Arvind Shinde | Pune Congress | आज भाजपाला ‘चले जाव’ म्हणण्याची गरज आहे | अरविंद शिंदे

Categories
Breaking News Political पुणे

आज भाजपाला ‘चले जाव’ म्हणण्याची गरज आहे | अरविंद शिंदे

१९४२ ला इंग्रजांविरूध्द काँग्रेसने ‘चले जाव’ ची हाक दिली, मात्र आज भाजपाला ‘चले जाव’ म्हणण्याची गरज आहे. असे प्रतिपादन पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्र. अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केले. 

 भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आज काँग्रेस भवन येथे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्र. अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या हस्ते ‘‘ध्वजारोहण’’ करून ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक रोहिणीताई गवाणकर यांचा सन्मान करण्यात आला.

       यावेळी बोलताना प्र. अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘१९४२ च्या चले जाव च्या आंदोलनामध्ये मुंबई नंतर देशामधील महत्वाचे ठिकाण असलेले हे पुणे शहर जिथे हुतात्मा नारायण दाभाडे यांना इंग्रजांनी या काँग्रेस भवनच्या आवारामध्ये गोळ्या घातल्या. याच पुणे शहराने देशाला दिशा देणारे विचारवंत नेतृत्व देणारे कतृत्ववान नेते दिले. देशाचा तिरंगा झेंडा पहिल्यांदा याच १९४२ च्या आंदोलनामध्ये अरुणा असफ अली यांनी फडकविला. देशाच्या स्वातंत्र्यामध्ये कसलाही आणि कोणताही भाग न घेता आज देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटणारे हर घर तिरंगा हे अभियान राबवित आहे परंतु ज्यांनी या तिरंगा झेंड्याला विरोध केला, ज्यांनी झेंडा जाळला आणि ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यानंतर ५१ वर्ष देशाचा तिरंगा झेंडा फडकविला नाही ते आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त चमकोगिरी करीत आहेत. १९४२ च्या चले जाव आंदोलनानंतर १९४७ ला देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी व क्रांतीकारकांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन हुतात्मे झाले. आज मी त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना व क्रांतीकारकांना अभिवादन करतो.’’

       यानंतर ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक रोहिणीताई गवाणकर यांचा सन्मान ज्येष्ठ नेते उल्हास पवार, अरविंद शिंदे, ॲड. अभय छाजेड यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना रोहिणीताई गवाणकर म्हणाल्या, ‘‘भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये महिलांचे देखील मोठ्या प्रमाणावर योगदान होते. त्यामध्ये प्रामुख्याने अरूणा असफ अली या क्रांतिकारी विचारांच्या होत्या आणि क्रांतीकारी भूमिका त्या निभावत असते. ९ ऑगस्टला गवालिया टँक येथे त्यांनी अत्यंत क्रांतीकारी भूमिका बजावत देशाचा तिरंगा झेंडा फडकवून भूमिगत झाल्या. अशा अनेक महिला या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत होत्या.’’

       यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर, कमल व्‍यवहारे, दिप्ती चवधरी, धनंजय दाभाडे, अजित दरेकर, लता राजगुरू, अविनाश बागवे, रफिक शेख, संगीता तिवारी, रजनी त्रिभुवन, द. स. पोळेकर, ॲड. अनिल कांकरिया, भगवान धुमाळ, आबा जगताप, नितीन परतानी, भरत सुराणा, अविनाश गोतारणे, बाळासाहेब प्रताप, हरिदास अडसूळ, ॲड. विजय तिकोने, ॲड. राहुल ढाले, ॲड. संजय साळवे, ॲड. राजेंद्र काळेबेरे, परवेज तांबोळी, आशिष व्‍यवहारे, सचिन भोसले, वाल्मिक जगताप, रमेश सोनकांबळे, सचिन आडेकर, प्रविण करपे, अनुसया गायकवाड, शारदा वीर, ॲड. अश्विनी गवारे, गौरव बोराडे, कान्होजी जेधे आदींसह असंख्य काँग्रेस कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Congress Pune | केंद्रातील मोदी सरकार सर्वसामान्यांचे नसून केवळ हम दो हमारे दो चे – अरविंद शिंदे

Categories
Breaking News Political पुणे

केंद्रातील मोदी सरकार सर्वसामान्यांचे नसून केवळ हम दो हमारे दो चे – अरविंद शिंदे

                                 

   पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पुणे सातारा रोड, भापकर पेट्रोल पंपाजवळ महागाई, बेरोजगारी व जीवनावश्यक वस्तूंवरील वाढलेल्या GST च्या विरोधात प्र. अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश आंदोलन करण्यात आले.

