Panshet Flood Victims |भाजपकडून पानशेत पुरग्रस्तांवर नऊ वर्षांपासून अन्यायच ; निवडणुकीच्या भितीपोटी काढला आदेश | मोहन जोशी

Categories
Breaking News Political social पुणे

Panshet Flood Victims |भाजपकडून पानशेत पुरग्रस्तांवर नऊ वर्षांपासून अन्यायच ; निवडणुकीच्या भितीपोटी काढला आदेश | मोहन जोशी

Panshet Flood Victims | “पानशेत पूरग्रस्तांना (Panshet Flood Victims) ते राहात असलेल्या जागा त्यांच्या मालकीची करुन देण्यासाठी काँग्रेस पक्षाने (Congress Party) २०१४ मध्ये निर्णय घेतला होता. परंतु, भाजप सरकारने (BJP Government) ९ वर्षे त्याची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे पानशेत पुरग्रस्तांवर भाजप सरकारने अन्यायच केला आहे.” अशी टिका प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी (Mohan Joshi) यांनी केली. (Panshet Flood Victims)

याविषयी जोशी म्हणाले, “पानशेत पुरग्रस्तांचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित आहे. पुरग्रस्त राहात असलेली घरे त्यांच्या मालकी हक्काने देण्यासाठीचा प्रश्न होता. काँग्रेस पक्षाने या प्रश्नाची दखल घेत पाठपुरावा केला होता. त्यामुळे विकास देशमुख हे जिल्हाधिकारी असताना पुरग्रस्तांच्या बैठ्या घरांमधील रहिवाशांना जागेचा मालकी हक्क देण्याचा निर्णय घेण्यात आला होता व तशी प्रमाणपत्रे देखील देण्यात आली होती. त्यानंतर पुरग्रस्त १०३ सोसायट्यांना देखील मालकी हक्क मिळावा, त्यांच्यासंबंधीच्या तांत्रिक अडचणी सोडविण्यात याव्यात, यासाठी मी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यामुळे २०१४ मध्ये तत्कालीन महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पुरग्रस्त सोसायट्यांमधील रहिवाशांना जागा त्यांच्या मालकी हक्काने देण्याचा निर्णय घेतला होता.” असे मोहन जोशी म्हणाले. (Pune News)

पुरग्रस्तांवर भाजपने अन्याय केला असल्याची टिका करत मोहन जोशी पुढे म्हणाले, “२०१४ मध्ये राज्यात सत्तांतर झाले. त्यानंतर भाजप सरकारने पानशेत पुरग्रस्तांसंबंधीच्या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करणे गरजेचे होते. मात्र तसे घडले नाही. नऊ वर्ष भाजप सरकारने पानशेत पुरग्रस्तांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार केला आहे. नऊ वर्ष निर्णयाची अंमलबजावणी न करता पुरग्रस्तांवर अन्याय केला आहे. कसबा विधानसभा निवडणूकीमध्ये काँग्रेस विजयी झाल्यामुळे भाजपला आपली चुक कळली आहे, त्यामुळे भविष्यातील निवडणुकांमध्ये आपल्याला पुरग्रस्तांचा चांगलाच फटका बसू शकतो, हे लक्षात आल्यामुळेच त्यांनी आता पुरग्रस्तांबाबत तातडीने आदेश दिले आहेत. मात्र अशा प्रकारे भाजपने नऊ वर्ष पुरग्रस्तांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्याचा केलेला प्रकार दुर्दैवी आहे.” असे मोहन जोशी म्हणाले.

याची पार्श्वभूमी सांगताना मोहन जोशी म्हणाले की, पुण्यात पानशेत धरण फुटण्याची घटना १२ जुलै १९६१ या दिवशी घडली. त्यामुळे आलेल्या पुरामध्ये पुण्याच्या मध्यवर्ती भागातील हजारो कुटुंबीयांची घरे, दुकाने पुराच्या पाण्यात गेली. त्यामुळे तत्कालीन सरकारने पुरग्रस्तांसाठी दत्तवाडी, राजेंद्रनगर, पर्वती दर्शन, सहकारनगर, शिवदर्शन, एरंडवणे, जनवाडी, गोखलेनगर, महर्षीनगर अशा ठिकाणी घरे बांधून दिली होती. संबंधित घरे ९९ वर्षांच्या कराराने भाडेतत्वावर देण्यात आली होती. मात्र हि घरे मालकी हक्काने मिळावीत यासाठी पुरग्रस्त नागरीक लढा देत होते. आता काँग्रेसने घेतलेल्या निर्णयाची भाजप सरकारने तब्बल ९ वर्षांनी अंमलबजावणी केली हेही नसे थोडके! असे मोहन जोशी शेवटी म्हणाले.


