Pune Airport | Pune Metro | Pune Congress | पुणे मेट्रोची सेवा तात्काळ विमानतळापर्यंत करा | काँग्रेस आक्रमक

Categories
Breaking News Political social पुणे

Pune Airport | Pune Metro | Pune Congress | पुणे मेट्रोची सेवा तात्काळ विमानतळापर्यंत  करा | काँग्रेस आक्रमक

 

Pune Airport | Pune Metro | Pune Congress | पुणे : आठ वर्षाहून अधिक काळ लांबलेला पुणे मेट्रोचा (Pune Metro) पहिला टप्पा पूर्ण करून त्यावर लवकरात लवकर वाहतूक चालू करा. पुणेकरांच्या संयमाचा अंत होऊ देऊ नका, असा इशारा माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Mohan Joshi Pune Congress) आणि आमदार रविंद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांनी मेट्रो प्रशासन आणि भाजप सरकारला आज सोमवारी दिला. (Pune Airport | Pune Metro | Pune Congress)

पुणे मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण करा, स्वारगेट ते कात्रज मार्ग (Swarhet katraj Underground Metro) काम लवकर सुरू करा, लोहगांव विमानतळापर्यंत (Pune Lohgaon Airport) मेट्रो सेवा द्या, अशा मेट्रो संबंधीच्या विविध मागण्यांसाठी माजी आमदार मोहन जोशी आणि रविंद्र धंगेकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी मेट्रो संचालक यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रोच्या कामाचे भूमीपूजन सुमारे आठ वर्षापूर्वी केले. त्यावेळी मोठा गाजावाजा करण्यात आला. मेट्रो लवकरच धावू लागेल, असे आश्वासन मोदी यांनी दिले. आठ वर्ष उलटली तरी मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण झालेला नाही. भाजप नेत्यांच्या सुप्त संघर्षात मेटुोचे काम लांबत गेले, त्यामुळे लाखो रूपयांनी खर्च वाढत गेला.ज्या पुणेकरांनी भाजपला महापालिकेत सत्ता दिली, आमदार, खासदार निवडून दिले, पण पुणेकरांना मेट्रो सेवेचा पुरेपूर लाभ भाजप देवू शकले नाही. याकडे भाजपचे त्यांच्या सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले, असे मोहन जोशी यांनी आंदोलकांसमोर बोलताना सांगितले.

या आंदोलनात दत्ता बहिरट, सुनिल मलके, मंजुर शेख,शेखर कपोते, प्रवीण करपे, शाबिर खान, आयुब पठाण, प्रथमेश आबनावे, विनोद रणपिसे, रोहन सुरवसे पाटील, किशोर मारणे, सुरेश कांबळे, रामविलास माहेश्वरी, बाबा नायडू, महेंद्र चव्हाण, राजाभाऊ कदम, साहील राऊत, अविनाश अडसूळ, सचिन बहिरट, बाबा सय्यद, अनिकेत सोनावणे आदी कार्यकर्ते सामील झाले होते.

Phule Smarak Pune | महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यातील स्मारकांच्या विकास आराखड्यांचा  आढावा

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Phule Smarak Pune | महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यातील स्मारकांच्या विकास आराखड्यांचा  आढावा

| उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बैठक

 

Phule Smarak Pune |  क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले (Mahatma Jyotiba Phule)आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांचे पुणे येथील राहते घर राहिलेला फुलेवाडा(Phule Wada)  तसेच फुले दांपत्याने मुलींची पहिली शाळा सुरु केलेला भिडेवाडा (Bhide Wada) येथे राष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यासंदर्भात सादर करण्यात आलेल्या विकास आराखड्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज मंत्रालयात आढावा घेतला.

देशात स्त्रीशिक्षणाची मुहुर्तमेढ रोवून शैक्षणिक, सामाजिक सुधारणांच्या क्षेत्रात क्रांतीकारी कार्य करणाऱ्या फुले दांपत्यासारख्या महामानवांचे स्मारक त्याच्या कार्याला न्याय देणारे असले पाहिजे. त्यासाठी हेरिटेज दर्जा आणि आधुनिक वास्तूकलेचा सुरेख मिलाप साधून हे प्रेरणादायी स्मारक तयार करण्यात यावे. स्मारकाच्या कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिला. (Pune Local News)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या या बैठकीला अन्न व नागरीपुरवठा मंत्री छगन भुजबळ, मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सैनिक, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, अल्पसंख्याक विकास विभागाच्या प्रधान सचिव आय.ए.कुंदन, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष शर्मा तर, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख व्हीसीद्वारे उपस्थित होते.

बैठकीत मार्गदर्शन करता उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे देशात स्त्रीशिक्षणाची सुरुवात झाली. आज समाजाच्या सर्व क्षेत्रात महिला आत्मविश्वासाने वावरताना दिसतात त्याचे श्रेय सर्वस्वी क्रांतीज्योती सावित्रीबाईंना जाते. त्यामुळे सावित्रीबाईंचे कार्य, स्त्रीशिक्षणासाठी त्यांनी सोसलेल्या हालअपेष्टा, केलेला त्याग याची माहिती शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत पोहचली पाहिजे. त्यातून युवा पिढीला मार्गदर्शन, प्रेरणा मिळाली पाहिजे. यासाठी प्रस्तावित स्मारकांमध्ये फुले दांपत्याच्या जीवनकार्याबद्दलची माहिती देणारे थिएटर, युपीएससी, एमपीएससी सारख्या स्पर्धा परिक्षांचे मार्गदर्शन केंद्र, कौशल्य विकासाचे प्रशिक्षण केंद्रासारख्या सुविधा असल्या पाहिजेत. नवे स्मारक पुण्याच्या हेरीटेज वास्तुसौंदर्यात भर घालणारे असले पाहिजे, त्यासाठी आराखड्यावर अधिक काम करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या.

