Rahul Gandhi | Supreme Court |सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला आणखी एक चपराक | प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी

Categories
Breaking News Political पुणे

Rahul Gandhi | Supreme Court |सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला आणखी एक चपराक | प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी

 

Rahul Gandhi | Supreme Court |काँग्रेसचे नेते राहूल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांना गुजरात न्यायालयाने (Gujrat High Court) दिलेल्या शिक्षेस सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) स्थगिती दिली . मणीपूर हिंसाचाराकडे (Manipur Violence) दुर्लक्ष करत असल्याबद्दल केंद्र सरकारला (Central Government) सुनावल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court)  आणखी एक चपराक केंद्र सरकारला, पर्यायाने भारतीय जनता पक्षाला (BJP) लगावली आहे. विरोधी पक्ष संपवण्याच भाजपचा कुटील डाव या स्थगितीने धुळीस मिळाला असल्याची प्रतिक्रिया प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Maharashtra Congress Vice President Mohan joshi) यांनी व्यक्त केली. (Rahul Gandhi | Supreme Court)

भारत जोडो यात्रेतून (Bharat Jodo Yatra) संपूर्ण देशात विविधतेत एकता असे वातावरण निर्माण केलेले राहूल गांधी यांची भाजपला भीती वाटत होती. त्यामुळेच दुसर्या राज्यात राहूल जी यांनी केलेल्या एका भाषणाचे खोटे निमित्त करून गुजरातमध्ये खटला दाखल करण्याचे कारस्थान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ग्रुहमंत्री अमीत शाह यांनी रचले. मात्र देशातील सर्वोच्च न्यायालयाने हे कारस्थान हाणून पाडले आहे असे जोशी म्हणाले.
आता ८,९ व १० ऑगस्ट या दिवशी संसदेत होणाऱ्या अविश्वास ठरावाच्या चर्चेसाठी देखील राहूल जी गांधी सहभागी होऊ शकतील ही देशातील जनतेच्या दृस्ठीने ही उत्साहाची बाब आहे असे जोशी यांंनी सांगितले. (Rahul Gandhi News)


News Title |Rahul Gandhi | Supreme Court | Another slap of the Supreme Court to the central government | State Congress Vice President Mohan Joshi

Kasba Constituency Civic Issues | कसबा मतदारसंघातील नागरी समस्यांचे निवारण करण्यासाठी महापालिका आयुक्ताकडे मागणी 

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Kasba Constituency Civic Issues | कसबा मतदारसंघातील नागरी समस्यांचे निवारण करण्यासाठी महापालिका आयुक्ताकडे मागणी

| हेमंत रासने यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने आयुक्तांची घेतली भेट

 

Kasba Constituency Civic Issues | गेल्या चार महिन्यांपासून कसबा विधानसभा मतदारसंघातील (Kasba Constituency)  विविध प्रभागांमध्ये सुरू केलेल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयांच्या (BJP Offices) माध्यमातून नागरिकांशी थेट संपर्क साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या आहेत. यामध्ये पेठ विभागातील अनियमित व कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा,   जुन्या वाड्यातील ड्रेनेज लाईन, मोठ्या पावसामध्ये नागझरी लगत असणाऱ्या वसाहती मध्ये पावसाळ्यात होणाऱ्या पाणी समस्यांच्या दृष्टीने उपाययोजना करणे,  पेठांमधील धोकादायक वाढलेली झाडे व फांद्यांची छाटणी करणे तसेच सार्वजनिक शौचालयांमध्ये विविध सोयी सुविधा उपलब्ध करणे अशा समस्यांचा समावेश आहे. याचे निवारण करण्याबाबतचे निवेदन पुणे मनपाचे आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar)  यांना कसबा विधानसभा निवडणूक प्रमुख हेमंत  रासने (Hemant Rasane) यांच्या वतीने देण्यात आले. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते. (Kasba Constituency Civic Issues)

या समस्यांमध्ये महापालिकेच्या विविध विभागातील पुढील तक्रारींचा प्रामुख्याने समावेश आहे.

1.पाणीपुरवठा
कसबा विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रभागांमध्ये पाणीपुरवठ्याची समस्या गंभीर आहे. अपुरा, कमी दाबाने आणि अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. या समस्यांची दखल घेऊन परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा. (Pune Municipal Corporation)

2. रस्ते विकास
विविध ठिकाणी सुरू असलेल्या विकासकामांमुळे रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. ठिकठिकाणी रस्त्यांची दुरुस्ती, रस्त्यात पडलेले खड्डे बुजविणे, डांबरीकरण करण्याची गरज आहे. (PMC Pune)

3. पार्किंग
कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये पार्किंगचा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे. ठिकठिकाणी पार्किंगचे फलक लावलेले नाहीत. तसेच पार्किंगच्या पट्ट्याही अस्पष्ट आहेत. त्यामुळे नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागतो.

4. पदपथ
कसबा विधानसभा मतदारसंघातील बहुतांश पदपथांवर अतिक्रमण करण्यात आलेले आहे. तसेच पदपथ नादुरुस्त झालेले आहेत. चौकातील झेब्रा क्रॉसिंगच्या खुणा अस्पष्ट झाल्या आहेत. मतदारसंघातील पदपथ दुरुस्त करण्याची नितांत आवश्यकता आहे. ज्यामुळे पादचाऱ्यांना सुरक्षितपणे चालता येईल.