News Title |Panshet flood victims from BJP have been unjust for nine years; The order issued due to the fear of elections Mohan Joshi

Pune News | Mohan Joshi | पुणेकरांनी भाजपला खूप काही दिले; पण भाजपने शहराला काय दिले? | मोहन जोशी यांचा भाजपला सवाल 

Categories
Breaking News Political पुणे

Pune News | Mohan Joshi | पुणेकरांनी भाजपला खूप काही दिले; पण भाजपने शहराला काय दिले?

| मोहन जोशी यांचा भाजपला सवाल

Pune News | Mohan Joshi | पंतप्रधान मोदी (PM Modi) यांची नऊ वर्षाची कारकीर्द धुमधडाक्यात साजरी केली जात आहे. नवा भारत नवी संसद याचे नारे दिले जात आहेत पण काँग्रेसचा (Pune congress) शहर भाजपाला (Bjp Pune) यानिमित्त एकच प्रश्न आहे तो म्हणजे पुणेकरांनी तुम्हाला भरपूर दिले पुणे शहराला तुम्ही काय दिले? महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष माजी आमदार  मोहन जोशी (Mohan Joshi) यांनी काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी जोशी यांनी हा सवाल केला आहे. (Pune News)
जोशी म्हणाले, दोन खासदार, 5 विधानसभा मतदारसंघात आमदार महानगरपालिकेत 98 नगरसेवक केंद्रात राज्यात आणि मनपात एक हाती सत्ता. पुणेकरांनी उदार मनाने इतके राजकीय यश दिले, त्या बदल्यात पुणे शहराच्या पदरी काय पडले? फक्त भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी.  केंद्र सरकारने जायका,  समान पाणीपुरवठा, मेट्रो, स्मार्ट सिटी,  पंतप्रधान आवास योजना आणखी काही योजना जाहीर केल्या त्या कागदावर आहेत.  (Pune Congress)
जोशी पुढे म्हणाले, महापालिकेची सत्तेची पाच वर्षे निव्वळ भ्रष्टाचारात गेली हे. सर्व पुणे शहराने पाहिले त्या भ्रष्टाचाराच्या भीतीने आता भाजप महानगरपालिकेच्या निवडणुका घ्यायला तयार नाही. घरपट्टीत महापालिकेने ठराव करून घेतलेली नागरिकांना दिलेली ४० टक्के सवलत यांनी काढून घेतली. वसुली लावली ती सुद्धा चार वर्षापासून. वीस ते बावीस हजार रुपयांच्या बोजा साधे घर असणाऱ्यापर्यंत पडत होता. याबाबत आंदोलने करावी लागली. तेव्हा कुठे परत निर्णय फिरवला. आमदार रवींद्र धंगेकर यांनी हा विषय विधिमंडळात मांडून या संदर्भात सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळवून दिला. (BJP Pune)
भ्रष्टाचारी लोक या शहरातील  नागरिकांचे गुन्हेगार आहेत. असा काँग्रेसचा आरोप आहे यांना सत्ता दिली ती स्वतःसाठी वापरली केंद्र सरकारची ९ वर्ष कसली साजरी करता महानगरपालिकेतल्या सत्तेतला पाच वर्षाचाकामचा  लेखा जोखा पुणेकरांना हिम्मत असेल तर द्या ? असे काँग्रेसने भाजपाला आव्हान दिले आहे.
जोशी म्हणाले, तेरा वर्षाच्या  कांग्रेस पक्ष च्या  प्रयत्नांमुळे 2013 रोजी मेट्रो मंजूर झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २४ डिसेंबर 2016 रोजी पुणे मेट्रोची पायाभरणी केली. तब्बल सहा वर्षांनी पूर्ण झालेल्या गरवारे ते वनाज या छोट्या मार्गाचे पंतप्रधानांनी उद्घाटन केले. ३४.६ किमी चा मेट्रो प्रकल्प पूर्ण होण्यासाठी मोदींनी कोणतेही आग्रह केल्याचे  अजूनही ऐकिवात नाही. मोदीजींनी पुणेकरांना उत्तर द्यावे की अजूनही मेट्रो का सुरू होत नाहीये.
पंतप्रधान आवास योजना दुर्बल घटकांसाठी या योजनेतून सन 2022 पर्यंत मोफत घरे देण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे. योजनेअंतर्गत किती घरे बांधून दिली याची माहिती भाजपा का लपवत आहे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन, जाहिराती फोटो आणि बातम्या झाले की जणू विकास झाला असे भाजप दाखवते, पुण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घोषणांचा सुकाळ आहे. मात्र अंमलबजावणी चा दुष्काळ आहे. पुण्याची शैक्षणिक प्रगती लक्षात घेऊन मंजूर झालेले आयआयएम नागपूरला गेली. प्रकाश जावडेकर माहिती आणि नभोवाणी मंत्री असताना पुण्यातील नॅशनल फिल्म अर्किव ची स्वायत्तता संपली. दूरदर्शन केंद्र मराठी बातम्या आकाशवाणी याची स्वायत्तता संपली.
पत्रकार परिषद वेळी  काँग्रेसचे सरचिटणीस प्रवक्ते रमेश अय्यर, शहर कॉंग्रेस उपाध्यक्ष शाबीर खान, ओबीसी सेलचे अध्यक्ष प्रशांत सुरसे, शहर काँग्रेसचे चिटणीस चेतन अग्रवाल, प्रदेश प्रतिनिधी यशराज पारखे उपस्थित होते.
—-
News Title | Pune News | Mohan Joshi | The people of Pune gave a lot to the BJP; But what did the BJP give to the city?| Mohan Joshi’s question to BJP

Pune Lok Sabha By-election | पुणे लोकसभा पोटनिवडणूक | आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता तरीही अजित पवारांना का हवीय पुण्याची जागा? 

Categories
Breaking News Political पुणे

Pune Lok Sabha By-election | पुणे लोकसभा पोटनिवडणूक | आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता तरीही अजित पवारांना का हवीय पुण्याची जागा?