Pune Lok Sabha Constituency | Pune Congress | काँग्रेस कडून पुणे लोकसभा समन्वयक पदाची जबाबदारी विश्वजित कदम यांच्याकडे!

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

Pune Lok Sabha Constituency | Pune Congress | काँग्रेस कडून पुणे लोकसभा समन्वयक पदाची जबाबदारी विश्वजित कदम यांच्याकडे!

| पुण्यातील पदाधिकारी यांच्याकडे देखील विविध लोकसभा मतदार संघाची जबाबदारी

Pune Lok Sabha Constituency | Pune Congress |  पुणे | प्रदेश काँग्रेसने (Maharashtra Congress) लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election 2024) जोरदार तयारी सुरु केली आहे. भाजपला (BJP) या निवडणुकीत मात देण्यासाठी काँग्रेस (Congress) ने कंबर कसली आहे. खासकरून पुणे शहरावर काँग्रेसने (Pune City Congress) चांगलेच लक्ष दिले आहे. दरम्यान पुणे लोकसभा मतदार संघ (Pune Lok Sabha Constituency) समन्वयक पदाची जबाबदारी विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांच्याकडे देण्यात आली आहे. नुकतीच प्रदेश काँग्रेस ने राज्यातील मतदार संघाच्या समन्वयक पदाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. (Pune Lok Sabha Constituency | Pune Congress)
विश्वजित कदम (Vishwajeet Kadam Congress) यांनी देखील पुणे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना भाजपसमोर हार पत्करावी लागली होती. तेव्हापासून पुण्याकडे त्यांनी लक्ष देण्यास सुरुवात केली. सध्या ते विधानसभेचे आमदार आहेत. पुण्याची जागा निवडून आणण्यासाठी आता कदम यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. प्रदेश ने नुकतीच त्यांच्यावर ही जबाबदारी दिली आहे.  (Pune News)
दरम्यान लोकसभा निवडणुकी साठी प्रदेश काँग्रेस कमिटी कडून पुण्यातील पदाधिकारी यांच्या कडे देखील विविध मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे.
 १) माजी आमदार मोहन जोशी – अहमदनगर २) आमदार रवींद्र धंगेकर – सातारा ३) संजय बालगुडे – माढा ४) अभय छाजेड – हातकंनगले अशा या जबाबदाऱ्या आहेत.

Pune BJP New Office |  शहर भाजपचे नवीन कार्यालय सुरू | देवेंद्र फडणवीस यांच्यासहित विविध नेत्यांकडून शुभेच्छा 

Categories
Breaking News Political पुणे

Pune BJP New Office |  शहर भाजपचे नवीन कार्यालय सुरू | देवेंद्र फडणवीस यांच्यासहित विविध नेत्यांकडून शुभेच्छा

 

Pune BJP New Office | विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आज शहर भाजपच्या एरंडवण्यातील डीपी रस्त्यावरील (DP Road Pune) नूतन कार्यालयाला भेट देऊन शुभेच्छांचा वर्षाव केला. अत्यंत उत्साही वातावरणात जय श्रीरामच्या जयघोषात नूतन कार्यालय कार्यान्वित झाले. शहर भाजपचे पुणे महानगरपालिका (PMC Pune)  परिसरातील मध्यवर्ती कार्यालय नवीन वास्तुत स्थलांतरित करण्याच्या निमित्ताने स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. (Pune BJP New Office)

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athvale), प्रदेश भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) , उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील (Chandrakant Patil), ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (girish Mahajan) यांनी कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक राजकीय सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिली. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate BJP Pune) यांनी स्वागत केले.

सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि पुणे शहराचा गतिमान पारदर्शक विकास करण्यासाठी या कार्यालयाच्या माध्यमातून अविरत प्रयत्न केले जातील असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यालयाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घरोघरी संपर्क साधण्याबरोबर माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नागरिकांपर्यंत पोहोचून संघटनात्मक कार्य बळकट करण्यावर भर दिला जाईल.

आगामी काळातील निवडणुकांचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी आणि भारतीय जनता पार्टीचा विचार प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचविण्यासाठी या कार्यालयाच्या माध्यमातून कार्यकर्ते नियोजन करतील असे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले.

लोकसभा विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुकांमध्ये पुणेकरांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास व्यक्त केला होता. हा विश्वास शहर भाजपने सार्थ ठरविला असून, आगामी काळात तो दृढ करण्यासाठी सर्व कार्यकर्ते एकजुटीने प्रयत्न करतील असे मत शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी व्यक्त केले.

जनसंघापासून भाजपच्या आजवरच्या ज्येष्ठ आणि नव्या कार्यकर्त्यांनी आठवणींना उजाळा देत गप्पा रंगवल्या.

