेले नाही.

आजच्या अर्थसंकल्पात बऱ्याच लोकप्रिय घोषणा अर्थमंत्र्यांनी केलेल्या आहेत पण त्या सर्व घोषणा फसव्या आहेत कारण देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था २०२७ पर्यंत १ ट्रिलियन डॉलर होईल अशी घोषणा केली आहे. हि अत्यंत फसवी आणि बोगस घोषणा आहे. कारण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राची अर्थव्यवस्था २०२५ पर्यंत ५०० बिलियन म्हणजे अर्धा ट्रिलियन करू अशी घोषणा केली होती आणि आता १ ट्रिलियन डॉलर ची घोषणा. महाराष्ट्राची अर्थव्यवस्थेची वाढ फक्त वार्षिक ६.८% इतकी असेल तर आपली अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर होण्यासाठी किती कालावधी जाईल ? मग ती २०२७ पर्यंतच करायची असेल तर आपला विकासदर किती हवा ?

या सरकार बद्दल राज्याच्या जनतेत जी प्रचंड नाराजी आहे त्याचे पडसाद त्यांना गेल्या काही महिन्यात झालेल्या विधानसभा-विधानपरिषद निवडणुकांवरून समजून आलेले आहे ते वातावरण बदलायचं हा प्रयत्न आहे. प्रत्येक समाज घटकाला खुश करण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे, परंतु हा प्रयत्न अत्यंत फसवा आहे हे जेव्हा जनतेला समजेल तेव्हा जनता या सरकारचा पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही. महापुरुषांची स्मारके करण्याच्या घोषणेला नक्कीच टाळ्या मिळाल्या असतील पण अशा स्मारकांकरिता जागा, समिती, त्याचे डिझाईन या सर्व गोष्टी पूर्ण व्हायला किमान २ वर्षाचा वेळ लागतो. शिवछत्रपतींचे व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकाची घोषणा होऊन १० वर्षे झाली तरी त्याची एक वीट रचलेली आपल्याला दिसत नाही. यामुळे राज्यातील जनतेला फसव्या आणि दिशाभूल घोषणांपेक्षा ठोस आणि जनहिताचे निर्णय सरकारकडून अपेक्षित होते.

PMPML | NCP | पी.एम.पी.एम.एल ची सेवा पूर्ववत करण्यात यावी | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मागणी

Categories
Breaking News PMC पुणे

पी.एम.पी.एम.एल ची सेवा पूर्ववत करण्यात यावी | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मागणी

पी.एम.पी.एम.एल ला सेवा पुरविणाऱ्या ठेकेदारांनी पुकारलेल्या संपामुळे प्रवासी व विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून यावर तात्काळ तोडगा काढण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाने आज पी.एम.पी.एम.एल.चे व्यवस्थापक ओमप्रकाश बकोरिया यांना केली.

याबाबत शहर अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, “पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेसचे संचलन पुणे, पिंपरी चिंचवड शहरांमध्ये व जवळपासच्या ग्रामीण भागामध्ये मोठ्याप्रमाणात होत असते. त्यामुळे पुणे, पिंपरी चिंचवड शहर व जवळपासच्या ग्रामीण भागातील प्रवाशी नागरिकांची वाहतुकीची उत्तमरीत्या सोय होत असून, पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बस सेवेला पुणे, पिंपरी चिंचवड शहर व जवळपासच्या ग्रामीण भागाची रक्तवाहिनी म्हणून संबोधले जाते.

काल दिनांक ०५/०३/२०२३ रोजी दुपार पाळीनंतर भाडेतत्वावरील बसेसच्या ठेकेदारांनी अचानकपणे संप पुकारलेला आहे. त्यामुळे पुणे व पिंपरी चिंचवड तसेच जवळपासच्या ग्रामीण भागातील प्रवाशी नागरिक, विद्यार्थी, महिला पुरुष, ज्येष्ठ नागरिक यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झालेली आहे. तसेच १० वी व १२ वी च्या परीक्षा चालू असून या संपाची झळ विद्यार्थांना मोठ्या प्रमाणात बसलेली आहे. पर्यायाने परीक्षेला जाणे-येणेकरीता अडचणी निर्माण झालेल्या आहेत.

परिवहन महामंडळाच्या भाडेतत्वावरील बसेसच्या ठेकेदारांशी याबाबत तातडीने बैठक घेऊन बसेस कशा पध्दतीने पुर्ववत सुरू करता येतील, याकरीता निर्णय घेणे अत्यंत आवश्यक व गरजेचे आहे. भाडेतत्वावरील बसेसच्या ठेकेदारांशी सल्ला मसलत करून तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे. पुणे व पिंपरी चिंचवड तसेच जवळपासच्या ग्रामीण भागातील प्रवाशी नागरिक, विद्यार्थी, महिला पुरुष, ज्येष्ठ नागरिक यांची झालेली गैरसोय दूर करणेकरीता पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या पाठीशी खंबिरपणे उभी असून याकरीता सर्वतोपरी आपणास मदत करण्यास आम्ही तयार आहोत.

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेस पुर्ववत सुरू करून पुणे व पिंपरी चिंचवड तसेच जवळपासच्या ग्रामीण भागातील प्रवाशी नागरिक, विद्यार्थी, महिला पुरुष, ज्येष्ठ नागरिकांची होणारी गैरसोय तातडीने दूर करावी, अशी मागणी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप , प्रवक्ते प्रदीप देशमुख , संतोष नांगरे आदी उपस्थित होते.