Pune Lok Sabha By-election | राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुणे लोकसभा मतदारसंघातील (Pune Lok Sabha  constituency) राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) ताकदीचा हवाला देत दावा केला आहे कि पुणे लोकसभेची जागा आम्ही लढवणार.  पुण्याची लोकसभेची जागा परंपरेनुसार काँग्रेसनेच (INC)  लढवली आहे. त्यामुळे अजित पवारांचे हे वक्तव्य राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीतील (Mahavikas Aaghadi) साथीदाराला फारसे पटण्याची शक्यता नाही. त्यामुळे आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता मानली जात आहे. (Pune Lok Sabha By-election)
 पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार  गिरीश बापट (MP Girish Bapat) यांच्या निधनाने ही जागा रिक्त झालेली आहे. मात्र राष्ट्रवादीने यावर दावा केला आहे. याआधी देखील पुणे राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप (NCP pune City President Prashant Jagtap) यांनी पुण्याच्या जागेवर दावा केला होता.   महाविकास आघाडीत  – राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना (UBT) हे पक्ष आहेत.  काँग्रेस परंपरेने पुणे लोकसभेची जागा लढवत आहे आणि पवारांच्या विधानामुळे युतीमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे. (Pune Lok Sabha bypoll)
अजित पवार म्हणाले कि, “माझे मत आहे की, निवडणुका जाहीर झाल्या की ज्या पक्षाची मतदारसंघात ताकद जास्त असेल त्याला तिकीट मिळाले पाहिजे.  आता कोणत्या पक्षाची ताकद जास्त आहे हे कसे ठरवायचे?  तुम्ही महापालिका निवडणुका, विधानसभा निवडणुकांमधील निवडणूक निकाल पहा आणि विश्लेषण केल्यास पक्षांची तुलनात्मक ताकद दिसून येईल.  पुणे लोकसभा मतदारसंघात आमचे अनेक आमदार आहेत आणि रवींद्र धंगेकर यांना तुम्ही खाजगीत विचाराल तर ते सांगतील की कसबा जिंकण्यासाठी राष्ट्रवादीने त्यांना खूप मदत केली,” (Pune Lok Sabha by-election)
 पुणे महानगरपालिकेत (Pune Municipal Corporation) मागील निवडणुकीत भाजपनंतर राष्ट्रवादी हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता, तर काँग्रेसची फारशी कामगिरी झाली नाही.  पुणे शहरातून काँग्रेसकडे फक्त एकच आमदार आहे, तर राष्ट्रवादीने मागील निवडणुकीत दोन विधानसभा जागा जिंकल्या होत्या.
 पवार म्हणाले की, सार्वत्रिक निवडणुकीला कमी अवधी असल्याने पोटनिवडणूक होऊ शकत नाही, असे आयोगाने यापूर्वी सांगितले होते, परंतु अलीकडच्या घडामोडींमुळे त्यांचे मत बदलले आहे.  “माझ्या मते सार्वत्रिक निवडणुकांना फक्त एक वर्ष उरले आहे, त्यामुळे पुणे लोकसभा जागेसाठी पोटनिवडणूक होणार नाही.  पण आता मला अंतर्गत वर्तुळातून असे कळले आहे की निवडणुका जाहीर होण्याची तयारी सुरू आहे,” (NCP Leader Ajit Pawar)
 पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. तर पक्षाचे ज्येष्ठ नेते दीपक मानकरही नशीब आजमावण्यास इच्छुक आहेत.  दुसरीकडे काँग्रेसने ही जागा लढवावी, असा आग्रह धरला आहे.  या जागेसाठी काँग्रेस नेते अरविंद शिंदे (Arvind Shinde) , मोहन जोशी (Mohan Joshi) आणि रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) हे मोजकेच दावेदार आहेत.
 “निवडणुकीबाबत कोणताही निर्णय उच्च पातळीवर घेतला जातो.  आम्ही राज्यातील नेत्यांना आधीच कळवले आहे की काँग्रेस पुणे लोकसभेची जागा लढवणार आहे. कारण पुणे जिल्ह्यातील उर्वरित लोकसभेच्या सर्व जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवत आहे,” असे एका काँग्रेस नेत्याने सांगितले. (Ajit Pawar)
 पुणे लोकसभा पोटनिवडणूक लवकरच जाहीर होऊ शकते, या संकेतावर जिल्हा निवडणूक कार्यालयाने नुकतेच मॉक पोलिंग केले.  पुणे महानगरपालिकेने निवडणूक ड्युटीवर असलेल्या 120 नागरी अधिकार्‍यांना देखील मॉक पोलमध्ये उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते.  गैरहजर असलेल्यांना शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल. असाही इशारा महापालिकेने दिला होता. (Pune Lok Sabha bypoll mock polling)
 बापट यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपायला एक वर्ष बाकी असताना या वर्षी २९ मार्च रोजी निधन झाले.  काँग्रेसचे मोहन जोशी यांचा पराभव करून मे 2019 मध्ये ते लोकसभेवर निवडून आले होते.  कायद्यानुसार लोकसभेची जागा सहा महिन्यांपेक्षा जास्त रिक्त राहू शकत नाही. (MP Girish Bapat)
 संभाव्य पुणे लोकसभा पोटनिवडणुकीची बरीच उत्सुकता आहे. कारण सार्वत्रिक निवडणुकांना फक्त एक वर्ष बाकी आहे आणि पोटनिवडणुकीचा निकाल 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीचा कल निश्चित करेल.  नुकत्याच झालेल्या कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या धंगेकरांनी भाजपच्या बालेकिल्ल्यात भाजपचे हेमंत रासने  यांचा पराभव केला होता.  भाजपने मागील सहा निवडणुकांमध्ये जागा जिंकून पुण्याच्या राजकारणावर आपली पकड सिद्ध करण्यासाठी पोटनिवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती.  भाजपच्या विद्यमान आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पोटनिवडणूक झाली होती. (Pune Lok Sabha constituency)
—-
News Title | Pune Lok Sabha By-election | Pune Lok Sabha By-Election | Why does Ajit Pawar want the seat of Pune despite the possibility of failure in the alliance?