प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, लोकसभा मतदार संघ संयोजक श्रीनाथ भिमाले यांची प्रमुख उपस्थिती होती.या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस च्या खासदार वंदना चव्हाण , श्रीकांत शिरोळे, प्रदीप गारटकर, मनसेचे अजय शिंदे यांच्या सह सर्व पक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते

Shekhar Gaikwad | Rajeev Nandkar | Book Publication | प्रशासकीय व्यवस्थेची पोलादी चौकट गंजलेली : पृथ्वीराज चव्हाण |शेखर गायकवाड आणि राजीव नंदकर लिखित पुस्तकांचे प्रकाशन

Categories
Breaking News cultural Political social पुणे महाराष्ट्र

Shekhar Gaikwad | Rajeev Nandkar | Book Publication |प्रशासकीय व्यवस्थेची पोलादी चौकट गंजलेली : पृथ्वीराज चव्हाण

|शेखर गायकवाड आणि राजीव नंदकर लिखित पुस्तकांचे प्रकाशन

 

Shekhar Gaikwad | Rajeev Nandkar | Book Publication | पुणे : देशातील लोकशाही व्यवस्थेचा कणा असलेली प्रशासकीय व्यवस्थेची पोलादी चौकट आज गंजलेली आहे. तिच्यातील दोष दूर करून काही आमूलाग्र बदल करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केले.  (Shekhar Gaikwad | Rajeev Nandkar | Book Publication)

सेवानिवृत्त सनदी अधिकारी शेखर गायकवाड यांचे ‘प्रशासकीय योगायोग’ आणि पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त राजीव नंदकर यांनी लिहिलेल्या ‘सुप्रशासन : संधी आणि आव्हाने’ या पुस्तकांचे प्रकाशन बालगंधर्व रंगमंदिर येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते उल्हास पवार होते. याप्रसंगी जीएसटी पुणेच्या अतिरिक्त आयुक्त वैशाली पतंगे, ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रभाकर करंदीकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याशिवाय शिक्षण विभागाचे आयुक्त सुरज मांढरे, सेवानिवृत्त अधिकारी सत्यजित गुजर, निवृत्त अधिकारी चिंतामणी जोशी, सेवानिवृत्त अधिकारी रंगनाथ नाईकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

चव्हाण म्हणाले, प्रशासकीय व्यवस्था पुन्हा बळकट कशी होईल आणि देशातील लोकशाहीचे खांब असणाऱ्या तिन्ही व्यवस्था मध्ये संतुलन कसे निर्माण होईल हे पाहणे गरजेचे आहे. कठोर प्रशिक्षणातून चांगले अधिकारी घडणे ही काळाची गरज आहे.

तसेच यशदा सारख्या संस्थेला विद्यापीठाचा दर्जा दिला जावा आणि तिथून उत्तमोत्तम संशोधन होऊन चांगले अधिकारी बाहेर पडावेत, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

अध्यक्षस्थानावरून बोलताना उल्हास पवार यांनी अनेकानेक किस्से सांगून धमाल उडवून दिली. ते म्हणाले, विसंगतीतून विनोद निर्माण होतो. प्रशासनात अनावधानाने बऱ्याच गडबडी होतात. त्यातूनच लेखनासाठी उत्तम संधी तयार होते.

ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रभाकर करंदीकर म्हणाले, प्रशासकीय व्यवस्थेत कागद नीट वाचले जात नाहीत. ते झाले तर अनेक प्रश्न सुटतील आणि सुप्रशासनाकडे वाटचाल होईल.

जीएसटीच्या अतिरिक्त आयुक्त वैशाली पतंगे म्हणाल्या, या दोन्ही पुस्तकातून प्रशासनाची बाजू समोर यायला नक्कीच मदत होईल. मराठी साहित्यात लिहिणाऱ्या अधिकाऱ्यांची मांदियाळी मोठी आहे. डोळसपण लाभलेल्या अधिकाऱ्यांचे पुस्तक नक्कीच वाचायला हवे.

रत्नाकर गायकवाड म्हणाले, “आजच्या खालावत चाललेल्या प्रशासनाला विनोदाची झालर मिळावी म्हणून या पुस्तकाचे लेखन मी केले आहे. प्रशासनातील अनेकानेक गंमतीशीर किस्से उलगडताना निखळ करमणूक करण्याच्या हेतूने लेखन केले आहे. सनदी अधिकाऱ्यांनी आपले अनुभव लिहिते केले तर मराठी साहित्यात मोलाची भर पडेल.

लेखक राजीव नंदकर म्हणाले, गेली 20 वर्षे प्रशासकीय सेवेत कार्यरत असताना आलेले विविध अनुभव आणि काम करताना बाळगलेला सकारात्मक दृष्टिकोन आणि प्रशासन ते सुप्रशासन हा प्रवास उलगडण्याचा प्रयत्न या पुस्तकाद्वारे केला आहे.

मनोविकास प्रकाशनचे प्रकाशक आशिष पाटकर आणि अनुराध्या प्रकाशनाच्या प्रकाशक चेतना नंदकर यांच्यातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रास्ताविक आणि आभार प्रल्हाद कचरे यांनी मानले. उपस्थित आजी माजी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अनेक किस्से सांगून धमाल उडवून दिली.