5. ड्रेनेज लाईन आणि पावसाळी गटारे

मतदारसंघातील विविध प्रभागांमध्ये ड्रेनेज लाईन तुंबलेल्या आहेत .चेंबर खचलेली आहेत. ड्रेनेजच्या झाकणाची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. तसेच पावसाळी गटार लाईन मधील राडाराडा काढून ते प्रवाही करण्याची गरज आहे.

6. सुलभ शौचालयांची दुरुस्ती
कसबा विधानसभा मतदारसंघातील वस्ती विभाग आणि जुन्या वाड्यांच्या परिसरामध्ये सुलभ शौचालये दुरावस्था झालेली आहे. दरवाजे बदलणे आवश्यक आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतागृहांमध्ये नियमितपणे साफसफाई होत नसल्याचे निदर्शनास आले. कृपया तातडीने उपाययोजना कराव्यात.

7. वृक्ष छाटणी
पावसाळा अर्ध्यावर आला तरी देखील मतदारसंघातील धोकादायक पद्धतीने वाढलेल्या वृक्षांची छाटणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. कृपया तातडीने वृक्षांची छाटणी करावी

8. पथदिवे आणि सीसीटीव्ही यंत्रणा
मतदारसंघात विविध ठिकाणी पथदिवे नादुरुस्त झाले आहेत. तसेच काही ठिकाणी नवीन उभारण्याची गरज आहे. काही ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित नाही त्यासाठी उपाय योजना कराव्यात.

विषयांची तातडीने नोंद घेऊन कसबा विधानसभा मतदारसंघातील नागरी समस्या सोडवाव्यात अशी मागणी महापालिका आयुक्तांना यावेळी करण्यात आली. (PMC Pune News)


News Title | Request to the Municipal Commissioner to solve the civil problems in Kasba Constituency

Maharashtra Politics | विरोधी पक्षांनाच सत्ताधाऱ्यांबरोबर बसण्याची हाव असेल तर लोकशाहीचा गाडा टिकेल कसा? आणि मग युवकांचा राजकारणातला रोल मॉडेल कोण असणार?

Categories
Breaking News Political social देश/विदेश महाराष्ट्र संपादकीय

Maharashtra Politics | विरोधी पक्षांनाच सत्ताधाऱ्यांबरोबर बसण्याची हाव असेल तर लोकशाहीचा गाडा टिकेल कसा? आणि मग युवकांचा राजकारणातला रोल मॉडेल कोण असणार?