Pune News | पुण्यातील वाड्यांचा विकास होणे अवघड | भाजपा ने पुणेकरांवर सूड उगवला 

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Pune News | पुण्यातील वाड्यांचा विकास होणे अवघड | भाजपा ने पुणेकरांवर सूड उगवला

| कॉंग्रेस नेत्यांचा आरोप

Pune News | निवडणुकीत भाजपाने (BJP) आश्वासन दिले होते की जुन्या वाड्याचा (Old Wada) विकास करण्यासाठी आम्ही किमान 2 FSI करू. परंतु पुन्हा एकदा सरकारने पेठामध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केली आहे. त्यामुळे पुण्यातील वाड्यांचा विकास होणे अवघड झाले आहे. भाजपा ने पुणेकरांवर सूड उगवला आहे. असा आरोप कॉंग्रेस आमदार रविंद्र धंगेकर (Congress MLA Ravindra Dhangekar), कॉंग्रेस नेते मोहन जोशी (Mohan Joshi) आणि संजय बालगुडे (Sanjay Balgude) यांनी केला. (Pune News)

कॉंग्रेस नेत्यांनी दिलेल्या निवेदनानुसार पुणे शहराचा विकास आराखडा (Pune Devlopment Plan) सन 2013-14 मध्ये प्रकाशित झाला. त्या वेळेस शहरातला गावठाण भाग विशेषता पेठामध्ये बांधकामाला 1.5 FSI करण्यात आला होता. या विरोधात मोर्चा काढण्यात आला होता व सभागृहात तसेच राज्य सरकारने हरकती सूचना मागवल्या होत्या. त्यावेळेस पुण्यातील पेठामध्ये राहणाऱ्या नागरिकांवर अन्यायकारक आहे अशी हरकत व सूचना केली होती. पुण्यातील गावठाणात आलेले जुने वाडे व त्यात राहणारे नागरिक अक्षरश 60 ते70 स्क फूट घरात राहत आहेत, भाडेकरूंना पुनर्वसन करण्यासाठी व वाड्यांच्या विकास करायचा असेल तर 2.50 FSI द्यावा अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. (Pune Municipal Corporation)

सन 2015 मध्ये भाजप सरकारने मनपा कडून विकास आराखडा स्वतःच्या ताब्यात घेतला व तो प्रकाशित केला. परंतु त्यात सुद्धा पुणेकरांना गावठाण भागात 1.50 FSI. ठेवण्यात आला होता. त्यावर निवडणुकीत भाजपाने आश्वासन दिले होते की जुन्या वाड्याचा विकास करण्यासाठी आम्ही किमान 2 FSI करू.परंतु पुन्हा एकदा सरकारने पेठाया मध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केली आहे. त्यामुळे पुण्यातील वाड्यांचा विकास होणे अवघड झाले आहे. असा आरोप या नेत्यांनी केला आहे. (PMC Pune)

तसेच वाड्याचा व पेठामधील घरांचा विकासाला 1 मीटर साईड मार्जिन सोडावी लागणार असे समान विकास नियमावलीत (U.D.C.P.R) सन 2020 मध्ये नमूद करण्यात आले होते. याबाबत आपण 1 मीटरची अट रद्द करू असे आश्वासन भाजपाच्या नेत्यांनी अनेक वेळा दिली व कसबा पोटनिवडणुकीत सुद्धा दिले होते परंतु साईड मार्जिनची अट सुद्धा तशीच ठेवण्यात आली आहे. त्यामुळे जुन्या पुण्याचा विकास ठप्प होणार आहे. पुणेकरांनी भाजपा ला 100 नगरसेवक 4आमदार 1खासदार दिले. त्या बदल्यात  पुणेकरांवर भाजपाने सूड उगवला आहे. असा आरोप या नेत्यांनी केला आहे. (Pune News)


News Title | Pune News | It is difficult to develop palaces in Pune BJP took revenge on the people of Pune| Allegation of Congress leaders

Karnataka Election Results | कर्नाटकमधील कॉंग्रेसचा विजय ही २०२४ मधील केंद्रातील सत्तापालटाची नांदी | मोहन जोशी

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे

Karnataka Election Results | कर्नाटकमधील कॉंग्रेसचा विजय ही २०२४ मधील केंद्रातील  सत्तापालटाची नांदी  | मोहन जोशी