पक्षांतरबंदी कायदा कचऱ्याच्या टोपलीत फेकावा

पक्षांतरबंदी कायदा हा निरर्थक ठरलेला असून तो कचऱ्याच्या टोपलीत फेकून द्यावा आणि त्या जागी नवे काही आणावे अशी गरज निर्माण झालेली आहे. आज एकूणच लोकशाही धोक्यात आलेली असून तीच टिकेल की नाही अशी स्थिती निर्माण झालेली आहे असे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

State Election Commission | दुबार नाव नोंदणी व समान छायाचित्राबाबत दुरूस्ती करुन घेण्याचे आवाहन

Categories
Breaking News Political social पुणे

State Election Commission | दुबार नाव नोंदणी व समान छायाचित्राबाबत दुरूस्ती करुन घेण्याचे आवाहन

 

State Election Commission | निवडणूक आयोगाने विविध माध्यमातून मतदार यादी (Voter List) शुद्धीकरणासाठी कार्यवाही सुरु केलेली आहे. पुणे जिल्ह्यात दुबार नाव नोंदणीचे २८ हजार तर समान छायाचित्राचे १ लाख ४२ हजार ३४९ मतदार असून संबंधितांनी त्यांना मिळालेल्या नोटीशीवरील पर्याय निवडून १ जानेवारी २०२४ पर्यंत दुरूस्ती करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख (Dr Rajesh Deshmukh IAS) यांनी केले आहे. (State Election Commission)

भारतीय लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५० च्या कलम १७ व १८ नुसार एका मतदाराची मतदार यादीमध्ये एकच नोंद असणे आणि निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी मतदार यादी त्रुटीरहीत असणे आवश्यक आहे. मात्र काही मतदारांचे नाव एकापेक्षा जास्त ठिकाणी नोंद असलेचे आढळुन आले आहे. त्यानुषंगाने निवडणूक आयोगाने एकापेक्षा अधिक ठिकाणी समान छायाचित्र व एका पेक्षा जास्त ठिकाणी मतदारांच्या इतर माहितीमध्ये साधर्म्य आढळलेल्या किंवा दुबार नाव नोंदणी आढळलेल्या मतदारांना नमुना अ मध्ये नोटीस पाठविल्या आहेत.

या नोटीशीद्वारे कोणत्या एका ठिकाणी नाव अपेक्षित आहे हे ठरविण्याचा अधिकार मतदाराला दिला आहे. संबधित मतदाराने ज्या ठिकाणी त्याचे नाव असणे त्यांना स्वतःला अभिप्रेत आहे त्याठिकाणी बरोबरची खूण करावी आणि दिलेल्या ईमेल पत्त्यावर आधारकार्डच्या झेरोक्स प्रतिसह अपलोड करावे किवा संबधित मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांची भेट घेवून त्यांच्यामार्फत पुष्टीकरण पत्रावर कार्यवाही करावी.

या मोहिमेनंतर दोन ठिकाणी मतदाराचे नाव आढळल्यास निवडणूक आयोगाच्या सुचनाप्रमाणे त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असेही श्री. देशमुख यांनी कळविले आहे.


 

मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण-२०२४ चा सुधारित कार्यक्रम घोषित

मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत मतदार यादी अंतिम प्रसिद्धी ५ जानेवारी ऐवजी २२ जानेवारी २०२४ रोजी होणार असून त्यासाठीचा सुधारित कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने घोषित केला आहे.

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत मोठ्या प्रमाणात छायाचित्र समान नोंदी, भौगोलिकदृष्ट्या समान नोंदी घेणे आणि अर्ज प्रलंबित असल्याने भारत निवडणूक आयोगाने कार्यक्रमात सुधारणा करण्यात आली आहे.

पुनरीक्षण उपक्रमाअंतर्गत दावे व हरकती निकाली काढण्याच्या सध्याची तारीख २६ डिसेंबर २०२३ ऐवजी १२ जानेवारी २०२४, मतदार यादीचे मानांकन तपासणे, अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी घेणे, अभिलेख अद्ययावत करणे व पुरवणी याद्यांची छपाई करण्याची तारीख १ जानेवारी २०२४ ऐवजी १७ जानेवारी २०२४ आणि मतदार यादी अंतिम प्रसिद्धी ५ जानेवारी ऐवजी २२ जानेवारी २०२४ रोजी होईल, अशी माहिती उप जिल्हाधिकारी तथा उप जिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर यांनी दिली आहे.

राजकीय पक्ष प्रतिनिधींची बैठक
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या सुधारीत वेळापत्रकाबाबत माहिती देण्यासाठी श्रीमती कळसकर यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी तहसिलदार शितल मुळे, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

——

खोट्या कागदपत्राच्या आधारे मतदार नोंदणी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुळशी तहसील कार्यालयाअंतर्गत खोट्या कागदपत्राच्याआधारे मतदार नोंदणी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींवर पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत २०३ भोर मतदार संघ ता. मुळशी येथील पिरंगुट व यादी भाग क्र. २०४ मुकाईवाडी येथे मतदार नोंदणीसाठी ऑनलाईन पद्धतीने मोठ्या प्रमाणात अर्ज क्र.६ दाखल करण्यात आले. या अर्जासोबत रहिवासी पुरावा म्हणून विद्युत देयक जोडण्यात आले होते. याबाबत शंका आल्याने महावितरणच्या संकेतस्थळावर पडताळणी केली असता विद्युत देयकांवरील नाव व पत्त्यात तफावत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी खोटे विद्युत देयक रहिवासी पुरावा म्हणून सादर केल्याबद्दल विजय मारणे, अमित शिंदे, भाऊसाहेब मोकर, शकील अहमद व महंमद आलम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशा प्रकारच्या घटना आपल्या परिसरात घडत असल्याचे निदर्शनास आल्यास नजीकच्या तहसील किंवा तलाठी कार्यालय, पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी, २०३ भोर विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी भोर तसेच तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी रणजीत भोसले यांनी केले आहे.