Maharashtra Politics | (Author: Ganesh Mule) | लोकशाहीचे (Democracy) जसे चार महत्वाचे स्तंभ आहेत, अगदी त्याचप्रमाणे आणि किंबहुना त्याहूनही महत्वाचा लोकशाहीचा आधार हा विरोधी पक्ष (Opposition Party) असतो. मात्र विकासाचे कारण देत तोच विरोधी पक्ष जर सत्ताधाऱ्या (Ruling Party) सोबत हातमिळवणी करून सत्तेत बसू लागला तर हा लोकशाहीचा गाडा टिकेल कसा? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. शिवाय महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने अशाच गोष्टी घडत चालल्या आहेत. त्यामुळे युवकांचा (Youth) राजकारणावरील विश्वास उडत चालला आहे. त्यामुळे आम्ही राजकारणात रोल मॉडेल (Roll Model) म्हणून कुणाकडे पाहायचे, असा संभ्रम राजकारणात येऊ पाहणाऱ्या आणि सर्वसामान्य युवकांना पडला आहे. (Maharashtra Politics)
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसापासून वेगवेगळ्या गोष्टी घडत आहेत. ज्या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच्या आहेत. जे काही घडतं त्यामुळे लोक फक्त सुन्न होतात. सुरुवातीला भाजप (BJP) हा मोठा पक्ष असून देखील भाजपला सत्ता स्थापन करता आली नाही. मुख्यमंत्री कुणाचा असणार, या मुद्द्यावर शिवसेनेने भाजपचा हात सोडला. त्यामुळे महाविकास आघाडी सत्तेवर आली. यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा सगळ्यात मोठा हात होता. काँग्रेस (INC), शिवसेना (Shivsena)आणि राष्ट्रवादीने (NCP) सत्ता स्थापन केली. मात्र हे सहन न झाल्याने आणि विरोधी पक्षात बसण्याची वेळ आलेल्या भाजपने कुरघोड्या करायला सुरुवात केली. यात सगळ्यात आघाडीवर होते ते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis). फडणवीस हे पवारांना शह देतात म्हणून त्यांची लोकप्रियता वाढू लागली होतीच. शिवाय त्यांना केंद्राकडून देखील साथ मिळत असल्याने त्यांचे महाराष्ट्रात वर्चस्व वाढत चालले होते. (Maharashtra Political Crisis)
मग फडणवीस यांनी आपले बुद्धिचातुर्य चालवत आणि गनिमी कावे करत शिवसेनेत उभी फूट पाडली. उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) सेना एकाकी पडली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या बंडाने शिवसेना तर फुटलीच मात्र महाविकास आघाडीला देखील आपली सत्ता राखता आली नाही. मग भाजप आणि शिंदे यांनी ठाकरेंचं उरलं सुरलं देखील सगळं हिरावून घेतलं. बंडखोरी केलेली सगळी लोकं ही ED आणि तत्सम यंत्रणांना घाबरलेली होती. फक्त हेच लोक नाही तर काँग्रेस, उद्धव यांची सेना आणि राष्ट्रवादीतील लोकांच्या मागे देखील यंत्रणा लावल्या जात होत्या. कुठल्याही पद्धतीने दबाव आणून विरोधी पक्ष कमकुवत करायचा हा चंग बांधून भाजपने कुरघोड्या सुरु ठेवल्या.
याचाच परिणाम म्हणून राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी (Ajit Pawar) नुकतेच बंड केले. विरोधी पक्षात असणारा राष्ट्रवादी मग  लगेच सत्ताधारी झाला. शरद पवारांना हे माहित होते कि नाही, हे पुढे उघड होईलच. मात्र या सगळ्या घटनांमुळे मात्र सर्वसामान्य लोक, युवक यांचा मात्र राजकारणावरील विश्वास उडत चालला आहे. शिवाय सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवणारा विरोधी पक्ष जर सत्तेच्या दावणीला बांधला जात असेल तर लोकशाहीचा गाडा कसा टिकणार? लोकांच्या आशेचा किरण कोण असेल? असे प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडू लागले आहेत.
जे चाललंय ते सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेरचं आहे, हे याचमुळे. कारण काँग्रेस ला कंटाळून लोकांनी भाजपला मोठा पक्ष बनवलं. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना आपल्या आशेचा किरण मानलं. मात्र भाजपने लोकांच्या हिताची भूमिका घेतली असं दिसून येत नाही. भ्रष्टाचारी लोकांच्या मागे यंत्रणा लावल्या म्हणून लोकांना भाजपविषयी आदर वाटू लागला. पण कालांतराने भाजपने त्याच लोकांना आपल्या पक्षाचा आश्रय देत त्यांना मंत्री केलं. त्यामुळे लोकांना यातला नेमका बोध कळेना. तसेच शरद पवार यांचं महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील मक्तेदारी मोडून काढणारा नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं जाऊ लागलं. मात्र त्यांच्या कुरघोड्या पाहता ते लोकांसाठी कमी आणि सत्तेसाठी चिटकून राहण्यासाठी सर्व गोष्टी करतात, हे लक्षात येऊ लागलं. शरद पवारांच्या नेहमीच्या बदलत्या भूमिकेमुळे लोकांचा त्यांच्यावर विश्वास उरला नाही. कालच्या प्रकरणात आपला हात नाही, असं शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलेलं असलं तरी लोकं आता त्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत.
सत्ताधाऱ्यांनी लोकांचं, लोक काय बोलतात यावर फार लक्ष द्यायचं नसतं आणि आपला अजेन्डा चालवायचा असतो, अशी एक रीत पडून गेली आहे. मात्र  विरोधी पक्षानं लोकांची बाजू घेऊन लोकांचे प्रश्न मांडून त्यांना न्याय मिळवून द्यायचा असतो, हे देखील सोयीस्कर रित्या विसरले जात आहे. अशा परिस्थितीत उत्साहाने राजकारणात येऊ पाहणाऱ्या नवख्या युवकांनी नेमकं कुणाला आदर्श मानायचं? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.
यात लोकांनाच अग्रणी भूमिका घ्यायला हवीय. राजकारणातून आपला फार विकास होत नसतो, हे आता तरी लोकांनी लक्षात घ्यायला हवंय. आपला विकास आपल्यालाच करावा लागतो. आपल्याशिवाय आपल्याला कुणी वाचवू शकत नाही, हे सूत्र लक्षात घेऊन आणि राजकारणाकडे दुर्लक्ष करून लोकांनी स्वविकास करून घ्यायला हवाय.

सर्वच राजकीय पक्ष म्हणतात, तरुणांनी राजकारणात आले पाहिजे पण युवा वर्गाने कोणाचा आदर्श घ्यावा हाच मोठा प्रश्न आज निर्माण झाला आहे. ज्यांचा आदर्श घ्यावा अशी व्यक्तिमत्वे कधी एका पक्षात तर कधी दुसऱ्या पक्षात हे वास्तव सद्यस्थितीत आहे आणि  पक्षाची ध्येयधोरणे काय ? या मुद्द्याला तिलांजली दिली जात असल्याचे वास्तवही आहे.त्यामुळे युवा वर्गाने राजकारणात यावे ही साद एकीकडे घातली जात आहे आणि दुसरीकडे जनहितासाठी आवश्यक असणारा विरोधी पक्ष कायमचा हद्दपार करण्याचे डावपेच सुरू आहेत त्यासाठी राजकारणात फोडाफोडीचे राजकारण तर खुलेआम होत आहे मात्र विकासाच्या नावाखाली स्वार्थ साधला जात असेल तर लोकहिताचा विचार कुणीच करत नाही असेच म्हणावे लागेल.

– हेमंत बागुल, काँग्रेस कार्यकर्ता.
——
Article Title | Maharashtra Politics |  If only the opposition parties want to sit with the rulers, how can the car of democracy survive?  And then who will be the role model of the youth in politics?

