Sanitation | PMC | नालेसफाई संदर्भात मनपा प्रशासनाला इशारा !

Categories
Breaking News PMC Political पुणे

नालेसफाई संदर्भात मनपा प्रशासनाला इशारा !

भारतीय जनता पक्ष पुणे शहराच्या शिष्टमंडळाने आज पावसाळी कामांच्या नियोजनातील निष्काळजीपणाबाबत महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी पावसाळा सुरू झाला तरी अपूर्ण असलेली नालेसफाई, निकृष्ट दर्जाची पावसाळी कामे, अद्यापही ‘जैसे थे’ स्थितीत असलेला राडारोडा आणि आपत्ती व्यवस्थापनाचा अभाव अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. पुराच्या सुरक्षेचा धोका असणाऱ्या ठिकाणांची वस्तुस्थिती देखील यावेळी आयुक्तांच्या लक्षात आणून देत, तात्काळ दखल घेऊन लवकरात लवकर कामे पूर्ण करण्याची मागणी केली.

वाढता पाऊस आणि संभाव्य पुरस्थितीचा धोका लक्षात घेऊन प्रभाग स्तरावर आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करावे अशी मागणी मुळीक यांनी केली.

मुळीक म्हणाले, ‘अती पावसाच्या कालावधीत नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू नये आणि त्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय साधावा याची दक्षता घेणे आवश्यक आहे. महापालिकेच्या विविध विभागात पोलीस प्रशासन पुणे महानगर परिवहन महामंडळ स्मार्ट सिटी यातील समन्वय महत्त्वाचा आहे.’
मुळीक पुढे म्हणाले, ‘पावसाचे पाणी साठण्याची संभाव्य ठिकाणे, रस्त्यात पडणारे खड्डे, पाण्याचा निचरा होण्याचे मार्ग, मोठे नाले, पुरामुळे बाधीत होणारे परिसर, निवारा यांची संख्या, साधन सामग्री आदींबाबत तातडीचे नियोजन होणे आवश्यक आहे.’

यावेळी जगदीश मुळीक, प्रदेश उपाध्यक्षा वर्षा तापकीर, सरचिटणीस गणेश घोष, उपाध्यक्ष गणेश कळमकर, माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे, सुशिल मेंगडे यांच्यासह मंडल अध्यक्ष व नगरसेवक उपस्थित होते.

CM Mets PM | केंद्राच्या भक्कम पाठिंब्याने राज्याचा विकास साधणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Categories
Breaking News Political देश/विदेश महाराष्ट्र

केंद्राच्या भक्कम पाठिंब्याने राज्याचा विकास साधणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवी दिल्ली  : राज्याच्या प्रगतीत केंद्र शासनाच्या सहकार्याची महत्वाची भूमिका असून केंद्राच्या भक्कम पाठिंब्याने महाराष्ट्राचा सर्वतोपरी विकास साधणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या दिल्ली भेटीवर असून त्यांनी राष्ट्रपतींसह केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतल्या. याविषयी माहिती देण्यासाठी महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार परिषदेत  शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, सर्वसामान्य जनता, शेतकरी व समाजाच्या सर्व घटकांच्या विकासासाठी आम्ही सरकार स्थापन केले आहे. हे सरकार राज्यातील सर्व घटकांच्या हितांची जपणूक करण्यासाठी कार्यरत राहील व यासाठी केंद्रशासनाच्या सहकार्याची आवश्यकता आहे. म्हणूनच सरकार स्थापनेनंतर शिष्टाचाराप्रमाणे राष्ट्रपती , प्रधानमंत्री व केंद्रीय मंत्र्यांच्या सदिच्छा भेटी घेण्यासाठी उपमुख्यमंत्र्यासह दिल्लीत आलो असल्याचे त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्राच्या विकासाबाबतचा दृष्टीकोन समजून घेऊन केंद्राच्या सहकार्याने राज्याला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील राहील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

राष्ट्रपती, प्रधानमंत्री यांची सदिच्छा भेट घेतली

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शुक्रवारी सायंकाळी दिल्लीत दाखल झाले. त्यांनी रात्री केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांची 6 ए, कृष्ण मेनन मार्ग या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. आज सकाळी त्यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची 17 अकबर रोड या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. दुपारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची 7 ,लोक कल्याण मार्ग या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