MVA | Shetkari Akrosh Morcha | महाविकास आघाडीच्या ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’ला उद्यापासून प्रारंभ |शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात शनिवारी सभा

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

MVA | Shetkari Akrosh Morcha | महाविकास आघाडीच्या ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’ला उद्यापासून प्रारंभ

|शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात शनिवारी सभा

 

MVA | Shetkari Akrosh Morcha | पुणे : महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) वतीने काढण्यात येणाऱ्या ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’ची (Shetkari Akrosh Morcha)  तयारी पूर्ण झाली असून उद्या (दि. २७) जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन या मोर्चाला प्रारंभ होणार आहे. खासदार शरद पवार (MP Sharad Pawar) यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे या मोर्चाची सांगता होणार आहे. (Maharashtra News)

संसद महारत्न खासदार सुप्रिया सुळे आणि संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संसदेत आवाज उठविल्यानंतर त्यांचे निलंबन करण्यात आले. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे आणि डॉ. कोल्हे यांनी ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’चे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. कांदा निर्यात बंदी तत्काळ उठवणे आणि निर्यातीसाठी कायमस्वरूपी धोरण, खासगी व शासकीय असा भेद न करता दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान, बिबटप्रवण तालुक्यात शेतीसाठी दिवसा अखंडित वीजपुरवठा, पीक विमा कंपन्यांच्या मनमानीला आळा घालून तातडीने नुकसान भरपाई, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी निश्चित ‘शैक्षणिक कर्ज ‘ धोरण लागू करणे आदी प्रमुख मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेससह महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी हा एल्गार पुकारला असून २७ ते ३० डिसेंबर दरम्यान भव्य ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’ आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती खासदार सुळे आणि अमोल कोल्हे यांनी दिली.

उद्या ( दि. २७) सकाळी ८ वाजता या मोर्चाला सुरुवात होणार असून ओतूर येथे पदयात्रा व कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले आहे. आळेफाटा येथे कोपरा सभा व नारायणगाव येथे एस.टी. स्टँडजवळ पदयात्रा होणार असून ठिकठिकाणी शेतकऱ्यांकडून या आक्रोश मोर्चाचे स्वागत केले जाणार आहे. दुपारी ३ वाजता कळंब येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर कोपरा सभा आणि मंचर बाजार समिती येथून पदयात्रेने लक्ष्मी रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोठी सभा होणार आहे. सायंकाळी ६.३० वाजता राजगुरुनगर बाजार समिती येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाजवळ सभा आणि त्यानंतर राजगुरुनगर एस.टी. स्टँड येथील हुतात्मा राजगुरू आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन पाबळ चौकातून वाहनांद्वारे हा मोर्चा चाकणकडे रवाना होईल. चाकण बाजार समिती प्रवेशद्वारापासून रात्री ८ वाजता काढण्यात येणाऱ्या पदयात्रेचा समारोप बाजारपेठेतून एस.टी.स्टँड, तळेगाव चौक येथे होईल. त्यानंतर चौफुला, करंदी मार्गे केंदूर येथे मोर्चाचा पहिला मुक्काम होईल, असे त्यांनी सांगितले.

गुरुवारी (दि. २८) सकाळी केंदूर येथील श्रीराम चौकात सभा आयोजित करण्यात आली असून पाबळ येथील लोणी चौकात कोपरा सभा होईल. त्यानंतर धामारी, मुखी, जातेगाव या ठिकाणी शेतकऱ्यांनी स्वागत केल्यानंतर दुपारी दीड वाजता शिक्रापूर येथे पाबळ चौक ते चाकण चौक अशी पदयात्रा काढण्यात येणार आहे. दुपारी दोन वाजता तळेगाव ढमढेरे येथील सावता माळी सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर टाकळीभीमा, पारोडी, दहीवडी, उरळगाव मार्गे न्हावरा येथे हा मोर्चा येईल. न्हावरा येथे तळेगाव फाटा ते निर्विदरम्यान पदयात्रा आणि पुढे निर्वि, कोळगाव डोळस, कुरुळी, वडगाव रासाई मार्गे मांडवगण फराटा येथे आल्यानंतर या ठिकाणी सभा होईल आणि पुढे तांदळी, काष्टी मार्गे दौंड येथे मुक्काम, असे नियोजन करण्यात आल्याचे कोल्हे यांनी स्पष्ट केले.

शुक्रवारी (दि. २९) सकाळी नऊ वाजता दौंड येथील महात्मा फुले पुतळा ते आंबेडकर चौक, गांधी चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दरम्यान पदयात्रा काढण्यात येणार असून त्यानंतर मोर्चा कुरकुंभ, मळद, रावणगाव मार्गे खडकी येथे येईल. याठिकाणी बारामती चौकातील ग्रामपंचायत कार्यालयाजवळ मोर्चाचे रुपांतर सभेत होईल. त्यानंतर भिगवण आणि पळसदेव येथे कोपरा सभा करुन दुपारी अडीच वाजता मोर्चा इंदापूर येथे येईल. इंदापूर येथे पदयात्रा झाल्यानंतर निमगाव केतकी येथे कोपरा सभा, आणि तेथून मसाळवाडी, काटेवाडी, लिमटेक, पिंपळी, बांदलवाडी मार्गे मोर्चा बारामती येथे आल्यानंतर नगरपालिकेसमोर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर बारामती येथे मुक्काम होईल, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