Pune Smart City | पुणे स्मार्ट सिटी बद्दल श्वेतपत्रिका काढा | मोहन जोशी

Categories
Breaking News PMC Political पुणे

Pune Smart City | पुणे स्मार्ट सिटी बद्दल श्वेतपत्रिका काढा | मोहन जोशी

| भाजपाची स्मार्ट सिटी योजना म्हणजे ‘निवडणूक जुमला’

Pune Smart City | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ८ वर्षांपूर्वी म्हणजे २५ जून २०१६मध्ये पुण्यात स्मार्ट सिटी (Pune Smart City) योजना समारंभपूर्वक मोठे मोठे जाहिराती देऊन जाहीर केली. पाठोपाठ २०१७ मध्ये पुणे महानगरपालिकेत (Pune Municipal Corporation) भाजपला (BJP) सलग ५ वर्षांसाठी सत्ता मिळाली. एकहाती सत्ता मिळूनही या योजनेतंर्गत काहीही स्मार्ट काम पुण्यात झालेले नाही. कामांच्या निविदांमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा मात्र घातला गेला असा आरोप करून या संपूर्ण योजनेची किमान पुणे शहरासाठीची श्वेतपत्रिका (White Paper) जाहीर करण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी (Congress Leader Mohan Joshi) यांनी केली. पुण्यातील स्मार्ट सिटी (Smart City Pune) योजनेला ८ वर्षे पुर्ण होत असल्याच्या अनुषंगाने ते बोलत होते. (Pune Smart City)
मोहन जोशी म्हणाले, आधीच विकसित असलेल्या पुण्यातील बाणेर बालेवाडी (Baner Balewadi) या परिसराची कार्यक्षेत्र म्हणून निवड केली गेली. त्यासाठी पुणेकरांमध्ये सर्वेक्षण नावाचा प्रकार करून नंतर सर्वांच्याच तोंडाला पाने पुसण्यात आली. बाणेर बालेवाडीमध्ये तरी काय केले? ते जाहीरपणे पुणेकरांना सांगावे असे आव्हान मोहन जोशी यांनी केले. (Pune Municipal Corporation)
आता केंद्र सरकारने ही योजना बंद करत असल्याचे जाहीर केले आहे. ‘गाजराची पुंगी, वाजली तर वाजली, नाहीतर मोडून खाल्ली’ असा हा प्रकार आहे. यात पुणेकरांचे कोट्यवधी रुपये मात्र सल्लागार कंपन्यांच्या घशात गेले असे मोहन जोशी म्हणाले. (Smart city scheme)
जोशी म्हणाले, ” शपथ घेऊन खोटे बोलायचे,  बोलायचे एक करायचे एक हा भाजपचा स्वभावच आहे. स्मार्ट सिटी योजना त्याचे ऊत्तम ऊदाहरण आहे. सत्तेवर येताच भाजपने शहरांमधील जनतेला त्यांची शहरे स्मार्ट करण्याचे स्वप्न दाखवले. त्याला ८ वर्षे झाली. या काळात पुणे महापालिकेत भाजपचीच पूर्ण बहुमताची सत्ता होती. पुणे शहर या ८ वर्षात कोणत्या अर्थाने स्मार्ट झाले हे भाजपने पुणेकरांसाठी जाहीरपणे सांगावे किंवा मग हाही निवडणूका जिंकण्यासाठी केलेला जुमला होता याची जाहीर कबुली तरी पुणेकर जनतेला द्यावी असे ते म्हणाले.
काँग्रेसकडे स्मार्ट सिटी योजनेत पुणेकरांसाठी भाजपने कधीकधी, कायकाय घोषणा केल्या याची यादीच असल्याचे स्पष्ट करून मोहन जोशी म्हणाले, कोट्यवधी रूपयांचा निधी या काळात केंद्र सरकारकडून आलेल्या सल्लागार कंपन्यांवर खर्च केला गेला. केंद्रानेच पाठवलेल्या अधिकार्यांना कोट्यवधीचे वेतन दिले गेले. महापालिकेचा अधिकार काढून घेतला गेला. त्या बदल्यात करदात्या पुणेकरांना काय मिळाले तर अर्धवट योजना, शहरातील अनेक रस्त्यांची अनाकलनीय मोडतोड आणि चौकाचौकात ऊभे केलेले जाहिरातींचे अशोभनीय विद्यूत खांब! ज्याचा शहराला शुन्य ऊपयोग आहे असे मोहन जोशी म्हणाले.
विकासाची आश्वासने देत सत्तेवर येताच भारतीय जनता पक्षाने धर्म आणि जातीभेदाची नखे बाहेर काढली. त्यावेळी दिलेली वारेमाप वचने म्हणजे ‘निवडणूकीचा जूमला’च असल्याचे ‘स्मार्ट सिटी’ या फसव्या योजनेवरून सिद्ध होत असल्याची टीका मोहन जोशींनी केली. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्वतंत्र कारभार करण्याच्या अधिकारालाच नख लावण्याचा डाव स्मार्ट सिटी योजनेत होता असेही ते म्हणाले.
पुणेकर जनता भाजपच्या या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून दिलेल्या भूलथापांना आगामी निवडणूकीत मतपेटीतून योग्य ऊत्तर देईलच, काँग्रेस कायम पुणेकरांबरोबर असेल असे मोहन जोशी यांनी शेवटी सांगितले.
News Title | Pune Smart City |  Download white paper about Pune Smart City |  Mohan Joshi  |  BJP’s Smart City Scheme is ‘Election Jumla’

PMC Teachers Agitation Update | रजा मुदतीतील शिक्षण सेवकांच्या आमरण उपोषणाला काँग्रेस, भाजपचा पाठिंबा 

Categories
Breaking News Education PMC Political पुणे

PMC Teachers Agitation Update | रजा मुदतीतील शिक्षण सेवकांच्या आमरण उपोषणाला काँग्रेस, भाजपचा पाठिंबा