Smart city | pune | काय ते रस्त्यावरचे खड्डे… काय ती स्मार्ट सिटी .. एकदम ओके…

Categories
Breaking News PMC Political पुणे

काय  ते  रस्त्यावरचे खड्डे… काय  ती  स्मार्ट  सिटी .. एकदम  ओके…

कॉंग्रेसची भाजपवर उपहासात्मक टीका

पुण्यात खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे.  पुण्यातील बऱ्याच रस्त्यांवर  मोठमोठे खड्डे पाहण्यास मिळत आहेत. जीव मुठीत घेऊन वाहन चालकांना आपले वाहन चालवावे लागत आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस संजय बालगुडे यांनी पुणे करांच्या वतीने आपली चिन्ता कट आऊटच्या द्वारे व्यक्त केली आहे.
पुणे शहर २०१७ ते २०२२ .
” काय ते रस्त्यावरचे खड्डे … काय ती घरपट्टीत वाढ … काय ती पाणीपट्टीत वाढ … काय ती स्मार्ट सिटी … काय तो कोट्यावधींचा घोटाळा … एकदम ओके “. 
असे या कट आऊट वर  उल्लेख करण्यात आले.  पुणे शहरातील प्रमुख रस्त्यांवर कट आऊट लावण्यात आले आहेत.

Voter List | PMC Election | प्रारुप मतदार याद्या राष्ट्रवादीच्या दबावाखाली | भाजपचा आरोप 

Categories
Breaking News PMC Political पुणे

प्रारुप मतदार याद्या राष्ट्रवादीच्या दबावाखाली

| भाजपचा आरोप

आगामी निवडणुकांसाठी जाहीर केलेल्या प्रारूप मतदार याद्या महापालिका प्रशासनाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावाखाली तयार केल्याचा आरोप भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केला.

प्रारुप मतदार यादीतील त्रुटी आणि घोळांबाबत मुळीक यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन चर्चा केली. महापालिका निवडणुकीच्या मतदार याद्या तपासणीसाठी आणि दुरुस्तीसाठी मुदतवाढ मिळावी, मतदार याद्यांमधील त्रुटी दूर कराव्यात अशा मागण्या केल्या. अन्यथा न्यायालयात दाद मागावी लागेल. असा इशारा दिला.
मुळीक म्हणाले, महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी महापालिका प्रशासनाने दिनांक 23 जून 2022 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. ती करताना एका प्रभागातील मतदार दुसर्‍या प्रभागात टाकणे काही याद्या गायब होणे, असे धक्कादायक प्रकार समोर आले आहे. महापालिका हद्दी बाहेरील गावातील मतदारांचा पुणे महापालिकेच्या विविध प्रभागांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. मतदार याद्या बीएलओ कडून करून घेणे अपेक्षित असताना संबंध नसलेल्या लोकांकडून मतदार याद्या फोडल्या गेल्याने त्यात चुका झाल्या आहेत. विविध प्रभागांमधील चार ते पाच आणि दहा ते पंधरा मतदार याद्या दुसर्‍या प्रभागात जोडल्या गेल्या आहेत. 58 प्रभागांपैकी 17 प्रभागात लोकसंख्या कमी आणि मतदार संख्या जास्त असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. हे प्रमाण जवळपास 30 टक्के इतके आहे.

यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, वर्षा तापकीर,मा सभागृह नेते गणेश बिडकर, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येंनपुरे, दिपक पोटे, दिपक नागपुरे, सुशिल मेंगडे, प्रशांत हरसूले, मा.नगरसेवक योगेश मुळीक, मंजुषा नागपुरे, छाया मारणे, जयंत भावे, मंजुश्री खर्डेकर, राहूल भंडारे, सुनिता वाडेकर, गणेश कळमकर, तुषार पाटील, महेश गलांडे, पूनित जोशी, साचीन मोरे, महेश पुंडे, अनिता तलाठी, चंद्रकांत जंजिरे, सुनिल खांदवे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Assembly Speaker | विधानसभा अध्यक्ष पद | महाविकास आघाडीकडून राजन साळवी तर भाजप कडून राहूल नार्वेकर 

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

विधानसभा अध्यक्ष पद | महाविकास आघाडीकडून राजन साळवी तर भाजप कडून राहूल नार्वेकर

महाराष्ट्रात नवं सरकार आल्यानंतर राजकीय घडामोडींनी आणखी वेग धरला आहे. शिंदेंनी सत्तेत येताच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लावली. मविआ सरकार असताना नाना पटोले यांच्याकडे हे पद होतं. मात्र, त्यांना काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद मिळताच अध्यपदाची जागा रिक्त आहे. मागील सरकारची तीन अधिवेशनं उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वात पार पडली. मात्र आता नव्याने सरकार आल्यानंतर बहुमत चाचणी घेण्याआधीच ही निवडणूक लावण्यात आली आहे.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून आमदार राहुल नार्वेकर, तर मविआकडून राजापूरचे आमदार राजन साळवींना उमेदवारी देण्यात आली आहे.