     यावेळी बोलताना अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, सीएनजी, पीएनजीचे दर दिवसेंदिवस वाढविले आहेत. महागाईने जनता त्रस्त असताना केंद्र सरकारने दूध, दही, पनीर, आटा, तेल, तूप यासह जीवनावश्यक वस्तूंवरही GST लावला आहे. मोदी सरकारने GST तून शाळकरी मुलांनाही सोडले नाही, शालेय वस्तूंवरही GST लावला आहे. रुग्णालयात उपचार घेण्यावरही GST भरावा लागणार आहे. हे सरकार केवळ हम दो हमारे दो असून मोदी, शहा व आदानी, अंबानी दोन विकाणारे व दोन विकत घेणारे यांचे आहे. मागील ४५ वर्षातील बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. २०१४ ते २०२२ पर्यंत विविध विभागांमध्ये नोकऱ्यांसाठी २२ कोटी अर्ज मिळाले मात्र केवळ ७ लाख उमेदवारांना नोकरी देण्यात आल्याचे केंद्र सरकारनेच लोकसभेत सांगितले आहे. एवढी भयानक अवस्था आहे. तर लष्करात भरती होऊन देशाची सेवा करु पाहणाऱ्या तरुणांना फक्त ४ वर्षाची सेवा व नंतर निवृत्ती अशी ‘अग्निपथ’ नावाची योजना आणली आहे. या योजनेला तरुण वर्गांचा तीव्र विरोध असून काँग्रेस पक्ष तरुणांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे.’’

          यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष रमेश बागवे, ॲड. अभय छाजेड, संजय बालगुडे, आबा बागुल, वीरेंद्र किराड, कमल व्यवहारे, संगीता तिवारी, अविनाश बागवे आदींची भाषणे झाली.

     यावेळी नगरसेवक लता राजगुरू, अजित दरेकर, रविंद्र धंगेकर, रफिक शेख, सुजाता शेट्टी, वैशाली मराठे, अनिल सोंडकर, ब्लॉक अध्यक्ष सतिश पवार, रमेश सोनकांबळे, सचिन आडेकर, प्रदिप परदेशी, शोएब इनामदार, प्रविण करपे, नीता रजपूत, रजनी त्रिभुवन, उस्मान तांबोळी, बाळासाहेब दाभेकर, रमेश अय्यर, सुनिल शिंदे, द. स. पोळेकर, सुजित यादव, नरेंद्र व्यवहारे, उमेश कंधारे, अविनाश गोतारणे, अनिल अहिर, रवि मोहिते, भरत सुराणा, परवेत तांबोळी, अनुसया गायकवाड, नंदा ढावरे, वैशाली रेड्डी, बेबी नाज, योगिता सुराना, रजिया बल्लार, स्वाती शिंदे, ताई कसबे, शानी नौशाद, राधिका मखामले, नलिनी दोरगे, सीमा महाडिक, अनिता धिमधिमे, अश्विनी गवारे, ज्योती परदेशी, नरसिंह आंदोली, दिपक ओव्हाळ, वाल्मिक जगताप, भगवान कडू, विश्वास दिघे, भरत सुराणा, स्वप्निल नाईक, मामा परदेशी, सादिक कुरेशी, अमित बागुल, प्रविण चव्हाण, आबा जगताप, अन्वर शेख, अविनाश अडसूळ, प्रकाश आरणे, बाळासाहेब प्रताप, बंडू नलावडे, सुरेश कांबळे, डॉ. अनुप बेगी, वाल्मिक जगताप, राजू शेख, आयुब पठाण, हेमंत राजभोज, विकी खन्ना, रॉर्बट डेव्हिड, सुनिल पंडित, रवि पाटोळे, अभिजीत महामुनी, सुरेश चौधरी, दत्ता पोळ, परवेज तांबोळी, हरिष यादव, रावसाहेब खवळे, बाळू कांबळे, केतन जाधव आदी उपस्थित होते.

Arvind Shinde | Governor | महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राच्या मातीशी गद्दारी करणाऱ्या सूर्याजी पिसाळ उर्फ भगतसिंह कोश्यारी यांचा जाहिर निषेध | अरविंद शिंदे

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राच्या मातीशी गद्दारी करणाऱ्या सूर्याजी पिसाळ उर्फ भगतसिंह कोश्यारी यांचा जाहिर निषेध | अरविंद शिंदे

      छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, संत श्रेष्ठ ज्ञानेश्र्वर महाराज यांच्या आशिर्वादाने पावन झालेली तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर आधारीत ही पावन भूमी असून १०८ हुतात्म्यांच्या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या बलिदानानंतर उभी राहिलेली ही भूमी याचा अपमान राज्याचे बाहेरून आलेले राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांनी आपल्या भाजपा प्रेमापोटी महाराष्ट्राचा अपमान केला आहे. याचा मी सर्वप्रथम निषेध करतो. असे पुणे शहर कॉंग्रेस चे प्रभारी अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सांगितले.