Karnataka Election Results | कर्नाटक विधानसभा निवडणुकीत (Karnataka Election) कॉंग्रेस पक्षाने (congress Party) निर्विवाद बहुमत संपादन केले ही २०२४च्या लोकसभा निवडणुकीतील सत्तापालटाची नांदी आहे. केंद्रातील अपयशी मोदी सरकार आणि कर्नाटकातील भारतीय  जनता  पक्षाचे  भ्रष्टाचारी व अकार्यक्षम सरकार यांविरुद्चा एकत्रित रोष कर्नाटकातील मतदारांनी मतपेटीच्या माध्यमातून व्यक्त केला हे या निकालावरून दिसून येते. असे प्रतिपादन प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Mohan Joshi) यांनी केले. (Karnataka Election Results)
जोशी म्हणाले, जनतेच्या खऱ्या   प्रश्नांच्या कडे दुर्लक्ष करीत केवळ धार्मिक उन्माद वाढविण्यावर भा ज पा ने भर दिला .धनसंपत्तीचा मोठा वापर केला.?मात्र , महागाई ,बेरोजगारी या बरोबरच महाभयानक भ्रष्टाचार याला विटलेला कर्नाटकातील  मतदार या धार्मिक उन्मादाला बळी पडला नाही. भ्रष्ट्राचारी जनविरोधी ,सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला सत्तेवरून दूर फेकले, त्याबद्दल कर्नाटकच्या जनतेला मी धन्यवाद देतो. त्या बरोबरच यु पी ए अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी ,कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे ,श्री.राहुल गांधी ,प्रियांका गांधी सर्व पदाधिकारी आणि कर्नाटक राज्यातील कॉंग्रेस नेते व कार्यकर्ते यांचे अभिनंदन करतो .
अखिल भारतीय कॉंग्रेस महासमितीने या निवडणुकीत चिकोडी लोकसभा मतदार संघातील आठ  विधानसभा मतदार संघांची जबाबदारी निरीक्षक म्हणून माझ्यावर सोपवली होती.गेले 2 महिने अधिकाधिक वेळ मी त्यासाठी दिला .या मतदार संघात आठ पैकी पाच मतदारसंघात कॉंग्रेस पक्ष विजयी झाला याबद्दल चिकोडी लोकसभा मतदार संघातील मतदारांचे मी विशेष आभार मानतो.
‘ऑपरेशन लोटस’चा विचारही भाजपा करू शकणार नाही .एव्ह्ढे घवघवीत यश कर्नाटकातील  मतदरांनी कॉंग्रेसला दिले आहे .कॉंग्रेस पक्ष हा विश्वास सार्थ ठरवेल हे निश्चित !असे ही जोशी म्हणाले.
——
Karnataka Election Results | Congress victory in Karnataka heralds a coup at the Center in 2024 Mohan Joshi

Shinde-Fadnavis Government | बेकायदेशीर शिंदे सरकारने राजीनामा द्यावा | मोहन जोशी

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

Shinde-Fadnavis Government | बेकायदेशीर शिंदे सरकारने राजीनामा द्यावा | मोहन जोशी

Shinde-Fadnavis Government | महाराष्ट्रातील सत्तापालटातून (Maharashtra Political Crisis) निर्माण झालेल्या प्रश्नांवर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme courth results) दिलेला निकाल हा ऐतिहासिक आहे. शिंदे गटाने प्रतोद नेमण्याचा निर्णय, राज्यपालांचा फ्लोअर टेस्ट बाबतचा निर्णय, बेकायदेशीर ठरून सर्वोच्च न्यायालयाने सत्तेसाठी अधीर बनलेल्या शिंदे – फडणवीस सरकारला मोठी चापराक दिली आहे. आता तरी या बेकायदेशीर सरकारने नैतिक जबाबदारी म्हणून त्वरित राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी महारष्ट्र प्रदेश कॉंग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Mohan Joshi) यांनी केली. (Maharashtra Political crisis News)

मोहन जोशी म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार पाडून शिंदे – फडणवीस सरकार आणण्यासाठी करण्यात आलेली कुटील कारस्थाने सर्वोच्च न्यायाल्यापुढे टिकू शकली नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे – फडणवीस सरकार आणि तत्कालीन राज्यपाल यांच्यावर कडक ताशेरे ओढले आहेत . अशावेळी हवालदिल झालेले शिंदे – फडवणीस सरकार या निर्णयाचे लंगडे समर्थन करीत सत्तेला चिकटून बसत आहेत ही लाजीरवाणी बाब आहे. जनता उघड्या डोळ्यांनी त्यांचा हा तमाशा बघत आहे. या बेकायदेशीर शिंदे – फडणवीस सरकारने जनाची नाही तर मनाची लाज बाळगून त्वरित राजीनामा द्यावा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शिंदे – फडणवीस सरकारच्या बेकादेशीर कृत्यांवर शिक्का मोर्तब झाले आहे. त्यामुळेच आता ,या सरकारने त्वरित राजीनामा दिलाच पाहिजे असे मोहन जोशी यांनी म्हटले आहे.

—-

Shinde-Fadnavis Government | The illegitimate Shinde government should resign Mohan Joshi

Mohan Joshi | कसब्यातील काँग्रेसच्या विजयामुळेच झुकला भाजप | मोहन जोशी

Categories
Breaking News PMC Political पुणे

कसब्यातील काँग्रेसच्या विजयामुळेच झुकला भाजप | मोहन जोशी

| प्रभू श्रीराम त्यांच्या नाही तर आमच्याच बरोबर

पुणे|  कसब्यातील विधानसभेच्या विजयानेच भारतीय जनता पक्षाला झुकवले आहे. काँग्रेसने प्रभू रामचंद्राला यासाठी साकडे घातले होते. ते मान्य झाले. श्रीराम त्यांच्या नाही तर आमच्याबरोबर आहे हे यावरूनच सिद्ध होत आहे अशा शब्दांमध्ये काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी घरपट्टीतील सवलत पुन्हा लागू करणाऱ्या राज्य सरकारला लक्ष्य केले.