PMC Teachers Agitation Update | पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागात (PMC Education Department) काम करणाऱ्या रजा मुदतीतील ९3 शिक्षण सेवकांना नियमित वेतनश्रेणी २०१७ (एप्रिल) पासून लागू करावी. या मागणीसाठी सर्व शिक्षण सेवक महापालिका भवनासमोर आमरण उपोषणास (Agitation) बसले आहेत. या आंदोलनाला काँग्रेस आणि भाजपने पाठिंबा दिला आहे. तसेच महापालिका प्रशासनासोबत चर्चा करून हा प्रश्न सोडवण्याची मागणी काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांनी केली आहे.   (PMC Teachers Agitation Update)

काँग्रेस कडून सकाळी आमदार रविंद्र धंगेकर(MLA Ravindra Dhangekar), मोहन जोशी (Mohan Joshi), अभय छाजेड (Abhay Chajed) या नेत्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्यांची समस्या जाणून घेतली. तसेच प्रशासनासोबत चर्चा करून शिक्षकांना न्याय देण्याची मागणी केली. तर दुपारी भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक (BJP City President Jagdish mulik) यांनी आंदोलन स्थळी भेट दिली. मुळीक यांनी देखील प्रशासना सोबत चर्चा केली. तसेच याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. (Pune Municipal Corporation)

आंदोलनकर्त्यांनी सांगितले कि, पुणे महापालिकेच्या इतिहासात प्रथमच पुणे महापालिकेच्या प्रशासनाने अति तत्परता दाखवत तब्बल २१९ शिक्षकां साठी एकतर्फी व पती-पत्नी अंतर्गत आंतर जिल्हा बदलीने सदर २१९ शिक्षकांना पुणे महापालिकेच्या सेवेत सामावून घेतले आहे.पुणे महापालिकेचे प्रशासन या २१९ शिक्षकांसाठी पायघड्या घालून त्यांचे स्वागतासाठी सज्ज आहेत.. त्यांना विशेष ट्रीटमेंट दिली जात आहे. परंतु  याच पुणे महापालिकेच्या शाळेत गेली सुमारे १५ वर्षापासून ६००० रुपयांच्या तुटपुंज्या मानधनावर शिकवणारे ९३ रजा मुदत शिक्षकांकडे दुर्लक्ष करण्यामागे नक्की काय दडलय हा संशोधनाचाच विषय आहे. असा प्रश्न आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला आहे. (PMC Pune News)
93 शिक्षकांनी त्यांची नियमित तीन वर्षाची सेवा पूर्ण केल्यानंतर त्यांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याबाबत प्रशासनाला अनेक वेळा निवेदने दिली.  पण त्यांचे निवेदनाला कोणीही दाद दिली नाही म्हणून या 93 शिक्षकांनी गेल्या पंधरा वर्षात अनेक वेळा निदर्शने,धरणे ,उपोषण या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधण्याची खूप प्रयत्न केले. सदर शिक्षकांना प्रशासनाने कागदपत्रांचा ससेमिरा मागे लावत एकदा महापालिकेच्या आस्थापना विभागात ,शिक्षण विभागात व नगर विकास विभागात अनेक वेळा पत्र व्यवहार करून नियमित  सेवेत घेण्यासाठी अनेक प्रयत्न केले होते. परंतु पुणे मनपाचे ढीम्म प्रशासनाने सदर शिक्षकांना कुठलीही खबरदात किंवा त्यांची दखल घेतली नाही अखेर या शिक्षकांनी मुंबई  उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आपल्यावरती झालेला अन्याय दूर करण्याबाबत याचिका दाखल केली होती . मुंबई उच्च न्यायालयाने सदर 93 शिक्षकांवरती खूप अन्याय झालेला आहे व यांना तात्काळ सहा आठवड्याच्या आत महापालिकेच्या सेवेत समावून घेऊन वेतनश्रेणीवर नियमित वेतन अदा करण्याचे आदेश दिलेले असताना सुद्धा गेली चार महिन्यापासून सदर पुणे मनपाचे प्रशासन याकडे जाणून बुजून कानाडोळा करत आहे. असा आरोप या आंदोलनकर्त्यांनी केला. (PMC Pune Education Department)
News Title | PMC Teachers Agitation Update | Congress, BJP support hunger strike of education workers during leave period

Pune Akashvani News | पुण्याबद्दल आकस नसेल तर प्रकाश जावडेकरांनी पुण्यासाठी एवढे तरी करावे – मोहन जोशी

Categories
Breaking News Political पुणे

 Pune Akashvani News | पुण्याबद्दल आकस नसेल तर  प्रकाश जावडेकरांनी  पुण्यासाठी एवढे तरी करावे – मोहन जोशी

