Tag: pune
चार धरणातील पाणीसाठा पोहोचला ३.६७ टीएमसी वर
| धरण क्षेत्रात जोरदार पाऊस
पुणे : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत गेल्या तीन दिवसापासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडवासाला या चारही धरणाचा एकूण पाणीसाठा ३.६७ टीएमसी झाला आहे. मागील वर्षी याच दिवशी हा साठा ८.६७ टीएमसी इतका होता.
हा पाणी साठा २ जुलै रोजी २.५१ टीएमसी पर्यंत खाली आला होता. मात्र, गेल्या तीन ते चार दिवसापासून या चारही धरणात पावसाला सुरुवात झाली होती. तर सोमवारी रात्री नंतर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने रात्रीत शहराचे ८ दिवसांचे पाणी वाढले आहे.
सोमवारी सायंकाळी हा पाणीसाठा २.७६ टीएमसी होता तो मंगळवारी सकाळी ०.२० ने वाढून २.९६ झाला असल्याची पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. तर बुधवारी सकाळी हा पाणी साठा ३.६७ टीएमसी झाला हे. या चारही धरणात अद्यापही पासून सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात ओढे, नाले तसेच आसपासच्या परिसरातून पाणी येत असल्याने हा साठा आणखी वाढेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार, खडकवासला १९ मिमी, पानशेत ६८ मिमी, वरसगाव ७० मिमी तर टेमघर धरणात ६५ मिमी पावसाची नोंद गेल्या २४ तासात झाली आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून विद्यार्थ्यांकरिता वार्षिक, सहामाही व त्रैमासिक पासची सुविधा
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून विद्यार्थ्यांकरिता सध्या रुपये ७५०/- चा मासिक पास वितरित करण्यात येत आहे. यामध्ये पासेसचा विद्यार्थांनी शैक्षणिक धोरणाकरिता जास्तीत जास्त लाभ घेण्याच्या दृष्टीने ७ जुलै पासून महामंडळाकडून नव्याने वार्षिक पास रुपये ५,०००/-, सहामाही पास रुपये ३,०००/- व त्रैमासिक पास रुपये २,०००/- पासेस वितरित सुरू करण्यात येत आहे.
यापूर्वी रुपये ७५०/- च्या पास वितरणाची जी कार्यपद्धती अवलंबण्यात येत आहे तीच कार्यपद्धती नव्याने सुरू करण्यात येणार्या पासेस करता कार्यान्वित राहील. यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
नव्याने सुरू करण्यात आलेल्या पासबाबतची संपूर्ण माहिती परिवहन महामंडळाच्या पास केंद्रांवर मिळेल.
वरील प्रमाणे नव्याने सुरू करण्यात आलेले सवलतीचे विद्यार्थी वार्षिक पास रुपये ५०००/- हा परिवहन महामंडळाच्या स्वारगेट बी.आर.टी. बिल्डिंग मुख्यालय क्र.१ च्या शेजारील पास विभाग येथे मिळेल. सहामाही पास रुपये
३,०००/- व त्रैमासिक पास रुपये २,०००/- हे दिनांक ०७/०७/२०२२ पासून परिवहन महामंडळाच्या सर्व पास केंद्रावरून वितरित करण्यात येतील. तरी या सवलतीच्या पासचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे.
प्रभाग रचनेला स्थगिती द्या
| माजी नगरसेवकांची मागणी
आयोगाला दिलेल्या पत्रानुसार चोकलीन्गम अहवालाची मागणी आम्ही हायकोर्टामध्ये दाखल केलेल्या याचिकेमध्ये केली होती. आयोगाच्या वकिलाने हायकोर्टामध्ये स्टेटमेंट केल्याप्रमाणे आम्हाला ही कागदपत्र प्राप्त झाली. या संदर्भामध्ये उल्लेख केलेल्या पत्राची छाननी केली असता
त्यामध्ये प्रभाग क्रमांक 12, 13, 15 आणि 57या प्रभाग रचनेचे राज्य निवडणूक आयोगाची मान्यतानसताना बदल झालेले आढळले ही बाब आम्हाला गंभीर वाटली म्हणून आम्ही महानगरपालिकांच्या अधिकाऱ्याकडे चौकशी केली असता त्यावेळेला त्यांनी आम्हाला असे सांगितले की आमच्या
पातळीवर आम्ही कुठलेही बदल केले नाही. तर राज्य निवडणूक आयोगाने आम्हाला अंतिम प्रभाग रचना मंजुरी बाबत १२ मे रोजी पत्र क्रमांक रानिआ/मनपा-२०२२ / प्र.क्र.६ /का-५ दिनांक १२ मे २०२२ हे पत्र पाठवले आणि त्या पत्राप्रमाणेच आम्ही प्रभाग रचना केली त्या पत्राची प्रत त्यांनी आम्हाला दिली. आम्ही दोन्ही प्रत्र तपासले असता एक गंभीर बाब आमच्या निदर्शनास आली. आम्हाला निवडणूक आयोगाने दिलेले पत्र व महानगर पालिकेला पाठवलेले पत्र एकाच तारखेचे एकाच जावक क्रमाकाचे असल्याचे स्पष्ट दिसत आहे. यामधील दोन्ही पत्रामधील मजकुरात फरक केला आहे. त्यामध्ये मुख्यता प्रभाग क्रमाक कमी जास्त दाखविण्यात आलेले आहेत.