जोशी म्हणाले, मुळातच ही सवलत काढून घेण्याचे काही कारण नव्हते. महापालिका स्वायत्त संस्था आहे. त्यांनी विशेष ठराव करून अनेक वर्षांपूर्वी ही सवलत लागू केली होती. पैसे कसे काढता येतील याच विचारात असलेल्या भाजप सरकारने ही सवलत वेगवेगळी कारणे दाखवत काढून घेतली. या कारणांचा निपटारा सरकारला त्यांच्या स्तरावर आधीच करता येणे शक्य होते. मात्र त्यांनी तसे केले नाही.

नागरिकांकडून ओरडा सुरू झाल्यानंतरही त्याकडे शिंदे फडणवीस सरकारने लक्ष दिले नाही. वारंवार आश्वासने दिली, मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी केली नाही. पुणेकर जनतेला फसवत राहिले.
महापालिका प्रशासनाने ही सवलत काढून घेतलेली बीले तर पाठवलीच, शिवाय त्यात ४ वर्षांपासूनची थकबाकीही दाखवली. साधी सदनिका असलेल्या कुटुंबांवरही यामुळे २० हजार रूपयांपेक्षा जास्त बोजा पडला.
काँग्रेसने या विरोधात सातत्याने आंदोलने केली. अखेर मंत्री मंडळाने ठराव केला, मात्र तरीही प्रशासन बधत नव्हते. मंत्री मंडळही मंजूर केलेल्या ठरावाची अंमलबजावणी व्हावी यासाठी उदासिन होते.

पालकमंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी तर या विषयाची माहिती नसल्यासारखे हात वर केले. काँग्रेसने अखेर प्रभू रामचंद्रांचरणी साकडे घातल्याचे आंदोलन केले. आता सरकारला सुबुद्धी आली व त्यांनी हा निर्णय अंमलात आणण्याविषयी महापालिकेला क‌ळवले. त्यामुळे या गोष्टीचे फुकटचे श्रेय भाजपच्या शहरातील एकाही नेत्याने घेऊ नये, हा पुणेकरांचा विजय आहे व त्यांनाच याचे खरे श्रेय आहे असे जोशी म्हणाले.

Book Distribution | “भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त २५ हजार पुस्तके वाटप “

Categories
Breaking News Education Political social पुणे

“भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त २५ हजार पुस्तके वाटप “

पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त माजी आमदार मोहन जोशी व आमदार रवींद्र धंगेकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले.

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानोपासक होते “ज्ञान ही शक्ती” आहे. यावर त्यांचा विश्वास होता यासाठी त्यांनी समाजाला शिका व *संघटित व्हा … वाचाल तर वाचाल…असा संदेश दिला. तरी आजची तरुण पिढी ही* *बाबासाहेबांच्या कार्याबद्दल अनभिद्य दिसून येते म्हणून तरुण वर्गाला या थोर समासुधारकांचे समाजासाठी केलेले त्यांचं कार्य समाजापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते या जयंती निमित्त आज या ठिकाणी 25000 पुस्तकांचा वाटप करीत आहोत “असे उदगार आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केले.

 

“भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला संविधान देऊन समतेची दिशा दिली. डॉ. बाबासाहब आंबेडकर हे केवळ दलितांचे नेते नव्हते ते संबंध राष्ट्राचे नेते होते, *ते युगकर्ते होते त्यांनी निर्माण केलेले युग हे सामान्य माणसाला लोकशाहीच्या क्षितिजावर उभे करणारे युग होते. असे प्रतिपादन मोहन जोशी यांनी केले*

यावेळी अनेक थोर समाज सुधारक ज्यांनी महाराष्ट्र राज्याला दिशा देणारे धोरण दिले यांच्या जीवनावरील २५ हजार पुस्तकाचे वाटप आमदार रवींद्र धंगेकर व मोहन जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मा. महापौर कमल व्यवहारे शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, विशाल धनवडे, लता राजगुरू, मा नगरसेविका सुशिला ताई नेटके, संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे, बाळासाहेब अमराळे,काँग्रेस ओ.बी.सी शहराध्यक्ष प्रशांत सुरसे,स वाल्मिकी जगताप, प्रियांका रणपिसे,चेतन आगरवाल, डॉ अनुपकुमार बेगी, चंद्रकांत चव्हाण, अस्लम बागवान, वाहिद बियाबनी, अविनाश अडसूळ, गेहलोत ताई, गोरख पळसकर, शिवानी माने, नरेश नलवडे , रुपेश पवार , राजेंद्र खेडेकर, किरण जगताप, अमित देवरकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन मा गणेश नवथरे यांनी केले.

Mahatma Phule | लेखणीने त्यांच्या दाखवली समतेची वाट, फुलेंच्या कार्याने उगवली परिवर्तनाची नवी पहाट – मोहन जोशी

Categories
Breaking News cultural Political पुणे महाराष्ट्र

लेखणीने त्यांच्या दाखवली समतेची वाट, फुलेंच्या कार्याने उगवली परिवर्तनाची नवी पहाट – मोहन जोशी

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त पुणे शहर काँग्रेस कमिटी ओ.बी.सी. विभागाच्या वतीने समता भुमी महात्मा फुले वाडा गंज पेठ येथे आयोजित कार्यक्रमात मा.आमदार मोहन (दादा) जोशी व आमदार रविंद्र धंगेकर यांच्या हस्ते महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले . कार्यक्रमाचेअध्यक्ष स्थानी शहराध्यक्ष प्रशांत सुरसे होते.