Pune Akashvani News | आकाशवाणी पुणे केंद्रातील (Akashvani Pune Centre) प्रादेशिक वृत्त विभाग बंद करुन त्यावरील बातमीपत्रांचे छत्रपति संभाजीनगरला  स्थलांतर करण्याचा निर्णय प्रसार भारतीने घेऊन पुण्याच्या सांस्कृतिक वैभवाला नष्ट करण्याचे धोरण आखले आहे असे दिसून येत आहे. अशा वेळी माजी केंद्रीय माहिती व नभोवाणी मंत्री असणारे ‘पुणेकर’ प्रकाश जावडेकर (Prakash Javdekar) यांना पुण्याबद्दल आकस नसेल तर किमान पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi) यांच्याकडे प्रयत्न करून हा निर्णय रद्द होण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा. जर हा निर्णय केंद्र शासनाने (Central Government) रद्द केला नाही तर कॉंग्रेस पक्षातर्फे (Congress Party) तीव्र निदर्शने केली जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचा पुण्याबद्दलचा आकस स्पष्टपणे दिसून येत असल्यामुळे पुणेकरांनी आता संघटित होऊन भाजपचा हा डाव हाणून पाडला पाहिजे. तसेच शिवाजीनगर येथे भव्य मेट्रो स्टेशन होत असल्यामुळे पुणे आकाशवाणीच्या सुमारे ४ एकर जागेवर बिल्डरच्या फायद्यासाठी व्यापारी संकुल होण्यासही विरोध केला पाहिजे असे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Mohan Joshi) यांनी म्हंटले आहे.
मोहन जोशी पुढे म्हणाले की, ‘पुणेकर’ प्रकाश जावडेकर केंद्रीय माहिती व नभोवाणी मंत्री असतानाच त्यांनी घेतलेल्या केंद्र धार्जिण्या निर्णयामुळे पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाची स्वायत्तता गेली. पुणे आकाशवाणीचे प्रादेशिक वृत्ताचे केंद्र गेले. पुणे दूरदर्शनची देखील त्यांनी दुरावस्था करून टाकली. केवळ राज्याचेच नव्हे तर देशाची सांस्कृतिक राजधानी असा पुण्याचा नावलौकिक कमी करण्याचा हा प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना गुजरातबद्दल प्रेम आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूरबद्दल प्रेम आहे अशावेळी ‘पुणेकर’ प्रकाश जावडेकरांना पुण्याबद्दल प्रेम आहे काय? असा प्रश्न पुणेकर विचारत आहेत. पुण्याच्या सांस्कृतिक वैभवाला नख लावणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारला साथ देऊन ‘पुणेकर’ प्रकाश जावडेकर यांनी कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदींच्यी मर्जी संपादन केलीही असेल मात्र पुणेकर आता त्यांच्या पुणे विरोधी कटकारस्थानांना क्षमा करणार नाहीत. आता तरी याचे प्रायश्चित्त म्हणून ‘पुणेकर’ प्रकाश जावडेकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय माहिती आणि नभोवाणी मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे रदबदली करून पुणे आकाशवाणी केंद्राबद्दलचा निर्णय मागे घेण्यास त्यांना भाग पाडावे. कॉंग्रेस पक्ष  पुणेकरांचे हित सांभाळण्यासाठी या निर्णयाविरुद्ध जोरदार आंदोलन करेल, असा इशारा मोहन जोशी यांनी दिला.  (Pune Akashvani)
—-
News Title | Pune Akashvani News |  If you don’t care about Pune, Prakash Javadekar should do something for Pune – Mohan Joshi

Panshet Flood Victims |भाजपकडून पानशेत पुरग्रस्तांवर नऊ वर्षांपासून अन्यायच ; निवडणुकीच्या भितीपोटी काढला आदेश | मोहन जोशी

Categories
Breaking News Political social पुणे

Panshet Flood Victims |भाजपकडून पानशेत पुरग्रस्तांवर नऊ वर्षांपासून अन्यायच ; निवडणुकीच्या भितीपोटी काढला आदेश | मोहन जोशी

Panshet Flood Victims | “पानशेत पूरग्रस्तांना (Panshet Flood Victims) ते राहात असलेल्या जागा त्यांच्या मालकीची करुन देण्यासाठी काँग्रेस पक्षाने (Congress Party) २०१४ मध्ये निर्णय घेतला होता. परंतु, भाजप सरकारने (BJP Government) ९ वर्षे त्याची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे पानशेत पुरग्रस्तांवर भाजप सरकारने अन्यायच केला आहे.” अशी टिका प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी (Mohan Joshi) यांनी केली. (Panshet Flood Victims)

याविषयी जोशी म्हणाले, “पानशेत पुरग्रस्तांचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित आहे. पुरग्रस्त राहात असलेली घरे त्यांच्या मालकी हक्काने देण्यासाठीचा प्रश्न होता. काँग्रेस पक्षाने या प्रश्नाची दखल घेत पाठपुरावा केला होता. त्यामुळे विकास देशमुख हे जिल्हाधिकारी असताना पुरग्रस्तांच्या बैठ्या घरांमधील रहिवाशांना जागेचा मालकी हक्क देण्याचा निर्णय घेण्यात आला होता व तशी प्रमाणपत्रे देखील देण्यात आली होती. त्यानंतर पुरग्रस्त १०३ सोसायट्यांना देखील मालकी हक्क मिळावा, त्यांच्यासंबंधीच्या तांत्रिक अडचणी सोडविण्यात याव्यात, यासाठी मी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यामुळे २०१४ मध्ये तत्कालीन महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पुरग्रस्त सोसायट्यांमधील रहिवाशांना जागा त्यांच्या मालकी हक्काने देण्याचा निर्णय घेतला होता.” असे मोहन जोशी म्हणाले. (Pune News)

पुरग्रस्तांवर भाजपने अन्याय केला असल्याची टिका करत मोहन जोशी पुढे म्हणाले, “२०१४ मध्ये राज्यात सत्तांतर झाले. त्यानंतर भाजप सरकारने पानशेत पुरग्रस्तांसंबंधीच्या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करणे गरजेचे होते. मात्र तसे घडले नाही. नऊ वर्ष भाजप सरकारने पानशेत पुरग्रस्तांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार केला आहे. नऊ वर्ष निर्णयाची अंमलबजावणी न करता पुरग्रस्तांवर अन्याय केला आहे. कसबा विधानसभा निवडणूकीमध्ये काँग्रेस विजयी झाल्यामुळे भाजपला आपली चुक कळली आहे, त्यामुळे भविष्यातील निवडणुकांमध्ये आपल्याला पुरग्रस्तांचा चांगलाच फटका बसू शकतो, हे लक्षात आल्यामुळेच त्यांनी आता पुरग्रस्तांबाबत तातडीने आदेश दिले आहेत. मात्र अशा प्रकारे भाजपने नऊ वर्ष पुरग्रस्तांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्याचा केलेला प्रकार दुर्दैवी आहे.” असे मोहन जोशी म्हणाले.