   शिंदे पुढे म्हणाले,   ‘‘गुजराती व राजस्थानमधील व्‍यापारी लोकांमुळे मुंबई महाराष्ट्र आहे जर ते नसते तर ही राजधानी आर्थिक राजधानी सुध्दा राहिली नसती.’’ अशा पध्दतीचे वक्तव्य हे निषेधार्य आहे. महाराष्ट्राच्या स्थापनेपासून मुंबईमध्ये गुजराती, राजस्थानी अनेक राज्यांतून आलेल्या सर्वांचे मराठी माणसाने मनमोकळ्या पणाने व मोठ्या मनाने स्वागत केले आहे. भाजपाचे राज्यपाल फक्त मतांचे द्रुवीकरण करण्यासाठी असे वक्तव्य करतात याचे आश्चर्य तर वाटतेच परंतु भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील एकाही नेत्याला वाईट वाटू नये याची खंत आहे आणि याबद्दल येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील जनता तुम्हाला जाब विचारल्या शिवाय राहणार नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये १०८ हुतात्म्यांवर कोणी गोळी चालविण्यास लावली हे महाराष्ट्र विसरलेले नाही.

      भाजपाचे राज्यपाल यांनी केलेल्या वक्तव्‍याचा निषेध वास्तविक पाहता मुंबईमध्ये राहणाऱ्या गुजराती व राजस्थानी व्‍यापाऱ्यांनी करायला पाहिजे कारण अनेक राज्यातून आलेल्या लोकांना मराठी माणासांनी साथ दिली नसती तर तेही व्‍यापारी मोठे झाले नसते. खर तर गुजराथी संघटनांनी व राजस्थानी संघटनांनी या वक्तव्‍याचे खंडण आगोदर केले पाहिजे. असे ही शिंदे म्हणाले.

Congress | Pune | मोदी आणि शाह यांना विसरण्याचा आजार | पुणे काँग्रेसची टीका

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

मोदी आणि शाह यांना विसरण्याचा आजार | काँग्रेसची टीका

केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय तपास यंत्रणेचा हुकूमशाही पद्धतीने वापर करून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा मा. सोनियाजी गांधी यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात आज सलग तिसऱ्या दिवशी पुन्हा बोलावले याच्या निषेधार्थे प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज बुधवार दि. 27 जुलै 2022 रोजी सकाळी १०.०० वा., डॉ आंबेडकर पुतळा येथे “शांततापूर्ण सत्याग्रह” करण्यात आला त्यावेळी पुणे शहर प्रभारी अध्यक्ष अरविंद शिंदे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी उपाध्यक्ष मोहन जोशी, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रमेश दादा बागवे, यांच्या सह इतर सर्व कॉंग्रेस पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी उपाध्यक्ष मोहन जोशी ह्यांनी आंदोलनात निषेधात्मक भाषणात आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी आणि अमित शहा हे मानसिक रोगी आहेत, त्यांना विसरण्याचा आजार झाला आहे. त्यामुळे त्यांनी जे जे वचन जनतेला दिले होते त्याच्या बरोबर विरुद्ध करण्याचे काम ते करत आहेत. त्यांनी जनतेला 2014 पेक्षा महागाई कमी करण्याचे वचन दिले होते पण आजारी मोदी हे ते विसरले आणि त्यांनी महागाई कमी करण्याऐवजी महागाई वाढवली, त्यांनी सांगितले होते की देशाची इज्जत वाढवेल त्या एवजी आजारी मोदी धडाधड सरकारी संपती विकत आहेत. आणि त्याच्या पुढे आत्ता त्यांना अजून एक रोग झाला आहे ते म्हणजे काही ही कारण नसताना गांधी घराण्यातील मंडळीना त्रास द्यायचा त्यालाच आधारून ईडी च्या माध्यमातुन राहुल गांधी आणि सोनिया गांधी ह्यांना त्रास देण्याचे कार्य सुरू आहे..

आजारी असलेले मोदी हे घृणा पूर्ण तिरस्कारपूर्ण राजकारण करत आहेत पण आम्ही तिरस्कार घृणा करणार नाही कारण आम्ही गांधी विचारांची मंडळी आहोत त्यानुसार आम्ही परमेश्वराला अशी प्रार्थना करतो हे परमेश्वरा ह्या आजारी मोदी ह्यांना बरे कर, त्यांच्या मध्ये शिरलेला भस्मासुर राक्षस बाहेर काढ आणि त्यांना सद्बुद्धी दे….

त्यांच्या समोर फक्त देशातील 2 बिजनैस मन दिसत आहेत त्यांना 130 करोड़ जनता दिसत नाही. त्यांना असे वाटते की ते केवळ दोन उद्योजकांचे पंतप्रधान आहेत तरी परमेश्वरा त्यांना बुद्धी दे आणि स्मृती दे जेणेकरून त्यांना आठवेल की पंतप्रधान म्हणुन त्यांचे कार्य 130 करोड़ जनतेसाठी आहे केवळ दोघांसाठी नाही.

यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘नॅशनल हेराल्ड वर्तमान पत्राने स्वातंत्र्य चळवळीत मोलाचे योगदान दिले आहेत्याच वर्तमान पत्राच्या खोट्या प्रकरणात सोनियाजी व राहुलजी यांची चौकशी केली जात आहे त्याचबरोबर काँग्रेस पक्ष महागाईबेरोजगारी सारखे सामान्य माणसांचे प्रश्न हाताळत आहे. संसदेत व संसदेबाहेर काँग्रेस पक्ष भाजपा सरकारला जाब विचारत आहे त्यामुळे ईडीसारख्या कारवायांच्या माध्यमातून दबाव आणून विरोधकांना संपवण्याचे काम केले जात आहे. सोनियाजी गांधी या देशातील गोरगरीब, सर्वसामान्य पिडीत, शोषित, वंचितांचा आवाज आहेत. त्या केंद्र सरकारच्या या दडपशाहीला भीक घालत नाही. लोकशाहीत विरोधकांना असा त्रास देण्याचे काम लोकशाहीला मारक आहे. सरकारविरोधात आवाज उठवणे हा लोकशाही परंपरेचा भाग आहे पण भाजपा सरकार विरोधकांचा आवाज दडपण्याचे काम करत आहे.’’

Congress Pune | महागाई व GST च्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठीच काँगेस नेत्यांना मोदी सरकार त्रास देत आहे | अरविंद शिंदे

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

महागाई व GST च्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठीच काँगेस नेत्यांना मोदी सरकार त्रास देत आहे | अरविंद शिंदे

     अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनियाजी गांधी यांना केंद्रातील भाजपचे मोदी सरकार सूडबुध्दीने लक्ष करीत असून ईडीच्या चौकशीसाठी सातत्याने बोलवित आहेत. याच्या विरोधात प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेवरून आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वारगेट येथील देशभक्त कै. केशवराव जेधे यांच्या पुतळ्याजवळ शांततापूर्ण बैठा सत्याग्रह करण्यात आला.

     यावेळी बोलताना अरविंद शिंदे म्हणाले, ‘‘केंद्रातील भाजपाच्या मोदी सरकारने घेतलेले चूकीचे निर्णय व धोरण यावरून सर्वसामान्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी काँग्रेस नेत्यांना नाहक त्रास देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून राजकीय सूडबुध्दीने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा श्रीमती. सोनियाजी गांधी यांना लक्ष करून ईडीच्या चौकशीसाठी बोलविले जात आहे. हे हुकूमशाही सरकार केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करीत असून या विरूध्द आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. ज्या पध्दतीने केंद्रातील मोदी सरकार आमच्या नेत्या सोनियाजी गांधी व राहुलजी गांधी यांना ईडी चौकशी मार्फत त्रास देत आहे व काँग्रेस पक्षाला बदनाम करीत आहे याचा आम्ही तीव्र निषेध करतो. लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष सक्षम असावा असे काँग्रेस पक्षाला वाटते परंतु या ठिकाणी केंद्रातील भाजप सरकार हे हिटलरशाही पध्दतीने विरोधी पक्ष संपविण्याचे काम करीत आहे.’’

     यावेळी माजी आमदार उल्हास पवार, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, रमेश बागवे, ॲड. अभय छाजेड, संगीता तिवारी, अविनाश बागवे आदींनी आपले विचार व्यक्त केले.     तसेच यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटीचे चिटणीस संजय बालगुडे, आबा बागुल, कमल व्यवहारे, बाळासाहेब दाभेकर, महिला अध्यक्षा पुजा आनंद, नगरसेविका लता राजगुरू, वैशाली मराठे, रफिक शेख, अजित दरेकर, नरेंद्र व्यवहारे, अण्णा राऊत, नीता रजपूत, रजनी त्रिभुवन, ब्लॉक अध्यक्ष सचिन आडेकर, रमेश सोनकांबळे, प्रविण करपे, शोएब इनामदार, सतीश पवार, भरत सुराणा, अविनाश अडसुळ, प्रशांत सुरसे, शिलार रतनगिरी, राजू साठे, राहुल तायडे, ज्योती परदेशी, स्वाती शिंदे, सिमा महाडिक, योगिता सुराणा, ॲड. निलेश बोराटे, राजू नाणेकर, उमेश कंधारे, रामविलास माहेश्वरी, विश्वास दिघे, भगवान कडू, बाळासाहेब प्रताप, रवि मोहिते, कान्होजी जेधे, शिवराज भोकरे, अक्षय माने, वैशाली परदेशी, अनुसया गायकवाड, वाल्मिक जगताप, सुरेश कांबळे, सचिन सावंत, चेतन आगरवाल, शाबीर खान, नर.सिंह आंदोली, हनुमंत राऊत, विक्रम खन्ना, बाबा सय्यद, हेमंत राजभोज, ॲड. अश्विनी गवारे, श्रीकृष्ण बराटे, अविनाश गोतारणे, रवि पाटोळे आदी उपस्थित होते.

     सत्याग्रहाचे सूत्रसंचालन द. स. पोळेकर यांनी केले तर आभार सचिन आडेकर यांनी मानले.