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून वंचित उपेक्षित, मागास वर्गीय समाजाला तसेच स्त्रियांना शिक्षणाचे दारे खुले करून आजच्या समाजाला आधुनिक उंचीवर नेऊन ठेवले आहे.
महात्मा फुले यांच्या दूरदृष्टीमुळेच महिला या आज सर्व क्षेत्रांमध्ये केंद्रबिंदू म्हणून अग्रस्थानी आहेत. त्याचे कार्य हे न विसरणारे अविस्मरणीय कार्य आहे. असे मनोगत मोहन जोशी यांनी व्यक्त केले.
यावेळी महात्मा फुले व डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे विविध पुस्तके मा.आमदार रविंद्र धंगेकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आली.

यावेळी शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, संजय बालगुडे, बाळासाहेब अमराले, शाबीर खान, आयुब पठाण, सुनिल पंडित, चेतन अग्रवाल, रवि पाटोले, सुरेश कांबळे, राजू देवकर,गणेश साळुंखे, दत्ता मांजरेकर, रुपेश पवार, अक्षय नवगिरे,फैजन अन्सारी, सौरभ अमराळे व पुणे शहर काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे सर्व पदाधिकारी उपस्थित उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन ओ.बी.सी. विभागाचे शहराध्यक्ष प्रशांत सुरसे यांनी केले.

Kumar Gandharva | पं. कुमार गंधर्व यांचे गायन मनाला प्रफुल्लीत करणारे | उल्हास पवार

Categories
Breaking News cultural social पुणे

पं. कुमार गंधर्व यांचे गायन मनाला
प्रफुल्लीत करणारे | उल्हास पवार

पुणे |  पं. कुमार गंधर्व यांच्या गायकीमध्ये असणारा भक्तीरस मनाला भावणारा आहे. त्यांची गायकी मनाची प्रसन्नता निर्माण करणारी आहे. अगदी लहान वयापासून त्यांनी आपल्या गायकीवर प्रभूत्व मिळवून आपल्या स्वराने श्रोत्यांवर पकड निर्माण केली. देशभरातून त्यांच्या कार्यक्रमाला मागणी वाढत गेली. त्यांच्या मैफलीत रंग चढत गेला. आजही त्यांचे गायन मनाला आनंद देत आहे, अशा या महान गायकाच्या जन्मशताब्दी वर्षपूर्तीचा प्रारंभ पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात माजी आमदार मोहन जोशी यांच्या पुढाकाराने होत आहे ही आनंदाची बाब आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व माजी आमदार उल्हासदादा पवार यांनी केले.

ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर, भेंडीबाजार अशा सर्व घराण्यांचे सार काढून नवीनच गायकी निर्माण करणारे पद्मविभूषण कै. पं. कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दी वर्ष प्रारंभ दिनानिमित्त शनिवार दि. ८ एप्रिल रोजी पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषद येथे कला क्रीडा केंद्राचे अध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी यांच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. यावेळी मंचावर ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. डॉ. मोहनकुमार दरेकर, पं. राजेंद्र कंदलगांवकर, मीनाताई फातर्पेकर, आयोजक मोहन जोशी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कै. पं. कुमार गंधर्व यांच्या प्रतिमेचे पूजन करुन दीपप्रज्वलन करण्यात आले. निवेदिता मेहेंदळे यांनी रचलेले व शिरीषा जोशी यांनी स्वरबद्ध केलेले मालकंस रागातील देवीस्तवन- “देवी शारदे आमुचे वंदन” तन्मयी मेहेंदळे यांनी सादर केले. सर्व शास्त्रीय गायकांचा उल्हासदादा पवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.

पुण्यामध्ये पं. कुमार गंधर्व यांचा पुतळा उभारुन उचित स्मारक व्हावे, या आयोजक मोहन जोशी यांच्या कल्पनेबद्दल त्यांचे अभिनंद करुन उल्हास पवार म्हणाले, पं. कुमार गंधर्व यांच्या शास्त्रीय संगीताची परंपरा वैशिष्ट्यपूर्ण होती. आजही त्यांच्या गायनाच्या शैलींचे गारुड देशभर आहे. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी त्यांच्या गायनाच्या शैलीचा गौरव केला होता. यापेक्षा मोठा गौरव होणे नाही. स्वातंत्र्यानंतर पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु यांनी मध्यप्रदेशातील धार येथे पं. कुमार गंधर्वांची आर्वजून भेट घेतली होती. या भेटीत पं. कुमार गंधर्व यांचे शास्त्रीय गायन त्यांनी आवर्जून ऐकले. असे, सांगून उल्हास पवार म्हणाले की, पं. नेहरुंना कमी वेळ असूनदेखील पं. कुमार गंधर्वांचे गायन ऐकण्यासाठी त्यांनी अधिक वेळ दिला, असल्याची आठवण त्यांनी सांगितली.
पं. कुमार गंधर्व यांच्या कार्यक्रमावेळी लाईट गेली, असल्याची आठवण सांगताना पवार म्हणाले, पं. कुमार गंधर्व यांचे सुरेल गायनाच्या कार्यक्रमात श्रोते तल्लीन झाले होते. अचानक लाईट गेली. मेणबत्या लावल्या गेल्या त्याचे भानही श्रोत्यांना नव्हते. इतके सारेजण तल्लीन झाले होते, असे उल्हास पवार म्हणाले. पं. कुमार गंधर्व यांचे निर्गुणी भजनाचे स्वर मला ऐकायला मिळाले हे माझे भाग्य असल्याचे यावेळी पवार यांनी सांगितले.