शनिवारी (दि. ३०) बारामती येथून मेडद, कऱ्हावागज, जळगाव, माळवाडी, तारडोळी मार्गे मोरगाव येथे मोर्चा आल्यावर मयुरेश्वराचे दर्शन घेऊन मंदिरासमोर कोपरा सभा होईल. त्यानंतर आंबी बु. मार्गे जेजुरी येथे कोपरा सभा होऊन मोर्चा शिंदवणे मार्गे हवेली तालुक्यात प्रवेश करेल. शिंदवणे येथे स्वागत स्वीकारुन उरळीकांचनला रवाना होईल. या ठिकाणी जुन्या इलाईट हॉटेलसमोर कोपरा सभा होणार असून सोरतापवाडी फाटा, कुंजीरवाडी फाटा, थेऊर फाटा मार्गे लोणी काळभोर येथे आल्यावर रेल्वे स्टेशनजवळ कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले आहे. लोणी काळभोर येथून कवडीपाट टोलनाका मार्गे मांजरी फार्म, शेवाळवाडी फाटा, १५ नंबर, हडपसर गाडीतळ मार्गे पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालय येथे हा मोर्चा जाईल. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर सभा होणार असून खासदार शरद पवार, संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे नेते याठिकाणी उपस्थित राहणार आहेत. देशाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाच्या न्याय्य मागण्यांसाठी काढण्यात येत असलेल्या या ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’त शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे आणि डॉ. अमोल कोल्हे यांनी केले असून पुण्यातील सभेला उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या मागे ठामपणे उभे असल्याचा संदेश द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Ayushman Bharat Card | वृक्षमित्र अरुण पवार यांच्या वतीने पावणेपाच हजार नागरीकांना आयुष्मान भारत कार्ड वाटपास सुरुवात

Categories
Breaking News cultural social आरोग्य पुणे महाराष्ट्र

Ayushman Bharat Card | वृक्षमित्र अरुण पवार यांच्या वतीने पावणेपाच हजार नागरीकांना आयुष्मान भारत कार्ड वाटपास सुरुवात

Ayushman Bharat Card | आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष्मान भारत मिशन अंतर्गत पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाचे (Marathwada  Janvikas Sangh) संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार (Arun Pawar) यांच्या वतीने चार हजार सातशे नागरिकांना आयुष्मान भारत आरोग्य कार्ड (Ayushmann Bharat Card) वाटपास नुकतीच सुरुवात सुरुवात करण्यात आली. दरम्यान, या सेवेबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

पिंपळे गुरव येथील भालचिम सभागृहात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, शेंद्रियशेती तज्ञ मा , दिलीपराव देशमुख बारडकर माजी नगरसेविका उषाताई मुंढे, कामगार नेते विश्वनाथ शिंदे, सह्याद्री संस्थेचे अध्यक्ष कृष्णा भालचिम, डी. बी. घोडे, किसनराव गभाले, गुलाब हिले, गोविंद पोटे, करवंदे गुरुजी, विष्णू शेळके, सूर्यकांत कुरुलकर, वामन भरगंडे, सखाराम वाळकोळी, नागेश जाधव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्डचे वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना अजित गव्हाणे म्हणाले, की अशा योजनेंतर्गत कुटुंबाला पाच लाख रुपयांपर्यंत आरोग्य कवच मिळत आहे. याचा लाभ कुटुंबातील एक किंवा सर्व सदस्य घेऊ शकतात. या योजनेत एक हजार २०९ शस्त्रक्रिया, चिकित्सा, उपचार उपचारांचा समावेश करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात ५७ खासगी आणि १२ सरकारी अशा एकूण ६९ रुग्णालयांचा समावेश आहे. असे उपक्रम राबविणे ही काळाची गरज असून, मराठवाडा जनविकास संघाने घेतलेला हा उपक्रम स्तुत्य आहे.

अरुण पवार म्हणाले, की आज सर्वसामान्य कुटुंबाना रुग्णालयाचा खर्च परवडेनासा झालेला आहे. त्यामुळे केंद्र शासनाने सुरू केलेला हा उपक्रम नागरिकांना फायदेशीर ठरत आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बळीराम माळी सर यांनी, तर आभार सूर्यकांत कुरुलकर यांनी मानले.

Jharkhand Congress | झारखंडमधील काँग्रेस खासदाराकडील ३०० कोटींचे घबाड ही तर काँग्रेसी भ्रष्टाचाराच्या हिमनगाचे टोक! | माधव भांडारी 

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे

Jharkhand Congress | झारखंडमधील काँग्रेस खासदाराकडील ३०० कोटींचे घबाड ही तर काँग्रेसी भ्रष्टाचाराच्या हिमनगाचे टोक! | माधव भांडारी

 

 

Jharkhand Congress | भ्रष्टाचार, कमिशनखोरी, लुबाडणूक, दलाली आणि लाचखोरी याच इतिहासाने बरबरटेल्या काँग्रेसचा आणखी एक भ्रष्ट चेहरा झारखंडमध्ये उजेडात आला आहे. या राज्यात काँग्रेसचे राज्यसभा सदस्य धीरज साहू यांच्या घरात सुमारे नऊ कपाटांमध्ये खचाखच भरलेली तीनशे कोटींहून अधिक रकमेची रोकड जप्त करण्यात आली आहे. काळा पैसा आणि भ्रष्टाचार नष्ट करण्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या मोहिमेतून आता काँग्रेसचा कारभार उघडकीस येऊ लागला असून जिथे काँग्रेस तिथे भ्रष्टाचार हे समीकरण झाले आहे, तर भ्रष्टाचार निपटून काढणे ही मोदी की गॅरंटी असल्याचे स्पष्ट झाले आहे, असा घणाघाती दावा भाजपचे  माधव भांडारी  (Madhav Bhandari)  यांनी पत्रकार परिषदेत केला.