याची पार्श्वभूमी सांगताना मोहन जोशी म्हणाले की, पुण्यात पानशेत धरण फुटण्याची घटना १२ जुलै १९६१ या दिवशी घडली. त्यामुळे आलेल्या पुरामध्ये पुण्याच्या मध्यवर्ती भागातील हजारो कुटुंबीयांची घरे, दुकाने पुराच्या पाण्यात गेली. त्यामुळे तत्कालीन सरकारने पुरग्रस्तांसाठी दत्तवाडी, राजेंद्रनगर, पर्वती दर्शन, सहकारनगर, शिवदर्शन, एरंडवणे, जनवाडी, गोखलेनगर, महर्षीनगर अशा ठिकाणी घरे बांधून दिली होती. संबंधित घरे ९९ वर्षांच्या कराराने भाडेतत्वावर देण्यात आली होती. मात्र हि घरे मालकी हक्काने मिळावीत यासाठी पुरग्रस्त नागरीक लढा देत होते. आता काँग्रेसने घेतलेल्या निर्णयाची भाजप सरकारने तब्बल ९ वर्षांनी अंमलबजावणी केली हेही नसे थोडके! असे मोहन जोशी शेवटी म्हणाले.


News Title |Panshet flood victims from BJP have been unjust for nine years; The order issued due to the fear of elections Mohan Joshi

PMC Election | BJP | भाजपकडून पुणे महापालिका निवडणुकीची तयारी सुरु 

Categories
Breaking News PMC Political पुणे

PMC Election | BJP | भाजपकडून पुणे महापालिका निवडणुकीची तयारी सुरु

| महापालिका निवडणूक प्रमुख म्हणून राजेश पांडे यांची नियुक्ती

PMC Election | BJP | पुणे महापालिका निवडणूक (Pune Municipal Corporation Election) कधी होणार याची उत्सुकता सर्वानाच आहे. मात्र निवडणूक कधी होणार, हे खात्रीशीरपणे कुणीच सांगू शकत नाही. पण दुसरीकडे भाजपने (BJP) मात्र निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. पुणे महापालिका निवडणूक प्रमुख (PMC Pune election) म्हणून राजेश पांडे (Rajesh Pande) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (PMC Election | BJP)
पांडे यांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP State president Chandrashekhar Bawankule) यांनी नुकतेच तसे पत्र दिले आहे. पत्रात बावनकुळे यांनी म्हटले आहे कि पुणे महापालिकेत पुन्हा एकदा विजयश्री खेचून आणण्यासाठी आपण प्रयत्न कराल.
प्रदेश भाजपने पुणे महापालिका निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या शिफारशीनुसार ही निवड झाली आहे. पक्ष नेतृत्वाने टाकलेला विश्वास मी सार्थ ठरवीन. अशा भावना पांडे यांनी यावेळी व्यक्त केल्या. (PMC election news)
महापालिकेच्या माध्यमातून भाजपने शहरात मोठी विकासकामे केली आहेत. आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकीत आम्ही मागील यशाची पुनरावृत्ती करू. त्यासाठी मी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करीन. बूथ रचनेचे सक्षमीकरण, नियोजनबद्ध निवडणूक व्यवस्थापन आणि विकासकामे व योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करू.
राजेश पांडे, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप, महाराष्ट्र
पुणे महापालिका निवडणूक प्रमुख, भाजपा
—–
News Title |PMC Election | BJP | Preparations for Pune Municipal Elections have started from BJP | Appointment of Rajesh Pandey as Chief Municipal Election Officer

Pune Metro | मेट्रोच्या विलंबाला जबाबदार कोण? | हा तर पुणेकरांच्या स्वप्नाशी केलेला खेळ | मोहन जोशी

Categories
Breaking News Political पुणे

Pune Metro | मेट्रोच्या विलंबाला जबाबदार कोण? | हा तर पुणेकरांच्या स्वप्नाशी केलेला खेळ | मोहन जोशी