New Government | MLA Sunil Kamble | आमदार सुनील कांबळे यांना मंत्रिपद! | चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

आमदार सुनील कांबळे यांना मंत्रिपद!

पुणे | उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याने भाजप एकनाथ शिंदे गटाला सोबत घेऊन सरकार बनवण्याच्या तयारीत आहे. लवकरच नवीन मंत्रिमंडळ अस्तित्वात येणार आहे. यामध्ये कॅंटोन्मेंट मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांना मंत्रिपद मिळू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर चंद्रकांत पाटील हे पुण्याचे पालकमंत्री होऊ शकतात, अशी चर्चा रंगली आहे.
आमदार सुनील कांबळे हे पुणे भाजपचे जुने नेते आहेत. तसेच त्यांनी नगरसेवक पदी निवडून येण्याचा देखील विक्रम केला आहे. आमदार होण्या अगोदर ते स्थायी समितीचे अध्यक्ष होते. कॅंटोन्मेंट मध्ये आपल्या कामामुळे नेहमी निवडून येतात. खास करून मागासवर्गीय समाजात त्यांना मानणारा वर्ग आहे. याचाच फायदा कांबळे यांना नवीन मंत्रिमंडळात होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण भाजपच्या आमदारांमध्ये मागासवर्गीय आमदार कमी आहेत. कांबळे आणि उमरखेड चे नामदेव ससाणे ही ती नावे आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्याला जर पद द्यायचे असेल आणि मागासवर्गीय समाजाचा प्रतिनिधी म्हणून सुनील कांबळे यांना सामाजिक न्याय मंत्री पद दिले जाऊ शकते. असा कयास व्यक्त केला जात आहे. दिलीप कांबळे यांना देखील हे पद देण्यात आले होते. त्यावेळी गिरीश बापट हे पुण्याचे पालकमंत्री होते. त्यामुळे पुणे परिसरातून तशी मागणी देखील होत आहे.

चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री

मात्र दुसरीकडे अशीही चर्चा आहे कि चंद्रकांत पाटील हे पुण्याचे पालकमंत्री होऊ शकतात. त्यांनाही मंत्रिमंडळात स्थान दिले जाऊ शकते. त्यामुळे पुणे शहरातील या दोन आमदारापैकी कुणाला मंत्री पद मिळणार आणि कुणाला पुण्याचा पालकमंत्री करणार याकडे लक्ष लागले आहे. कारण पुण्याकडे सर्वांचे लक्ष असते. आता आगामी काळात महापालिका निवडणूका येऊ पाहताहेत. त्यामुळे पुणे आणि पिंपरी महापालिकेवर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी पालकमंत्र्यांची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे.

MLC Election | BJP Pune | विधानपरिषद निवडणूक |  भाजपचा विजयी जल्लोष

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

विधानपरिषद निवडणूक |  भाजपचा विजयी जल्लोष

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वरील विश्वास, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे यशस्वी नेतृत्व, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची समर्थ साथ, भाजपवरील जनतेचा विश्वास, भाजपचे विकासाचे धोरण, सुशासन आदीचा हा विजय असून, आघाडी सरकारच्या अंधकारमय कारभाराला सुरूंग लावून विकासाची मशाल पेटविणारा हा विजय असून, राज्यसभेपाठोपाठ विधानपरिषदेत पाचही जागांवर मिळविलेला विजय हा देवेंद्रजींची कमाल असल्याचे मत भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी व्यक्त केले.

विधान परिषदेतील यशानंतर शहर भाजपच्या वतीने आज महापालिकेसमोरील पक्षाच्या कार्यालयासमोर शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी मुळीक बोलत होते. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, प्रदेश चिटणीस धीरज घाटे, सरचिटणीस राजेश येनपुरे, गणेश घोष, प्रमोद कोंढरे, रविंद्र साळेगावकर, धनंजय जाधव, निहाल घोडके, चंद्रकांत पोटे, सुशील मेंगडे, अजय खेडेकर, दत्तात्रय खाडे, संदीप लोणकर, गणेश कळमकर, आरती कोंढरे, गायत्री खडके, अन्वर पठाण, संदीप काळे, अजय दुधाणे उपस्थित होते.