याबाबत पुणे महानगरपालिकेची व पुणेकर नागरिकांची आणि आयुक्त म्हणून आपली देखील फसवणूक आपलेच अधिकारी अविनाश सणस यांनी केली आहे असे आमचे मत झाले आहे. कारण या दोन्ही पत्रांच्या मध्ये आयुक्त राज्य निवडणूक आयोग यांच्या मान्यतेने असा उल्लेख आहे परंतु आपण कशाला नेमकी मान्यता दिली हे स्पष्ट होत नाही. कारण याच्यामध्ये प्रभागांचे नंबर आणि क्रमांक वेगळे असल्यामुळे हा गोंधळ निर्माण केल्यामुळे ही परिस्थिती झालेली आहे या अधिकाऱ्याचा मागचा
इतिहास तपासला तर कागदा पात्रांच्या हेराफेरीमध्ये त्यांच्यावर लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे असे फेरफार करून फसवणूक करायची अशी त्यांची मानसिकता आहे असे आमच्या लक्षात आले.
आपल्या स्तरावर या संदर्भामध्ये पुढच्या आठ दिवसांमध्ये निर्णय करावा. जर या संदर्भात निर्णय केला नाही तर आपली राज्य निवडणूक आयोग ही संस्था ७४व्या घटनादुरुस्तीच्या नंतर निर्माण झालेली स्वायत्त संस्था आहे त्यामुळे त्या संदर्भातला कायदा राज्य विधिमंडळाने केला आहे त्यामुळे राज्य विधिमंडळाकडे याविरुद्ध दाद मागावी लागेल अन्य दुसरा कुठलाही पर्याय आमच्यासमोर दिसत नाही. त्यामुळे प्रभाग रचनेला स्थगिती द्यावी. या मागण्या आम्ही आपल्याकडे करत आहोत. असे ही पत्रात म्हटले आहे.
धरण क्षेत्रातील जोरदार पावसाने पाणीसाठ्यात वाढ
पुणे : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत गेल्या दोन दिवसापासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडवासाला या चारही धरणाचा एकूण पाणीसाठा २.९६ झाला आहे.
हा पाणी साठा २ जुलै रोजी २.५१ टीएमसी पर्यंत खाली आला होता. मात्र, गेल्या दोन ते दिवसापासून या चारही धरणात पावसाला सुरुवात झाली होती. तर सोमवारी रात्री नंतर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने रात्रीत शहराचे चार दिवसांचे पाणी वाढले आहे.
सोमवारी सायंकाळी हा पाणीसाठा २.७६ टीएमसी होता तो मंगळवारी सकाळी ०.२० ने वाढून २.९६ झाला असल्याची पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. तर या चारही धरणात अद्यापही पासून सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात ओढे, नाले तसेच आसपासच्या परिसरातून पाणी येत असल्याने हा साठा आणखी वाढेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार, खडकवासला १९ मिमी, पानशेत ५० मिमी, वरसगाव ५३ मिमी तर टेमघर धरणात सर्वाधिक ६६ मिमी पावसाची नोंद गेल्या २४ तासात झाली आहे.
प्रारुप मतदार याद्या राष्ट्रवादीच्या दबावाखाली
| भाजपचा आरोप
आगामी निवडणुकांसाठी जाहीर केलेल्या प्रारूप मतदार याद्या महापालिका प्रशासनाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावाखाली तयार केल्याचा आरोप भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केला.