पं. डॉ. मोहनकुमार दरेकर म्हणाले, सवाई गंधर्वातील एका कार्यक्रमात पं. कुमार गंधर्व यांना भेटता आले. त्यांच्या गायनाचा कार्यक्रम मला ऐकण्याचे भाग्य लाभले. ईश्वराचे दर्शन वारंवार होत नाही, तर एकदाच होते. असेच पं. कुमार गंधर्व यांच्या गाण्यात होते. त्यांच्या गाण्यांचे पारायण सुरु असून पुढील पिढीला ते नक्कीच दिशा देणारे असेल असेही यावेळी पं. दरेकर यांनी सांगितले. पं. कुमार गंधर्व यांनी आपल्या गायनातून बोली भाषेत उच्चाराला फार महत्व दिले. त्यांच्या गायनाची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही. अवघ्या सहा वर्षाचा मुलगा रेकॉर्डींग ऐकून जसेच्यातसे ऐकलेले राग गाण्याची हातोटी त्यांच्या अंगी होती. त्यांचे गाणे कधीही तंबोर्याच्या बाहेर गेले नाही. तंबोरा आणि तबल्यात त्यांचा स्वर विरुन गेला असल्याचे यावेळी पं. दरेकर यांनी सांगितले. पं. दरेकर यांनी आपल्या आवाजात पं. कुमार गंधर्व यांच्या गायकीची झलक दाखवून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

पंडित राजेंद्र कंदलगांवकर म्हणाले, पं. कुमार गंधर्व यांच्यात स्वरांची सिद्धी होती. त्यांनी गायलेल्या स्वरांची आस दीर्घकाळ असायची. प्रत्येक गायनात त्यांच्या स्वरवाक्य दिसून येत होते. त्यांच्या गायनाचा अभ्यास आपल्याला कसा करता येईल, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यांच्या कलाविष्कारांचा अभ्यास करुन नव्या पिढीला देण्यासाठी आपण पुढाकार घेण्याची गरज असल्याचे यावेळी त्यांनी संयोजक मोहन जोशी यांना सांगितले.
ज्येष्ठ शास्त्रीय गायिका मीनाताई फातर्पेकर म्हणाल्या, पं. कुमार गंधर्व आणि आमच्या घराण्यांचा संबंध होता. माझी आजी सरस्वतीबाई राणे व हीराबाई बडोदेकर यांच्यामुळे गायनाचे धडे मला सतत मिळाले. अनेक मोठ्या कलाकारांचा राबता घरात असायचा. पं. कुमार गंधर्व यांच्या खूप आठवणी घरात ऐकायला मिळाल्या. पं. कुमार गंधर्व यांची शैली वेगळी होती, हृद्याला भिडणारी होती. त्यांच्या निर्गूणी भजनांची कॉपी करता येत नाही. आम्ही इंदोरमध्ये असताना इंदोरजवळील देवास येथे त्यांना भेटण्याची संधी आम्हाला मिळाली. माझ्या आजीने मला त्यांच्यापुढे बंदीश गायला सांगितली. या गायनाच्या संधीमुळे त्यांनी मला दिल्लीच्या कार्यक्रमात गायनाला संधी दिल्याची आठवण त्यांनी सांगितली. त्यांचे गायन आम्ही कलाकार पुढे घेऊन जाऊ असेही यावेळी त्यांनी सांगितले. जन्मशताब्दी वर्षाचा कार्यक्रम स्तूत्य असल्याचे कौतूक करुन मोहन जोशी यांना धन्यवाद फातर्पेकर यांनी दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शैलेश गुजर यांनी केले. प्राजक्ता जाधव यांनी आभार मानले.

| पं. कुमार गंधर्व यांचे पुण्यात स्मारक व्हावे…-मोहन जोशी

पद्मविभूषण कै. पं. कुमार गंधर्व यांचे जन्मशताब्दी वर्ष कार्यक्रमाचा प्रारंभ पुण्याहून सुरु होत आहे ही आनंदाची बाब आहे, असे सांगून संयोजक पुणे कला क्रीडा केंद्राचे अध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी म्हणाले की, पं. कुमार गंधर्व यांची जन्मभूमी कर्नाटक आहे. तर महाराष्ट्र व मध्यप्रदेश ही कर्मभूमी आहे. पुण्याशी पं. कुमार गंधर्व यांचे नाते भावनिक होते. पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. पुण्यात पं. कुमार गंधर्व यांचा जन्मशताब्दीनिमित्ताने त्यांच्या गायनाचा प्रवास व गायकी पुढील पिढीपर्यंत जाणे गरजेचे आहे. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम आम्ही राबविणार आहोत. पुण्यात कै. पं. कुमार गंधर्व यांचे स्मारक व पुतळा उभारण्यासाठी महाराष्ट्र सरकारला विनंती व पाठपुरावा करणार आहोत, असे टाळ्यांच्या कडकडाटात मोहन जोशी म्हणाले.