झारखंडमध्ये काँग्रेसच्या एका संसद सदस्याच्या घरात ही कोट्यवधींची रोकड सापडली, तर या हिशेबाने काँग्रेसच्या अन्य नेत्यांच्या घरी आणि काँग्रेसचे सर्वेसर्वा असलेल्या गांधी कुटुंबाकडे किती संपत्ती असेल? याचा हिशेब जनतेने करावा असेही भांडारी म्हणाले.या हिशेबानुसार, गांधी परिवार हा जगातील सर्वात भ्रष्ट परिवार ठरेल, असा आरोपही त्यांनी केला. (BJP Pune)

जेथे जेथे लोकप्रतिनिधी काँग्रेसचा आहे, तेथे तेथे भ्रष्टाचाराची गॅरंटी आहे, आणि जेथे भाजप आहे, तेथे स्वच्छ कारभाराची गॅरंटी आहे, असेही श्री. भांडारी म्हणाले. काँग्रेसच्या नेते, कार्यकर्त्यांना जेथे भ्रष्टाचाराचे प्रशिक्षण मिळते, ते केंद्रस्थान आता देशाला माहीत झाले आहेच, तर त्याचे नाव गांधी करप्शन सेंटर असे ठेवावे, असा उपरोधिक सल्लाही श्री. भांडारी यांनी दिला. या परिवाराकडूनच काँग्रेसींना भ्रष्टाचाराचे प्रशिक्षण दिले जाते का, असा सवालही त्यांनी केला. या सेंटरमधून प्रशिक्षण घेतलेल्यांच्या काळ्या कमाईचा नेमका किती हिस्सा गांधी परिवाराकडे जातो त्याचा हिशेब द्या, अशी मागणी करून ते म्हणाले की, देशातील भ्रष्टाचार निपटून काढण्याची गॅरंटी देणाऱ्या मोदी सरकारने आता या भ्रष्टाचाराची पाळेमुळे खणून काढल्याखेरीज स्वस्थ बसू नये. काँग्रेसच्या एका खासदाराकडे कपाटे ओसंडू वाहतील एवढा काळा पैसा असून ज्यांच्या कृपेने हे नेते बनले त्या गरीब जनतेचे डोळे या संपत्तीने दिपून गेले असतील.

भ्रष्टाचाराचे भांडे फुटू लागल्यामुळेच सारे भ्रष्ट नेते इंडिया आघाडीच्या नावाने एकत्र आले असून एकएक प्रकरण बाहेर पडू लागल्यामुळे आता ईडी, सीबीआय, आयटीसारख्या संस्थांच्या नावाने सामूहिक रडगाणे सुरू झाले आहे. झारखंडमधील सत्तारूढ पक्षाच्या एका खासदाराचा हा घोटाळा मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या डोळ्यादेखत उघडकीस आल्याने आता त्यांना क्षणभरही सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसच्या सत्तेला खडे बोल सुनावले. इंडिया आघाडीच्या नावाने एकत्र आलेल्या सर्वांचा इतिहास भ्रष्टाचाराचाच आहे. बेंगलुरूमध्ये काँग्रेसच्या एका निकटवर्तीच्याच घरी ४२ कोटींचे घबाड सापडले होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारमधील पार्थ चटर्जी यांच्या घरात ५० कोटींची रोकड व कोट्यवधींचे सोने सापडले होते, तर अरविंद केजरीवाल यांचा इमानदार साथीदार सत्येंद्र जैन याच्याकडेही सोन्याची नाणी व कोट्यवधींची रोकड जप्त करण्यात आल्यावर केजरीवाल यांनी मौन धारण करून भ्रष्टाचार लपविण्याची धडपड चालविली आहे, असे ते म्हणाले.

छत्तीसगडमध्ये काँग्रेस सत्तेवर असताना उघडकीस आलेल्या महादेव ऑनलाईन जुगारातील हप्तेखओरी प्रकरणात खुद्द मुख्यमंत्र्यांचेच हात बरबटले होते, म्हणूनच जनतेने त्यांना घरी बसवून मोदींच्या गॅरंटीवर गाढ विश्वास व्यक्त केला, असे श्री. भांडारी म्हणाले. काँग्रेस आणि हेमंत सोरेन यांच्याठगबंधन सरकारने मनरेगामध्ये साडोपाचशे कोटी, कोळसा खाणींच्या व्यवहारात दीड हजार कोटी, अवैध खाण उत्खननातून दीड हजार कोटी, ग्रामीण विकास निधीतून दीड हजार कोटी, जमीन घोटाळ्यातून तीन हजार कोटींच्या जनतेच्या पैशावर डल्ला मारला आहे, असा आरोप त्यांनी केला. मोदी की गॅरंटी ही केवळ निवडणूक प्रचाराचा मुद्दा नाही. भ्रष्टाचार निपटून काढण्याच्या मोदी सरकारच्या गॅरंटीने कांग्रेसच्या भ्रष्ट कारभाराच्या मुळावर घाव घालण्यास सुरवात केली असून इंडिया आघाडीतील एकामागोमाग एक भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या काळ्या कारभाराचा हिशेब जनतेसमोर द्यावाच लागणार आहे असा विश्वासही भंडारी यांनी व्यक्त केला.