प्रारुप मतदार यादीतील त्रुटी आणि घोळांबाबत मुळीक यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन चर्चा केली. महापालिका निवडणुकीच्या मतदार याद्या तपासणीसाठी आणि दुरुस्तीसाठी मुदतवाढ मिळावी, मतदार याद्यांमधील त्रुटी दूर कराव्यात अशा मागण्या केल्या. अन्यथा न्यायालयात दाद मागावी लागेल. असा इशारा दिला.
मुळीक म्हणाले, महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी महापालिका प्रशासनाने दिनांक 23 जून 2022 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. ती करताना एका प्रभागातील मतदार दुसर्या प्रभागात टाकणे काही याद्या गायब होणे, असे धक्कादायक प्रकार समोर आले आहे. महापालिका हद्दी बाहेरील गावातील मतदारांचा पुणे महापालिकेच्या विविध प्रभागांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. मतदार याद्या बीएलओ कडून करून घेणे अपेक्षित असताना संबंध नसलेल्या लोकांकडून मतदार याद्या फोडल्या गेल्याने त्यात चुका झाल्या आहेत. विविध प्रभागांमधील चार ते पाच आणि दहा ते पंधरा मतदार याद्या दुसर्या प्रभागात जोडल्या गेल्या आहेत. 58 प्रभागांपैकी 17 प्रभागात लोकसंख्या कमी आणि मतदार संख्या जास्त असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. हे प्रमाण जवळपास 30 टक्के इतके आहे.
यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, वर्षा तापकीर,मा सभागृह नेते गणेश बिडकर, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येंनपुरे, दिपक पोटे, दिपक नागपुरे, सुशिल मेंगडे, प्रशांत हरसूले, मा.नगरसेवक योगेश मुळीक, मंजुषा नागपुरे, छाया मारणे, जयंत भावे, मंजुश्री खर्डेकर, राहूल भंडारे, सुनिता वाडेकर, गणेश कळमकर, तुषार पाटील, महेश गलांडे, पूनित जोशी, साचीन मोरे, महेश पुंडे, अनिता तलाठी, चंद्रकांत जंजिरे, सुनिल खांदवे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
छद्मविज्ञानाच्या पराभवासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार आवश्यक
– मच्छिन्द्रनाथ मुंडे यांचे प्रतिपादन
– महाराष्ट्र अंनिसचे चमत्कार सादरीकरण प्रशिक्षण
पुणे : विज्ञानाचा आधार असल्याचे सांगून अनेक गोष्टी लोकांवर बिंबविल्या जातात. मात्र त्याला विज्ञानाचा आधार नसून ते छद्मविज्ञान असते. छद्मविज्ञानाचा पराभव करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करण्याची गरज आहे, असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य पदाधिकारी मच्छिन्द्रनाथ मुंडे यांनी व्यक्त केले.
शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर स्थापित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शिवाजीनगर पुणे शाखेने ‘चमत्कार प्रशिक्षण’ आयोजित केले होते. प्रशिक्षणप्रसंगी मुंडे बोलत होते. कागदात असलेले तथाकथित भूत जाळून चमत्कार प्रशिक्षणाचे उदघाटन महाराष्ट्र अंनिसच्या विज्ञान बोध वाहिनीचे राज्य कार्यवाह भास्कर सदाकळे यांनी केले. राज्य पदाधिकारी विशाल विमल यांनी प्रशिक्षणाचा समारोप केला. प्रशिक्षणार्थींना सहभाग प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. सदाकळे यांनी चमत्कारांचे सादरीकरण अत्यंत रंजकपद्धतीने करून दाखविले. चमत्कारामागील वैज्ञानिक कारणे, हातचलाखी, रासायनिक घटकांचा वापर, सादरीकरणातील सफाईदारपणा मुंडे यांनी सांगितला.
डोळ्यांवर कापड बांधूनही वाचता येणे अर्थात ‘मिडब्रेन’, ‘ग्रहणात शिजवलेल्या अन्नावर अनिष्ट परिणाम होतो’, ‘चुंबकांच्या वापराने कर्करोग, मधुमेह कसा समूळ बरा होतो’ असे चमत्काराचे दावे करून छद्मविज्ञान बिबवले जात आहे. मात्र विज्ञानाच्या चष्म्यातून प्रत्येक गोष्टीची चिकित्सा केल्यास छद्मविज्ञान खोटे पडते, असे मुंडे यांनी सांगितले.