OBC Reservation | ओबीसींना राजकीय आरक्षण लागू झाल्याबाबत पुण्यातील राजकीय पक्षांना काय वाटते?

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

राज्यात ओबीसींना राजकीय आरक्षण लागू झाल्याच्या आनंदात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला.

ओबीसी आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडी सरकारने गठीत केलेल्या बांठिया समितीचा अहवाल मा.सर्वोच्च न्यायालयाने स्विकारला. यामुळे ओबीसी आरक्षणासह निवडणूका होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्ष कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी पेढे वाटत आनंदोत्सव साजरा केला. महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणासाठी अतिशय प्रामाणिकपणे काम केले त्यामुळेच हे आरक्षण मिळाल्याची प्रतिक्रिया अध्यक्ष  प्रशांत जगताप यांनी दिली. याबद्दल त्यांनी मा. सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व ज्येष्ठ नेते छगन भुजबळ साहेब, धनंजय मुंडे, विजय वडेट्टीवार यांचे मनापासून आभार मानले.

शरद पवार साहेबांनी त्याकाळात राज्यात मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्याच्या बाजूने ठाम भूमिका घेतली आणि राज्यात ओबीसी आरक्षणाचा निर्णय झाला. ते आरक्षण अबाधित राहिलं, याचा मनापासून आनंद आहे. ओबीसी आरक्षणासाठी ठाम भूमिका घेण्याचं काम सुरुवातीपासून आम्ही केलं व व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची यापुढे देखील हीच भूमिका राहील” , असे देखील शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने काँग्रेस पक्षाला आनंद झाला | अरविंद शिंदे

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, सर्वोच्च्य न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओ. बी. सी. समाजाचे आरक्षण मान्य केले आहे. या निर्णयाचे मी स्वागत करतो. या आरक्षणासाठी काँग्रेस पक्षाने पहिल्यापासूनच पाठपुरावा केला असून महाविकास आघाडीतर्फे एकत्रित सर्वोच्च न्यायालयातील लढाई लढली गेली. मा. बांठिया कमिशन महाविकास आघाडी सरकारने या आरक्षणासाठी नेमले होते. या आयोगाकडून सादर करण्यात आलेला वस्तूनिष्ठ अहवाल मा. सर्वोच्च्य न्यायालयाने मान्य केला यामुळे राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका या ओ. बी. सी. आरक्षणासहित होणार आहेत.

     महाराष्ट्रातील तमाम ओ. बी. सी. बांधवांना राजकीय आरक्षण पुन्हा लागू करण्याच्या मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने काँग्रेस पक्षाला आनंद झाला आहे.

महाविकास आघाडीने ओबीसी राजकीय आरक्षणाचे श्रेय घेऊ नये |भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची स्पष्टोक्ती

सर्वोच्च न्यायालयाने सांगूनही महाविकास आघाडी सरकारने तिहेरी चाचणी पूर्ण करण्यासाठी काम केले नाही म्हणून राज्यात ओबीसींचे राजकीय आरक्षण गमावले. अडीच वर्षे वेळ वाया घालविणाऱ्या महाविकास आघाडीने आता ओबीसी राजकीय आरक्षणाचे श्रेय घेऊ नये, असे स्पष्ट प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केले.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीला ओबीसींना राजकीय आरक्षण द्यायचे नव्हते त्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने सांगूनही समर्पित आयोग नेमणे व एंपिरिकल डेटा गोळा करण्यासाठी हालचाली केल्या नाहीत. एंपिरिकल डेटाचे काम करण्याच्या ऐवजी सातत्याने केंद्र सरकारकडे २०११ च्या जनगणनेची माहिती मागून केंद्राकडे बोट दाखवत वेळ वाया घालविला. बांठिया आयोग नेमल्याबद्दल आघाडीचे नेते सांगत असले तरी हे काम मार्च २०२२ मध्ये करण्याच्या ऐवजी आधी का केले नाही आणि एंपिरिकल डेटा आधी का गोळा केला नाही याचे उत्तर त्यांनी द्यायला हवे.

ते म्हणाले की, महाविकास आघाडीच्या बेफिकीरीमुळे राज्यात ओबीसी राजकीय आरक्षण पुन्हा स्थापित झाले नाही आणि परिणामी मध्यंतरी सहा जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणुका, भंडारा – गोंदिया जिल्हा परिषदांच्या निवडणुका, १०६ नगरपंचायतींच्या निवडणुका आणि हजारो ग्रामपंचायतींच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय झाल्या. आता ओबीसी राजकीय आरक्षणाबद्दल दावा करणाऱ्या महाविकास आघाडीने याबद्दल उत्तर द्यायला हवे.