Pune Metro | पुणेकर आतुरतेने वाट पहात असलेल्या पूर्ण मेट्रोला (Pune Metro) हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे की नाही? या विलंबाला नक्की कोण जबाबदार आहे असा प्रश्न काँग्रेसने (congress) केला आहे. भारतीय जनता पक्षाने (Bhartiy Janata Party) हा पुणेकरांच्या स्वप्नाबरोबर खेळच चालवला आहे. (Pune Metro)
प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी (Mohan Joshi) म्हणाले, भाजपच्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी महापालिका निवडणूक (PMC Élection) लक्षात घेत पंतप्रधानांच्या हस्ते घाईघाईत फक्त ५ किलोमीटर मार्गाचे उदघाटन ६ मार्च २०२२ रोजी केले. त्याला आता सव्वा  वर्ष झाले. या सव्वा वर्षाच्या कालावधीत मेट्रोची धाव १ इंचही पुढे गेलेली नाही. पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Guardian Minister Chandrakant Patil) वायद्यावर वायदे करत आहेत. या वर्षीचा जानेवारी झाला, मग मार्चही झाला, त्यानंतर महाराष्ट्र दिनाचा मुहुर्त सांगून झाला, मात्र तोही होऊन गेला आणि आता जून उजाडला तरी मेट्रो अद्याप पूर्ण  सुरू झालेली नाही असे मोहन जोशी म्हणाले. (Pune Metro News)
पुणेकरांना रोजची वाहतूक कोंडी (Traffic in pune) आता नकोशी झाली आहे. त्यावरचा उपाय म्हणून केंद्र व राज्य सरकारने मेट्रोचा ११ हजार ५०० कोटी रूपये इतक्या अगडबंब खर्चाचा प्रकल्प सुरू केला. तो बहुधा भ्रष्टाचारासाठीच केला असावा अशी शंका आता पुणेकरांना येऊ लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २४ डिसेंबर २०१६ रोजी भूमी पूजन केल्यापासून आता ७ वर्षे झाली तरीही अजून काम सुरूच असल्याचे सांगण्यात येते. याचा काय अर्थ घ्यायचा? हा प्रकल्प आता नक्की कशाची वाट पाहतोय? की उदघाटनांचा प्रचंड सोस असलेल्या पंतप्रधानांना भाजपच्या नेते पुन्हा पुण्यात आणणार आहेत हे त्यांनी एकदा जाहीर करावे. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वायद्यांचा पुणेकरांना आता कंटाळा आला आहे. त्यांच्या वरील विश्वास उडाला आहे. (Congress leader Mohan Joshi)
पुणेकरांना आम्ही मेट्रो दिली असे भाजपच्या पुण्यातील नेत्यांकडून वारंवार सांगण्यात येते. मात्र ही मेट्रो पुणेकरांचा अंत पहात आहे. काम सुरू झाल्यापासून आतापर्यंत पुणेकर मेट्रो मार्गावरील वाहतूक कोंडीचा, रस्त्यांवरील खड्ड्यांचा, मेट्रोच्या कामामुळे रस्त्यांमध्ये साचलेल्या पाण्याचा त्रास सहन करत आहे. मात्र भाजपला त्याच्याशी काहीच देणेघेणे नाही असे दिसते आहे. असेल तर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीरपणे पूर्ण मेट्रो सुरू होण्याची एकच तारीख जाहीर करावी असे काँग्रेसचे त्यांना आव्हान असल्याचे मोहन जोशी म्हणाले. (Pune News)
——
News title | Pune Metro |  Who is responsible for metro delay?  |  This is a game played with the dream of Punekar  Mohan Joshi

Municipal Elections | Chandrashekhar Bawankule | NCP | राष्ट्रवादी न्यायालयात गेल्याने महापालिका निवडणुकांना होतोय उशीर 

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

Municipal Elections | Chandrashekhar Bawankule | NCP | राष्ट्रवादी न्यायालयात गेल्याने महापालिका निवडणुकांना होतोय उशीर 

 

: चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका 

Municipal Elections | Chandrashekhar Bawankule  | NCP | महापालिका निवडणुका घेण्यास भाजप-शिवसेना (BJP-Shivsena) आजही तयार आहे. ‘महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi) प्रभागरचनेसंदर्भात (Ward Structure) घेतलेला चुकीचा निर्णय आम्ही रद्द केला. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) न्यायालयात गेली आहे. म्हणून निवडणुकांना उशीर होत आहे,’’ अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP State President Chandrashekhar Bawankule) यांनी  राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. (Municipal Elections | Chandrashekhar Bawankule | NCP)

: पुणे लोकसभेबाबत कुठलाही निर्णय नाही

 
पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीसंदर्भात (Pune Loksabha By election) बावनकुळे यांना विचारले असता यावर निर्णय झालेला नाही, त्यामुळे आता त्यावर बोलण्यावर काही अर्थ नाही, असे सांगून बावनकुळे यांनी प्रश्नाला बगल दिली. 

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (BJP National presidetn J P Nadda) यांच्या मुंबई दौऱ्यावरून शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता, ते म्हणाले, ‘‘किंचित सेनेतील नेतेमंडळी सोडून जातील या भीतीनेच मुंबईत कोणी भाजपचे नेते आले की राऊत टीका करतात.’’ ‘‘मुंबईत महापौर (Mumbai Mayor) आमचाच होणार,’’ असेही त्यांनी सांगितले. तसेच जेव्हा केव्हा निवडणुका होतील, तेव्हा नड्डा यांचा प्रवास किती महत्त्वाचा होता हे संजय राऊत यांना कळेलच.’’
कुरुलकर यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) संबंधाबाबत बावनकुळे म्हणाले, ‘‘पक्षाने त्यावर भूमिका का मांडावी? त्यांची चौकशी सरकारमार्फत केली जात आहे. कोणत्या एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला, तर त्यामुळे संस्थेला अथवा संघटनेला दोष देता येणार नाही. जर त्या व्यक्तीने गुन्हा केला असेल, तर त्यावर कारवाई झालीच पाहिजे, ही पक्षाची भूमिका आहे. तो कोणत्या धर्माचा आहे किंवा जातीचा आहे, हे बघून भाजप कोणालाही टार्गेट करत नाही.’’
—–
News Title | Municipal Elections | Chandrashekhar Bawankule | NCP | Municipal elections are delayed due to NCP going to court: Criticism of Chandrasekhar Bawankule