आजूबाजूला लहान घडलेली घटना ही दुसऱ्यापर्यंत पोहोचताना मोठ्या स्वरूपात सांगितली जाते. त्यामुळे चुकीची माहिती व गैरसमज पसरतात. लहान बुवाबाजी करणारा ढोंगीबाबा असेल तर त्याला मोठे करण्याचे काम काही जण करत असतात. चमत्काराला नमस्कार करून लोक फसतात आणि त्यातून आर्थिक, मानसिक, शारीरिक शोषण सुरू होते. त्यामुळे चमत्कारी गोष्टीना विरोध करून वास्तविक गोष्टीची कास धरण्याची गरज आहे, असे मत भास्कर सदाकळे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र अंनिसच्या थॉट विथ ऍक्शन जर्नलचे संपादक हर्षदकुमार मुंगे यांनी प्रास्ताविक केले. शाखा सचिव घनश्याम येणगे, शाखा सहसचिव अरिहंत अनामिका यांनी सुत्रसंचलन केले. माधुरी गायकवाड यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. मयूर पटारे, वनिता फाळके, विनोद खरटमोल यांनी गाणी सादर केली. ओंकार बोनाईत आणि सागर तुपे यांनी मनोगत व्यक्त केले. सोशल मीडिया विभागाचे राज्य सहकार्यवाह रविराज थोरात यांनी आभार व्यक्त केले.
अंतिम मतदार यादी प्रसिद्धीसाठी 23 जुलै पर्यंत अवधी द्या
| महापालिकेची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी
याबाबत महापालिकेकडून निवडणूक आयोगाला पत्र पाठवण्यात आले आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादीवर 3 जुलै पर्यंत प्राप्त होणाऱ्या हरकती व सूचनांचा निपटारा करून अंतिम प्रभागनिहाय मतदार यादी 9 जुलै रोजी प्रसिद्ध करणेबाबत कळविले आहे. त्यानुसार दि. ३१/०५/२०२२ रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार संघाच्या यादीच्या आधारे प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी तयार करणेत आली आहे. सदर प्रारूप प्रभागनिहाय मतदार यादीवर पुणे शहरातील विविध राजकीय पक्ष, नागरिक आणि सामाजिक संघटना यांचेकडून दि.०३/०७/२०२२ पर्यंत ४२७३ इतक्या मोठ्या संख्येने हरकती व सूचना प्राप्त झालेल्या असून त्यामध्ये प्रामुख्याने ०३/०७/२०२२ रोजीच्या शेवटच्या एका दिवशी १७४७ इतक्या मोठ्या प्रमाणात हरकती व सूचना प्राप्त झालेल्या आहेत. तसेच विविध राजकीय पक्षांकडून ५६२ हरकती प्राप्त झालेल्या आहेत.
—
समाविष्ट २३ गावांतील शाळांमधील शिक्षकांच्या नियुक्त्यांवर तोडगा काढा
| महापालिका आणि जिल्हा परिषदेकडे खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी
वॉकेथॉन’मध्ये ५०० डॉक्टरांचा सहभाग
बदलत्या जीवनशैलीमुळे होणारे आजार टाळण्यासाठी नियमित चालण्याचा व्यायाम करा असे आवाहन डॉ. शशांक शहा यांनी दिला.
डॉक्टर दिनानिमित्त शहर भाजपच्या वैद्यकीय आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘वॉक फॉर हेल्थ’ या वॉकेथॉनचा शुभारंभ करताना डॉ. शहा बोलत होते. वॉकेथॉनमध्ये ५०० हून अधिक डॉक्टरांनी सहभाग घेतला.
भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, माजी आमदार शरद ढमाले, डॉ. शशांक शहा, डॉ. संदीप बुटाला, डॉ. धनंजय जोशी, डॉ. प्रदीप सेठीया, डॉ. उज्ज्वला हाके, डॉ. शुभदा कामत, डॉ. मनिषा जाधव, डॉ. सुनील चव्हाण, डॉ. रोशन जैन, दिलीप वेडे-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. शहा पुढे म्हणाले, मधुमेह, लठ्ठपणा अशा आजारांचा प्रादुर्भाव वाढत आहे. या आजारांमुळे ८० टक्के इतर आजार होण्याची भिती असते. त्यासाठी चालण्या सारखा व्यायाम महत्त्वाचा आहे.
मुळीक म्हणाले, नियमित व्यायाम करण्याचा संदेश देण्यासाठी डॉक्टरांचा सहभाग असणारा हा उपक्रम महत्त्वाचा असल्याचे मत मुळीक यांनी व्यक्त केले. डॉक्टरांनी रुग्णांना सेवा देताना, स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.