त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेची सूत्रे स्वीकारल्यावर तातडीने ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत आढावा घेतला, बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारला, सर्वोच्च न्यायालयात चांगल्या रितीने पाठपुरावा केला त्यामुळे ओबीसी राजकीय आरक्षण परत मिळाले आहे. भाजपा प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणात हस्तक्षेप याचिका दाखल केल्यामुळे न्यायप्रक्रियेत सक्रीय सहाय्य करता आले. ओबीसी राजकीय आरक्षण पुन्हा प्रस्थापित होईपर्यंत भाजपा ओबीसींना निवडणुकीत २७ टक्के तिकिटे देईल, अशीही भूमिका जाहीर केली होती व इतरांना त्याचे अनुकरण करावे लागले.

ते म्हणाले की, शिंदे – फडणवीस सरकारच्या पुढाकारामुळे मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, अनुसूचित जाती – जमातींना पदोन्नतीमध्ये आरक्षण हे प्रश्नही सुटतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Arvind Shinde | pune congress | तुमचे फक्त ६ महिने मला द्या | स्वबळाचा नारा देत अरविंद शिंदेनी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जागवली ऊर्जा 

Categories
Breaking News Political पुणे

महापालिका निवडणुकीत 173 जागांवर उमेदवार उभे करण्याचे काँग्रेसचे नियोजन

| स्वबळाचा नारा देत अरविंद शिंदेनी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जागवली ऊर्जा

पुणे | आगामी महापालिका निवडणुकीसाठी पुणे काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. त्यानुसार काँग्रेस येणाऱ्या महापालिका निवडणुकीत 173 जागांवर उमेदवार उभा करणार आहे. तसे नियोजन देखील पक्षाकडून सुरु आहे. त्यामुळे आगामी 6 महिने पक्षासाठी सर्वस्व अर्पण करत मेहनत करा, अशी अपेक्षा अरविंद शिंदे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली आहे.
https://youtu.be/gdamQK9ampw

| काँग्रेस ने घेतली आघाडी

राज्यातील राजकीय घडामोडी कडे पूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. यामुळे महापालिका निवडणुकीचा विषय मागेच पडला होता. सरकार स्थापन झाल्यावर पुन्हा निवडणुकीचा विषय ऐरणीवर आला आहे. कारण महाविकास आघाडी सरकार कोसळून आता भाजप आणि शिंदे गटाने सत्ता स्थापन केली आहे. दरम्यान महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर महापालिका निवडणुकीच्या हालचाली सुरु करण्यात काँग्रेस ने आघाडी घेतली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेस ने कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. तसेच प्रभारी अध्यक्ष झाल्यानंतर देखील अरविंद शिंदे यांना कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घ्यायच्या होत्या. त्यामुळे सर्व आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची शिंदे यांनी बैठक घेतली. यामध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या सूचना घेण्यात आल्या.

| पक्षासाठी आगामी 6 महिने सर्वस्व अर्पण करा

महापालिका निवडणुकीबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांनी नेतृत्वाकडून अपेक्षा व्यक्त केल्या कि आता महाविकास आघाडी सरकार नाही, त्यामुळे आपल्याला चांगला जोर लावावा लागणार आहे. तसेच मतदार याद्याबाबत देखील तक्रारी सांगितल्या. पदाधिकाऱ्यांनी देखील निवडणुकीच्या नियोजनाबाबत सूचना केल्या. त्यावर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कि आपण येणाऱ्या महापालिका निवडणुकीत 173 जागांवर उमेदवार उभा करणार आहोत. तसे नियोजन देखील पक्षाकडून सुरु आहे. त्यामुळे आगामी 6 महिने पक्षासाठी सर्वस्व अर्पण करत मेहनत करा, अशी अपेक्षा अरविंद शिंदे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली. कार्यकर्त्यांनी देखील याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
दरम्यान शिंदे यांनी पदावर आल्यानंतर आजी माजी लोकांना एकत्र करत सुसंवाद साधल्याने आणि त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण केल्याने कार्यकर्ते समाधान व्यक्त करत आहेत. शिवाय महापालिका निवडणूक स्वबळावर लढवायची असल्याने देखील कार्यकर्ते खुश आहेत. कारण या अगोदर नेहमी आघाडी होत असल्याने काही जागांवर पाणी सोडावे लागत होते. मात्र आता संधी मिळण्याची आशा असल्याने कार्यकर्ते मात्र चांगलेच समाधानी झाले आहेत.

Rahul Gandhi | Pune congress | राहुल गांधीच्या समर्थनार्थ पुणे कॉंग्रेस कडून निदर्शने 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

राहुल गांधीच्या समर्थनार्थ पुणे कॉंग्रेस कडून निदर्शने

केंद्रातील भाजपचे नरेंद्र मोदी सरकार काँग्रेसच्या अध्यक्षा  खा.‌ सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर सक्त वसुली संचालनालयामार्फत (ईडी) दबाब आणून लोकशाहीमध्ये विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचमुळे गेली ३ दिवस काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांना ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी बोलावून त्यांच्या अटकेसाठी मार्ग तयार करीत असून या अन्यायाविरोधात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे प्रभारी  अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बालगंधर्व चौक येथे निदर्शने करण्यात आली.