Pune Should be No. 1 City | पुणे शहर भारतामधील पहिल्या क्रमांकाचे शहर केले जाणार

Categories
Breaking News social पुणे

Pune Should be No. 1 City | पुणे शहर भारतामधील पहिल्या क्रमांकाचे शहर केले जाणार

| ‘पुणे विकास व लोक कल्याण समिती चा पुढाकार

Pune Should be No. 1 City |   ‘पुणे शहर भारतामधील पहिल्या क्रमांकाचे शहर व्हावे’ (Pune Should be No. 1 City in India) या उद्देशासाठी ‘Mandke Human Happiness Foundation’ यांच्या पुढाकाराने ‘पुणे विकास व लोक कल्याण समिती’च्या (Pune Vikas ani Lok Kalyan Samiti)  माध्यमातून हे काम केले जाणार आहे. सुधीर मांडके (Sudhir Mandke) यांची ही संकल्पना आहे. (Pune Should be No. 1 City)

यामध्ये सुधीर मांडके, माजी IAS अधिकारी महेश झगडे, पोलीस ट्रॅफिक कमिश्नर विजयकुमार मगर, रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट गव्हर्नर मंजू फडके, लायन्स क्लब गव्हर्नर श्री. विजय भंडारी, ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष श्री. मधुकर पवार, माजी आईएएस व साहित्य संमेलन अध्यक्ष श्री. लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. राजन जोशी, अभिनेता सुबोध भावे, श्री. बाबासाहेब कल्याणी व अनेक उद्योजक, निरनिराळ्या एनजीओ, आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. विकास आचलकर, मोठ्या प्रमाणात बिल्डर्स, पुणे शहराचे कामकरणारे महत्वाचे काँट्रॅक्टर्स आणि सर्व ५० लाख पुणेकर या मिशनमध्ये सहभागी आहेत. (Pune News)
याबाबत सुधीर मांडके यांनी सांगितले कि, पुण्यामध्येवेगवेगळ्या क्षेत्रांतील (आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय, संरक्षण, कायदा, राजकीय, मनोरंजन, लायन्स क्लबचे पदाधिकारी, रोटरी क्लबचे पदाधिकारी, को-ऑपरेटिव्ह सोसायटींचे पदाधिकारी, पुण्यातील सर्व उद्योजक इत्यादी) अनेक जाणकार नागरिक यात सहभागी आहेत. पुण्याची माहिती असणारे, पुण्याच्या समस्यांची जण असणारे, या समस्यांवर उपाय सुचविणारे, जनजागृतीसाठी उस्फुर्तपणे सहभागी होणारे अनेक सुजाण नागरिक एकत्र येऊन गेली काही वर्षे काम करत आहेत. पुणे शहर केवळ महाराष्ट्राच नाही, भारत देशासाठी मार्गदर्शक ठरेल अशा योजना राबविण्याचा आमचा उद्देश आहे. आपल्या पुण्याचा सर्वांगीण विकास हा एकच विचार सर्व पुणेकरांचा असायला पाहिजे. त्यासाठी एकमेकांच्या साहाय्याने प्रयत्न केले आणि प्रत्येक नागरिकाने स्वतःचा खारीचा वाटा उचलला तर यश नक्की येईल.
मांडके पुढे म्हणाले. पुण्यातील समस्यांवर उपाय सुचविण्याचे काम ‘पुणे विकास व लोककल्याण समिती’ गेली काही वर्षे करत आहे. पुण्यातील प्रत्येक नागरिक जेव्हा या शहराला स्वतःच्या घराचे अंगण समजून सूज्ञपणाने काम करेल तेव्हा पुण्याच्या विकासाचा उद्देश सध्या हुईल. पुण्याचे प्रश्न सर्वांनाच माहिती आहेत पण त्यावर जाणकार लोकांच्या मदतीने उत्तरे शोधून त्यावर कृती करणे आवश्यक आहे. उदा. पुणे महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासन यांच्या सहयोगातून वाहतूक समस्येवर उत्तर शोधणे. काही महत्वाच्या गोष्टी आपण उस्फुर्तपणे केल्या तर सर्व आपोआप घडेल. त्यामुळे आपण सर्वजण मिळून सर्व प्रकारचे नियम पाळूयात, पाणी आणि वीज तारतम्याने वापरूयात जेणे करून त्याची प्रचंड प्रमाणात बचत
होईल.
मांडके यांनी पुढे सांगितले प्रत्येक विषयासाठी एक कमिटी बनवण्यात येणार आहे. उदा. पुण्यातील सर्व शिक्षण संस्थांचे (शाळा, महाविद्यालये) प्रमुख आणि मा. शिक्षण मंत्री यांची एक कमिटी बनवून त्यांची बालगंधर्व रंगमंदिर येथे लवकरच एक मिटिंग होणार आहे. अशा जवळपास ३० कमिटी बनवून हे काम चालणार आहे. ही सर्व कामे प्रत्येक पुणेकर सोबत असल्या शिवाय होणार नाहीत. त्यामुळे यात लोकांचा सहभाग महत्वाचा असणार आहे. असेही मांडके यांनी नमूद केले. शहरातील जवळपास 70 हून अधिक समस्यांवर ही समिती काम करणार आहे. असेही मांडके यांनी सांगितले.