 

Maharashtra Samman Parishad | ३ फेब्रुवारी पासून पुणे येथून महाराष्ट्र सन्मान परिषदेस सुरुवात

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

३ फेब्रुवारी पासून पुणे येथून महाराष्ट्र सन्मान परिषदेस सुरुवात

“आवाज बहुजनांचा , सन्मान महाराष्ट्राचा..!!” या ब्रीद वाक्यासह सुरू होत असलेल्या महाराष्ट्र सन्मान परिषदेचा शुभारंभ शुक्रवार, दि.०३ फेब्रुवारी २०२३ रोजी पुण्यातून होत आहे.
टिळक स्मारक मंदिर येथे होत असलेला हा कार्यक्रम ज्येष्ठ कामगार नेते मा.डॉ. बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत असून ,मा.गृहनिर्माणमंत्री.डॉ.जितेंद्र आव्हाड,शिवसेना उपनेत्या मा.सौ.सुषमा अंधारे , सुप्रसिद्ध शाहिर मा.श्री.संभाजी भगत ,सुप्रसिद्ध शिवव्याख्यात्या मा.ॲड.सौ.वैशाली डोळस हे प्रमुख वक्ते या कार्यक्रमासाठी लाभणार आहेत. अशी माहिती पुणे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.

जगताप म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आपल्या महाराष्ट्राच्या भूमीचा , येथील महापुरुषांचा अवमान होईल या पद्धतीची कृती या राज्यात सातत्याने घडत आहे.या सर्व अवमानानांचा निषेध करण्यासाठी व अश्या प्रकारच्या प्रवृत्तींना खऱ्या इतिहासाची ओळख करून देण्यासाठी ही यात्रा घेण्यात येत असल्याचे यात्रेचे संयोजक प्रशांत जगताप यांनी सांगितले.

या यात्रेसाठी लोकायत , अखिल भारतीय मराठा महासंघ फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच भारतीय बौद्ध महासंघ ,म. फुले समता परीषद ,गणराज्य संघ, जमाईत उलेमा ए हिंद , मातंग एकता आंदोलन ,मुलनिवासी मुस्लिम मंच , लहुजी समता परिषद , रिजनल ख्रिश्चन सोसायटी , माळी महासंघ ,हमाल पंचायत पुणे मर्चेंट संघटना, अखिल छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड युनियन, छत्रपती शिवाजी टेम्पो संघटना महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठान अंगमेहनतीची कष्टकरी संघर्ष समिती,युवा मातंग सेवा संघ, राष्ट्रीय बहुजन महासंघ,पुणे महासंघ,कागद-काच – पत्रा पंचायत आदी सहयोगी संस्था या यात्रेत सहभागी होतील.
प्रवक्ते अंकुश काकडे व प्रदीप देशमुख , महेश शिंदे इ प्रमुख पदाधिकारी पत्रकार परिषदेस उपस्थीत होते

NCP Pune | पथ विभागाच्या टेंडर वरून राष्ट्रवादीचे आंदोलन

Categories
Breaking News PMC Political पुणे

पथ विभागाच्या टेंडर वरून राष्ट्रवादीचे आंदोलन

पुणे महानगरपालिकेच्या (PMC Pune)  रस्त्यांच्या टेंडर प्रक्रियेत (Road repairing Tender) सुरू असलेल्या भाजपच्या (BJP) हस्तक्षेपाविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या (NCP) वतीने पुणे महानगर पालिका प्रवेशद्वारावर तीव्र निदर्शने करत आंदोलन करण्यात आले.

याबाबत राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, पुणे शहरातील विविघ भागातील रस्त्याच्या कामाच्या निविदेत ठराविक ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून रस्त्याच्या कामाची निविदा तयार करण्यासाठी व त्यात दबाव आणून स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे आमदार ,माजी आमदार, माजी पक्षनेते व पदाधिकारी अन्य ठेकेदारांना धमकावत आहेत याची सर्व वर्तमानपत्रांनी दखल घेत याबाबतचे वृत्त प्रसारित होऊनही हा प्रकार थांबलेला नाही. गेल्या ५ वर्षात सत्ताधारी भाजप नगरसेवकांचे सुरू असलेले “टेंडरराज” राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर पुन्हा सुरू झाले असून यात सर्वसामान्य पुणेकरांच्या कररुपी पैश्यांची उधळपट्टी करत पुणे महानगरपालिकेच्या तिजोरीवर राजरोसपणे दरोडा घालण्याचा प्रकार सुरू आहे. (PMC Pune)

या निविदेतील अटी -शर्ती दुरूस्त करुन पुन्हा निविदा काढावी व संबंधीत अधिका-यांची चौकशी करावी या मागणी करीता राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्यावतीने तिव्र आंदोलन करण्यात आले.
व मनपा आयुक्त विक्रम कुमार यांची भेट धेवून यासंदर्भात त्वरीत योग्य तो निर्णय ध्यावा, ही मागणी करण्यात आली.

सदर आंदोलनास शहराध्यक्ष प्रशांत जगताप , आमदार चेतन तुपे ,सौ. राजलक्ष्मी भोसले योगेश ससाणे, फारूक ईनामदार , सुनिल बनकर ,गफूर पठान , प्रदीप गायकवाड , महेन्द्र पठारे , चंन्द्रकांत कवडे , शंतनू जगदाळे , अमर तुपे , संदीप बधे , पुनम पाटील यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थीत होते. (NCP Pune)