     यावेळी बोलताना प्र. अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘आमचे नेते राहुल गांधी यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घाबरले असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशाचे नेतृत्व राहुलजी गांधी करतील या भीतीमुळेच नॅशनल हेरॉल्ड या चूकीच्या प्रकरणामध्ये मुद्दामून नाव बदनाम करून खोट्या गुन्ह्यात अटक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना असून पक्षाचा कार्यकर्ता कदापी शांत राहणार नाही, या विरोधात रस्त्यावर उतरून मोदी सरकारचा खरा चेहरा लोकांसमोर आणण्याचे काम काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते येथून पुढे करतील मोदी सरकारने चूकीच्या पध्दतीने राहुलजी गांधी यांना अटक करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही शांत बसणार नाही. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे मोठ्या  प्रमाणावर रस्त्यावर उतरून निषेध नोंदविला जाईल.’’

     यावेळी माजी आमदार रमेश बागवे, ॲड. अभय छाजेड यांची यावेळी निषेधाची भाषणे झाली.

     यावेळी कमल व्यवहारे, अजित दरेकर, अविनाश बागवे, रफिक शेख, सुजाता शेट्टी, वैशाली मराठे, संगीता तिवारी, पुजा आनंद, गोपाळ तिवारी, मुख्तार शेख, राजेंद्र शिरसाट, नारायण पाटोळे, सुनिल शिंदे, शिवा मंत्री, प्रदिप परदेशी, सतिश पवार, विजय खळदकर, रमेश सोनकांबळे, प्रविण करपे, अजित जाधव, सचिन आडेकर, यासीन शेख, आबा जगताप, नितीन परतानी, साहील केदारी, मेहबुब नदाफ, सुरेश कांबळे, फैय्याज शेख, विश्वास दिघे, गुलाम हुसेन, प्रमोद निनिरिया, मुन्नाभाई शेख, परवेज तांबेळी, संजय अंभग, सेल्वराज ॲन्थोनी, संतोष आरडे आदींसह असंख्य काँग्रेस कार्येकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

Arvind Shinde | Pune Congress | अरविंद शिंदे यांनी स्विकारला पुणे काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्ष पदाचा पद्‌भार

Categories
Breaking News Political पुणे

अरविंद शिंदे यांनी स्विकारला पुणे काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्ष पदाचा पद्‌भार

 पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारी अध्यक्ष पदाचा पद्‌भार माजी अध्यक्ष रमेश बागवे यांच्या कडून अरविंद शिंदे यांनी काँग्रेस भवन येथे पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये स्विकारला.

     शिर्डी येथे झालेल्या राज्यस्तरिय नवसंकल्प शिबीरामध्ये प्रदेश काँग्रेस कमिटीच्या झालेल्या ठरावानुसार ५ वर्षांपेक्षा जास्त संघटनेतील असलेल्या पदांचा पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला. त्यामध्ये पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड व रोहित टिळक या पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी देखील राजीनामे दिले होते. त्यानंतर प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले यांनी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीला प्रभारी अध्यक्ष म्हणून पुणे महानगरपालिकेतील अभ्यासू नगरसेवक अरविंद शिंदे यांना नियुक्तीचे पत्र दिले.

     आज काँग्रेस भवन येथे पार पडलेल्या पद्‌भार स्विकारण्याच्या कार्यक्रमामध्ये बोलताना रमेश बागवे म्हणाले की, ‘‘माझ्या सारख्या मातंग समाजातील कार्यकर्त्याला काँग्रेस पक्षाने पुण्यासारख्या शहराचे अध्यक्ष पद दिले हे माझ्यासाठी आमदार, मंत्री पदापेक्षा मोठे होते. अध्यक्ष असताना शहरातील निष्ठावान व सर्वसामान्य कार्यकर्त्यांना घेवून व पदाधिकारी व नगरसेवकांना विचारात घेवून पक्षाचे काम गेली ६ वर्ष मी प्रामाणिकपणे केले.’’

     नवनिर्वाचित प्रभारी अध्यक्ष अरविंद शिंदे यावेळी म्हणाले की, ‘‘काँग्रेस पक्षाचे काम करीत असताना एक युवक काँग्रेसचा कार्यकर्ता ते पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष या प्रवासामध्ये अनेकांनी मला साथ दिली. पक्षाचे प्रामाणिकपणे केलेल्या कामाचे फळ आज अध्यक्ष पदाच्या रूपाने मला मिळाले. यामागे प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले, एच. के. पाटील, मा.ना.बाळासाहेब थोरात, सुशिलकुमार शिंदे, मा.ना.अशोक चव्‍हाण, पृथ्वीराज चव्‍हाण, मा.ना.सुनिल केदार, संग्राम थोपटे आणि संजय जगताप यांच्या सहकार्याने आगामी पुणे महानगरपालिकेच्या

निवडणुकीत पूर्ण ताकदीने व काँग्रेस पक्षाच्या हिताचे काम मी करेन. त्याचबरोबर येणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला विचारात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय महानगरपालिकेत व शहरामध्ये होणार नाही. या पध्दतीचे काम शहरामध्ये पक्ष संघटना म्हणून मी करेन.’’