मुळीक म्हणाले, राज्यसभेनंतर विधान परिषद निवडणुकीत विजयाची किमया करणारे देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढविला असून, स्वबळावर म्हणजे काय याचा राजकारणात अर्थ शिकविला. अन्य पक्षाच्या नेत्यांनी आत्मपरिक्षण करावे, ज्यांना स्वत:चे आमदार सांभाळता येत नाही, त्यांनी आता न बोललेच बरे राहिल.

President Election | राष्ट्रपती निवडणूक : विरोधी पक्षाकडून यशवंत सिन्हा उमेदवार 

Categories
Breaking News Political देश/विदेश

राष्ट्रपती निवडणूक : विरोधी पक्षाकडून यशवंत सिन्हा उमेदवार 

येत्या 18 जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी निवडणूक पार पडणार असून, यासाठी सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. या दरम्यान, आज विरोधी पक्षांच्या पार पडलेल्या बैठकीमध्ये विरोधी पक्षाकडून राष्ट्रपती पदासाठी यशवंत सिन्हा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे, अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी दिली आहे.

या बैठकीला जयराम रमेश, सुधींद्र कुलकर्णी, दीपंकर भट्टाचार्य, शरद पवार, डी राजा, तिरुची शिवा (डीएमके), प्रफुल्ल पटेल, येचुरी, एनके प्रेमचंद्रन (आरएसपी), मनोज झा, मल्लिकार्जुन खर्गे, रणदीप सुरजेवाला, हसनैन मसूदी (नॅशनल कॉन्फरन्स) यांच्यासह अभिषेक बॅनर्जी आणि राम गोपाल यादव हेही या बैठकीला उपस्थित होते. याशिवाय या बैठकीला ओवैसी यांच्या पक्षाचे खासदार इम्तियाज जलीलही उपस्थित होते. गेल्या बैठकीत AIMIM ला बोलावण्यात आले नव्हते. त्यामुळे बैठकीला उपस्थित राहिलो नसल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी यशवंत सिन्हा यांनी सकाळी ट्वीट करत ‘तृणमूल काँग्रेसमध्ये मला सन्मान आणि प्रतिष्ठा दिल्याबद्दल ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचे आभार मानले होते. आता माझ्यावर पक्षापासून फारकत घेऊन मोठ्या राष्ट्रीय हेतूसाठी, विरोधी ऐक्यासाठी काम करण्याची वेळ आलीय. मला खात्री आहे की, ममता बॅनर्जी माझं हे धोरण स्वीकारतील अशा आशयाचं ट्वीट सिन्हा यांनी केले आहे.

MLC Election | विधान परिषद निवडणूक निकाल | मविआला धक्का; भाजपाची बाजी

Categories
Breaking News Political देश/विदेश महाराष्ट्र

विधान परिषद निवडणूक निकाल | मविआला धक्का; भाजपाची बाजी 

दोन तासांच्या विलंबानंतर विधान परिषदेच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर आता पहिल्या फेरीचा निकाल हाती आला आहे. यामध्ये भाजपचे सर्वच्या सर्व 5 उमेदवार विजयी झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) 2 शिवसेनेचे (Shivsena) 2 आणि काँग्रेसचा एक उमेदवार विजयी झाले आहेत.

 

भाजपचे उमेदवार प्रविण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे, प्रसाद लाड हे विजयी झाले आहेत. तर शिवसेनेचे उमेदवार सचिन अहिर आणि आमश्या पाडवी हे विजयी झाले आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसेही विजयी झाले आहेत. तसेच काँग्रसेचे भाई जगताप विजयी झाले आहे. मात्र, पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा या निवडुकीत पराभव झाला आहे.

 मतमोजणीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कोट्यातील एक मत बाद ठरवण्यात आले होते. तर, त्यानंतर मविआने भाजपच्या उमा खापरे यांच्या कोट्यातील एका मतावर आक्षेप घेतला होता. भाजपकडून रामराजे यांच्या निंबाळकरांच्या कोट्यातील एका मतावर आक्षेप घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी ट्वीट केले होते. यामध्ये त्यांनी भाजपकडून खोट्या बातम्या पेरायला सुरुवात. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कोट्यातील मत बाद झाल्याची बातमी खोटी. भाजपकडून संभ्रम निर्माण करायला सुरुवात असे म्हणत भाजपवर हल्लाबोल केला होता.मुक्ता टिळक अन् लक्ष्मण जगताप यांच्या मतदानावर काँग्रेसचा आक्षेप सकाळी मतदानावेळी काँग्रेसकडून भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर आक्षेप घेण्यात आला होता. मुक्ता टिळक जगताप यांची मतदान पत्रिका दुसऱ्या कोणीतरी मतपेटीत टाकल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. तसेच मतदानावेऴी दोन सहकारी उपस्थित असल्याचाही आरोप करत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. काँग्रेसकडून निवडणूक आयोगाला ईमेलद्वारे ही तक्रार करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना  फडणवीसांनी मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांचे आभार देखील यावेळी त्यांनी मानले, पाचव्या उमेदवारासाठी आमच्याकडे एकही मत नव्हतं, तरीही आम्ही कॉंग्रेसच्या दोन्ही उमेदवारांपेक्षा जास्त मतं घेतली असे फडणवीस यावेळी म्हणाले. या निकालानंतर महाराष्ट्रात परिवर्तनाची नांदी पाहायला मिळाली असे ते म्हणाले, या सरकारच्या विरोधातील असंतोष समोर आला आहे, यापुढे असाच संघर्ष सुरू राहील आणि लोकाभिमुख सरकार आणल्यानंतरच तो थांबेल असे देखील फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, चमत्कार मी मानत नाही, असंतोष मतांमध्ये परिवर्तीत झाला आहे. तो वाढत राहीला तर काय होऊ शकतो तेच या निकालाने दाखवून दिलं असे फडणवीस म्हणाले. कोणाची किती मतं फुटली ते आम्हाला माहिती आहे, मी सगळ्या आमदारांचे आणि अपक्षांचे आभार मानतो ज्यांनी आमचे पाच उमेदवार निवडून आणले. आमचा संघर्ष जनतेसाठी आहे सत्तेसाठी नाही असे देखील फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

Shivsena | CM Uddhav Thackeray | वर्धापन दिन साजरा करताना मुख्यमंत्री ठाकरे काय म्हणाले? 

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

शिवसेनेचा आज ५६वा वर्धापन दिन साजरा होत आहे. पण विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हॉटेल वेस्टइन इथं शिवसेनेचे आमदार वास्तव्यास आहेत. त्यामुळं याच हॉटेलमध्ये हा सोहळा घेण्याचं शिवसेनेनं निश्चित केलं होतं. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

मुख्यमंत्री ठाकरे काय म्हणाले? 

विधानपरिषदेसाठी  पाडवी आणि सचिन अहिर यांना आंधळेपणाने उमेदवारी दिली नाही, त्यांनी शिवेसनेसाठी काम केलंय. त्यांनी मोठी भूमिका पार पाडली आहे. शिवसेनेने नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.

उद्याच्या निवडणुकीत आमच्यात फुट पडणार नाही. तुम्ही जरी देशात काहीतरी केलं तर इथल्या जनतेला कळतं. प्रत्येकाला पर्याय असतो. शेराला सव्वाशेर असतोच. महाराष्ट्रात सत्तेचा माज चालत नाही हे उद्या दाखवून द्या, महाराष्ट्र पेटला तर एखाद्याला खाक केल्याशिवाय राहत नाही हे लक्षात असू द्या.

भाडोत्री सैन्य हा काय प्रकार आहे, तुम्हाला भाडौत्री सैन्या पाहिजे असतील तर सगळंच भाड्याने आणा ना. त्यासाठी टेंडरही काढा. अग्निपथ योजना म्हणजे मृगजळ आहे. ही योजना उद्या तरूणांच्या अंगावर आली तर कोण झेलेल?

जी वचन पाळता येतील अशी वचनं जनतेला द्या. अग्निवीरांच्या नावाखाली तुम्ही तरूणांच्या आयुष्याशी खेळत आहात.

ह्रदयात राम आणि हाताला काम असं चित्र सध्या दिसतंय, हाताला काम नसेल तर नुसतं राम राम म्हणून काही होणार नाही. शिवसेनेने दिलेले वचन पाळले म्हणून आजही शिवसेना टिकून आहे. अग्निपथ मुद्द्यावरून तरूणांची माथी कुणी भडकावली?