     यावेळी माजी शहराध्यक्ष ॲड. अभय छाजेड यांनी राज्यस्तरीय नवसंकल्प शिबीरामध्ये झालेल्या निर्णयांची माहिती उपस्थितांना दिली.

     यावेळी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार दिप्ती चवधरी, अनंत गाडगीळ, संजय बालगुडे, कमल व्‍यवहारे, अमीर शेख, गोपाळ तिवारी, सोनाली मारणे, दत्ता बहिरट, कैलास कदम, संगीता तिवारी, रमेश अय्यर, पुजा आनंद, राहुल शिरसाट, भुषण रानभरे, बाळासाहेब दाभेकर, अजित दरेकर, लता राजगुरू, वैशाली मराठे, सुजाता शेट्टी, रफिक शेख, राजेंद्र भुतडा, सचिन आडेकर, सतीश पवार, प्रविण करपे, रमेश सोनकांबळे, रमेश सकट, शोएब इनामदार, प्रदिप परदेशी, सुनील घाडगे, द. स. पोळेकर, बाळासाहेब अमराळे, रजनी त्रिभुवन, सुनिल शिंदे, नीता रजपूत, राजेंद्र शिरसाट, शिवाजी बांगर, अस्लम बागवान, मुख्तार शेख, संदीप मोकाटे, राहुल तायडे, सुजित यादव, मेहबुब नदाफ, राजू शेख, दिपक निनारिया, मीरा शिंदे, दिपक ओव्‍हाळ, विठ्ठल गायकवाड, दत्ता पोळ, गौरव बोराडे, लतेंद्र भिंगारे, नंदलाल धिवार, शैलजा खेडेकर, सुंदर ओव्‍हाळ, सुरेश कांबळे, बबलु कोळी, योगेश भोकरे, अंजली सोलापूरे, शिलार रतनगिरी, अजित ढोकळे, किशोर मारणे, संतोष आरडे आदी उपस्थित होते.

Arvind Shinde | pune congres | पुणे शहर काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्ष पदी अरविंद शिंदे!

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

पुणे शहर काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षपदी अरविंद शिंदे

पुणे : काँग्रेसच्या नियमावलीनुसार रमेश बागवे यांनी शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे हे पद रिक्त होते. मात्र आता प्रभारी अध्यक्ष पदी अरविंद शिंदे यांची नियुक्ती प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार करण्यात आली आहे.

कॉंग्रेस हायकमांड च्या निर्णयानुसार ५ वर्ष पूर्ण झालेल्या  पदाधिकाऱ्याना राजीनामा देण्यास सांगितले आहे. तसा नियम करण्यात आला आहे. त्यानुसार कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष रमेश बागवे यांच्यासह तीन पदाधिकाऱ्यानी आपले राजीनामे सादर केले आहेत. त्यामुळे आता नवीन शहर अध्यक्ष कोण होणार, याकडे लक्ष लागून राहिले होते. या पदासाठी शहरातून सर्व तगडे नेते इच्छुक आहेत. यामध्ये आबा बागुल, अरविंद शिंदे, संजय बालगुडे आणि दत्ता बहिरट यांचा समावेश आहे. आगामी काही दिवसात यांच्यापैकी कुणाच्या गळ्यात शहर अध्यक्ष पदाची माळ पडणार, याकडे लक्ष लागून राहिले होते.

काँग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड यांच्यासह रोहित टिळक यांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेसच्या ठरावानुसार त्यांनी हे राजीनामे पाठवले आहेत. यामुळे पुण्यातील काँग्रेसमध्ये मोठे बदल होणार हे स्पष्ट झाले होते.

पाच वर्षांपेक्षा जास्त पदावर असलेल्यानी पदं रिक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार देशभरातील पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेण्यात आले आहेत. मागील आठवड्यात नगरच्या शिर्डीत राज्य काँग्रेसची बैठक पार पडली. यावेळी चिंतन शिबिरात हाच नियम राज्यात लागू करण्याचे ठरवण्यात आले. यानंतर पुण्याला नवं नेतृत्व मिळणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

बागवे यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले आहे. नवीन अध्यक्ष निवडीपर्यंत अरविंद शिंदे यांना प्रभारी अध्यक्ष पद दिले आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली नवीन अध्यक्षांची निवड होईल. ऑगस्ट महिन्यात पूर्ण वेळ नवीन अध्यक्ष मिळेल असे सांगण्यात येत आहे. दरम्यान 2003-04 साली देखील अशीच वेळ आली होती. संगीता देवकर यांना प्रभारी अध्यक्ष करण्यात आले होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या निवडणुकीत अभय छाजेड यांनी बाजी मारली होती.