शिवसेनेचा जन्म भूमीपुत्रांना न्याय देण्यासाठी झाला होता. हिंदुत्वाचा नारा शिवसेनेने आणि बाळासाहेबांनी बुलंद केला.

उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हटल्यानंतर समोरचा माणूस आदराने उभा राहतो, हा सन्मान कुणी काढून घेऊ शकत नाही, तो मान मला बाळासाहेबांनी दिला आहे. ज्याच्याकडे धाडस नसतं त्याच्याकडे काहीच नसतं.

विधानपरिषदेसाठी एकही मत फुटलेलं नाही. कारण शिवसेनेमध्ये असं गद्दार कुणी राहिलं नाही. शिवसेना या फाटाफुटीच्या राजकारणात उभी राहिली आहे. आईचं दुध विकणारा नराधम मला शिवसेनेत नको असं शिवसेनाप्रमुख म्हणाले होते.

आपला रमेश गेला. तो कट्टर कार्यकर्ता होता. अशा कट्टर कार्यकर्त्यामुळेच शिवसेना उभी आहे.

: आज आमदारांना या हॉटेलमध्ये आपण बडदास्त ठेवलीए यालाच लोकशाही म्हणतात. आपल्याच आमदारांना एकत्र ठेवणं ही आजची लोकशाही असेल. उद्याच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत ते चांगल्यापद्धतीनं दिसलं पाहिजे.

मार्मिकच्या प्रिंटिंगला बंदी होती पण तो छापून घेऊन तो बाजारात पोहोचवण्याचं काम दिवाकर रावतेंनी केलं. तसेच ८५ नंतरच्या काळात मार्मिक वर्तमानपत्राच्या स्वरुपात येणार होतं. त्यावेळी बाळासाहेबांनी सुभाष देसाई यांना माझ्यासोबत काम करण्यास सांगितलं. तेव्हापासून आम्ही जोडलो गेले. देसाई आणि रावते वयानं माझ्यापेक्षा मोठे पण शिवसेना नेता म्हणून मला मानून मी जे बोलेल हे आदेश समजून त्यांनी काम केलंय. तुम्ही निवृत्त झालात असं समजू नका.दिवाकर रावते आणि सुभाष देसाई यांच्यामध्ये तेव्हाचा शिवसैनिक आजही जिवंत आहे.

शिवसेनेच्या स्थापनेवेळी सहा वर्षाचा होतो. स्थापनेच्या वेळी फोडलेल्या नारळाचं पाणी अंगावर उडलं होतं. ती जबाबदारी खूप मोठी होती हे त्यावेळी मला माहिती नव्हतं.

माझा पक्ष पित्याने स्थापन केल्यामुळे पितृपक्षच आहे.

  • संजय राऊत काय म्हणाले?

  • मी जेव्हा अयोध्येला गेलो होतो तेव्हा इतक्या लोकांचा माझ्याशी संपर्क होत होता तेव्हा कोणाच्या मनात राग, द्वेष होत नव्हता. हिंदुत्वाच्या शिलेदाराचा नातू येतोय या भावनेतून लखनौपासून अयोध्येपर्यंत सर्वांनी आमचं स्वागत केलं. त्यामुळं आपल्याला घाबरायचं कारण नाही. शिवसेना विचार असाच तेजानं फडकत राहिल. आज जे सर्व लोक पीर पीर आणि टीर टीर करत आहेत हे सर्वजण भविष्यात शिवसेनेच्या पायाशी येतील. आम्ही ईडीला घाबरत नाही, शिवसेनेच्या पायाशी याल तर तुडवले जाल. शिवसेनेची स्थापना अग्नितून झाली आहे. मोदी सरकारच्या निर्णयामुळं देशात अराजक निर्माण झालं आहे. महाराष्ट्र शांत यासाठी आहे कारण राज्याची सूत्र उद्धव ठाकरेंच्या हाती आहेत तोपर्यंत महाराष्ट्र शांत आहे. अग्निवीर काय असतं, सैन्य पोटावर चालतं हे आम्हाला माहिती होतं. चार वर्षांचं कंत्राट जगाच्या पाठीवर असा मुर्ख निर्णय कोणी घेतला नाही. तुम्ही एक जागा जिंकली तर जग जिंकलं असं होत नाही, तुम्हारा घमंड तो चार दिन की है पगले.. शिवसेनेची बादशाही खानदानी आहे. आज फादर्स डे आहे पण शिवसेनाप्रमुख हे हिंदुत्वाचे फादर आहेत.